Skip to main content

प्राध्यापकांचा संप मिटणार कधी ?

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी रविवार, 16/08/2009 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
वरिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापकांचा संप सुरु होऊन आज तीस दिवस होत आहेत, [सर्वात मोठा संप चोपन्न दिवसाचा रेकॉर्ड आहे] अजून प्राध्यापकांचा संप मिटण्याची कोणतीच चिन्ह नाहीत. प्राध्यापक संपावर का गेले आहेत ? प्राध्यापक संपावर आहेत कारण महाराष्ट्रातील सर्व शासकीय कर्मचार्‍यांना सहावा वेतन आयोग लागू झाला आहे, त्याची अंमलबजावणी झाली आहे. प्राध्यापकांच्या बाबतीत शासन केवळ आश्वासन देत आहे, कालच्या दैनिकामधून महाराष्ट्र सरकारच्या उच्च तंत्र शिक्षण विभागाने एक जाहीरात दिली असून दि.१२ ऑगष्टला०९ ला प्राध्यापकांना सहावा वेतन आयोग लागू केला असून प्राध्यापकांनी महाविद्यालयात रुजू व्हावे अशी एक जाहिरात दिली. काही खुलासे केले आहेत. सदरील जाहिरातीतील सर्व मुद्दे खोटारडे आहेत. महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर हा चर्चा प्रस्ताव टाकेपर्यंत शासन निर्णय नव्हता, पाहा शासनाच्या संकेतस्थळावरील दुवा. नेट-सेट नसलेल्या प्राध्यापकांची काय भानगड आहे ? युजीसी (विद्यापीठ अनुदान आयोग )ने प्राध्यापकांसाठी नेट-सेट परिक्षा उत्तीर्ण होणे सक्तीची १९९१ केले परंतु मा.सर्वोच्च न्यायालयाने विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नेट-सेटच्या रेग्युलेशनच्या बाबतीत एक महत्वपूर्ण आणि धोरणात्मक निर्णय दि. ०८ /०९/१९९४ दिला. त्यात म्हटले की, परिक्षा सक्तीची करायची किंवा नाही याबाबतचा निर्णय विद्यापीठाने आणि शासनाने घ्यावा तरच तो परिनियम लागू पडेल. तेही पुर्वलक्षी प्रभावाने नव्हे. महाराष्ट्र शासनाने परिक्षा सक्तीची नियमन करायला १९९९ हे वर्ष उजाडले आणि तोपर्यंत सेवेत प्राध्यापकांची भरती होत गेली. प्राध्यापकांची ही नियुक्ती सक्षम निवड समितीने केलेली होती. म्हणजे विद्यापीठाचे प्रतिनिधी, सहसंचालक, विषय तज्ञ इत्यादी. जर ती परिक्षा सक्तीची होती तर नेट-सेट पात्रता नसलेल्या अधिव्याख्यात्यांना सेवेत घ्यायलाच नको होते. आता या सेवेत असलेल्या लोकांना नेट-सेट परिक्षा सक्तीची उत्तीर्ण व्हा चा आग्रह शासन धरत आहे. विद्यापीठांनी आपल्या कायद्यात नेट-सेट सक्तीचे असावे असा कायदा केलेला नसल्यामुळे ती अट सेवेत असलेल्या प्राध्यापकांना लागू होत नाही. तसे असूनही शासनाने त्यांची वरीष्ठ श्रेणी, वाढीवभत्ते, रोखले आहेत. आणि त्यांची सेवा (अ-डॉक) तदर्थ सेवेची ठरवली आहे. सेवेत असलेले प्राध्यापक ज्या दिवशी सेट-नेट किंवा पीएच.डी झालेले असतील त्या दिवसापासून त्यांची वरीष्ठश्रेणी, इतर अनुषांगिक फायद्यासाठी त्यांची नियुक्ती ग्राह्य धरण्यात यावी असे महाराष्ट्र शासन म्हणते, जी युजीसे ने आपल्या मार्गदर्शक तत्वात या नसलेल्या गोष्टी कधीच सांगितल्या नाही. आणि आता शासन म्हणते की, त्या प्राध्यापकांचे प्रश्न युजीसी सोडवावेत. अशी ही शासनाची आडमुठेपणाचे धोरण आहे. सहावा वेतन आयोग लागू करण्याच्या बाबतीतही केंद्रसरकार ८० टक्के रक्कम देते आणि महाराष्ट्र शासनाला २० टक्के रक्कम द्यायची असते पण ती देण्यासाठी संप करावा लागतो हे प्राध्यापकांचे दुर्दैव आहे. अर्थात मायसुद्धा लेकराला रडल्याशिवाय दुध पाजत नाही, हे तर आपले अजब मायबाप सरकार आहे. प्राध्यापकांच्या बाबतीत गलेलठ्ठ पगार मिळवणारे कर्मचारी असे म्हणून पाहतात. वर्गावर न जाणारे प्राध्यापक, केवळ पाच तास महाविद्यालयात थांबणार्‍यांना इतके पगार काय करायचे ? प्राध्यापक विद्यार्थ्यांना शिकवतात काय ? नॉलेज अपडेट आहे का ? वगैरे प्रश्न विचारले जातात. प्राध्यापक मागतात काय आणि देतात काय असा एक सकाळचा लेख वाचण्यासारखा आहे. (दुवा सापडत नाहीहे) विद्यार्थी कॉलेजच्या व्हरंड्यात येतात पण वर्गात येत नाही. त्याची वेगळी कारणं आहेत. कला-वाणिज्य महाविद्यालयातील वर्ग ओस पडत आहेत. त्याला प्राध्यापकच जवाबदार धरल्या जातो. बीए, बीकॉमच्या वर्गाला उपस्थित राहण्यापेक्षा कमाइकडे तरुण वळला आहे. असो, ती वेगळी गोष्ट आहे. अशा आणि अजून काही मागण्यांसाठी (एमफूक्टो)प्राध्यापक महासंघाबरोबर प्राध्यापक संपावर आहेत, योग्य मार्ग निघावा आणि संप लवकर मिटावा या पेक्षा अधिक काय म्हणू शकतो ?

वाचने 23553
प्रतिक्रिया 112

प्रतिक्रिया

In reply to by श्रावण मोडक

सहमत आहे. शिकवणे हा मुद्दा दुय्यम पहिले छन छन... रोकडा फेका.. शार्पच्या नोटसवरुन तुम्हीच शिका

In reply to by श्रावण मोडक

नुसतं आयएसएसएन क्रमांक असलेल्या नियतकालिकात वगैरे चुकीचं झालं असे म्हणायचं होतं. इम्पॅक्ट फॅक्टर म्हणजे ते जर्नल पुढे किती जण वापरत आहेत किंवा कितपत उपयोगी आहे अशा अर्थाचे रेटिंग. विकीच्या म्हणण्यानुसार The impact factor (IF) of an academic journal is a measure reflecting the average number of citations to recent articles published in the journal. It is frequently used as a proxy for the relative importance of a journal within its field, with journals with higher impact factors deemed to be more important than those with lower ones. The impact factor was devised by Eugene Garfield, the founder of the Institute for Scientific Information. Impact factors are calculated yearly for those journals that are indexed in the Journal Citation Reports. जर का ते कोणाला उपयोगी नाही तर कोणी वापरणार नाही अन् शून्य इम्पॅक्ट फॅक्टर असे. http://en.wikipedia.org/wiki/Impact_factor

In reply to by लॉरी टांगटूंगकर

काय सांगताय!
reflecting the average number of citations to recent articles published in the journal
हे रिफ्लेक्शन मोजायचं कसं एवढंच सांगा. मग मी तुम्हाला, कराडच्या नियतकालिकात (हे तेच, वरच्या लेखात असणारे) संगमनेरच्या नियतकालिकाचा संदर्भ देतो, आणि हे दोन्ही संदर्भ एखाद्या शोधनिबंधात देतो, हे कसं जमते ते दाखवतो. मग आपण ते मान्य करायचं?

In reply to by श्रावण मोडक

खरडफळाच करायचाय का? त्यात जगभरात कुठे कसा वापरला गेला त्याचे डिस्ट्रिब्युशन असावे. अशा लोकल लेव्हलच्या जर्नलचा जगभर वापरल्या जाणाऱ्या जर्नलवर परिणाम करता येईल??? अन् तुम्ही दिलेलं उदाहरण पटलंय, असलं काही करायला लागलो तर संपलच. खरं तर यावर मला विचार करता येत नाहीये. अनासपुरेचा पिक्चर आठवायला लागलाय (निशाणी डावा अंगठा) :) .

In reply to by लॉरी टांगटूंगकर

खरडफळाच करायचाय का?
तिथं असं काही चालतं का हे माहिती नाही. त्यामुळं, जी, नाही. 'जगभर' म्हणाल तर अलीकडेच वाचनात आलेला एक लेख आहे. हा लेखक प्राध्यापक नसावा, पण विज्ञानातील आहे, फिजिसिस्ट आहे. यात बरंच काही आलं. जगभरातील ही नियतकालिकंही कशी चालतात हा संशोधनाचा विषय नक्कीच नाही. त्यामुळं अशाही नियतकालिकात 'साईट' झालं म्हणजे संशोधन झालं असं असेल, तर गोष्ट वेगळी. 'जगभरात' याची व्याख्या काय हा प्रश्न अलाहिदा.

In reply to by श्रावण मोडक

वरचा प्रतिसाद टायपून होई पर्यंत ४,५ प्रतिसाद आलेले होते. म्हून खफ करायचा का लिहिलं. दुवा वाचला, सगळी नियतकालिके अशीच आहेत काय ?? अन् रिसर्चलं लागणारा पैसा तर वेगळाच. इथे बऱ्याच ठिकाणी जर्नल्स घेतली जात नाहीत. तिथे संशोधनाला किती पैसा दिला जात असेल देवच जाणे. खाली म्हणल्याप्रमाणे एकूण ठिगळं लावायची तरी किती ?? जो चल रहा है चलने दो...

In reply to by लॉरी टांगटूंगकर

माझ्या माहितीप्रमाणे भारताचा या इम्पॅक्ट फॅक्टरनुसार केलेल्या यादीत अतिशय खालचा क्रमांक आहे. रिसर्च पेपरच्या फॅक्टर्‍या असल्याप्रमाणे ते प्रकाशित होतात.त्यांची खरी किंमत? शून्य.. आणि हे असे भरमसाठ पेपर प्रकाशित न करणारे लोक वेडे ठरतात आपल्याकडे संशोधन किंवा शिक्षणक्षेत्रात. विद्यार्थ्यांनाही असेच पेपर करण्यासाठी उत्तेजन दिलं जातं. नावावर पेपर आला म्हणजे झालं, ही मनोवृत्ती अगदी अपवाद सोडले तर सगळ्यांचीच आहे. हे अपवाद तरी करुन करुन काय करणार? प्रवाहाच्या फार विरुद्ध जाता येत नाही त्यांनाही. एकूण ठिगळं लावायची तरी किती ठिकाणी आणि कशी हा मोठाच प्रश्न आहे.

सदर बातमी वाचून दोन विचार मनात आले. च्यायला आमच्यावेळी असे नव्हते च्यायला आमच्यावेळी असे का नव्हते.

आता सरकार ने फक्त परिक्षा घेणे आणि निकाल लावणे इतकेच काम करावे. ज्या विद्यार्थ्यांना शिकायचे आहे, ते शिकतील खाजगी शिकवणी लावुन. ९०% प्राध्यापकांची लायकी शाळेची घंटा वाजवणार्‍य शिपायाची सुद्धा नाहिये. उरलेले १०% क्लासेस चालवून शिकवतील ज्यांना शिकायचे आहे त्यांना.

In reply to by प्रसाद१९७१

कृपया शाळेतील शिपायाचा प्राध्यापकांशी तुलना करुन अपमान करु नका. शिपाई कष्ट करुन कमावत असतो.

In reply to by नाना चेंगट

माझी चुक मान्य. शिपायांच्या भावना दुखावल्या गेल्या असतील प्राध्यापकांशी तुलना करुन त्याबद्दल क्षमस्व.

परशुरामा, वाचतोय ना प्रतिसाद. सहाव्या वेतन आयोगाच्या फरकाची रक्कम नको, नेट-सेटचे लाभ नको, संप तर नकोच नको, पण मिपावरचे प्रतिसाद तेवढे आवर रे बाबा......!!!! :) अवांतर : आमचा मित्र मिभो उर्फ सर्किट याची धाग्याची निमित्तानं लै आठवण येतेय. -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हा हा हा दमलात एवढ्यात ! चक चक चक !

माझ्यामते १) त्याना कमीतकमी २ लाख प्रतिमहिना एवढा पगार करावा. २)त्याना सर्वात उत्कृष्ट व महागडी सेडाना कार ड्रायव्हर सह सरकारने पुरवावी.(गाडी पुसण्याचा व चालवण्याचा त्याचा वेळ व पैसा वाचेल व एकाद्या होतकरु विद्यार्थ्याला नोकरी देखिल मिळेल.) ३) त्याना ३ किंवा ४ बीएचके बंगला अथवा सदनिका द्यावी. त्यात करकामासाठी एक घरगडी व स्वंयपाकासाठी एक बाई असावी.(आजकाल सर्व प्राध्यापकाच्या बायका बीएड करत असतात त्यामुळे सरांना वेळेत बर्‍याच गोष्टी मिळत नाहीत) ४)सेट नेट किंवा पीएचडी ह्या गोष्टींची सक्ती त्याच्यावर करु नये.(एकाच विषयावर १०० जणानी पीएचडीचा एकसारखा शोधनिबंध लिहण्याचा त्रास तरी वाचेल.) ५)प्राध्यापकाना दररोज ३च लेक्चर असावीत. (निदान त्याना तरी कळेल आपण आज काय शिकवले.) ६)कॉलेजात त्याना स्टाफरुम मध्ये इंटरनेट सुविधा,फुकट प्रिंटाउट मिळाव्यात.(म्हणजे एमएलएम कंपण्याचे लॉगैन व प्रिंट त्याना वेळेत कॉलेजातच मिळत जातील.तसेच नवीन कोणत्या एमएलएम कंपण्याचालु झाल्या आहेत त्याची माहिती त्याना नोटिसबोर्डावर उपलब्द करुन दिली जावी) ७)एल आयसी किंवा इतर विमा कंपन्यानी सर्व प्राध्यापकाना आपले एजंट म्हणुन नोंदणी करुन घ्यावे.म्हणजे त्याना कमी पडणारा पैसा त्यातुन ते मिळवु शकतील. अजुन बरेच काही सांगता येईल. पण सरकारने निदान वरील ७ मागण्या तात्काळ मंजुर करुन घ्याव्यात.

एल आयसी किंवा इतर विमा कंपन्यानी सर्व प्राध्यापकाना आपले एजंट म्हणुन नोंदणी करुन घ्यावे.म्हणजे त्याना कमी पडणारा पैसा त्यातुन ते मिळवु शकतील.
आणि सर्व विद्यार्थ्यांनी कमीत कमी एक कोटीची पॉलिसी घेतलीच पाहिजे ह्या प्राध्यापकांकडुन. १ दिवसाला ३ तास घेणे फार होते. एक लेक्चर पुरे. २. Staff room AC असावी. त्यात प्रत्येक प्राध्यापकांसाठी बेड असावेत. ३. Staff room मधे १०० इन्ची LED TV असावा. ४. income tax नसावा अजुन बर्‍याच काही मागण्या आहेत.

खरय आज कुणीही उठाव आणी प्राध्यापकांना झोड्पावं अशी स्थिती दिसते,प्राध्यापकांमधे काही लोक म्हणतात तसे काही लोक असतीलही पण सगळ्यांना एकाच तराजुने तोलण कस शक्य आहे,आज कुठल अस क्षेत्र आहे की ज्यात सगळे एक सारखेच लोक आहेत. प्राध्यापकांचा पगार सर्व समाजाच्या डोळ्यात खुपतोय अस दिसत्,फक्त पाच तास काम करुन एव्हढा पगार हेच वरकरणी दिसतय पण ते पाच तास शिकवण्यासाठी किती तास आधी तयारी करावी लागते याचा विचार कोणी करताना दिसत नाही. प्राध्यापकांच्या बहिष्कारा बद्दल बोललं जातय पण पण ही वेळ त्यांच्यावर कोणी आणली याचा विचार होताना दिसत नाही,मित्रहो प्राध्यापकांनाही त्यांच्या न्याय्य मागण्यासाठी भांडण्याचा हक्क आहेत हे आपण विसरता. बाकी चर्चेच्या हीन पातळी बद्द्ल काही न लिहणंच बर,,,,,

In reply to by प्राध्यापक

>>> बाकी चर्चेच्या हीन पातळी बद्द्ल काही न लिहणंच बर,,,,, चालायचंच सर....!!! :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्राध्यापक

आपल्याला घडवण्यात शाळेपासून महाविद्यालयापर्यंतच्या शिक्षकांचा / प्राध्यापकांचा पुरेपूर वाटा आहे. प्रत्येकच क्षेत्रात चांगल्याबरोबर वाईटही असणारच. संपूर्ण प्राध्यापकवर्गावर इतकी टोकाची टिका करण्यापेक्षा शिक्षणक्षेत्रात सुधारणा होण्यासाठी स्वतःला काय करता येईल हे पहावे. काहीच नाही तर आपल्या कार्यक्षेत्राशी संबंधीत अभ्यासक्रम शिकवला जातो तिथे जाऊन विद्यांर्थ्यांना गेस्ट लेक्चर्स वगैरे द्यावीत. म्हणजे पुस्तकी ज्ञानाचा प्रत्यक्ष उपयोग कसा करता येतो हे विद्यार्थ्यांना योग्य वेळी कळेल. मी हे करून पाहिले आहे व त्यासाठी प्राध्यापक व विद्यार्थी या दोन्हींचेही पूर्ण सहकार्य मिळाले.

In reply to by श्रीरंग_जोशी

प्रचंड असहमत. मी जेव्हडे काही शिकलो आहे आणि नोकरी करुन पोटापाण्याची सोय करत आहे त्यात महाविद्यालयापर्यंतच्या प्राध्यापकांचा थोडा सुद्धा वाटा नाही. माझी प्राध्यापकांबद्दल ची मते माझ्या अनुभवातुन बनली आहेत. समाजावरची बांडगुळे आहेत.

In reply to by प्रसाद१९७१

वाटा नाही कसा? आहेच. सकर्मक नसेल, अकर्मक आहेच. काय करायचे हे त्यानी सांगितले नसेल, पण काय करू नये हे वागण्या-बोलण्यातून नक्कीच शिकवले असेल. तो वाटाच आहे.

In reply to by प्राध्यापक

>>>खरय आज कुणीही उठाव आणी प्राध्यापकांना झोड्पावं अशी स्थिती दिसते,प्राध्यापकांमधे काही लोक म्हणतात तसे काही लोक असतीलही पण सगळ्यांना एकाच तराजुने तोलण कस शक्य आहे,आज कुठल अस क्षेत्र आहे की ज्यात सगळे एक सारखेच लोक आहेत. तेच तर आम्ही म्हणतोय. पण प्राध्यापक आम्ही नाही तसले असा आव आणतात तो चुकीचा आहे एवढेच >>प्राध्यापकांचा पगार सर्व समाजाच्या डोळ्यात खुपतोय अस दिसत्,फक्त पाच तास काम करुन एव्हढा पगार हेच वरकरणी दिसतय पण ते पाच तास शिकवण्यासाठी किती तास आधी तयारी करावी लागते याचा विचार कोणी करताना दिसत नाही. हा हा हा असे किती तयारी करुन तासिका घेणारे आहेत प्राध्यापक? एकदा त्यांच्या चरणाचे तीर्थ प्राशन करावे म्हणतो. असतील म्हणा नाही असे नाही पण गेल्या चाळीस वर्षांत एक माईचा लाल असा तयारीने आलेला दिसला नाही. सगळे आपले आपल्या बॅ़क बॅलन्सच्या फिकीरीत.. असो ! आमचे नशीब आम्हाला चांगले प्राध्यापक दिसलेच नाहीत. >>प्राध्यापकांच्या बहिष्कारा बद्दल बोललं जातय पण पण ही वेळ त्यांच्यावर कोणी आणली याचा विचार होताना दिसत नाही,मित्रहो प्राध्यापकांनाही त्यांच्या न्याय्य मागण्यासाठी भांडण्याचा हक्क आहेत हे आपण विसरता. भांडावे की जरुर भांडावे... ! पण न्याय्य मागण्यांसाठी भांडतांना आपले कर्तव्य विसरु नये. असो. विषय मोठा आहे. >>>बाकी चर्चेच्या हीन पातळी बद्द्ल काही न लिहणंच बर,,,,, सहमत आहे. मिपावर यापेक्षाही हीन पातळीवर चर्चा झाली आहे. त्यावेळेस आपण काही बोललेले दिसले नाही. तुम्हाला दुजोरा देणारे तर आनंदाने टाळ्या वाजवून सामिल झालेले आम्ही पाहिले आहे. मिपा हे समाजाचे प्रतिबिंब आहे. आज समाजात प्राध्यापक हा हेटाळणीचा आणि कुचेष्टेचा विषय होत चालला आहे हे नक्की. मिपावर त्याचे प्रतिबिंब उतरणारच. प्राध्यापकांना फक्त आरत्याच ओवाळून घ्यायच्या असतील तर इतर हुच्चभ्रु संकेत स्थळे आहेत किंवा कुठल्यातरी खेड्यातून प्रसिद्ध होणारी आंतरराष्ट्रीय दर्जाची (!) जर्नल्स आणि शेमिनार्स आहेत. जै हो !! >>विद्याविनयेन शोभते सहमत आहे. आमच्यापाशी ना विद्या ना विनय त्यामूळे शोभण्याचा प्रश्नच नाही. जातीचे नंगट ! पटल त्याला उचलून धरणार नाही पटल त्याला शिव्या देणार ! हाकानाका.

In reply to by प्राध्यापक

फक्त पाच तास काम करुन एव्हढा पगार हेच वरकरणी दिसतय पण ते पाच तास शिकवण्यासाठी किती तास आधी तयारी करावी लागते याचा विचार कोणी करताना दिसत नाही.
अभ्यासक्रम बदलला तरीही वर्षानुवर्ष त्याच पुटं चढलेल्या, पिवळ्या झालेल्या वह्यातलं शिकवायचं, एक-दोनच विषय घेउन दशकानुदशकं शिकवायचं, क्वालेजच्या ट्रस्टीज समोर हांजी हांजी करायची वगैरे हे विसरलात. आमच्यावेळी बहुतांश क्वालेज मध्ये इंटर्नल मार्क्स प्राध्यापक मंडळींच्या हातात नसते तर वर्गात काळं कुत्रं फिरकलं नसतं अशी परिस्थिती होती (आताचं माहीत नाही ;) ) आया(याया)यटीज/रिजनल वगैरे क्वालेजेसचं माहीत नाही पण मागच्या तीन-चार दशकांपासून कुत्र्याच्या छत्र्यांसारख्या उगवलेल्या अभियांत्रिकी क्वालेजेसचं सांगतो. ज्यांना कंपन्यात कुठेच चांगली नोकरी मिळत नाही ती लोकं कंटाळून प्राध्यापकी करतात असा माझा समज माझ्या ब्याच मेटस नी पक्का केला आहे. :)

In reply to by दादा कोंडके

>>आया(याया)यटीज/रिजनल वगैरे क्वालेजेसचं माहीत नाही यांच्याबद्दल सर्वसामान्य माणसांनी मतप्रदर्शन करायला बंदी आहे.

In reply to by दादा कोंडके

क्वालेजच्या ट्रस्टीज समोर हांजी हांजी करायची वगैरे हे विसरलात. आमच्यावेळी बहुतांश क्वालेज मध्ये इंटर्नल मार्क्स प्राध्यापक मंडळींच्या हातात नसते तर वर्गात काळं कुत्रं फिरकलं नसतं अशी परिस्थिती होती (आताचं माहीत नाही )
हॅ हॅ हॅ..आज काल तर कॉलेजच्या ट्रस्टीज चे वाढदिवस सुद्धा प्राध्यापक मंडळीं कॉलेज समोर बॅनर वैग्रे लावून, फटाके फोडून साजरे करतात. बाकी, अजून पर्यंत जरी इंटर्नल मार्क्स प्राध्यापक मंडळींच्या हातात असले तरी वर्गात उपस्थिती मात्र प्रचंड रोडावली आहे एव्हढाचं काय तो फरक. त्याचे कारण तुम्हाला मी सांगायला नकोचं ;)
ज्यांना कंपन्यात कुठेच चांगली नोकरी मिळत नाही ती लोकं कंटाळून प्राध्यापकी करतात असा माझा समज माझ्या ब्याच मेटस नी पक्का केला आहे.
सेम हियर. :)

In reply to by प्राध्यापक

पाच तास शिकवण्यासाठी किती तास आधी तयारी करावी लागते याचा विचार कोणी करताना दिसत नाही.
वर्षानुवर्ष तेच ते शिकवूनहि जर रोज शिकवण्यासाठी आधी तयारी करावी लागत असेल तर अवघड ए ब्वॉ. प्राध्यापकांच आणि इद्यार्थ्यांच बी.

प्राध्यापक हो तुमच्यावर इतका अन्याय खरोखरच होत असेल तर तुम्ही दुसरी नोकरी का शोधत नाही. तुमच्या मागण्या मागण्याचा जसा तुम्हाला हक्क आहे,तसा शिक्षण घेण्याचा विध्यार्थ्यांना देखिल हक्क आहे.दुसर्‍याचा हक्क पायदळी तुडवताना व वर चर्चा चालु आहे तिला हिन चर्चा म्हणता,शिक्षण क्षेत्रात तुम्हाला पगार मिळत नसल्यास इतर क्षेत्रात तुम्ही जाउ शकता. इतक्या विद्यार्थ्याच्या आयुष्याशी खेळण्याचा हक्क कोणी तुम्हास दिला आहे. विद्याविनयेन शोभते...तुमच्या सारख्या लक्ष्मी भक्ताना तर नाहीच नाही. एक विद्यार्थी.

In reply to by वेताळ

तुम्ही दुसरी नोकरी का शोधत नाही.
प्रचंड सहमत.

अभाविप.ने मुंबई उच्च न्यायालयात प्राध्यापकांच्या परिक्षेच्या कामकाजावरील बहिष्काराच्या बाबतीत जनहितयाचिका टाकली असून ती याचिका उच्च न्यायालयाने स्वीकारुन महाराष्ट्र सरकार, युजीसी आणि एमफुक्टो (प्राध्यापक संघटना) यांना प्रतिवादी केलं आहे. त्याबाबतची सुनावनी १६ एप्रिलला होणार आहे. मा.शरद पवार आणि मुख्यमंत्री महाराष्ट्र सरकार यांची याबाबतची काल होणारी बैठक काही झाली नाही. बघु या काय तोडगा निघतो ते....! -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

उच्च न्यायालयाने प्राध्यापकांना फटकारू नये तसेच त्यांचे वाभाडे काढू नये अशी सदिच्छा व्यक्त करतो. :)

मला वाटते आता कुठला संप चालू नाही... पण मग हा धागा कधी मिटणार? :)

In reply to by विकास

संप चालू नसला तरी प्राध्यापकांचा बहिष्कार चालू आहे. त्यांच्या रास्त मागण्या पूर्ण झाल्या की आपण हा धागा मिटवू या ! तोवर प्राध्यापकांना नैतिक पाठिंबा देणे आपले कर्तव्य आहे. कोण म्हणतो देणार नाही ! घेतल्याशिवाय सोडणार नाही ! प्राध्यापकांचा विजय असो ! समस्त प्राध्यापकांनो एक व्हा !

प्राध्यापकांच्या बहिष्काराच्या संदर्भात, प्राध्यापकांनी विद्यापीठाच्या परीक्षा कामावर बहिष्कार टाकला त्या कारणांची गंभीर नोंद घेण्यास हायकोर्टाने स्पष्ट नकार दिला. ''नेट-सेट पात्रता नसलेल्या प्राध्यापकांना विद्यापीठांनी मान्यता दिल्याच्या तारखेपासून सेवागृहित धरून वेतननिश्चिती व स्थाननिश्चिती देण्यात यावी , या विद्यापीठ अनुदान आयोगाने दिलेल्या निर्णयाची राज्य सरकारने चार महिन्यात कारवाई करून अंमलबजावणी करावी , असा आदेश मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. त्यामुळे ज्या मूळ कारणांसाठी प्राध्यापकांनी विद्यापीठाच्या परीक्षा कामावर बहिष्कार टाकला त्या कारणांची गंभीर नोंद घेण्यास हायकोर्टाने स्पष्ट नकार दिला. तसेच सरकारला निर्णय घेण्यासाठी पुरेसा कालावधी दिला आहे.'' मटा. -दिलीप बिरुटे (हायकोडताच्या निर्णयाने आनंदित झालेला)

In reply to by रुमानी

नै वो. अजून पगार कै वाढले नाही. प्राध्यापकांचा बहिष्कार पगारासाठी नाही. सहाव्या वेतन आयोगाची जी फरकाची रक्कम आहे, त्यासाठी हा बहिष्कार आहे. सर्वांनी मीठ मोहर्‍यांनी नजर काढली होती, तुम्हीच राहील्या होत्या. धन्यवाद. ;) -दिलीप बिरुटे

प्राध्यापकांनी म्हणे गुढी न उतरविण्याचा संकल्प केला होता,पण सहचरणीचे रुप पाहुन उतरविली गुढी