छान, सुंदर हलका फुलका चित्रपट... "जय महाराष्ट्र ढाबा बठींडा".......
अभिजित खांडेकर, प्रार्थना बेहेरे... ही नवीन जोडगोळी आपल्याला या चित्रपटात पाहायला मिळेल.
नवीन फ्रेश लुक ही या अवधूत गुप्ते निर्मित चित्रपटाची मेन यु.एस. पी....
चित्रपटाची सुरुवातच आपल्या मराठमोळ्या पद्धतीने नामावलीने होते (नावं इंग्रजीत होती.. ती खटकली). पण त्याचबरोबर मराठमोळी पद्धतीच्या डिशेश दाखवल्यात, हे छान वाटलं.
पहिला सीन अभिजित खांडेकरचा फ्रेश लुक पंजाबी स्टाईलमध्ये .... (दाढी ठेवलीये ना थोडी म्हणून..). पंजाब मध्ये मराठी ढाब्याला त्याच्या एक वर्ष झालेलय.. सगळे पंजाबी चकित होतात, अर्रे वा एक मराठमोळा माणूस इथे येउन समर्थपणे ढाबा चालवून दाखवतो, तेही मराठमोळ्या पद्धतीने.. छान.. पण नेहमी प्रमाणे खार खाणारे असणारच ना या यशावर, नाहीतर माणूस तो कसला.. पण इथे पंजाबी खार खायला लागतात...
अभिजितची म्हणजे 'सयाजी निंबाळकर' ची भेट योगाने सहज एका सुंदर मुलीशी होते... प्रार्थना बेहेरे म्हणजे जसपिन्दर कौर--जस...(दिल गार्डन गार्डन झाला हो इथे...तिला पाहून.. :-*).. प्रेमाची पहिली ती नजर... घायाळ झाला 'सया'.. म्हणजे सयाजी हो आपला 'जस' ला पाहून..... :-D
तर असा घायाळ झालेला आपला मर्द मराठा शेर 'सया', 'जस'चा पिच्छा काही सोडायला तयार नाही. दिलं सरळ आपलं 'दिल' काढून, आय मीन 'विसिटिंग कार्ड'.... आणि दिलं आमंत्रण दुस-या दिवशी भेटण्याच आपल्या मराठी ढाब्यात, आणि 'जस' येतेही... (चित्रपटात 'प्रथम' खटकलेली गोष्ट). नंतर जाता जाता आपला मराठी पठ्ठ्या तिला फोन करतो (चित्रपटात 'दुसरी' खटकलेली गोष्ट), आता तिने फोन केला असता तर समजू शकतो.... आठवतंय का त्याने तिला विसिटिंग कार्ड दिलेलं असतं... हा... ). पण छान सीन आहे.. असो आपण पुढे सरकूया...
'जस' इथे पंजाबात आपल्या मैत्रिणीच्या लग्नासाठी आलेली असते, आणि नेमका त्या मैत्रिणीच्या बाबांनी आपल्या 'सया'ला कंत्राट दिलं कि ओ राव सरळ.., जेवणाची व्यवस्था बघण्याचं...आहात कुठे... जय महाराष्ट्र मराठी ढाब्याची मराठमोळी चव ती. जसजस चित्रपट इथून पुढे जात राहतो, तसं चित्रपटातील 'तिसरी' खटकणारी गोष्ट बोचत राहते हो.... कि अनोळखी माणसे एकदम एकमेकांशी एवढ्या मोकळेपणाने, प्रेममय भाषेत कशी बोलत राहतात ?.... (आधी वाटलं कि चित्रपट आहे हो राव.... होत असेल इथे असं काही, जे इतर चित्रपट नेहमी होत राहत.... पण नाही चित्रपटाच्या सरतेशेवटी त्याचा उलगडा होत जातो..... त्यामुळे तूर्तास सस्पेन्स म्हणा हवं तर)
सुंदर चित्रीकरण... पंजाबचा ब्याकग्राउंड मागे....(DDLG ची आठवण झाली... मलातरी...) तीच ती नयनरम्य शेतं.. पिवळीशार फुलं....छान.. सोबत अप्रतिम संगीत....लाजवाब.. "अवखळसे स्पर्श ते हरवले का असे", "न कळे कधी मन गुंतले", 'दिल हारेया ओय" अशी कर्णमधुर संगीताची गाणी, स्वप्नील बांदोडकर, जान्हवी प्रभू-अरोरा, वैशाली सामंत, राहुल वैद्य यांचा आवाज, निलेश मोहरीर याचं संगीत दिग्दर्शन आणि इतर सोबत.. आहाहा... कानाला पर्वणी होती यांची...
पुढे या दोघा 'जस' आणि 'सया' च प्रेम वाढीस लागायला लागतं.... ....... थांबा......... पण इथे 'जस'चं लग्न झालेलं असतं, असं ती त्याला सांगतेही [चित्रपटात 'चौथी' खटकलेली गोष्ट). पण 'प्रेम' आंधळे असते ना म्हणे..:-P. 'जस' ने सांगून सुद्धा 'सया' आशा धरून, भूतकाळ विसर असं तिला सांगताना त्याच्या मनाला कसं कळलं कि हिने घटस्फोटासाठी अर्ज केला असेल किंवा तिच्या नव-यासोबत सुखी नसेल ? (एक अंदाज अहो.. असं काही म्हटलेला किंवा दाखवलेलं नाहीये...). (पुन्हा वरील वाक्याचा उल्लेख इथे करीन..... :-D.. आधी वाटलं कि चित्रपट आहे हो राव.... होत असेल इथे असं काही, जे इतर चित्रपट नेहमी होत राहत.... पण नाही चित्रपटाच्या सरतेशेवटी त्याचा उलगडा होत जातो..... त्यामुळे तूर्तास सस्पेन्स म्हणा हवं तर)
मैत्रिणीच्या लग्नाचा पूर्व सोहळा चालू असताना..... (संगीत अहो असतं ना त्यांच्यात), मैत्रिणीच्या बाबांना 'जस' बद्दल कळत कि ती घरातून म्हणे पळून आली आहे. ते घेऊन जातात मग तिला आणि डांबून ठेवतात एका खोलीत..... आपला हिरो 'सया' जातो तिच्या घरी जोशात... आणि घेऊन येतो तिला... ढीश्याव..ढीश्याव... हर हर महादेव..
चित्रपटाच्या क्लायम्याक्स कडे आपण येताना सर्व वर नमूद केलेल्या खटकणा-या गोष्टींचा हळुवार अलगद उलगडा होत जातो आणि आनंद होतो कि वाह.. क्या बात आहे... सुंदर मांडणी... एडिटिंग...
अवधूत स्टाईल ने त्यालाच म्हणावसं वाटत..'व्वा मित्र तोडलस'.... मी तर म्हणेन 'तारलंस' या चित्रपटाला.... कुठे तरी पकड जातेय चित्रपटावरील असं वाटायला लागलं होतं शेवटी शेवटी.... पण नाही...... और वो लगा सिक्सर.....खटकणा-या गोष्टींचा उलगडा होत जातो ना म्हणून.....
सामान्य प्रेक्षक उठूनच गेला असता मध्येच.... (शेवट पर्यंत खिळवायला मात्र जमलं नाही या चित्रपटाला, ही एक उणेची बाजू, म्हणून असेल कदाचित, असं मला वाटतंय). पण ज्याने संयम ठेवून जर चित्रपट संपूर्ण पाहिला तर, त्या शेवटच्या काही सिन्स मधून, नव्हे मी म्हणीन त्या शेवटच्या उलगडपटातून, संपूर्ण चित्रपटाबद्दलचा निदान माझा दृष्टीकोन तरी बदलला, असं मी तुम्हा माय बाप प्रेक्षकांस आवर्जून उल्लेख करून सांगीन.... बाकी तुम्ही सुज्ञ आहातच...
साढ्ढआ मराठी चित्रपट ओ पाजी.. आवडला... एकदा तरी जरूर पहा.. ३ स्टार ***
माझ्यातर्फे. १/२ स्टार * एक्स्ट्रा... नवीन नायिकेसाठी...प्रार्थना बेहेरे.... मुआह ...... :-*
नमस्कार --
कळावे लोभ असावा,
आपला के.डी
केदार दिवेकर
+९९२०५७७८०२
वाचने
3269
प्रतिक्रिया
7
मिसळपाव
प्रतिक्रिया
नवीन नायिकेसाठी...प्रार्थना
ओक्के. चित्रपट पहायला हरकत
चित्रपट हरयाणात पण लावा
श्रीनिवासजी
In reply to चित्रपट हरयाणात पण लावा by श्रीनिवास टिळक
ओक्के!
चित्रपटाचा लुक खरंच छान आहे.
शिवसंग्राम प्रकाशन कोल्हापूर