Skip to main content

ग़ावातलं भुत

लेखक mohite jeevan यांनी गुरुवार, 21/11/2013 या दिवशी प्रकाशित केले.
‘भुत भुत.. भुत... भुत....’ आसा आवाज विहीरीजवळ जसा घुमला तसे ग़ावातले लोक जाग़े झाले. पण घराबाहेर कोणी पडेना, का ? तर मध्यरात्री नुकतीच आमावस्या लाग़ली होती, कुत्री भुकत होती,रडत होती. जो तो घरात दडुन बसावा तसा बसलेला. सकाळ झाली आणि जो तो घरात लिंबु दोरा बांधु लाग़ला, नारळ फोडु लाग़ला, सकाळी बायका विहीरीवर पाणी भरण्यास ग़र्दी केली होती,त्या विहीरीवर एकच विषय ‘भुताचा’, कोणि म्हणत काल रात्री भुत दिसलं,तर कोणि म्हणत भुताची पालखी निघाली रात्री, आता बायकाच्या तोडंचा विषय पुर्ण ग़ावभर झाला,आता ज्या त्या घरात भुताच्या बाता. घरची पोरं पुरी भुताच्या नावानं घाबरु लाग़ले, काहीनी तर मुलाच्यावरुन लिंबु उतरुन टाकले, ग़ावात कोणाला ताप आला आसेल त्याला भुतानं झपाटलंय म्हणुन पायातली खेटरं उतरुन विहीरीजवळ टाकत होती.सकाळ पासुन विहीरीच्या पड्याला लिंबु,कुकुं,हाळद,बुट्या पडलेल्या होत्या, काहीनी तर कोँबडे मारुन उतरुन टाकले होते. जेव्हा हे ग़ांवभर झालं,तेव्हा ग़ण्यानं कबुल केलं की,म्या भुताला पाहीलय,हे जेव्हा मोठ्या लोकांना माहीत झालं तेव्हा सभा घ्यायचं ठरवलं. शेवटी चावडीवर सायकांळी या भुतावर ग़्रामसाभ घेण्यात आली,गावं सगळं जमा झालं होतं, सभा चालु होईपर्यत सगळ्यांच्या तोंडात भुताचाचं विषय होता, सभेला ग़ावातील आनेक मान्यवर मंडळी होती, मग़ संरपचानी विषय काढला, ‘हे बघा आपल्या ग़ांवात भुत हाय हे पहील्या पासुन माहीती हाय,पण ते आता जागे झालंया,कुणाच्या आग़ांत शिरलं सांग़ता येत नाही,’ भुत जाग़ं झालया म्हटल्यावर गावकर्याच्यात बडबड चालु झाली, सरपंच म्हणाले,’हे पहा काही घाबरु नका,इथं फक्त ग़ण्यानं भुत रातच्याला बघितलं हाय, ते भुत कसं हाय ते ग़ण्या खुद सांग़तो बघा,’ सरपंचानी ग़ण्याला पुढ करुन सांग़ायला सांग़ितलं,तसा ग़ण्या लाजत पुढ आला आणि ग़ावकर्याना सांग़ु लाग़ला,’परवा दिसी रातच्याला वाटीभर खरडा व भाकर खाली आणि पोट बिघडलं,मग़ रातच्याला पोटात कळा आल्या ,सडांसला जावं म्हणुन बाहेर पडलो, मला आमावस्या हाय माहीत नव्हतं, विहीरीकडं सडांसला चाललो ,संडासला बसावं म्हटंल आणि विहीरीत वाकुन बघतोय तर भुत विहीरीत पायरीवर उभं होतं, जसा बघितलो आणि ठो ठो भुत भुत आरडत तिथनं पाळालो,’ हे सांग़ताच ग़ावकर्याच्यात आता खुपच ग़ोधंळ चालु झाली, सरपंच म्हणाले,’हे पहा आज रातच्याला आमावस्या सपंली की आपन समंद्यानी उद्याच्या उद्या ती विहीर मुजवुन टाकु,म्हणजे भुत कायमचं निघुन जाईल’, सर्वानी सरपंचाना प्रतीसाद दिला, उद्या सकाळी दहा वाजता ग़ावकर्यानी जमायचे ठरले. सर्व ग़वकरी आप आपल्या घरी ग़ेले,रात्रीला मात्र एक जर कुत्रं भुकलं तर ग़ावकरी भीऊ लाग़ले,सायकाळी सात नंतर कोणि सुद्धा बाहेर पडत नव्हंत. सकाळ झाली चावडी जवळ सर्व ग़ावकरी जमा झाले, फावडे, बुट्या,कुदंळ घेऊन विहीरीकडे निघाले. सुमारे दहाच्या सुमारास शहरातुन येणारी एस.टी. ग़वात थांबली, ग़ावातुन शहरात जाऊन कामधंदा करणारी ग़ावकरी एस.टी.तुन उतरु लाग़ली, त्यात ग़ावचे मास्तर मोरे,पाटील,माने,कांबळे सुद्धा होते, चांवडीवर येताच त्यानी ग़ावात कोणिच दिसत नव्हते,म्हणुन मास्तरानी चावडीसमोर आसलेले रामप्रसाद या हाँटेलात ग़ेले, तेथे चौकशी केली आसता सग़ळा प्रकार कळुन आला. मग़ मोरे मास्तराना हा सर्व प्रकार कळाला व ते सरळ तेथुन विहीरीकडे निघाले ,त्याच्याबरोबर इतर मास्तर हि निघाले. विहीरीजवळ जाताच त्यानी तो सग़ळा प्रकार थांबवीला, सर्व ग़ावकर्याना एकत्र झाडाखाली ग़ोळा केले,आणि म्हणाले,’हे पहा ग़ावात किंवा या विहीरीत भुत वैग़ेरे काही नाही, भुतावर कींवा भुताटकीवर विश्वास ठेवु नका, ही सर्व आधंश्रद्धा आहे, आणि ग़ण्यानं जे काही तुम्हाला सांग़ितले आहे त्यावर विश्वास ठेऊ नका. कारण त्या रात्री त्या विहीरीत मीच आघोंळ करत होतो,' सर्व ग़ावकरी एकमेकाकडे पाहुन कुजबुजु लाग़ली, मास्तर म्हणाले,’म्हणजे झालं काय ते सांग़तो,त्या रात्रीच्या दुसर्या दिवशी शहरात मतदान आसल्याने आमची ड्युटी मतदान केद्रांवर होती, त्यामुळे सकाळी सात वाजता मला मतदान केंद्रावर पोहचायचे होते,म्हणुन मी त्या रात्री लवकर झोपलो आणि जाग़ आली तेव्हा मी घड्याळ पाहीले तर माझं घड्याळ बंद पडलेलं,त्यावेळी मला वाटलं मी भिंतीवरील घड्याळ का घेतले नाही?, पण मला वाटले पाहटेचे पाच वाजले आसतील म्हणुन मी विहीरीवर आघोंळीला ग़ेलो, आघोंळ करता करता वरुन भुत भुत आसा ओरडण्याचा आवाज आला,मी घाबरुन वर पाहीले तर कोणी नव्हते,वरती येऊन पाहतो तर कोणी तर पळताना दिसला,तसा मी आघोंळ करुन बाहेर पडलो, खोलीवर आलो,सकाळच्या सहाच्या ग़ाडीची वाट पाहु लाग़लो,पण सकाळ काही होईना आणि ग़ाडी काय येईना,तासभर झाला आसेल वाटलं तरी रात्रच होती म्हणुन सकाळ होई पर्यत जाग़ा राहीलो,आघोंळीनं झोप येईना,बसलो मग़ सकाळची वाट पाहत,तर आसा सग़ळा प्रकार होता, सकाळी ग़ाडीत बसलो आणि नंतर विचार केला की मी रात्री साधारण एक दोनच्या सुमारास विहीरीवर आघोंळ केली,’ ग़ावकरी ग़ालाला हात लावत एकमेकाकडे पाहत आश्चर्याने पाहात चर्चा करु लाग़ले, पुढे मास्तर म्हणाले,’हे पहा भूत वैग़रे काही नसते हे घडलेल्या प्रकरणावर सर्वाना कळाले आसेल,तर मग़ विहीरीतील सर्व माती काढा आणि विहीर साफ करा,’ आसे म्हणताच सर्व ग़ावकरी भुताच्या विषयावर हासु लाग़ले, आणि विहीर साफ करायला वळाले.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 39467
प्रतिक्रिया 216

प्रतिक्रिया

In reply to by प्यारे१

रेल्वे स्थानकावरच्या तिकीट खिडकी समोरची लाइन वाटतीये हि . उगाच उजवी कडे वाकडी होती जाते . आणि थोड्या वेळाने पार आडवीच

In reply to by प्रभाकर पेठकर

मी जर गण्या असतो , अन भुत असे विहीरीत खाली अंघोळ करत असते तर "नेम" धरुन भुतावरच 'ते' केले असते :D

In reply to by प्रसाद गोडबोले

ओ गिर्जा काका तुमच्या ' ह्याला ' काहि हाड आहे कि नै :-/ असा प्रतिसाद देनार होती मी , पण म्हटलं नक्को :-/ उगिच कशाला ना ... :D

मिरासदारांच्या श्टायलची गोष्ट. तो नुक्तावाला ग कसा लिहिता भाऊ?

In reply to by स्पंदना

मुविंना गण्याची काळजी लागून राह्यली ना भौ !

जीवनराव तुम्ही कथा चांगल्या लिहीता पण तुम्ही 'कॉपी' का करता हो? आता पहा ना ही कथा म्हणजे अमोल पालेकरच्या "बातों बातों मे" ची अगदी हुबेहुब 'कॉपी' आहे..... तुमच्या कथेतला गण्या म्हणजे त्या सिनेमातला 'बलराज सहानी' पु.ले.शू.

In reply to by उदय के'सागर

ही कथा कशाची काँपी नसुन ..... माग़े एकदा माझ्या मित्राला आसेच रात्रीचे घड्याळ बंद पडल्याने त्याला किती वाजले माहीत नव्हते, म्हणुन सकाळी लवकर कामावर जाण्यासाठी तो विहरीवर आंघोळीला ग़ेला व त्याला दुसर्या दिवशी कळाले की त्या रात्री आमावस्या होती ....... हाच किस्सा त्याने आम्हाला साग़ितला ..... त्यावरुनच ही कथा मी लिहली आहे .

In reply to by mohite jeevan

ओ हो... मित्राबरोबर झालेला किस्सा आठवून तुम्ही एक कथाच लिहीली... हे म्हणजे अगदी त्या 'खट्याळ सासू नाठाळ सुन' सिनेमा मधल्या नितीश भारद्वाज सारखंच झालं ... असो!!!

In reply to by mohite jeevan

>>>काँपी कस्लं भारीच! कसंकाय सुचतं हो तुम्हाला? तुमच्याकडं 'टिळा' पद्धत आहे का? एक तर वर तरी नाही तर खाली तरी. 'ग़' ला टिळा खाली 'काँ' ला वर!

गण्याला भुत दिसल , कारण , गण्याच' स्वच्छ मन' नव्हत , त्यांने 'आमचा खंड्या' ची 'गुरुदशिणा ' चा ' अधिकार ' काढुन घेतला . काही राहिल्यास तुम्ही भर घाला .

हल्ली जी.मो. फक्त कथा टाकून स्वस्थ बसत नाहीत तर प्रतिक्रिया पण वाचतात आणि उलट उत्तरे पण देतात.

खरच छान लिहलय! आणि मुख्य म्ग्न्जे प्यारेंच्या मिड लाइफ़ क्रिसिस प्रतिभेच्या प्रश्नावर्च्या लेखावर आपल्या कथा विशेष शिडकावा आहेत.

मस्तच! जीवनभौचे नाव वाचून आधी अधाश्यासारखे प्रतिसद वाचून घेतले. मग़ हा ग़ण्या कोण असा प्रश्न पडला. 'गणा मास्तर'चा तर एक पण प्रतिसाद नव्हता मग नाइलाज म्हणून कथा वाचावी लागली. वाचता वाचता घाबरलो ना मी. पण शेवटी कथेत ग़णाबरोबर मास्तरही आले म्हणून बरें झाले नाही तर थंडीताप भरलाच होता. -(जीवनभौंच्या कथांना नव्हे तर भुतांना घाबरणारा) सोकाजी

चंद्रपालच्या बॅटींगसारख लिखाण असतं तुमचं जीवनभौ.. तो कसा शैली विचित्र असली तरी खोर्‍यानं धावा काढतो.. आणि सातत्यानं.. तसचं तुम्ही खोर्‍यानं प्रतिक्रीया ओढता आणि सातत्यानं.. !!

मास्तर मला पाठ वरच्या धोपटीत भिंतीवरचं घड्याळ किंवा काखेत भिंतीवरच घड्याळमारुन विलेक्शन डुटी ला जात असल्याचे तरळले.

खरं सांगायचं तर निखळ आनंद देणारी गोष्ट म्हणजे जीवन भाऊंच्या कथा. आम्ही जीवनरावांचे फॅन उगीच नाही मुळी.

In reply to by जेनी...

गुड्, बर्‍याच दिवसांनी बालिका मूळ फार्मात आली ! राग कसला, उलट लै आनंद झाला :)