Skip to main content

स्वच्छ मन

लेखक mohite jeevan यांनी रविवार, 10/11/2013 16:05 या दिवशी प्रकाशित केले.
मी आँफीसमधुन घरी जात होतो,पुढे काही आतंरावर ट्राफीक जाम होते,मी माझ्या बाईकचा वेग़ कमी केला आणि माझी बाईक एका फोर व्हीलर ग़ाडी माग़े थाबवली. तेथे प्रत्येकजण त्या ट्राफीक मधुन बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होता,ग़ाडीचा आवाज,लोकांच्या बोलण्याचा आवाज येत होता.त्यातुनच एक आवाज येत होता,तेथे जवळच्याच एका मशीदीत नमाजचा आवाज येत होता.त्या थांबलेल्या जागेवरच मी विचार केला,'प्रत्येक लोकांचा देव वेग़ळा आसतो,मला ते काय म्हणतात याचा आभ्यास करुन जाणुन घ्यायची इच्छा झाली,'त्यावेळी आनेक विचार मनात येत होते. शेवटी त्या ट्राफीकमधुन मी बाहेर पडलो व त्या विचारात आसल्याने सहजच माझे लक्ष नेहमीच्या मार्गा वरील त्या चर्चवरील क्राँसवर लक्ष ग़ेले. मग़ माझ्या मनात विचार आला,' लोक येशु क्राँसवर आसताना त्याचे स्मरण कसे करु शकतात?कारण येशुतर वेदनेत आसतो,' मनात त्या धर्माचा ही आभ्यास करावयाचा वाटला,मी काही वेळातच घरी आलो.समोरच श्री रामचा फोटो पाहिला आणि समाधान पावलो.कारण मी रामायण भग़वतनेग़ीता वाचली होती, आता मला कुराण,बायबल वाचण्याची इच्छा झाली. बायको माहेरी ग़ेली होती,मी कपडे बदलून,चेहराधुण्यासाठी बेसवाँश कडे ग़ेलो,चेहरा धुण्या अग़ोदर एक नजर चेहरा आरशात पाहीला,आज चेहरा माझा वेग़ळाच दिसत होता. त्या चेहर्यात मला साई बाबा दिसत होते,मग़ मला जाणवले,'हे तर साई बाबाच आहे,ती दाढी ते डोळे सर्व काही मी साई बाबा आसल्याचे सांग़त होते,मग़ मीच डोळे मिटवले व डोके त्या आरशाला टेकवले,' मी विचार करत होतो की,'साई बाबा माझ्यात का आले?,काय तो भ्रम होता की काही कारण होते,' मग़ सग़ळ्यात त्रासदायक प्रश्न होता की,'आसे मला का वाटावे?काय मी भारतातील नविन देव किंवा संत बनणार आहे का?,' मग़ मला वाटु लाग़ले,'भारताची दशा पाहता भारताला एखाद्या संताची ग़रज आहे, काय मी त्यासाठी लायक आहे?,' आणि मी आपले डोळे हाळु हाळु उघडले व आरशात माझा चेहरा पाहु लाग़लो, आता तो साईचा चेहरा दिसत नव्हता.मी चेहरा बेसवाँश मध्ये धुतला व पुन्हा चेहर्याचे निरक्षण केले आणि वाटले आपला चेहरा साई बाबा सारखा तर आहे, डोळे,ओठ,कान व दाढी. मग़ मी साई बाबा विषयी वाचण्यास सुरवात केली,त्यावरुन मनात विचार आला की,साई बाबांचा कोणताही धर्म नव्हता,त्याच्याकडे सर्व धर्माचे लोक येत आसत,आणि त्याच्या दरबारात आजुन ही येतात,ते म्हणत 'सबका मालिक एक है,' रात्री खुप उशीरा मी झोपलो,दुसर्यादिवशी रविवार होता,त्यामुळे काही वाटले नाही. रात्री मला एक स्वप्न पडले,एका घोड्यावर हात फिरवत साई बाबा उभे आहेत,त्याच्या चेहर्यावर हास्य होते. त्यावरुन मला त्याची चुकलेल्या घोडीची कथा आठवली व मला तोच घोडा आसेल वाटले. मी स्वप्नात पाहिले की तो घोडा साई बाबा पासून दुर जात आहे,व तो काही अतंरावर उभा राहुन साईना पाहत आहे. साई बाबा दोन्ही हात पसरुन त्या घोड्याला बोलवत आहेत,पण घोडा त्याना पाहुन ओरडत आहे,मोठ मोठ्याने किंकाळ्या फोडत आहे. पण आचानक वार्याचे वादळ निर्माण होऊ लाग़ते.आता घोडा आणखिन जोरात किंकाळ्या फोडत आसतो. अचानक मला जाणवले की, तेथे कोणि ही साई बाबा नव्हते की,वार्याचे ते वादळ होते.पण त्या घोड्याचा आवाज मात्र येत होता.आचानक मी उठलो व डोळे उघडले,खिडकीतुन त्या घोड्याचा आवाज येत होता.मी खिडकी जवळ ग़ेलो, खिडकीतुन पाहीले, स्वप्नातील त्या साई बाबा जवळील त्या घोड्यासारखा घोडा, त्याचे पाय एका ग़टारीच्या लोखंडी सळीच्या जाळीत आडकलेला होता,त्याच्या पायातुन रक्त वाहत होते, जस जसे घोडा पाय ओढत आसे तस तसे त्याच्या वेदना वाढत होत्या,त्याच्या आवाज माझे ह्रदय हालवुन टाकत होते. मी रोडवर खिडकीतुन पाहिले सकाळी सकाळी काही लोक ये जा करत होते पण त्या घोडयाच्या वेदनेकडे कोणि ही पाहत नव्हते.मी चौथ्या मजल्यावर होतो. मग़ मीच विचार केला की,'मीच त्या घोड्याला बाहेर काढतो,पण नाही,मला तसे करताना कोणि विचारले तर?त्या घोड्याचा मालक आला तर?मी त्या घोड्याला सोडविताना लोक काय म्हणतील?लोकांनी विचारले तर?आणि मी काय सांग़ु?आजकाल कोणि कोणाची मदत करतो का?आजकाल जर एखादा प्रयत्न जर करत आसेल तर त्याच्यामाग़े सुद्धा लोक कारण शोधत आसतात? आसे विचार येऊ लाग़ले,' पण माझ्या डोक्यात विचार आला,साई बाबानी जर आसा विचार केला आसता तर लोकांची मदत केली नसती.मग़ मीच विचार केला,'लोकांची परवा न करता त्या घोड्याला सोडीवले पाहिजे व मी ही नाही ग़ेलो तर त्या लोकांत व माझ्यात काय फरक आसणार.माझ्या मनात एक वादळ निर्माण झाले, मला कधी एकदा त्या घोड्याला सोडवितो आसे वाटु लाग़ले.म्हणुन मी खाली जाण्यासाठी पँट घालु लाग़लो,चप्पल घातले व बाहेर पडणार तेवढ्याच त्या घोड्याचा आवाज बंद झाला. मी खिडकीतुन पाहिले तर खांद्यावर चाबूक आसलेला त्या घोड्याच्या मालकाने त्याला काढले होते.मग़ मला समाधान वाटले. मग़ मी आकाशाकडे पाहिले मला त्या आकाशात साई बाबाचा चेहरा दिसत होता. आणि माझ्या ह्रदयातुन एक आवाज आला ,'तु तुझे मन फक्त स्वच्छ ठेव,बाकी देवावर सोड.' *ओम साई बाबा*
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 23512
प्रतिक्रिया 119

प्रतिक्रिया

In reply to by अत्रुप्त आत्मा

मुळातच चेसुगू ही साहित्य क्षेत्रातील एक भरीव उणीव आहे.
वा!, शब्दांची रांगोळी

In reply to by अत्रुप्त आत्मा

चेतन सुभाष गुगळे असं पूर्ण नाव घ्या रे. काय वाटत असेल त्यांना?.... चिंचवडात! ;)

In reply to by प्यारे१

=)) प्यारे..... तू.......! http://www.easyfreesmileys.com/smileys/free-fighting-smileys-556.gif (पुणे गेट कट्ट्या'ची अठवण झालेला) आत्मू =))

कथा बीज चांगले आहे. एखादे चांगले कार्य हातून घडत नसेल तरी (म्हणजे ते करण्यात अडचणी येत असल्या उदा. एखाद्याला मदत वगैरे ) निराश होऊ नये. दुसरयाचे भले करण्याचा विचार तरी आपल्या मनात आला हे ही नसे थोडके. नाहीतर हल्ली सगळी कडे असंवेदनशीलताच खूप दिसते. असे काहीसे लेखकाला सांगायचे आहे हे समजले. पण कथा नीट फुलवता आली नाही किंवा शब्दयोजना चांगली झाली नाही. त्यामुळे कथेचा प्रभाव वाचकांवर पडत नाहीये . शुध्दलेखनाकडे लक्ष दिल्यास आपले लिखाण वाचण्यास त्रास होणार नाही.

गोष्टीतला 'किंकाळ्या फोडणारा' घोडा वाचून हे आठवले. Unicorn - (मन स्वच्छ करण्याच्या प्रयत्नात असलेला) सोकाजी

In reply to by mohite jeevan

धन्यवाद. च्यामारी, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद वाचून मुळात काय प्रतिसाद देणार होतो, तेच विसरलो. धन्यवाद.

In reply to by चित्रगुप्त

हा जीवनभौंचा फंडा आहे. तुम्ही काहीही म्हणा, ते फक्त एकच म्हणणार : धन्यवाद! चलो जीवनभौ, म्हणा पुन्हा एकदा ....

In reply to by संजय क्षीरसागर

आहो धन्यवाद म्हणायला समोरच्याची ही तशी लायकी लाग़ते........ उग़ाच कोणाला ही म्हणता येत नाही

In reply to by सोत्रि

मन स्वच्छ करण्याच्या प्रयत्नात असलेला
कुठे बेसवॉशवर का =)) =)) =))

जीवनभौ सारख्या जातिवंत लेखकाच्या प्रांजळ लेखकाची जुन्याजाणत्या लोकांनी अशी टर उडवलेली पाहुन एक मिपाकर म्हणून शरम वाटली.

अरे देवा, लेखन वाचायचं राहीलं होतं. रिकामं मन असलं की असे काहीबाही विचार येतात. लिहित राहा. -दिलीप बिरुटे

In reply to by mohite jeevan

>>>डाँ. खिक्क्क्क दिसण्यावर जाऊ नका हो मोहिते आण्णा. डाँ दिसत असले तरी ते प्रा. डॉ. आहेत. ;) ओ डाँ साहेब, बरोबर ना? =))

In reply to by प्यारे१

>>> ओ डाँ साहेब, बरोबर ना? प्रोत्साहान देण्याचं धोरण आडवं येतंय मला. नै तर चांगलं स्वच्छ केलं असतं मन :) -दिलीप बिरुटे

च्यायला हेवा वाट्ला हो जिवनभौ तुमचा , आल्या आल्या सेंचुरी गाठली ;) खर खर सांगा कुणाला कुणाला सुपारी दीली ;)

बेसवॉशमधे नित्य चेहरा धुणारा: मॉडेल शोबुज खान https://www.facebook.com/InsideGhaziabadConfessions इंग्रजीची ट्यूशन लावण्यासाठी मॉशोखा शी संपर्क करा.

In reply to by mohite jeevan

आंदो आंदो.. मांत्रीक मिपाकर तयारच हैत उतरवायला.. :D क्रम्शः 'अंगातलं भुत' पण येउद्यात. ;)

In reply to by mohite jeevan

छान. गावातली हडळ सुद्धा असू द्या त्या भुताच्या सोबतीला.

जीवनसाहेब सगळ्या धर्मांचा एकत्र अभ्यास झाला की आमच्या माहितीसाठी त्याविषयावर देखील याच दर्जाचा जबरदस्त लेख येऊ दे...!!! =))

In reply to by शिद

@याच दर्जाचा जबरदस्त लेख येऊ दे...!!! Lol>>> ह्या..ह्या...ह्या...ह्या...ह्या...! =)) अगदी अगदी. =)) +++++++++++++++++++++++++++++++११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११

जीवन्भौंच्या लिखाणात कोणत्यातरी दूर दूरच्या गूढ, अज्ञात प्रदेशातले पडघम वाजत असतात, त्यांची ओढ अंतःकरणाला जाणवते, पण असे का होते, ते सांगता येत नाही. जीवन्भौंना अमेरिकेत वगैरे असतात तसला कोणी चतुर एजंट लाभला, तर बघता बघता साहित्य अकादमी, ज्ञानपीठ, बुकर वगैरे पारितोषिके आणि सन्मान लाभतील, मोठमोठे दिग्दर्शक त्यांच्या कथांवर चित्रपट बनवतील, यदर्थी संशय नाही.

बेसवाँशवर फेस धुवत असताना मलाही असंच काहीतरी वाटलं पण मी बघितलं तर बायको घरीच होती. मग मला कावळ्याचि अस्फुँट कावकाव ऐकू आली. यावरून आपण मोहिते जीवन आयुष्यात होऊ शकत नाही हे माझ्या ध्याणात आले. जय महाराष्ट्र!

मोजी,अकु,निसो,अशा फंडा लेखकांच्या अजरामर कलाकृती (मोकल्याचा समावेश अनिवार्य) कराव म्हणजे सगळ्यांनाच फायदा होईल. अभामिपापुरान्साहित्युत्खानन्लेखनसवादन्प्र्सारानिसंवर्धन समिती

In reply to by नाखु

हे मिपाचं वैभव आहे. सारा आंतरजालीय साहित्य एक तरफ और मोकलाया दाही दिशा एक तरफ!

अरे रे अरे रे अरे रे अरे रे अरे रे हा धागा कसा सुटला बरे रे बरे रे !! बेसवाँशवरमोजीफआनक्लबवरवाटपाहूणपुढीलधाग्याचीवाटपाहतोय !!