Skip to main content

दादांना झालय तरी काय???

लेखक वेताळ यांनी रविवार, 07/04/2013 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी कॉग्रेसचे नेते श्री. अजितराव(दादा) पवार ह्यांनी आज सकाळी इंदापुर येथिल निबोंडी गावी झालेल्या सभेत एकदम वन्टास फुल्टु झालेल्या माणसासारखे भाषण केले. महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळाची त्यानी खिल्ली उडवली. त्यानी लाईट येत नसलेमुळे लोक मनोरंजन म्हणुन पोर जन्माला घालतात हाही शोध मांडला आहे. ह्या बाबत सविस्तर वृत मटा मध्ये आले आहे http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/19425252.cms अजितदादाना मुख्यमंत्री व्हायचे आहे,तिकडे युवराजाना पंतप्रधान व्हायचे आहे. पण दोघेही आड ना बुड पध्दतीने भाषणे ठोकत आहेत्.आता ह्या दोघाचे करायचे तरी काय? इतक्या गलिच्छ भाषेत भाषण करणारयाना राज ठाकरे किंबा बाळासाहेबाच्या भाषणावर टिका करण्याचा हक्क आहे काय? जाणत्या राज्यानी गावातल्या पोराटोराना सल्ला देण्यापेक्षा आपल्या घरीच संस्कार वर्ग सुरु करावेत काय? मिपाकराना काय वाटते?

वाचने 31992
प्रतिक्रिया 124

प्रतिक्रिया

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्र्यानेच महाराष्ट्राची लाज घालवली. धाडसी आणि कृतीशील वाटणार्‍या नेत्याचे अत्यंत अश्लाघ्य वर्तन.

In reply to by प्रभाकर पेठकर

धाडसी आणि कृतीशील वाटणार्‍या नेत्याचे..
हा नेता वृद्ध मुरलेल्या राजकारण्यासारखा एकेक शब्द मोजून मापून बोलत नाही, फाटक्या तोंडाचा आहे, गुंड प्रवृत्तीचा आहे पण तो धाडसी आणि कृतीशील आहे अशी प्रतिमा 'सकाळ' ला हाताशी धरून केलेली आहे. फेकलेला राजिनामा शेपुट घालून मागं घेउन रुजू झालेल्या दुसर्‍याच दिवशी 'दादांनी चालवला पुन्हा कामाचा धडाका' या आशयाची सकाळला बातमी होती. मुळात तशी वैचारिक बैठकच नसली तर ही प्रतिमा म्हणजे सरड्याचे रंग असतात. मा. शरदच्चंद्र पवरांना थप्पड मारल्याची बातमी सांगितल्यावर जेष्ठ गांधीवादी अण्णा हजारे 'बस, एक ही मारा?' असं म्हणाले होते याची आठवण झाली. :)

राष्ट्रीय लेव्हल ला जसे काँग्रेस ला वाटते की आपण काहीही केले तरी ही जनता आपल्यालाच निवडुण देते, तशीच महाराष्ट्रात पवारांची अशीच धारणा असावी, आपले कोणीच काही वाकडे नाही करु शकत ह्या भ्रमात ते असावेत. मोठे पवार आता स्पष्टीकरण देतील की अजीतच्या विधानाचा मिडीयाने विपर्यास केला.

In reply to by श्री गावसेना प्रमुख

चॅनेल्सवरुनही दाखवले हे वक्तव्य, तेह्वा तसे म्हणू शकतीलच असे नाही. कदाचित काकांना हे वक्तव्य १० लोकांनी पाहिले तर परस्पर मार्ग मोकळा झाल्याचेही वाटू शकते ना? कल्पवृक्ष लावण्यासाठी तितकेच सोपे!

In reply to by श्री गावसेना प्रमुख

>>> राष्ट्रीय लेव्हल ला जसे काँग्रेस ला वाटते की आपण काहीही केले तरी ही जनता आपल्यालाच निवडुण देते, तशीच महाराष्ट्रात पवारांची अशीच धारणा असावी, आपले कोणीच काही वाकडे नाही करु शकत ह्या भ्रमात ते असावेत. मग त्यात चुकीचं काय आहे? महाराष्ट्राची व देशाची ६५ वर्षांत पूर्ण वाट लावूनसुद्धा हे परत निवडून येतातच ना! आज अजित पवार जे काही बरळले त्यामुळे बारामतीतून त्यांचं १ मत तरी कमी होणार आहे का? असंख्य चुका करूनसुद्धा यांना जनतेने वारंवार मते दिल्यामुळे हे उन्मत्त झाले आहेत. हे उन्मत्त व्हायला यांना उन्मत्त व्हायची वारंवार संधी देणारी जनताच जास्त जबाबदार आहे. Afterall people deserve their rulers! जनतेला त्यांच्या लायकीचेच सत्ताधारी मिळतात असे एक सुप्रसिद्ध वचन आहे.

In reply to by श्री गावसेना प्रमुख

>>> राष्ट्रीय लेव्हल ला जसे काँग्रेस ला वाटते की आपण काहीही केले तरी ही जनता आपल्यालाच निवडुण देते, तशीच महाराष्ट्रात पवारांची अशीच धारणा असावी, आपले कोणीच काही वाकडे नाही करु शकत ह्या भ्रमात ते असावेत. मग त्यात चुकीचं काय आहे? महाराष्ट्राची व देशाची ६५ वर्षांत पूर्ण वाट लावूनसुद्धा हे परत निवडून येतातच ना! आज अजित पवार जे काही बरळले त्यामुळे बारामतीतून त्यांचं १ मत तरी कमी होणार आहे का? असंख्य चुका करूनसुद्धा यांना जनतेने वारंवार मते दिल्यामुळे हे उन्मत्त झाले आहेत. हे उन्मत्त व्हायला यांना उन्मत्त व्हायची वारंवार संधी देणारी जनताच जास्त जबाबदार आहे. Afterall people deserve their rulers! जनतेला त्यांच्या लायकीचेच सत्ताधारी मिळतात असे एक सुप्रसिद्ध वचन आहे.

In reply to by श्रीगुरुजी

एकदा टग्या हे टेग लागल्यावर आता अजून काय तुम्हाला अपेक्षित आहे. ही ग्रामीण भागातील जनता एरवी वर्षभर साप दिसला की त्याला ठेसून मारतील मात्र नागपंचमीला त्याची पूजा करतील ह्या अत्र्यांच्या विधानांची आठवण झाली.

In reply to by श्री गावसेना प्रमुख

अहो प्रमुख ज्यांच्या विशेषनावरून तुम्ही हे नाव घेतले आआहे त्यांच्या शिवराल भाषनाबद्दल काही बोला की. का ते पण सनातन हिंदू धर्माचा पुरस्कार करायचे म्हणून सगळे माफ होते त्याना.

In reply to by पिंपातला उंदीर

हे आले स्युडोसेक्युलर. मुद्दा काय, बोलताय काय, नक्की काय चाल्लंय? पण असोच. झोपेचे सोंग घेतल्या गेले के असेच होते. सो चालूद्या.

आदा मदा कोणकोण दादा दादा बोलला जसा घोडा ****

In reply to by चेतनकुलकर्णी_85

मिसळपाववरील कार्यकारी मंडळ कुठल्याही राजकीय पक्षांचे पुरस्कारकर्ते नाहीत. सद्य परिस्थितीत राज्यकर्त्यांनी जरी मर्यादा सोडल्या असल्या तरी या संस्थळावर वावरताना सदस्यांनी आपले भान सुटणार नाही याची काळजी घ्यावी. - धन्यवाद संपादक मंडळ.

१.
'पाणीच नाही तर काय सोडणार?... मुतता का आता तिथे?...' अशी अर्वाच्य भाषा वापरून दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळणा-या अजित पवारांना सगळ्यांनी मिळून शिवाम्बू पाजायला हवी, अशी सणसणीत चपराक शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लगावली आहे. मुख्यमंत्री आणि शरद पवारांना थोडी जरी लाज-शरम असेल तर त्यांनी अजितदादांना मंत्रिमंडळातून लाथ मारून हाकलून द्यावं, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
२.
'पाणीच नाही तर काय सोडणार?... मुतता का आता तिथे?...' अशी अर्वाच्य भाषा वापरून दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळणा-या अजित पवार यांना राज यांनी आज खास ठाकरे शैलीत उत्तर दिले. आगामी निवडणुकीत मतदार अजित पवारांना ' मत ' नव्हे तर ' मूत ' देतील. त्यात ते वाहून जातील. त्यावेळी तुम्हाला अडवायला ना कसले बंधारे असतील ना धरणं... या शब्दात राज यांनी अजित पवारांच्या वादग्रस्त वाक्याचा समाचार घेतला.
लोल. :)) :)) सौजन्यः मटा

In reply to by दादा कोंडके

आणि थोडं राज्याच्या राजकारणात खूटं झालं की लगेच बातमी देणार्‍या सकाळ मध्ये अजून तरी ही बातमीच दिसत नाहिये.

In reply to by दादा कोंडके

स्पष्ट जाहीर असं मुखपत्र आहे ते.. दादांना दोन तीन वर्षात अचानक पुढे आणून त्यांचा तडफदार नेते म्हणून उदो उदो करण्यात किंवा वर लिहिलंय तशी प्रतिमा निर्माण करण्यात सकाळचा खूप मोठा हात आहे. नुकत्याच झालेल्या राजीनामा नाट्यात सकाळचे मथळे पण नाट्यपूर्ण असायचं.. दादांच्या राजीनाम्याने सरकार हादरले.. वगैरे.. याची स्पष्ट बातमी कधीही येणार नाही.. वादळ शमलं की सकाळ न्यूज नेटवर्क या नावाखाली वाटेल ती वैयक्तिक मतं बातमी म्हणून छापतील..

In reply to by मैत्र

>>> सकाळमध्ये बातमी आहे आणि पहिल्या पानावर आहे इतर सर्व पक्षांप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही नेतृत्वासाठी स्पर्धा आहे. सुप्रिया व अजित या दोघांपैकी एकजण शरद पवारांनंतर राष्ट्रवादीचा सर्वेसर्वा होणार हे नक्की. "सकाळ" गेल्या काही महिन्यांपासून सुप्रियाला प्रमोट करत आहे. सुप्रियाचे 'स्त्रीभॄणहत्या वाचवा' आंदोलन व 'महिला सबलीकरण' मेळावे गेले अनेक दिवस "सकाळ"चे पहिले पान व्यापून आहेत. आज अजित पवारांचे बेताल वक्तव्य "सकाळ"च्या पहिल्या पानावर मोठी बातमी देऊन छापले गेले याचे अजिबात आश्चर्य वाटले नाही.

In reply to by दादा कोंडके

अर्वाच्य भाषेत दुष्काळग्रस्तांच्या जखमेवर मीठ चोळलं म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवारांचा धिक्कार करणा-या मनसे आणि शिवसेनेनंही आपल्या आंदोलनादरम्यान सभ्यतेच्या मर्यादा ओलांडल्याचं दुर्दैवी चित्र पाहायला मिळालं. दादरमध्ये मनसैनिकांनी एका शाळकरी मुलाला अजितदादांच्या फोटोवर लघुशंका करायला लावली, तर औरंगाबादमध्ये शिवसैनिकांनी त्यांच्या प्रतिमेला मूत्र पाजलं. त्यांनी केलेला हा प्रकार अजितदादांच्या उद्गारांइतकाच ओंगळवाणा आहे.
सौजन्यः मटा

नेत्यांचे असल्या शिवराळ भाषेतले वक्तव्य वाचून फार वैषम्य वाटले. सततच्या दुष्काळावर मानवी प्रयत्न करायचे सोडून भ्रष्ट मार्गातून पाण्यासारखा पैसा इतके वर्ष सतत वाहत असतांना त्यावर ठोस उपाययोजना करायचे सोडून कमरेचे सोडून केवळ वाचा(ळ)विर होणारे आपले नेते पाहून पुरोगामी विचारसरणीच्या महाराष्ट्रात आपण राहत आहोत काय हा प्रश्न कुणाही सुजाण नागरीकाला पडेल. भिक नको पण कुत्रे आवर ही म्हण दुष्काळावर उपाययोजना नको पण भाषणबाजी आवर अशी हवी.

आगामी निवडणुकीत मतदार अजित पवारांना ' मत ' नव्हे तर ' मूत ' देतील. त्यात ते वाहून जातील. आ.अत्रेंच्या नंतर असे थेट बोलणारा वक्ता/ नेता म्हणून राज चे कौतुक.

In reply to by तर्री

सहमत आहे. बाकी ठाकरी शैलीला नाके मुरडणार्‍या विचारवंतांना अजित पवारांच्या मुतारीचा वास येऊन उर्ध्व लागला आणि काही बोलण्याच्या मनस्थितीत उरले नाही असे आमचा वार्ताहर कळवतो.

In reply to by नाना चेंगट

बाकी ठाकरी शैलीला नाके मुरडणार्‍या विचारवंतांना अजित पवारांच्या मुतारीचा वास येऊन उर्ध्व लागला आणि काही बोलण्याच्या मनस्थितीत उरले नाही असे आमचा वार्ताहर कळवतो.
कोण बरे असे हे विचारवंत? माझ्या पहाण्यात तरी अजित पवारांच्या विधानाचा सगळ्यांनीच निषेध केलेला दिसला.

चालायचंच! ज्या ठाकरी शैलीला नावं ठेवली जायची/जातात त्या शैलीचे अफाट चाहते आहेत, त्यांच्याकडून मिळणारा टाळ्यांचा कडकडाट, हशा, शिट्या ह्यांची कुणाला कधी भुरळ पडली नाही तरच नवल. 'सेकंड इन कमांड' ह्यांनाही कदाचित प्रयोग करुन पहावासा वाटला असेल! आमच्या सत्तावीस गुरुंपैकी एक - दादा कोंडके ह्यांनी कोल्लापूरात शिवसेनेच्या प्रचाराच्या वेळी केलेलं भाषण ज्यांनी ऐकलं असेल त्यांना ह्या निंबोडीच्या भाषणात काही गैर वाटणार नाही. बाकी, सभेच्या मंचावरुन अशा पध्दतीनं बोलणं हे नैतिकदृष्ट्या चूक की बरोबर हे ठरवण्याची पात्रता अन अक्कल माझ्यात मुळीच नाही. पण एक गोष्ट मात्र आवर्जुन जाणवतेय, आजकाल आपण अकारणच अतिसंवेदनशील झालो आहोतसं वाटतंय. अगदी आपल्या घरातल्या आजी-पणजींच्या तोंडी असलेल्या शिवराळ म्हणीदेखील काही कमी ठसक्याच्या अन झणझणीत नसायच्या. पण आजकाल आपल्या भावना फार लवकर दुखावू लागल्या आहेत असं मला वाटतं. शुचिता अन सभ्य-असभ्यतेच्या अतिरेकातून अशा प्रकारच्या प्रतिक्रिया (अगदी वृत्तपत्रांतूनदेखील) उमटताहेत असं माझं वैयक्तिक मत आहे. हां, कोणावर भाषणातून शिवराळपणा, अश्लिलपणा,'बिलो द बेल्ट' वार करणं ह्याबद्दल ऊठसूठ तोंडसुख घेणं, अन आपल्या भाषणातही तेच करणं ह्या दुटप्पीपणाबद्दल मात्र आपेक्ष जरुर आहे. (स्वगतः घे भाड्या आक्षेप! कोण हिंग लाऊन विचारतोय तुझ्या आक्षेपाला? ) असो! बदलत्या काळानुरुप लज्जारक्षणाची वस्त्रं तोकडी होत अंगं उघडी पडत चालली असताना, भाषेला मात्र व्हिक्टोरियन काळातल्यासारखं सभ्यतेच्या कॉर्सेटमध्ये आवळणं मज मूढाच्या अल्पमतीपल्याडचं आहे. :) मरुद्या तिच्यायला! ते बोलणार, मिड्या त्याचं भांडवल करणार, ते सावरुन घेणार, विरोधक त्याचंही भांडवल करणार.... आपण मात्र आहोत तिथंच. आपल्या छटाकभराच्या अडचणी काय कमी आहेत आपल्याला? म्हणतात ना, मुंगीला 'मूताचा' पूर! तीच गत आपली. ह्या मोठ्या माशांच्या खेळ्या आपल्याला काय कळाव्यात? -(शिवराळ) धम्या.

In reply to by धमाल मुलगा

त्यांच्या वक्तव्यातला पहिला भाग, 'तो एकतर देशमुख का कुणतरी आझाद मैदानावर उपोषणाला बसलाय...' यातलाच जो बेदकारपणा, असंवेदनशीलता आणि माज दिसतो त्याचीच पहिल्यांदा किळस आली. आणि आज्यांनी माजघरात किंवा चार गावठी मित्रांचं पानटपरीवर बोलणं आणि उपमुख्यमंत्राचं जाहीर भाषण यात काही फरक आहे की नाही? परिथितीचं गांभिर्य आणि दुष्काळ, भारनियमन वगैरेची संवेदनशीलता बाजूला ठेउ. या निमित्ताने सगळ्यांनीच तोंडाच्या गटारी उघडल्यात.

In reply to by दादा कोंडके

त्यांच्या वक्तव्यातला पहिला भाग, 'तो एकतर देशमुख का कुणतरी आझाद मैदानावर उपोषणाला बसलाय...' यातलाच जो बेदकारपणा, असंवेदनशीलता आणि माज दिसतो त्याचीच पहिल्यांदा किळस आली.
अर्थातच बिनशर्त सहमती! पण मला एक सांगा, बेदरकारपणा, माज, असंवेदनशीलता(! सदरहू प्रभृतीसंदर्भात हा शब्द वापरतानाही अंमळ हात कापले हों!) हे काय नविन आहे का? आज कित्येक वर्षं हे असंच चालू आहे. त्याला आज तथाकथीत अश्लिलतेची फोडणी मिळाली म्हणून कदाचित आज ते ऊठून दिसतंय.
आणि आज्यांनी माजघरात किंवा चार गावठी मित्रांचं पानटपरीवर बोलणं आणि उपमुख्यमंत्राचं जाहीर भाषण यात काही फरक आहे की नाही?
नक्कीच आहे. फरक नक्कीच आहे. पण मंचावरुन भाषणात असे शब्द वापरणं हे चूक की बरोबर हे ठरवण्याची निदान माझीतरी कुवत नाही. आज आपण २०१३ मध्ये आहोत. १९८८ मधलं दादांचं भाषण ऐकलंयत? ६८-७० पासूनची बाळासाहेबांची भाषणं ठाऊक असतीलच, आचार्य अत्र्यांची भाषाही सोवळी बिलकुल नव्हती. माझं म्हणणं केवळ इतकंच आहे की आपण एक समाज म्हणून आजच्या घडीला जास्तच संवेदनशील झालो आहोत असं वाटतंय. लक्षात घ्या, माझा मूळ मुद्दा हा त्या भाषणातल्या वृत्तीबद्दल मुळीच नाही. त्या गोष्टीचं समर्थन होऊच शकत नाही. म्हणणं इतकंच आहे, की आजच्या घडीला आपण भाषेला आलवण नेसवून माजघरात कोंड्तोय का? ज्या प्रकारच्या प्रतिक्रिया समाजातून येत आहेत तितकं अश्लाघ्य अन अश्लिल ते बोलणं होतं का? तसं असेल तर कोकणातल्या घराघरातल्या अगदी दशग्रंथी ब्राह्मणांमध्येही पुर्वी सहजी ऐकू येणारा - अगदी घरातल्या पोरांनाही उद्देशुन 'रांडेंच्या' हा शब्द आपण कोणत्या वर्गवारीत बसवणार? कोल्हापूरात सहजपणे एखादं विशेषण असल्यासारखा येणारा 'भाड्या' कसा जस्टिफाय करणार? मला कळतंय, मी देतोय ती उदाहरणं खाजगी जिवनातली आहेत, आणि सभाशास्त्र वेगळं असतं. अहो, पण ते कोणासाठी? सभाशास्त्र पंडितांना लागू...पंडिंतांच्या सभेत! जनमानसाशी बोलायचं ते त्यांच्या भाषेत हे राजकारणातल्या सभांचं एक हुकमी पान नव्हे का? मिष्टर पवारांनाही बोलतानाच आपला तोल (रुढार्थानं) ढासाळल्याचं लक्षात आलंच. आता त्यावर काही मखलाशी केली तर तत्क्षणी घेतलेल्या त्या पावित्र्यापासून कोलांटी मारल्यासारखंच होणार. आणि बहुतेक ते तसं पुढंमागं म्हणतीलही कदाचित. कुणी सांगावं? >> परिथितीचं गांभिर्य आणि दुष्काळ, भारनियमन वगैरेची संवेदनशीलता बाजूला ठेउ. अनागोंदीवादी पक्षात सातबारा, पाणलोट, आणि सहकारी ब्यांका ह्यापलिकडं नक्की कशाची संवेदनशीलता एरवि असते असं तुम्हाला आढळलंय? :)

In reply to by धमाल मुलगा

त्याला आज तथाकथीत अश्लिलतेची फोडणी मिळाली म्हणून कदाचित आज ते ऊठून दिसतंय.
हो. फक्त अश्लिल आहे म्हणून नव्हे तर हा 'नेमेची येणारा दुष्काळ' नैसर्गिक नसून मानव निर्मीत आहे हे सिद्ध झाले असून, महाराष्ट्रात बहुतांश वेळेला सत्तेत असून, पाटबंधारे खाती यांच्याच अखत्यारीत असून कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचाराचा आरोप झालेल्या आणि त्यामुळे राजिनामा द्यावा लागलेल्या अजित पवारांनी दुष्काळात होरपळत असताना अश्या नाजूक वेळेला असं वक्तव्य करावं का हा प्रश्न आहे. मागे विधानसभेमध्ये 'पोर्न क्लिप' बघणार्‍या मंत्र्यावर टिका झाली. त्यातली अश्लिलता बाजूला ठेवली तरी जनतेच्या प्रश्नांकडे केलेली अक्षम्य डोळेझाक महत्वाची आहे. त्याऐवजी एखाद्या मंत्री बाई वाती वळत बसल्या असत्या तर तोही तेव्हडाच अक्षम्य अपराध होय.
पण मंचावरुन भाषणात असे शब्द वापरणं हे चूक की बरोबर हे ठरवण्याची निदान माझीतरी कुवत नाही. आज आपण २०१३ मध्ये आहोत. १९८८ मधलं दादांचं भाषण ऐकलंयत? ६८-७० पासूनची बाळासाहेबांची भाषणं ठाऊक असतीलच, आचार्य अत्र्यांची भाषाही सोवळी बिलकुल नव्हती.
हे ही निषेधार्थ आहेच. आणि घटनात्मक विशेष अधिकार आणि जबाबदार असलेल्या व्यक्तीनी थोडा ताळतंत्र बाळगावा अशी अपेक्षा असते.

In reply to by धमाल मुलगा

धमाल मुलगा - तुमच्या प्रतिसादाशी असहमत असलो तरी तुमचा स्टँड मला आवडला. इतरवेळेला ज्याभाषेला ठाकरी भाषा म्हणून कुरवाळायचे आणि आपल्या नावडत्या पक्षातील मात्र कुणी हीच भाषा वापरली की लगेच आकाश पाताळ एक करायचे हा दुटप्पीपणा निदान तुमच्याकडे तरी दिसला नाही.

In reply to by धमाल मुलगा

असो! बदलत्या काळानुरुप लज्जारक्षणाची वस्त्रं तोकडी होत अंगं उघडी पडत चालली असताना, भाषेला मात्र व्हिक्टोरियन .....
धम्या उत्तर तुच दिलंयस. वर असताना ऐवजी असल्यामुळे लिहिलं की हल्ली नेते असे का बोलतात याचं उत्तर मिळेल :) हल्ली नेत्यांना कर्तृत्त्वाची वस्त्र तोकडी पडताहेत.. तेव्हा फक्त असल्या भाषणबाजीवर जोर आहे.. सगळीकडे.. सगळ्याच पक्षात... काय म्हणतोस?

In reply to by धमाल मुलगा

अजित पवार गावाकडच्या सभांना अशीच भाषणं ठोकतात त्यामुळे विशेष वाटल नाही, अजित पवार वि राज ठाकरे सामना रंगवण्यासाठी मिडीयाने हे भाषण क्याच केलं एव्हडच म्हणता येईल.बाकी राष्ट्रवादी च्या नेत्यांकडून अशीच भाषा अपेक्षित त्यामुळे जनतेने त्यांना तोंड आवरायला सांगण्यापेक्षा स्वतः ला सवय लावून घ्यावी हे असलं ऐकायची.2014 ला बदल नाही घडला तर अजून ५ वरीस सोसायची तयारी ठेवा

In reply to by मालोजीराव

आत्ताच फेसबुकवर पाहिलेली कविता… साभार - अनिकेत बोंद्रे एक मुतारी द्या मज आणुनी फुंकीन तीत मी स्वप्राणाने भेदून टाकीन दुष्काळ सगळा दीर्घ तिच्या त्या पिचकारीने ! --- दादाकवी

In reply to by धमाल मुलगा

तुझा मुद्दा फारसा पटत नाहीये. दोन्ही पोस्टी वाचल्या. आचार्य अत्रे, बाळ ठाकरे ह्यांच्या भाषेचं समर्थन करत नाही, पण दोघेही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून बोलत नव्हते हा मोठा फरक आहे. तेच दादा कोंडकेंबद्दल. इथे 'माननीय' अजित पवार, ज्यांनी उपमुख्यमंत्रीपद "भूषवलेलं" असताना, आणि आता इतकी वर्षं सत्तेत असून दुष्काळाबाबत काहीही ठोस पावलं न उचलता, हे उचलली जीभ लावली टाळ्याला ह्या पद्धतीने बोलणं निदान उपमुख्यमंत्री पदावर असताना तरी टाळायला हवं, निदान त्या पदाची इभ्रत राखण्यासाठी, कारण ते महाराष्ट्राचं पद आहे. कोण्या एका राजकीय पक्षाचं किंवा गुंडगिरीच्या आणि पैशाच्या जोरावर अर्धा अधिक महाराष्ट्र खिशात घालणार्‍यांच्या खाजगी मालकीचं नाहीये - इतकी तरी जाणीव असावी. आणि 'रांडेंच्या', 'भाड्या' बद्दल म्हणशील तर ते शब्द जी जवळीक दाखवण्यासाठी वा प्रसंगी कान उपटण्यासाठी जसे वडिलकीच्या वा मैत्रीच्या अधिकारात आणि ज्या लहेजात वापरले जातात, त्यात आणि ह्या भाषणात काही फरक नाहीच म्हणतोस? असेलही. दादांची ही दुष्काळग्रस्त जनतेविषयी माया आणि आपुलकी दाखवायची खास ष्टाईल म्हणायची की काय? तरी बरं, हे सगळं बोलता बोलता त्यांना स्वतःलाच शंका आली की आपण सकाळीच पावशेर टाकून आलो की काय! बाकी आजकाल बहुतांशी राजकारणी बिनमुद्द्याचं आणि जास्त करुन गुद्द्याचं बोलत आहेत... काही चांगले काम करणारे असतीलही पण अशांबद्दल फारसं समजून येत नाही आणि कर्तव्यशून्य राज्यकर्त्यांना कोणत्याही कारणाने का होईना, प्रसिद्धी मिळत राहते.

In reply to by यशोधरा

>>>दोघेही महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून बोलत नव्हते हा मोठा फरक आहे. हाच फरक अनेकांना समजलेला नाही... अजूनही.

In reply to by धमाल मुलगा

धम्या एक गोष्ट लक्षात घे की मुख्य आक्षेप भाषेला नाही आहे. सामान्य जनतेप्रती जो बेदरकारपणा दाखवला गेला आहे आणि त्यांच्या भावनांची जी कुचेष्टा केली गेली आहे त्याला आहे. ठाकरे काय किंवा अत्रे काय प्रसंगी शिवराळ भाषा वापरत असतील, प्रतिस्पर्ध्याची आईमाईदेखील काढत असतील. पण त्यांनी गोरगरीब जनतेच्या असहाय्यतेची आणि दुर्दैवाची टिंगलटवाळी तरी केली नव्हती. पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे तर आहे. ते पैसेखाऊ राजकारण्यांमुळे किती, सरकारच्या नाकर्तेपणामुळे किती आणि निसर्गाच्या अवकृपेने किती याची मीमांसा करता येइल पण म्हणुन तुम्ही सामान्य जनतेला "आता काय मुतु काय?" असे जर विचारायला लागलात तर ते एक अतिशय निर्लज्ज कृती आणि असंवेदनशील विधान असेल. शिवाय गेली अनेको वर्षे वीजेची बोंबाबोंब सुरुच आहे. इतके वर्ष सत्तेवर असुनही अजुन यांना परिस्थिती सुधारता आलेली नाही. ठीक आहे. पण मग किमान निर्लज्जपणे लोकसंख्यावाढीची विधाने करु नयेत ना.

In reply to by मृत्युन्जय

+१ भाषेपेक्षा सहानुभूतीचा अभाव जास्त खटकतो इथे.. टगेगिरी करायची ही जागा नव्हे इतके समजत नसेल तर उपमुख्यमंत्रीम्हणून रहाण्याची लायकी नाही असेच वाटते!!

In reply to by मृत्युन्जय

अगदी अगदी. विरोधकांवर हल्ला केला तर समजू शकतो, पण सामन्य जनतेशी असं बोलत असाल तर तो माजच आहे, विनोद सुद्धा कुठे कसा आणि कुणाबद्दल करावा ह्यावर तुम्ही तुमची लायकी दाखवून देता. माफी वगैरे ठीक आहे पण प्रायश्चित काय? त्याच उत्तर द्या दादासाहेब!

हे साहेब गेल्या साडेतेरा वर्षांपासून सतत सत्तेमध्ये आहेत. या काळात त्यांनी राज्यासाठी नेमकी काय भरीव काम केले म्हणून बरेच लोक त्यांचे धडाकेबाज, कार्यक्षम म्हणून कौतुक करत असतात हा प्रश्न मला नेहमीच पडतो. त्यांनी ज्या ज्या खात्यात काम केले उदा ऊर्जा, जलसंधारण, अर्थ त्या त्या क्षेत्रात राज्याची वाट लागली. स्वतःचे सख्खे काका राजकारणात एवढा दीर्घकाळ असूनही सुसंकृततेच्या बाबतीत एक आदर्श असताना त्यांनी ही वाट चोखाळावी, ईश्वर त्यांना सद्बुद्धी देवो.

अजित पवार गुंडप्रवृत्तीचे म्हणुनच प्रसिद्ध आहेत, त्यांच्या काकांसारखा मुखवटा का होईना घातलेला नाही. त्यामुळे त्यांना जनतेने निवडुन का दिलं हाच एक प्रश्न. बाकी स्वतः जाहीरपणे अश्लाघ्य भाषा वापरुन सोज्वळपणे इथे प्रतिसाद देणारे लोकं पाहीले की करमणुक होते.

ज्या प्रभाकर देशमुख वरून हा सगळा वादंग झाला, त्यांचे ह्या सर्व घटनेवर त्यांचे मत ह्यामुळे बरीच माहिती मिळाली.

महाराष्ट्रात पडलेल्या दुष्काळाची त्यानी खिल्ली उडवली.
म्हणूनच त्यांना लाज वाटली पाहिजे. खिल्ली कुठल्या गोष्टींची उडवायची ह्याला मर्यादा असते.अजित पवारांनी हे वक्तव्य केल्यावर सभेतल्या ईतरांनीही त्यावर टाळ्या वाजवल्या.

ह्या अर्वाच्य, असभ्य, असंस्कृत बोलण्यामागे मुंब्रा परिसरातील अवैध बांधकामावरचे लक्ष उडवून लावावे असा उद्देश असेल. नुकत्याच झालेल्या पडझडीमुळे ते एक नवे शुक्लकाष्ठ राष्ट्रवादीच्या मागे लागण्याची शक्यता आहे, तशात अल्पसंख्य लोक गाडले गेले असल्यामुळे प्रश्न अधिकच नाजूक बनला आहे त्यामुळे काकासाहेबांच्या सल्ल्यानेच हा शिमगा केला गेला असण्याची शक्यता आहे. कितीही उर्मट असला तरी अजित पवार हा एक राजकारणी आहे. निष्कारण चिखलफेक तो करेल असे मला वाटत नाही.

In reply to by हुप्प्या

+१११११११११११. असे असण्याची शक्यता आजिबात नाकारता येत नाही. गुड पॉइंट.

In reply to by बंडा मामा

राष्ट्रवादी व आव्हाड तर नालायक आहेतच. पण महानगरपालिकेत शिवसेना भाजपाची सत्ता आहे. त्यांना बेकायदेशीर बांधकामांबाबतीत काही करता येणे शक्य नव्हते काय असा प्रश्न मनात येतो.

In reply to by आजानुकर्ण

महानगरपालिकेत आयुक्त अधिक सर्वाधिक शक्तिशाली असतो व तो राज्यसरकारद्वारा नियुक्त केलेला असतो त्यामुळे महापौरपद हे फारसे अधिकार नसलेले पद असते असा दावा करून दिड दशकापूर्वी महापौर परिषदेचा प्रयोग करण्यात आला होता. या मुद्द्यावर (महानगरपालिकेतील सत्ताधारी पक्ष अधिक शक्तिशाली की मनपा आयुक्त...) यावर जाणकारांचे मत जाणण्यास उत्सुक.

In reply to by श्रीरंग_जोशी

मागील महापालिका निवडणुकीच्यावेळी शिवसेनेने 'करुन दाखविले'च्या फलकांचा धमाका सर्वत्र केला होता. शिवाय वर्तमानपत्रामध्येही जाहिराती येत होत्या. आयुक्तांच्या कार्याचे श्रेय लाटण्याचा हा प्रकार वाटतो.

In reply to by आजानुकर्ण

मनपामधील सत्ताधारी पक्षाची भूमिका जनता व मनपा आयुक्त यांना जोडणारा दुवा अशी असावी. आयुक्त काही जनतेतून निवडून येत नाही त्यामुळे जनतेने बहुसंख्येने निवडून दिलेल्या पक्षाचे वा आघाडीचे नगरसेवक जनतेच्या गरजा आयुक्तापेक्षा निश्चितच अधिक व्यवस्थितपणे समजून घेत असावे. व त्यावर पाठपुरावा करून आयुक्त व मनपामधील इतर अधिकार्‍यांद्वारे अंमलबजावणी करवून घेत असावेत. या कामाचे श्रेय घेतल्यास त्यांनी त्यांच्या कर्तव्य पार पाडल्याचेच श्रेय घेतले असे समजायला काही हरकत नाही. महाराष्ट्रात अंदाजे २० च्या आसपास मनपा असाव्यात. सगळीकडे याच प्रकारे श्रेय घेणे / हरकत घेणे सुरू असते. अर्थात या विषयाच्या जाणकारांचे विस्तॄत मत जाणणे अधिक महत्वाचे.

In reply to by nandan

दादा कोणते ?दादा पवार म्हणत असाल तर ते ना दिन मे ना रात मे,ना घर मे ना घर के बाहर्,ना जमी पर ना हवा मे,अशा परिस्थितीत आल्याचे बारामती प्राथमिक आरोग्य केंद्रात नोंद आहे असे ऐकीव आहे

अतिशय बेताल वक्तव्य. महाराष्ट्राचं दुर्दैव की असे उप-मुख्यमंत्री आपल्याला सोसावे लागतात. मग्रुरी,सत्ता,संपत्ती, याची नशा चढते आणि नशेत माणसं बरळतात असा तो अर्थ. आता विरोधी पक्षांने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे, सत्ताधारी पक्षाने श्रेष्ठींकडे अशा बेताल वक्तव्याचा निषेध व्यक्त करावा, आणि पदावरुन पायउतार करण्यास भाग पाडावे, आता ते होईल की नाही माहिती नाही. आणि लोक पुन्हा त्यांना निवडून देणार नाही, याच्यावर बॉ आपला विश्वास नाही. -दिलीप बिरुटे

त्यांच्या वक्तव्यावर लोक ज्याप्रकारे खदखदत होते, तेही चीड आणणारे होते. हेच तर उद्वेग जनक आहे. ज्यांचे पु.लं. , चिं.वी. , ह्यांच्यासारख्या दर्जेदार, अभिरुची संपन्न विनोदावर पोषण झालेले नाही त्यांना अश्या विनोदात आनंद वाटतो. चांगले पहायचे नाही , चांगले वाचायचे नाही , चांगले ऐकायचे नाही. चांगले निवडायचे नाही. आणि मराठीच्या , महाराष्ट्राच्या , मराठ्यांच्या गप्पा झोडायच्या !

सत्तेची नशा आणि माज याच हे मूर्तीमंत उदाहरण महाराष्ट्रातल्या जनतेला दिसलं... दुष्काळग्रस्त महाराष्ट्राची आणि जनतेची कुठलीच सानभुती आणि तमा न-बाळगताना त्यांनी महाराष्ट्राचा आणि जनतेचा अपमान केला असुन निर्लज्य पणाचा कळस कसा गाठायचा याचे उदाहरण जनते समोर ठेवले ! ह्या असल्या राज्यकर्त्यांना निवडुन देणारी जनता ही सुद्धा तितकीच जवाबदार आहे कारण अश्या धेंडांना उन्मत्त होण्यासाठी हीच जनता मदतनारुपी मदत करते. इथे महाराष्ट्रातल्या लोकांना प्यायला पाणी नाही,वानखेडे स्टेडियला पाणी मारले जाते त्याची आकारणी १००० लिटरला ४०रु या प्रमाणे केली जात आहे,पण लोकांना पिण्यासाठी पाणी हवे त्याचा मात्र काळाबाजार ! परिस्थीती इतकी भयंकर आहे की महाराष्ट्रातले तहानने व्याक्युळलेले लोक आता रेल्वेस्टेशन मधे गर्दी करु लागले आहेत आणि ट्रेनच्या संडास मधला जो फ्लश असतो त्याचे पाणी भरुन घेतले जात आहे ! :( राज्यातल्या राज्यकर्त्यांना दुष्काळ दिसेनासा झाला असुन लोकांना विचारणारा लोकप्रतिनिधी जणु अद्रुष्य झाला आहे.कोड्यावधी रुपये खर्चुन महाराष्ट्रात आयपील सामने खेळवले जाणार आणि दुष्काळ ग्रस्तांची अशी क्रुर थट्टा आपले नेते करत राहणार हे वास्तव आपण आपल्या डोळ्यांनी पाहत आहोत. :( अजित दादांच्या वक्तव्यात हसणार्‍या मंडळीत स्त्रीयांचाही सहभाग होता हे पाहुन या सर्व हसणार्‍यांची वॄत्ती आणि समज हीन स्वरुपाचीच असावी असे माझे ठाम मत झाले. ! :( जाता जाता :--- महाराष्ट्रात दुष्काळाने थैमान घातलेले असुन सुद्धा लोकांपेक्षा उध्योगपतींना आणि राजकारणार्‍यांना आयपीलची काळजी जास्त आहे हे दुसुन आले ! मी या क्रिकेटसामन्यांवर माझ्या वैयक्तिक बहिष्कार आधीच घातला आहे. आपण ही त्याचा बहिष्कार आणि निशेष आपपल्या पद्धतीने करावा.... अशी मी नर्म विनंती करतो.

In reply to by मदनबाण

मी या क्रिकेटसामन्यांवर माझ्या वैयक्तिक बहिष्कार आधीच घातला आहे
+१ आय.पी.एल. म्हणजे काळा पैसा देशभर फिरवायचा तो मार्ग आहे.ह्या सामन्यांमागे ड्रग्स्,वेश्याव्यवसाय हे काळे धंदे चालु असतात ते वेगळेच.

क्रिकेट सामन्यावर बहिष्कार योग्य आहे.पण मैदानावर हिरवळ टिकवण्यासाठी पाणी मारावे लागते.ते पाणी मैदानावर चि़खल होईल इतके जास्त नसते.दुष्काळाबद्द्ल सर्वांना सहानुभूती आहेच पण अनेक शेतकर्यांनी अनेक वेळी मिळतील तितकी कर्जे घेतलेली आहेत.इतरांना मदतीचे जाऊ द्या पण त्यांनी स्वतःची कर्जेदेखिल फेडली नाहीत.त्यांनी आय.पी.एल.सामने होऊ नयेत असे का म्हणावे ? श्रीमंत लोकांचा पैसा त्यांनाही काम करूनच व आयकर भरून मिळालेला असतो त्या पैशाबद्दल द्वेश नसावा.व तो पैसा कसा खर्च करावा हे त्यांना स्वातंत्र्यही पाहिजे.तर लोकशाही म्हणता येईल.दुष्काळग्रस्त निधीस आयकर सवलत दिल्यास ते लोकही देणग्या देतील.क्रिकेटच्या अती प्रसाराने इतर खेळांचे नुकसान होते म्हणून माझाही क्रिकेटसामन्यांवर वैयक्तिक बहिष्कार आहेच.

In reply to by विलास अध्यापक

पण मैदानावर हिरवळ टिकवण्यासाठी पाणी मारावे लागते.ते पाणी मैदानावर चि़खल होईल इतके जास्त नसते. मी दिलेल्या प्रतिसादातील व्हिडीयो पहा,मग कळेल की मैदानावर पाणी दिले जाते त्याने किती लोकांची तहान भागु शकेल !आणि मैदानावरील हिरवळ टिकवण्या पेक्षा जिवंत लोकांची तहान जास्त भागवणे यातले जास्त महत्वाचे काय ? संत एकनाथ महाराजांनी कावडीने पाणी घेऊन जाताना महादेवाच्या अभिषेकाचे पाणी गाढवाला पाजले होते हा महाराष्ट्रातील संतांनी घालुन दिलेला धडा आपण आठवायला हवा. इतरांना मदतीचे जाऊ द्या पण त्यांनी स्वतःची कर्जेदेखिल फेडली नाहीत.त्यांनी आय.पी.एल.सामने होऊ नयेत असे का म्हणावे ? शेतकर्‍यांनी खचितच कर्ज काढली असतील तर ती शेतीसाठी किंवा स्वतःच्या पोरीबाळींची लग्न करण्यासाठी ! ती न देता आल्याने सुद्धा आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍यांची संख्या कमी नसावी ! तसेही दुर्दैवाने शेतकर्‍यांच्या आत्महत्येत महाराष्ट्र आघाडीवर आहे. :)मुळात पाण्यासाठी दारोदार हिंडणार्‍या आणि विस्थापित महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग आणि जनतेची तुलना आयपील सामन्यांशी होउच शकत नाही ! शेतकर्‍यांच्या कर्जा बाबत आपण बोलता तेव्हा आयपीलएलच्या थकबाकी बद्धल आपण चकार शब्द काढत नाही ! का ? काही दुवे :- IPL dues: HC says Maharashtra govt may attach defaulters' properties BCCI, Maharashtra pulled up for not paying police dues श्रीमंत लोकांचा पैसा त्यांनाही काम करूनच व आयकर भरून मिळालेला असतो त्या पैशाबद्दल द्वेश नसावा.व तो पैसा कसा खर्च करावा हे त्यांना स्वातंत्र्यही पाहिजे. सहमत ! पण ही मंडळी ज्या समाजात आपण राहतो त्याच समाजाचा एक भाग आहेत्,हे कसे विसरुन चालेल ? इथे लोक तहानेने दारोदार हिंडताना दिसत असताना आणि राज्यात भिषण दुष्काळ असताना क्रिकेटवर पैसा ओतणे हे कुठल्या श्रीमंतीचे लक्षण आहे ? दुष्काळग्रस्त निधीस आयकर सवलत दिल्यास ते लोकही देणग्या देतील. दुष्काळ ग्रस्तांना पैसा नको तर पाणी हवे आहे ! माझ्या माहिती प्रमाणे आत्ता पर्यंत आयपीएल आयोजकांपासुन ते क्रिकेटरांव पैसा लावणार्‍या उध्योगपती आणि सिनेकलांवत यांनी राज्यातल्या दुष्काळ ग्रस्तांची साधी दखल घेतल्याचे उदाहरण दिसलेले नाही. जाता जाता :--- माझ्या राज्यातले लोक दुष्काळाचा गंभीर सामना करत असताना मी क्रिकेटचे सामने पाहुन माझे मनोरंजन करु शकत नाही.मी त्यांच्या जागी असतो तर ते जे भोग भोगत आहेत ते मलाही भोगावे लागले असते