Skip to main content

ज्योतिषशास्त्राचा फायदा

लेखक आयुर्हित यांनी शुक्रवार, 28/02/2014 22:07 या दिवशी प्रकाशित केले.
ज्योतिष हे एक खूप महत्त्वाचे व दूरदर्शी शास्त्र आहे. आपण भारतीय खूप नशिबवान आहोत. आपल्याकडे मागील ८००० वर्षांपासून केलेले निरीक्षणे आपल्या ऋषी मुनींनी सांगून/लिहून ठेवले आहेत व ते खूप अचूक आहेत. ज्याप्रमाणे दिवाळीच्या/उन्हाळ्याच्या सुट्ट्यामध्ये आपण सहलीचे नियोजन करण्यासाठी दिनदर्शिकेचा (कॅलेंडरचा) वापर करतो, त्याच प्रमाणे आपल्या आयुष्याचे नियोजन करण्यासाठी ज्योतिष शास्त्राचा खूप फायदा होत असतो. थ्री इडीएट मध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या आवडी निवडी पाहून आपण आपला/मुलांचा अभ्यासक्रम(discipline) निवडून त्याप्रमाणे व्यवसायात पूर्ण यशस्वी होऊ शकतो. हे आपल्याला जन्मकुंडलीत पाहूनही ठरवता येते व मुले लहान असतांना त्यांना त्याप्रमाणे शाळेत/अभ्यास क्रमाला पाठविणे जास्त सोयीस्कर असते यामुळे त्यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाची वर्षे आपण वाचवू शकतो. मोठ्या कंपन्यात/सैन्यात मनुष्य बळ (Human Resource)नेमतांनाही ज्योतिषाचा वापर करून चांगले उत्पादनशील कामगार व विचारवंत अधिकारी शोधून नेमता येतील आणि त्यामुळेही देशाची उत्पादन क्षमता वाढू शकेन.यासाठी HR मॅनेजर ला हा अभ्यास सक्तीचा केला पाहिजे. आजच्या जमान्यात, जोपर्यंत रुग्णाला तो त्रास सुरु होत नाही, तोवर त्याचे pathological reports त्याबद्दल काहीच माहिती पुरवत नाहीत. ज्या दिवशी pathological reports हाती येतात व अचूक निदान होतो तोपर्यंत केस हाताबाहेर गेलेली असते व फक्त हळहळ करण्या पलीकडे तज्ञ फारसे काही करू शकत नाहीत. यासाठी ज्योतिषाचा/जन्म कुंडलीचा वापर करून रुग्णाचे भवितव्य काय असू शकेल, त्याला कितपत व कोणत्या अवयवाला त्रास/नुकसान होवू आहे/शकते हे पाहू शकतो व त्याला त्यासाठी आधीपासूनच (in advance)मार्गदर्शन करू शकतो. कोणते शेअर्स/सेक्टर/Industries कधी वर/खाली जाणार आहेत ह्याचाही खूप मौलिक अभ्यास होऊ शकतो.कोणाला व कधी शेअर्स मध्ये फायदा/तोटा होणार आहे हे सुद्धा याने कळू शकेल. माझ्या मते या शास्त्राचा सखोल अभ्यास करणारे खूप कमी लोक आहेत व बऱ्याच लोकांचा हा व्यवसाय असल्याने त्यात व्यावसायिक फायदे/तोटे असणारच. पण जर आपण सर्वांमिळून जर या अभ्यासात भाग घेतला तर या शास्त्राचा आपणा सर्वांना याचा भरघोस फायदा होईलच.

वाचने 38622
प्रतिक्रिया 93

प्रतिक्रिया

In reply to by अत्रुप्त आत्मा

झोपलेल्याला जागे करता येते, झोपेचे सोंग घेतलेल्याला नाही :) "फलज्योतिष" हा धंदा आहे. त्यामुळे गंदा हैं पर धंदा हैं या न्यायने आपल्या व्यवसायाची पाठराखण करायलाच हवी.

In reply to by आत्मशून्य

@मोदी पंतप्रधान होणार नाहीत.>>> अशीच प्रेडीक्शन करणार ते... या फांदिवरचा कावळा उडेल,त्या फांदिवरचा उडणार नाही. म्हणजे कोणताही उडाला तरी फांदी संदिग्ध ठेवल्यामुळे ती हवी तेंव्हा बदलता येते!

In reply to by अत्रुप्त आत्मा

त्यांनी निसंधीग्धपणे मोदी पंतप्रधान होणार नाहीत, भाजप सत्ता बनवणार नाही व खान्ग्रेसच्या पाठींब्यावर सरकार स्थापन होइल जे ३ ते ३.५ वर्षे चालेल व पुन्हा निवडणुक घ्यावी लागेल असे म्हटले आहे. आपचा यात साधा उल्लेखही नाही हे बघता या पक्षाला भवीष्य नाही असेही बहुदा गृहीत धरावे वाटते. हे सर्व त्यांनी विवीध पक्षांच्या स्थपनेच्या दिवसावरुन व उभे केलेल्या जागावरील उमेदवारांची ग्रहस्थीती वगैरे वगैरे बघुन प्रेडीक्शन केले आहे. केजीरवाल औट घटकेचे मुख्यमंत्री का झाले होते, राहुल का पंतप्रधान होणार नाही हे सुधा त्यांच्या कूंडल्यावाचुन सांगीतले. अर्थात... आपल्या डोक्याबाहेरील ग्रहतार्‍यांची मिमांसा त्यामागे दिलेली असल्याने जास्त खोलात शिरता आले नाही. @प्रकाश घाटपांडे काका, सहमत आहे. जकातदार तर प्रसिद्धीच्या झोतात आले हे नक्किच पण सध्याचे वारे बघता प्रवाहाविरोधी प्रसिध्दीचा उघड झोत आंगवर घेण्यास अंगात गट्स लागतात हे माझे वैयक्तीक मत आहे, अगदी अनेक मिपाकरही या प्रकाराला घाबरतात हे तर आपण रोजच बघतो. त्यामुळे त्यांचे भवीष्यकथन खरेच योग्य ठरते की अयोग्य हे पहाणे रोचक ठरते.

In reply to by नावात्_काय्_आहे

कुंडलीतले दोष काढायला अमुक वारला उपास करा , तमुक वाराला देव दर्शन करा हे वजन करण्यासाठी , का गर्दी वाढवण्यासाठी

In reply to by आत्मशून्य

विशेष असा नाही . :प फक्त समोरच नेमका कोणत्या गटातला हे ओळखायला मदत होते . तुमचं जवळ जर प्रश्नांची उत्तर असेल तर ती दिली तरी चालतील . फक्त प्रश्नाला प्रश्न नको

In reply to by नावात्_काय्_आहे

नाही तर आंका ठरलो नसतो काय ? पण... या क्षणी समजा तुमच्या समोर जिलबी, बासुंदी, श्रीखंड, गुलाबजाम, आणी खिर ठेवली/मेनु असेल तर त्यातुन आपण कोणता निवडाल याचे ठोकताळे बांधु शकतो.

In reply to by आत्मशून्य

बांधा कि राव. ठोकताळे चुकानार नाही याची दक्षता घ्यावी . अजून मूळ प्रश्न तिथेच राहून विषय फक्त बहरकातु नका देऊ

In reply to by नावात्_काय्_आहे

एखादे त्रुणधान्य, (फळभाजी, पालेभाजी, प्राणिज भाजी, मत्स्यभाजी) ह्यापैकी एक किंवा जास्त खाण्याचे योग आहेत. जलपानाचे योग आहेत. परदेशस्थ खाणे उदा. चायनिज ई.ई. खाण्याचेही जोरदार योग दिसतायेत. पण पोटाची काळजी घ्यावी. यापैकीच एक बाधण्याचे क्षिण संकेत दिसतायेत.

त्यांनी निसंधीग्धपणे मोदी पंतप्रधान होणार नाहीत, भाजप सत्ता बनवणार नाही व खान्ग्रेसच्या पाठींब्यावर सरकार स्थापन होइल जे ३ ते ३.५ वर्षे चालेल व पुन्हा निवडणुक घ्यावी लागेल असे म्हटले आहे. जकातदार कुठे आहेत सध्या ? त्यांची ओटी भरावी म्हणतो, खणानारळाने.

In reply to by सुबोध खरे

आता लोकं आपल्या मागे हात धुवुन लागतील हे ज्योतिषपॉवरने समजल्याने त्यांनी अंदमानच्या जंगलात पळ काढला असावा असं वाटत आहे =))

In reply to by सुबोध खरे

@ जकातदार कुठे आहेत सध्या ? त्यांची ओटी भरावी म्हणतो, खणानारळाने.>> आता पाय लावून पळुन जाणार ते! :-D रच्याकने:- जकातदार हा एक अत्यंत बालबुद्धिचा माणुस आहे. भांडावं कोणत्या मुद्द्यांवर? याची बेसिक अक्कल देखिल नाही त्याला!