Skip to main content

केजरीवालांचे वाराणशीतील भाषण

लेखक श्रीगुरुजी यांनी मंगळवार, 25/03/2014 20:49 या दिवशी प्रकाशित केले.
केजरीवालांचे आजचे काशीतले भाषण १५-२० मिनिटे पाहत होतो. केजरीवालांनी अत्यंत नकारात्मक भाषण केले. संपूर्ण वेळ फक्त मोदींवर टीका करत होते. निवडून आलो तर आपण स्वतः किंवा आपला पक्ष नक्की काय करणार आहे याविषयी भाषणात चकार शब्द नव्हता. मोदी निवडून आले तर तुमचे कसे वाटोळे होईल हाच भाषणातला मुख्य मुद्दा होता. बाकी काहीच नव्हते. मोदी कसे वाईट आहेत, मोदी आणि राहुल अंबानी-अदानींच्या हेलिकॉप्टरमधून प्रवास करतात, नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाल्यास देशातील लघूउद्योग संपुष्टात येतील आणि शेतकरी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होतील, मोदी निवडून आल्यास वाराणशीतले सर्व लघुउद्योग बंद पडतील व आजूबाजूच्या शेतकर्‍यांना आत्महत्या कराव्या लागतील, नरेंद्र मोदींनी केवळ बड्या उद्योगपतींचा विकास केला आहे. मोदींच्या गुजरातमध्ये आतापर्यंत तब्बल ६०,००० लघुउद्योग बंद झाले, मोदींनी शेतक-यांच्या जमिनी हिसकावून अदानी आणि अंबानी यांना दिल्या, मोदी प्रत्येकवेळी मतदारांना धमक्या देऊन निवडून येतात ... मोदीनिंदा, मोदीनिंदा आणि मोदीनिंदा ... या व्यतिरिक्त त्यांच्या भाषणात काहीच नव्हते. आपला पक्ष महागाई, भ्रष्टाचार, बेरोजगारी इ. कशी कमी करणार आहे, देशाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आपल्याकडे काय योजना आहेत, देशाची अंतर्गत व बाह्य सुरक्षा आपण कशी करणार आहोत, आपल्या पक्षाचे परराष्ट्र धोरण काय आहे, शेतकर्‍यांसाठी आपण काय करणार आहोत, आपल्याकडे विकासाच्या कोणत्या कल्पना आहेत या व अशा अनेक प्रश्नांवर त्यांनी चकार शब्दही काढला नाही. नेहमीच्या पद्धतीनुसार नाटकीपणा केलाच. सकाळी माध्यमांना सोबत घेऊन गंगेत डुबक्या मारल्या. नंतर भाषण सुरू असताना मध्येच ३-४ मिनिटे थांबले. कारण हे होते की कुठूनतरी मशिदीतली बांग ऐकू येत होती. बांग संपेपर्यंत थांबून आणि सकाळी गंगेत डुबक्या मारून आपली दिखाऊ धर्मनिरपेक्षता व लांगूलचालन दाखवून दिले. आजूबाजूला बरीच मुस्लिम वस्ती असलेले मैदान निवडण्यातही काँग्रेससारखीच चतुराई दिसली. १९८७-८९ या काळात वि.प्र.सिंग जशी नाटके करत असत तसेच केजरीवालांनीही आज केले. त्यांनी अंबानी बंधूंचे स्विस बँकेत खाते असून यामध्ये कोटीच्या-कोटी काळा पैसा असल्याचा आरोप केला व अंबानी बंधूंच्या स्विस बँकेतील खाते क्रमांकही जाहीर केले- खाते क्रमांक- ५०९०१६०९८३ आणि ५०९०१६०९८४. वि.प्र.सिंग यांनीही बोफोर्स प्रकरण जोरात असताना राजीव गांधींच्या स्विस बॅंक खात्याचे क्रमांक असेच जाहीर केले होते. त्याच धर्तीवर केजरीवालांनी तोच नाटकीपणा केला. परंतु २०१४ मधील मतदार १९८८ च्या तुलनेत जास्त शिक्षित आहे याची त्यांना कल्पना नसावी. एकंदरीत एक अत्यंत नकारात्मक भाषण व कमालीचा नाटकीपणा केजरीवालांनी आज वाराणशीत केला. --------------------------------------------------------------------------- केजरीवाल व इतरांवर आज वाराणशीत शाई फेकल्याचे दाखवत होते. यापूर्वी योगेंद्र यादवांना शाई फासणारा 'आप'चाच कार्यकर्ता होता. 'आप'ने त्याच्याविरूद्ध काहीच कारवाई केली नाही. काही दिवसांपूर्वी हरयानामध्ये केजरीवालांना काळे झेंडे दाखविणारे 'आप'चेच कार्यकर्ते होते. मनीष सिसोदियांना पाटण्यामध्ये काळे झेंडे दाखविणारे देखील 'आप'चेच कार्यकर्ते होते. स्वतःच्याच कार्यकर्त्यांकडून शाई फेकण्यासारखी खोडसाळ कृत्ये करून सहानूभूती मिळविणे आणि इतर पक्षांवर दोष ढकलणे ही 'आप'ची नवीन स्ट्रॅटेजी दिसतेय.

वाचने 65371
प्रतिक्रिया 228

प्रतिक्रिया

काँग्रेस ने मोदींचा रस्ता काटायला सोडलेली मांजर असावी असंच केजरीवाल चं सगळं चाललेलं आहे सध्या :)

केजरीवाल व इतरांवर आज वाराणशीत शाई फेकल्याचे दाखवत होते. तरी या वेळेस गाडीची काच कशी फुटली नाही? सकाळी माध्यमांना सोबत घेऊन गंगेत डुबक्या मारल्या. *clapping* तुम्हाला माहीत नसेल कदाचीत पण *secret* गंगेत डुबकी मारली की आपली सगळी पापे धुतली जातात आणि आपण परत धुतल्या तांदळासारखे स्वच्छ होतो. (पण मग मोदी उडी का मारत नाहीत? *scratch_one-s_head* ) यासंदर्भात अनरीअल टाईम्स मधे आलेला विनोद बघण्यासारखा आहे. Keju Ganga purifies herself after washing over Kejriwal’s holy body in Varanasi Before after

In reply to by विकास

>>>सकाळी माध्यमांना सोबत घेऊन गंगेत डुबक्या मारल्या. प्रसारमाध्यमांच्या पापांचं क्षालन झालं असावं असं मानायला जागा आहे तर... (मुळात प्रसारमाध्यमं पाप करतात का?) बा द वे (तुमचा तो) तरुण तेजपाल कुठंय हो सध्या? ;)

In reply to by प्रचेतस

+१०० या रवंथापेक्षा आता पहा, नीट विचार करा आणि योग्य वाटेल त्याला मत द्या... पण मत जरूर द्या... असेच वाटते.

निवडून आलो तर आपण स्वतः किंवा आपला पक्ष नक्की काय करणार आहे याविषयी भाषणात चकार शब्द नव्हता. मोदी निवडून आले तर तुमचे कसे वाटोळे होईल हाच भाषणातला मुख्य मुद्दा होता. वरील वाक्याशी पुर्ण सहमत. केजरीवाल याचे परीक्षण करताना हा विचार महत्वाचा आहे. महत्वाचे म्हणजे केजरीवाल याना हे माहीत आहे की आपण सरकार बनवत नाही. त्यामुळे बोलायला काय जाते? मला व्यक्तीशा हा मुद्दा पटतो की राहुल आणि मोदी हे उद्योगपतीचा वापर करतात व त्याना त्याचा मोबदला ही देतात. हे सर्वमान्य गुपित आहे. पण शासनकर्ता म्हणुन मी मोदीना जास्त योग्य मानतो. कारण शासनात भावनेपेक्षा व्यवहाराला महत्व असावे. (अनुस्वार सापडत नाही. मदत करा.)

केजरीवाल व इतरांवर आज वाराणशीत शाई फेकल्याचे दाखवत होते. यापूर्वी योगेंद्र यादवांना शाई फासणारा 'आप'चाच कार्यकर्ता होता. 'आप'ने त्याच्याविरूद्ध काहीच कारवाई केली नाही. काही दिवसांपूर्वी हरयानामध्ये केजरीवालांना काळे झेंडे दाखविणारे 'आप'चेच कार्यकर्ते होते. मनीष सिसोदियांना पाटण्यामध्ये काळे झेंडे दाखविणारे देखील 'आप'चेच कार्यकर्ते होते. स्वतःच्याच कार्यकर्त्यांकडून शाई फेकण्यासारखी खोडसाळ कृत्ये करून सहानूभूती मिळविणे आणि इतर पक्षांवर दोष ढकलणे ही 'आप'ची नवीन स्ट्रॅटेजी दिसतेय.
हे सगळं संघाच्याच चालीवर चालू आहे म्हणायचं !

भाजपा = मोदी हे समीकरण आणि आअप=केजरीवाल हे समीकरण दोन्हीचा अतिशय वीट येऊ लागला आहे. दोन्ही पक्षांच्या समर्थकांनी यापलिकडे जाऊन बोलावे. माझे मतः केजरीवाल मोदींना हरवण्याची शक्यता बरीच कमी आहे, मोदी व केजरीवाल यांच्याहून कितीतरी चांगले उमेदवार कित्येक भागांतून उभे आहेत. तेव्हा ही व्यक्तीकेंद्रीत लढाई कंटाळवाणी आहे!

जास्तीत जास्त बालीशपणा आणि तमाशा करण्याचा या माणसाने चंगच बांधला आहे. वैताग आलाय अशा बातम्यांचा आता. निदान या वैतागासाठी तरी वाटते मधी एकदा सोळा मे ही तारीख उजाडते आहे.

गुजरातच्या विकासाच्या पोकळ गप्पा ऐकून आम्हालाही कंटाळा आला आहे पृथ्वीराज चव्हाणांनी मोदींना डीबेटसाठी आमंत्रण दिले आहे केजरीवालांनीही नरेंद्रभाईंना डीबेटचे आव्हान केले आहे परंतु नेहमीप्रमाणे मोदींनी आपला उद्धट स्वभाव कायम ठेऊन खुल्या चर्चेतुन पळ काढला आहे.लोक मुर्ख असतात परंतु इतकेही मुर्ख नसतात हे अजून भाजपाला लक्षात आलेले नाही.

In reply to by नानासाहेब नेफळे

खुल्या डिबेटचे आमंत्रण देण्यारा बाबांनी (पृथ्वीराजबाबा) स्वतः मुख्यमंत्री झाल्यापासून किती फायली सह्या करून पास केल्या ते सांगा. अभ्यास करून शेरे देणे, सुधारणा करून मग सही करणे ही प्रक्रीया तर दूरच राहीली. बाबा नुसता फायलींवर बसून राहतो असे फाईलसही सम्राट घड्याळवाले काकाजी म्हणतात. हल्ली कोणीही कोणाला आव्हान देतो. मुंगीने हत्तीला आव्हान द्यावे, आणि मुंगी मारणे हा कायद्याने गुन्हा असल्याने हत्तीने दुर्लक्ष करावे तर मुंगी लगेच टेरी (!) बडवून घेणार की 'हत्ती मला घाबरला, हत्ती मला घाबरला'. असो चालायचेच.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

मिपावरच्या निष्णात डिबेटपटूंचे कौशल्य आणि चिकाटी पाहता डिबेटसाठी दिलेली आव्हाने हा डिबेटची प्रक्रिया सुरू राहिल्याने निवडणुका अनिश्चित कालावधीकरता स्थगित करण्यासाठी रचलेला डाव असू शकतो अशी साधार भीती वाटते. असो.

In reply to by नानासाहेब नेफळे

लोक मुर्ख असतात परंतु इतकेही मुर्ख नसतात हे अजून भाजपाला लक्षात आलेले नाही. तुम्ही नानासाहेब नेफळे, ग्रेटथिन्कर, टॉपगिअर्ड फिलोसॉफर असे कितीही डुआयडी काढलेत तरी ते आम्ही ओळखू शकतो हे तुमच्या लक्षात आलेले नाही.

In reply to by नानासाहेब नेफळे

राखी सावंतनेही केजरीवालाना आव्हान दिले आहे. अजुन केजरीवालांनी उत्तरच दिलेले नाही

In reply to by नानासाहेब नेफळे

>>> परंतु नेहमीप्रमाणे मोदींनी आपला उद्धट स्वभाव कायम ठेऊन खुल्या चर्चेतुन पळ काढला आहे. चर्चा बरोबरीच्या लोकांमध्ये होउ शकते. कुठे १२ वर्षांहून अधिक काळ गुजरातसारख्या मोठ्या रा़ज्याचे मुख्यमंत्रीपद यशस्वीपणे सांभाळणारे मोदी आणि कुठे दिल्लीसारख्या छोट्या राज्याचे मुख्यमंत्रीपद ४९ दिवसात सोडून देऊन पळ काढणारे केजरीवाल! केजरीवालांप्रमाणेच पृथ्वीराज चव्हाणसुद्धा मोदींबरोबर चर्चा करण्यासाठी पात्र नाहीत. त्यांना केवळ दिल्लीश्वरांच्या कृपेने मुख्यमंत्रीपद मिळाले आहे. ते स्वतः निवडून सुद्धा आलेले नाहीत. त्यांनी आधी निवडून येऊन दाखवावे आणि नंतर चर्चेचे आव्हान द्यावे. केजरीवाल आणि चव्हाण यांनी आधी स्वतःला सिद्ध करावे, आपली कार्यक्षमता दाखवून द्यावी आणि नंतर शड्डू ठोकावा. >>> लोक मुर्ख असतात परंतु इतकेही मुर्ख नसतात हे अजून भाजपाला लक्षात आलेले नाही. तुम्ही आजवर 'ग्रेटथिंकर', 'टॉपगिअर्ड फिलॉसॉफर', 'नानासाहेब नेफळे' अशा अनेक नावांनी वावरलात. एका नावाने 'आप' आणि 'केजरीवालांना' शिव्या द्यायच्या आणि दुसर्‍या नावाने त्यांचे कौतुक करायचे अशी तुमची स्ट्रॅटेजी. इथले सभासद तुम्ही समजता तितके मूर्ख नसतात हे अजून तुमच्या लक्षात आलेले दिसत नाही.

In reply to by श्रीगुरुजी

त्येच की !नरेंद्र मोदींनीही गुजरातचे मुख्यमंत्री व्हायच्या आधी साधी ग्रामपंचायतीचीही निवडणुक कधी लढवली नव्हती, मग थेट त्यांना कोणताहि अनुभव नसताना मुख्यमंत्रीपदी कसे बसवले गेले? एक मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जे की अमेरिकेतुन संगणकशास्रात M.S झालेले, दुसरे केजरीवाल IIT तुन M tech झालेले, यांच्यापूढे आपला काही टिकाव लागणार नाही.. आपण आपल्या 'बरोबरीच्याच' लोकांबरोबरच योग्य आहोत याचा साक्षात्कार नरेंद्र मोदींना झाला ,हे ही नसे थोडके.. केजरीवाल जर बरोबरीचे नाहीत तर त्यांच्या १६ प्रश्नांची थातुरमातुर उत्तर द्यायची गरज काय होती आणि जर उत्तरंच द्यायचीत तर खुली चर्चा पृथ्विराज चव्हाण व केजरीवालांसोबत करुन दाखवा.. शौर्याचे, विजिगिषु वृत्तीचे डोस उठसुठ जगाला पाजणार्या संघाच्या एका स्वयंसेवकाने अशा क्लैब्याचे दर्शन घडवावे हे काही बरे नव्हे...

In reply to by नानासाहेब नेफळे

पृथ्वीराज ह्यांनी आधी काका पुतण्याची डिबेट करावे मूळ मुद्दा फायली का हलत नाहीत. पृथ्वी व केजू ह्यांच्या सारख्या सहकारी पक्षाच्या कुबड्या घेऊन मोदी ह्यांनी सरकार स्थापन नाही केले. त्यांच्यात कशी तुलना होऊ शकते.

In reply to by निनाद मुक्काम …

>>> पृथ्वीराज ह्यांनी आधी काका पुतण्याची डिबेट करावे आपल्याला 'लकवा' झालेला आहे का नाही याविषयी त्यांनी काकांशी सखोल व गंभीर चर्चा करावी आणि मग मोदींना आव्हान द्यावे.

In reply to by नानासाहेब नेफळे

>>> त्येच की !नरेंद्र मोदींनीही गुजरातचे मुख्यमंत्री व्हायच्या आधी साधी ग्रामपंचायतीचीही निवडणुक कधी लढवली नव्हती, मग थेट त्यांना कोणताहि अनुभव नसताना मुख्यमंत्रीपदी कसे बसवले गेले? कारण त्यांच्यात पात्रता होती आणि गेल्या १२+ वर्षात त्यांनी आपली पात्रता सिद्ध केली आहे. दुसरीकडे आयआयटीतून एम टेक झालेले जबाबदारी झटकून केवळ ४९ दिवसात धूम पळून का गेले हे सांगा ना. >>> एक मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण जे की अमेरिकेतुन संगणकशास्रात M.S झालेले, दुसरे केजरीवाल IIT तुन M tech झालेले, लालू सुद्धा डॉक्टरेट आहे, राहुल सुद्धा एम फिल आहे (म्हणे)! >>> यांच्यापूढे आपला काही टिकाव लागणार नाही.. आपण आपल्या 'बरोबरीच्याच' लोकांबरोबरच योग्य आहोत याचा साक्षात्कार नरेंद्र मोदींना झाला ,हे ही नसे थोडके.. तुम्ही वाट्टेल ते गोड गैरसमज करून घ्या! >>> केजरीवाल जर बरोबरीचे नाहीत तर त्यांच्या १६ प्रश्नांची थातुरमातुर उत्तर द्यायची गरज काय होती आणि जर उत्तरंच द्यायचीत तर खुली चर्चा पृथ्विराज चव्हाण व केजरीवालांसोबत करुन दाखवा.. अजाण व्यक्तीला थातुरमातुर दिलासा देऊनच वाटेला लावायचे असते. ज्ञानी व्यक्ती अज्ञानी व्यक्तिंबरोबर वादविवादात व्यर्थ वेळ घालवत नाहीत. >>> शौर्याचे, विजिगिषु वृत्तीचे डोस उठसुठ जगाला पाजणार्या संघाच्या एका स्वयंसेवकाने अशा क्लैब्याचे दर्शन घडवावे हे काही बरे नव्हे... बरं मग?

In reply to by श्रीगुरुजी

पृथ्विराज असतील वा केजरीवाल, जाहिर चर्चेला ते तयार आहेत यातच त्यांचे मेरीट्स आहेत.. नरेंद्र मोदी पळ काढण्यात तरबेज आहेत .. करन थापरच्या इंटरव्हुमधुन पळ काढणे जाहीर चर्चेच्या आव्हाणातुन पळ काढणे महाराष्ट्राला दुष्काळनिवारणासाठी दिलेल्या मोफत मदतीच्या वचनातुन पळ काढणे व मदतीचे पैसे मागणे .हे बघा इथे http://www.esakal.com/esakal/20140326/4634611105938493251.htm

In reply to by नानासाहेब नेफळे

उद्या कोणीही सोम्यागोम्या मोदींना चर्चेसाठी आव्हान देईल. दिल्लीचे मुख्यमंत्रीपद सोडून पळून आल्यामुळे केजरीवालांकडे असल्या फालतू प्रश्नांसाठी व आव्हानासाठी भरपूर रिकामा वेळ आहे. मोदी व्यस्त आहेत. असल्या फालतू चर्चांसाठी त्यांच्याकडे वेळ नाही. मोदींचं नंतर बघू. प्रथम केजरीवालांनी माझ्या खालील प्रश्नांची उत्तरे द्यावीत व माझ्याशी जाहीर चर्चा करावी. (१) सभेत भाषण सुरू असताना कोठून तरी लांबून बांग ऐकू आल्यावर ४-५ मिनिटे भाषण थांबवून स्वस्थ उभे का होते? असे करायला बांग म्हणजे काय राष्ट्रगीत वाटले का त्यांना? या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर दिल्यावर पुढील प्रश्न विचारीन. चव्हांणांनी माझ्या खालील प्रश्नाचे उत्तर द्यावे. (१) अशोक चव्हाणांवर आदर्श प्रकरणी आजतगायत कारवाई का केली नाही? या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर दिल्यावर पुढील प्रश्न विचारीन.

In reply to by श्रीगुरुजी

उद्या कोणीही सोम्यागोम्या मोदींना चर्चेसाठी आव्हान देईल. दिल्लीचे मुख्यमंत्रीपद सोडून पळून आल्यामुळे केजरीवालांकडे असल्या फालतू प्रश्नांसाठी व आव्हानासाठी भरपूर रिकामा वेळ आहे. मोदी व्यस्त आहेत. असल्या फालतू चर्चांसाठी त्यांच्याकडे वेळ नाही. मोदींचं नंतर बघू.
महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याचा चारवर्षे मुख्यमंत्री ,त्याअधी पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री ,सत्तरच्या दशकात अमेरीकेतुन संगणकशास्त्रातील पदवी घेतलेला..." सोम्या ", मॅगसेसे पुरस्कार मिळालेला ,आयआयटी इंजिनिअर,रेवेन्यु खात्याचा कमिशनर, दिल्लीत वचनांची पुर्ती करणारा मुख्यमंत्री ,दहा वर्षं समाजसेवेत घालवलेला.. "गोम्या " जर हे' सोमेगोमे' आहेत तर यांच्यापासुन पळ काढणायची मोदींना गरजच काय???? एकदाच ,फक्त थोडे तास द्यावेत चर्चेसाठी नरेंद्रभाईंनी व या दोघा सोम्यागोम्यांना निष्प्रभ करुन दाखवावे..

In reply to by नानासाहेब नेफळे

>>> महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्याचा चारवर्षे मुख्यमंत्री ,त्याअधी पंतप्रधान कार्यालयाचे मंत्री ,सत्तरच्या दशकात अमेरीकेतुन संगणकशास्त्रातील पदवी घेतलेला..." सोम्या ", इतक्या पदव्या असून उपयोग काय? शेवटी काँग्रेसमध्येच कुजले ना? आणि ४ वर्षे मुख्यमंत्री असून नक्की काय कामगिरी केली? मंत्रालयाच्या आगीत सिंचन घोटाळ्याचा फाईल्स नष्ट होणे आणि अशोक चव्हाण, सुशीलकुमार, निलंगेकर इ. आदर्श घोटाळ्यातून अलगद सोडविणे ही महान कामगिरी समजली तर प्रश्नच मिटला. त्यांना वादविवादाची एवढी हौस असेल तर विनोद तावडे, गिरीश बापट इ. ना आव्हान देऊन चर्चा करावी. मोदींबरोबर चर्चा करण्याकरता आधी त्यांना स्वतःला सिद्ध करावं लागेल. >>> मॅगसेसे पुरस्कार मिळालेला ,आयआयटी इंजिनिअर,रेवेन्यु खात्याचा कमिशनर, दिल्लीत वचनांची पुर्ती करणारा मुख्यमंत्री ,दहा वर्षं समाजसेवेत घालवलेला.. "गोम्या " जिथे जाईल तिथून पळून जाणे एवढंच यांनी आतापर्यंत केलंय. यांच्याशी कसली डोंबलाची चर्चा करायची? >>> जर हे' सोमेगोमे' आहेत तर यांच्यापासुन पळ काढणायची मोदींना गरजच काय???? एकदाच ,फक्त थोडे तास द्यावेत चर्चेसाठी नरेंद्रभाईंनी व या दोघा सोम्यागोम्यांना निष्प्रभ करुन दाखवावे.. नरेंद्र मोदींसमोर हे आधीच निष्प्रभ आहेत. अगदीच चर्चेसाठी उतावीळ असतील तर गुजरातमधील भाजपच्या एखाद्या आमदाराशी चर्चा करून हौस भागवून घ्यावी.

In reply to by श्रीगुरुजी

सिंचन घोटाळ्याच्या फाईल्स नष्ट होणे, सुशीलकुमार शिँदे निलंगेकर यांना आदर्शतून अलगद सोडवणे ..
याची उत्तरे चव्हाणांना विचारता येतील, जर मोदी जाहीर चर्चेला तयार असतील तर..अशा चर्चेत तावडे बापट व राणाभिमदेवी थाटात 'पुराव्यानिशी' अगडबंब आरोप करणारे व नंतर गायब होणारे किरीट सोमय्या वगैरेंची टीमच घेऊन येता येईल. चव्हाण व केजरीवाल दोघेही एक्स्पोझ होतील...हिच वेळ आहे काँग्रेसला जनतेसमोर एक्स्पोझ करायची.. पण.... नरेंद्र मोदी असे करणार नाही याचे कारण आहे त्यांच्या मंत्रीमंडळातील अत्यंत 'स्वच्छ ''कार्यक्षम' मंत्री बाबू बोखिरीया,व पुरषोत्तम सोलंकी ,त्याच बरोबर दहा वर्षे गुजरातमध्ये लोकायुक्त का नेमला नाही याचाही जाब त्यांना द्यायला लागेल. बोखिरियाना तीन वर्षांची शिक्षा झाली आहे. http://m.timesofindia.com/india/Babu-Bokhariya-Gujarat-minister-sentenc… पुरषोत्तम सोलंकी http://www.dnaindia.com/india/report-hc-found-him-guilty-in-rs400-cr-sc… यावर आपले काय म्हणणे आहे श्रीगुरुजी? की आता कोर्टही खोटारडे झाले?

In reply to by नानासाहेब नेफळे

या इथे वरती जो प्रतिसाद आहे. त्याचा प्रतिवाद कुणीही केलेला नाही ,कृपया या प्रतिसादाचा प्रतिवाद कुणीतरी करावा अशी मी मित्रत्वाची विनंती करतो.

In reply to by मंदार दिलीप जोशी

का नाही? काय चूकीचे आहे त्या प्रतिसादात! आपल्याकडे उत्तर नसेल तर तसे स्पष्ट सांगा, या धाग्यावरचे प्रत्येक माझे प्रतिसाद श्रीगुरुजींना आणि तूम्ही प्रतिवादीत केले आहेत. परंतु हा प्रतिसाद रिक्त सोडला कारण इतक्या उघड मुद्द्याचे उत्तर तूमच्याकडे नाही... परत एकदा मित्र्त्वाची विनंती करतो, आपण त्या प्रतिसादाचा प्रतिवाद करावा. http://www.misalpav.com/comment/566824#comment-566824

In reply to by नानासाहेब नेफळे

काय चूकीचे आहे त्या प्रतिसादात! सग्ळच चुकलं की वो तुम्चं. त्याचं आसम हाय नेभळे साय्ब. तुम्च्या गुर्जींच म्हन्न हाय की 'तुमि पुरावे माग्ता. म्हंजे तुम्च्याशी चर्चा श्यक्य नाय.' आता गुर्जी बद्ला नायतर माग्णि बद्ला. काय म्हंता?

In reply to by नानासाहेब नेफळे

बांग हे काय राष्ट्रगीत आहे का
त्यांच्या सभेत अनेक मुस्लिम आले असतील, त्यांच्यासाठीतरी नमाज पठण पवित्र आहे, त्या अनुषंगाने ,त्यांच्या भावनेचा आदर राखण्यासाठी केजरीवाल थांबले असतील.
अशोक चव्हाणांना तिकिट
मुद्दा मान्य आहे..तिकीट द्यायला नको होते.परंतु येदुरप्पांना टिकीट देणार्या भाजपसारख्या पक्षाने व अशा पक्षाचे व त्याच्या विचारधारेच जाहिर समर्थन करणार्यांनी असे प्रश्न विचारायचा नैतिक अधिकार गमावला आहे.

In reply to by नानासाहेब नेफळे

>>> मुद्दा मान्य आहे..तिकीट द्यायला नको होते.परंतु येदुरप्पांना टिकीट देणार्या भाजपसारख्या पक्षाने व अशा पक्षाचे व त्याच्या विचारधारेच जाहिर समर्थन करणार्यांनी असे प्रश्न विचारायचा नैतिक अधिकार गमावला आहे. बरं मग निदान तुमच्या 'आप'समर्थकांनी किंवा गंगेहून निर्मळ असणार्‍या केजरीवालांनी तरी हा प्रश्न विचारला का? हा प्रश्न विचारण्याचे नैतिक, अनैतिक, राजकीय, सामाजिक, भावनिक, धार्मिक, निधर्मी इ. सर्व हक्क निदान केजरीवालांना आणि 'आप'ला तरी नक्कीच आहेत. मग ते अजून गप्प का? ('आप' काँग्रेसची 'बी' टीम तर नाही ना?)

In reply to by नानासाहेब नेफळे

अरे पावट्या तुझ्या डोक्यातला अंधार अजुन गेलेला दिसत नाही म्हणुन थोडेसे असे, तुझे 'सोम्या आणि गोम्या' दोघेही परावलंबी, पराधीन म्हणजेच दुसर्‍याचा आधार असल्याशिवाय त्यांना धड उभेही राहता येत नाही कींवा दोन पावलेही टाकता येत नाहीत आणि म्हणे आमच्याबरोबर चर्चा करा. मोदी स्वबळावर तिन वेळा निवडुन आलाय कोणाच्याही कुबड्या घेतल्याशिवाय आणि स्वताच्या कर्तबगारीवर पंतप्रधानपदाच्या उमेद्वारीपर्यन्त पोहोचलाय. अशा माणसाने काय म्हणुन या असल्या सोम्या आणि गोम्याना प्रतिसाद द्यावा ?? त्या सोम्या आणि गोम्यानी पाडलेला प्रकाश दाखव आणि नंतर चर्चेचे आव्हान कर. अरे तुझा तो साळ्सूदपणाचा आव आणणारा भम्पक गोम्या धड दोन महीने दिल्लीचे राज्य चालवु शकला नाही आणि म्हणे मी देश चालवणार, लोकांच्या डोक्यावर टोपी घालणे आणि रस्त्यावर घोळ्क्याने किंचाळण्याइतके सोपे आहे का ते ??? त्याची दहा वर्षाची तथाकथीत समाजसेवा इथे ठळकपणे व विस्ताराने समोर मांडता येइल का तुला ??? आणि तो दुसरा तुझा सोम्या कधी आणि कोणती निवड्णुक लढवुन मुख्यमंत्री झाला सांगशिल का ??? आता पडला का प्रकाश..!!!! ग्रेट........नान्या ????

In reply to by नानासाहेब नेफळे

महाराष्ट्राला दुष्काळनिवारणासाठी दिलेल्या मोफत मदतीच्या वचनातुन पळ काढणे व मदतीचे पैसे मागणे
हे उत्तम करते आहे गुजरात सरकार. सगळे २२ कोटी महराश्ट्राच्या सत्ताधीशांचा कार्यकर्त्यांनी लुटुन खाल्ले. परत द्या ते पैसे गुजराथ ला.

In reply to by श्रीगुरुजी

लालू सुद्धा डॉक्टरेट आहे, राहुल सुद्धा एम फिल आहे (म्हणे)!
बाकी काही असो पण राहुल अन लालूची तुलना केजरीवाल अन पृथ्वीराज चव्हाणांबरोबर करणे काही पटले नाही. हा फक्त वादासाठी वाद झाला.

In reply to by बॅटमॅन

पृथ्वीराज चव्हाण आणि अरविंद केजरीवाल यांच्या शिक्षणाचा मुद्दा गुरुजीनी काढला नव्हता. मला वाटते अश्या अतार्किक मुद्द्यावर असेच अतार्किक उत्तर बरे असते. :-) बाकी शिक्षण लई झाले म्हणून तो चांगला मुख्यमंत्री हे काही पटले नाही बुवा!!

In reply to by श्रीगुरुजी

राहुल सुद्धा एम फिल आहे
छे! छे! एजन्सी फ्रान्स प्रेस (AFP) ची बातमी, ५ मार्चच्या अंकात आमच्या येथील इंग्रजी दैनिकाने छापली होती. त्यातून उर्ध्रुत करतो. बातमी मोदी व राहूल ह्यांच्याविषयी आहे. "One is a former tea boy, the other a Harvard and Cambridge-educated scion of India's biggest political dynasty" पुढे... "Often portrayed as a reluctant leader, he [राहूल गांधी] gave up a business career to enter politics".... आहात कुठे!! राहूल गांधी चुकून सत्तेवर आलाच तर तो थेट चंद्रावरून शिक्षण घेऊन आला आहे, आणि शुक्रावर अथव थेट सूर्यावरच त्याचा बिझीनेस होता तो सोड्न भारतातील गरीब बिचार्‍या जनतेचा उद्धार करण्यासाठी तो आता पृथ्वीतलावर अवतरला आहे, असे वाचावयास मिळेल ह्याची खात्री बाळगावी!

In reply to by श्रीगुरुजी

अजाण व्यक्तीला थातुरमातुर दिलासा देऊनच वाटेला लावायचे असते. ज्ञानी व्यक्ती अज्ञानी व्यक्तिंबरोबर वादविवादात व्यर्थ वेळ घालवत नाहीत.
+१०० मुर्खांशी वाद घालण्यात अर्थ नसतो, ते तुम्हाला त्यांच्या पातळीवर आणुन ठेवतात. :)

In reply to by नानासाहेब नेफळे

केवळ फॉर दी रेकॉर्ड दुरुस्ती: दुसरे केजरीवाल IIT तुन M tech झालेले, यांच्यापूढे आपला काही टिकाव लागणार नाही. केजरीवाल हे B.Tech. आहेत, M.Tech. नाहीत. मोदी पॉलीटीकल सायन्स मध्ये MA - Gujarat University, Ahmedabad आहेत.

In reply to by विकास

तिथेच तर फरक आहे. MA - Gujarat University आणि B.Tech from IIT पण ते जाऊ दे.. केजरीवाल हुशार आहेत हे त्यांचे कट्टर विरोधकही मान्य करतात. आणि मोदी तितके तल्लख नाहीत हे त्यांचे समर्थकही मान्य करतात. त्यांचे इंग्रजी भाषण ऐकले नाहीत का कधी.

In reply to by बंडा मामा

तिथेच तर फरक आहे. MA - Gujarat University आणि B.Tech from IIT हा एक नवजातीयवाद आहे असे म्हणायचे का? बाय द वे, मोदींनी पॉलीटिकल सायन्स मधे मास्टर्स केले आणि त्यातच ते पुढे आहेत. मात्र दिल्लीहून पळायची सुरवात केजरीवाल यांनी आय आय टी नंतर रेव्हेन्यू डिपार्टमेंट मधे जाऊन केली. कदाचीत तिथे पण जमले नसावे. ;)

In reply to by विकास

नव/जुना जातियवाद इथे कुठुन आला? IIT मधून बी टेक करायला आणि गुजरात युनिवर्सिटी मधुन आर्ट्सची डिग्री घ्यायला एकच कॅलीबर लागते असे तुमचे मत आहे का? तरीही मी जाऊ दे म्हणालो होतो. शिक्षण कुठून का घेतले असेना हुशारी कुणाकडेही असू शकते. त्यासाठीच मी केजरीवालचे उदाहरण दिले होते. उदा, हा विडीयो बघा: मोदींनी पळ काढला वगैरे तर सोडून द्या, किती बत्थड सारखी मक्ख चेहर्याने उत्तरे देत होते मोदी ते पाहा. हा माणूस आपल्या देशाचा पंतप्रधान व्हावा असे कसलेही तेज/बुद्धीमत्ता मोदींच्यात दिसत नाही.

In reply to by बंडा मामा

या मुलाखतीला जर कोणि मोदिंचा पळकुटेपणा म्हणत असेल तर त्यांना केजरीवालांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा म्हणजे 'त्याग' , 'तत्वनिष्ठा' वगैरे वाटणं स्वाभावीक आहे. असो. सरणावरच्या प्रेतांनी मनोरंजन करणं - वांझोट्या ज्ञानाच्या पदव्या देणं आणि न पेलणार्‍या जबाबदार्‍यांनी त्यागी बनवण्याचे प्रयोग भारताला नवीन नाहि. एकवेळ मोदिला मृत्यु आहे... पण केजरीवाल अमर आहे.

In reply to by बंडा मामा

नव/जुना जातियवाद इथे कुठुन आला? IIT मधून बी टेक करायला आणि गुजरात युनिवर्सिटी मधुन आर्ट्सची डिग्री घ्यायला एकच कॅलीबर लागते असे तुमचे मत आहे का? चुकीचे गृहीतक आहे. कारण प्रत्येकजणाला आय आय टीला जावेसे वाटते असे तुम्हाला म्हणायचे आहे, जे हास्यास्पद आहे. शिक्षण कुठून का घेतले असेना हुशारी कुणाकडेही असू शकते. त्यासाठीच मी केजरीवालचे उदाहरण दिले होते. केजरीवाल ढ आहेत का नोबेल पारीतोषिकाच्या लायकीचे आहेत ह्या बद्दल मी काहीच म्हणत नाही. पण आय आय टी तून शिकले म्हणून हुषार असे म्हणायचे असते तर त्यात काहीतरी कॉम्प्लेक्स भाव नक्कीच आहे... मोदींनी पळ काढला वगैरे तर सोडून द्या, किती बत्थड सारखी मक्ख चेहर्याने उत्तरे देत होते मोदी ते पाहा. हा माणूस आपल्या देशाचा पंतप्रधान व्हावा असे कसलेही तेज/बुद्धीमत्ता मोदींच्यात दिसत नाही. खालील फोटोतला कसा देशाचा पंतप्रधान काय विश्वनायकच वाटतोय नाही का? :) AK AK

In reply to by विकास

१. आपण चित्रे दिलेला माणूस ना मी पंतप्रधानाचा दावेदार समजतो ना तो स्वतः तसे म्हणतो. २. मी व्हिडीयो दिला आणि आपण फोटो दिलेत. फोटो पाहुन आपण गुणवत्ता जज करणार असणार तर काय बोलायचे.

In reply to by बंडा मामा

लेकानो शिक्षणाचा आणि बुध्दीमत्तेचा संबध असतो हे तुम्हाला कोणी शिकवले रे? साधा ग्रज्युएट नसलेल्या गेटस कडे ढिगबंडल आयआयटीयन्स चाकरी करतात.

In reply to by खटपट्या

नाही. ज्या भाषेत इंटरव्यु देत आहोत त्या भाषेवर प्रभुत्व आणि कठोर प्रश्नांचा सामना सडेतोड मुद्दे मांडून ह्याला मी तल्लखपणा मानतो.

In reply to by बंडा मामा

तिथेच तर फरक आहे. MA - Gujarat University आणि B.Tech from IIT
अडाण्यांचा मुकुटमणी शोभावा असा हा प्रतिसाद आहे. म्हणजे काय तर इंजिनिअर (किंवा कदाचित डॉक्टरही) म्हणजेच तल्लख बुध्दीमत्तेचे आणि आर्ट्सवाले आडाणी. आधीच विंजिनिअर आणि त्यातून आय.आय.टीचा म्हणजे काय बोलायलाच नको.सगळ्या जगाची अक्कल केवळ यांनाच दिलेली आणि इतरांना काही समजत नाही.गुजरात युनिव्हर्सिटी म्हणजे किस झाड की पत्ती.आधीच आर्ट्सवाले म्हणजे थोडेसे 'मेन्टली चॅलेन्ज्ड' आणि त्यातून गुजरात युनिव्हर्सिटी म्हणजे ते किती मंद असतील याची कल्पनाच केलेली बरी!! या असल्या विकृत मानसिकतेचा मला स्वतःला भयंकर त्रास झाला आहे त्यामुळे असले कोणीतरी काहीतरी बरळायला लागले की ते प्रचंड डोक्यात जाते. आणि आय.आय.टी खरगपूरची काय मातब्बरी सांगता?मी पोस्ट ग्रॅज्युएट केले आहे त्या संस्थेत ३०-३५ आय.आय.टी खरगपूरचे बी.टेक होते आणि अनेक आय.आय.टी खरगपूरवाल्यांना तिथे प्रवेश मिळालाही नव्हता. (अर्थातच आमच्याच संस्थेतील लोकांना जगातील सगळी अक्कल दिली आहे आणि बाकीचे आडाणी असा माझ्याकडे नक्कीच नाही-- अशा अ‍ॅटिट्यूडवाल्यांना इंटरव्ह्यूमध्येच वगळले जाते :) ) या असल्या 'होलिअर दॅन दाऊ' अ‍ॅटिट्यूडमुळे भारतातील कित्येक विद्यार्थ्यांचे नुकसान केले आहे (आपल्याच समाजातील मोठ्या माणसांनी आणि इतरांनी). या प्रकाराला जितका होईल तितका विरोध केलाच पाहिजे.
त्यांचे इंग्रजी भाषण ऐकले नाहीत का कधी.
कोणाच्याही भाषणाचा आणि कर्तृत्वाचा संबंध जोडायला काय सगळे आम आदमी पार्टीवाले वाटले का या कंसमामाला?

In reply to by क्लिंटन

यावरून जगातल्या नामवंत कंपन्यांचे कॉलेज ड्रॉपआउट असणारे संस्थापक आठवले…ज्यांच्या पदरी हे आय आय टी, एम आय टी वाले काम करतात

In reply to by मालोजीराव

मालोजीराव,
तरीही मी जाऊ दे म्हणालो होतो. शिक्षण कुठून का घेतले असेना हुशारी कुणाकडेही असू शकते.
ह्या माझ्या प्रतिसादातील वाक्याचा अर्थ काय होतो?

In reply to by बंडा मामा

त्या दृष्टीनं आमचे सांगलीचे वसंतदादा पाटील हे लौकिकार्थानं (फक्त) प्राथमिक शिक्षण घेतलेले माजी मुख्यमंत्री हुशार ठरावेत.

In reply to by श्रीगुरुजी

केजरीवालांप्रमाणेच पृथ्वीराज चव्हाणसुद्धा मोदींबरोबर चर्चा करण्यासाठी पात्र नाहीत. त्यांना केवळ दिल्लीश्वरांच्या कृपेने मुख्यमंत्रीपद मिळाले आहे. ते स्वतः निवडून सुद्धा आलेले नाहीत. त्यांनी आधी निवडून येऊन दाखवावे आणि नंतर चर्चेचे आव्हान द्यावे.
गुर्जी…तुम्ही मोदीप्रेमामुळे वाहावत जाता कधी कधी…तुमच्या पोस्ट अभ्यासपूर्ण असतात म्हणून नेहमी वाचतो. पृथ्वीराज चव्हाण कराड मधून उभे राहिले तर समोरच्याचे डीपोजीट जप्त करतील इतकी ताकद आहे.त्यांची चूक इतकीच कि ते काँग्रेससारख्या पक्षात आहेत. स्वतंत्र निर्णय घेण्याची सूट असती तर मोदींच्या योग्यतेचे मुख्यमंत्री नक्कीच झाले असते.

In reply to by मालोजीराव

स्वतंत्र निर्णय घेण्याची सूट असती तर मोदींच्या योग्यतेचे मुख्यमंत्री नक्कीच झाले असते.
याविषयी असहमती दर्शवायचे कारण नाही. तरीही...
पृथ्वीराज चव्हाण कराड मधून उभे राहिले तर समोरच्याचे डीपोजीट जप्त करतील इतकी ताकद आहे.
१९९९ मध्ये याच पृथ्वीराज चव्हाणांचा राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला होता.त्यानंतर पृथ्वीराजांनी लोकसभेची निवडणुकही लढवली नाही.मग हे नक्की कोणत्या आधारावर म्हणता?

In reply to by क्लिंटन

१९९९ मध्ये याच पृथ्वीराज चव्हाणांचा राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी पराभव केला होता.त्यानंतर पृथ्वीराजांनी लोकसभेची निवडणुकही लढवली नाही.मग हे नक्की कोणत्या आधारावर म्हणता?
९१,९६,९८ मध्ये चव्हाण जिंकले होते हे नजरेआड कसं केलत…१९५७ ते १९९८ पर्यंत त्यांच्या घरातलाच खासदार होता (प्रेमलाकाकी आणि आनंदकाका). ९९ च्यावेळी राष्ट्रवादी आणि काँग्रेस विरोधात होते…तत्कालीन स्थितीप्रमाणे श्रीनिवास पाटलांना फायदा होणार उघड होतं.

In reply to by मालोजीराव

हो बरोबर आहे ना. पृथ्वीराज १९९१,१९९६ आणि १९९८ मध्ये जिंकले होते. तसे तीन निवडणुका जिंकलेले अनेक खासदार आहेत.तरीही इतर उमेदवारांचे डिपॉझिट जप्त होईल अशी परिस्थिती असणे म्हणजे त्या मतदारसंघावर पूर्ण पकड हवी (अशी पकड नरेन्द्र मोदी किंवा वाय.एस.राजशेखर रेड्डी, सोनिया गांधी इत्यादींचीही नाही). तितकी पकड पृथ्वीराजांची आहे का हाच प्रश्न आहे.

In reply to by क्लिंटन

तितकी पकड पृथ्वीराजांची आहे का हाच प्रश्न आहे.
बरोबर आहे, त्यांना तिकीट मिळालं असतं तर कदाचित स्पष्ट झालं असतं असो माझा मुद्दा त्यांच्या पात्रतेबद्दल होता…केजरीवाल बरोबर त्यांची तुलना गैर वाटली.

In reply to by मालोजीराव

>>> माझा मुद्दा त्यांच्या पात्रतेबद्दल होता…केजरीवाल बरोबर त्यांची तुलना गैर वाटली. पृथ्वीराज चव्हाण उच्चविद्याविभूषित आहेत. परंतु काँग्रेसमध्ये त्यांची हुशारी वाया गेल्यासारखी वाटते. त्यांची कारकीर्द मनमोहन सिंगांसारखी वाटते. सुदैवाने अधिकार पद आहे पण दुर्दैवाने निर्णयक्षमतेचा अभाव आणि निष्क्रीयता आहे. गेल्याच आठवड्यात झालेल्या गारपिटीच्या नुकसानाच्या पार्श्वभूमीवर निष्क्रीयता जास्तच खुपते.

In reply to by श्रीगुरुजी

मुद्दा मान्य बरं का ! परंतु ही गुजरातमधली निर्णयक्षमता का ढेपाळते आहे तेही जरा स्पष्ट करा. हे बघा इथे. http://www.misalpav.com/comment/566824#comment-566824

In reply to by मालोजीराव

त्यांची चूक इतकीच कि ते काँग्रेससारख्या पक्षात आहेत. स्वतंत्र निर्णय घेण्याची सूट असती तर मोदींच्या योग्यतेचे मुख्यमंत्री नक्कीच झाले असते.
हे थोडेफार मान्य आहे. पण काँग्रेस पक्षात रहायचा निर्णय त्यांचाच आहे.