काठमांडू ते कंदाहार - Flight IC 814
1998 साली झालेल्या विमान अपहरणाबद्दल अनेक ठिकाणी अनेकवेळा सतत चर्चा होत असते.
श्री श्रीरंग जोशींनी या घटनेसंदर्भात विस्तृत लेखन दिवाळी अंकामधील काठमांडू ते कंदहार या लेखामध्ये केले आहेच.
अनेक ठिकाणी होणारे विषयांतर पाहता या विषयावर हा धागा काढत आहे. या धाग्यामध्ये आपण या अपहरणासंदर्भात चर्चा करूया.
संपादक मंडळास नम्र विनंती.
१) माहेरच्या अव्हेरावरचे प्रतिसाद इथे शिफ्ट करणे शक्य असेल तर कृपया करावेत - तिथले विषयांतर टळेल.
२) सदर धागा अस्थानी किंवा अनावश्यक वाटत असेल तर जरूर उडवावा - माझी हरकत नाही.
सदर अपहरणादरम्यान अपहरणकर्त्यांकडून मारल्या गेलेल्या रूपेन कट्याल यांना श्रद्धांजली.
वाचने
52315
वाचनखूण
प्रतिक्रिया
77
आवडला!
माहेरच्या अव्हेरावर मी दिलेले
In reply to माहेरच्या अव्हेरावर मी दिलेले by मोदक
हा मुद्दा अत्यंत टाकावू
In reply to हा मुद्दा अत्यंत टाकावू by मोदक
हाहहा....
In reply to हाहहा.... by मैत्र
या दोन नमुन्यांचा मूळ कंदाहार
In reply to या दोन नमुन्यांचा मूळ कंदाहार by मोदक
?
In reply to ? by नितिन थत्ते
http://www.misalpav.com
In reply to या दोन नमुन्यांचा मूळ कंदाहार by मोदक
मला पण हा प्रतिसाद अकारण
टोकाची मते
In reply to टोकाची मते by श्रीरंग_जोशी
नाही रे श्रीरंगा, ऑपरेशन
In reply to नाही रे श्रीरंगा, ऑपरेशन by मोदक
मान्य आहे
In reply to मान्य आहे by श्रीरंग_जोशी
ठीक.
In reply to टोकाची मते by श्रीरंग_जोशी
"पण तरीही प्रत्यक्ष वाटाघाटी
एंटबे आणि कंदाहार ची तुलना चुकीची
In reply to एंटबे आणि कंदाहार ची तुलना चुकीची by सूर्याजीपंत
तुलना केलेली नाही
In reply to एंटबे आणि कंदाहार ची तुलना चुकीची by सूर्याजीपंत
सविस्तर प्रतिसादाबद्दल
एंटबे चा विमानतळ हा इस्रायेल च्या एका माजी लष्करी अधिकार्यांनी ( कर्नल बारलेव) यांनी बांधला होता.माझ्या माहितीप्रमाणे कर्नल बारलेव्ह हे इस्रायल युगांडा प्रेमप्रकरणाच्या वेळी (इस्रायलने इदी आमीनची मिग / लढाऊ विमानांची मागणी फेटाळल्यावर हे प्रेमप्रकरण फिसकटले!) युगांडाच्या आर्मीला 'घडवण्यात' अग्रेसर होते. इदी आमीनचे त्यांच्याशी वैयक्तीक मैत्रीपूर्ण संबंध होते. एंटबे वाटाघाटींच्या वेळी इदी आमीनशी बोलणी करण्यामध्ये इस्रायली बाजूने कर्नल बारलेव्ह यांचा सहभाग होता.त्यामुळे इस्रायेलला विमानतळाची ब्लू प्रिंट उपलब्ध होती.सर्व ओलीस एंटबेवरील जुन्या टर्मीनल बिल्डींगमध्ये वसवले गेले होते. ही माहिती खुद्द इदी आमीनने बोलता बोलता कर्नल बारलेव्ह यांना दिली होती. (ओलीस ठीक आहेत, ते जुन्या टर्मीनल मध्ये आहेत, त्यांना चादरी व आवश्यक वैद्यकीय सेवा पुरवल्या आहेत!) या टर्मीनल बिल्डींगचे बांधकाम 'सोलेल अँड बोनेह' या इस्रायली कंपनीने केले होते त्यामुळे त्या ब्लू प्रिंट्स विनासायास इस्रायली आर्मीला उपलब्ध झाल्या.शिवाय १९९५ पासून, त्या विमानतळावर फक्त सौदी आणि पाकिस्तान याच दोन देशांची विमाने उतरत असल्याने कोणाहीकडून काहीही माहिती मिळण्याचा संभाव नव्हता.वेळोवेळी सोडल्या गेलेल्या ओलीसांकडून इस्रायलने माहिती मिळवली. अगदी बेनगाझी येथे पहिला थांबा घेतल्यानंतर गरोदर असलेल्या पॅट्रिशीया हॅमन या महिलेपासून ते इदी आमीन मॉरीशसला जाण्याआधी सोडण्यात आलेल्या ८० पेक्षा जास्ती 'नॉन ज्यू' ओलीसांपर्यंत सर्वांच्या मुलाखती त्या त्या देशात जावून इस्रायली तुकड्यांनी घेतल्या होत्या.एंटबे मध्ये केनियानी परतीच्या प्रवासात इस्रायेलच्या विमानांना इंधनासाठी उतरण्याची परवानगी दिली होती. तशी कोणतीही शक्यता कंदाहार प्रकरणामध्ये नव्हती.या विधानाची आवश्यकता / भारताने कंदाहारवर हल्ला केला असता तर एखाद्या 'स्टॉप ओव्हरची' आवश्यकता कळाली नाही. इस्रायलला नैरोबी विमानतळाची गरज होती कारण "तेलअवीव-लाल समुद्र-इजिप्त-सुदान-सौदी अरेबीया-जिबोती बंदर-केनया-सोमालिया-इथिओपीया-व्हिक्टोरीया तलाव-एंटबे" या मार्गाने ४००० किलोमीटर पेक्षा जास्त प्रवास करून विमाने एंटबे ला पोहोचली होती. इंधन भरल्याशिवाय एंटबे ते इस्रायल हा परतीचा प्रवास शक्य नव्हता म्हणून केनियामध्ये थांबा घेतला गेला होता. (सुटकेसाठी गेलेल्या इस्रायली विमानांना केनिया मध्ये इंधन भरण्याची परवानगी एंटबेला उतरण्या आधी काही मिनिटे मिळाली होती, ही परवानगी मिळाली नसती तर एंटबे विमानतळावरील इंधन चोरून इस्रायली विमानांमध्ये भरण्याचा प्लॅन आखला गेला होता व या साठी एक मोबाईल फ्युएल पंप इस्रायली विमानांमध्ये होता. हल्याच्या धामधुमीमध्ये इस्रायलने एंटबे विमानतळावरील रशीयन मशीनरी पळवली. या ढापलेल्या मशीनरीला जागा व्हावी म्हणून हा पंप (नाईलाजाने) एंटबे विमानतळावर सोडून देण्यात आला. हवाई हल्ल्याचा रूट.In reply to सविस्तर प्रतिसादाबद्दल by मोदक
एकदा आपली खरडवहीतून चर्चाही
एकदा आपली खरडवहीतून चर्चाही झाली होती असे स्मरते.
बरोबर.. खालीलप्रमाणे आपली चर्चा झाली होती. सर्वप्रथम "ऑपरेशन एंटेबी" या धाग्यावर गणपाच्या या प्रतिसादावरून चर्चेस प्रारंभ झाला.गणपा - Mon, 23/04/2012 - 13:26मस्त चित्रपट आहे. कुंद्याच्या सांगण्यावरुन पाहिला. तो पहात असताना कंदहार विमान अपहरणाच्या वेळी भारताला अस एखादं पाउल का उचलता आल नाही याची राहुन राहुन लाज वाटली.नितिन थत्ते - Mon, 23/04/2012 - 13:37गणपा भौ मनाला लावून घेऊ नका. इतिहासात हे एकमेव (किंवा कदाचित अजून एक) यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन असावे. गेल्यावर्षी इस्रायलने एका अपहृत सैनिकाच्या बदल्यात १०२७ कैद्यांना सोडले होते. त्याखेरीज वेळोवेळी अनेक कैद्यांना सोडण्यात आलेले आहे.मोदक - Mon, 23/04/2012 - 19:52इतिहास - जगाचा की इस्त्रायलचा..? "यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन" ची व्याख्या काय..? म्हणजे Acceptable Civilian Casuality Ratio वगैरे..?नितिन थत्ते - Mon, 23/04/2012 - 20:00जगाच्याच (२० व्या शतकापासूनच्या) इतिहासात असेल. तुम्हाला आणखी बरीच उदाहरणे सापडली तर कळवावी.मोदक - Mon, 23/04/2012 - 20:16सांगतो... पण तुम्ही व्याख्या सांगा ना... (हॉस्टेज रेस्क्यू या विषयावर ठरवून वाचलेले आहे म्हणून विचारले)येथून पुढील चर्चा खरडवहीमध्ये..
मोदक Wed, 25/04/2012 - 00:19तुमच्या प्रतिसादातून "दहशतवाद्यांचा Success Rate जास्त आहे" असा संदेश जातो आहे का..?नितिन थत्ते Wed, 25/04/2012 - 10:16तसा मेसेज नाही. मेसेज आहे की कुणीतरी नेहमीच डेअरडेव्हिल असतो आणि कुणी(पक्षी-भारत) नेहमी कमकुवत असतो असे नसते. आपण ज्याला डेअरडेव्हिल समजतो त्यालाही कित्येकवेळा तडजोड करावी लागते.मोदक Thu, 26/04/2012 - 01:08आपण ज्याला डेअरडेव्हिल समजतो त्यालाही कित्येकवेळा तडजोड करावी लागते
"कित्येकवेळा" आणि जगाच्या "इतिहासात एखादेच / दुसरे" हे दोन शब्द वेगवेगळ्या अर्थछटा दाखवतात.नितिन थत्ते Thu, 26/04/2012 - 14:05बहुतेकवेळा तडजोडच करावी लागते असे वाचावे.मोदक Sat, 28/04/2012 - 00:37बहुतेकवेळा तडजोडच करावी लागते असे वाचावे.
जगातले सगळे देश Commandos, Neavy Seals, ATS असे आणि यांसारखे बरेच Highly Trained Units पोसून "बहुतेकवेळा तडजोडच करतात" हे मत वाचून आश्चर्य वाटले. पण तुमच्याकडून असाच प्रतिसाद अपेक्षीत होतानितिन थत्ते Sat, 28/04/2012 - 10:17तुमचा पॉईंट माझ्या लक्षात येत नाहीये. कमांडो, एटीएस वगैरे एरवी काम करतातच. भारतातही करतात. जेव्हा ओलीसांच्या सुटकेचा प्रश्न असतो तेव्हा 'बहुतेकवेळा तडजोड' करावी लागते. अपहरणकर्त्यांना ठार मारून किंवा इतर मार्गाने, कैद्यांना सोडण्याची मागणी मान्य करता ओलीसांची सुटका झाल्याची उदाहरणे विरळाच असतात. (इस्रायल- ज्याच्या सो कॉल्ड खंबीरपणाचे भारतात अवास्तव कौतुक होत असते त्यानेही बहुधा ही एकच कारवाई केली आहे.... कदाचित आणखी एखादी असेल. गणपा यांना मी दिलेल्या प्रतिसादात इस्रायलने किती वेळा कैद्यांना सोडले आहे याची विकीयादीच दिली आहे. तरीही इस्रायल नेहमीच कणखर असतो आणि भारत नेहमीच बोटचेपेपणा करतो असे म्हणण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला आहे. परंतु मला तो वाद चालवावासा वाटत नाही. माझ्या दृष्टीने तसे नाही एवढे दाखवण्यापुरेसा विदा आहे.मोदक Sat, 28/04/2012 - 11:17सर्वप्रथम - मी वाद घालत नाहीये. (तुमचा अनुभव आणि अभ्यासापुढे माझ्या मर्यादा मला माहीत आहेत.)तुमचा पॉईंट माझ्या लक्षात येत नाहीये.
पॉईंट हा आहे की "इतिहासात हे एकमेव (किंवा कदाचित अजून एक) यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन असावे" हे खूप धाडसी विधान आहे..कमांडो, एटीएस वगैरे एरवी काम करतातच. भारतातही करतात. जेव्हा ओलीसांच्या सुटकेचा प्रश्न असतो तेव्हा 'बहुतेकवेळा तडजोड' करावी लागते. अपहरणकर्त्यांना ठार मारून किंवा इतर मार्गाने, कैद्यांना सोडण्याची मागणी मान्य करता ओलीसांची सुटका झाल्याची उदाहरणे विरळाच असतात.
"यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन" किंवा "बहुतेकवेळा तडजोड" ची तुमची व्याख्या काय आहे..? बेसलान किंवा मॉस्को थीएटर सारखा भयानक प्रकार होवून सुध्दा ते सरकार संपूर्ण जबादारी स्वीकारत आहे... व्याख्या कळाली तर आपल्याला एका पातळीवर येणे सोयीचे पडेल असे वाटते. (१००% ओलीस जिवंत सुटावेत, प्रॉपर्टी / विमान डॅमेज होवू नये, सगळे दहशतवादी ठार व्हावेत आणि एकही गोळी न झाडता हे सगळे व्हावे असे काही आहे का..?)(इस्रायल- ज्याच्या सो कॉल्ड खंबीरपणाचे भारतात अवास्तव कौतुक होत असते त्यानेही बहुधा ही एकच कारवाई केली आहे.... कदाचित आणखी एखादी असेल.)बर्याच आहेत.. तुम्ही व्याख्या सांगीतली की विदा जमवून पाठवतो.गणपा यांना मी दिलेल्या प्रतिसादात इस्रायलने किती वेळा कैद्यांना सोडले आहे याची विकीयादीच दिली आहे.
आपण भरलेल्या अर्ध्या ग्लासाकडे बघुया... तसेच तुम्ही १० पैकी ५ विषयात नापास झाला व मी ४ विषयात नापास झलो म्हणोन मी हुषार ठरत नाही. भारत नेहमीच बोटचेपेपणा करतो असे म्हणण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला आहे. हे मी कधीही म्हटले नाहीये. आणि परिस्थिती कितीही वाईट असली / कशीही असली तरी हे विधान खूप धाडसाचे ठरेल. तुमचा प्रतिसाद विनाकारण Defensive वाटला.नितिन थत्ते Sat, 28/04/2012 - 11:53व्याक्या करणे फार अवघड नसावे. ८०% पेक्षा जास्त ओलीस जिवंत सुटावेत. अपहरणकर्त्यांच्या काहीही मागण्या मान्य होऊ नयेत. [सुरक्षा दलांमधील कॅज्युअल्टीविषयी काही क्रायटेरिया नाही]. भारताची २६/११ कारवाई या ८०% क्रायटेरियामध्ये ऑलमोस्ट बसते. परंतु त्यावेळी अतिरेक्यांच्या काही मागण्याच नव्हत्या. ७८% ओलीसांची सुटका झाली. (मीडियाद्वारा सुरक्षा दलांच्या हालचालीविषयी इत्थंभूत माहिती अतिरेक्यांना मिळत असताना मिळालेले यश खरे तर जास्तच आहे). परंतु या कारवाईला काही एण्टेबीच्या कारवाईचा दर्जा देता येणार नाही. भारताला जेव्हा मवाळ भूमिका घ्यावी लागते (उदा कंदाहार प्रकरण) तेव्हा लोक नेहमीच या एण्टेबी ऑपरेशनचे उदाहरण देतात. तुम्ही कोण हे मला ठाऊक नाही म्हणून तुम्ही असे म्हणता की नाही याबद्दल काही माहिती नाहीमोदक Sat, 28/04/2012 - 12:02व्याक्या करणे फार अवघड नसावे. ८०% पेक्षा जास्त ओलीस जिवंत सुटावेत. अपहरणकर्त्यांच्या काहीही मागण्या मान्य होऊ नयेत. [सुरक्षा दलांमधील कॅज्युअल्टीविषयी काही क्रायटेरिया नाही].
ओक्के..भारताला जेव्हा मवाळ भूमिका घ्यावी लागते (उदा कंदाहार प्रकरण) तेव्हा लोक नेहमीच या एण्टेबी ऑपरेशनचे उदाहरण देतात.
तुलना होवूच शकत नाही. IC 814 ने अमृतसरहून उड्डाण का केले..? हा मूळ प्रश्न आहे माझ्यादृष्टीने.तुम्ही कोण हे मला ठाऊक नाही म्हणून तुम्ही असे म्हणता की नाही याबद्दल काही माहिती नाही
कळाले नाही तुम्हाला काय म्हणायचे आहे ते.. नक्की काय माहिती हवी आहे तुम्हाला माझ्याविषयी..?नितिन थत्ते Mon, 30/04/2012 - 08:56म्हणजे तुम्ही जुनेच कोणी आयडी आहात किंवा कसे ते ठाऊक नाही.मोदक Mon, 30/04/2012 - 09:20म्हणजे तुम्ही जुनेच कोणी आयडी आहात किंवा कसे ते ठाऊक नाही
जोपर्यंत आपली चर्चा पातळी सोडून जात नाहीये आणि दोघांपैकी कोणीही Davil's Advocate मोड मध्ये जात नाही तोपर्यंत खरेतर हा प्रश्न पडायचे कारण नव्हते. मी मिपावर खूप सुरूवातीपासून वाचनमात्र आहे. गेली ६ महिने प्रतिसाद द्यायला सुरू केले आहे. इतकीच ओळख सध्या पुरेशी आहे असे वाटते. ********************** यानंतर माझ्या आळशीपणाने मी विदा देण्यामध्ये चालढकल करीत राहिलो.. तो विदा वरती दिला आहे. तुमच्या मूळ विधानाला "इतिहासात हे एकमेव (किंवा कदाचित अजून एक) यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन असावे" असलेला माझा विरोध आजही आहे आणि त्याचा विदा वरीलप्रमाणे... आणखी विदा हवा असल्यास शोधाशोध करून देईनच!In reply to एकदा आपली खरडवहीतून चर्चाही by मोदक
-१
In reply to -१ by श्रीरंग_जोशी
इतिहासात हे एकमेव (किंवा
इतिहासात हे एकमेव (किंवा कदाचित अजून एक) यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन असावे.हे विधान (मला तरी) ढोबळ वाटत नाही.In reply to इतिहासात हे एकमेव (किंवा by मोदक
:-)
In reply to इतिहासात हे एकमेव (किंवा by मोदक
विदा जमवल्याबद्दल धन्यवाद.
In reply to एंटबे आणि कंदाहार ची तुलना चुकीची by सूर्याजीपंत
हा प्रतिसाद आवडला. खूपच नवीन
हिशेब चुकता करणे ?
In reply to हिशेब चुकता करणे ? by हुप्प्या
हिशेब?
In reply to हिशेब? by श्रीरंग_जोशी
त्या इंडिया टुडे आर्टिकल ची
In reply to त्या इंडिया टुडे आर्टिकल ची by पिंपातला उंदीर
पहिल्या प्रयत्नात नाही मिळाली.
In reply to पहिल्या प्रयत्नात नाही मिळाली. by श्रीरंग_जोशी
Operation Salami Slice
In reply to Operation Salami Slice by सूर्याजीपंत
Salami Slice चा एकदम सही दुवा
In reply to हिशेब? by श्रीरंग_जोशी
"गेल्या दोन दशकांत अनेकदा
In reply to "गेल्या दोन दशकांत अनेकदा by श्रीगुरुजी
सहमत
In reply to "गेल्या दोन दशकांत अनेकदा by श्रीगुरुजी
"इतर देशात कमांडो पाठवून
In reply to "इतर देशात कमांडो पाठवून by सूर्याजीपंत
वाह!
In reply to हिशेब? by श्रीरंग_जोशी
पण माझा प्रश्न केवळ कंदाहार प्रकरणावर आहे
In reply to पण माझा प्रश्न केवळ कंदाहार प्रकरणावर आहे by हुप्प्या
माझ्या परिने उत्तर
In reply to माझ्या परिने उत्तर by श्रीरंग_जोशी
तो काळ वेगळा होता ,
In reply to हिशेब चुकता करणे ? by हुप्प्या
+११११११११
१६० खासदारांना ओलिस म्हणुन पाठवायला हवे होते
In reply to १६० खासदारांना ओलिस म्हणुन पाठवायला हवे होते by प्रसाद१९७१
हे वस्तुतः शक्य आहे..?
In reply to हे वस्तुतः शक्य आहे..? by मोदक
अहो तो उपहास होता
In reply to अहो तो उपहास होता by प्रसाद१९७१
मजेशीर प्रतिसाद.
In reply to अहो तो उपहास होता by प्रसाद१९७१
१) अहो तो उपहास होता
In reply to १) अहो तो उपहास होता by मोदक
तो typo होता
लेखन विषयात
इतर माहिती
In reply to इतर माहिती by मैत्र
+१
In reply to इतर माहिती by मैत्र
त्या वेळी हेच कृत्य काँग्रेस
त्या वेळी हेच कृत्य काँग्रेस किंवा इतर कुठल्याही सत्ताधारी पक्षाने आणि परराष्ट्रमंत्र्याने केले असते तरी ते चूक म्हणता आले नसते..+११११११ अत्यंत ब्लंटली विचारतो.. आपल्यापैली एकजण किंवा आपले नातेवाईक त्या विमानात असते (देव करो आणि असे कधीही न घडो!) तर आपल्या काय भावना असत्या..? अतिरेक्यांना सोडले नसते तर होणार्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी, ती किंमत चुकवण्यासाठी आपण सर्वजण एक समाज म्हणून तितके प्रगल्भ आहोत का..?In reply to त्या वेळी हेच कृत्य काँग्रेस by मोदक
खूप मोठा मुद्दा आहे..
In reply to खूप मोठा मुद्दा आहे.. by मैत्र
मैत्रे यांचा हा प्रतिसाद
In reply to खूप मोठा मुद्दा आहे.. by मैत्र
सहमत.
In reply to त्या वेळी हेच कृत्य काँग्रेस by मोदक
हाच॑ भारत आणि ईस्त्राईल मध्ये फरक आहे
In reply to हाच॑ भारत आणि ईस्त्राईल मध्ये फरक आहे by लाल टोपी
ईस्त्राईलने ती कारवाई
ईस्त्राईलने ती कारवाई करण्यापूर्वी पंतप्रधान गोल्डा मायर यांनी ओलीसांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला होता त्यावेळी नातेवाईकांच्या जीवापेक्षा देशहित महत्वाचे आहे असे सांगून सरकार जो काही निर्णय घेईल त्याला पूर्ण पाठींबा दिला होता असे वाचल्याचे आठवते.तपशीलामध्ये फरक आहे... १) ऑपरेशन एंटबे दरम्यान "यित्झॅक राबीन" हे इस्राईलचे पंतप्रधान होते २) ओलीसांच्या नातेवाईकांनी पंतप्रधान राबीन यांच्या निवासस्थानावरील सैनिकांचे संरक्षक कडे तोडून व सैनिकांना धक्काबुक्की करून राबीन यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला होता व ओलीसांच्या सुटकेसाठी वाटाघाटी करा अशी जाहीर विनंती केली होती. बाकी समाजाच्या प्रगल्भतेबद्दल हेच म्हणावेसे वाटते की.. कितीही उदात्त विचार केला तरी वैयक्तीक पातळीवर आपण थोडेफार स्वार्थी असतो. "माझे नातेवाईक या विमानांमध्ये असते तर...?" या प्रश्नाचे आपल्याबाबतीतले उत्तर सर्व प्रश्नांना पूर्णविराम देते. इस्राईलमधले आणखी एक उदाहरण - एंटबे संदर्भातलेच.. एंटबे विमानतळावरती हल्ल्याच्या सुरूवातीच्या क्षणांदरम्यान योनी नेतान्याहू च्या आदेशावरून मुकी बेत्सर या योनीच्या सहकार्याने दोन सैनीकांवर गोळ्या झाडल्या होत्या व या गोळ्यांच्या आवाजामुळे "Element of Surprise" राहिले नाही व याचा परिणाम योनी नेतान्याहूच्या मृत्यूमध्ये झाला. या मुद्द्यावरून योनी नेतान्याहूचा लहान भाऊ व सध्याचे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू आणि मुकी बेत्सर यांनी एकमेकांवर उघड उघड आरोप केले आहेत. हे उदाहरण द्यायचा उद्देश हाच आहे की.. आपण आपल्या कुटुंबीयांच्या बाबतीत हळवे असतो, देशप्रेमापुढे वा देशाच्या भलाईपेक्षाही!In reply to ईस्त्राईलने ती कारवाई by मोदक
धन्यवाद
In reply to इतर माहिती by मैत्र
"कारगिल नुकतेच झाले होते ..
In reply to इतर माहिती by मैत्र
हा प्रतिसाद खूपच आवडला.
In reply to हा प्रतिसाद खूपच आवडला. by श्रीगुरुजी
या प्रकरणामध्ये भारताने
या प्रकरणामध्ये भारताने अतिरेक्यांपुढे गुडघे टेकले, वाजपेयी नेभळट निघाले, भारताची अब्रू गेली, सरकारने बेजबाबदारपणाचा कळस केला, इस्राएलसारखा चिमूटभर देश जे करू शकला ते भारत करू शकला नाही, कमांडो कारवाई करून अतिरेक्यांना मारणे सहज शक्य होते पण भारत सरकारने बेपर्वाई दाखविली इ. दोषारोप "लोकसत्ता"तून कुमार केतकर व इतर काही माध्यमे सातत्याने करत असतात. इथले काही सभासद असेच प्रतिसाद देत होते. या चर्चेतील काही माहितीपूर्ण प्रतिसादांमुळे त्यांना वस्तुस्थिती लक्षात आली असेल अशी आशा आहे.+१११११११११११११यापुढे
In reply to यापुढे by पुण्याचे वटवाघूळ
विमान पाडावे ?
श्रीरंग जोशी , सूर्याजीराव ,
In reply to श्रीरंग जोशी , सूर्याजीराव , by निनाद मुक्काम …
>>>चार दूतावास
In reply to श्रीरंग जोशी , सूर्याजीराव , by निनाद मुक्काम …
चार कॉन्स्युलेट्स असाव्यात
In reply to श्रीरंग जोशी , सूर्याजीराव , by निनाद मुक्काम …
"माझ्या माहितीप्रमाणे तालिबान
In reply to "माझ्या माहितीप्रमाणे तालिबान by श्रीगुरुजी
माझी लिहिण्यात चूक झाली
In reply to माझी लिहिण्यात चूक झाली by निनाद मुक्काम …
वाणिज्य दूतावास म्हणा :-)
In reply to "माझ्या माहितीप्रमाणे तालिबान by श्रीगुरुजी
माझी लिहिण्यात चूक झाली
In reply to "माझ्या माहितीप्रमाणे तालिबान by श्रीगुरुजी
आपला Northen Alliance ला
विकीपेडिया वर वाचली माहिती
कंदाहार प्रकरणावर चर्चा
In reply to कंदाहार प्रकरणावर चर्चा by बंडा मामा
कंदाहार प्रकरणावर चर्चा
कंदाहार प्रकरणावर चर्चा करण्यासाठी सेपरेट चर्चा करायची आहे त्यात पुन्हा एटांबे, पांडे वगैरे प्रकरणे कशाला.मान्य - अवांतर झाले आहे परंतु ते धागा काढला त्यावेळी माहेरच्या अव्हेरावरती दिलेले प्रतिसाद होते. मला या घटनांविषयी अधिक माहिती नसल्याने "स्वपार्टीसमर्थक" इथे थोडा प्रकाश टाकतील अशी अपेक्षा होती! (ह.घ्या.) एंटबेचा उल्लेख आला कारण अनेकदा तपशीलातील चुका बर्याच गोष्टींना वेगळे वळण लावतात... उदा लाल टोपी यांचा हा प्रतिसाद.ईस्त्राईलने ती कारवाई करण्यापूर्वी पंतप्रधान गोल्डा मायर यांनी ओलीसांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला होता त्यावेळी नातेवाईकांच्या जीवापेक्षा देशहित महत्वाचे आहे असे सांगून सरकार जो काही निर्णय घेईल त्याला पूर्ण पाठींबा दिला होताही वस्तुस्थिती नाहीये, आणि हा गैरसमज दूर करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला.कंदाहारचे निमीत्त पण काँग्रेस किती वाइट आणि भाजपा किती स्वच्छ ह्यावरच चर्चा हवी असेल तर ती माहेरचा अव्हेर मधे चालूच आहे.काँग्रेस वाईट आहे आणि भाजपा स्वच्छ आहे असे मी म्हणालो आहे का..? हे तुमचे मत असेल तर माझी काहीच हरकत नाही. तुम्ही भाजपाला वाईट म्हणाला आणि काँग्रेसला चांगले म्हणाला तरीही माझी हरकत नाही. ;-)In reply to कंदाहार प्रकरणावर चर्चा by मोदक
कॉग्रेसने केलेली चूक लक्षात
विशेष प्रवासी
विशेष प्रवासी
In reply to विशेष प्रवासी by निनाद मुक्काम …
विशेष माहितीबद्दल धन्यवाद
९/११
In reply to ९/११ by बेभान
९/११च्या हल्ल्यातील युनायटेड
९/११च्या हल्ल्यातील युनायटेड ९३ विमानातील प्रवाशांसारखे धाडसी कृत्य IC 814 प्रवाशांनाही का करता आले नाही?युनायटेड ९३ च्या प्रवाशांनी अपहरणाची बातमी देण्यासाठी आपापल्या कुटुंबीयांना मोबाईलवरून कॉल केले तेंव्हा त्यांना ९/११ बद्दल समजले. म्हणजेच त्यांना माहिती होते की ट्वीन टॉवर्स वर विमाने धडकली आहेत व आपणही असेच कुठेतरी आदळणार आहोत. अपहरण झाल्यानंतर युनायटेड ९३ काही मिनिटे अत्यंत कमी उंचीवरून उडत होते व युनायटेड ९३ च्या प्रवाशांनी बदललेला रूट फ्लाईट अटेंडंट्सच्या मदतीने "गेस" केला होता. या सर्व घटनांची परिणीती "मृत्यू निश्चित आहे" या धारणेत झाली व त्यामुळे जिवावर उदार होवून प्रवाशांनी कॉकपीटवर हल्ला केला असावा. त्या सर्व प्रवाशांनी दाखवलेल्या धाडसामुळे व्हाईट हाऊस / कॅपीटल बिल्डींग शाबूत राहिली असे म्हणायला हरकत नाही. अवांतर - ९/११ च्या घटनेमध्ये बहुतांश विमानांमध्ये अपहरणकर्त्यांनी प्रवाशांना फारसा उपद्रव न करता सरळ कॉकपीटवर हल्ला करून तेच ताब्यात घेतले होते व स्वतःला तिथे कोंडून घेवून विमाने लक्ष्यांवर धडकवली! यामुळे "नक्की काय चालले आहे" हे अनेक प्रवाशांना लक्षात आले नसावे अतीअवांतर - होलोकॉस्टमध्ये कैद्यांना जाणीवपूर्वक "मृत्यू निश्चित आहे" या भावनेची जाणीव करून दिली नव्हती. "जिवंत राहण्याची आशा" अशा घटनांमध्ये परिस्थिती आणि प्रतिकाराच्या मनस्थितीवर प्रभाव टाकत असावी. :-(जर त्या विमानातील १००+ देशबांधवानी ६ अतिरेक्यांचा मुकाबला करून इतिहास बदलला असता.तुमच्या भावना समजू शकतो परंतु अपहरणकर्त्यांनी रूपेन कट्याल ला भोसकून आणि मारहाण करून दिलेला मृत्यू दहशत बसवण्यास पुरेसा असावा असे वाटते.कुठल्याही अतिरेकी संघटनेचे धाडस झाले नसते पुन्हा इथे येवून दहशतवादी कारवाया करण्याचे.हा गैरसमज आहे - प्रतिकाराची एखादी घटना इतक्या टोकाची दहशत बसवू शकत नाही. (असे मला वाटते!)देशाची आणि देशवासियांची प्रतिमा संपूर्ण जगात उंचावली असती.पास. *********** इतिहास बदलणे, देशाची प्रतिमा उंचावणे वगैरे गोष्टी माझ्या"नंतर" घडणार असल्याने अशा घटनांमध्ये "नंतर" फॅक्टर निर्णायक ठरत असावा.बेल बॉटम चित्रपटाची कथा
In reply to बेल बॉटम चित्रपटाची कथा by diggi12
ते दिल्ली - श्रीनगर विमान (१९८४)
काही जणांना वस्तुस्थिती