मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

दोभोळकर कुटुंबीयांनी समाजसेवक दिवंगत बाबा आमटे यांच्यासारखा सरकारी पुरस्कार नाकारावा का ?

psajid · · काथ्याकूट
नुकताच डॉ. नरेंद्र दाभोळकरांना सरकारने 'पद्मश्री' हा मानाचा पुरस्कार मरणोत्तर जाहीर केला. या निमित्त माझ्या मनात काही प्रश्न उपस्थित झाले ते तुमच्याशी व्यक्त करावे म्हणतो १) डॉक्टरांच्या खुनाला आज जवळ जवळ पाच महिने होत आलेत तरीही पोलिस नेमक्या खुन्यापर्यंत पोहोचली नाहीत आणि म्हणून सरकारने हे अपयश झाकण्यासाठी, आणि जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवून आम्ही (सरकार) सुधारणावाद्यांच्या बरोबरच आहे हे दाखवण्यासाठी महाराष्ट्रातून त्यांच्या नावाची पद्म पुरस्कारासाठी शिफारस केली का ? २) कोणत्याही समाज सुधारकाचे कार्य हे त्याच्या मृत्युनंतरच लोकांसमोर यावे का ? ३) सरकारच्या धोरणाविरुध्द थोर समाजसेवक बाबा आमटे यांनी त्यांना मिळालेला पद्मविभूषण हा पुरस्कार जसा परत केला. तसाच डॉक्टरांना मिळालेला 'पद्मश्री' हा पुरस्कार सरकारचा निषेध करत त्यांच्या कुटुंबीयांनी परत करावा का ? ४) आजकाल हे देशातील सर्वोच्च पुरस्कार कुणालाही (वरिष्ठ पातळी वरील शिफारसीमुळे) मिळतात का ? या प्रश्नावरती मला निखळ चर्चा अपेक्षित आहे.

वाचन 4642 प्रतिक्रिया 0