>> कविता कुणाला विचारून लिहिली जात नाही.तिची निर्मिती होते.ती जन्माला येते.कुणाला आवडो न आवडो त्याच्या मनात घोळत असलेले शब्द जेव्हा तो कागदावर लिहून काढतो ती त्याची कविता होते.
>> कारण माझ्या अनुभवातून मी सांगेन की कधी कधी डोक्यात विषय आला की शब्द आपोआप जुळून येतात आणि त्या दोन ओळी कागदावर लिहील्या शिवाय चैन पडत नाही.
ही वाक्यं तर विशेष महत्वाची आहेत.
ती एक सुरसुरी असते आणि कुठलीही ओळ / कुठल्याही ओळी सुचल्यावर कुठे तरी तात्पुरती लिहून ठेवणं फारच आवश्यक असतं... भले मग तो कागदाचा चिटोरा, बसचे तिकीट, रेस्टॉरंटच्या बिलाचा पाठकोरा भाग इ. काहीही असो. बरं, ही कवितापण अशी लहरी असते की एकदा सुचलेल्या ओळी, लिहून ठेवल्या नाही तर, काही वेळाने तश्शाच परत आठवतीलच ह्याची खात्री नसते !
कधी असंही होतं की दोन -तीन ओळी सुचतात पण पुढे त्यांचं काहीच होत नाही .. ती कविता आपल्याकडून होणारी नसतेच बहुतेक.
आवडत्या विषयावर लेख लिहिल्याबद्दल धन्यवाद सामंतकाका :)
चित्रेजी,
आपल्या प्रतिक्रिये बद्दल आभार.
आपल्या पण कविता मी वाचल्या आहेत.छान लिहिता.
पाडगांवकर म्हणतात,
"जेव्हां आपले मन जुळते
तेव्हा आपल्याला गाणे कळते"
www.shrikrishnasamant.wordpress.com
श्रीकृष्ण सामंत
"कृष्ण उवाच"
shrikrishnas@gmail.com
कविता कधीही सुचते. आणि कधि तर, लिहायला म्हणून बसलं तरी नाहि सुचत.
कविता सुचण्याला वेळ, काळ आणि स्थळाचं बंधन नाही हेच खरं.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
>>कविता ह्रुदयातल्या कळा प्रदर्शीत करते.मग त्या आनंदाच्या असो दुःखाच्या
खरच.
खुप आवडला हा लेख. पटला ..
मनात विचार येवुन लिहिता न येण्यात किती वेदना असतात ते अनुभवून कळते..
प्रतिक्रिया
पटला लेख
आभार
कृपया मला
जशी तुझी इच्छा
छान लिहिले आहे..
अगदी सहमत
काव्याची व्याख्या.
किती छान व्याख्या आहे
लेख आवडला
अगदी खर..
आभार