✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

मॉल संस्कृति

ब
बलि यांनी
Wed, 10/16/2013 - 17:42  ·  लेख
लेख
सर्वप्रथम मला सामील करून घेतल्याबद्दल मिपा चे आभार. माझं पहिलं लेखन तुमच्यासमोर ठेवतो आहे . चूकभूल माफ असावी . काही दिवसांपूर्वी मी माझ्या फेसबुक च्या भिंतीवर एक चित्र प्रकाशित केले होते. त्यात एक गरीब स्त्री रस्त्याच्या कडेला बसून भाजी विकत होति. त्या चित्राचा आशय असा होता कि, " कृपया रस्त्यावर भाजी विकणाऱ्या लोकांबरोबर भाव कमी जास्त करू नका. ते आपल्या शेतातील माल कमी किमतीला विकतात. मॉल मध्ये खरेदी करू नका. शेतकरी आपल्या उपजीविकेसाठी भाजी विकत असतो. " ह्या चित्रावर बऱ्याच प्रतिक्रिया आल्या. माझ्या मित्राबरोबर मी ह्या विषयी खूप वेळ गप्पा मारल्या . त्याचा सारांश असा , माझ्या मित्राला हे मान्य नव्हतं. त्याच्या म्हणण्यानुसार काही नामांकित मॉल चालवणाऱ्या संस्था भाजीपाला थेट शेतकऱ्यांकडून विकत घेतात आणि ते सुद्धा पिक यायच्या आधीच त्याचा बुकिंग करून ठेवतात. पण सगळ्याच शेतकऱ्यांना ह्याचा लाभ होत असावा का ? अगदी शहरातील भाजी विक्रेते सोडा, पण शहराबाहेरच्या रस्त्यांवर भाजी विकणारे नक्कीच शेतीमध्ये काम करणारे असतील आणि त्यांना जर फायदा होत असेल तर काय बिघडले ? आजच्या बाजारात दलालांचा सुळसुळाट आहे हे खरंय पण सगळेच धंदा म्हणून भाजी विकतात असेही नहि. त्याच्या म्हणण्यानुसार मोल्स मध्ये स्वस्त दरात भाजी मिळते म्हणून तिथून खरेदी करावं. ह्यावर माझी प्रतिक्रिया अशी होती कि, २००-३०० रुपयांच्या पिज्जा खाणार्यांनी २-३ रुपयांचा विचार करणं योग्य आहे का ? ( अर्थात पिज्जा मलादेखील आवडतो आणि इतर पिज्जा खाणार्यान्बद्दल मला काही आक्षेप नाही ). ह्या विषयावर मिपाकरांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायची इच्छा झाली म्हणून हे लेखन करावा असं मनात आलं.
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
35179 वाचन

💬 प्रतिसाद (146)

प्रतिक्रिया

२००-३०० रुपयांच्या पिज्जा

अग्निकोल्हा
Wed, 10/16/2013 - 17:54 नवीन
२००-३०० रुपयांच्या पिज्जा खाणार्यांनी २-३ रुपयांचा विचार करणं योग्य आहे का ?
२००-३०० रुपयांच्या पिज्जा खाणारे २-३ रुपयांचा विचार करत नाहित. सहा महिन्यातुन एखादा पिझ्झा खात असतिल तर गोष्ट निराळी...
  • Log in or register to post comments

२००-३०० रुपयांच्या पिज्जा

परिंदा
Wed, 10/16/2013 - 17:56 नवीन
२००-३०० रुपयांच्या पिज्जा खाणार्यांनी २-३ रुपयांचा विचार करणं योग्य आहे का ? >> शेतकर्‍यांना रास्त भाव मिळायला पाहिजे हे मान्य! पण हे मॉल आणि मॉर्डन संस्कॄतीविषयी बोलणारे नेहमी पिझ्झाचेच उदाहरण का देतात? उद्या १० रु ची भाजी कोणी २० रुपयांना विकली तर योग्य आहे का? यावर २००-३०० रुपयांच्या पिज्जा खाणार्यांनी त्या अतिरिक्त १० रु चा विचार करावा का? किंवा महिना १०-१५ हजार कमावणार्‍यांनी त्या अतिरिक्त १० रु चा विचार करावा का? किंवा ६-७ हजारांची पेन्शन मिळणार्‍यांनी त्या अतिरिक्त १० रु चा विचार करावा का?
  • Log in or register to post comments

भाजीचा योग्य भाव कोण आणि कसा ठरवणार ?

बलि
Wed, 10/16/2013 - 18:30 नवीन
पिज्जा माझ्या आवडीची गोष्ट आहे म्हणून उदाहरण दिलं :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: परिंदा

२० वर्षापुर्वी पुण्यातल्या

ग्रेटथिन्कर
Wed, 10/16/2013 - 18:24 नवीन
२० वर्षापुर्वी पुण्यातल्या मंडईत मारुती800मधून आलेल्या एक गोर्या घार्या बाईने अनुनासिक स्वरात भाजीवाल्या म्हातारीशी चाराण्याची कोथिंबीर १० पैश्याला दे म्हणून घासाघिस चालवली होती, तो प्रसंग आठवला . मॉल आणि भाजिविक्रेते दोघांकडून माल खरेदी करावा...
  • Log in or register to post comments

मारुती800मधून आलेल्या एक

विजुभाऊ
Wed, 10/16/2013 - 19:25 नवीन
मारुती800मधून आलेल्या एक गोर्या घार्या बाईने अनुनासिक स्वरात भाजीवाल्या म्हातारीशी चाराण्याची कोथिंबीर १० पैश्याला दे म्हणून घासाघिस चालवली होती
गोरी घारी आणि सानुनासीक स्वर्ई पुण्यातील एका पेठेची आणि एक्स्टेन्डेड कोथरुड भागची व्यवच्छेदक लक्षणे समजायची का? भगवान परषुराम पहाताहेत हो वरुन...
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिन्कर

सहमत.

बॅटमॅन
Wed, 10/16/2013 - 19:28 नवीन
सहमत. अवान्तरः गोर्‍या, घार्‍या अन सानुनासिक स्त्रियांचे फ्यासिनेशन अम्मळ जरा जास्तच आहे का हो मराठी आंजावर?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

ते 'फेसिनेसन' चं जाऊन्दे पण

प्यारे१
Wed, 10/16/2013 - 22:23 नवीन
ते 'फेसिनेसन' चं जाऊन्दे पण स्त्रिया मराठी आंजावर मुळात आहेत का ? ;) -पळून गेलेला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

पळपुटे प्यारेश्वर, स्त्रिया

बॅटमॅन
Wed, 10/16/2013 - 22:29 नवीन
पळपुटे प्यारेश्वर, स्त्रिया आंजावर आहेत की नाहीत हा मुद्दा अलाहिदा आहे. वर वर्णिलेल्या एवंगुणविशिष्ट स्त्रियांबद्दलचे फेसिनेसन मराठी आंजावर वेळोवेळी बाहेर पडते हा मुख्य मुद्दा आहे. असे पळून जाऊन काय होणार? बी अ म्यान, करू नका लेखणीची तल्वार म्यान ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्यारे१

वर वर्णिलेल्या एवंगुणविशिष्ट

मृत्युन्जय
गुरुवार, 10/17/2013 - 10:36 नवीन
वर वर्णिलेल्या एवंगुणविशिष्ट स्त्रियांबद्दलचे फेसिनेसन काही लोकांकडुन सगळ्याच माध्यमांतुन बाहेर पडते. त्यामुळे ...........
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अगदी कालपरवाच मी चारचाकीत

मृत्युन्जय
गुरुवार, 10/17/2013 - 10:35 नवीन
अगदी कालपरवाच मी चारचाकीत बसुन आलेल्या एका सावळ्या, काळ्या डोळ्यांच्या भसाड्या आवाजात बोलणार्‍या बाईला एक किलो बटाट्यावर कढीपत्ता फुकट द्या म्हणुन भांडणार्‍या बाईला बघितले तो प्रसंग आठवला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिन्कर

ते...

मुक्त विहारि
गुरुवार, 10/17/2013 - 10:38 नवीन
अंगभर सोने राहिलेच की.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

वाण नाही पण गुण लागला सदाशिव

ग्रेटथिन्कर
गुरुवार, 10/17/2013 - 11:48 नवीन
वाण नाही पण गुण लागला सदाशिव पेठेचा.... ख्याख्याख्याख्या
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

=))

बॅटमॅन
गुरुवार, 10/17/2013 - 12:27 नवीन
=)) =)) =))
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मृत्युन्जय

माझ्या मते भाजी विकणार्

धन्या
Wed, 10/16/2013 - 18:42 नवीन
माझ्या मते भाजी विकणार्‍यांकडून भाजी खरेदी करायला हवी. तीही एक दोन रुपयांसाठी घासाघीस न करता. आपल्या खिशातून एक दोन रुपये जास्त गेले तर आपल्याला फारसा फरक पडणार नसतो. परंतू त्या भाजी विकणार्‍यांना नक्की पडतो. मी सिंहगड रोडवरुन जिथून ऑफीसची बस पकडतो तिथे रस्त्याच्या बाजूला (हो, फुटपाथवरच) एक दहा पंधरा भाजीवाले बसतात. बसायला सिमेंटच्या गोणीचं कापड आणि समोरचा भाजीचा ढीग. काही भाजीवाले आता ओळखीचे झाल्यामुळे मोकळेपणाने बोलतात. त्या धंद्याचं गणित समजावून सांगतात. फारसं काही सुटत नाहीच. फक्त कुणा दुसर्‍याकडे राब राब राबायचे त्याच्याऐवजी हा स्वतःचा व्यवसाय ईतकंच. यातच बर्‍याच भानगडी असतात. ज्या एरीयात भाजी विकायची तिथले लोकल पुढारी "इथे बसायचंय ना?" असं धमकावत प्रत्येक "महोत्सवाला" वर्गणी गोळा करतात. कार्पोरेशनवाले पावत्या फाडतात. अशात त्यांचं कुणी एक दोन रुपयांसाठी घासाघिस करणारं गिर्‍हाईक पाहीलं की वाईट वाटतं.
  • Log in or register to post comments

सहमत

बॅटमॅन
Wed, 10/16/2013 - 18:46 नवीन
छोटे व्यावसायिक बळीचे बकरे असतात लैवेळेस. तस्मात अंमळ घासाघिशीकडे दुर्लक्ष केले तरी फार अडचण होऊ नये. (खुश्कैरेधन्यौ)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

छोटे व्यावसायिक बळीचे बकरे

धन्या
Wed, 10/16/2013 - 18:57 नवीन
छोटे व्यावसायिक बळीचे बकरे असतात लैवेळेस.
हेहे. हे सगळीकडेच होतं. उदा. दोन-तीनशे रुपयांचं लाईटबील थकलं की कनेक्शन तोडलं जातं. लाखांच्या थकबाक्या असणारे उदयोग मात्र वीज वापरतच असतात.
तस्मात अंमळ घासाघिशीकडे दुर्लक्ष केले तरी फार अडचण होऊ नये.
वर पिझ्झाचं उदाहरण खटकलं. पण खरंच पिझ्झाच्या चार छोटयाशा तुकडयांसाठी कमीत कमी दोनशे रुपये मोजणारे भाजीवाल्यांकडे केवळ दोन तीन रुपयांची घासाघीस करतात ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

सहमत.

बॅटमॅन
Wed, 10/16/2013 - 19:02 नवीन
पूर्ण सहमत आहे. संधी मिळेल तिथे बारगेनिङ्ग करणे हा तसेही आपला स्थायीभावच असतो. त्यात परत समोरचा छोटा भाजीवाला असला तर ही प्रवृत्ती उफाळून येते एकदम.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

मी मॉल मधून कधीच खरेदी करत नाही...

मुक्त विहारि
Wed, 10/16/2013 - 18:57 नवीन
आणि तसेही आमच्या डोंबिवलीत अद्याप आजू बाजूच्या खेड्यातून भाजी विकायले येते.तिथल्याच भाजावाल्यांकडून घेतो. आणि घासाघीसच्या बाबतीत म्हणाल तर, भाजीची प्रत महत्वाची.प्रती प्रमाणे दर असेल तर खरेदी करायची.तसे २/३ भाजीवाले मला ओळखतात आणि योग्य त्या दरानेच भाजी विकतात. शेवटी काय हो टाळी एका हाताने वाजत नाही.....
  • Log in or register to post comments

डोंबिवलीत भाजी घेताना आपलं एक

शैलेन्द्र
Wed, 10/16/2013 - 19:11 नवीन
डोंबिवलीत भाजी घेताना आपलं एक तत्त्वं आहे, आगरी म्हातार्‍यांकडुन घ्यायची, शक्यतो भय्या टाळायचा.. भाजी चांगली मिळते, वजन शक्यतो नीट असतं आणि घरगुती असल्याने जास्त खतं/किटकनाशक मारलेले नसतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

शक्यतो भय्या टाळायचाच......

मुक्त विहारि
Wed, 10/16/2013 - 19:13 नवीन
+ १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

मंडळी...

धन्या
Wed, 10/16/2013 - 19:20 नवीन
चर्चेचा विषय भरकटतोय असं वाटतंय. चर्चा "भाजी मॉलमधून न घेता भाजीवाल्यांकडून घ्यावी" या विषयावर व्हावी असं धागाकर्त्याला अपेक्षित असावं. वरच्या दोन प्रतिसादांवरुन ही चर्चा "मराठी भाजीवाले आणि उत्तर भारतीय भाजीवाले" अशी भरकटेल असं दिसतंय.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

चर्चारूपी गाडीचे रिव्हर्टिंग स्टेशन

बॅटमॅन
Wed, 10/16/2013 - 19:22 नवीन
तो आंग्ल नेटाचा नियम नैका? लै वेळ कुठलीही चर्चा चाल्ली की शेवटी कशीही हिट्लर अन नाझीपर्यंत येऊन थांबणारच. तसा मराठी नेटाचा नियमः लै वेळ कुठलीही चर्चा चाल्ली की शेवटी कशीही उत्तर भारतीयांपर्यंत येऊन थांबणारच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

तसा मराठी नेटाचा नियमः

मुक्त विहारि
Wed, 10/16/2013 - 19:36 नवीन
लै वेळ कुठलीही चर्चा चाल्ली की शेवटी कशीही उत्तर भारतीयांपर्यंत येऊन थांबणारच." + १
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अगदि बरोबर

बलि
Wed, 10/16/2013 - 19:39 नवीन
चर्चा "भाजी मॉलमधून न घेता भाजीवाल्यांकडून घ्यावी" या विषयावर व्हावी असं धागाकर्त्याला अपेक्षित असावं
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

आयला हे बरे आहे.....

मुक्त विहारि
Wed, 10/16/2013 - 19:57 नवीन
आम्ही आपले जरा डीटेल मध्ये सांगातले तर लगेच उत्तर भारतीयांचा कैवार घेणारे पुढे आले की काय? मी आधीच म्हणालो की मी भाजी खरेदी आग्री माणसांकडून घेतो.(ह्याचाच अर्थ मी मॉल मधून घेत नाही.त्यातच हे पण सांगीतले की भैय्याकडून घेत नाही.तर काय बिघडले?) बरे आणि हे सगळे उप-प्रतिसादात आलेले मुद्दे आहेत.मुख्य प्रवाहातले नाहीत. महत्वाचे..... वरील सगळे टाइमपास म्हणून लिहीले आहे.मुद्दाम फार गहन विचार करू नका....पण मी मात्र जास्त विचार करूनच लिहीले आहे.....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बलि

तसं नाही हो...

धन्या
Wed, 10/16/2013 - 20:06 नवीन
आम्ही आपले जरा डीटेल मध्ये सांगातले तर लगेच उत्तर भारतीयांचा कैवार घेणारे पुढे आले की काय?
हातावर पोट असणारे माणसं इथून तिथून सारखीच असतात. मी चार वर्षांपूर्वी उसगावात होतो तेव्हाची गोष्ट. आपल्याकडे ब्ल्यूप्रिंटवाले जोरात होते. मनात विचार यायचा, या उसगाववाल्यांनी जर ब्ल्यूप्रिंटवाल्यांसारखा विचार केला तर आपल्याला परतीचं विमान तरी पकडता येईल का. असो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

थोडा फरक आहे.....

मुक्त विहारि
Wed, 10/16/2013 - 20:22 नवीन
आणि तो तुम्हीच छान व्यक्त केला आहे... "मनात विचार यायचा, या उसगाववाल्यांनी जर ब्ल्यूप्रिंटवाल्यांसारखा विचार केला तर आपल्याला परतीचं विमान तरी पकडता येईल का?" तुम्ही हा विचार केलात तर भैय्ये लोक... मराठी माणसांनाच बाहेर कसे काढता येईल ह्याचा विचार करतात. हाच विचारातला फरक आहे. अहो संत भूमी आहे आपली.माझ्या मनांत पण असेच विचार येणारच ना? पण संताच्याच डोक्यात काठी बसली तर त्या संताने प्रतिकार करायचा की मार खातच रहायचे? मला अद्याप ह्याचे उत्तर मिळालेले नाही?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

वेळ पडल्यास प्रतिकार

बलि
Wed, 10/16/2013 - 20:29 नवीन
भले तरी देऊ कासेची लंगोटी ॥ नाठाळाचे माथी हाणू काठी ॥
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

भले तरी देऊ कासेची लंगोटी ॥

मुक्त विहारि
Wed, 10/16/2013 - 20:37 नवीन
नाठाळाचे माथी हाणू काठी ॥ मान्य....१००% मान्य.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बलि

उसगावात काय भागलपूर मुंबई

ग्रेटथिन्कर
Wed, 10/16/2013 - 22:21 नवीन
उसगावात काय भागलपूर मुंबई प्याशिंजर पकडून गेला होतात काय? विसा मिळाला होता ना?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

मी ट्रोलशी चर्चा करत नाही.

धन्या
Wed, 10/16/2013 - 22:49 नवीन
मी ट्रोलशी चर्चा करत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिन्कर

पण मी करतो ना!

ग्रेटथिन्कर
Wed, 10/16/2013 - 22:56 नवीन
पण मी करतो ना!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

विसा मिळाला होता ना?

बलि
Wed, 10/16/2013 - 23:19 नवीन
विसा मिळाला होता ना?
उसगाव चा मंत्री त्याशिवाय बारा घुसू देईल
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ग्रेटथिन्कर

@ बलि.....

मुक्त विहारि
Wed, 10/16/2013 - 23:26 नवीन
जे आपल्याला समजते ते गहन विचार करणार्‍याला समजेलच असे नाही. आपण दोघेही पामर माणसे आहोत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बलि

मुविच्या या मुद्द्याला

ग्रेटथिन्कर
Wed, 10/16/2013 - 22:17 नवीन
मुविच्या या मुद्द्याला अनुमोदन. मराठी माणसाने हाडाची काडं करायची आणि फायदा उपटायला 'बिहारी' कशाला?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि

+१

सूड
Wed, 10/16/2013 - 19:18 नवीन
विशेषकरुन अळू (भाजीचं/वडीचं), कापासाठी केळी अशा गोष्टीं आगर्‍यांकडनंच घ्याव्यात. अगदी व्यवस्थित मिळतात.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: शैलेन्द्र

हेच धोरण मी मार्केटयार्डात

अत्रुप्त आत्मा
Wed, 10/16/2013 - 19:42 नवीन
हेच धोरण मी मार्केटयार्डात पाळतो. शेतकरीच विक्रेता असेल, तर भावात (फार) घासाघीस करायची नाही.पण फुलं आडत्यांकडुन घेणं आलं कि तोडातोडी करायचीच! :)
  • Log in or register to post comments

घ्या आता.....

मुक्त विहारि
Wed, 10/16/2013 - 21:47 नवीन
एकाला एक न्याय तर एकाला एक न्याय.... आता तुम्हीच असे वागताय तर आम्ही पण असेच वागायचे ठरवतो.. नाही म्हटले तरी आमचे गुरुजी बादशाही आहेत....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अत्रुप्त आत्मा

घासाघीस..

उपास
Wed, 10/16/2013 - 20:06 नवीन
आठवड्याच्या बाजारी (रविवारी) पाषाणात आजूबाजूच्या गांवातून (लव्हाळं वगैरे) भाजी येते पण ती आठवडाभर टिकतेच असं नाही. थोडं वेगळं मत - भाजी रस्त्यावरच्या विक्रेत्याकडून घेतली जाते पण काही भाजीविक्रेते/ फळवाले चलाखी करतातच, मॉल मधून भाजी घेत नसलो तरी तिथे चलाखी करण्याचं आणि आपली तिथे फसवणूक होतेय असं वाटायचं प्रमाण कमी आहे. जे आहे ते रोख ठोक, पाहिजे तर घ्या नाही तर नको. वाजवी आहे की नाही किंमतिला ते ग्राहकानेच ठरवायचं. पण मटकीमध्ये खडे न येणं, कोथींबीर चांगली मिळणं (चांगला दर्जा) जर जर मॉल मध्ये सहज होत असेल तर घेण्यास अडथळा नसावाच, शेतकर्‍याने/ भाजी विक्रेत्याने मालाचा दर्जा उंचवलाच पाहिजे, तो 'व्यवसाय' करतोय दान मागत नाहिये. मी भाजी वाल्याला नेहमी हटकून सांगतो की तुझ्याकडे चांगला माल मिळत असेल तर मी अजून गिर्हाईक पाठवेन ते खुषीने दोन पैसे जास्त देतिल पण माल चांगलाच हवा, फळांच्या बाबतित हे विशेष! जाता जात एक प्रश्न - आंब्याची पानं + झेंडू ह्याच तोरण पाडव्यांना, दसर्‍याला घराला बांधलं जातं, त्याची वाजवी किंमत काय? मुंबईत जे १५-२० रुपयांत मिळत तेच पुण्यात (पाषाण / बाणेर भागात) ८० कसं काय असू शकतं? कुणी गणित समजावून सांगेल का, असं असल्याने बरेच जण प्लास्टीकच्या तोरणाचा पर्याय (जे पर्यावरणासाठी चांगलच कदाचित!) वापरु लागणारच. पण तोरणाच्या बाबतित तरी (आणि तेच मिटर न पाडता चालवणार्‍या रिक्षाच्या बाबतही) आपली लुबाडणूक होतेय, असं वाटत राहातं.
  • Log in or register to post comments

तुमचे दोन्ही मुद्दे योग्य

धन्या
Wed, 10/16/2013 - 20:18 नवीन
तुमचे दोन्ही मुद्दे योग्य आहेत. मालाच्या गुणवत्तेत तडजोड नकोच. अशावेळी पुढच्या भाजीच्या गाडीकडे जायचं. सगळेच बेईमान नसतात. दोन तीन वेळा एकाच भाजीविक्रेत्याकडून भाजी घेतली की आपण त्यांचे "रेगुलर कस्टंबर" होतो आणि चांगली भाजी तर मिळतेच परंतू घासाघिस न करताच चार पैसे कमी दयावे लागतात.
आंब्याची पानं + झेंडू ह्याच तोरण पाडव्यांना, दसर्‍याला घराला बांधलं जातं, त्याची वाजवी किंमत काय? मुंबईत जे १५-२० रुपयांत मिळत तेच पुण्यात (पाषाण / बाणेर भागात) ८० कसं काय असू शकतं? कुणी गणित समजावून सांगेल का
शहरी भाग सोडला की आंब्यांचा झाडांना तोटा नसतो. झेंडूची मात्र निगराणी करावी लागते. परंतू त्याचे कुणी "सिझन" आहे म्हणून गैरफायदा घेत असेल तर अशा वेळी त्या चिजा खरेदी न करणं हेच उत्तम. खुशाल प्लास्टिकचं तोरण दाराला लावावं अशा मताचा मी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपास

कुणी अनावश्यक लुबाडत असेल तर थोडा वेगळा मार्ग काढावा.

मुक्त विहारि
Wed, 10/16/2013 - 20:52 नवीन
१. त्याच दिवशी तोरण बांधायलाच हवे असा काही नियम नाही आहे.तुम्ही थोडी स्वस्त दरांत पाने-फुले मिळायला लागली की पण तोरण बांधू शकता. २. तुमच्या आसपास जी कुठली झाडे असतील तर त्याची पाने आणि जमिनीवर पडलेली फुले वापरलीत तरी चालेल. मी वलसाड, गुजरातला असतांना आंब्याची पाने आणि सदाफुलीची फुले वापरून तोरण करत होतो.दोन्ही फुकट मिळत होते. लुबाडणूक आणि दादागिरी सहन करण्याच्या प्रमाणात वाढते....
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

जे आहे ते रोख ठोक, पाहिजे तर

बलि
Wed, 10/16/2013 - 23:24 नवीन
जे आहे ते रोख ठोक, पाहिजे तर घ्या नाही तर नको.
रस्त्यावरचा भाजी विक्रेता / ती कुठे आपल्या हाताला धरून पकडून ठेवतात . आवडली भाजी तर घ्यायची नाहीतर पुढचा ठेला . नाही का !!
मी भाजी वाल्याला नेहमी हटकून सांगतो की तुझ्याकडे चांगला माल मिळत असेल तर मी अजून गिर्हाईक पाठवेन ते खुषीने दोन पैसे जास्त देतिल
स्वागत असो
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपास

मुंबईत जे १५-२० रुपयांत मिळत तेच पुण्यात

सुमीत भातखंडे
गुरुवार, 10/17/2013 - 11:08 नवीन
हा हा...सहमत आहे. तुम्ही वर म्हटल्याप्रमाणे हे रिक्षावाल्यांच्या बाबतीतही म्हणता येईल. पुण्यात मिटरची पद्धत आहे, पण पिंपरी चिंचवड मधे मात्र वाट्टेल ते सांगतात. ३० रु. च्या खाली नाहीच काही. मिटर-बिटर हा प्रकारच नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: उपास

+१ मुविकाका

भाते
Wed, 10/16/2013 - 20:26 नवीन
उत्तर भारतीयांच्या कैवाऱ्यांना मारा xxवर. मराठी माणसाला दोन चार रुपये जास्त द्यायला माझी अजिबात ना नाही. पण त्या भैयाला तेवढेसुद्धा मिळता कामा नये. किमान डोंबिवलीत तरी मराठी माणसाकडुन फसवणुक होत नाही. त्यामुळे दोन चार रुपये जास्त गेले तरी चांगल्या मालाची (भाज्यांची) खात्री असते. योग्य वेळी घासाघिस करावीच लागते. वैयाक्तिक अनुभव.
  • Log in or register to post comments

उत्तर भारतीयांच्या

धन्या
Wed, 10/16/2013 - 20:40 नवीन
उत्तर भारतीयांच्या कैवाऱ्यांना मारा xxवर.
उत्तर भारतियांचा कैवार कुणी आणि कसा घेतला आहे ते सांगू शकाल का? सगळेच उत्तर भारतीय त्यांच्याबरोबर केल्या जाणार्‍या कुठल्याही व्यवहारात फसवणूकच करतात असं तुम्ही ठामपणाने म्हणू शकाल का? तसेच आजवर तुम्हाला कधीच मराठी व्यक्तीने फसवले नाही असेही तुम्ही ठामपणाने म्हणू शकाल का? आपल्या देशाचे हे दुर्दैव आहे. आपण समोरच्या व्यक्तीला कुव्यक्तीलाक्याटेगरीत टाकल्याशिवाय आपल्याला चैनच पडत नाही. मी फक्त चर्चा "मराठी भाजी विक्रेते आणि उत्तर भारतीय भाजी विक्रेते" अशी नाही हे निदर्शनास आणले तर मी तुमच्या नजरेत लगेच उत्तर भारतीयांचा कैवारी झालो का?
मराठी माणसाला दोन चार रुपये जास्त द्यायला माझी अजिबात ना नाही.
समजा तुम्ही मंडईत गेलात, एक मराठी भाजीवाला आणि एक उत्तर भारतीय भाजीवाला बाजूबाजूला बसले आहेत. मराठी भाजीवाल्याकडे असलेली भाजी चांगल्या प्रतीची नाही. उत्तर भारतीय भाजी विक्रेत्याकडे चांगल्या प्रतीची भाजी आहे. दोन्हीकडे भाजीचा भाव सारखा आहे. तरीही तुम्ही मराठी माणसाला दोन चार रुपये जास्त देऊण त्याच्याकडूनच भाजी घ्याल का?
किमान डोंबिवलीत तरी मराठी माणसाकडुन फसवणुक होत नाही. त्यामुळे दोन चार रुपये जास्त गेले तरी चांगल्या मालाची (भाज्यांची) खात्री असते.
ही खरंच चांगली गोष्ट आहे. परंतू तरीही मराठी माणसाकडून फसवणूक होत नाही किंवा उत्तर भारतीयांकडून नेहमी फसवणूकच होते असे सरसकटीकरण नाही होऊ शकत.
  • Log in or register to post comments

+ १

मुक्त विहारि
Wed, 10/16/2013 - 21:17 नवीन
@ धन्या, माझी बोलतीच बंद करून टाकली की राव.... तुमच्या ह्या प्रतिसादाला आमचा पांढरा झेंडा.१००% सहमत.. विचारांना, विचारांच्या सहाय्यानेच प्रतिकार केलेला उत्तम.अशी आमची किंचीत विचारसरणी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

+२

प्रचेतस
Wed, 10/16/2013 - 21:48 नवीन
प्रतिसाद आवडला
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

जोर्दार मुद्देसूद खंडन!!!!!

बॅटमॅन
Wed, 10/16/2013 - 22:34 नवीन
जोर्दार मुद्देसूद खंडन!!!!! पूर्ण सहमत हेवेसांनल. असले जनरलायझेशन करणारांची अलीकडे कीव येते फक्त.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धन्या

@ बॅटमन....

मुक्त विहारि
Wed, 10/16/2013 - 22:40 नवीन
सॉरी हं माझ्या कडून चूक झाली खरी.. (थोडासा तरी खजील) मुवि
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बॅटमॅन

अहो त्यात काय एवढे? चूक

बॅटमॅन
Wed, 10/16/2013 - 22:59 नवीन
अहो त्यात काय एवढे? चूक लक्षात आल्यावर मोठ्या मनाने कबूल करण्यालाही **त दम लागतो. नैतर चूक असूनही कबूल न करता उलट ट्रोलिंग करणारे ट्रोलभैरव कमी नैत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मुक्त विहारि
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा