काठमांडू ते कंदाहार - Flight IC 814
1998 साली झालेल्या विमान अपहरणाबद्दल अनेक ठिकाणी अनेकवेळा सतत चर्चा होत असते.
श्री श्रीरंग जोशींनी या घटनेसंदर्भात विस्तृत लेखन दिवाळी अंकामधील काठमांडू ते कंदहार या लेखामध्ये केले आहेच.
अनेक ठिकाणी होणारे विषयांतर पाहता या विषयावर हा धागा काढत आहे. या धाग्यामध्ये आपण या अपहरणासंदर्भात चर्चा करूया.
संपादक मंडळास नम्र विनंती.
१) माहेरच्या अव्हेरावरचे प्रतिसाद इथे शिफ्ट करणे शक्य असेल तर कृपया करावेत - तिथले विषयांतर टळेल.
२) सदर धागा अस्थानी किंवा अनावश्यक वाटत असेल तर जरूर उडवावा - माझी हरकत नाही.
सदर अपहरणादरम्यान अपहरणकर्त्यांकडून मारल्या गेलेल्या रूपेन कट्याल यांना श्रद्धांजली.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
आवडला!
माहेरच्या अव्हेरावर मी दिलेले
हा मुद्दा अत्यंत टाकावू
हाहहा....
या दोन नमुन्यांचा मूळ कंदाहार
?
http://www.misalpav.com
मला पण हा प्रतिसाद अकारण
टोकाची मते
नाही रे श्रीरंगा, ऑपरेशन
मान्य आहे
ठीक.
"पण तरीही प्रत्यक्ष वाटाघाटी
एंटबे आणि कंदाहार ची तुलना चुकीची
तुलना केलेली नाही
सविस्तर प्रतिसादाबद्दल
एंटबे चा विमानतळ हा इस्रायेल च्या एका माजी लष्करी अधिकार्यांनी ( कर्नल बारलेव) यांनी बांधला होता.माझ्या माहितीप्रमाणे कर्नल बारलेव्ह हे इस्रायल युगांडा प्रेमप्रकरणाच्या वेळी (इस्रायलने इदी आमीनची मिग / लढाऊ विमानांची मागणी फेटाळल्यावर हे प्रेमप्रकरण फिसकटले!) युगांडाच्या आर्मीला 'घडवण्यात' अग्रेसर होते. इदी आमीनचे त्यांच्याशी वैयक्तीक मैत्रीपूर्ण संबंध होते. एंटबे वाटाघाटींच्या वेळी इदी आमीनशी बोलणी करण्यामध्ये इस्रायली बाजूने कर्नल बारलेव्ह यांचा सहभाग होता.त्यामुळे इस्रायेलला विमानतळाची ब्लू प्रिंट उपलब्ध होती.सर्व ओलीस एंटबेवरील जुन्या टर्मीनल बिल्डींगमध्ये वसवले गेले होते. ही माहिती खुद्द इदी आमीनने बोलता बोलता कर्नल बारलेव्ह यांना दिली होती. (ओलीस ठीक आहेत, ते जुन्या टर्मीनल मध्ये आहेत, त्यांना चादरी व आवश्यक वैद्यकीय सेवा पुरवल्या आहेत!) या टर्मीनल बिल्डींगचे बांधकाम 'सोलेल अँड बोनेह' या इस्रायली कंपनीने केले होते त्यामुळे त्या ब्लू प्रिंट्स विनासायास इस्रायली आर्मीला उपलब्ध झाल्या.शिवाय १९९५ पासून, त्या विमानतळावर फक्त सौदी आणि पाकिस्तान याच दोन देशांची विमाने उतरत असल्याने कोणाहीकडून काहीही माहिती मिळण्याचा संभाव नव्हता.वेळोवेळी सोडल्या गेलेल्या ओलीसांकडून इस्रायलने माहिती मिळवली. अगदी बेनगाझी येथे पहिला थांबा घेतल्यानंतर गरोदर असलेल्या पॅट्रिशीया हॅमन या महिलेपासून ते इदी आमीन मॉरीशसला जाण्याआधी सोडण्यात आलेल्या ८० पेक्षा जास्ती 'नॉन ज्यू' ओलीसांपर्यंत सर्वांच्या मुलाखती त्या त्या देशात जावून इस्रायली तुकड्यांनी घेतल्या होत्या.एंटबे मध्ये केनियानी परतीच्या प्रवासात इस्रायेलच्या विमानांना इंधनासाठी उतरण्याची परवानगी दिली होती. तशी कोणतीही शक्यता कंदाहार प्रकरणामध्ये नव्हती.या विधानाची आवश्यकता / भारताने कंदाहारवर हल्ला केला असता तर एखाद्या 'स्टॉप ओव्हरची' आवश्यकता कळाली नाही. इस्रायलला नैरोबी विमानतळाची गरज होती कारण "तेलअवीव-लाल समुद्र-इजिप्त-सुदान-सौदी अरेबीया-जिबोती बंदर-केनया-सोमालिया-इथिओपीया-व्हिक्टोरीया तलाव-एंटबे" या मार्गाने ४००० किलोमीटर पेक्षा जास्त प्रवास करून विमाने एंटबे ला पोहोचली होती. इंधन भरल्याशिवाय एंटबे ते इस्रायल हा परतीचा प्रवास शक्य नव्हता म्हणून केनियामध्ये थांबा घेतला गेला होता. (सुटकेसाठी गेलेल्या इस्रायली विमानांना केनिया मध्ये इंधन भरण्याची परवानगी एंटबेला उतरण्या आधी काही मिनिटे मिळाली होती, ही परवानगी मिळाली नसती तर एंटबे विमानतळावरील इंधन चोरून इस्रायली विमानांमध्ये भरण्याचा प्लॅन आखला गेला होता व या साठी एक मोबाईल फ्युएल पंप इस्रायली विमानांमध्ये होता. हल्याच्या धामधुमीमध्ये इस्रायलने एंटबे विमानतळावरील रशीयन मशीनरी पळवली. या ढापलेल्या मशीनरीला जागा व्हावी म्हणून हा पंप (नाईलाजाने) एंटबे विमानतळावर सोडून देण्यात आला. हवाई हल्ल्याचा रूट.एकदा आपली खरडवहीतून चर्चाही
एकदा आपली खरडवहीतून चर्चाही झाली होती असे स्मरते.
बरोबर.. खालीलप्रमाणे आपली चर्चा झाली होती. सर्वप्रथम "ऑपरेशन एंटेबी" या धाग्यावर गणपाच्या या प्रतिसादावरून चर्चेस प्रारंभ झाला.गणपा - Mon, 23/04/2012 - 13:26मस्त चित्रपट आहे. कुंद्याच्या सांगण्यावरुन पाहिला. तो पहात असताना कंदहार विमान अपहरणाच्या वेळी भारताला अस एखादं पाउल का उचलता आल नाही याची राहुन राहुन लाज वाटली.नितिन थत्ते - Mon, 23/04/2012 - 13:37गणपा भौ मनाला लावून घेऊ नका. इतिहासात हे एकमेव (किंवा कदाचित अजून एक) यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन असावे. गेल्यावर्षी इस्रायलने एका अपहृत सैनिकाच्या बदल्यात १०२७ कैद्यांना सोडले होते. त्याखेरीज वेळोवेळी अनेक कैद्यांना सोडण्यात आलेले आहे.मोदक - Mon, 23/04/2012 - 19:52इतिहास - जगाचा की इस्त्रायलचा..? "यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन" ची व्याख्या काय..? म्हणजे Acceptable Civilian Casuality Ratio वगैरे..?नितिन थत्ते - Mon, 23/04/2012 - 20:00जगाच्याच (२० व्या शतकापासूनच्या) इतिहासात असेल. तुम्हाला आणखी बरीच उदाहरणे सापडली तर कळवावी.मोदक - Mon, 23/04/2012 - 20:16सांगतो... पण तुम्ही व्याख्या सांगा ना... (हॉस्टेज रेस्क्यू या विषयावर ठरवून वाचलेले आहे म्हणून विचारले)येथून पुढील चर्चा खरडवहीमध्ये..
मोदक Wed, 25/04/2012 - 00:19तुमच्या प्रतिसादातून "दहशतवाद्यांचा Success Rate जास्त आहे" असा संदेश जातो आहे का..?नितिन थत्ते Wed, 25/04/2012 - 10:16तसा मेसेज नाही. मेसेज आहे की कुणीतरी नेहमीच डेअरडेव्हिल असतो आणि कुणी(पक्षी-भारत) नेहमी कमकुवत असतो असे नसते. आपण ज्याला डेअरडेव्हिल समजतो त्यालाही कित्येकवेळा तडजोड करावी लागते.मोदक Thu, 26/04/2012 - 01:08आपण ज्याला डेअरडेव्हिल समजतो त्यालाही कित्येकवेळा तडजोड करावी लागते
"कित्येकवेळा" आणि जगाच्या "इतिहासात एखादेच / दुसरे" हे दोन शब्द वेगवेगळ्या अर्थछटा दाखवतात.नितिन थत्ते Thu, 26/04/2012 - 14:05बहुतेकवेळा तडजोडच करावी लागते असे वाचावे.मोदक Sat, 28/04/2012 - 00:37बहुतेकवेळा तडजोडच करावी लागते असे वाचावे.
जगातले सगळे देश Commandos, Neavy Seals, ATS असे आणि यांसारखे बरेच Highly Trained Units पोसून "बहुतेकवेळा तडजोडच करतात" हे मत वाचून आश्चर्य वाटले. पण तुमच्याकडून असाच प्रतिसाद अपेक्षीत होतानितिन थत्ते Sat, 28/04/2012 - 10:17तुमचा पॉईंट माझ्या लक्षात येत नाहीये. कमांडो, एटीएस वगैरे एरवी काम करतातच. भारतातही करतात. जेव्हा ओलीसांच्या सुटकेचा प्रश्न असतो तेव्हा 'बहुतेकवेळा तडजोड' करावी लागते. अपहरणकर्त्यांना ठार मारून किंवा इतर मार्गाने, कैद्यांना सोडण्याची मागणी मान्य करता ओलीसांची सुटका झाल्याची उदाहरणे विरळाच असतात. (इस्रायल- ज्याच्या सो कॉल्ड खंबीरपणाचे भारतात अवास्तव कौतुक होत असते त्यानेही बहुधा ही एकच कारवाई केली आहे.... कदाचित आणखी एखादी असेल. गणपा यांना मी दिलेल्या प्रतिसादात इस्रायलने किती वेळा कैद्यांना सोडले आहे याची विकीयादीच दिली आहे. तरीही इस्रायल नेहमीच कणखर असतो आणि भारत नेहमीच बोटचेपेपणा करतो असे म्हणण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला आहे. परंतु मला तो वाद चालवावासा वाटत नाही. माझ्या दृष्टीने तसे नाही एवढे दाखवण्यापुरेसा विदा आहे.मोदक Sat, 28/04/2012 - 11:17सर्वप्रथम - मी वाद घालत नाहीये. (तुमचा अनुभव आणि अभ्यासापुढे माझ्या मर्यादा मला माहीत आहेत.)तुमचा पॉईंट माझ्या लक्षात येत नाहीये.
पॉईंट हा आहे की "इतिहासात हे एकमेव (किंवा कदाचित अजून एक) यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन असावे" हे खूप धाडसी विधान आहे..कमांडो, एटीएस वगैरे एरवी काम करतातच. भारतातही करतात. जेव्हा ओलीसांच्या सुटकेचा प्रश्न असतो तेव्हा 'बहुतेकवेळा तडजोड' करावी लागते. अपहरणकर्त्यांना ठार मारून किंवा इतर मार्गाने, कैद्यांना सोडण्याची मागणी मान्य करता ओलीसांची सुटका झाल्याची उदाहरणे विरळाच असतात.
"यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन" किंवा "बहुतेकवेळा तडजोड" ची तुमची व्याख्या काय आहे..? बेसलान किंवा मॉस्को थीएटर सारखा भयानक प्रकार होवून सुध्दा ते सरकार संपूर्ण जबादारी स्वीकारत आहे... व्याख्या कळाली तर आपल्याला एका पातळीवर येणे सोयीचे पडेल असे वाटते. (१००% ओलीस जिवंत सुटावेत, प्रॉपर्टी / विमान डॅमेज होवू नये, सगळे दहशतवादी ठार व्हावेत आणि एकही गोळी न झाडता हे सगळे व्हावे असे काही आहे का..?)(इस्रायल- ज्याच्या सो कॉल्ड खंबीरपणाचे भारतात अवास्तव कौतुक होत असते त्यानेही बहुधा ही एकच कारवाई केली आहे.... कदाचित आणखी एखादी असेल.)बर्याच आहेत.. तुम्ही व्याख्या सांगीतली की विदा जमवून पाठवतो.गणपा यांना मी दिलेल्या प्रतिसादात इस्रायलने किती वेळा कैद्यांना सोडले आहे याची विकीयादीच दिली आहे.
आपण भरलेल्या अर्ध्या ग्लासाकडे बघुया... तसेच तुम्ही १० पैकी ५ विषयात नापास झाला व मी ४ विषयात नापास झलो म्हणोन मी हुषार ठरत नाही. भारत नेहमीच बोटचेपेपणा करतो असे म्हणण्याचे स्वातंत्र्य तुम्हाला आहे. हे मी कधीही म्हटले नाहीये. आणि परिस्थिती कितीही वाईट असली / कशीही असली तरी हे विधान खूप धाडसाचे ठरेल. तुमचा प्रतिसाद विनाकारण Defensive वाटला.नितिन थत्ते Sat, 28/04/2012 - 11:53व्याक्या करणे फार अवघड नसावे. ८०% पेक्षा जास्त ओलीस जिवंत सुटावेत. अपहरणकर्त्यांच्या काहीही मागण्या मान्य होऊ नयेत. [सुरक्षा दलांमधील कॅज्युअल्टीविषयी काही क्रायटेरिया नाही]. भारताची २६/११ कारवाई या ८०% क्रायटेरियामध्ये ऑलमोस्ट बसते. परंतु त्यावेळी अतिरेक्यांच्या काही मागण्याच नव्हत्या. ७८% ओलीसांची सुटका झाली. (मीडियाद्वारा सुरक्षा दलांच्या हालचालीविषयी इत्थंभूत माहिती अतिरेक्यांना मिळत असताना मिळालेले यश खरे तर जास्तच आहे). परंतु या कारवाईला काही एण्टेबीच्या कारवाईचा दर्जा देता येणार नाही. भारताला जेव्हा मवाळ भूमिका घ्यावी लागते (उदा कंदाहार प्रकरण) तेव्हा लोक नेहमीच या एण्टेबी ऑपरेशनचे उदाहरण देतात. तुम्ही कोण हे मला ठाऊक नाही म्हणून तुम्ही असे म्हणता की नाही याबद्दल काही माहिती नाहीमोदक Sat, 28/04/2012 - 12:02व्याक्या करणे फार अवघड नसावे. ८०% पेक्षा जास्त ओलीस जिवंत सुटावेत. अपहरणकर्त्यांच्या काहीही मागण्या मान्य होऊ नयेत. [सुरक्षा दलांमधील कॅज्युअल्टीविषयी काही क्रायटेरिया नाही].
ओक्के..भारताला जेव्हा मवाळ भूमिका घ्यावी लागते (उदा कंदाहार प्रकरण) तेव्हा लोक नेहमीच या एण्टेबी ऑपरेशनचे उदाहरण देतात.
तुलना होवूच शकत नाही. IC 814 ने अमृतसरहून उड्डाण का केले..? हा मूळ प्रश्न आहे माझ्यादृष्टीने.तुम्ही कोण हे मला ठाऊक नाही म्हणून तुम्ही असे म्हणता की नाही याबद्दल काही माहिती नाही
कळाले नाही तुम्हाला काय म्हणायचे आहे ते.. नक्की काय माहिती हवी आहे तुम्हाला माझ्याविषयी..?नितिन थत्ते Mon, 30/04/2012 - 08:56म्हणजे तुम्ही जुनेच कोणी आयडी आहात किंवा कसे ते ठाऊक नाही.मोदक Mon, 30/04/2012 - 09:20म्हणजे तुम्ही जुनेच कोणी आयडी आहात किंवा कसे ते ठाऊक नाही
जोपर्यंत आपली चर्चा पातळी सोडून जात नाहीये आणि दोघांपैकी कोणीही Davil's Advocate मोड मध्ये जात नाही तोपर्यंत खरेतर हा प्रश्न पडायचे कारण नव्हते. मी मिपावर खूप सुरूवातीपासून वाचनमात्र आहे. गेली ६ महिने प्रतिसाद द्यायला सुरू केले आहे. इतकीच ओळख सध्या पुरेशी आहे असे वाटते. ********************** यानंतर माझ्या आळशीपणाने मी विदा देण्यामध्ये चालढकल करीत राहिलो.. तो विदा वरती दिला आहे. तुमच्या मूळ विधानाला "इतिहासात हे एकमेव (किंवा कदाचित अजून एक) यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन असावे" असलेला माझा विरोध आजही आहे आणि त्याचा विदा वरीलप्रमाणे... आणखी विदा हवा असल्यास शोधाशोध करून देईनच!-१
इतिहासात हे एकमेव (किंवा
इतिहासात हे एकमेव (किंवा कदाचित अजून एक) यशस्वी रेस्क्यू ऑपरेशन असावे.हे विधान (मला तरी) ढोबळ वाटत नाही.:-)
विदा जमवल्याबद्दल धन्यवाद.
हा प्रतिसाद आवडला. खूपच नवीन
हिशेब चुकता करणे ?
हिशेब?
त्या इंडिया टुडे आर्टिकल ची
पहिल्या प्रयत्नात नाही मिळाली.
Operation Salami Slice
Salami Slice चा एकदम सही दुवा
"गेल्या दोन दशकांत अनेकदा
सहमत
"इतर देशात कमांडो पाठवून
वाह!
पण माझा प्रश्न केवळ कंदाहार प्रकरणावर आहे
माझ्या परिने उत्तर
तो काळ वेगळा होता ,
+११११११११
१६० खासदारांना ओलिस म्हणुन पाठवायला हवे होते
हे वस्तुतः शक्य आहे..?
अहो तो उपहास होता
मजेशीर प्रतिसाद.
१) अहो तो उपहास होता
तो typo होता
लेखन विषयात
इतर माहिती
+१
त्या वेळी हेच कृत्य काँग्रेस
त्या वेळी हेच कृत्य काँग्रेस किंवा इतर कुठल्याही सत्ताधारी पक्षाने आणि परराष्ट्रमंत्र्याने केले असते तरी ते चूक म्हणता आले नसते..+११११११ अत्यंत ब्लंटली विचारतो.. आपल्यापैली एकजण किंवा आपले नातेवाईक त्या विमानात असते (देव करो आणि असे कधीही न घडो!) तर आपल्या काय भावना असत्या..? अतिरेक्यांना सोडले नसते तर होणार्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी, ती किंमत चुकवण्यासाठी आपण सर्वजण एक समाज म्हणून तितके प्रगल्भ आहोत का..?खूप मोठा मुद्दा आहे..
मैत्रे यांचा हा प्रतिसाद
सहमत.
हाच॑ भारत आणि ईस्त्राईल मध्ये फरक आहे