जमल्यास "कैफी आज़मी" ह्यांच्याविषयी लिहिण्याचीही इच्छा आहे, शिवाय अदिम हाश्मी यांच्या "फासलें ऐसे भी होंगे..." ह्याविषयीही लिहायचा प्रयत्न करेन. प्रतिसाद अवश्य लिहा!
(उर्दूप्रेमी) मनिष
मनिषराव,
अवश्य लिहा. त्याचप्रमाणे मीर तक़ी मीर च्या शायरीबद्दल ही लिहा असे आमचे सांगणे आहे.
कारण उर्दू शायरीचा हा बादशहा अनेकांना अपरिचित आहे. ग़ालिबसारखा शायरही मीर बद्दल लिहून गेलाय की
रेख़्ते के तुम ही उस्ताद नहीं हो 'ग़ालिब'
कहते है अगले ज़माने मे़ कोई 'मीर' भी था....
क्या बात कही है ग़ालिबने? ग़ालिब सारखा माणूस मीरबद्दल हे उद्गार काढतो...सही..
ग़ालिबने मीर च्या काव्याला दिलेले हे सर्टिफिकेट कुठल्याही ज्ञानपीठ पुरस्कारापेक्षा मोठे आहे.
आपला,
(मीरप्रेमी) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
मावळतीच्या सूर्याने जाता जाता कृष्ण्वसना संध्येच्या अंगावर क्षितिजाच्या तबकातील लाल फुले उधळली. आकाशगंगानी आपले सोन्याचे अलंकार तिच्यावर चढवले आणि निसर्गाने आपले चांदीचे दागिने (पांढरशुभ्र सुर्यप्रकाश) उतरवूने ठेवले.
ओ हो हो ! काय सुंदर वर्णन आहे !
असलेलं मोडून त्या जागी नवीन निर्माण होणे, अशा अविरत बदलातूनच हे जग घडलेले आहे, आणि म्हणूनच ज्याचा र्हास होत जातो (जे नाशवंत असते), ते सुंदर असते.
क्लास ! आजानुकर्णाचे मतपरिवर्तन लवकाराच होईल असे दिसते.
- (कलिजा खलास) सर्किट
ता.क. स्वतःचे नाव आपण "दीवाना-ए-मानिष असे लिहिले आहे. म्हणजे मनिषचा दीवाना, असा अर्थ होतो ना ? आपल्याला दीवाना-ए-इक्बाल लिहायचे होते का ?
ता.क. स्वतःचे नाव आपण "दीवाना-ए-मानिष असे लिहिले आहे. म्हणजे मनिषचा दीवाना, असा अर्थ होतो ना ? आपल्याला दीवाना-ए-इक्बाल लिहायचे होते का ?
हो, चुकलंच. आता - "मनिष दिवाना" करतो! :)
दीवाना-ए-मानिष
ह्यावरून एका अलीकडेच अत्यंत गाजलेल्या एका गाण्यामधील गंमत आठवली
ऐ मेरी मेरी मेरी जोहराजबीं (गायक-हिमेश रेशमिया ; गीतकार-समीर ; चित्रपट-फिर हेराफेरी)
ह्याची पुढचीच ओळ "फुर्कत-ए-गम मिटा जा" अशी आहे. येथे विरहाचे दु:ख असा अर्थ अभिप्रेत असावा, त्यामुळे तो गम-ए-फुर्कत असायला हवा (असा माझा कयास, बरोबर आहे ना?).
काय धमाल गाणे आहे ते! पण समीर यांचा शब्दप्रयोग ठीक असावा.
इदाफ्याचे नियम (म्हणजे अमुक-ए-तमुक-ए-ढमुक) चे नियम मला अजून नीट कळले नाही, म्हणून भाष्य करायला कचरतो. पण इदाफ्यात (असले तर) विशेषण शेवटी येते याची नोंद घेतली पाहिजे.
म्हणजे "मजनूच्या लैलेचे सुंदर स्मित" = "तबस्सुम-ए-लैला-ए-मजनू-ए-हसीन"
असे काहीसे यावे.
मनिष यांच्या लेखातल्या इक़्बाल यांच्या कवितेत
"शाम-ए-सियाहक़बा" असे रूप आले आहे. त्याचा अर्थ "कृष्णवसना हिची संध्या" नसून "कृष्णवसना (अशी) संध्या" असा मनिष यांनी दिला आहे, तो ठीकच आहे.
त्यामुळे अमुक-ए-तमुक चा अर्थ "तमुकचा अमुक" असा घेता येतो आणि संदर्भानुसार "तमुक असा अमुक" असा घेता येतो, असा ढोबळ अर्थ मी काढतो.
हा प्रकार मला नीट कोणी समजावून सांगितला तर हवा आहे. मनिष, धोंडोपंत, चित्तर, कोणी सांगू शकतील...
यामुळे अमुक-ए-तमुक चा अर्थ "तमुकचा अमुक" असा घेता येतो आणि संदर्भानुसार "तमुक असा अमुक" असा घेता येतो, असा ढोबळ अर्थ मी काढतो.
अच्छा म्हणजे अर्थ-ए-वाक्य असा आहे होय?
- सर्किट
मला उर्दू भाषेत रस आहे आणि प्रेमही आहे पण मला फार व्याकरणाचे ज्ञान नाही. मला वाटते, धोंडोपंत किंवा चित्तर जास्त सांगू शकतील. पण माझ्या माहितीप्रमाणे "गम-ए-फुरकत" हे बरोबर आहे, जसे "शब-ए-फुरकत" - "फुर्कत-ए-गम मिटा जा" हे गाण्यासाठी असावे असे वाटते. तरी एकदा खात्री करून घेइन.
अर्थ-ए-वाक्य अफलातुनच!!! :)
मला वाटते, ह्याला "इज़ाफ़त" म्हणतात आणि ते इंग्रजी of सारखा करतात. जसे - हाल-ए-दिल
तसेच विशेषण आणि विशेष्य ह्यांच्यातील नाते दाखवण्यासाठीही वापरतात. जसे - इस्मे-शरीफ़ (शुभनाम)
बरोबर. हाच शब्द अपेक्षित होता.
अरबीप्रमाणे उर्दूतही إضافة 'इदा़फ़[त] असा लिहितात. पण तुम्ही म्हणता तसा " इज़ाफ़त " असाच उर्दूत उच्चार आहे.
नियम दिल्याबद्दल धन्यवाद. त्यावरून विशेष्य-विशेषण म्हणून "मनिषे-दीवाना" म्हणण्यास हरकत नव्हती असे वाटते. तरी ऐकायला जरा वेगळेच (थोडे विचित्र) वाटते खरे. म्हणून तुम्ही केलेला बदलही पटतो.
अमुक-ए-तमुक हा समास षष्ठी-तत्पुरुष आणि कर्मधारय अशा दोन्ही प्रकारांनी सोडवता येतो अशी माझी समजूत आहे.
उदा. ग़मेफ़ुर्क़त, मुग़ले-आज़म
धनंजय, उर्दूतला ज़्वाद हा ज़ व द च्या मधला आहे असे एका हैदराबादी गृहस्थाने मला सांगितले होते (आधीच सांगतो की चित्तरंजन यांना हे मान्य नाही, त्यांच्या/तज्ज्ञांच्या मते उर्दूत तिन्ही-चारी/सगळ्या ज़ चा उच्चार एकच होतो असे त्यांनी पूर्वी एकदा लिहिले होते). यामुळे अरबीमध्ये त्याचा बरेच वेळा द होतो, जसे रमदान. मराठीतही तकाज़ा चा तगादा याचमुळे झाला असावा.
- दिगम्भा
विकीपीडिया म्हणते -
Standard Urdu uses many prepositions directly borrowed from Persian, and also some from Arabic. The most common is इज़ाफ़त اضافه izāfat, the particle -e- meaning "of" that links two words together. Example: रंग-ए बहार / رنگ بہار / rang-e-bahār (lit., colour of spring).
त्या न्यायाने मग गम-ए-फुरकत हे बरोबर आहे. बाकी गाण्याबद्दल समीर लाच विचारले पाहिजे!
कष्टाने आपण हे शोधून काढलेत हे काबिल-ए-तारिफ आहे :-))
गीतकार समीर असल्यानेच मी (जवळजवळ ऍज ऍन आफ्टरथॉट) प्रश्नार्थक लिहिले, एरवी मी एकदम आत्मविश्वासाने लिहिले असते.
बघू जाणकार काय सांगतात ते !
कष्टाने आपण हे शोधून काढलेत हे काबिल-ए-तारिफ आहे :-))
आवडाबाई पण उर्दू झाल्या वाटतं? कमाल आहे.
आपला,
(चकित) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
आवडाबाई पण उर्दू झाल्या वाटतं? कमाल आहे.
हो उर्दू आहेच, पण सध्या थोडा ट्रॅक चेंज केलाय. आजपासून सवाई गंधर्व !! तेव्हा ४ दिवस शास्त्रीय संगीत !!
संपल्यावर रिपोर्ट देतेच !
अर्थात हेच इक्बाल पुढे कट्टर धर्मवादी झाले, पाकिस्तानच्या निर्मितीचा एक खंदा पुरस्कर्ता हा आरोपही त्यांच्यावर झाला. पण त्यांच्या (आणि अर्थातच उर्दू शायरीच्या वैविध्याविषयी, दर्जाविषयी ही चर्चा असल्यामुळे त्यांचे मतपरिवर्तन, उदारमतवादी ते कट्टर धर्मवादी हा प्रवास हे इथे वगळले आहे.
अर्थातच उर्दू शायरीच्या वैविध्याविषयी, दर्जाविषयी ही चर्चा असल्यामुळे त्यांचे मतपरिवर्तन, उदारमतवादी ते कट्टर धर्मवादी हा प्रवास हे इथे वगळले आहे.
होऊ द्या की त्यावरही चर्चा. हवं तर स्वतंत्र लेख सुरू करा पण आम्हालातरी त्यातच तुमच्या शेरो शायरी पेक्षा जास्त रस आहे.
-कि'गार
सर महंमद इक़्बाल यांनी स्वतंत्र पाकिस्तान निर्मितीचा प्रस्ताव कधीही मांडला नाही. त्यांना पद्धतशीरपणे त्यात गोवण्यात आले.
सारे जहाँसे अच्छा, हिदोस्ताँ हमारा....
म्हणणारा माणूस हिंदोस्ताँला तोडायची मागणी कशी करेल?
एडवर्ड थॉमसनने त्याच्या पुस्तकात स्वतंत्र पाकिस्तान निर्मितीचा उल्लेख करून ती कल्पना सर महंमद इक़्बालांच्या डोक्यातून बाहेर आली आहे असे म्हटले. त्यानंतर लगेच इक़्बाल यांनी आपली अखंड भारताची भूमिका असल्याचे स्पष्ट करतात थॉमसनने फक्त दिलगीरी व्यक्त केली.
पण तोपर्यंत जीना आणि लियाकत अली मंडळीना आयताच बळीचा बकरा मिळाला होता. अलाहाबादच्या मुस्लिम लीगच्या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सर महंमद इक़्बाल यांची निवड 'करण्यात' आली आणि त्या अधिवेशनात स्वतंत्र पाकिस्तान निर्मितीचा ठराव संख्याबळाच्या आधारे पास करण्यात आला असे इतिहास सांगतो.
वास्तविक सर महंमद इक़्बाल यांचे मत पंजाब, वायव्य सरहद्द आणि बलुचिस्थानचे एक राज्य बनवून ते अखंड भारतात सामावून घ्यावे असे होते.
आपला,
(इतिहाससंशोधक) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
मनिषराव,
तुमचे म्हणणे खरे आहे.
पण सर महंमद इक़्बाल यांच्याबद्दल लोकांच्या मनात गैरसमज असू नयेत म्हणून वरील गोष्ट स्पष्ट करणे अगत्याचे वाटले.
आपला,
(दक्ष) धोंडोपंत
आम्हाला येथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com
मनिषराव,
अतिशय सुंदर लेखन! आपला उर्दू भाषेचा एवढा व्यासंग आहे हे माहितीच नव्हतं. आपल्याकडून अजूनही अश्याच लेखांची अपेक्षा आहे....
उर्दू भाषा ही अतिषय नजाकतदार आणि काव्यमय आहे.
क्या बात है! त्या भाषेचा रुबाब काही वेगळाच...
तात्या.
प्रतिक्रिया
जमल्यास
अवश्य
वा ! मेजवानी!
ता.क.
छान लेख !!
फस्क्लास गाणे!
असे आहे होय ?
रस जास्त ज्ञान कमी
'अर्थ-ए-वाक
इज़ाफ़त
इज़ाफ़त
षष्ठी-तत्पुरुष आणि कर्मधारय
हुश्श...
एवढ्या
उर्दू आवडाबाई
आता शास्त्रीय पण !!
अर्थात हेच
का बरे?
खोटा आरोप
खरे आहे
खरे आहे
सुंदर..
सुंदर
हेच
बहोत ख़ूब
सुभान अल्लाह..
वाह वाह बहुत खूब