कविता म्हणजे रे काय?........ भाऊ
मला परवा कुणीतरी सहज विचारलं
आहा, छान बकरा मिळाला पकवायला
मीही मग माझ्या "प्रतिभेला" ललकारलं
र ला र जोडायचा, ट ला ट जोडायचा
चार ओळींची कशीबशी सांगड बांधायची
कधी तिला रडवायचं तर कधी त्याला
अशी अगदी सहजच "चारोळी" पाडायची
हिंदी सिनेमांची गाणी उत्तम कच्चा माल
प्रत्येक हिंदी शब्दाला चढवा मराठी साज
करत राहा उदो उदो भाषांतरीत प्रतिभेचा
त्याला म्हणायचं मित्रा "किंचित अनुवाद"
कुणी बापडं कधी खुपच सुंदर लिहतं रे
त्याच्याच शब्दांनी मग त्यालाच हाणायचं
आयजीच्या जिवावर बायजी उदार होणं
पोटटेहो, त्याले आपन "विडंबन" म्हनायचं
फ़ुलवत जातसे कवी कहाणी बारा ओळींत,
अनपेक्षित देई कलाटणी अंती दोन ओळींत,
शार्दूलविक्रीडित वृत्ताशी करी झटापट तो
बरोब्बर रे बरोब्बर, हे काव्य तर "सुनीत"
दोन दोन ओळींमध्ये सांगते मर्म आयुष्याचे
अन जखम हळव्या मनाची निमुटपणे जाणते
भाऊसाहेब पाटणकरांची जी देते याद, दोस्ता
त्या निर्मितीला ही दुनिया गझल असं म्हणते
पावसाची रीमझीम, अन त्याचं पावसावर लिहणं
ते वाचून तिच्या आठवणीने डोळ्यात पाणी येणं
सलाम असो त्या "अविनाश" च्या तरल प्रतिभेला
खुपच कमी खोदतात असं हळुवार "कविते" चं लेणं
(किंचित कवी),
सतीश गावडे
आम्ही इथेही उजेड पाडतो -> मी शोधतो किनारा...
Taxonomy upgrade extras
| लेखनविषय: |
|---|
वाचने
2119
प्रतिक्रिया
2
मिसळपाव
प्रतिक्रिया
प्रतिसाद कवितेचा कवितेतुन
आवडली