Skip to main content

आठवण...

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 06/03/2013 00:10 या दिवशी प्रकाशित केले.
आठवणींनी जीव माझा बेचैन किती जाहला? सखये तुझा कुठे तो... माझाही न राहिला. दूर किती दूर जाशी लागे मज हुरंहूरं शांत आहे ही तृप्तता की भावनांचे काहूरं? वेड असे भीत आहे हाक कशी देऊ मी? का तुझिया स्मरणाने फक्त तृप्त होऊ मी??? आसवांचे नजराणे का मागे प्रीत ही? सहजाच्या जगण्याची का अल्लड रीत ही? दु:ख्ख असे आज नाही जरी न तुझा राहिलो देवालयी पुष्पांसम निर्माल्य अता जाहलो. वेड्या त्या उद्यानी तार कुणी छेडिली? कृष्ण नव्हे कृष्ण अन् राधा हि न राधा राहिली...
काव्यरस
लेखनविषय:

वाचने 5658
प्रतिक्रिया 35

प्रतिक्रिया

वेड्या त्या उद्यानी तार कुणी छेडिली? कृष्ण नव्हे कृष्ण अन् राधा हि न राधा राहिली.
. आत्माजी? सुरेख भाऊ! फक्त पहिल्या कडव्यात "जीवा"बद्दल बोलताय ते लक्षात येत नाही. अन "माझा हि" जरा चुकलय का? ते 'ही' हवंय. अन ते माझा ला जोडुन हवंय.
दु:ख्ख असे आज नाही जरी न तुझा राहिलो देवालयी पुष्पांसम निर्माल्य अता जाहलो
हे अन शेवटच कडव काव्याची उच्च्त्तम पातळी गाठतात. मस्त रे आत्मुस! मस्त भावा! लिहित रहा.

In reply to by धन्या

मस्त कविता हो बुवा.. धन्या, नक्की पुणेकर का..? त्या असिधा(व्हावामा)विजि संघाचे काय झाले? ;-)

In reply to by पैसा

हल्ली तुम्हाला तुमचा सूर सापडलेला दिसतोय.
असंच काही नाही. कदाचित त्यांचा सूर हरवलाही असेल म्हणून ईतक्या सुंदर कविता लिहित आहेत ते. ;)

वाह बुवा... भन्नाट
वेड्या त्या उद्यानी तार कुणी छेडिली? कृष्ण नव्हे कृष्ण अन् राधा हि न राधा राहिली...
या साठी एक मस्तानी लागू तुम्हाला.

वेड्या त्या उद्यानी तार कुणी छेडिली? कृष्ण नव्हे कृष्ण अन् राधा हि न राधा राहिली...
फक्त हीच ओळ कवितेच्या गाभ्याशी विसंगत वाटली. पण एकुणच कविता अप्रतिम. बहुदा शेवटचा पॅरॉ समजुन घेण्यात माझिच चुक होत असेल.

विडंबनाचा आला कंटाळा वाल्याचा वाल्मिकी झाला एक सूर प्रितीचा हरवला परि कवनास सूर गवसला बुवा आमची कविता कशी वाटते. पण सांप्रत आपण कहर चालविला आहे. राधा या नावात काही स्पेलिंग मिस्टेक झाली आहे का ? ( इथे डोळा बारीक केलेली स्मायली ! ) .

In reply to by चौकटराजा

एक सूर प्रितीचा हरवला
हे कधी झालं. बुवा बोलले नाहीत काही.
राधा या नावात काही स्पेलिंग मिस्टेक झाली आहे का ?
कदाचित पुर्ण शब्दच चुकीचा असेल. राधा हे कवी जयदेव याने गीतगोविंद या काव्यात उभं केलेलं काल्पनिक पात्र आहे असं वल्ली म्हणतो. ;)

In reply to by धन्या

काही वेळा काल्पनिक प्रियेवर ही प्रेम करण्यात मजा असते राव ! नवरंग चित्रपटात " मोहिनी" त गुंतलेला कवि बरंच काही उत्त्तम काव्य करून जातो. बुवाही आता राहकवि असले तरी राजकवि होतील एक दिवस !

In reply to by ५० फक्त

>>>> अभासिंधाव्हावामा संघातर्फे ते मधले जिपा राहिले काय? अभासिंधाव्हावामाजिपा संघातर्फे

In reply to by प्रचेतस

ओ पिमचिनवाले, एकदा तरी अशी तरल, भावस्पर्शी, हळूवार, मृदू, मयुरपंखी कविता लिहा आणि मग आमच्या संघाला जिलेबीपाडू संघ म्हणा.

In reply to by धन्या

हॅ हॅ हॅ , धन्या तुम्हाला सियाचिन म्हणायचे आहे का ? कारण जिलबीचे व्यापारी चांद्या पासून बांद्या पर्यंत पसरले आहेत.

कविता हुरहुर लावून गेली. अवांतरः "सहजाच्या जगण्याची का अल्लड रीत ही?" हे 'सहज' कोण म्हणे? आपले मिपावरचे सहज मामा तर नव्हेत? :D

In reply to by जेनी...

@गुर्जि पीरमात पडलेत राव ! १०१टक्का ..... >>> =)) बालिका... महा डँबिस =)) आंम्ही गेली १५ वर्ष पिरेमात पडूनच आहोत... :-p अता उचला कुणितरी...असं म्हणायची येळ आलीया. =))

In reply to by अत्रुप्त आत्मा

>>>>आंम्ही गेली १५ वर्ष पिरेमात पडूनच आहोत... अता उचला कुणितरी...असं म्हणायची येळ आलीया. तर बुवांचे वय किती????

बुवा कविता पुन्हा एकदा वाचली, तुम्ही ते आपलं विडंबनाचंच बघत जा, नका उगा काहीतरी हळवं लिहित जाउ, विवि फार बोअर होतं आहे, विवि म्हणजे गविंचा भाउ नव्हे, विना विडंबन.