Skip to main content

वेदीवर या राही मी स्थिर

लेखक हिटलर यांनी बुधवार, 30/01/2013 21:17 या दिवशी प्रकाशित केले.
कुणाच्याही वैयक्तिक भावना दुखावण्याचा हेतू नाहीय पण नथुराम गोडसेंनी गांधीहत्या का केली याची काही कारणे या कवितेच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त केली आहेत. देशभक्ती हे पाप असे जर l तर मी पापी घोर भयंकर l मात्र पुण्य ते असेल, माझा नम्र तरी अधिकार तयावार वेदीवर या राही मी स्थिर ll धृ ll द्रौपदीस छळले दुष्टांनी l कुरुतीर्थी लढले भीमार्जुन न्हाली रुधिराने वसुंधरा l अन्यायाचे हो परिमार्जन सीतेसाठी श्रीरामांनी l लंकेवर केले रणकंदन मात्र आज या नव्या भारती l अबला हतबल सबलावाचून अबलांचा तो करुणार्तस्वर l सह्याद्रीच्या ये कानावर वेदीवर या राही मी स्थिर ll १ ll न्यायासाठी आप्तांशीही लढणे l मागे फिरणे नाही होता संभ्रम धनुर्धराला l स्फूर्तिप्रद हरी गीता गाई ` ठाई ठाई खला मारिले त्याने, जग कल्याणापायी केले का हो पाप तयाने ? आपण म्हणतो नाही ! नाही ! समजा असले ! कृष्णार्पण ते ! कर्ता तो अन निमित्त मी तर वेदीवर या राहो मी स्थिर ll २ ll भू विभाजने कष्टी झाले त्या व्रणीतांचे करण्या सांत्वन फास घेतला गळ्याभोवती l परी नाही विचलित माझे मन दुष्टांना देणे सहायता l ठरते अत्याचारा इंधन काया जरी हि वडिलोपार्जित l रक्षा कायेची माझे धन धन ते टाका सिंधूमध्ये अखंडत्व देशा आल्यावर वेदीवर या राही मी स्थिर ll ३ ll

वाचने 30494
प्रतिक्रिया 129

प्रतिक्रिया

नथुराम गोडसे किंवा कवितेचे प्रकाशक यांनी या संकेतस्थळावर ही कविता टाकण्यास परवानगी दिली आहे का? अन्यथा ते लेखनचौर्य ठरेल.

In reply to by आजानुकर्ण

-१ असहमत आहे. साहित्यिकाच्या मृत्यूनंतर केवळ ६०वर्षे प्रताधिकार कायदा लागु असतो. आता ही कविता प्रताधिकार मुक्त आहे. बाकी हा धागा आणि कविता अत्यंत हास्यास्पद, अनुचित आणि खोडसाळ आहे याबद्दल सहमती

In reply to by ऋषिकेश

कविता नथुराम रचित आहे म्हणून हास्यास्पद, अनुचित आणि खोडसाळ आहे का? नथुरामचा कॉंटेक्स्ट काढून वाचता येइल का? तशी वाचल्यास कशी वाटते?

In reply to by मन१

कविता नथुराम रचित आहे म्हणून हास्यास्पद, अनुचित आणि खोडसाळ आहे का?
कविता ज्या घटनेनंतर लिहिली गेली आहे त्यानंतर अशी कविता प्रत्यक्ष खुन्याने लिहिणे हे मलातरी हास्यास्पद, अनुचित आणि प्रसंगी खोडसाळ वाटते. (हा धागा तसा आहे याबद्दल दुमत नसावे)
नथुरामचा कॉंटेक्स्ट काढून वाचता येइल का?
नाही वाचता येणार
तशी वाचल्यास कशी वाटते?
गैरलागू

In reply to by मन१

कविता नथुराम रचित आहे म्हणून हास्यास्पद, अनुचित आणि खोडसाळ आहे का? त्यात गांधीहत्येचे जस्टीफिकेशन असल्यास नक्कीच अनुचित आहे. कारण गांधीहत्येस एका अर्थी "देशभक्ती जर पाप असे तर..." असे त्यात म्हणलेले दिसते. जर गांधीहत्या हा कॉन्टेक्स्ट नसला तर ती कविता नथूरामची असली तरी गैर वाटणार नाही. पण मग तसे करण्यासाठी त्यातील काही ओळी बदलाव्या लागतील, उ.दा. न्यायासाठी आप्तांशीही लढणे l मागे फिरणे नाही (कुठला न्याय? ) ठाई ठाई खला मारिले त्याने, जग कल्याणापायी, केले का हो पाप तयाने ? आपण म्हणतो नाही ! नाही ! (गांधीजी खल होते?) दुष्टांना देणे सहायता l ठरते अत्याचारा इंधन (जर ५५ कोटी हाच मुद्दा त्याचा त्यावेळेस असला, तरी त्यावर उत्तर गोळ्या झाडणे?)

In reply to by ऋषिकेश

हापोथेटिकल केसः- नथुरामने ही कविता खुनापूर्वी कित्येक दिवस प्रकाशित केली असती, आणी तेव्हा तुम्ही ती वाचली असती तर तुम्हाला ठीक वाटली असती का? खरच इतकी वाईट ही कविता आहे का?

In reply to by मन१

हायपोथेटिकल उत्तरे:
नथुरामने ही कविता खुनापूर्वी कित्येक दिवस प्रकाशित केली असती, आणी तेव्हा तुम्ही ती वाचली असती तर तुम्हाला ठीक वाटली असती का?खरच इतकी वाईट ही कविता आहे का?
सांगता येत नाही. मुळात भारतीय इतिहासात नथुराम याचे अस्तित्त्वच फक्त एका क्षणाचे आहे. त्याच्या आधी तो काय होता त्याला फारसे महत्त्व नाहिच

In reply to by ऋषिकेश

नथुराम यांचे तुमच्या मते अस्तित्व एक क्षणाचे असले तरी माझ्या सारख्या अनेकांसाठी ते खुप महत्वाचे आहे. नथुरामांनी फक्त एक च चुक केली, ज्या माणसाला नंतर सगळ्या देशानीच अव्हेरला असता त्याला हुतात्मा केले.

In reply to by अनुराधा१९८०

नथुराम हा शिखंडीचीच आवृत्ती होय. त्याने पराक्रम तरी काय केला तर स्वतःच्या आजोबांच्या वयाच्या देवतुल्य निशस्त्र व्यक्तीमत्वावर गोळ्या झाडुन त्यांचा खुन केला,आणी अनुराधाबाई तुम्ही असल्याच समर्थन करता?

In reply to by बाबा पाटील

नथुरामाने गांधीहत्या करण्या अगोदर कोणते सामाजिक कार्य केले होते ह्याच्या बद्दल अनुराधा बाई काही माहिती देवु शकाल काय?

In reply to by वेताळ

वेताळ बाबा - मी कुठे म्हणले की नथुरामांनी सामाजीक कार्य केले होते. काहिच्या काही माझ्या नावावर खपवताय. मी वर लिहिले च ना की गांधीवध करुन पण चुक च केली. मेल्यामुळे सगळी पापे धुवुन निघाली आणि हुतात्मा पण मिळाले.

In reply to by अनुराधा१९८०

नथुराम यांचे तुमच्या मते अस्तित्व एक क्षणाचे असले तरी माझ्या सारख्या अनेकांसाठी ते खुप महत्वाचे आहे. ह्यावरुन मला वाटले नथुरामचे अस्तित्व समाजासाठी खुप महत्वाचे होते.त्याने एकच कार्य केले अन त्यात त्याने एका समाजाची पुर्ण वाट लावली.गांधी हत्येनंतर झालेल्या दंगलीला नथुराम जबाबदार नाही का?

In reply to by वेताळ

नथुराम ला कल्पना नव्हती की महाराष्ट्र इतका जातीयवादानी किडलेला असेल. दंगलीमुळे ज्या समाजाची वाट लागली त्या समाजाचे डोळे उघडले आणि तो फक्त स्वतापुरते बघायला लागला. हे तसे long term मधे चांगले च झाले.

In reply to by अनुराधा१९८०

नथुराम माथेफिरु नव्हता,त्याने साहित्यनिर्मिती केली.तो विचारवंत होता. खुप विचारांती त्याने निर्णय घेतला कि गांधी वधाशिवाय देशाला तरणोपाय नाही म्हणुन शेवटचे टोकाचे पाउल उचलुन गांधी हत्या केली. ह्याचे पुढे काय परिणाम होतील ह्याचा त्याने विचार केला असला पाहिजे.महाराष्ट्र जातियवादाने किडलेला आहे हे देखिल तुम्हा आम्हा सारख्या उच्चवर्णियानी म्हणावे हे आश्चर्यकारक आहे.जे आपण जोपासतो तेच उगवते. असो.एकाद्या नेत्याची हत्या होते तेव्हा त्याचे अनुयायी त्याला मारणार्‍या समाजाचे नामोनिशाण मिटवण्याचा प्रयत्न करतो हे पुर्वी पासुन घडत आहे. ते काय गांधी हत्येनंतर चालु झाले हे म्हणणे सयुक्तिक नाही.

In reply to by वेताळ

अखंड हिंदुस्थान हीच त्याची मागणी होती म्हणून ? त्याने केलेल्या कृत्याचा जरूर निषेध करू शकता. लोकशाहीत हा अधिकार आहे आपल्याला. पण बिनबुडाचे आरोप करणं हे देखील गांधीवादात येत का ? छत्रपति शिवाजी महाराज, महाराणा प्रताप हे पथभ्रष्ट देशभक्त होते अस अहिंसावादी मिस्टर गांधीच मत होत. मग नथूरामच काय घेऊन बसलात गांधी भक्तांसाठी ती एक अतिशय क्षुद्र व्यक्ती आहे.

..पण गांधीजींच्या प्रसन्न छायाचित्राच्याच खाली, आणि या 'राष्ट्रनायकाला श्रध्दांजली' अशा शब्दांना लगटून असलेल्या या कवितेचं उद्धरण हे नक्कीच खटकलं (अगदी धागालेखकाचा तसाच हेतू नसणार याची जाणीव असूनही), तसंच -अभिव्यक्तिस्वातंत्र्य वगैरे वगैरे मान्य करूनही- आजच्याच दिवशी हा धागा टाकणं हे अनौचित्यपूर्ण आणि खोडसाळपणाचं वाटलं हेही नम्रपणे नमूद करू इच्छितो.

In reply to by बहुगुणी

१००% सहमत. असाच औचित्यपूर्ण निषेध अन्य ठीकाणी देखील होईल ही आशा.

In reply to by बहुगुणी

devil's advocate बनूनः- नथुरामला ज्या दिवशी फाशी दिली गेली त्या दिवशी त्याचा फोटो एखाद्या संस्थळावर लागेल काय? कारण त्याने वैयक्तिक फायद्यासाठी काही केलें नाही, त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमीही नाही आणि केले ते काही प्रमाणात मातीशी इमान राखण्याच्या भावनेतूनच केले असे मानणारा एक गट आहे. तर त्या गटातील लोकांनी संस्थळावर फोटो टाकला जावा अशी मागणी करावी काय? समजा ते झालं तर त्याच्या फोटोअच्या खाली कुणी "दे दी हमें आझादी बिना खड्ग बिना ढाल" ह्या कवितेचं रसग्रहण टाकलं तर त्यास तुम्ही अनौचित्यपूर्ण म्हणाल का?

In reply to by मन१

>>नथुरामला ज्या दिवशी फाशी दिली गेली त्या दिवशी त्याचा फोटो एखाद्या संस्थळावर लागेल काय? फोटो नाही पण .....

In reply to by नितिन थत्ते

धन्यवाद या संदर्भाबद्दल. अनेक लोकांच ३ वर्षात मत-परिवर्तन zआलेल दिसताय. त्यावेळेस आडून आडून नथुराम च समर्थन करणारे अनेक लोक आज गांधीजी याना भाव-विभोर वैइगेरे श्रध्ांजली अर्पण करताना दिसत्यात आज ; )

In reply to by पिंपातला उंदीर

याच मन:परिवर्तन गांधीजींचा फार विश्वास होता. याच संस्थळावर क्लिंटन, ऋषिकेश इत्यादी लोकांनी आपलं गांधीसंदर्भात मतपरिवर्तन झाल्याचं नोंदवलं आहे. मी ही या दृष्टीने त्याच पंथातली. तर हे मनपरिवर्तन कधीही होऊ शकतं. त्याबद्दल उपरोध व्यक्त करणं योग्य वाटत नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सहमत आहे. गांधीजींच्या तत्वज्ञानात ही एक फार चांगली सोय आहे. मी त्यांची पुस्तके वाचल्यावर मला कळलं की गांधीजी हे किती थोर राजकारणी होते ते.आजच्या औद्योगिक नागरसंस्कृतीस गांधीजींचे विचार अगदी पोषक आहेत. साध्या साध्या प्रसंगांमधून गांधीजींचे तत्वपालन दिसते. उदाहरणार्थ, माझे सत्याचे प्रयोग या पुस्तकात त्यांनी सांगितलेला एक प्रसंग पाहा. गांधीजी प्रवासाला निघाले. त्यांनी रेल्वेचे थर्डक्लासचे तिकीट काढले (साधेपणा). तब्येत थोडीशी बरी नव्हती म्हणून ते सेकंड क्लासमध्ये जाऊन बसले (सविनय कायदेभंग), अर्धा प्रवास झाल्यावर टीसीने त्यांना पकडले आणि पूर्ण प्रवासाच्या सेकंड क्लासच्या व थर्डक्लासच्या तिकीटाच्या किंमतीतला फरक दंड म्हणून आकारला. परंतु, केवळ अर्धाच प्रवास सेकंड क्लासने केला म्हणून अर्धाच दंड भरण्यावर अडून बसले (सत्याग्रह) आणि हे सगळे चालू असताना त्यांनी टीसीवर एकदाही हात उचलला नाही (अहिंसा). हे असे करायला फार धैर्य लागते. आज गांधीजींच्याच स्वतंत्र देशाचा नागरिक असूनही हे असे काही करण्याची माझी हिंमत नाही. ती यायला फार मोठी साधना लागेल. डेरिक जेन्सन नावाचा एक वाट चुकलेला पर्यावरणवादी लेखक आहे. त्याने 'एन्डगेम' नावाचे एक पुस्तक लिहीले आहे आणि त्यात त्याने सिव्हिलायझेशनची काही मूळ तत्वे मांडली आहेत. त्यातले एक तत्व असे आहे की नागरसंस्कृतीत खालच्या माणसाने केलेली हिंसा अक्षम्य असते पण वरच्या माणसाने खालच्या माणसाची हिंसा केली तर ती नुसती क्षम्यच नाही तर स्वीकारार्ह आहे. (उदाहरणांसाठी मूळ पुस्तक पाहावे). भारतामध्ये आधुनिक आणि औद्योगिक नागरसंस्कृतीचा विकास होण्यासाठी गांधीजींने शिकवलेल्या अहिंसेचा फार मोठा वाटा आहे. तरीही अजूनही अनेक माओवादी, नक्षलवादी किंवा धर्मांधळे लोक हातात शस्त्र घेतात आणि आपल्यापेक्ष वरच्या वर्गातल्या लोकांविरुद्ध हिंसा करतात. त्यांचेही लवकरात लवकर मनःपरिवर्तन होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना! तसे झाले तर ती बापूजींना एक खरी श्रद्धांजली ठरेल.

In reply to by नगरीनिरंजन

'गांधीजींने' ही टंकनचूक आहे. ते 'गांधीजींनी' असे वाचावे. 'आपल्यापेक्ष' हे 'आपल्यापेक्षा' असे वाचावे. मिपावर प्रतिसाद स्वसंपादनाची सोय मिळेपर्यंत असहकार आंदोलन करण्याची मी हाक देत आहे. हा प्रतिसाद वाचणार्‍याने त्यानंतर स्वसंपादनाची सोय मिळेपर्यंत मिपावर एकही अक्षर लिहू नये असे मी आवाहन करतो. गांधीजींना श्रद्धांजली म्हणून हे आंदोलन यशस्वी करून दाखवण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची आहे.

In reply to by नगरीनिरंजन

गांधीजींचं सर्वच तत्त्वज्ञान मला ग्राह्य वाटत नाही. उदा: हा सेकंड क्लास-थर्ड क्लासचा प्रसंगही देता येईल. पण त्यापुढच्या काळात कायदेभंग केल्यानंतर तर जी शिक्षा होईल ती भोगायला ते तयार असत. याला मनःपरिवर्तन म्हणता येईल. एकंदर गांधींजींचे समाजातल्या हलक्या मानलेल्या लोकांकडे (दलित, स्त्रिया इ.) बघण्याचा दृष्टीकोन दया, अनुकंपा अशा प्रकारचा होता. मला तो ही पटत नाही.
अजूनही अनेक माओवादी, नक्षलवादी किंवा धर्मांधळे लोक हातात शस्त्र घेतात आणि आपल्यापेक्ष वरच्या वर्गातल्या लोकांविरुद्ध हिंसा करतात. त्यांचेही लवकरात लवकर मनःपरिवर्तन होवो ही ईश्वरचरणी प्रार्थना! तसे झाले तर ती बापूजींना एक खरी श्रद्धांजली ठरेल.
उद्या राजकारणी आणि/किंवा सरकारी बाबूंनी आपल्याकडे नसलेली जादूची कांडी फिरवल्यामुळे माओवादी, नक्षलवादी किंवा धर्मांधांचं खरोखरच मनःपरिवर्तन झालं तर त्यांच्याबद्दल उपरोध व्यक्त करण्यापेक्षा त्यांना मुख्य प्रवाहात सामील करून घेणं आपल्याहीसाठी शहाणपणाचं असेल. नाहीतर शिवाजीचा राज्याभिषेक का झाला या चर्चा आणि शिवजयंतीची सुट्टी खरोखरच वांझोटी म्हणावी लागेल.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

माओवादी, नक्षलवादी किंवा धर्मांधांचं खरोखरच मनःपरिवर्तन झालं तर त्यांच्याबद्दल उपरोध व्यक्त करण्यापेक्षा त्यांना मुख्य प्रवाहात सामील करून घेणं आपल्याहीसाठी शहाणपणाचं असेल.
अर्थातच. पण ती भविष्यातली शक्यता झाली. मुळात त्यांचं मनःपरिवर्तन होऊन साध्या माणसापासून शस्त्र हाती घ्यायची वेळ का आली याचा विचार आत्ता करणे आवश्यक आहे. गांधीजींच्या नावाचा उदोउदो करणारा समाज, त्यांचे विचार ज्या बाबतीत (localization, स्वयंपूर्ण खेडी, कुटीरोद्योग) योग्य वाटतात त्याच्या अगदी उलट वागतोय.

In reply to by नगरीनिरंजन

मुळात त्यांचं मनःपरिवर्तन होऊन साध्या माणसापासून शस्त्र हाती घ्यायची वेळ का आली याचा विचार आत्ता करणे आवश्यक आहे.
सहमत आहे. ते समजल्याशिवाय मनःपरिवर्तन कसं होईल हे समजणंही कठीणच आहे.
गांधीजींच्या नावाचा उदोउदो करणारा समाज, त्यांचे विचार ज्या बाबतीत (localization, स्वयंपूर्ण खेडी, कुटीरोद्योग) योग्य वाटतात त्याच्या अगदी उलट वागतोय.
या बाबतीत माझा पूर्ण पास. तुम्ही बोला, मी ऐकते आणि समजणार नाही तिथे प्रश्न विचारते. गांधीजींचं अहिंसा तत्त्व म्हणून मान्य असणार्‍यांना गांधीजींचं अर्थशास्त्र किंवा सनातनी हिंदू विचार न पटणं हे ही शक्य आहेच. गांधीसमर्थक गांधीभक्तच असतील असंही नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

गांधीसमर्थक गांधीभक्तच असतील असंही नाही
तेच. बहुतेकवेळा सोयीस्कर अशाच विचारांचाच अधिकृतपणे पुरस्कार केला जातो असा माझा समज झाला असल्याने उद्वेग वाटतो. बाकी काही नाही.

In reply to by नगरीनिरंजन

गांधीजींच्या नावाचा उदोउदो करणारा समाज, त्यांचे विचार ज्या बाबतीत (localization, स्वयंपूर्ण खेडी, कुटीरोद्योग) योग्य वाटतात त्याच्या अगदी उलट वागतोय.
मला स्वतःला गांधीजींविषयी आदर असला तरी त्यांची काही मते--कुटीरोद्योग, ब्रम्हचर्य वगैरे पटत नाहीत. अर्थात त्यामुळे त्यांच्याविषयीच्या आदरात काही कमी होत नाही.पण एखाद्या व्यक्तीविषयी आदर वाटत असला किंवा बरीचशी मते पटत असली तरी सगळी मते पटलीच पाहिजेत असे थोडीच आहे?

In reply to by क्लिंटन

मलाही त्यांचे बरेचसे विचार पटत नसले तरी आदर आहेच. त्याचप्रमाणे सावरकर, भगतसिंग आणि इतर सशस्त्र क्रांतिकारी लोकांबद्दलही आदर आहेच. पण दुर्दैवाने सहिष्णुतेचा दावा़ करत असलो तरी सगळ्यांना समान वागवणे होताना दिसत नाही. गांधींचे (आणि एकतर्फी अहिंसेचे) प्रस्थ अंमळ जास्तच झाले आहे.

In reply to by नगरीनिरंजन

+ १००, जे जे जिथुन चांगले वाटेल, पटेल आणि पचेल ते ते तिथुन तिथुन घ्यावं या माझ्या वैयक्तिक मताचा मला पुर्ण आदर आहे.

In reply to by बहुगुणी

आजच नव्हे तर सध्याच्या काळात कधीही ही कविता अनुचितच आहे. देशभक्तीच्या या कल्पना आता खुळचटपणात जमा होतात आणि कविता हास्यास्पद वाटते. एक माणूस म्हणून गोडसेंबद्दल मात्र वाईट वाटते, ज्या कल्पना आज खुळचट वाटतात (तेव्हाही बहुतेकांना वाटत असतील कदाचित) त्यावर प्राणपणाने निष्ठा ठेवून त्यांनी स्वतःचे आयुष्य वाया तर घालवलेच पण मृत्युनंतरही 'माथेफिरू' म्हणवून घेण्याची वेळ आणून ठेवली.

In reply to by नगरीनिरंजन

आणि गांधी वध करणारा माणूस जर निळ्या किंवा हिरव्या झेंड्या खालचा असता तर त्यालाही समस्त देशाने असेच माथेफिरू म्हणून झिडकारले असते का हो?
ज्या कल्पना आज खुळचट वाटतात (तेव्हाही बहुतेकांना वाटत असतील कदाचित)
बाकी अखंड हिंदुस्थानचे स्वप्न पाहणे हे जर खुळचट पणाचे लक्षण असेल तर आजकाल बाहेरच्या देशात जाऊन चाकरी करणे अति शहाणपणाचे लक्षण आहे का?

In reply to by चेतनकुलकर्णी_85

आणि गांधी वध करणारा माणूस जर निळ्या किंवा हिरव्या झेंड्या खालचा असता तर त्यालाही समस्त देशाने असेच माथेफिरू म्हणून झिडकारले असते का हो? >> +१०००००००००००००००००

In reply to by अनुराधा१९८०

मग भगवा दहशतवाद म्हटले कि तुमची का फाटते.गुन्हेगारी कृत्याला रंग द्यायचा का प्रयत्न करता? गांधी हत्येचे समर्थन करताच येत नाही.

In reply to by चेतनकुलकर्णी_85

आजकाल बाहेरच्या देशात जाऊन चाकरी करणे अति शहाणपणाचे लक्षण आहे का
अति नसले तरी शहाणपणाचे लक्षण आहे. आपले पंतप्रधानही नुकतेच म्हणाले की जास्तीत जास्त लोकांनी परदेशात जाऊन काम करावे म्हणजे देशाला परकीय चलन मिळेल. त्याचं काय आहे की देशातच राहणार्‍या देशभक्त लोकांना देश महासत्ता व्हावा म्हणून देशी/परदेशी गाड्या घेऊन चालवायच्या असतात आणि त्या गाड्यांना परदेशी तेल लागते आणि ते तेल मिळवायला परदेशी चलन लागते. अखंड हिंदुस्थानाचे स्वप्न पाहण्यातच सगळा वेळ जात असल्याने देशांतर्गत देशभक्तांना निर्यात वाढवायला फुरसत मिळत नाही म्हणून मग आपल्या बिचार्‍या पंतप्रधानांवर काही नाही तर किमान माणसे तरी निर्यात करू असे म्हणायची वेळ येते.

नथुराम गोडसेंनी कधीही गांधीजींचा इतका द्वेष केला नसेल, जितका तथाकथित नथुरामभक्त करतात ! मरणान्तानि वैराणि.......|

In reply to by कवितानागेश

नथुराम गोडसेंनी कधीही गांधीजींचा इतका द्वेष केला नसेल, जितका तथाकथित नथुरामभक्त करतात ! पहीला मुद्दा किती वास्तव आहे अथवा नाही याची कल्पना नसली, तरी, या वाक्यातून व्यक्त केलेल्या भावनेशी सहमत!

१) की "त्याने हिंदुधर्मीयांच्या रक्षणासाठी व त्यांच्यावर फाळणीकाळात झालेल्या अत्याचाराच्या बदल्यासाठी भारताला स्वातंत्र्य मिळवण्यात सर्वोच्च स्थान असलेल्या नेत्याचा खुन केला" असं वाटतयं, हेच ? २) की त्याला गांधी कर्तुत्वात महान न्हवते, त्यांच्या आंदोलनात अजिबात ताकत न्हवती, इंग्रजांना त्यांचा धाक वाटावा असे सर्वोच्च नेतृत्व न्हवते, त्यांची विचारसरणी व वागणुक देशाला स्वातंत्र देण्यासाठी अतिशय कुचकामी होती, इंग्रजांना पराकोटीची मदत करणारी होती, थोडक्यात आज गांधि द्वेश्टे महात्मा गांधिची जी किंमत करतात तिच किंमत इंग्रज गांधिची करत होते ? किंबहुना महात्मा गांधी त्यांच्या खिजगणीतही न्हवते ? असं काही म्हणायचं आहे ? जर नथुरामला मुद्दा क्रमांक दोन बद्दल काही संदेश कवितेतुन द्यायचा नसेल तर आज राष्ट्रपिता महात्मा गांधींची पुण्यतिथी असताना त्यांनी स्वातंत्र्य मिळवायला काय केलं याचे गोडवे/पोवाडे गायले पाहिजेत. स्वातंत्र्याची पहाट दिसल्या नंतर भारतीय धर्मांधांकडुन कसं शेण खाल्ल गेलं, नेमके कोणते अत्याचार कोणावर कसे झाले यावर चर्चेचा आज नक्किच दिवस न्हवे. स्वातंत्र्यानंतर भारतियांनी जे शेण खाल्लं त्याची कारणमिमासां करण्याची नेमकी हि वेळही न्हवे. ज्यांनी परक्यांविरुध्द उत्कृष्ट लढा दिला त्यांचे त्यांच्या स्वातंत्र्य लढ्याच्या कार्याबद्दल पुण्यतिथी दिवशी फक्त कौतुकच झाले पाहिजे, अन्यथा तो भारत देशाचा अपमान होय, एक प्रकारे राष्ट्रद्रोहच. आणि त्यांच्या ज्या वर्तनाचा आपल्यांना जो काही त्रास झाला त्यावर विचारमंथनाला ३६५ दिवस आहेतच की अगदी मस्त कमानी उभारुन फ्लेक्स लावुन ही कविता भारतियांच्या समोर आणुया, पण ते उरलेले ३६५ दिवस. आजचा दिवस हा परकीयांना कशी माघार घ्यायला लावली त्याचं कौतुक करण्याचाच होयं. धागा खरं तर अप्रकाशित केला जावा.

In reply to by अग्निकोल्हा

आजचा दिवस हा परकीयांना कशी माघार घ्यायला लावली>>> कसली माघार आणि काय? भारतात एकावेळी १ लाख इंग्रज पण नसायचे ( हे खरे आहे अतिशयोक्ती नाही ). त्यांनी जे काही राज्य केले ते संपूर्ण पणे भारतीय सैन्य आणि भारतीय पोलिसांच्या बळावर. सैनिकांच्या मनात आले असते तर एका क्षणात इंग्रजांना राज्य सोडावे लागले असते. त्यामुळे जो काही so called लढा करावा लागला तो भारतीय लोकांविरुद्ध.

In reply to by अनुराधा१९८०

गांधींचेच विचार तुम्ही सांगताय असं नाही वाटत तुम्हाला? जसे भारतात एका वेळी १ लाखाहून अधिक इंग्रज नसायचे तशीच भारतीय सैन्य आणि भारतीय पोलीस यांची संख्याही फार नसायची (१० कोटी जनतेच्या तुलनेत). भारतीय इंग्रजांना 'सहकार्य' करतात म्हणून इंग्रज राज्य करू शकतात हेच तर गांधी सांगत होते. त्यासाठीच असहकार वगैरे चळवळी. भारतीयांनी सहकार्य न करण्याची अंतिम परिणतीच 'नाविकांच्या बंडाच्या' रूपाने पहायला मिळाली. नाविकांच्या बंडामुळे स्वातंत्र्य मिळाले असे नाही. कारण नाविकांचे बंड झाले तोवर स्वातंत्र्य हे अगोदरच 'जस्ट राउंड द कॉर्नर' होते. कदाचित त्या बंडाने प्रक्रियेला वेग आला असू शकेल.

In reply to by अनुराधा१९८०

जहालमतवादी नेते लोकमान्य टिळक ह्यानी खरेतर जनतेचा ब्रेनवॉश करायला हवा होता व इंग्रजांविरोधात आघाडी उघडुन भारत स्वतंत्र्य करायला हवा होता. त्याच्या चुकीचे खापर तुम्ही गांधीजीच्या माथी का मारता आहात.गांधीजी नी दुसरा मार्ग निवडला आणि तो यशस्वी केला.

अतिशय अप्रस्तुत आणि खोडसाळ विकृत धागा. मरणानंतर वैर संपत / संपवावं असं आपली संस्कृती सांगते. संपादक महोदयांनी कृपया लक्ष द्यावे. हा धागा अप्रकाशित करण्यात यावा. जमल्यास हिटलर यांचे सदस्यत्व काढून घ्यावे हि विनंती.

गांधींशी माझ वैर नाहीय. पण नथूराम यांनी गांधीहत्या का केली हे देखील लोकांना कळल पाहिजे. तो कुणी माथेफिरू नव्हता. कवितेत गांधीना उद्देशून एकही अपशब्द नाहीय.ज्या दिवशी हि घटना घडली तो दिवस मला योग्य वाटला हा धागा प्रकाशित करण्यासाठी. गांधींचा अवमान करण्याचा हेतू नाही हे स्पष्ट करतो.

In reply to by हिटलर

कवितेत गांधीना उद्देशून एकही अपशब्द नाहीय. म्हणून अपकृत्य अर्थात गोळ्या झाडणे चालते का? तो माथेफिरू नसेल कदाचीत पण शस्त्रहीन व्यक्तीची आणि ते देखील देशभक्ताची (शत्रूची नाही) हत्या करणारा, म्हणूण खुनी नक्कीच होता. त्यामुळे त्याचे कुठल्याही प्रकारचे समर्थन असमर्थनीय आहे.

In reply to by विकास

तो माथेफिरू नसेल कदाचीत पण शस्त्रहीन व्यक्तीची आणि ते देखील देशभक्ताची (शत्रूची नाही) हत्या करणारा, म्हणूण खुनी नक्कीच होता. त्यामुळे त्याचे कुठल्याही प्रकारचे समर्थन असमर्थनीय आहे.
अधिकारहीन सदस्यांची मते, ही एखाद्या अधिकार्‍याला खोडसाळ वाटतात म्हणून अधिकाराचा वापर करून उडवली जातात तेंव्हा ते समर्थनीय असते काय?

In reply to by परिकथेतील राजकुमार

येथे म्हणल्याप्रमाणे : "येथे एक खुलासा करणे आवश्यक आहे की सल्लागार हे संपादक नाहीत. त्यामुळे त्यांच्याशी संपादकीय विषयावर चर्चा न करता अन्य विषयांबाबत त्यांचा सल्ला घेऊ शकता." :-)

In reply to by विकास

विकासशेठ माफी करा बरं का. तो प्रतिसाद तुम्हाला उद्देश्यून नाही, तर तुमच्या वाक्यांची मदत घेऊन अधिकारी लोकांना प्रश्न विचारायचा प्रयत्न होता. प्रतिसादाखाली खुलासा करण्याचाच राहून गेला. अर्थात हा प्रतिसाद लिहिताना तुम्ही 'सल्लागार' आहात हे बिलकूल देखील डोक्यात नव्हते.

In reply to by परिकथेतील राजकुमार

नो प्रॉब्लेमो! :-)

In reply to by परिकथेतील राजकुमार

अधिकारहीन सदस्यांची मते, ही एखाद्या अधिकार्‍याला खोडसाळ वाटतात म्हणून अधिकाराचा वापर करून उडवली जातात तेंव्हा ते समर्थनीय असते काय?
एकदम बरोबर प.रा.शेठ :)...आपल्याकडे रिकामटेकडे कार्यकर्ते आहेतच अधिकाराचे गैरवापर करणारे.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

रिकामटेकडे कार्यकर्ते
ऑक्झिमोरॉन आवडून गेला ;) बाकी, "काश्मिर" होण्याचे पोटेन्शियल ह्या धाग्यात आहे. तेव्हा पॉपकॉर्न घेऊन बसावे, हे उत्तम!!

In reply to by अनुराधा१९८०

दिल को खुश करनेको गालिब ये खयाल अछा है. व्याकरणदृष्ट्या हे वाक्य ' दिल खुश करनेको गालिब ये खयाल अच्छा है' असं असायला हवं होतं बहुधा. अवांतर - तेच तेच वाद घालुन कंटाळा आल्यानं मराठी संस्थळांवरच्या हिंदित लिहिलेल्या उर्दुचं व्याकरण' या विषयावर वाद सुरु करावा ही इच्छा आहे म्हणुन हा प्रतिसाद.

In reply to by ५० फक्त

व्याकरणदृष्ट्या हे वाक्य ' दिल खुश करनेको गालिब ये खयाल अच्छा है' असं असायला हवं होतं बहुधा.
माझ्या ऐकण्यात हे "दिल को खुश रखनेको गालिब ये खयाल अच्छा हैं" असं आहे.. ( संदर्भ : "इक बराम्हण ने कहा हैं, के ये साल अच्छा हैं" ही जगजीतसिंगानी गायलेली गझल.. आणि त्यात "बराम्हण" असंच म्हटलंय.." ) बाकी कविता पटली नाही.. आणि वर ज्यांनी ज्यांनी "गांधीजींना देशाने अव्हेरले असते" असे म्हटले आहे, ते पटवून देऊ शकतील का? आणि "गांधीवाद्यांची" बिलं गांधींच्या नावाने फाडणं, म्हणजे "डार्विनच्या माकडांचा नंगानाच" टायपातलं होणार.. ;-)

एखाद्या माणसाची हत्या झाल्यावर, त्याच्या पुण्यतिथीला तुम्ही श्रद्धांजली वाहणार कि त्याचा खून करणाऱ्याच मनोगत लिहिणार? मनोगत लिहियाला ना नाही. पण आजच हा दिवस मात्र खचितच श्रद्धांजली वाहून स्मरण करण्याचा आहे. तो संकेत तुम्हाला पाळता आला नाही. तुम्ही एका सार्वजनिक संस्थळावर लिहित आहात हे भान सुटू द्यायला नको होते.

In reply to by बोलघेवडा

तो ज्याच्या त्याच्या अभिव्यक्तीचा प्रश्न नसावा का? एखाद्याला तो त्या मृत व्यक्तीच्या तथाकथित कर्तृत्वाला स्मरण्याचा दिन वाटेल तर एखाद्याला तो त्या व्यक्तीप्रमाणे कसे वागू नये हे स्मरण करण्याचा असेल. काय करायचे हे ज्याच्या त्याच्या अभिव्यक्तीवर अवलंबून. म्हणूनच बाळ ठाकरे गेल्यावर (आमच्या दृष्टीने) खोडसाळ)विधाने करणार्‍या फारूख ढोंडी या कन्येस आम्ही काही केले नाही. नंतर तथाकथित सर्वोच्च न्यायालय (का कुठले न्यायालय) यांनी पोलिसांना दोषी ठरवल्यावर तथाकथित अभिव्यक्ती वाल्यांनी जो काय जल्लोष केला त्यावरही आम्ही काही केले नाही. त्यामुळे इथेही काही करणार नाही. धागाप्रवर्तकाचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मान्य करून टंकुमटंकुम अन्यथाटंकुम याच न्यायाने धागाप्रवर्तकाचा त्याच्या दृष्टीने प्रबोधनाचा हक्क मान्य करून पुढे गेलो.

In reply to by llपुण्याचे पेशवेll

आमच्या दृष्टीने) खोडसाळ)विधाने करणार्‍या फारूख ढोंडी या कन्येस आम्ही काही केले नाही.
असे काही करण्याचे काही विशेष अधिकार आपणाकडे आहेत काय की ते आपण जाणूनबुजून वापरले नाहीत?