त्रिगुणात्मक त्रैमूर्ती : एक विचार
लेखनप्रकार
दत्त जयंतीनिमित्त भगवान दत्तात्रेयांच्या आरतीचा विचार करण्याचा मानस आहे. त्या अनुषंगानं आधी दोन आरत्यांचा ( गणपतीच्या नि देवीच्या ) नि प्रतिसादांचा आढावा घेतला जावा ही विनंती.
ब्रह्मा, विष्णू आणि महेश ह्या तिन्ही देवतांच्या अंशावताराची जयंती. खरंतर देव जन्म घेतात का असा प्रश्न येतो पण भाविकांना ईष्ट देवतेचं स्मरण करायची संधी मिळावी, त्याद्वारे भक्ती वाढीस लागावी हा हेतू.
दत्त जयंतीची कथा : अत्रि नामक ऋषींच्या पतिव्रता पत्नीची अनसूयेची परिक्षा घेण्यास स्त्रीमत्सरानं सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती उतावीळ होतात, आपापल्या पतिराजांना तयार करतात नि अत्रि नसताना त्यांच्या आश्रमात पाठवतात. भिक्षा मागताना आम्हाला नग्न होऊन भोजन दे अशी अट घालतात. ती आपल्या पातिव्रत्याच्या जोरावर तिघांना लहान बाळ करुन आपलं स्तन्य (दूध) वाढते. अनसूयेवर तिघे प्रसन्न, त्यांच्या बायका गप्प. वर माग म्हटल्यावर तुम्हा ति घांनीही माझं दूध प्यायलेलं आहे त्यामुळे तुम्ही तिघेही आता माझे पुत्र आहात इथेच वास करुन असा म्हटल्यावर त्रिमुखी दत्त बनून अवतार धारण होतो.
कथेबाबत अनेक प्रकारे उहापोह होऊ शकतो. मनोरंजनाचं साधन नसलेल्या नि गुलामीनं पिचत पडलेल्या समाजातला कथेकरी बुवा आपल्या कल्पनाविष्कारानं कथा अशा प्रकारे सांगू शकतो ह्यात आश्चर्य नाही. रुपकं म्हणून वापरलेल्या गोष्टींना घट्ट परंपरांचं स्वरुप येऊन त्यात कर्मठपण कधी आलं ते सांगता येत नाही. सध्या फक्त एवढंच लक्षात घेऊ या की पातिव्रत्याचं सामर्थ्य दाखवण्याबरोबर मनाची निर्वासन (वासनारहित) अवस्था असेल, भगवंताकडे जाताना कुठलाही आडपडदाच काय तर यत्किंचित देखील झाकलेपणा नसला तर, विचारांची क्लॅरिटी असेल तर भगवंत स्वतः घरी येतात असा बोध ह्या कथेमधून घेता येतो.
पूर्ण आरती :
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा। त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।
नेती नेती शब्द न ये अनुमाना॥ सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥ १ ॥
जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता । आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥ धृ ॥
सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त । अभाग्यासी कैची कळेल हि मात ॥
पराही परतली तेथे कैचा हेत । जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥ २ ॥
दत्त येऊनिया ऊभा ठाकला । भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला । जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥ ३ ॥
दत्त दत्त ऐसें लागले ध्यान । हरपले मन झाले उन्मन ॥
मी तू पणाची झाली बोलवण ।एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥ ४ ॥
(पाठ आहे पण हाताशी पटकन khapre.org वर मिळाली. कॉपी करुन घेतली)
आरती शब्दाचा एक अर्थ 'उपास्याबद्दल रती असेपर्यंत म्हणजे प्रेम असेपर्यंत करावयाची ती' असा आपण पाहिलेला आहेच. पुन्हा सांगावं असा हा विषय आहे. अध्यात्माबद्दल सांगण्याचं वैशिष्ट्य म्हणजे पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज असते. कारण ऐकलेलं पटकन 'आत' पोचत नाही . कारण इतर गोष्टींनी मन 'व्यापलेलं' असतं. असो.
ही संतश्रेष्ठ शांतिब्रह्म एकनाथ महाराजांनी रचलेली आरती आहे. २१ वेळा अंगावर थुंकणार्या यवनास शांतपणे आपल्या वागण्याद्वारे सुधारणारे, पितर भोजनावेळी ब्राह्मणभोजनाऐवजी दीनदलित जोडप्यांना जेवू घालणारे समाज सुधारक, यात्रा करुन परतताना गाढवाच्या मुखी गंगाजल ओतून भूतदया करणारे असे एकनाथ महाराज! स्वत:च्या उदाहरणातून शांतपणे समाजसेवा करता येते हे त्यांनी तेव्हाच दाखवून दिलेलं आहे.
पंगतीला पत्नीच्या पाठीवर एका उद्धटाने उडी मारली तेव्हा 'अगं सांभाळ, त्यांना पाडशील' म्हणून मिश्किलपणं त्याची जागा दाखवून देणारे, भारुडाच्या माध्यमातून समाज प्रबोधन नि अध्यात्माचे अवघड सिद्धांत सहज समजावून सांगणारे एकनाथ महाराज. कार्यालयीन कामकाजात एक पै चा हिशेब सापडेना म्हणून रात्रभर जागून तो शोधणारे व्यवहार दक्ष नि खाजगी कामासाठी सरकारी दिवा विझवून, स्वखर्चाच्या तेलाचा दिवा जाळणारे एकनाथ महाराज. विस्मृतीत गेलेल्या ज्ञानेश्वरीला शुद्ध प्रत करुन पुन्हा प्रचार करणारे एकनाथ महाराज जणू ज्ञानेश्वर महाराजांच्या गळ्याभोवतीची ही कर्मठपणाने फासणारी मुळीच जणू सोडवतात.
अशा सर्वार्थाने श्रेष्ठ एकनाथ महाराजांनी रचलेली ही भगवान दत्तात्रेयांची आरती आहे.
मागे एका प्रतिसादात लिहील्याप्रमाणं भगवदतत्त्व सगळीकडं सारखंच. एकाच व्यक्तीला काका, मामा, बाबा, भाऊ, दादा, सर, साहेब, बंड्या म्हटल्याप्रमाणं कार्यानुसार नि कारणानुसार त्याचं नाम बदलतं. विश्व निर्मितीच्या कार्य शक्ती नि तेव्हाच्या अधिष्ठानाला ब्रह्मदेव, विश्वाचा पसारा सुरु राहण्याच्या कार्यशक्ती च्या अधिष्ठान देवतेला विष्णू नि तोचा संहार करण्याच्या शक्तीच्या अधिष्ठानाला महेश असं नाव आहे. हीच त्रैमूर्ती.
ज्या 'मोडस' मध्ये (अनुषंगाने) ती काम करते ते त्रिगुण. हालचालीशिवाय कार्य शक्य नाही. कुठलीही गोष्ट सुरु करण्यासाठी आवश्यक हालचाल अथवा जी क्रिया लागते तिला रजोगुण म्हणतात. नि सांभाळण्यासाठी आवश्यक असतं ते स्थैर्य. टिकणं. ह्या टिकण्याच्या मागं असणारा भाव असतो तो सत्त्वगुणाचा म्हणून ओळखला जातो. नि संपवण्यासाठी आवश्यक असतो तो तमोगुण म्हणजे संहार करण्याची क्रिया.
हल्लीच्या कोलॅबोरेशन च्या जमान्याच्या भाषेत बोलायचं तर दत्त भगवान हे एक 'टायअप' आहे तिन्ही गुणांच्या अभिव्यक्तीचं, तिन्ही प्रकारच्या शक्तींचं! पण ह्या तीन क्रिया म्हणजे भगवान दत्त नव्हेत किंवा हे तीन गुण म्हणजे दत्त नव्हेत. तर त्रिगुणात्मक म्हणजे तिन्ही गुणांचा आत्मा म्हणून म्हणजे ज्याला आपण मूळ स्त्रोत म्हणू शकू असे हे दत्त भगवान आहेत. मुळात ते काहीच करत नाहीत. ज्याप्रमाणं वीजेच्या बलावर हीटर नि रेफ्रिजरेटर दोन्ही चालून अनुक्रमे गरम नि थंड करण्याची कामं होतात पण वीज गरम किंवा गार नव्हे त्याप्रमाणं दत्त त्रिगुणात्मक आहेत खरे पण त्रिगुण म्हणजे दत्त नव्हेत तर त्रिगुण ज्याच्या अधिष्ठानावर काम करतात ती गोष्ट (इथं थोडं आणखी विश्लेषण म्हणजे असं एक जागी दाखवता येईल नि दुसरीकडं येणार नाही असं ते नसतंच मुळी. सबाह्य अभ्यंतरी पुढं येईलच)
दत्त म्हणजे दिलेला. कुणी दिला? कसा दिला? आपण वर पुराणातली कथा पाहिली. दत्तांच्या आईचं नाव अनसूया नि वडलांचं नाव अत्रि. कथा फार काही 'सांगणार्या' असतात. बहुतेकदा रुपक कथाच असतात त्या. आओअण नीट पाहिलं तर ह्या कथा पुष्कळ काही देऊ शकतात.
अ त्रि म्हणजे जे तीन च्या पलिकडे आहेत असे ते.
तीन गोष्टींची भली मोठी यादी आहे. तीन गुण -सत्त्व, रज, तम , तीन काल - भूत, वर्तमान, भविष्य, तीन अवस्था - जागृती, स्वप्न, सुषुप्ति, तीन देह- स्थूल, सूक्ष्म, कारण देह अशा सगळ्याच्या पलिकडं गेलेल्या व्यक्तीमध्ये दत्ताची अभिव्यक्ती शक्य आहे. (अथर्वशीर्षामध्ये त्वं गुण, देह, काल, अवस्था त्रयातीतः असं जे गणनायकाचं वर्णन आहे ते हेच्च्च्च! एकाच व्यक्ती चा हाक मारताना पुतण्याकडून काका नि दुसर्या बाजूनं भाच्याकडून मामा म्हणून उल्लेख येतो तसंच)
हेच अनसूया ह्या आईबद्दल. अन-असूय= असूया नसलेला/ली हे मनाचं स्वरुप असलेल्या व्यक्तीमध्ये दत्त भगवान येतात.
मुळात हे दत्त वगैरे का आणायचे जीवनात?
माणसाच्या जीवनात अनेक प्रकारच्या संघर्षामध्ये स्पर्धा, मत्सर, हेवेदावे असतात पण ज्या व्यक्तीला असूया नाही त्याला ह्या कशाचा त्रास होत नाही. आपल्याला वाटेल मग प्रगती कशी होणार? स्पर्धेशिवाय प्रगती कशी शक्य आहे ? उदाहरण घेऊ. शाळेत असताना एकाला ७५ % मिळाले तरी इतर ७०% च्या आसपास असल्यानं पहिला नंबर मिळायचा. एकदा असंच एकानं सांगितलं तुला ७५% मिळतात म्हणजे २५ % येत नाही का? डोळे उघडले. परिक्षा कितीची आहे? १०० % ची आहे ना? मग आपण १०० % साठी काम केलं पाहिजे. दुसरा ७० % वर असो अथवा ९५ % वर!
स्पर्धा कुणाची? कुणाशी? ह्या विचारामध्ये आपण इतरांशी तर नाहीच तर स्वतःशीसुद्धा स्पर्धा नाही करत. मला १०० % यावं एवढा भाव निर्माण होतो.
भूतकाळाची नि भविष्याची चिंता मुख्यत्वे भीतीपोटी असते. भीतीचा उगम पुन्हा आपण असू का नसू ह्यामध्ये असतो. एकदा आपण शरीर नाही तर चैतन्य आहोत हा भाव आत पक्का झाला की जमतं. थोडं अवघड वाटतं पण आधीच्या लेखात म्ह्टल्याप्रमाणं जर 'जे माझं आहे ते मी नाही' हे पक्कं झालं की माझा मोबाईल, घड्याळ म्हणजे मी नाही हे जसं मान्य तसं माझा हात, माझा पाय, माझं शरीर, माझं नाव, माझी शैक्षणिक पदवी, माझी संपत्ती, माझे नातेवाईक, माझं मन, बुद्धी चित्त म्हणजे मी नाही हे लक्षात येतं, पटतं. हळू हळू हे आत्मसात व्हायला लागतं. ह्यातून भीती जाते, चिंता जातात, काळजी जाते.
अनसूयेच्या पोटी येणारे दत्त ह्यासाठी आपल्यामध्ये आणावेत. असूया गेली नि भूत भविष्याच्या चिंता गेल्या की बरंचसं मन मोकळं होतं. मन मोकळं झालं की आनंद असतो, आनंद असला की समाधान असतं.
आपण पहिल्या ओळीतला पहिला चरण बघतोय अजून. त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा 'जाणा' वर म्हटलेलं सगळं हे जाणण्याचीच तर प्रक्रिया आहे. नेमकं काय आहे हे एकदा समजलं की पुढचं सगळं एकदम स्वच्छ होऊन जातं.
माहिती असणं वेगळं, समजणं वेगळं, समजून घेणं वेगळं नि जाणणं वेगळं. हे जाणल्यावर पुन्हा वेगळं काही जाणण्याची गरज तर राहत नाहीच पण वखवख देखील थांबते.
हे एकदा समजलं म्हणजे जणू 'मास्टर की' सापडली!
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा.: असा हा (तिन्ही गुणांचे स्वामी एकत्र आलेला) अवतार तिन्ही लोकांचा राणा म्हणजे राजाच जणू. (बाकी आनुषंगिक म्हणून तमोगुणाचे स्वामी म्हणून शंकर तमोगुणी नाहीत तर ते त्याचे स्वामी आहेत. बर्याच जणांचा तसा समज पुराणकथांचा पाठिंबा असल्यानं जाणवतो खरा मात्र हे खरं नाही. आमच्या घाटपांडे काकांनी पोलिसात असताना अनेक जणांची पाठ फोडली असेल पण म्हणून ते रागीट ठरत नाहीत तसंच काहीसं! असो. महाशिवरात्रीला शंकराची आरती बघू अशी महादेवाला प्रार्थना!)
नेति नेति शब्द न ये अनुमाना, सुरवर मुनिजन समाधी न ये ध्याना|
जोवर नेमका भाव समजत नाही तोवर गूढ आकलन होत नाही त्यामुळंच हे वेद शास्त्र नेति नेति (हे नाही, ते नाही असं) म्हणत राहतात नि कुठल्या अनुमानाप्रत येऊ शकत नाहीत. वर म्हटल्याप्रमाणं जे माझं ते मी नाही चा विचार अगदी ह्याच प्रकारे करता येऊन नेति नेति नि शंकराचार्यांच्या आत्मषटकाला जाऊन पोचतो.
'न जाणता कोटीवरी| साधने केली परोपरी| तरी मोक्षास अधिकारी| होणार नाही||' असं म्हणतानाचा समर्थ रामदासांचा भाव,
'तीळ जाळिले तांदूळ, काम क्रोध तैसेचि खळ' म्हणणारे तुकाराम महाराज, 'वस्तुर्सिद्धीर्विचारेण न कश्चित कर्मकोटिभि'
ह्या सगळ्याचा नि सुरवरमुनिजन योगी 'समाधी न ये ध्याना' चा एकंदर अर्थ हाच की योग्य मार्गानं सारासार विचार नि विवेक करुनच नेमकं काय हे समजून घेऊनच मोक्षपद प्राप्ती करुन घेतली जाऊ शकते (मुळात ते नित्यप्राप्त च आहे, चुकीच्या धारणांमुळं बंधन वाटतं (आरशावर घाण असली तर प्रतिबिंब दिसत नाही पण ते असतं तसं. आरसा स्वच्छ करावा लागतो))
जयदेव जयदेव जय श्रीगुरुदत्ता | आरती ओवाळीता हरली भवचिंता
भव चिंता: भव म्हणजे संसार. दुसरा अर्थ माझ्यापुरतं असलेलं जग. आपल्या आजूबाजूचंच. सगळ्याचा विचार काही ठराविक लोकांसाठी सोडून देऊ. (असतात तसे. असो द्यावेत) श्रीगुरु कॄपेने दिल्या गेलेल्या ह्या दत्तांच्या कृपेने माझी संसारविषयक म्हणजे एकंदर प्रपंचाची 'काय होईल नि कसं होईल'ची चिंता दूर झाली आहे असं नाथ महाराज म्हणतात तेव्हा ते आपल्यासाठी जास्त असतं. संत स्वतःसाठी बोलताना सुद्धा सगळ्यांचं हीतच पाहतात.
सबाह्य अभ्यंतरी म्हणजे सगळीकडे व्यापून असलेलं तत्त्व ते तूच आहेस. विश्वनिर्मिती ते विश्वाचा लय ज्याच्या सत्तेवर (बेसवर) चालतो ते चैतन्यरुप म्हणजे दत्त. ही गोष्ट अभाग्याला मात्र कळू शकत नाही.
पराहि परतली तेथ कैचा हा हेत, जन्ममरणाचा पुरलासे अंत|
आपण जेव्हा बोलतो तेव्हा बोलण्याची मूळ सुरुवात होते ती म्हणजे परावाणी. परा, पश्यन्ती, मध्यमा नि वैखरी अशा चार वाणी आहेत. वैखरी म्हणजे आपण जे बोलतो ते. मात्र परावाणी मध्ये मूळ सुरुवात होते असं मानतात.
ते तसंच का मानायचं? गणित सोडवायला एक 'क्ष' लागतो म्हणून. बस्स्स. समीकरण सोडवून 'क्ष' चं विसर्जन च अपेक्षित आहे. तर ही जी परावाणी आहे ती सुद्धा परतते असं दत्तात्रेयांचं स्वरुप आहे.
थोडासा विचार करुया. आपण कधी कधी शांत बसतो. अगदी शांत. काहीच विचार नाही. तेव्हा काय होतं? आतलं सगळं शांत असतं. मन हे करु का ते करु असं काम नसतं करत, बुद्धीला घ्यायला कुठला निर्णय नसतो, चित्त काही साठवून ठेवायला नसल्यानं गप्प असतं, तसंच विचाराचा उगम असलेली परावाणी सुद्धा आपल्या मूल स्थानावर असते. चक्र सुरुच नाही ना कसलं! त्यामुळं शांतीचा अनुभव येतो. ह्यालाच परावाणीचं मूलस्थानी परतणं म्हणायचं. जास्त डिटेल्स नकोत पण जेव्हा सगळं अत्यंत शांत असतं तेव्हा दत्ताचं दर्शन झालं असं म्हणायचं.
हे कधीकधी एका जन्मात शक्य होत नाही म्हणून 'जन्ममरणाचा अंत पुरतो'. जन्मो जन्म सुद्धा घालवावे लागतात.
दत्त येवोनिया उभा ठाकला, सद्भावे साष्टांगे प्रणिपात केला : अशा सातत्याच्या विचारातून कधीतरी जाणून घेतलेल्या अनुभवातून दत्त हा अनुभव येतो त्याला शाश्वततेकडे नेणार्या सतभावानं प्रणिपात म्हणजे अहं सोडून नमस्कार केला.(भाव म्हणजे जो स्थिर असतो तो तर भाव-ना म्हणजे अस्थिर भाव, अभाव म्हणजे नाहीच्च! )
अशा रितीने तत्त्व समजल्यानं आशीर्वाद लाभला नि जन्ममरणाचा फेरा म्हणजे हे जे 'मी नि माझं' चं खरं स्वरुप समजलं त्यामुळं त्या बंधनातून माझी मुक्तता झाली.
दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हारपले मन झाले उन्मन,
मीतूपणाची जाली बोळवण, एका जनार्दनी श्रीदत्त ध्यान||
तत्त्व समजलेलं आहे, त्यामाग ची प्रेरणा जाणलेली आहे, जनार्दनस्वामी जे श्रीगुरु आहेत त्यांची कॄपा झालेली आहे अशा दुग्धशर्करायोगानं प्रारब्ध योगानं नि स्वप्रयत्नानं नाथ महाराजांना त्रिगुणातीत, अनसूय बुद्धीनं मिळालेल्या दत्ताचं ध्यान लागलंय, हे ध्यान लागल्यानं मनाचं, बुद्धीचं, चित्ताचं, अहंचं काम थांबून मनाची उत-मन म्हणजे जणू मन शिल्लकच नाही अशी अव स्था झालेली आहे. एकच तत्त्व सगळीकडं असल्याचा अनुभव, अनुभूती आल्यानं वेगळेपणा शिल्ल क नाही, मी आणि तू असं काही नाहीच सगळीकडं एकच एक असल्याचा भाव जागृत झालेला आहे.
असाच आनंदाचा ठेवा सगळ्यांना प्राप्त व्हावा हीच विनवणी श्री दत्तात्रेय, एकनाथ महाराज, जनार्दन स्वामी नि श्रीगुरुंच्या चरणी अर्पण करतो.
सगळ्यांना दत्तजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
वाचने
45514
वाचनखूण
प्रतिक्रिया
246
हारपले मन झाले उन्मन,
अवधुतचिंतनश्रीगुरुदेवदत्त !!
In reply to अवधुतचिंतनश्रीगुरुदेवदत्त !! by प्रसाद गोडबोले
आपण म्हणता तसं असू शकतं.
In reply to आपण म्हणता तसं असू शकतं. by प्यारे१
वाह
In reply to आपण म्हणता तसं असू शकतं. by प्यारे१
अत्यंत सुस्पष्ट.. अर्थपूर्ण..
आयला, काय स्टोर्या लावतात लोक!
In reply to आयला, काय स्टोर्या लावतात लोक! by संजय क्षीरसागर
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.
In reply to प्रतिसादाबद्दल आभारी आहे. by प्यारे१
+१११
In reply to प्रतिसादाबद्दल आभारी आहे. by प्यारे१
हा हा हा
In reply to प्रतिसादाबद्दल आभारी आहे. by प्यारे१
आयला!
In reply to आयला! by अवतार
परिक्षा
In reply to आयला! by अवतार
मला बोलावलंत?
In reply to मला बोलावलंत? by निराकार गाढव
गाढव परवडलं!
In reply to गाढव परवडलं! by अवतार
@गाढवाला आपण स्वत: गाढव आहोत
In reply to @गाढवाला आपण स्वत: गाढव आहोत by अत्रुप्त आत्मा
@ म्हणून सगळेच गाढव नसतात...
लेख आवडला...!
छान लिहिलीयस प्यारे.
उत्तम विवेचन.
In reply to उत्तम विवेचन. by प्रचेतस
महाराष्ट्र सोडून अन्यत्र
In reply to महाराष्ट्र सोडून अन्यत्र by बॅटमॅन
दत्तोपासना
In reply to दत्तोपासना by अनिरुद्ध प
धन्यवाद. कुरवपुर अन पिठापूर
In reply to महाराष्ट्र सोडून अन्यत्र by बॅटमॅन
नृसिंह सरस्वतींच्या अगोदर दत्तोपासना पापिलवार नसल्याची शंका आहे.
In reply to नृसिंह सरस्वतींच्या अगोदर दत्तोपासना पापिलवार नसल्याची शंका आहे. by अनिरुद्ध प
माहितीकरिता धन्यवाद!
In reply to महाराष्ट्र सोडून अन्यत्र by बॅटमॅन
दत्त आणि संतोषीमाता
धन्यवाद
मस्त लेख....
In reply to मस्त लेख.... by मुक्त विहारि
+१
क्या बात है प्यारेस्वामी! लेख
उत्कृष्ठं विवेचन.
दत्त जयन्ती च्या शुभेच्छा !
सुरेख!
In reply to सुरेख! by पैसा
आभारी आहे हो!
सुंदर विवेचन.
In reply to मनाने मनाला मनाबाहेरुन मनाजोगं कंट्रोल करणार्या ? by संजय क्षीरसागर
काँग्रॅचुलेशन्स !!!
In reply to काँग्रॅचुलेशन्स !!! by अर्धवटराव
याच प्रकारच्या स्वतःच्या कथेचा भंपकपणा त्यानं कबूल केला आहे
In reply to याच प्रकारच्या स्वतःच्या कथेचा भंपकपणा त्यानं कबूल केला आहे by संजय क्षीरसागर
बरोब्बर.
In reply to बरोब्बर. by अर्धवटराव
स्वप्रतिमा?
In reply to स्वप्रतिमा? by संजय क्षीरसागर
अच्छा??
In reply to अच्छा?? by अर्धवटराव
दत्त दत्त!!
In reply to स्वप्रतिमा? by संजय क्षीरसागर
डॉ. दाभोलकर
In reply to डॉ. दाभोलकर by पैसा
मला वाटतंय दाभोलकरांच्या
In reply to मला वाटतंय दाभोलकरांच्या by प्यारे१
प्रतिसादातच काँट्राडिक्शन आहे!
In reply to डॉ. दाभोलकर by पैसा
दाभोलकरांचे विचार.
In reply to दाभोलकरांचे विचार. by अर्धवटराव
गोंधळ म्हणजे काय असतो ते पाहा:
In reply to गोंधळ म्हणजे काय असतो ते पाहा: by संजय क्षीरसागर
पुन्हा एकदा अभिनंदन.
In reply to पुन्हा एकदा अभिनंदन. by अर्धवटराव
केविलवाणी परिस्थिती कुणाची होतेयं ते प्रतिसाद सांगतायंत
In reply to केविलवाणी परिस्थिती कुणाची होतेयं ते प्रतिसाद सांगतायंत by संजय क्षीरसागर
प्रतिसाद तर बरच कहि सांगतात हो.
In reply to दाभोलकरांचे विचार. by अर्धवटराव
>>>>(अंधश्रद्धा या शब्दातच
In reply to >>>>(अंधश्रद्धा या शब्दातच by प्यारे१
श्रद्धेची उपयोजिता!
In reply to श्रद्धेची उपयोजिता! by संजय क्षीरसागर
कशाला संक्षी या भाकड लोकांवर
In reply to कशाला संक्षी या भाकड लोकांवर by स्पा
@ तुम्ही लिहा फाहू फक्कड काहीतरी
In reply to श्रद्धेची उपयोजिता! by संजय क्षीरसागर
अश्या काल्पनिक स्टोर्यातून
In reply to अश्या काल्पनिक स्टोर्यातून by गवि
अबाबाबाबा
In reply to अश्या काल्पनिक स्टोर्यातून by गवि
यु अटेण्ड सॅल्व्हेशन डुड !!!
In reply to अश्या काल्पनिक स्टोर्यातून by गवि
@ गवि
In reply to अश्या काल्पनिक स्टोर्यातून by गवि
___/\___
In reply to डॉ. दाभोलकर by पैसा
@ ज्योति कामत : दाभोलकर आणि आपण
In reply to @ ज्योति कामत : दाभोलकर आणि आपण by संजय क्षीरसागर
मी तो हमाल भारवाही
In reply to मी तो हमाल भारवाही by पैसा
या सर्वावर टिप्पणी करण्याएवढा माझा अभ्यास नाही?
In reply to या सर्वावर टिप्पणी करण्याएवढा माझा अभ्यास नाही? by संजय क्षीरसागर
:)
In reply to @ ज्योति कामत : दाभोलकर आणि आपण by संजय क्षीरसागर
@ तुमच्या प्रतिसादातला हा अत्यंत महत्त्वाचा भाग पुनरुधृत करतो :
@ पैजारबुवा, मस्तच.
In reply to @ पैजारबुवा, मस्तच. by प्यारे१
धन्साशिर्वाद, प्यारे...
In reply to @ पैजारबुवा, मस्तच. by प्यारे१
प्यारेबुवा सातारकर वा आफळे इ
आवडले !
खुप छान आणी अप्रतिम लेख.
येवढ्या मोठ्या गोष्टी समजून
In reply to येवढ्या मोठ्या गोष्टी समजून by सूड
+१
In reply to येवढ्या मोठ्या गोष्टी समजून by सूड
पुना पुना वाचायचं...
वा प्यारेबुवा, छान लिहिताय.
सुंदर लेख
मस्त !
छान लिहिले आहे.
सुंदर
स्वभावातला माजोरडेपणा कुणा
In reply to स्वभावातला माजोरडेपणा कुणा by पिलीयन रायडर
>>त्यामुळे तुझ्या सारख्या
In reply to >>त्यामुळे तुझ्या सारख्या by सूड
मी तुझं कौतुक केलं होतं रे
In reply to >>त्यामुळे तुझ्या सारख्या by सूड
___/\___ प्रयत्न करतोय रे!
In reply to ___/\___ प्रयत्न करतोय रे! by प्यारे१
(No subject)
In reply to (No subject) by बिपिन कार्यकर्ते
( बिकाकाका कमी बोलून किंवा
In reply to ( बिकाकाका कमी बोलून किंवा by प्यारे१
(No subject)
In reply to ( बिकाकाका कमी बोलून किंवा by प्यारे१
>>'दया तिचे नाव, भूतांचे पाळण
In reply to >>'दया तिचे नाव, भूतांचे पाळण by सूड
का छळतोस रे प्यारे काकांना
सुपर्ब !!
आवडले...अजुन दोन एक वेळा
तिसरे कडवे
दत्तगुरूंचे २४ गुरू
अभ्या, अक्षया, श्रीवेद,
In reply to अभ्या, अक्षया, श्रीवेद, by प्यारे१
(No subject)
ह. भ. प. (ओरिजिनल लाँगफॉर्म