Skip to main content

कळी जपताना....

लेखक स्मिता श्रीपाद यांनी मंगळवार, 08/04/2014 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
केवळ चार वर्षाचं छोटसं पिल्लु.... आत्ताशी कुठे शाळेच्या फुलपाखरी विश्वात प्रवेश केलेला..... सगळं जग खुप गोड आणि रंगिबेरंगी वाटणारं वय.... आणि अचानक तिच्या आयुष्यात काहितरी वेगळच घडत....काय घडलं ? कसं घडलं ? हे पण कळलं नसेल तिला.... रोज भेटणारे बसमधले काका आपल्याशी असे का वागले हे पण कळलं नसेल..... कसं सहन करायचं ते तिनं..... चार वर्षांच्या चिमुरडीवर ओढवलेल्या प्रसंगाने अस्वस्थ झालेय मी कालपासुन.... माणसं इतकी विक्रूत का होत असतील.....? कालच्या ईसकाळ मद्धे मी ही बातमी वाचली....आणि मनात खुप प्रश्ण निर्माण झाले..... काल घरी गेल्या गेल्या माझ्या ३.५ वर्षाच्या मुलीला पोटाशी घेउन बसले.....डोकं सुन्न झालं होता.....माझ्या ईतक्याश्या पिल्लाला मी हि घटना समजावुन सांगु शकत नाही..... असे लोक समाजात असतील तर आमच्या मुलीला आम्ही कसं जपायचं.....? कुठल्या भाषेत समजावायचं इतक्या चिमुकल्यांना....? अनोळखी माणसांशी बोलु नका , त्यांच्याकडुन काही घेउ नका हे तर कधीच सांगुन आणि शिकवुन झालय....पण ओळखिची माणसं पण असं काही वागत असतील तर ? अशावेळी काय शिकवायचं मुलांना.....? ३-४ वर्षांच्या छोट्या मुलांना स्वतःचा बचाव वगैरे करण कसं काय जमेल....? मग आम्ही त्यांना कसं समजावणार जपुन रहायला....? आणि कोणाकोणापासुन ? मिपा वर विविध क्षेत्रातले तज्ञ आहेत.... छोट्या मुलांना या बाबतीत सावध रहायला आम्ही कसं शिकवु याबद्दल कोणी मार्गदर्शन करेल का प्लीज ? - एक अस्वस्थ आई....

वाचने 34127
प्रतिक्रिया 100

प्रतिक्रिया

In reply to by रेवती

माझंही हेच मत आहे रेवती.. कारण अभ्यास काय घरातही होईल. तेवढ्यासाठी इतक्या लहान मुलाला उगाच २ तास बस मध्ये घालवायला लावणे असुरक्षित आणि मुलाला दमविणारे आहे. माझा चांगलीच शाळा (म्हणाजे बेस्टच हवं..वाला) अट्टाहास नाही.. फक्त पुढे जाऊन अ‍ॅडमिशनला खुप त्रास होईल का अशी शंका वाटते..

In reply to by पिलीयन रायडर

धन्यवाद...माझ्या मनातील प्रश्न विचारला नेमका.
३ र्‍या वर्षी मी त्याला शाळेत घातले तर ह्या हुन वेगळे काय शिकवतात (प्लेग्रुप, मिनी केजी, सिनिअर केजी मध्ये)? मी माझ्या मुलाला ४/५ व्या वर्षी शाळेत घालु शकते का?
चर्चा वाचत आहे.

In reply to by शिद

इतक्या लहान कोवळ्या मुलांना शाळेत घालणं याला निदान ७-८ वर्षांपर्यंत होम स्कूलिंग हा पर्याय असू शकतो का?

In reply to by बहुगुणी

मला देखिल हाच प्रश्न पडलाय. जरा समज आणि ताकद येइपर्यंत मुलांना एकट्याना कुठेही पाठवणं नको होतं.. शिवाय निदान लहानपणीतरी मुलांना मोकळेपणानी घरी खेळू द्यावं असं पण वाटतं. त्यांची दप्तरे बघवत नाहीत.

In reply to by कवितानागेश

माझ्या एका मैत्रिणीने आपल्या मुलासाठी होम स्कूलिंगचा पर्याय निवडला आहे. तिच्याशी बोलताना समजलं की पुण्यामध्ये बर्‍याचजणांनी सद्ध्या हा पर्याय निवडला आहे आपल्या पाल्यांसाठी.

In reply to by यशोधरा

म्हणजे होम स्कूलिंग साठी कोठे नोंदणी करावी लागते का? अभ्यासक्रमाचे तपशील कोठे आणि कसे ठरतात? परीक्षा कोठे देणार? पालकांचा अथवा जो कोणी शिक्षक आहे त्यांची काही विशिष्ट शैक्षणिक पात्रता हवी का?

In reply to by कवितानागेश

त्यांची दप्तरे बघवत नाहीत. मलाही ती दप्तरे बघवत नाहीत. आजच खांदे दुखण्याची तक्रार आमच्याघरी आलीये.

In reply to by बहुगुणी

नाही.. मला होम स्कुलींग करायचं नाही.. माझा मुलगा शाळेत जायला हवाच आहे.. कारण शाळेत मुलं अजुन मुलांना भेटतात.. त्यांच्यात जास्त रमतात.. रोज नियमित कुठेतरी ठरल्या वेळेला जाण्याची सवय होते.. आणि जगात आपण एकमेव मुल नाही ह्याची जाणिव होते! माझा मुद्दा असाय की माझा मुलगा तसाहि ८ तास पाळणाघरात असतो.. तिथेही त्याला अभ्यासक्रम आहेच.. कदाचित शाळेएवढा भरीव नसेल पण बेसिक शिकवत आहेतच.. मग आणखिन "शाळा" म्हणुन वेगळ्या ठिकाणी पाठवायची खरच गरज उरते का? अभ्यासक्रमातला फरक मी घरी भरुन काढु शकेन आणि शाळेचे बाकी फायदे पाळणाघरात आहेतच.. होम स्कुलिंग बद्दल मितान सांगु शकेल..

नुकत्याच झालेल्या पेनसिल्वेनिया स्टॅबिंग केसमुळे कालची संध्याकाळ मुलाला इंन्स्ट्रक्षने देण्यात गेली. शिवाय माझा मुलगा व त्याचा मित्र एकदा बंदुकीबद्दल (सहज) बोलत होते तरी ते ऐकून एकाने तक्रार केली व आम्हाला शाळेकडून तसे कळवण्यात आले होते. त्यावेळी लगेच पोहोचता येण्याचे मह्त्व समजले. नंतर माझा मुलगा व त्याच्या मित्राला ३ दिवस आपापल्या आईवडीलांनी शाळेत सोडावे असे सुचवण्यात आले. त्यामुळे असे बोलणेही लोकांना किती घाबरवू शकते हे त्यांना समजले. आज त्याच्या प्रॉजेक्टचा काही भाग शाळेच्या मैदानावर जाऊन करायचा आहे तरी मला धाकधुक वाटत आहे. मागल्या वर्षी कनेटिकट येथे बंदुकीने विद्यार्थ्यांची टीनएजरने केलीली कत्तल, काल परवाचे स्टॅबिंग अशाने शाळेकडून, समाजाकडून आपण, आपल्याकडून मुलांनी, मुलांकडून आपण/ शिक्षकांनी नक्की काय अपेक्षा करावी हेच समजेनासे होते. आता पिक अपला आईवडील पोहोचण्यापूर्वीचा थोडा वेळ मुलांनी शाळेच्या आत उभे राहणे सुरक्षित की बाहेर? काही सुचत नाही. हे असले विचार डोक्यात होते म्हणून पहाटेच दचकून जाग आली.

In reply to by पिलीयन रायडर

सतत भीतीच असते असे नाही पण काही घडले की बरेच दिवस काळजी करण्यात आणि घेण्यात जातात. लहान मुले निदान आपल्या नजरेसमोर असतात पण मोठ्या मुलांना सारखे घरात बांधून ठेवता येत नाही व ते बरोबरही नव्हे. थोडेथोडे एकटे सोडणे वगैरे करताना जिवाची घालमेल होते. मुलेही नवीन धाडस करू पाहतात.

In reply to by रेवती

पण मोठ्या मुलांना सारखे घरात बांधून ठेवता येत नाही व ते बरोबरही नव्हे. थोडेथोडे एकटे सोडणे वगैरे करताना जिवाची घालमेल होते. मुलेही नवीन धाडस करू पाहतात.
खरं आहे. कालच मुलगी म्हणत होती की १६ वर्षाची झाली की ती कार शिकणार्/चालवणार वगैरे. मी एकदम काळजीची प्रतिक्रिया दिली. त्यावर ती म्हणते - Mama, you cannot keep me kid all the time. मी म्हटलं - Unfortunately not :(

३० एक वर्षापूर्वी मी आणि मा़झे काही मित्र एका 'सिंहांच्या' मंडळाचे नाममात्र वर्गणी भरुन 'छावा' सदस्य झालो. वैद्यकिय शिबिरे, अपंगांना चाकांची खुर्ची वाटप अशी अनेक सामाजिक कार्यक्रमात आम्ही छावे भाग घ्यायचो. सिंह् सदस्य हे समाजातील सर्व थरातील प्रतिष्ठित व्यक्ति होत्या, त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला मजा वाटत होती. आजुबाजूचे आमच्याकडे आदराने बघायचे. एकदा एका अनाथाश्रमाला मदतीच्या कार्यकामाला आम्ही गेलो होतो, अनाथाश्रमातील मुलींनी सांस्क्रुतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रम आटोपल्यावर आश्रमातील महिला कर्मचार्याबरोबर आमचे 'सिंह' सभासद एका खोलीत मिटिंगसाठी गेले व दरवाजा बंद केला . थोडया वेळाने एका महिलेबरोबर आश्रमातील १०-१२ तरुण मुली त्याच खोलीत शिरल्या व दरवाज्या आतून बंद केला. बराच वेळ झाला तरी मिटिंग संपत नव्हती, आमच्यातील एकाने कुतूहल म्हनून त्या खोलीकडे गेला व दरवाज्याच्या फटितून आत बघितले, त्याने हळुच आम्हाला खुणेने बोलावले, आम्ही फटितून जे काही बघितले ते पाहुन आम्हालाच शरम वाटली. जे हात एरवी सराईतपणे शस्त्रक्रिया करत तेच हात आज कोवळ्या शरिरावरुन फिरत होते. आश्रमाच्या मदतीच्या बदल्यात तेथील महिला व्यवस्थापक मंडळाने कोवळ्या कळ्या कुस्करायला मदत केली. त्या मुली सुरक्षित हातात नव्ह्त्या. आम्ही सर्वकाही चोरुनच बघितले होते, व जाब विचारण्याईतके 'मोठे' ही झालो नव्हतो. हळूहळू आमच्यातील एक एक छावा मंडळ सोडू लागला शेवटी फक्त सिंह्च उरले, सिंह कसले लांडगेच होते ते. पालकांच्या पंखाखाली जी मुले सुरक्षित नाहीत तेथे अनाथ मुलांची सुरक्षितता कोणाच्या भरोशावर सोपवावी ?

In reply to by मार्मिक गोडसे

अहो .. वाचुन धडधडतय मला.. तुम्ही का नाही तक्रात केलीत?? का नाही पोलीसात कळवलत? किती भयंकर गोष्ट आहे ही.. मला लिहीतानाही त्रास होतोय..

In reply to by मार्मिक गोडसे

बापरे. खूपच भयानक आहे. तुम्हाला तो लांडग्यांचा क्लब माहित असेल तर अजून सुद्धा तुम्ही त्यांचा बुरखा फाडू शकता.

In reply to by खटपट्या

तुमची खात्रीपूर्वक माहिती पोलिसांना/ महिला आयोगाला कळवा; ती कळवल्याने आजही तुम्ही काही अश्राप स्त्रियांना वाचवू शकता (ती न कळवल्याने मात्र अजाणता तुम्ही त्यांच्या शोषणात सहभागी व्हाल!) (त्या 'संस्थे'चं नाव इथे जाहीर करण्याचं टाळा; मिपा व्यवस्थापनाला विनाकारण बदनामीकारक मजकूर पसरवण्याबद्दल गोत्यात येऊ शकेल असं वाटतं.)

In reply to by बहुगुणी

तुमचे म्हणणे मान्य आहे. ३० एक वर्षापुर्वीची ही घटना. आमच्यातील एका मित्राला समाजसेवेची आवड होती, तो घुसला त्याने आम्हालाही खेचले. आमच्यामध्ये सक्रिय कार्यकर्ते कमी व माझ्यासारखे खोगिरभरती कार्यकर्ते जास्त होते. मोठ्या होटेलातील मिटिंग व तेथिल मेनुचे आकर्षण अधिक. त्या वयात अशा घटना हाताळण्याचे कौशल्य निदान माझ्याकडे तरी नव्हते. परंतु १० वर्षापुर्वी आमच्या रहिवासी सोसायटित एकाने अनधिकृत ट्रांसपोर्ट सुरु केले होते. त्यांच्या कामगारांमुळे सोसायटितील माहिलांना त्रास होत असे. तक्रार करुनहि सोसायटीने कोणतीहि कारवाही केली नाहि. अखेर मी व माझ्या वडिलांनी एके दिवशी त्याच्या कर्मचार्यांना शिवागीळ करुन धमकावले. प्रकरण पोलिस स्टेशन पर्यंत गेले. व तेथेच मिटले. व ते कार्यालय कायमचे बन्द झाले. सोसायटितील महिला सुरक्षित झाल्या. त्या पापातून थोडं तरी मुक्त झालो. परंतू अपराधि भावना कायम आहे. तुम्ही जाणीव करुन दिल्यापासून ती अधिकच वाढली.

In reply to by मार्मिक गोडसे

रच्याकने कंच्या गावच्या कट्याची गोश्ट हाये ही ? न्हाइ लै परतिषीस्टीत लोग्जस या कट्याचे सडस्य गावोगावी असतात म्हणौन इचारले.

आपल्या देशातील *** राजकारणी ! बलात्कार करणाऱ्याला फाशी कशाला द्यायला हवी-मुलायम यालाच म्हणतात "यादवी माजणे". माझा आपल्या देशातील राजकारण्यांवर राग या आणि अशाच अनेक कारणांसाठी आहे.ही राजकारण्यांची हरामखोर अवलाद आपल्याच देशातील जनतेचे आणि देशाचे लचके तोडण्यास बसलेली आहे.

In reply to by मदनबाण

आरोपी (गुन्हेगार) एका विशिष्ट धर्माचे असल्याने हे सेक्युलर मसीहा असले बोलत आहेत. मुल्ला यम सिंगांचा इतिहास बघता ते स्त्रियांबद्दल सहानुभूतीसुद्धा बाळगून कधीच राहिले नव्हते. त्यांच्या स्वतःच्या २ बायका अनेक वर्षे एकाच वेळी जिवंत होत्या. या लोकांना सामान्य लोकांचे कायदे लागू होत नाहीत बहुतेक. त्यांची पहिली पत्नी प्रदीर्घ मानसिक आजरानंतर कोणत्याही उपचारांशिवाय २००३ साली वारली. त्यांच्याकडून कसल्या अपेक्षा करायच्या? :(

In reply to by पैसा

कुठल्या बलात्कार खटल्यातील आरोपी एका विशिष्ट धर्माचे आहेत? (मुलायमची प्रतिक्रिया मूर्खपणाची आहे हे अधोरेखित करतो.) राजकारणी लोकांच्या बायकांबाबत सहमत. मुलायम-करुणानिधीसारखे दोनदोन बायका करतात किंवा इतर नेत्यांसारखे असलेल्या बायकांना परित्यक्ता करतात.

In reply to by आजानुकर्ण

मतांसाठी कायपन! आणि खाजगी वागणूक कशी असेल ते मात्र कोणी विचारू नये. सामान्य लोकं बसतात भांडत, अमका पक्ष बरा आणि तमका नेता वाईट म्हणत. :(

In reply to by पैसा

मूळ आक्षेप विशिष्ट धर्माचेच लोक जास्त बलात्कार करतात व मुलायम अशा धर्मीयांची मते मिळवू पाहण्यासाठी बलात्काराचा गुन्हा सौम्य करु पाहतो या (व अशा सौम्यीकरणाला विशिष्ट धर्माचे लोक बळी पडून व मतेही देतील असे गृहितक असणाऱ्या) आरोपाला आहे. पुण्यातील मुलीसंदर्भात झालेला प्रकार किंवा मुंबई/दिल्लीतील घटना यात या एका विशिष्ट धर्माचेच लोक जबाबदार होते असे आढळले नाही. खाजगी वागणूक कोणाचीही विचारु नये. मोदी असो वा मुलायम हे मान्य.

http://www.cnn.com/2014/04/11/world/europe/vatican-pope-sex-abuse/index… चर्चच्या पाद्र्यांनी लहान मुलांचे जे लैंगिक शिषण केले, त्याबद्दल पोपने माफी मागितली व हेही सांगीतले की गुन्हेगारांना शिक्षा होइल व असे प्रकार झाल्यास चर्चवर निर्बंध घातले जातील, यापुढे चर्च कर्मचार्‍यांना ट्रेनिंगही देण्यात येईल.

या धाग्यावर आलेले काही प्रतिसाद 'काळजी घेणे' पेक्षा 'काळजी करणे' कडे झूकलेले वाटतात त्यात काही ठिकाणी सेपरेशन अँक्झायटीही दिसते. समस्या असतात नाही असे नाही तरीपण बहुतांश वेळा बहुतांश जग व्य्वस्थीत चालू असत याचा नकारात्मक बातम्यांच्या भडीमारा खाली विसरही पडू देऊ नये. आयूष्यात जोखीम ही सर्वत्र असते ती दारी असते तशी घरीही असते. जोखीमीच्या स्थिती कशा हाताळाव्यात याचे प्रशिक्षण महत्वाचे. सांगण्याचा उद्देश प्रोटेक्शन आवश्यक असतेच पण केअर अँड प्रोटेक्शन ओव्हरप्रोटेक्शन मध्ये एंड अप होऊ नये. बंधने घालताना मुले त्यांच्या नैसर्गिक विकासापासून वंचीत होणार नाहीत धीट होतील याचा समतोलही सर्व पालक पाहतच असतात तरी पण एक स्मरण करणे गरजेचे म्हणून हा प्रतिसाद

रोज एक वैताग देणारी गोष्ट कळतेच. लहान मुलाला किंवा मुलीला थेट चॉकलेट न देता पालकांकडे देण्याची प्रथा मी माझ्यापुरती सुरु केली ती याच कारणामुळे. पण जर फक्त आई - मूल दोघेच असतील तर पंचाईत. म्हणजे आईचा भलताच गैरसमज व्हायचा आणि फटके पडायची वेळ येईल.