Skip to main content

माझी कविता

लेखक चन्द्रशेखर गोखले यांनी मंगळवार, 07/10/2008 00:32 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या कवितेवर नाही संस्कार भाषेच्या व्याकरणाचा, प्रतिभा अलंकारांचा, तो आहे केवळ उदगार माझ्यातल्या अनुभूतिचा. कुणाला तरी आई म्हणाव इतका संस्कार आईग! म्हणायला पुरेसा आहे, कुणाला तरी बाप म्हणाव इतका संस्कार बापरे!! म्हणायला पुरेसा आहे कुणापुढेतरी नतमस्तक व्हाव इतका संस्कार अरे देवारे!!! म्हणायला पुरेसा आहे आईग! बापरे!! अरे देवारे!!! इतक आणि इतकच माझ्या कवितेच आयुष्य बाकी शब्दांपेक्षा महत्वाच आहे ते अनुभूतिच विश्व......!
लेखनविषय:

वाचने 3295
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

आवडली कविता. अगदी मनापासून. कुणाला तरी आई म्हणाव इतका संस्कार आईग! म्हणायला पुरेसा आहे, कुणाला तरी बाप म्हणाव इतका संस्कार बापरे!! म्हणायला पुरेसा आहे कुणापुढेतरी नतमस्तक व्हाव इतका संस्कार अरे देवारे!!! म्हणायला पुरेसा आहे खासाच!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

साधी सरळ कविता आवडली !!!! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

चुकुन मी अलंकारा ऐवजी अहंकार शब्द वाचला अगोदर्.पण काही फरक पडत नाही प्रकाश घाटपांडे

गमतीशीर आहे. :-) स्वगतः - केवळ आईग! बापरे!! अरे देवारे!!! हे तीन शब्द व अनुभूती येत असली की करा कविता, व लोकांना छळा. असा संदेश तर नाही ना जात आहे? :-( कृ. ह. घ्या.

आवडली ... माझ्या कवितेवर नाही संस्कार भाषेच्या व्याकरणाचा, प्रतिभा अलंकारांचा, तो आहे केवळ उदगार माझ्यातल्या अनुभूतिचा....छानच !!!

तो आहे केवळ उदगार माझ्यातल्या अनुभूतिचा. माझ्या कवितेच आयुष्य बाकी शब्दांपेक्षा महत्वाच आहे ते अनुभूतिच विश्व......! वा! साधी, सोपी व तेवढीच सुंदर कविता वाचल्याचा आनंद झाला.. तात्या.