Skip to main content

चिन्यांचा उपद्व्याप

लेखक कोमल यांनी शुक्रवार, 26/04/2013 15:45 या दिवशी प्रकाशित केले.
दोन तीन दिवसांपूर्वीच्या पेपर मध्ये आलेल्या बातमीने मनात खळबळ माजवली.
  • चीनी हेलिकॉपर्ट्सची भारतीय हवाई हद्दीत ३०० किमी पर्यंत घुसखोरी
  • चीनी सैन्याची देप्सांग खोऱ्यात सुमारे १० किमी पर्यंत घुसखोरी, ६ दिवसांनंतर भारताला खबर
आणि यावर संरक्षण मंत्रांचे वक्तव्य काहीसे असे होते- "चीनकडून होत असलेल्या घुसखोरीच्या मुद्द्यावर 'शांततापूर्ण' मार्ग काढण्यासाठी विविध पातळ्यांवर 'चर्चा' सुरू आहेत. देशाची एकात्मता आणि सुरक्षा यांचे रक्षण करण्यासाठी सरकार आवश्‍यक ती सर्व पावले उचलत आहे." ghusakhori आहोत कुठे आपण?? नक्की काय सुरु होणार आहे?? कि झालं आहे पण आपल्याला अजून सुगावा लागलेला नाहीये? १९६२ च्या युद्धाची ऐंशीत आणि नव्वदीत जन्मलेल्या आमच्या सारख्यांना फारच पुसट (किंवा अगदी नाहीच) झळ लागलेली. इंडो चायना वॉर बद्दल आम्ही ऐकल आमच्या आजी आजोबांकडून, तत्सम व्यक्तींकडून, वाचलं आंतरजालावरील माहितीपर लेखांतून किंवा भा. रा. भागवतांच्या मानस पुत्र फा. फे. कडून. फा. फे. चा गमतीचा मुद्दा सोडला तर आम्हाला फक्त एवढंच माहित आहे कि चीन सारखा बलाढ्य शत्रू खिशात सुरा घेऊन आपल्या शेजारी येउन बसला होता आणि संधी साधून त्याने आपल्यावर हल्ला केला. तात्कालिक राजकीय परिस्थितीमुळे म्हणा किंवा हिमालयात लष्करास आलेल्या अडचणींमुळे म्हणा आपला त्या युद्धामध्ये पराभव झाला. आता पुन्हा जर फिरून तशी परिस्थिती निर्माण झाली तर परिणाम काय होऊ शकतील? आजवर चीन ने या न त्या मार्गाने भारतासाठी प्रश्न निर्माण केले आहेतच. पाकिस्तानला केलेले अप्रत्यक्ष सहकार्य, गेल्या ३ वर्षांत ६०० वेळा केलेली घुसखोरी, याव्यतिरिक्त चिनी साहित्यांनी भारताची बाजारपेठ आणि खाद्यपेठ मोठ्याप्रमाणात बळकावली आहेच. "हिंदी चीनी भाई भाई(??)" म्हणत म्हणत या भाईने तर दादागिरी दाखवायला सुरुवात केली आहे असे वाटते. भारताचा आणि किती भूभाग हा भाई घशात घालणार आहे कुणास ठाऊक?? आजच्या घडीला भारतात असलेली राजकीय परिस्थिती किंवा राजकीय इच्छाशक्ती(!!)(एका दैनिकाच्या संपादकांच्या मते) चीन ला थोपवू शकेल का? (चीनी बातम्यांनी सुन्न झालेली) कोमल फोटो गूगल कडून साभार

वाचने 103218
प्रतिक्रिया 164

प्रतिक्रिया

जे काही चीन सध्या करत आहे ते फक्त नाटक आहे, आपल्या सरकारला इकडे अडकवून दुसर्या भागात ( अरुणाचल किव्हा पी वो के मध्ये ) भयंकर काहीतरी करत आसवे किव्हा तयारी करत आसवे असे वाटते आहे. शिवराज साहेब म्हणा प्रतिभा बाई म्हणा किव्हा सुशीलकुमार साहेब म्हणा आपल्या महाराष्ट्रीय नेत्यांची राष्ट्रीय पातळीवर राजकारण किव्हा पद भूषवायची लायकीच नाही आहे असे खेदाने म्हणावेसे वाटते आहे.

भारतात मिलिटरी सर्व्हिस कंपल्सरी व्हावी अशी तीव्र इच्छा आहे (किमान १२ महिन्यांसाठी तरी)

In reply to by मालोजीराव

+१००० सिरियसली सहमत. मिलिटारी सर्व्हिस कंपल्सरी करत नाहित तर मग निदान ऐच्छिक तरी करा म्हणावं. "मला मिलिटारीत यायचे आहे" असे जो कुणी म्हणेल त्याला निदान नकार तरी देउ नका. (सध्या नाकारल्या जाणार्‍या उमेदवारांचे प्रमाण खूपच अधिक आहे, काटेकोर नियमांमुळे.) ह्याचा फायदा फक्त लष्करी संख्याबळ वाढण्यात होइल असे नाही तर नागरी/सिव्हिलियन जीवनातही एक शिस्त्,निष्ठा आणि एक प्रकारची जबाबदारीची जाणीव्/जाण निर्माण होइल अशी आशा करतो.

In reply to by मन१

मिलिटारी सर्व्हिस कंपल्सरी किन्वा"मला मिलिटारीत यायचे आहे" असे जो कुणी म्हणेल त्याला निदान नकार तरी देउ नका. हि वाक्ये व्यासपीठावरून बोलायला छान आहेत. एकदा लष्करी भरती च्या छावणी मध्ये जाऊन पहा बाराशे लोकांची भरति असेल तर तेथे पन्नास हजाराचा जमाव असतो यातील फक्त दोन हजार केवळ दहावी/ बारावी झालेले कच्चे लोक निवडून काढून त्यांना दोन वर्षे प्रशिक्षण देऊन पोलादी हृदयाचा सैनिक बनवणे हे सोपे काम नाही. मुळात दर वर्षी होणार्या भरती साठी सुव्यवस्था ठेवण्यासाठी पोलिसांचा फौजफाटाच ठेवावा लागतो त्यात जे लोक नापास होतात ते भ्रष्टाचाराचे आरोप करून दंगल करतात हा प्रकार थांबवणेच इतके कठीण आहे कि एकशे विस कोटी लोकसंख्येच्या दहा टक्के म्हणजे बारा कोटी तरुणांना एक वर्ष लष्करी शिक्षण कोण देणार आणि त्यांच्या एक वर्षाच्या खाण्या पिण्याचा खर्च कोण करणार? मुळात बारा लाख लष्करापैकी दीड लाख हे लष्कराच्याच प्रशिक्षणात आणि आधुनिकीकरणात गुंतलेले आहेत. त्यांना तेथून बाहेर काढून बारा कोटी लोकांना एक वर्ष प्रशिक्षण देणे हे शक्य आहे का? अवांतर चालू द्या

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

विमे, खिरापत कसली? कंपल्सरी लष्करी प्रशिक्षण असलेले देश जगात नाहितच का? खरे ह्यांनी सांगितलेल्या व्यावहारिक अडचणी मान्य आहेत. पण त्यावरही काही उपाय काढता येतो का हे पहायला हवं. अधिक संख्येनं खडं लष्कर आजच्या तंत्रज्ञानाच्या युगातही मला आवश्यक वाटतं. निदान अंतर्गत सुरक्षितता ठेवण्यास लष्कर मिळेल. व बाकी काही नाही झाले तरी नागरी जीवनात शिस्त येइल. त्याहून महत्वाचे म्हणजे एक मोठा reserve force तयार होइल. (अशाच रिझर्व फोर्समुळे रशियाला दुसर्‍या म्हायुद्धात बरीच मदत झाली होती.) . नागरी जीवनात शिस्त का आवश्यक आहे, हे मी वेगळे सांगायची गरज आहे का? शेकडो हजारो मुद्दे देता येतील. सध्या एकच उदाहरण सांगतो. १९६५ आणी १९७१ च्या युद्धाच्या वेळी मुंबैसारखा शहरांत रात्री युद्धजन्य आणीबाणी घोषित केली होती. रात्री दिवे लावू नयेत अशा सूचना होत्या.(दिवे लावल्यास शत्रू विमानांना शहरे अचूकतेने ओळखता येतील असे भय होते.) इतके असूनही भारतीय फार मोठ्या संख्येने ह्या सूचनेचे उल्लंघन करीत होते. ह्याबद्दल ज्यांच्यावर अंतर्गत सुरक्षेची जिम्मेदारी आहे(जे थेट सीमेवर लढत नाहियेत) अशा त्यावेळच्या कित्येक लष्करी अधिकार्‍यांनी नापसंती नि चिंता व्यक्त केली होती. पण सवयीप्रमाणे तिकडे दुर्लक्ष केले गेले. नशीब हेच की इतके असूनही आपल्या शहरांवर खरोखर हल्ल झाला नाही. बाकी विषयांतर होतय हे मान्य.

In reply to by मन१

अबे बाकी ठीके, पण आर्थिक मुद्दा बघ ना. जास्त लष्कर म्हंजे हौ जास्त इज इनफ अ‍ॅण्ड हौ मच फर्दर इज अ बर्डन? आपली लोकसंख्याच तेच्यायला इतकी आहे की हे सांभाळणं लै कठीण होईल. अनझेपेबल होण्याच्या एकमेव कारणामुळे मला हे नको वाट्टेय.

In reply to by मन१

कंपल्सरी लष्करी प्रशिक्षण असलेले देश जगात नाहितच का?
लष्करी प्रशिक्षण की लष्करात नोकरी?? दोन्हीत फरक असेल असा माझा अंदाज आहे. जाणकार प्रकाश टाकतीलच. शिवाय त्या देशांची लोकसंख्या आणि भारताची लोकसंख्या यात प्रचंड फरक आहे. भारतात हे कठीण आणि मुख्य म्हणजे अनावश्यक आहे.
बाकी काही नाही झाले तरी नागरी जीवनात शिस्त येइल.
असे वाटत नाही. रेल्वेत सैनिकांना अनावश्यक दादागिरी करताना पाहिले आहे. (सैन्यातील अधिकारी आणि इतर सैनिक यांच्यात किती आणि कसा फरक असतो हे नीटसे माहित नाही). बेशिस्त हा आपला सर्वात मोठा दुर्गुण आहे हे मान्य, पण हा उपाय कितपत जमेल ते माहित नाही.
अशाच रिझर्व फोर्समुळे रशियाला दुसर्‍या म्हायुद्धात बरीच मदत झाली होती
रशियन सैन्याची संभावना बाजारबुणग्यांचे सैन्य असे होत असे असे ऐकून आहे.

In reply to by मन१

शिस्त, धैर्य वगैरे सद्गुण बाणवायला सैनीक भरती कंपल्सरी करण्याची काहि आवश्यकता नाहि. मैदानी खेळ, सामाजीक उपक्रम (अगदी नदी सफाई पासुन ते बालवाडी शिक्षण वगैरे) यांचा शैक्षणीक जीवनात व्यवस्थीत समावेश झाला तरी काम भागेल. महिन्यातुन एकदा जरी गाव खराटा घेऊन उभं राहिलं तरी रोगराई खलास होईल. मुंबई शहराने अगदी ठरवुन पावसाळ्यापुर्वी दोन रविवार आपले मनोरंजन कार्यक्रम बंद ठेऊन नाले साफसफाई केली तर रस्ते तुंबण्याची शक्यता शुण्य होईल... (पण हे होण्याची शक्यता देखील शुण्य आहे ;) ) अर्धवटराव

In reply to by अर्धवटराव

आत्ता असं नाहीये म्हणता? एन एस एस च्या नावाखाली १० १० दिवसांचे कँप होतात वरिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे. फोटो येतात पेप्रात, आहात कुठं? व्हेअर आर यु? ह्या कॅंपांमध्ये नेमकं काय चालतं नि कसं चालतं हा संशोधनाचा विषय आहे म्हणा. संघाचे वर्ग, एन सी सी कँप असं बरंच बरंच आहे. पण अवाढव्य लोकसंख्येला पुरेसं होत नाही. :(

In reply to by sagarparadkar

असो. हा धागा वाचून मागे मिपावर असाच एक मॅरॅथॉन धागा आपण इंचाइंचाने काश्मीर घालवतो आहोत म्हणून निघाला होता त्याची आठवण झाली. शेकडो प्रतिसादानंतर काश्मीरात आपण माघार घेत नसून प्रगती करत आहोत असे धागाकर्त्यांनीच येऊन सांगितले. शेवटी लष्करी आणि राजनैतिक डावपेच वगैरे बाबत मनमोहनसिंग वगैरे मिपाकरांचा सल्ला घेत नाहीत हे देशाचे दुर्दैवच. नाहीतर एव्हाना आपले लष्कर बीजींगमध्ये सूप पीत बसलेले दिसले असते.

In reply to by नितिन थत्ते

मनमोहनसिंग वगैरे मिपाकरांचा सल्ला घेत नाहीत हे देशाचे दुर्दैवच. नाहीतर एव्हाना आपले लष्कर बीजींगमध्ये सूप पीत बसलेले दिसले असते.
1

In reply to by नितिन थत्ते

>>> शेवटी लष्करी आणि राजनैतिक डावपेच वगैरे बाबत मनमोहनसिंग वगैरे मिपाकरांचा सल्ला घेत नाहीत हे देशाचे दुर्दैवच. नाहीतर एव्हाना आपले लष्कर बीजींगमध्ये सूप पीत बसलेले दिसले असते. मनमोहन सिंगांनी मिपाकरांचा सल्ला घ्यावा किंवा अजून कोणाचाही घ्यावा. अगदी प्रियांकाच्या बाळांचा सल्ला घेतला तरी हरकत नाही. पण नुसता सल्ला घेऊन डोळे मिटून चेहर्‍यावर दीन, पतित, अन्यायी, केविलवाणे भाव आणून स्वस्थ बसून राहू नका. निष्क्रीयता सोडा, दुर्बलता सोडा, कोळसा घोटाळा/२जी घोटाळा/राष्ट्रकुल घोटाळा इ. अगणित घोटाळ्यातील भ्रष्टाचार्‍यांना पाठीशी घालणे सोडा, चौकशी अहवाल बदलून खोटे अहवाल तयार करणे सोडा, सोनिया किंवा राहुल कडून आदेशांची वाट बघू नका. योग्य ती लष्करी कारवाई करून भारतीय भूमीत घुसलेल्या चिन्यांना हाकलून लावा. अर्थात तुमच्याकडून अशी अपेक्षा ठेवणे म्हणजे चंद्र मागण्यासारखे आहे. पण काय करणार, राहवत नाही म्हणून लिहितो.

In reply to by श्रीगुरुजी

शेवटी लष्करी आणि राजनैतिक डावपेच वगैरे बाबत मनमोहनसिंग वगैरे मिपाकरांचा सल्ला घेत नाहीत हे देशाचे दुर्दैवच. नाहीतर एव्हाना आपले लष्कर बीजींगमध्ये सूप पीत बसलेले दिसले असते. हॅहॅहॅ... चच्चांकडुन अपेक्षित असलेलीच प्रतिक्रिया ! मनमोहन सिंग यांना सध्या कोणा-कोणाचा सल्ला घ्यावा हाच प्रश्न पडलेला असावा.बाकी चच्चा तुमच्या आवड्या कॉग्रेस बद्धल हा लेख सुद्धा वाचा जरा... सारवासारवीतली सक्रियता जाता जाता :--- आपल्या लष्कराचे दुर्दैव असे की आपल्या वायझेड राजकारण्यांमुळे त्यांचे मनोधैर्य खचत चालले आहे,मग कारगील योद्द्यांना अमानुषपणे ठार करणे असो,वा सैनिकांची मुंडकी तोडुन नेणे असो...आमचं सरकार फक्त "शाब्दिक" निषेध नोंदवण्यापलीकडे काहीच करत नाही,आणि हेच आता चीन बाबत घडताना आपण सर्व हतबलतेने पाहत आहोत. चीनने आपल्या देशात तंबु ठोकुन आज बहुतेक १८ दिवस पूर्ण झाले आहेत आणि लष्करी तत्परतेचा (कारगिल प्रमाणेच यावेळी देखील आपल्या लष्कराचे इंटलिजन्स फेल्युअर झाले.) आणि राजकिय धोरणाचा पार चुरळा झाला आहे. :( जग आपल्याकडे पाहुन हसतय ! हे हिंदुस्थानी म्हणे महासत्ता होण्याच्या बाता मारतात,जे साध्या ४० सैनिकांना त्यांच्याच देशातुन हुसकवुन लावु शकत नाही... Chinese troops may never leave Ladakh: Intelligence officials

चिनी सैन्यतुकडीची घुसखेरी चिंतेची बाब आहे. मला अशी आशा वाटत आहे की, भारतीय लष्कर प्रत्यूत्तराची पूर्वतयारी करत आहे. अन चिन्यांना गाफील ठेवण्याचा डावपेच म्हणून सरकार एकदम संयमीत प्रतिक्रिया देत आहे. याप्रकारची रणनिती बांग्लादेश मुक्तीसंग्रामात यशस्वीरित्या वापरली गेली होती

In reply to by श्रीरंग_जोशी

त्यावेळी पंतप्रधान पद इंदिरा गांधींकडे होतं, त्यांनी नाही म्हटलं तरी भारतासाठी बरचं काम केलं होतं. आत्ताची परिस्थिती याच्या पूर्ण उलट आहे. आता ममो खेळणं पंतप्रधान आहे. जर तुम्ही म्हणलात तसा सरकारचा डाव(???) असेल तर "जिओ युपिए२". पण हे कल्पनातीतच वाटतं..

In reply to by कोमल

सध्या केवळ अंदाजच बांधल्या जाऊ शकतो. चीन आपल्याला दुखावेल असे वाटत तरी नाही. बारीक सारीक कुरापती काढत राहणे हे नेहमीचेच आहे. काही दिवसांनी / आठवड्यांनी हे घुसखोर परत जातील अर्थात भारताकडून काही अटींची पूर्तता करून.

In reply to by श्रीरंग_जोशी

काही अटींची पूर्तता करून
नक्की कसल्या अटी याचे अंदाज नाही बांधले का तुम्ही अजुन??
चीन आपल्याला दुखावेल असे वाटत तरी नाही
तुम्ची दुखावण्याची व्याख्या मला कळू शकेल का?? भारताच्या हद्दीच्या आत तंबू ठोकले आहेत त्यांनी.. अजून काय करायला पाहीजे त्यांनी म्हणजे "आपण" दुखावले जाऊ??

In reply to by कोमल

वॄत्तपत्रांतील बातम्यांमध्ये याबाबत लिहून आले आहे. भारत सीमाभागात लष्करी पायाभूत सुविधा मजबूत करत आहे. टेळहणी साठी युद्धसज्ज तुकड्या तैनात करत आहेत. या सर्व गोष्टींची तीव्रता कमी व्हावी यासाठी दबावाची खेळी खेळली जात आहे. जोवर हल्ला व लष्करी चकमकी होत नाही तोवर तरी आपण अधिकॄतरित्या दुखावले जाऊ असे दिसत नाहीये. लष्करी प्रत्युत्तर हि अधिकृतरित्या दुखावले जाण्याची खूण समजावी. फार पूर्वी जे एन दिक्षित यांचा लेख वाचला होता तेव्हा वाटाघाटी करताना चिनी केवढे संयमी चिवट असतात अन भारतीय बाजू घाई गडबड करून स्वतःच्या अडचणी वाढवते याबाबत लिहिले होते.

In reply to by श्रीरंग_जोशी

मराठी मधील एका अग्रणी वृत्तपत्रातील बातमी विरोधी पक्ष काय बोलत आहेत किंवा का बोलत आहेत हा वादाचा मुद्दा आहे.. पण वृत्तपत्र तरी हेच दाखवत आहेत.. याला काय म्हणावे?? आणि या बातमी खालीच असलेली बातमी, पंप्र निवडणुकीच्या प्रसारात मग्न आहेत. तुम्ही म्हणत आहात तशी ही जर दबावाची खेळी असेल तर उत्तमच, पण अशी कृती जर भारतीय सैनिकांनी केली असती तर चीन एवढा संयमी राहीला असता का?? वाटाघाटीच्या भानगडीत पडला असता का?? जाता जाता- वाटाघाटीची वेळ नेहमीच का हो येते आपल्यावर??

In reply to by कोमल

दुवा पाहिला. विरोधी पक्ष आपले काम करत आहेत. माझ्या निरिक्षणानुसार भारत सरकार (कुठल्याही पक्षाचे / आघाडीचे असो) व भारतीय लष्कर माध्यमांद्वारे आक्रमकता न दाखवता प्रत्यक्ष कारवाईवर भर देतात. मागे एका चर्चेत याचे एक उदाहरण दिले होते. वाटाघाटी द्विपक्षीय असतात. ती वेळ सर्वांवरच येते.

In reply to by श्रीरंग_जोशी

चर्चा वाचली आणि तुमचा लेखही वाचला. लेख खुप आवडला. पण ती चर्चा ज्या वर आहे ती परिस्थिती (कंदहार अपहरण) आणि सद्द परिस्थिती(चीनची) यांची तुलना होऊच शकत नाही. त्यावेळी वाटाघाटी केल्या होत्या कारण कैक लोक प्रत्यक्ष ओलिस होते. आणि त्वरीत निर्णय घेणे गरजेचे होते. आताच्या मुद्याबद्दल विचार केला तर १० दिवस झाले आहेत चिन्यांना भारतात तंबू ठोकून, त्यांनी (अजूनतरी) अपहरण करणे, ओलिस ठेवणे या गोष्टींना सुरवात केली नाहीये, पण म्हणून सरकारने काहीच ठोस पावले न उचलता भारतीय जनतेला आणि पर्यायाने जगाला काही वेगळा संदेश दिला आहे अस नाही वाटत का?? चीनने सुद्धा अशा गोष्टींना सुरवात करावी का, जेणे करून वाटाघाटीची वेळ येइल आणि चीन अजून आपल्या देशाचा काही हिस्सा खिशात घालेल, (कदाचीत) परत जाइल आणि पुन्हा काही दिवसांनी परत येइल.. तुम्ही
पण अशी कृती जर भारतीय सैनिकांनी केली असती तर चीन एवढा संयमी राहीला असता का?? वाटाघाटीच्या भानगडीत पडला असता का??
याबद्द्ल काहीच मत नाही मांडलेलं..

In reply to by कोमल

मी वर जो दुवा दिला होता तो ज्या प्रतिसादाचा होता त्यात हे उदाहरण लिहिले होते.
जॉर्ज फर्नांडिस यांची संरक्षणमंत्री म्हणून शेवटची कारकिर्द सुरू झाल्या झाल्या भारतीय लष्कराने काश्मीरमधील नियंत्रणरेषेच्या अनेक किमी पलिकडे असलेली अतिरेक्यांची ठाणी धडक कारवाई करून नष्ट केली होती. व स्वतःच्या तिथे असण्याचे कुठलेही पुरावे शिल्लक न ठेवता आपल्या सैन्याची तुकडी सुखरूप परत आली होती. त्यावेळी इंडिया टुडे मध्ये यावर लेख आला होता.
या घटनेचा अजिबात गाजावाजा होऊ दिला गेला नाही. असे काही घडलेच नाही या प्रकारचीच उत्तरे माध्यमांच्या प्रतिनिधींना भारतीय लष्कराच्या अधिकार्‍यांकडून मिळत होती. सदर प्रकरणात पहिली आगळीक भारताकडून घडावी याची व्युहरचना चीनने केलेली असावी असा अंदाज आहे. हेच जर याविरुद्ध घडले असते तर चीनची प्रतिक्रिया काय राहिली असती यावर मी काही बोलू शकत नाही कारण त्या विषयाचा माझा अभ्यास नाही. मला एवढेच म्हणायचे आहे की प्रत्येक देशाची एक प्रकृती असते त्याविरुद्ध वागायला गेले की फसगत होऊ शकते. आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताची विश्वासहर्ता चीनपेक्षा केव्हाही अधिक आहे. बाकी आपल्याला चीनबाबत जसे वाटते की आपल्या भूभागात त्यांनी घुसखोरी केलेली आहे तसेच तिकडल्या लोकांचेही म्हणणे असणार की भारताने चीनच्या बर्‍याच भूभाग साडेसहा दशकांपासून बळकावलेला आहे अन चिनी सरकार हातावर हात ठेवून बसले आहे.

In reply to by श्रीरंग_जोशी

नक्कीच काही तरी गैरसमज होतोय.
भारतीय लष्कराने काश्मीरमधील नियंत्रणरेषेच्या अनेक किमी पलिकडे असलेली अतिरेक्यांची ठाणी धडक कारवाई करून नष्ट केली होती
१)पाक विरोधी केलेली ही कारवाई स्तुत्यच आहे, पण हे घडलं भाजप सत्तेवर असतांना, सध्या सत्ता काँग्रेस कडे आहे. (मी भाजप ची समर्थक नाही, हं पण काँग्रेस विरोधक नक्की आहे) २)भारत-पाक संबंध आणि भारत- चीन संबंध खूप वेगळे आहेत. जे पाक सोबत घडवून आणलं ते चीन सोबत शक्य वाटत नाही. भारताचे पाक बद्द्लचे धोरण आणि चीन बद्दलचे धोरण यांत प्रचंड तफावत आहे, दोन्ही देश भारताचे कट्टर शत्रु असले तरी. त्यामुळे पाक वर केलेल्या कारवाईचा मुद्दा चीन प्रकरणी तुलनात्मक नाही ठरु शकत.
बाकी आपल्याला चीनबाबत जसे वाटते की आपल्या भूभागात त्यांनी घुसखोरी केलेली आहे तसेच तिकडल्या लोकांचेही म्हणणे असणार की भारताने चीनच्या बर्‍याच भूभाग साडेसहा दशकांपासून बळकावलेला आहे अन चिनी सरकार हातावर हात ठेवून बसले आहे.
३)अतिशय असहमत. अस्काइ चीन अर्थात चीनने बळकावलेला प्रदेश तर त्यांच्याच ताब्यात आहे. img शिवाय यात सध्या चीन ने धुसखोरी केलेला प्रदेश दौलत बेग ओल्डी दिसत आहे. आणि हा प्रदेश चीनचा नाही हे कुणीही सांगु शकेल. आणि राहीली गोष्ट "चिनी सरकार हातावर हात ठेऊन बसलं असेल" असे चीनी जनतेला वाटत असण्याची तर ती शक्यता नसावीच कारण तेथील सरकारने तेथील जनतेलाच खूप हवालदील केले आहे. असो, माझे म्हणणे एवढेच आहे की चीन बाबत एकदा तोंड पोळलं आहे, पाकविरूद्ध केलेल्या काही यशस्वी कारवायांमुळे सरकारकडून युद्धनीतीची अपेक्षा करणे चुकीचे आहे.

In reply to by कोमल

हे प्रकरण असो वा इतर कुठले, माझे विचार असेच आहेत की जेव्हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न येतो व परराष्ट्र धोरणांचा विषय असतो तेव्हा कुठल्याही पक्षाचे आघाडीचे सरकार असो सरकारचे धोरण व लष्कराचे धोरण फारसे वेगळे नसते. अन या बाबतीत आपली सरकारी व्यवस्था बेजबाबदार असते असे मी मानत नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या डावपेचांत कधी आपले शत्रू वरचढ ठरू शकतात तर कधी आपण. उठसूठ स्वतःच्या देशाच्या धोरणकर्त्यांवर अविश्वास दाखवणे मला पटत नाही. नोव्हे २०१२ मध्ये कसाबच्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी कशी सफाईने करण्यात आली याबाबत संबंधितांचे अभिनंदन करणारे स्टेटस मी माझ्या चेपूवर टाकले तर लगेच कुणीतरी जालावर फिरत असलेले १० प्रश्न त्यावर प्रतिक्रिया म्हणून टाकले त्यापैकी काही तर अक्षरशः कॉमन सेन्सने उत्तर देण्यासारखे होते. त्यावर मी उत्तर दिले कसलेही ठोस कारण नसताना मी माझ्या देशाच्या व्यवस्थेबद्दल उगाचच संशय निर्माण करण्यात सहभागी होणार नाही. अनेकांच्या चेपूवर इतर देशांचे नागरिक मित्र असतात. काय प्रतिमा बनत असेल आपल्या देशाची? प्रत्येक सरकार निवडून देण्यात आपला प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष वाटा असतोच. ५ वर्षांसाठी त्यांच्यावर कामगिरी सोपवली आहे ना मग प्रत्येक कृतीवर अविश्वास दाखवण्याची घाई करणे बरोबर नाही. सतत अविश्वास दाखवणे खूप नुकसानदायी असते, मग तो मैत्रीत, नात्यात असो वा स्वतःच्या सरकारविषयी.

In reply to by श्रीरंग_जोशी

विषयांतर होत आहे आता.. तुमच्या विचारांनुसार चर्चा वाढवली तर बरेच फाटे फुटतील. एकच छोटीशी कथा सांगते, "एक आटपाट नगर होते. बाकीच्या नगरांसारखेच. एके दिवशी त्या नगरीत एक माणूस येतो अन नगरीतील लोकांच्या सोबतीने राहु लागतो. काही दिवसांनी तो त्या नगरीत दंगे-धोपे सुरु करतो. लोक त्याला समजावतात. तो समजतो. अजून काही दिवसांनी तो चोरी मारी करू लागतो. लोक त्याला प्रचंड दम भरतात. तो काही दिवस दबून वावरू लागतो. पुन्हा थोड्या दिवसांनी सक्रिय होतो आणि प्रमाणापेक्षा जास्त वाइट धंदे सुरु करतो. लोक त्याला गावातून हाकलू लागतात, तो खूप गयावया करतो, माफी मागतो, पण लोकांचा त्याच्यावरील विश्वास उडालेला असतो." तुम्ही जर त्या नगरीतील एक नागरिक असले असता तर तुम्ही काय बरं केलं असतं?? विषयांतर झाल्याबद्दल क्षमस्व..

In reply to by कोमल

पण मी ज्या नगरीत लहानाचा मोठा झालो त्या नगरीत एवढेच होत नाही. मी सरकारी अनुदानाच्या शाळा कॉलेजात शिकलो. सरकारी धोरणांमुळे उद्योगधंद्यांना पोषक वातावरण निर्माण झाले. त्यातून निर्माण झालेल्या रोजगारामुळे माझ्या घरात चूल पेटते. सरकारी अनुदानाचं इंधन मी वापरतो. सरकारच्या सौजन्याने विकसित झालेल्या पायाभूत सुविधांचा मी पुरेपूर वापर करतो. अतिरेकी नकारात्मकतेमुळे विशेषकरून गेल्या तीन वर्षांत देशाचे बरेच नुकसान झाले आहे. विषयांतराबद्दल क्षमस्व!!

In reply to by कोमल

अतिशय असहमत. अस्काइ चीन अर्थात चीनने बळकावलेला प्रदेश तर त्यांच्याच ताब्यात आहे.
'बळकावलेला' वर काहिसा असहमत / साशंक. यावर इथे वेगळा धागा उघडला होता

"In international diplomacy there are no permanent friends or permanent enemies, only permanent interests." - Prince von Otto Eduard Leopold Bismark थोडक्यात, जर का आपण आपला (म्हणजे देशाचा) स्वार्थ सांभाळत नसलो तर इतर कुठल्या शत्रूची गरज नाही, आणि पाळत असलो तर इतर आपोआप मैत्रीसाठी हात मागतील.

In reply to by विकास

खरयं... आपलं सध्याच सरकार इतकं दुबळ आहे,की ते स्वतः कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही,आणि लष्करालाही घेउ देत नाही. सारखं यांच तुणतुण वाजवण चालु आहे की चीनला दुखवणे योग्य नाही,पण चीन आपल्या खोड्या काढतोय आणि जागा बळकवुन बसला आहे...जे सरकार त्यांच्या निर्णय पंगुत्वासाठी प्रसिद्ध पावलं आहे,ते कुटनितीचा वापर करण्याची गोष्ट करतो आहे.चीन हळुहळ्य या भागात तंबुंची संख्या आणि सैनिकांची संख्या लवकरच वाढवेल अशी शक्यता मला वाटते. ज्या हिंदुस्थानी सैंन्याने १९७१ मध्ये पाकिस्तान बरोबरचे युद्ध फक्त १३ दिवसात संपवले,तेच हिंदुस्थानी सैन्य या साध्या तंबुंच्या विरोधात साधे पाउलही उचली शकत नाही,हे फक्त आपल्या सरकारच्या दुबळ्या नितीमुळे होत आहे. जर ते आपल्या सिमेत येउन घुसुन तंबु गाडुन बसतात,तर आपल्या सैन्याने देखील त्यांच्या सिमेत घुसायला हवे,मग बघा चीनची प्रतिक्रिया काय होईल... जाता जाता :- चीन जरी लष्करी दॄष्ट्या आपल्या पेक्षा वरचढ असेल तरी सुद्धा आपल्या सैन्याचा युद्ध अभ्यास / अनुभव हा त्यांचा पेक्षा जास्त आहे.त्यांना फक्त सरकारने मोकळीक द्यायची गरज आहे...

In reply to by मदनबाण

आपलं सध्याच सरकार इतकं दुबळ आहे,की ते स्वतः कुठलाही निर्णय घेऊ शकत नाही
त्यांच्या स्वार्थाचे निर्णय अगदी घाईघाईनी घेतय सरकार. २जी, कोळसा, साखर कारखाने - लगेच ताबडतोब निर्णय.

http://www.nytimes.com/2013/05/03/world/asia/where-china-meets-india-pu… या बातमीमधले शेवटचे वाक्य रोचक आहे. The latest spat between India and China is bound to resolve itself this year, one way or another. In six months, snow and bitterly cold weather will make the Chinese encampment very difficult, if not impossible, to maintain.

In reply to by श्रीरंग_जोशी

निसर्ग तरी मदतीस आहे आपल्या म्हणायचं. पण ती चिनी माणसं आहेत. काय काय तयारी करून आले असतील सांगता येत नाही

"घेंतला थोडा भाग, घुसलें थोडे मधे तर त्यांची नाकं थोडीच बाणेदार होणार आहेत भारतीयांसारखी, ती तशीच रहातील चपटी-चपटी". बाकी जागेचे थोडे शिंतोडे पाकिस्तान्कडे उडवा बाकीचे चीनकडे, जमल्यास बांग्लादेशालाही द्या अर्ध्य.

In reply to by आशु जोग

खरोखरच दुर्लक्ष होतं आपलं.. आता पाहिलं पाहीजे खुर्शिद साहेब काय बातमी घेऊन येत आहेत ते..

ताज्या बातमी नुसार आज संध्याकाळी भारतीय प्रमाण वेळे नुसार चीनी सैन्य मागे हटण्यास सुरुवात झाली आहे. आपले ITBP {Indo-Tibetan Border Police} चे लोक उद्या सकाळ पर्यंत दैलत बेग ओल्डी मधेच थांबुन राहणार आहेत आणि चीनी सैन्याची माघात निश्चित झाल्यावर माघारी परतणार आहेत. दुवा:- Indo-China border incursion row ends,withdraw troops from Ladakh

चीनची ही खुसखोरी तर आपल्याला कळलेलीच आहे,पण मागच्या महिन्यात त्यांनी वेगळ्याच प्रकारे घुसखोरी केली होती त्याची बातमी सुद्धा याच धाग्यावर सांगणे महत्वाचे आहे. मागच्या काही काळात चीन ने सायबर अ‍ॅटॅक करण्याचे सत्र आरंभले होते आणि त्यात लक्ष होते DRDO{Defence Research and Development Organisation} जास्त माहिती खालील दुव्यांवर मिळेल :--- INDIA's biggest Hack ever DRDO system's data hacked and uploaded in China DNA Exclusive: India's secrets are in Guangdong India’s secrets in China: Chinese hack DRDO security systems

ईकडे दिलेली माहिती चांगली आहे. The informal border separating China and India is known as the Line of Actual Control. While it has never been formally demarcated, the countries have signed two accords to maintain peace in frontier areas. Both countries have sought to keep the row low-key, keen not to disrupt their booming bilateral trade http://www.scmp.com/news/china/article/1230083/india-foreign-minister-m… भांडण मिटलेले दिस्तेय. सूप प्यायला हरकत नाही.!

दिलेल्या माहिती बद्द्ल धन्यवाद मबा. तरीही धोका टळलेला नाहीच. असो. पुन्हा अशा गोष्टींकडे भारताने वेळीच लक्ष पुरवले पाहिजे. योग्य ती काळजी घ्यायला पाहिजे. आपमतलबी चीन कधीच कुरपती काढणं थांबवणार नाही.

मिपावरील संरक्षण तज्ज्ञांचे अत्यंत आभार. त्यांच्या मोलाच्या मार्गदर्शनामुळे भारत सरकारला चिन्यांच्या कुरापतींची जाणीव झाली व मिपाकरांच्या रेट्यामुळे व सल्ल्यामुळे हा प्रश्न योग्यप्रकारे तडीस नेणे सरकारला भाग पडले. अन्यथा येथेही आपले सरकार तोंडघशी पडले असते.

इथेही भारताचा पराभवच झाला. चीनने म्हणे १९ किमी आत येऊन ठोकलेले तंबू काढून टाकले आहेत, पण चीन परत १९ किमी मागे जाणार का थोडेच अंतर मागे जाणार हे अजून नक्की नाही. आणि तंबू काढून टाकण्याच्या बदल्यात चीनने भारताचे नियंत्रण रेषेच्या आतील भारतीय भूभागातील सैन्य मागे घ्यायला लावले आहे. म्हणजे चीनने भारताला स्वतःच्याच भूमीतून सैन्य मागे घ्यायला लावले. आपले सैन्य आपल्याच भूमीतून मागे घ्यायला लागले तरी चीनला भारताच्या हद्दीत घातलेले तंबू काढावे लागले हा भारताचा दैदिप्यमान विजय आहे. अत्यंत मुत्सद्दी रीतीने व शांततेच्या मार्गाने जरब दाखवून चीनला नमवून आपण महासत्ता असल्याची जगाची पुन्हा एकदा खात्री पटविल्याबद्दल युपीए सरकारचे त्रिवार अभिनंदन! आपण राजनैतिक पातळीवर हा प्रश्न सोडवू असे आपले पंतप्रधान म्हणताच चीनला धडकी भरली व लगेच भारताला स्वतःच्याच भूमीतून मागे जायला लावण्याच्या किरकोळ अटीवर चीनने आपले तंबू गुंडाळले. आपल्या सर्वाच्या पूर्वपुण्याईनेच इतके खंबीर व कणखर पंतप्रधान व सरकार आपल्याला लाभले आहे. जय हो!

चीनची भारतीय क्षेत्रातून माघार. युपीए सरकारच्या कणखरतेची व समर्थ परराष्ट धोरणाची पुन्हा एकदा प्रचीती. http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/19926783.cms

In reply to by श्रीगुरुजी

हेच लिहायला आलो होतो. आता थत्तेचाचा आणि आजानुकर्ण काका काय म्हणतात ते पाहू.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

थत्तेचाचांचे माहिती नाही, पण निदान मी तरी संरक्षणसिद्थतेच्या बाबतीत पूर्णपणे मिपावर अवलंबून आहे. सरकारला काडीचीही अक्कल नसल्याने मिपाकरांवर विश्वास ठेवणे भाग पडते. मिपावरील संरक्षणतज्ज्ञांनी या संपूर्ण प्रकारात भारताने चीनविरोधात शेपूट घातले आहे याची प्रखर जाणीव सरकारला करुन दिली की हे पाऊलही सरकार मागे घेईल येत शंका वाटत नाही. तेवढे नकाशे वगैरे तयार झाले की मिपाकरांतर्फे सरकारला निवेदन जाईलच याची खात्री आहे.

In reply to by आजानुकर्ण

मी गेले काही दिवस हा धागा सातत्यानं पाहतोय. इतरही धागे पाहतोय. चीनच्या त्या संरक्षणविषयक 'व्हाईट पेपर'वर अजून इथं काहीच कसं मतप्रदर्शन नाही झालं तज्ज्ञांचं, असा प्रश्न पडलाय... एवढा ऑनलाईन उपलब्ध असलेला व्हाईटपेपर आणि तरीही इथं मौन? काही तरी गौडबंगाल आहे.

In reply to by आजानुकर्ण

उपरोध सोडा, मुद्द्याचे बोला. मुद्दे नसले की हे उपरोध वगैरे वापरून वेळ मारून न्यायची, नै ??

इथले काँग्रेस समर्थक एकदम बेपत्ता झालेले दिसताहेत. मला वाटलं की भारताने चीनवर मिळविलेल्या दैदिप्यमान विजयाबद्दल इथे अभिनंदनाच्या प्रतिसादांचा पूर येईल. पण इथे तर शुकशुकाट दिसतोय. बाकी कोणी नसलं तरी निदान मी तरी या विजयाबद्दल सरकारचं अभिनंदन केलेलं आहे. मी काँग्रेसचा कट्टर समर्थक नसलो तरी काँग्रेसने केलेल्या चांगल्या कामगिरीचं मी नेहमीच कौतुक करतो.

In reply to by श्रीगुरुजी

ते तुम्हाला करावे लागेलच हो. पण कारगिल मध्ये आपण जो भू भाग गमावला त्याच्याबद्दल काय स्पष्टीकरण देणार आहात आपण.

In reply to by श्रीगुरुजी

काँग्रेसने केलेल्या चांगल्या कामगिरीचं मी नेहमीच कौतुक करतो.
पण फार कमीदा अशी वेळ आली असेल ना?? ;)

In reply to by कोमल

>>> पण फार कमीदा अशी वेळ आली असेल ना?? छे छे! अशी वेळ जवळपास रोजच येत असते. काँग्रेसची कामगिरीच अशी आहे की काँग्रेसचं रोज कौतुक करावं लागतं. आता आजचंच बघा. सर्वोच्च न्यायालयानं सुद्धा काँग्रेसचं कौतुक केलंय. मग आपण कशाला मागे रहायचं!

In reply to by श्रीगुरुजी

येथे सरकारचे अभिनंदन करण्याचा प्रश्नच नाही. अभिनंदन त्या मिपाकरांचे की ज्यांनी सरकारला या प्रश्नाची प्रखर जाणीव करुन दिली. त्यामुळे काँग्रेस समर्थक इथे आले नसावेत असे वाटते.

बाकी कर्नाटक मध्ये भारष्टाचरामध्ये कॉंग्रेस ची बरोबरी केल्याबद्दल अभिनंदन. आणि निवडणुकी मध्ये ३ क्रमांक वर गेल्या बद्दल सहानुभूती

>>> बाकी कर्नाटक मध्ये भारष्टाचरामध्ये कॉंग्रेस ची बरोबरी केल्याबद्दल अभिनंदन. काँग्रेसची बरोबरी कशी होणार हो? भ्रष्टाचारामध्ये काँग्रेसची पीएचडी आहे तर भाजप अजून लोअर केजीतच गटांगळ्या खातोय. किंवा असं समजा की भ्रष्टाचारामध्ये काँग्रेस वॉलमार्टसारखं एक सुपरमार्केट आहे, तर भाजप किरकोळ वाण्याचं दुकान.

In reply to by श्रीगुरुजी

भ्रष्टाचारामध्ये काँग्रेस वॉलमार्टसारखं एक सुपरमार्केट आहे, तर भाजप किरकोळ वाण्याचं दुकान.
पण शेवटी सगळे एकाच माळेचे मणी की हो गुर्जी.. याचं थोडं कमी, त्याचं थोडं जास्त..

जेव्हा संपूर्ण सरकार भ्रष्टाचार आणि लूटमार करण्यात गर्क असतं आणि नेतृत्व अत्यंत दुर्बल, निष्क्रीय, निर्विकार, हतबल आणि निर्णयक्षमताहीन असतं, तेव्हा शत्रूराष्ट्रे फायदा उठवणारच. १९४८ आणि १९६२ मध्ये अगदी असंच घडलं होतं. या दुर्बल नेतृत्वाचा गैरफायदा घेऊन अजून पुढील १०-११ महिन्यात पाजीस्तान-चीन सारखी शत्रूराष्ट्रे भारताचं अजून किती नुकसान करणार आहेत खुदा जाने!

In reply to by श्रीगुरुजी

>>या दुर्बल नेतृत्वाचा गैरफायदा घेऊन अजून पुढील १०-११ महिन्यात पाजीस्तान-चीन सारखी शत्रूराष्ट्रे भारताचं अजून किती नुकसान करणार आहेत खुदा जाने! ऐला !! १०-११ महिन्यांनी काय होणार आहे? भलतेच आशावादी ब्वॉ तुम्ही.

चीन ने Depsang, Chumar and Pangong Tso. या तीन भागात जवळपास 640 sq kms भाग स्वतःच्या ताब्यात घेतला आहे. I काही दुवे :- China army not letting Indian troops patrol LaC Chinese Army has occupied 640 square km in three Ladakh sectors, says report China 'gobbles’ up 640 sq km of Indian land in Ladakh

In reply to by मदनबाण

चिनी त्यांचा स्वभाव सोडणार नाही आणि भारत आपला.. उद्या सकाळी उठून दारात मटा ऐवजी चायना डेली आणि चितळें ऐवजी सान् लू दिसू नये म्हणजे मिळवली..

आपण भारतीय सध्या कोरोनाने परेशान असतांना चीन्यांनी पुन्हा लडाखकडील काही भागात घुसखोरी केली आहे, असे वाचनात आले नव्या या वादाबद्दल कोणी माहिती देऊन तो सर्व सीमेचा वाद समजावून सांगेल काय ? -दिलीप बिरुटे

"चीनकडून होत असलेल्या घुसखोरीच्या मुद्द्यावर 'शांततापूर्ण' मार्ग काढण्यासाठी विविध पातळ्यांवर 'चर्चा' सुरू आहेत. देशाची एकात्मता आणि सुरक्षा यांचे रक्षण करण्यासाठी सरकार आवश्‍यक ती सर्व पावले उचलत आहे."
दोनहजार तेरामधलेच वाक्य आताही कालपरवा टीव्हीवर ऐकलं. एकदा या चिन्यांचा बंदोबस्त केला पाहिजे, सारखा आपला काही ना काही भाग भुभाग कोरत असतात. -दिलीप बिरुटे