Skip to main content

सांजवेळ

लेखक सचीन
Published on रवीवार, 24/11/2013
दिगूअण्णा खिडकीच्या बाहेर बघत बसले होते. खाली जी मुले खेळत त्यांना बघणे, दिवसभर रहदारी बघणे. हा त्यांचा नेहमीचा क्रम होता .दिवस तर कसाबसा ढकलला जात असे पण संध्याकाळ मात्र उदासवाणी असे. ह्या सांजवेळी दिगूअण्णा नेहमीच अस्वस्थ असत. आतल्या खोलीत मालतीबाई जपमाळ ओढत बसे. ह्या जोडप्याची देखभाल करण्यासाठी कोणीही नव्हते. घरात पैसा होता पण मायेच कुणी नव्हत. दिगूअण्णाना मालतीबाई नि मालतीबाईना दिगूअण्णा इतकेच त्यांचे विश्व. शेजारच्या सखारामबापूंचे भरलेल कुटुंब त्यांना नेहमीच मोहवत असे. सखारामबापूंची नातवंड दुपारी दिगूअण्णाच्या घरी येत तेव्हा दिगूअण्णा नी मालतीबाईना फार आनंद होत असे. सखारामबापूंचा मुलगा बबन हा खरच गुणी मुलगा होता.दिगूअण्णाचा माधव आणि हा बबन एकाच वयाचे दोघेही एकत्रच शिकले पण शैक्षणीक प्रगतीत माधव हा नेहमीच वरचढ होता. दिगूअण्णाची साम्पतिक स्तिथी हि सखारामबापूंपेक्षा चांगली होती. निरनिराळ्या क्लास्सेस यांचा मारा करून माधव हा अभ्यासात चांगलाच पुढे आला होता. बबनची मात्र एवढी प्रगती नव्हती सखाराम बापूंच्या तुटपुंज्या मिळकती मुळे त्यांना बबनच्या शैक्षणीक प्रगतीकडे नीट लक्षच देता आले नव्हते.आणि बबनही शिक्षणात सामान्यच होता. काळ आपल्या वेगाने पुढे निघून गेला माधव हा एक संगणक अभियंता झाला व अमेरिकाला जाऊन सेटल झाला तर बबन हा एका कंपनीत कारकून म्हणून कामाला लागला त्याने एका घरगुती मुलीशी लग्न केले व त्यांचा संसार सुरु झाला माधवनेही एका अमेरिकन मुलीशी लग्न केले व तो तिथेच स्थायिक झाला. आज दिगूअण्णा जेव्हा दोन्ही संसाराकडे बघत होते तेव्हा त्यांना जाणवले कि ज्यावेळी माधवची शैक्षणीक प्रगती होत होती त्यावेळी ते आनंदात होते. परंतु आज मात्र तशी परिस्तिथी नव्हती सखारामच्या कुटुंबाकडे पुरेसा पैसा नव्हता. तथाकतीत प्रतिष्ठेची साधने नव्हती. पण त्या घरात प्रेम होते, जिव्हाळा होता, कौटुंबिक सौख्य होते. बबन हा आपल्या आई वडिलांकडे लक्ष देई. घरात पैसे दिले म्हणजे आपले कर्तव्य झाले असे मानणाऱ्यापैकी बबन नव्हता. त्याला बढतीची जागा मिळत होती पण त्या साठी दुस ऱ्या राज्यात जावे लागेल अशी अट होती. पण बबनने बढती नाकारली व आई वडिलांची सेवा करण्यासाठी तो येथेच राहिला. सखारामबापूंनी त्याला समजावले “बेटा, तू जा आमची काळजी करू नको. आम्ही काय पिकले पान. आज आहोत, उद्या गळून पडणार”. पण बबन म्हणाला, “बाबा, तुम्ही मला काटकसर करून शिक्षण दिलेत. तुमची सेवा करणे हे माझे कर्तव्य आहे. आज उतारवयात तुम्हाला नि आईला माझी गरज आहे. मी जास्त पैशांसाठी नि करीअरसाठी तुम्हाला सोडून जाऊ शकत नाही.तो कृतघ्नपणा होईल. करीअर पैसा ह्या गोष्टी निश्चितच मोठ्या आहेत. पण माझ्या आई वडिलांपुढे त्या मला तुच्छ आहेत. थुंकतो मी त्या जादा मिळणाऱ्या पैशांवर. जर मला आई वडिलांचा त्यासाठी त्याग करावा लागणार असेल.” मला माहित आहे बाबा मी लहान असताना जेव्हा आजारी पडे. तेव्हा तुम्ही नि आई रात्ररात्र माझ्या उशाशी बसून काढल्यात. आज तुम्ही वृद्ध झालात तुम्हाला आज माझी खरी गरज आहे, तर मी तुम्हाला सोडून कसा जाऊ. बाबा, मला जर कुणी गरीब म्हटले तर मला काही वाटणार नाही. पण पैशांसाठी आई वडिलांना सोडणारा कृतघ्न म्हटले तर मला माझीच लाज वाटेल, बाबा”.शेवटी त्याच्या हट्टापुढे सखारामबापू झुकले. इकडे माधव अमेरिकेत सेटल झाला होता. आपल्याला नातू झालाय हे दिगूअण्णाना फेसबुकच्या माध्यमातून कळले. अनेक वर्षांनी त्यांना आपल्या मुलाला भेटायचा योग आला. ते सपत्निक अमेरिकाला गेले. आपली अमेरिकन सून नि नातवंडे त्यांनी डोळे भरून पाहिली.नातवाना हे आजी आजोबा बिलकुल आपले वाटले नाही. त्यांची छोटी नात तर आजीचे कुंकू, गळ्यातले मंगळसूत्र, साडी हा अवतार बघून एकाद्या परग्रहावरील माणसाला पाहावे तशी त्यांना पाहू लागली. एकदा मालतीबाईनी आपल्या सुनेला संकष्टीचा उपवास धरायला सांगितला. तेव्हा सुनबाई फक्त हसली. नंतर माधव आईला म्हणाला,”तिला पुन्हा असे काही सांगू नकोस.तिला ह्या गोष्टीन मध्ये अजिबात रस नाही”. मालतीबाई नाराज झाल्या. नातवान्शीही त्यांचे कधी जुळलेच नाही आजी बाबा आपल्या नातवाना अनोळखीच राहिले. माधव आपल्याला एकदाही इथे कायमचे राहायला या असे बोलला नाही हे दिगू अण्णांना चांगलेच खटकले. शेवटी महिनाभर तेथे राहून दिगूअण्णा नि मालतीबाई परतले. तोच त्यांना आमंत्रण मिळाले सखारामबापूंच्या एकसष्ठीचे. दिगूअण्णा मागील महिन्यातच एकसष्ठ वर्षाचे झाले होते पण कोणालाच त्याची आठवण नव्हती. सखारामबापूंची एकसष्टी जोरात झाली. शंभर एक पान उठले. बबन सपत्निक आईवडिलांच्या पाया पडला.आपण आज जे यशस्वी आहोत त्यामागे आईवडिलांचा आशीर्वादच आहे हे त्याने ठासून सांगितले. काटकसरीत थोड्या पैशात संसार करणारा बबन आज स्वताला यशस्वी म्हणत होता याचे दिगूअण्णाना कौतुक वाटले. दिगूअण्णानी सखारामबापूंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या व म्हणाले “सखाराम, आपण बालमित्र मी जीवनात नेहमीच तुझ्या पुढे राहिलो. तुझ्याहून जास्त पैसा कमावला. पोराला शिक्षण दिले, पण आज मला कळते कि, मी तो इसापनितीतला ससा आहे नि तो तू कासव, शेवटी शर्यत जिंकणारा. आज आपल्या ह्या जीवनाच्या सांजवेळी नक्कीच तू माझ्यापेक्षा सुखी आहेस तुझ्यासारखेच यशस्वी जीवन साऱ्याना लाभो हीच प्रार्थना.” सखारामबापू भारावल्यासारखे दिगूअण्णाकडे पाहतच राहिले..
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 3578
प्रतिक्रिया 13

प्रतिक्रिया

छोटेखानी पण अतिशय सुरेख गोष्ट. आमचा एक मित्र आहे. अर्थात एक मुलगा अन एक मुलगी या चौकोनी कुटुंबातला. अमेरिकेत छान नोकरी. आता पुढे सुंदर वाटचाल होइल अशी खात्री. त्याचे आईवडिल एकदा जाउन अमेरिकावारीसुद्धा करुन आले. अन मग एकदा वडिलांनी फोन करुन घसा तपासून आलोय म्हणुन सांगितले. कॅन्सरची शंका होती. त्यावेळी आम्ही मुंबईतच होतो. एकदम मित्राचा फोन. मी मुंबईत आहे. भेटायला गेलो. त्याचे वडिल ठिक होते. तेंव्हाची ट्रीटमेंट झाली. सगळ सुरु करुन हा परत अमेरिकेत गेला खरा, पण कॅन्सर रिलॅप्स झाला. सगळ सोडुन परत आला. आई वडिलांजवळ आला. अर्थात त्या आजारात बाबा गेले. आता आईजवळ भारतातच रहातो. मला फार अभिमान वाटतो त्याचा. मी एकदा म्हंटल होतं त्याला, 'दिपक तू जे केलस त्याबदल्यात तुला १०० पटीने यश मिळेल." अन आज ते यश मिळालेही आहे. खूप मोठ्या हुद्द्यावर आहे दिपक. याच्या अगदी उलट उदाहरण घरात. आईवडिलांकडुन अमाप पैसे घेउन एमएस. मग अमेरिका. आईवडिलांना प्रचंड मनस्ताप देणारी वागणुक. शेवटी लग्न झाल्यावरसुद्धा असच वागण. पुढे काही लिहीत नाही. वैयक्तिक होइल.

अगं आई गं !! तो माधव किती दूष्टं आहे आणि बबन ़ कित्ती चांगला आहे ? :(

खर्रय स्सालं आजकाल कित्येक जण परदेशात स्वताच्या स्वार्थाचा विचार करूनच जातात.

जीवनभौ च्या कथेचे इतके दूरवर परीणाम होत असतील याची जाणीव नव्हती. शेवटी संस्कारी लेखन हेच महत्वाचे. ( मराठी कथालेखकांच्या कथेचे संस्कार दूरवर जावोत...;) )

घरगुती म्हणजे काही काळापुर्वी कथाकादंबर्‍यांत उल्लेखलेल्या...... फुलाफुलांची सहावारी साडी नेसलेल्या, ओठाचा चंबु करुन बोलणार्‍या, शेपटा उगाच्चच उडवणार्‍या, धनुष्याकृती भुवया उडविणार्‍या, मुलांशी बोलताना नजर जमिनीवर खिळवुन, पायाच्या अंगठ्याच्या नखाने सारवलेली जमीन खरवडणार्‍या तसेच पदराशी चाळा करणार्‍या मुली ह्या घरगुती होत.