माहिती हवी आहे - पुण्यातील आयुर्वेदिक केंद्रे /निष्णात वैद्य
नमस्कार
ही माझी मिपावर नवीन सुरुवात अहे. चू. भू. सांभाळून घ्यावी.
काही दिवसांपूर्वीचा "आयुर्वेदाला वैज्ञानिक ज्ञानशाखा मानावे का?" या विषयाचा धागा आणि प्रतिक्रिया पहिल्या. मिपावर या विषयाचे बरेच जाणकार आहेत हे पाहून आनंद झाला. म्हणूनच या ज्ञानाचा फायदा मला आणि सर्वाना व्हावा म्हणून हा काकू.
माझ्या घरी सर्वांना (मी,बहिण, भाऊ,आई ) संप्रेरक असंतुलनाचा (hormonal imbalance)त्रास आहे असे आढळून आले आहे. याची लक्षणे आम्हा भावंडांमध्ये खूपच समान आहेत जसे कि चेहऱ्यावर पुरळ येणे,केस गळणे,केस अकाली पांढरे होणे,जाडी वाढणे,वारंवार तोंड येणे, चिडचिड होणे, कोणत्याही कामात उत्साह नसणे. सर्वाना या सगळ्याचा कमी जास्त त्रास होतो.
विशेषतः बहिण (वय २६ ) आणि भाऊ (वय २८) यांच्या चेहर्य्वर वयात आल्यापासून आतापर्यंत पुरळ येतात तेही खूप जास्त प्रमाणात. यासाठी त्वचा तज्ञाचा सल्ला घेतला असता त्यांनी सांगितले कि हे संप्रेरक असंतुलन (hormonal imbalance ) मुळे होत आहे आणि यासाठी कोणतेही खास उपचार नाहीत. पुरळ सुकण्यासाठी मलम दिले होते. २-३ महिने नियमीत वापराने पुरळ गेले परंतू १) त्या मलमाचे दुष्परिणाम दिसून येऊ लागले जसे कि डोळ्यांची आग होणे २) हे मलम कायमस्वरूपी काम करणारे नाही जोपर्यंत वापरत आहात तोपर्यंत परिणाम,वापरणे बंद केले असता दुप्पट जोमाने पुरळाची उत्पत्ती सुरु.
दुष्परिणाम दिसू लागल्याने मलम वापरणे बंद केले आहे. आंतरजालावर उपाय शोधले असता पूरक आहार आणि घरगुती उपाय या बद्दल वाचायला मिळाले. त्यानुसार घरगुती उपचार सुरु आहेत जसे कि तेलकट, आंबट , उष्णता वाढवणारे पदार्थ आहारातून पूर्णपणे वर्ज्य केले आहेत, फळे, पाणी, हिरव्या पालेभाजा यांचा आहारात मुबलक वापर इ. परंतु म्हणावासा परिणाम दिसून आलेला नाही. (गेल्या ३ महिन्यापासून हे उपचार सुरु आहेत)
मातोश्रींना दम्यासारखा त्रास आहे. (हा त्रास संप्रेरक असंतुलनाशी निगडीत नाही. ) हवामानातील बदल अजिबात सोसत नाही. जेवणातही दही,ताक ,लिंबू, कैरी (आंबट पदार्थ ), फ्रीजमधील थंड पदार्थ, काकडी,मुळा (थंड पदार्थ), अति तेलकट (मसाल्याचे , तळलेले , काजू,बदाम, अक्रोड) असे पदार्थ एकदम वर्ज्य आहेत . गेली ४० पेक्षा जास्त वर्षांपासून ती यातील कोणत्याही पदार्थाचा यथोचित आस्वाद घेऊ शकली नाही. फक्त भात,भाकरी,वरण, रोजच्या भाज्या याव्यतिरिक्त कशाचाही आनंद घेऊ शकली नाही. ज्या ज्या वेळी वरील कोणताही पदार्थ (अगदी थोड्या प्रमाणात) आहारात आला असता ८-१० दिवसांच्या आजाराची निश्चिंती. उन्हाळ्यातही माठाचे एक ग्लास पाणी वा काकडीची एक फोड सुद्धा दगा देते.
"आयुर्वेदाला वैज्ञानिक ज्ञानशाखा मानावे का?" या दुव्यामध्ये नाडी परीक्षक वैद्यन्बद्दल वाचायला मिळाले.आयुर्वेदामध्ये प्रत्येक आजारावर उपचार आहेत आणि निरोगी जीवन जगण्यासाठी आयुर्वेदाचा खूप चांगला उपयोग होतो असे आंतरजालावर वाचण्यात आले. आमच्या नातेवाईकांपैकी एकजणाने कमरेच्या दुखण्यासाठी अशाच एका नाडी परीक्षक वैदयांकडून (मु. पो. हैद्राबाद) उपचार घेणे सुरु केले आहे. त्यांचा अनुभव खूप चांगला आहे. आम्हाला हैद्राबादला जाणे शक्य नाही. पुण्यात वा आसपास कोणी निष्णात वैद्य असल्यास पत्त्यासकट माहिती द्यावी. सोबत स्वताला आलेले अनुभव दिल्यास विशेष आभारी. पुण्यातील प्रसिध्द "बालाजी तांबे" यांचे उपचार कोणी घेतले असल्यास (त्यांचे उपचार कितपत परिणाम कारक आहेत याबद्दल) मार्गदर्शन करावे.
(काही चुकीचे लिहिले असल्यास दयाळू मिपाकर क्षमा करतील आणि पामराला समजून घेतील अशी आशा आहे . जाहीररीत्या लिहिण्याचा पहिलाच प्रयत्न आहे.)
वर्गीकरण
प्रतिक्रिया
कळवते व्य.नि. मधून.
चिमण्या गणपतीशेजारी
किडनी स्टोन साठी कुणी चांगला
आगाऊ सल्ला
तुम्ही उत्तर अन्य कोणालातरी
एक तर तुम्ही क्षमा मागायचा
सुबोध सर्, आयुर्वेदाने मुत्राश्मरी पडतात...
३mm
वर लिहिले आहेच
माझा अनुभव.
डॉक्टर बाबा साहेब,
४-५ मिमी साठी औषधे द्यायची गरजच नसते हो.
मी प्रथम पासुन एकच गोष्ट
+१
मुतखडा निवारणासाठी
मझि माहिति
२.५ mm च्या किडनी स्टोनवरील
निष्णात वैद्य
वैद्य खासगीवाले, बाजीराव रोड
तारीख तपासावी.
लिहू देत. कोणालातरी उपयोग