Skip to main content

राष्ट्रवादीची राजेशाही

लेखक हुप्प्या यांनी रविवार, 17/02/2013 00:51 या दिवशी प्रकाशित केले.
आजचा जाणता राजा असा ज्याचा लौकिक बनवला जातो आहे अशा शरद पवारांच्या पक्षात सध्या थाटामाटात विवाहसोहळे, वाढदिवस वगैरे साजरे करायची अहमहिका सुरु असावी असे वाटते आहे. नेहमीप्रमाणे महाराष्ट्रात यंदाही दुष्काळाचे रडगाणे चालू असल्यामुळे राजकीय दृष्ट्या असे श्रीमंती उधळपट्टीचे जाहीर प्रदर्शन आपल्या पक्षाला गोत्यात आणू शकते हे जाणत्या राजाने त्वरित जाणले त्यामुळे संबंधित इसमाची, ज्याचे नाव भास्कर जाधव (नगरविकास राज्यमंत्री) खरडपट्टी काढली. बहुधा ती खरडपट्टी मी मारल्यासारखे करतो तू रडल्यासारखे कर टाइपाची असावी असे वाटते. कारण जाणत्या राजाने नापसंती व संबंधित खरडपट्टीलेल्या माणसाने माफी मागितल्यावरही सोहळ्यांची मालिका अव्याहत चालू आहे. भास्कर जाधवाची सबब अशी होती की लग्नाचा अफाट खर्च कुण्या काँट्रॅक्टरने केला म्हणे आणि जाधवाला कल्पनाच नव्हती की इतका खर्च होतो आहे! वा! काय स्पष्टीकरण आहे! आता हा कंत्राटदार काय हरिश्चंद्र आहे का की उगाचच कोट्यावधी रुपये उधळेल? तो आता पुढच्या कंत्राटात सगळे दामदुपटीने वसूल करणार हे तुम्ही आम्हीही जाणतोच की. पवार आता मोठ्या साधेपणाच्या गमजा करत आहेत पण त्यांच्या मुलीचा लग्नसोहळाही आलिशान होता असे अंधुकसे आठवते आहे. चुभूद्याघ्या. इतका अमाप पैसा मिळवणार्‍या आमदार, खासदार, नगरसेवक, मंत्र्यांना आपली श्रीमंती मिरवायची दुसरी संधी कुठे मिळणार? उगाच लोकसेवक वगैरे ढोंगे करण्यापेक्षा, होय आम्ही आहोतच पैसेवाले आणि म्हणूनच ते उधळतो आहे हे मान्य करावे झालं. साधेपणा, काटकसर वगैरे कालबाह्य मूल्ये आहेत असे वाटते. तुमचे काय मत?

वाचने 14533
प्रतिक्रिया 82

प्रतिक्रिया

त्यांच्यात धमक आहे मिळवायची आणि उधळायची. तुम्हाला जमत नाही म्हणुन मनगट चावत बसले आहात.

In reply to by श्री गावसेना प्रमुख

हा प्रश्न लेखकाला का मला? मला काहीच प्रोब्लेम नाही कोणी २५००० च्या जेवणावळी घातल्या तर. माझ्याकडे पैसे असतील तर मी पण घालीन जेवणावळी. तुम्हाला सुद्धा बोलाविन.

In reply to by प्रसाद१९७१

त्या जेवणावळीचा पैसा जनतेकडुन लुटलेला आहे,कळत नकळत.म्हणुन ओरड चाललेली आहे

In reply to by श्री गावसेना प्रमुख

तुमच्यात हिंम्मत नाही पैसा कमवायची ( लुटायची किंवा कसाही ) म्हणुन ही जळजळ. जनते कडुन पैसा लुटणे हे काही सोपे काम नाही.

In reply to by प्रसाद१९७१

धमक चांगले काम पूर्ण करण्यात लागते. लोकांना फसवून, लुबाडून, जनतेचा पैसा लाटून पैसा कमवण्यात धमक नाही; हरामखोरपणा लागतो. तो या राजकारण्यांमध्ये पुरेपूर असतो. दमदाटी करून जमिनी लाटायच्या; बंगले हस्तगत करायचे; लोकांचा घामाचा पैसा स्वतःच्या रक्तात, हाडामासांत जिरवायचा; येणार्‍या उद्योगांकडून लाच खायची आणि वरून नेहमीच लोकांच्या तोंडाला पाने पुसायची याला काय म्हणतात ते दुष्काळात होरपळणार्‍या आणि स्वातंत्र्य मिळाल्यापासून (म्हणजे तब्बल ६६ वर्षे) रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, वाहतूक सेवा, शिक्षण या प्राथमिक गरजांसाठी झिजणार्‍या गावोगावच्या सामान्य माणसाला विचारा. इतक्या वर्षांत राजकारण्याची पोटे मात्र तट्ट फुगतच गेली. कालचे दीडदमडीचे गावपुढारी आजचे कोट्यधीश झाले. शेकडो कोटींची माया काय यांच्या बापजाद्यांनी कष्टाने आणि प्रामाणिकपणे घाम गाळून कमावली आहे? नाही, ती त्यांनी देशाला आणि लोकांना विकून कमवली आहे. सगळेच राजकारणी एकाच माळेचे मणी आहेत. शरद पवार धडाडीचे, मराठी मातीतले, मर्द मराठा म्हणून त्यांची तळी जनतेने उचलली पण ते ही कुचकामी निघाले. त्यांच्या पक्षाने गुंडगिरीचे आणि जातीपातीचे राजकारण महाराष्ट्रात रुजवले. भ्रष्टाचाराची इतकी प्रकरणे कशी काय जाऊन बरोब्बर शरद पवारांना जाऊन चिकटतात? बाकी छगन भुजबळ, तटकरे वगैरेंबाबत तर बोलायलाच नको. स्वतःची स्वतंत्र संस्थानेच तयार केली आहेत या लोकांनी जनतेच्या घामाच्या पैशातून. आणि यांनीच नाही तर प्रत्येक पक्षाच्या नेत्याने अशी संस्थाने उभी केली आहेत. काँग्रेस असो, शिवसेना असो, भाजप असो...सगळे सारखेच लबाड आणि स्वार्थी! एखादाच मोदी गुजरातसारख्या राज्यात खरा विकास घडवून आणू शकतो. बाकी सगळी चोर माकडे! त्यांची संपत्ती त्यांना उधळू देत. आपल्याला मनगट चावत बसायची काही गरज नाही. त्यांच्या संपत्ती उधळण्याचे परिणाम काय होतात हे ही आपल्याला चांगलेच ठाऊक आहे. सुरेश जैन तुरुंगात आहे, कलमाडी दिवसभर घरी बसून माशा मारतात असे ऐकले आहे. अजून काय काय...

भाबडेपणा आहे समीरसुर - धमक कुठलीही कृती करायला लागते.
दीडदमडीचे गावपुढारी आजचे कोट्यधीश झाले
जर हे दिड दमडीचे लोक जर कोट्याधीश झाले असतील तर तुम्ही तर बन्द्या रुपयाचे, तुम्ही तर अब्जाधीश होयला पाहिजे होते.
लोकांनी जनतेच्या घामाच्या पैशातून. आणि यांनीच नाही तर प्रत्येक पक्षाच्या नेत्याने अशी संस्थाने उभी केली आहेत
मग हेच लोक निवडुन कसे येतात? म्हणजे जनता मुर्ख आहे हे तुम्ही कबूल करताय. मुर्ख लोकांना काय अधिकार दुसर्‍या लोकांच्या कर्तबगारीला हिणवण्याचा

In reply to by प्रसाद१९७१

मग हेच लोक निवडुन कसे येतात?
१. कारण दुसरा पर्याय नाही. २. राजकारणी लोक अश्या कमावलेल्या पैशात, त्यांच्या निवड्णुक क्षेत्रात बर्‍याचश्या दुय्यम दर्ज्याच्या बाबी पुरसक्रूत करतात. उ.दा. रुग्णवाहिनी, अंत्यविधी. निवड्णुकीच्या वेळी पैसे/दारु वाटणे. मुळात प्रश्न तो नाही. पैसे सगळेच खातात, पण विधायक/रचनात्मक कामे आधी करा. पैसा कमावणे हे दुय्यम महत्वाचे असावे. आजच्या महाराष्ट्रात ९९% राजकरणी पैसे खाण्याला प्रथम महत्व देतात. उगाच नाही यांच्या मलेशियात खाणी आणि न्युझिलंडात शेकडो एकर जागा आहेत.

राष्ट्रवादी/काँगेस इतर सगळेच एका माळेचे मणी आहेत मग कशाला ठणाना चालू आहे? कोण योग्य आहे ते तरी सांगा आम्हाले. शरद पवार हे नाव बिलं फाडायला सोपे आहे. कुणाही शेंबड्याने उठावे आणि काहीही बकावे......

In reply to by भिकापाटील

जाणत्या राजाने जाणून बुजून ह्या विषयाला हात घातला आहे. थाटामाटात लग्ने होणे हे कायम चालूच असते. पण दुष्काळ असताना अशी लग्ने होऊ नयेत अशी अपेक्षा कुणी बरे केली? जाणत्या राजाने. हा एक भंपकपणा होता निवडणुका जवळ आल्यात म्हणून केलेला. आणि त्याविषयी टीकाटिप्पणी करणे योग्यच होते.. अगदी राजू शेट्टीनेही ह्या बाबतीत जाणत्या राजावर ताशेरे ओढले आहेतच. जाणत्या राजाने जनताही हळुहळू जाणती होते आहे हे लक्षात घ्यावे. -- एक शेंबड्या पोर

लक्षात येतय का ?शेवटी जाधव पुर्वाश्रमीचे शिवसैनिक . त्यांनी अशी अनावश्यक उधळपट्टी करणे थोरल्या पवारांना कसे रुचेल.. येऊनजाऊन जाधव राष्ट्रवादीच्या वळचणीला गेलेले एक क्षुल्लक आश्रित त्यांनी नव्या धन्याची बरोबरी करण्याचे धाडस करावे हे कसे जमायचे?बाकी दुष्काळाच्या नावे बोंबा मारणे हे फक्त दाखवायला. इतके वाईट वाटतेय दुष्काळी परिस्थितिचे तर स्वतःचे भरल्ेल्े खजिन्े स्वयंघोषित जाणत्या राजाने दुष्काळाने पोळलेल्यांसाठी खुले करावे कुणी अडवलय?

शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यानी आपल्या सुपुत्राच्या लग्नात काय दिवे लावले आणि पैशाचा कसा चुराडा कसा केला ते बघा. मायला असले नेते आमच्या मराठवाड्यतच का पैदा होतात https://www.google.co.in/url?sa=t&rct=j&q=&esrc=s&source=web&cd=1&cad=r…