हरवलेला विद्यर्थ
आपण रोज किती व्यक्तींना भेटतो; नव्या, जुन्या, नको, हव्या, अनोळखी, ओळखीच्या. कितींशी बोलतो, हसतो, काही देतो, घेतो. या प्रत्येकाच्या मनावर आपला ठसा, आपली ओळख कोरली जाते ते आपल्या वागण्यातून. त्या व्यक्तीचं आपल्याबद्दलचं मत, त्याच्या मनात आपली प्रतिमा, आपल्याबद्दल त्याचे विचार वर आपल्याशी त्याचं पुढचं प्रत्येक वागणं; हे आपण त्याच्याशी कसे वागलो, वागतो, यावरून ठरत जातं. आणि हे सूत्र व्यक्ती, तिचा सामाजिक दर्जा, तिची आर्थिक पत, जात, कुळ, धर्म, या सगळ्या गोष्टींपासून अबाधित आहे.
आम्ही एक दिवस ऑफिसच्या कॅंटीनमधे जेवायला बसलो होतो. ‘मामा प्लेट लाना’, बाजूच्या टेबल वरील एका व्यक्तीने ऑर्डर सोडली. मामा ताट घेऊन आला. तो पुन्हा माघारी वळतो तोच ‘मामा दो स्पून्स भी लाना... और अचार भी’ अशी दुसरी ऑर्डर सोडली. मामा तेही बिनबोलत घेऊन आला. मला ते फार खटकत होतं. मी माझ्या समोर बसलेल्या व्यक्तीकडे बघून तसं दर्शवलं. ती व्यक्तीही माझ्याच विचाराची असल्याने तिने नजरेतूनच सहमती व्यक्त केली. हा घडणारा प्रकार तसा नवीन नव्हता. अनेक जणांकडून ही अशी फर्मानं सर्रास सोडली जातात आणि ती आम्हाला खटकतात. परंतु आमच्या टेबलावर हे असं कधीच झालेलं नाही. आमचा लंच ग्रूप असं वागणारा नाही. आम्ही ठरवून असं वागतो असं नव्हे. अंगवळणी पडलेलं आहे ते. अॅफिसचं कॅंटीन झालं तरी आपलं ताट आपण आणणं, नंतर ते उचलून सिंक मधे ठेवणं, आपला चहाचा पेपरग्लास कच-याच्या डब्यात टाकणं, आम्हाला कधीच कमीपणाचं वाटत नाही.
कॅंटीनचे आमचे मामा. साउथ इंडियन व्यक्ती. सडसडीत शरीरयष्टी; पण पोट सुटलेलं; केस विस्कटलेले आणि काळ्या पांढ-या रंगांची मिश्र छटा असलेले. डोळ्यावर एक जाडया फ्रेमचा चश्मा, आणि चेह-यावर सतत एक मंद हास्य; जे ‘अशा’ ऑर्डरींनीही ढळत नसे. मी कंपनीत लागल्यावर मला आमच्या खात्यातील एक कर्मचारी मजेत म्हणाला होता, ‘मामा इज द मोस्ट इंपॉर्टंट पर्सन इन द कंपनी’. ते वाक्य खरंच आहे, हे जेंव्हा जेंव्हा मामा सुट्टीवर गेला तेंव्हा तेंव्हा पटत गेलं. मामा नसला की चहा-नाश्ता, जेवण, चार वाजता मागवलेली बिस्किटं, किंवा मॅगी, केबिनवाल्यांना नियमित लागणारे चहा-कॉफीचे डोस, या सगळ्या गोष्टींचे बारा वाजतात. असा हा माणूस अव्याहत ऑफिसभर फिरत असतो, अर्थातच ऑर्डरी पूर्ण करत.
मी आमच्या ग्रूपबरोबर दुपारी कॅंटीन मधे गेलो होतो. ‘मामा एक बिस्किट चा पुडा देता प्लीज?’ आमच्यातल्या एकाने मामाला विचारणा केली. ‘आ देताय ना... ए लो’ त्याने गुड डे चा पुडा आणून दिला. मी हसलो. मी म्हणालो, ‘कुठल्या अधिकाराने ही लोकं मामाशी आज्ञार्थी बोलतात?, मामाला कंपनी पैसे देते; ही माणसं नव्हे.’ ‘नाहीतर काय!, अरे आपण कुणाशीही बोलताना नम्रपणे बोलतो; बोलावं.’, तो म्हणाला. ‘ते झिजत नाहीत रे, शिपायाला विनंती केल्याने! आणि शिपाई असो किंवा कुणीही असो, माणूस आहे ना; जनावर नाही.’ आणखी एकाने त्या विचाराला जोड दिली. आमची ही चर्चा बराच वेळ चालली. पण माझ्या मनातले विचार मात्र त्याहून अधिक वेळ.
कुणाशीही बोलताना आपण प्रथमत: विद्यर्थातच बोललं पाहिजे. जर तुम्ही समोरच्या व्यक्तीकडून आदराची अपेक्षा करत असाल तर तो तुम्हीही त्याला द्यायलाच हवा. समोरच्या व्यक्तीला एखादी विनंती करा, की ती व्यक्तीही त्याच आदराने तुमची विनंती मान्य करायला तयार असते. पण उद्दामपणे एखादी आज्ञा करा; त्या व्यक्तीच्या भुवया उंचावल्याच म्हणून समजा, आणि मग कलह. ‘जरा दोन मिनिटं गाडी इथे पार्क करू का?’ असं विचारा; चारापैकी दोन वॉचमन तुम्हाला गाडी पार्क करायला देतील, तिच्याकडे लक्षही ठेवतील. पण ‘तुझ्या मालकीचा रस्ता आहे का?’ चा सूर लावा की भांडणात तुमचा वेळ, मूड, आदर गेलाच म्हणून समजा. हा नियमच म्हणावा लागेल मनाचा. आणि या नियमाला असलेल्या प्रत्येक अपवादाचं मूळ हे एक तर पैशात, गरजेत किंवा उपकारात असतं.
हे चांगलं वागणं का जमत नाही लोकांना? का ते स्वत:ला जगज्जेते समजतात? का दुस-याचा अपमान म्हणजेच आपला मान हे समीकरण त्यांना योग्य वाटतं? दुस-याशी नम्रपणे बोलणं, म्हणजे दुसरा आपल्याहून वरचढ, असं नसतं.. हे का कुणाला कळत नाही? लहानपणीचा विद्यर्थ मोठेपणी हरवतो का? असे अनेक प्रश्न बराच वेळ माझ्या डोक्यात चमकत राहिले.
आमच्यावर झालेल्या संस्काराचाच हा भाग आहे; की प्रथमत: आज्ञार्थी बोललंच जात नाही कुणाशीही. ही चांगली सवय अंगी बाणवलेली आहे आणि त्यानेच कामं होतात बरेचदा. यात कुठलीही प्रौढी नाही. माणूस म्हणून प्रत्येकाला स्वाभिमान असतो, आणि प्रत्येकाची ती भावनिक गरज असते. असाच ऑफिसमधला एक प्रसंग आठवला जेंव्हा कुणीतरी मला म्हणालं होतं, ‘यार मामा तेरेको बराबर चाय ला के देता है, बाकी सबको नही’. आठवून मला हसू आलं.
टेबलावर बसून ऑर्डर सोडण्याचा असाच किस्सा पुढच्याच दिवशी एका दुस-या सहकर्मचा-याच्या बाबतीत झाला. आणि नंतर जरा निवांतपणे मी त्याच्याशी बोलताना आडूनच या विषयाला हात घातला, जेणेकरून त्याला त्या गोष्टीची आठवण व्हावी आणि योग्य तो संदेश मिळावा. उत्तर निराश करणारं होतं. तो म्हणाला,‘तुला सांगू, या लोकांशी असंच बोलायचं असतं. नाहीतर डोक्यावर बसतात साले. अॅंड, वन शुड बिहेव अॅकॉर्डिंग टू द लेव्हल व्हेअर ही इज अॅट’ ही ‘अॅकॉर्डिंग टू’ वाली संकल्पना मला तरी जमणारी नव्हती. त्यामुळे हसतच मी विषयाला बगल दिली. तो फोन आल्यासरशी उठून निघून गेला. माझ्या लक्षात आलं, की त्याला नुकतीच बढती मिळाल्याची घोषणा झालीय, आणि आता तो काही दिवसांत केबिनवाला होणार आहे. ‘कुणाला काय सांगायला गेलो’ अशा विचारात मी असतानाच हातात चहाचा कप घेउन मामा आले, म्हणाले, ‘साब चाय चाहिये?’
कुणाशीही बोलताना आपण प्रथमत: विद्यर्थातच बोललं पाहिजे. जर तुम्ही समोरच्या व्यक्तीकडून आदराची अपेक्षा करत असाल तर तो तुम्हीही त्याला द्यायलाच हवा. समोरच्या व्यक्तीला एखादी विनंती करा, की ती व्यक्तीही त्याच आदराने तुमची विनंती मान्य करायला तयार असते. पण उद्दामपणे एखादी आज्ञा करा; त्या व्यक्तीच्या भुवया उंचावल्याच म्हणून समजा, आणि मग कलह. ‘जरा दोन मिनिटं गाडी इथे पार्क करू का?’ असं विचारा; चारापैकी दोन वॉचमन तुम्हाला गाडी पार्क करायला देतील, तिच्याकडे लक्षही ठेवतील. पण ‘तुझ्या मालकीचा रस्ता आहे का?’ चा सूर लावा की भांडणात तुमचा वेळ, मूड, आदर गेलाच म्हणून समजा. हा नियमच म्हणावा लागेल मनाचा. आणि या नियमाला असलेल्या प्रत्येक अपवादाचं मूळ हे एक तर पैशात, गरजेत किंवा उपकारात असतं.
हे चांगलं वागणं का जमत नाही लोकांना? का ते स्वत:ला जगज्जेते समजतात? का दुस-याचा अपमान म्हणजेच आपला मान हे समीकरण त्यांना योग्य वाटतं? दुस-याशी नम्रपणे बोलणं, म्हणजे दुसरा आपल्याहून वरचढ, असं नसतं.. हे का कुणाला कळत नाही? लहानपणीचा विद्यर्थ मोठेपणी हरवतो का? असे अनेक प्रश्न बराच वेळ माझ्या डोक्यात चमकत राहिले.
आमच्यावर झालेल्या संस्काराचाच हा भाग आहे; की प्रथमत: आज्ञार्थी बोललंच जात नाही कुणाशीही. ही चांगली सवय अंगी बाणवलेली आहे आणि त्यानेच कामं होतात बरेचदा. यात कुठलीही प्रौढी नाही. माणूस म्हणून प्रत्येकाला स्वाभिमान असतो, आणि प्रत्येकाची ती भावनिक गरज असते. असाच ऑफिसमधला एक प्रसंग आठवला जेंव्हा कुणीतरी मला म्हणालं होतं, ‘यार मामा तेरेको बराबर चाय ला के देता है, बाकी सबको नही’. आठवून मला हसू आलं.
टेबलावर बसून ऑर्डर सोडण्याचा असाच किस्सा पुढच्याच दिवशी एका दुस-या सहकर्मचा-याच्या बाबतीत झाला. आणि नंतर जरा निवांतपणे मी त्याच्याशी बोलताना आडूनच या विषयाला हात घातला, जेणेकरून त्याला त्या गोष्टीची आठवण व्हावी आणि योग्य तो संदेश मिळावा. उत्तर निराश करणारं होतं. तो म्हणाला,‘तुला सांगू, या लोकांशी असंच बोलायचं असतं. नाहीतर डोक्यावर बसतात साले. अॅंड, वन शुड बिहेव अॅकॉर्डिंग टू द लेव्हल व्हेअर ही इज अॅट’ ही ‘अॅकॉर्डिंग टू’ वाली संकल्पना मला तरी जमणारी नव्हती. त्यामुळे हसतच मी विषयाला बगल दिली. तो फोन आल्यासरशी उठून निघून गेला. माझ्या लक्षात आलं, की त्याला नुकतीच बढती मिळाल्याची घोषणा झालीय, आणि आता तो काही दिवसांत केबिनवाला होणार आहे. ‘कुणाला काय सांगायला गेलो’ अशा विचारात मी असतानाच हातात चहाचा कप घेउन मामा आले, म्हणाले, ‘साब चाय चाहिये?’
वर्गीकरण
प्रतिक्रिया
लेखन आवडले
सुवर्णमध्य.
"विनम्रपणाने बोलणार्याला
हम्म!
आलाय की!
लेखन आवडले पण लोक फार गृहित
तेच!