Skip to main content

रंगीत दहशतवाद

लेखक हुप्प्या यांनी बुधवार, 23/01/2013 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
आजपर्यंत अनेक दहशतवादी हल्ले, बॉम्बस्फोट वगैरे पाहण्यात आले होते. प्रत्येक वेळेस केवळ अतिरेकी अमुक धर्माचा आहे म्हणून दहशतवादाला त्या धर्माचे नाव देता कामा नये हा नियम कटाक्षाने पाळला जात होता. तमाम साहेब, म्याडम व्यासपीठावरून उच्चरवात हेच ठासून सांगत होते. त्यामुळे दहशतवाद हा नेहमीच कृष्णधवल चष्म्यातून पहात होतो. पण आधुनिक काळाला अनुसरून आपले द्रष्टे गृहमंत्री शिंदेसाहेब ह्यांनी ह्या प्रकाराला फाटा द्यायचे ठरवले आहे. आणि रंगीत दहशतवाद हा एक नवा उपक्रम सुरू केला आहे. च्यारिटी बिगिन्स आट होम ह्या न्यायाने सुरवातीला भगवा हा अस्सल भारतीय मातीतला रंग निवडला आहे. त्या धोरणाला अनुसरुन आजकाल भगवा दहशतवाद भारतात फोफावतो आहे, रा. स्व. संघाचे लोक मोठ्या प्रमाणात अतिरेकी प्रशिक्षण केंद्रे चालवत आहेत. तिथे गठ्ठ्याने अतिरेकी बनत आहेत वगैरे रोचक विधाने आपल्या गृहमंत्र्यानी केली. आणि मोठीच खळबळ झाली. बहुधा काळेपांढरे टीव्ही जाऊन रंगीत आल्यावर अशीच खळबळ माजली असेल. अर्थात सिनेमा चालू असताना प्रेक्षकाने खलनायकावर ओरडणे, त्याच्या अंगावर धावून जाणे बावळटपणाचे वाटते तसे गृहमंत्री हा एकरंगी दहशतवादाचा खेळ तटस्थपणे बघत आहेत. प्रत्यक्ष मैदानात उतरून संबंधित संघटनेवर बंदी घालू, संबंधित संघटनांचे सदस्यत्व मिरवणारे आमदार, खासदार ह्यांचे पद रद्द करू, कुठल्या राज्यातील सरकार अशा वाईट नादाला लागत असेल तर ते बरखास्त करू असे काही म्हणत नाहीत. पण आता काही बुरसटलेले, जुनाट विचारांचे काँग्रेसी नेते ह्या रंगीत दहशतवादाला नाकारुन पुन्हा ब्लॅक अँड व्हाईट दहशतवादाकडे वळू असे म्हणत आहेत. http://online2.esakal.com/esakal/20130123/5600019574208857395.htm पूर्वीही असे अप्रिय सत्य ठणकावून सांगणार्‍या द्र्ष्ट्या लोकांना हालअपेष्टा सहन करायला लागल्या होत्या. गॅलिलिओ, टॉलेमी अशा लोकांच्या तोडीस तोड आपले गृहमंत्रीजी आहेत असे वाटते. आपल्याला काय वाटते? रंगीत दहशतवादच बरा नाही का? रंगीत सिनेमे आल्यावर कुणी ब्लॅक अँड व्हाईटला विचारतो का? फक्त आपल्याला हवे ते रंग निवडायचे स्वातंत्र्य हवे, कसे?

वाचने 54833
प्रतिक्रिया 167

प्रतिक्रिया

ओ. आमच्या गाववाल्यांबद्दल काही बोलायचे नाही. ते त्यांचे स्वतःचे मत नाहीये. ;)

राजपुत्र राहुल गांधी यांच्या प्रेमाचे भरते आल्याने बहुतेक शिंदे साहेबांचे आपल्या बोलण्यावर नियंत्रण राहिले नसावे ! ;) यांना पाकव्याप्त काश्मिरमधले टेररिस्ट कँप दिसत नाहीत पण हिंदुस्थानात नसलेले हिंदु टेररिस्ट कॅंप दिसतात या बद्धल त्यांच्या दिव्य दॄष्टीचे कौतुकच करायला हवे. ;) या विषयावर लोकसत्ते मधे आलेला हा लेख वाचनिय आहे. जाता जाता :--- अफजल्याची फाईल हे म्हणे ४८ तासात मार्गी लावणार होते, शिंदे साहेब या फाईलवर सखोल अभ्यास करणार होते म्हणे ! अजुन यांचा अभ्यास पूर्ण झालेला दिसत नाही. ;)

कै नै हो, सगळा साला फ्याशनचा खेळ आहे. विशिष्ट धर्माला शिव्या घातल्या की कूल पॉईंट्स मिळतात, अन्य कुणाबद्दल अवाक्षर उच्चारले तर मात्र ** मारतील. **** आहेत झालं.

मुळात या लोकांचा रा.स्व. वर का राग आहे देवच जाणे. याना संघाची विधायक कामं दिसत नाहीत, संघाच्या मुशीत घडलेल्या नरेंद्र मोदींनी घडवलेला विकसित गुजरात दिसत नाही, अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना आपल्या आजरपणावर उपचार करून घ्यायला परदेशी गेले नव्हते, कारण जर पंतप्रधानच परदेशी गेला तर आमच्या देशात उत्तम प्रतिच्या आरोग्यसुविधा नाहीत असं इतर देशात वाटेल, ही विचारसरणी दिसत नाही, भारतापासून जवळपास तुटलेल्या ईशान्य भारताला पुन्हा मुख्य प्रवाहात सामील करून घेण्यासाठी संघाने चालवलेला पूर्वांचल विकास प्रकल्प, आणि त्यासाठी तिकडे पूर्णवेळ कार्य करणारे आय.आय.टी., आय.आय.एम. सारख्या संस्थांमधून बाहेर पडलेले आणि उच्च पगारावर लाथ मारलेले तरूण प्रचारक दिसत नाहीत. या लोकांकडुन अजून कसल्या अपेक्षा करणार? यांच्यासाठी प्रत्येक दिवस "अजि सोनियाचा दिनु" असतो ना.. आणि यांच्या सोनियाच्या ताटी ज्योती तर उजळलेल्या आहेतच... ******** संपादक मंडळः- येथील सर्वच सदस्यांना विनंती आहे की भडक भाषा न वापरताही हा काथ्याकूट होउ शकतो याचा विचार व्हावा.

संपादक मंडळः- येथील सर्वच सदस्यांना विनंती आहे की भडक भाषा न वापरताही हा काथ्याकूट होउ शकतो याचा विचार व्हावा.
? जरुर व्हावा,नाहीतर आहेतच द्वेष्टे गरळ ओकायला. आता काल परवाला मुंबई मध्ये पकडलेला दहशतवादी हा आर एस एस चा होता का?

खुळा आहे सुशील. खालील फोटोच्या तसवीरी त्याच्या घ्ररातल्या प्रत्येक भिंतीवर लावा. susheel

In reply to by परिकथेतील राजकुमार

कॉमॅ मोड : किती गरीब व सालस माणुस आहे नजरसुद्धा वर करुन पहात नाही.(बाकीचे वर बघताय म्हणुन) मिपा मोडः खाली मुंडी पाताळधुंडी आहे लेकाचा झाल !

१०० % असहमत. सुशीलकुमारांची मानसिकता पहिली तर ते एक धूर्त राजकारणी आहेत हे समजून येते. हया वादग्रस्त उद्गारांमागे त्यांचा "मोटिव्ह" काय असेल ? असा प्रश्न केल्यास उत्तर सहज मिळेल . "२०१४ नंतर राहुल गांधींच्या च्या मंत्रिमंडळात परत महत्वाचे स्थान मिळवणे " राहुलजी समोर प्रतिस्पर्ध्याच्या वर्मावर घाला घालणारे सुशील हे "दिग्गी राजा प्रमाणे " उथळ व बेताल नाहित. सुशील हे स्वार्थ , हुजरेगिरी अंगात पूर्ण भिनलेले मुरब्बी राजकारणी आहेत ! आपले गृहमंत्री असे बोलण्याचे दुसरे करण "असुरक्षित असल्याची भावना " हे होय. ओवेसी , कसाब यांच्यावर कारवाई केल्याने - करावीच लागल्याने सोलापुरात "मायानोरीटी" ची मते आपल्याला मिळणार नाहित ह्या भावनेने त्यांना ग्रासले असावे. सोलापुरात पराभव आणि राज्यसभेत वर्णी लागली नाही तर आपला "शिवराज पाटील " तर नाही ना होणार ? असे ही वाटत असेल. त्यांच्या हया बोलघेवडेपणा मागे मला तरी ही दोन प्रमुख करणे दिसतात.

In reply to by तर्री

नसतील खुळे पण त्यासारखी विधाने करतातच ना? गृहमंत्री झाल्याबद्दल विशिष्ट समाजाला काँग्रेसने प्राधान्य दिल्याबद्दल आभार मानणे हाही त्यापैकीच प्रकार. तद्दन मूर्खपणा आहे-राजकीय शहाणपणा असला तरी.

In reply to by तर्री

२००२ मध्ये सोलापूरमधील ३-४ मुस्लिम कुटुंबातील काही जणांना घरात जवळपास १५० गावठी बॉम्ब सापडले म्हणून मोक्काखाली अटक करून तुरूंगात ठेवले होते. जानेवारी २००३ मध्ये शिंदे मुख्यमंत्री झाल्यावर सर्वात पहिल्यांदा त्यांनी या आरोपींवरील मोक्का रद्द करायला लावला व नंतर सर्वांना जामिनावर सोडले. तो खटला आजतगायत सुरू झालेला नाही. २००४ - २००६ या काळात आंध्रप्रदेशचे राज्यपाल असताना शिंद्यांनी खुनाच्या आरोपात जन्मठेप झालेल्या एका काँग्रेस कार्यकर्त्याला आपल्या अधिकारात त्याची शिक्षा माफ करून मुक्त केले होते. यावर संबंधित फिर्यादी न्यायालयात गेल्यावर न्यायालयाने शिंद्यांवर अत्यंत कडक शब्दात ताशेरे ओढून त्या आरोपीची जन्मठेप कायम केली होती. आदर्श घोटाळ्यातही शिंदे आहेतच.

या संदर्भात हाफिज सईद आणि शिंदे सायबांनी एकत्र पत्रकार परिषद घेतल्याचे बघण्यात आले ;) भास होता कि खरे होते ? ...जाणकारांनी प्रकाश टाकावा

या सगळ्याचे उत्तर २०१४ साली मतपेटीतून देणे एवढेच आपल्या हातात आहे. तरुण पिढीने जागृत होऊन मोठ्या प्रमाणावर मतदान करण्याची वेळ आली आहे.

याच विषयावर एक चांगला लेख http://www.outlookindia.com/article.aspx?283666 या लेखातील हे परिच्छेद काय सुचवितात? The investigation so far, based largely on the interrogation of some arrested Hindu suspects, who professed the Hindutva ideology, showed that neither the BJP nor the RSS had any knowledge of the planned acts of reprisal by these suspects. There has been no evidence at all that these organisations had any role in these incidents. These were purely rogue acts of reprisal by these individual Hindus with past association with these organisations. While evidence of the involvement of some Hindu rogue elements in the Malegaon blasts seems to be strong, evidence of their involvement in the Samjhauta Express explosion appears to be more circumstantial than direct. Moreover, immediately after it, US authorities had assessed that it was probably caused by the Lashkar-e-Toiba (LET).They have not come out with any subsequent assessment on it. Investigation into these cases has since been taken over by the National Investigation Agency (NIA) formed by the Union Ministry of Home Affairs in 2009 when Mr P. Chidambaram was the Home Minister. Despite all its resources, the NIA has not so far been able to come out with a comprehensive conclusion on the alleged involvement of some Hindu extremists in acts of reprisal against Muslims. There has been no sense of urgency in the MHA in having the investigation completed and the suspects prosecuted. One has a strong suspicion that the NIA is sought to be used not for the investigation and prosecution, but for politically needling the BJP and the RSS by periodically levelling allegations against them. This partisan exploitation of the investigation for political purposes is likely to continue till the 2014 elections. Mr Shinde’s statement is part of this partisan exercise. Short-sighted leaders of the Congress do not seem to realize that they have been playing into the hands of Pakistan and weakening our campaign against Pakistan for early action against the masterminds of the 26/11 terrorist strikes in Mumbai. Pakistan has been trying to link up its early prosecution of the accused in the 26/11 strikes in Mumbai with our early prosecution of the accused in the Samjhauta Express explosion on the ground that many Pakistanis travelling back to Pakistan by this train were killed in this explosion.

In reply to by श्रीगुरुजी

`मालेगावचा मास्टरमाइंड' --- लेखक श्री. रवींद्र दाणी मालेगाव येथे झालेल्या बाँबस्फोटांमध्ये हिंदुत्ववादी संघटनांना गोवण्यात आले आणि राजकीय शक्‍तींना आयतेच कोलीत मिळाले. त्यानंतर या प्रकरणातील हिंदु आरोपींना अधिकाधिक अडकवण्यासाठी अतिरेकीविरोधी पथकावर दबाव आणून आरोपींच्या चौकशा सुरू झाल्या. हा दबाव नक्की कोणाच्या माध्यमातून होता, हे लेखक श्री. रवींद्र दाणी यांनी `साप्‍ताहिक विवेक'च्या अंकात प्रसिद्ध केलेल्या `मालेगावचा मास्टरमाइंड' या लेखातून काही भाग येथे देत आहे. लष्करप्रमुख जनरल कपूर यांची नाराजी महाराष्ट्र अतिरेकीविरोधी पथकाने (एटीएसने) मालेगाव चौकशीसाठी लेफ्ट. कर्नल प्रसाद पुरोहित यांना अटक करण्याची परवानगी संरक्षणमंत्र्यांकडे मागितली. एका अतिरेकी कृत्यासाठी एका लेफ्ट. कर्नलला अटक करणे, ही काही साधीसुधी बाब नव्हती. अतिरेकीविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे वा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या आदेशाने वा दबावाने लष्करप्रमुख जनरल दीपक कपूर यांनी आपल्या एका अधिकार्‍यास पोलिसांच्या स्वाधीन करण्याचा प्रश्‍नच नव्हता. लष्करप्रमुख या बाबतीत संरक्षणमंत्री ए.के. अँथनी यांचे ऐकतील, असेही वाटत नव्हते. ए.के. अँथनी यांचा कोणताही इरादा नाही, दबदबा नाही. मग `लष्करप्रमुखांवर कोणता दबाव आला असावा' या विचारातून मालेगावचा `मास्टरमाइंड' कोण असावा, याचा शोध मी सुरू केला. नंतरच्या घटनाक्रमाने त्या शोधाला जणू गती मिळाली. हेमंत करकरे वारंवार आणखी काही विद्यमान लष्करी अधिकार्‍यांच्या चौकशीची मागणी करत होते. यावरून त्यांना विलासराव देशमुख, रा.रा. पाटील व लष्करप्रमुख जनरल कपूर यांच्यापेक्षाही मोठ्या व्यक्‍तीचा पाठिंबा होता. म्हणूनच करकरे दिल्लीत येऊन आणखी काही लष्करी अधिकार्‍यांच्या चौकशीचा विषय लष्करी अधिकार्‍यांशी बोलत होते. मालेगाव चौकशीवर नियंत्रण कुणाचे ? मालेगाव चौकशीवर विलासराव देशमुख वा रा.रा. पाटील यांचे नियंत्रण राहिलेले नव्हते, तर दिल्लीतून या चौकशीवर देखरेख केली जात आहे, याचा स्पष्ट पुरावा म्हणजे शिवराज पाटील. दररोज या चौकशीवर ते लक्ष ठेवून होते. शिवराज पाटील मालेगाव चौकशीत आदल्या दिवशी काय झाले आहे, याची माहिती घेत होते आणि पुढे काय करावयाचे आहे, याचेही निर्देश देत होते. गृहमंत्रालयातील एका अधिकार्‍याने प्रस्तूत प्रतिनिधीस ही माहिती दिली. अर्थात शिवराज पाटील यांच्या राजीनाम्यानंतर शिवराज यांच्या मागे कोण ? करकरे यांची अस्वस्थता ! या प्रश्‍नाचे उत्तर शोधण्यापूर्वी व निष्कर्ष काढण्यापूर्वी अतिरेकीविरोधी पथकाचे प्रमुख हेमंत करकरे यांना या चौकशीबाबत काय वाटत होते, याचाही उल्लेख केला पाहिजे. हेमंत करकरे आज हयात नाहीत. ते हयात असते, तर काही बाबींचा उल्लेख करता आला नसता. मालेगाव चौकशी सुरू झाल्यानंतर साध्वी प्रज्ञा यांच्या अटकेचा मुद्दा वादग्रस्त झाल्यानंतर हेमंत करकरे मुंबईतील त्यांच्या एका मित्रामार्फत दिल्लीतील एका व्यक्‍तीसाठी काही संदेश पाठवत होते. हे संदेश माझ्याकडे येत होते. संदेश पुढे पोहोचवण्याची जबाबदारी माझ्याकडे होती. तीन संदेशांचा येथे उल्लेख करता येईल. दिवाळीच्या काळात : दिवाळीच्या काळात झालेल्या पहिल्या संदेशानुसार, मालेगाव बाँबस्फोटाची जबाबदारी हिंदु संघटनांपैकी कोणी तरी घेतल्यास चौकशी पूर्ण समजून संपवली जाईल. दुसरा संदेश : दिवाळीनंतर ८-१० दिवसांनी दुसरा संदेश आला. त्यात करकरे सांगत होते, `३० वर्षांत कधीही नव्हता एवढा दबाव माझ्यावर आहे. साध्वी प्रज्ञा यांच्या `नार्को टेस्ट'मध्ये काहीही सापडलेले नाही. दोन ठिकाणी काही मामुली विसंगती आढळून आल्या. दिवाळीनंतर मालेगाव चौकशीत फार प्रगती झालेली नाही.' करकरे वारंवार दबावाचा उल्लेख करत होते. ३० वर्षांच्या सरकारी सेवेत माझ्यावर कधी नव्हता एवढा दबाव काही लोकांना, संघटनांना अडकवण्यासाठी आहे, असे ते कळवत होते. शेवटचा संदेश : २६ नोव्हेंबरची घटना होण्यापूर्वी करकरे यांचा तिसरा संदेश आला. काही बातम्या दिल्लीत `लिक' होत आहेत, तर काही मुंबईहून आणि यात माझी बदनामी होत आहे. मी त्या नाकारूही शकत नाही. मी काय करावे, हेच मला समजत नाही. करकरे यांचे हे संदेश पाहता वैयक्‍तिक आणि राजकीय दबावामुळे त्यांच्या मनाची झालेली घालमेल याची कल्पना येते. करकरे यांचे हे संदेश प्रसिद्ध झाल्याने त्यांच्याबद्दल निर्माण झालेले समज-गैरसमज दूर होण्यात मदतच होईल; कारण सर्व बातम्या करकरे स्वत:च `लिक' करत होते, असे चित्र तयार झाले होते; पण ती वस्तूस्थिती नव्हती. करकरे यांच्याकडून आलेल्या संदेशांमधून ते स्पष्ट होत होते. करकरे यांच्या संदेशातून स्पष्ट होणार्‍या दोन ठळक बाबी म्हणजे त्यांच्यावर सरकारमधून दबाव होता व चौकशीतील माहिती त्यांना न विचारता `लिक' केली जात होती. पंतप्रधान कार्यालयाचे राजकारण मालेगाव चौकशीबाबत पंतप्रधान स्वत: लक्ष देत होते काय ? या प्रश्‍नाचे उत्तर नकारार्थी आहे. पंतप्रधानांचा स्वभाव तसा नाही. डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असले, तरी ते खरोखरीच नामधारी आहेत. शरद पवार वगळता अन्य कोणताही मंत्री त्यांना विचारत नाही. मग मालेगाव चौकशीची सूत्रे कोणत्या व्यक्‍तीकडे वा शक्‍तीकडे होती ? ही व्यक्‍ती वा शक्‍ती लष्करप्रमुखांना आदेश देऊ शकेल, अशी असण्यास हवी, `सीबीआय' व `आयबी' यांना निर्देश देऊ शकणारी असायलाच हवी. वृत्तपत्रांना बातम्या `लिक' करण्याचा निर्णय घेणारी असावयास हवी. या तिन्ही कसोट्या पूर्ण करणारी ती व्यक्‍ती होती राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार एम्.के. नारायणन ! मालेगाव चौकशीची संपूर्ण सूत्रे नारायणन हाताळीत होते. लष्करप्रमुखांना हाताळण्याचे प्रकरण असो, `आयबी' व `सीबीआय' यांची मदत घेण्याचा निर्णय असो, प्रत्येक निर्णय नारायणन घेत होते. मालेगाव चौकशीचे निमित्त करून हिंदूंना अतिरेकी ठरवणे, निवडणुकीच्या तोंडावर भाजपचा भयोत्पादनाचा (दहशतवादाचा) मुद्दा हिसकावून घेणे आणि संघ परिवारातील भाजप, रा.स्व. संघ व विश्‍व हिंदु परिषद यांना बदनाम करणे. या महायोजनेची अंमलबजावणी नारायणन करत होते. महाराष्ट्र अतिरेकीविरोधी पथक पंतप्रधान कार्यालयाकडून आदेश घेत होते. हे अधिक स्पष्ट शद्बांत सांगावयाचे झाल्यास हेमंत करकरे नारायणन यांच्याकडून आदेश घेत होते. नारायणन यांची दोरी कोणाच्या हाती ? मालेगाव चौकशीची सूत्रे करकरे यांच्याकडे होती. सरकारी पद्धतीनुसार करकरे महाराष्ट्राच्या गृहमंत्रालयाकडून आदेश घेत होते; पण त्या आदेशामागे एम्.के. नारायणन होते. आता यात नारायणन कसे आले ? नारायणन हे पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असले, तरी ते पंतप्रधानांना कमी `रिपोर्ट' करतात आणि सोनिया गांधींना जास्त `रिपोर्ट' करतात. नारायणन यांना राजकीय वर्तुळात `दस जनपथका आदमी' म्हणून ओळखले जाते. एम्.के. नारायणन हे फक्‍त त्यांना `१०-जनपथ'मधून मिळणार्‍या आदेशानुसार वागत होते. कारण त्यांची ख्यातीच `१०-जनपथ'चे निष्ठावंत अशी आहे. नारायणन `भारतीय लोक सेवे'तील सेवानिवृत्त अधिकारी आहेत. `इंटेलिजन्स ब्युरो'चे प्रमुख म्हणून त्यांनी काम केले आहे. त्यांची निष्ठा राजीव गांधी यांच्याशी होती. तीच निष्ठा २००४ मध्ये त्यांच्या कामी आली आणि पंतप्रधानांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जे.एन. दीक्षित यांचे अकस्मात निधन झाल्यानंतर नारायणन यांना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार म्हणून नियुक्‍त करण्यात आले. नारायणन यांनी मालेगाव चौकशी होण्यासाठी जे काही केले ते सोनिया गांधींच्या निर्देशनावरून केले; पण मालेगाव चौकशीतला `मास्टरमाइंड' येथेच थांबत नाही. सोनिया गांधी यांच्या प्रत्येक राजकीय निर्णयामागे त्यांचे राजकीय सल्लागार अहमद पटेल असतात. मालेगावात हिंदु अतिरेक्यांनी बाँबस्फोट केले, अजमेर व हैद्राबाद या ठिकाणीही हिंदूच आहेत, हे अहमद पटेल यांचे सूत्र. हे सूत्र सोनिया गांधी यांच्या माध्यमातून पुढे रेटण्यात आले ते नारायणन यांच्या सरकारी माध्यमातून महाराष्ट्रापर्यंत राबवण्यात आणि हेमंत करकरे यांच्यासारख्या कर्तबगार अधिकार्‍याच्या माध्यमातून राबवण्यात आले. शेवटी करकरे यांनाही याची कल्पना होती; पण ते काहीही करू शकत नव्हते आणि २६ नोव्हेंबरच्या घटनेने करकरे काळाच्या पडद्याआड गेले आहेत. मालेगाव प्रकरणात हिंदु संघटनांना अडकवण्यासाठी त्यांच्यावर आलेल्या दबावाची कथा सांगण्यासाठी ते हयात असते, तर मालेगावचा `मास्टरमाइंड' देशाला अधिक चांगल्या प्रकारे ओळखता आला असता ! -------------------------------------------------------------------------------- कोणताही लष्करप्रमुख सरकारचा प्रचंड दबाव असल्याशिवाय आपल्या विद्यमान लष्करी अधिकार्‍यास पोलिसांच्या स्वाधीन करत नाही. हा नोकरशाहीतील सर्वमान्य पण अलिखित नियम आहे. महाराष्ट्रातील मालेगाव बाँबफोटाची चौकशी सुरू झाल्यावर सर्वप्रथम साध्वी प्रज्ञासिंग यांना अटक झाली. त्या वेळी फार प्रतिक्रिया उमटल्या नाहीत; पण नंतर काही दिवसांत भारतीय लष्कराच्या `मिलिटरी इंटेलिजन्स'मध्ये कार्यरत एका लेफ्ट. कर्नलला अटक झाल्यावर मात्र मालेगाव चौकशी प्रकरण साधे सरळ नाही, याचा पहिला संकेत मिळाला !

गॄहमंत्रायलाच्या ऑफिशिअल साईटवर प्रकाशित केलेल्या, तसेच सरकारने प्रतिबंधित केलेल्या अतिरेकी संघटनेच्या यादीत एकाही हिंदुत्ववादी अतिरेकी संघटनेचे नाव शोधुनही सापडले नाही. १)इंग्रजी दुवा :- http://www.mha.gov.in/uniquepage.asp?Id_Pk=292 (यात ३५ नावे आहेत.) २)हिंदी दुवा:- http://www.mha.gov.in/pdfs_hin/banned_org-H.pdf (यात ३४ नावे आहेत.) जाता जाता :--- तुलना करण्यात कॉग्रेसी नेत्यांची मजल कुठवर जावी ? तर... राहुल गांधींची तुलना मणिशंकर अय्यर यांनी ओबामांशी केली ! :D

In reply to by मदनबाण

वर श्रीगुरूजींनी, तसेच लोकसत्तेच्या अग्रलेखातील आणि आउटलूक मधील लेखात अजून कोणालाच दोषी ठरवता आले नाही असे म्हणले आहेच. पण तरी देखील गिल्ट बाय असोसिएशन च्या नेहमीच्या पद्धतीने सरकार संघ-भाजपाला या आरोपींमुळे आरोपीच्या पिंजर्‍यात घालत आहे. वास्तवीक जर काही पुरावे असले तर खरेच जाहीर करून योग्य ती कारवाई करावी, कोणी काही म्हणणार नाही, म्हणू शकणार नाही... पण तसे कसे करता येणार? त्यात गंमत म्हणजे स्वतःची असोसिएशन कुणाबरोबर आहे आणि त्यावरून स्वतःस काय समजायचे ह्याचा देखील विचार करायला हवा: १. हिंदू मधील बातमी: 1993 Surat blast: imprisonment for former Congress Minister २. १९९३ च्या मुंबई बाँबस्फोटासंदर्भात अवैध शस्त्रे बाळगल्यासंदर्भात संजय दत्तवर हायकोर्टापर्यंत शिक्षा झाली आहे आणि लवकरच सुप्रिम कोर्ट अपिलावरील निकाल जाहीर करेल. अर्थात आत्ता तरी त्यावरील आरोप हे कोर्टाने मान्य करून दोषी ठरवले आहेच. तरी देखील त्याला विधानपरीषदेचे तिकीट दिले गेले आहे. ३. त्या आधी भगत वगैरेंवर अनेक खटले शिख दंगलीसंदर्भात भरले गेले, पण त्यामुळे त्यांच्या हयातीत पक्षकार्यास धक्क्क बसल्याचे किमान ऐकीवात तरी नाही. त्या उलट बंगारू लक्ष्मण आता कुठे आहे हे देखील कुणास माहीत नाही. याचा अर्थ भाजपा आदर्श आहे वगैरे मी म्हणत नाही, पण फरक नक्कीच दिसतो.

In reply to by विकास

१९९३ च्या मुंबई बाँबस्फोटासंदर्भात अवैध शस्त्रे बाळगल्यासंदर्भात संजय दत्तवर हायकोर्टापर्यंत शिक्षा झाली आहे ....... तरी देखील त्याला विधानपरीषदेचे तिकीट दिले गेले आहे.
अभिनेता संजय दत्त समाजवादी पक्षाचा सदस्य झालाय. अन विधानपरिषदेचे तिकिट मिळालेले संजय दत्त काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. सध्याच्या मुख्यमंत्र्यांसाठी बहुधा त्यांनीच वि.प. सदस्यत्वाच राजीनामा दिला होता. प्रदेश काँग्रेस समितीचे ते दिर्घकाळ पदाधिकारी होते. नक्की माहीत नाही पण ते कोकणातले असावेत असा अंदाज आहे.

In reply to by श्रीरंग_जोशी

अभिनेता संजय दत्त बहुदा समाजवादी पक्षात आता नाही. विकास यांनी उल्लेख केलेले हे संजय दत्त म्हणजे महाराष्ट्र काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी संजय दत्त. हे दुसरे ज्यांनी पृथ्वीराज जव्हाण यांच्यासाठी विधानपरिषदेतील जागा मोकळी करुन दिली. मात्र विकास यांना अभिप्रेत असलेल्या संजय दत्त यांच्यासाठी एका पक्षाच्या दिवंगत प्रमुखांनी विशेष मदत करुन त्याला तुरुंगातून बाहेर कसे येता येईल हे पाहिले होते हे नक्की आठवते. ;)

In reply to by आजानुकर्ण

हा संजय दत्त काँग्रेसमधेच आहे: Congress welcomes Sanjay Dutt as actor regrets joining SP मात्र तुम्ही (श्रीरंग_जोशी) म्हणत असल्याप्रमाणे आमदार संजय दत्त बहुदा वेगळी व्यक्ती असावी.
मात्र विकास यांना अभिप्रेत असलेल्या संजय दत्त यांच्यासाठी एका पक्षाच्या दिवंगत प्रमुखांनी विशेष मदत करुन त्याला तुरुंगातून बाहेर कसे येता येईल हे पाहिले होते हे नक्की आठवते.
हा हा! अहो पण त्यांचे खुल्लमखुल्लाच होते. त्यांनी काही कुणाला गिल्ट बाय असोसिएशन ठरवले नाही आणि स्वत:ला सोवळे समजत चीप शॉट्स मारले नाहीत. तिथेच तर फरक आहे.

In reply to by विकास

कदाचित याबद्दलची बातमी मी वाचलिही असावी पण लक्षात राहिली नाही हे माझ्यासाठी एक सुचिन्हच. कारण काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंधीत बातम्यांचे लहान सहान तपशील मी ध्यानात ठेवत असे. अजूनही लक्ष असतेच पण हळू हळू रस कमी होत चालला आहे.

In reply to by विकास

गुपचूप कायदा तोडणे आणि खुल्लमखुल्ला कायदा तोडणे हे दोन्ही सारख्याच स्वरुपाचे गुन्हे आहेत. आम्ही कायद्याला किंवा लोकशाहीला जुमानत किंवा मानत नाही वगैरे म्हणत आमदार निवडून आणण्याची आणि सरकार बनवण्याची कसरत करायची हेही तितकेच केविलवाणे.

In reply to by आजानुकर्ण

तुमच्या भावनेशी सहमतच. ;) माझा मुद्दा: एका बाबतीत किर्तन आतून तमाशा असे वर्तब दिसते तर दुसर्‍या बाबतीत आंतर्बाह्य तमाशाच. किमान जनतेची दिशाभूल दुसर्‍या बाबतीत नसते इतकेच काय ते म्हणायचे आहे. मात्र पहील्या बाबतीत स्वत:ला हवे ते करायचे आणि दुसर्‍याला बदनाम करत लोकांचे लक्ष इतरत्रच वेधायचे असला प्रकार असतो.

In reply to by विकास

मीदेखील तुमच्या भावनेशी सहमत आहे. लोकशाही न मानताही लोकशाही निवडणुका लढवणे हा वरुन कीर्तन आतून तमाशा किंवा सतत काँग्रेस किंवा मुसलमानांना बदनाम करत लोकांचे लक्ष विकासाच्या मुद्द्यांवरुन धार्मिक मुद्द्यांवर नेण्याचा प्रकार करण्यापेक्षा काँग्रेससारखा अंतर्बाह्य तमाशा मलाही मान्य आहे. ;)

In reply to by आजानुकर्ण

काँग्रेसला तमाशा म्हणून तमाशाची बदनामी केल्याबद्दल निषेध... xxxxपेठ म्हणणार होतो पण तिथेही फक्त ठराविक धर्माच्या दाढ्या कुरवाळण्याचा प्रकार होत नसावा त्यामुळे त्यांचीही बदनामी होईल. त्यामुळे काँग्रेस = काँग्रेस. त्याला दुसरी उपमा नाही.

In reply to by विकास

बहुदा सगळेच राजकीय पक्ष भ्रष्टाचार सिद्ध झालेल्या नेत्यांबाबत निदान थोडीतरी लाज बाळगत असले तरी दंगलीबाबत आरोप सिद्ध झाल्यास तितकी पर्वा करत नाहीत असे दिसते. बंगारु लक्ष्मण यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते.भगत यांच्यावर दंगलीचे. दंगलीचे आरोप असूनही पक्षकार्यात धक्का न बसलेली इतर उदाहरणे म्हणजे बाळासाहेब ठाकरे, विनय कटियार वगैरे.

In reply to by आजानुकर्ण

बंगारु लक्ष्मण यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते.भगत यांच्यावर दंगलीचे.
आधी म्हणल्याप्रमाणे, बंगारूंना बाजूस केले गेले तर भगत शेवटपर्यंत पक्षात राहीले.
दंगलीचे आरोप असूनही पक्षकार्यात धक्का न बसलेली इतर उदाहरणे म्हणजे बाळासाहेब ठाकरे, विनय कटियार वगैरे.
कटीयार बद्दल माहीत नाही, पण बाळासाहेबांबद्दल टाईम्स मधीले हे वाचनीय आहे. त्यातील पहीलाच परीच्छेद खाली उर्धृत करत आहे: For all the "inflammatory" speeches and controversy through Shiv Sena chief Bal Thackeray's long political career, his brush with the law was always rather remote. He never faced a trial, spent time in jail only once, and was never convicted for any substantial criminal offence. The cases against him for hate speech were all either withdrawn or never took off for want of prior government sanction ; in others he was never charged. He did get convicted once for contempt of court but any glee among his detractors was short-lived . The Supreme Court set aside his conviction in 2004 for want of the necessary consent of the advocate-general.

In reply to by विकास

बंगारु हे अगदी टीव्हीच्या पडद्यावर पैसे घेताना पकडले गेल्यावर भाजपाकडे दुसरा पर्याय होता का? भगत पक्षात राहिले कारण त्यांच्यावरचे आरोप हे भ्रष्टाचाराचे नसून दंगलींचे होते. दंगलींचे आरोप असलेले कटियार, साध्वी ऋतंभरा, ठाकरे वगैरे कोणीही पदावरुन बाजूला गेले नाही. याउलट भ्रष्टाचाराचे आरोप असलेले राम नाईक, दिलीप सिंग जुदेव, येडियुरप्पा, स्वतः श्री गडकरी हे अगदी शेवटची वेळ येईपर्यंत पदाला चिकटूनच होते. आता बंगारुंचे उदाहरण देऊन भ्रष्टाचाराच्या विरोधात भाजपा काही ठोस पाऊल उचलत आहे असे तुम्हाला निर्देशित करायचे असेल तर त्याविरोधातील अनेक उदाहरणे इतिहासात मिळतील श्रीकृष्ण आयोग अहवालाने बाळासाहेबांना दंगलीबाबत जबाबदार धरले होते. मात्र तत्कालीन सेना-भाजपा सरकारने त्या अहवाला समाधी दिली. ठाकरे यांच्याविरोधात कारवाई करण्याचे धैर्य व कायदा-सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी याचा योगायोग अनेक सरकारांना साधता आला नाही.

सुशीलकुमारांना जर हे सगळे माहीत असेल तर आख्खे गृहमंत्रालय हाताशी असताना मीडियासमोर बडबडण्यापेक्षा सरळ कारवाई करुन मोकळे व्हावे. दहशतवादाला धर्माचा रंग देणे चुकीचे आहे. मी हिंदू आहे आणि हिंदू दहशतवादी हा शब्द मला खुपतो.

In reply to by आजानुकर्ण

फॉर दी रेकॉर्ड इतके स्पष्ट लिहील्याबद्दल धन्यवाद! अगदी संघ-भाजपाच्या विरोधकांकडूनही इतकेच म्हणायची गरज आहे. असो. :)

In reply to by आजानुकर्ण

केंद्रीय गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी गेल्या रविवारी जयपूर येथील कॉग्रेसच्या चिंतन शिबीरात केलेल्या एका आरोपाने मोठीच राजकीय खळबळ उडवून दिलेली आहे. आपल्या हाती आलेल्या अहवालानुसार संघ व भाजपा यांच्या शिबीरात भगवा दहशतवाद शिकवला जातो व हिंदू दहशतवादी घडवले जातात; अशा स्वरूपाचा तो आरोप आहे. मग त्यांनी हिंदू शब्द वापरला, की भगवा यावर वाद घालण्यात अर्थ नाही. त्यातला आशय स्पष्ट आहे. त्यांनी देशातला व संसदेतला प्रमुख विरोधी पक्ष भाजपा आणि त्याच्याशी संबंधित असलेल्या रा. स्व. संघावरच दहशतवाद फ़ैलावत असल्याचा आरोप केलेला आहे. आता त्या आरोपामुळे भाजपा वा संघवाले विचलित झाले, संतापले आणि त्यांनी त्यावर आक्षेप घेतला तर योग्यच आहे. पण त्यावर गदारोळ उठल्यावर शिंदे वा अन्य कॉग्रेसजनांनी केलेला खुलासा कमालीचा हास्यास्पद आहे. तो खुलासा म्हणजे गृहमंत्र्यांच्या विधानाचा विपर्यास झाल्याचा दावा केला जातो. विपर्यास भाजपाने केला म्हणायचा तर नेमका त्यांनी घेतला; तोच अर्थ पाकिस्तानात बसलेल्या लष्करे तोयबाच्या प्रमुखानेही काढला आहे. म्हणजेच गृहमंत्री बोलल्याचा जो आशय इथल्या माध्यमांनी व भाजपाने काढला; तोच त्या विधानाचा सर्वसाधारण अर्थ असू शकतो. त्यावरूनच प्रतिक्रिया उमटणार ना? सवाल असा आहे, की देशाच्या गृहमंत्र्याने कुठलेही विधान करतांना जपुन बोलायचे असते. कारण त्याच्या विधानाचा संदर्भ अनेक गोष्टींसाठी लावला जाणार असतो. पाकिस्तानचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष आसिफ़ अली झरदारी यांनी एका जागी बोलताना असेच वादग्रस्त विधान केलेले होते व भारताने त्याचे भांडवल केले आहे, मग शिंदे वाटेल ते बोलून निसटू शकतील काय? ‘पाकिस्तानने काही काळ दहहतवादाचा वापर राष्ट्रीय धोरण म्हणून केला’, असे झरदारी बोलून गेले होते. तो वापर कश्मिर धोरणाच्याच बाबतीत झाला; असे भारताने कायम म्हटलेले आहे. म्हणजे तसे विधान करून झरदारी यांनी भारताला पाकविरुद्ध मुद्दाच पुरवला होता. शिंदे यांनी त्याची परतफ़ेड केली म्हणून त्यांचे जयपूरमधील विधान हा गंभीर मामला आहे. भारतातल्या दहशतवाद व जिहादी कारवायांमागे पाकिस्तानचा हात आहे; असे आरोप आपण गेली दोन दशके करीत आहोत. मग मुशर्रफ़ यांच्या कारकिर्दीत बलुचिस्तानमध्ये जो असंतोषाचा भड्का उडाला, त्याला भारताच्या कारवाया कारणीभूत आहेत; असा आरोप पाकिस्तान करू लागला. त्याला कुठला पुरावा नाही. पण आरोप होतच असतो. आपणही तसे आरोप पाकिस्तानवर करता असतो. मुंबईतील हल्ल्याचा सुत्रधार म्हणून आपण लष्करे तोयबाचा प्रमुख हफ़ीज़ सईद याच्याकडे बोट दाखवत असतो. त्या्च्या विरोधातले सज्जड पुरावे मिळाल्याने व जगाला ते दाखवले असल्याने; अमेरिका व राष्ट्रसंघानेही त्यावर बंदी घातली आहे. पण पाकिस्तानने कधीच सईदला त्यातला गुन्हेगार मानलेले नाही वा तसा आरोप स्विकारलेला नाही. उलट त्याने लष्करचे नाव बदलून जमात उद दावा असे केले. ती सेवाभावी संघटना आहे असाच पाकिस्तान प्रत्येकवेळी प्रतिदावा करीत आलेले आहे. मात्र आपल्याकडे हिंदूत्ववादी संघटनांवर जे आरोप सेक्युलर पक्ष व माध्यमांकडून होत असतात, त्याचा आधार पाकिस्तान नित्यनेमाने घेत असते आणि त्याच आधारावर भारतातच हिंदू दहशतवाद बोकाळला असल्याचा प्रतिआरोप केला जात असतो. शिंदे यांच्या जयपूरच्या विधानाने त्याच आरोपाला दुजोरा मिळालेला आहे. इथे शिंदे यांची चुक कुठे झाली, ती लक्षात घेतली पाहिजे. ते कॉग्रेस पक्षात आहेत व कॉग्रेसचे नेताही आहेत. पण त्याचवेळी ते भारत सरकारचे गृहमंत्री सुद्धा आहेत. मग ते बोलतील त्याकडे कॉग्रेस पक्षाच्या नेत्याचा आरोप म्हणून बघितले जाणार नाही. तर भारत सरकारचे मत वा निष्कर्ष म्हणूनही बघितले जाणार असते. शिंदे यांनी केलेला आरोप व दिग्विजय सिंग यांनी केलेला आरोप यात असा मूलभूत फ़रक असतो. म्हणूनच अशा महत्वाच्या पदावर बसलेल्या व्यक्तीने त्याचे कायम भान राहले पाहिजे. शिंदे यांना त्याचेच भान ठेवता आलेले नाही. पण पक्षिय अभिनिवेशामध्ये त्यांनी केलेल्या विधानामुळे भाजपाला किती नुकसान होईल; हा भागा अजिबात महत्वाचा नाही. शिंदे यांच्या त्याच विधानाने भारताचे किती नुकसान केले वा होणार; या गोष्टीला अत्यंत महत्व आहे. शिंदे यांनी ते भाषण केल्यावर इथे भाजपाने कल्लोळ केला, ह्याला महत्व नाही. त्यापेक्षा पाकिस्तानातून तात्काळ आलेली प्रतिक्रिया महत्वाची होती. लष्करे तोयबाचा मुखिया व २६/११ च्या मुंबई हल्यातला सुत्रधार, आरोपी हफ़ि़ज़ सईद याने भारतातच दहशतवाद पोसला जातो, याला भारताच्या गृहमंत्र्यांनीच दुजोरा दिल्याचे घोषित केले. तेवढ्यावर न थांबता त्यांने तात्काळ तीन भारतीय हिंदू दहशतवादी संघटनांवर बंदी घालण्याचे आवाहन अवघ्या जगाला करून टाकले. त्यांनी नावे वाचली तर शिंदे किती हास्यास्पद ठरलेत; त्याचा अंदाज येऊ शकतो. हफ़िज़ने बंदीची मागणी केली त्यात संघ व हिंदू परिषदेचे नाव असायला हरकत नाही. पण त्याने बंदी घालायची मागणी केलेल्या तिसर्‍या संघटनेचे नाव ‘शिंदे’ असे दिले होते. म्हणजे त्या माकडाला शिंदे हे व्यक्तीचे नाव किंवा आडनाव असते हेसुद्धा माहीत नाही. अशा माकडाच्या हाती आपण कोलित देतो आहोत, याचे भान गृहमंत्र्यांनी ठेवायचे असते. कारण गृहमंत्र्याचे विधान जाहिर असले; मग ते भारत सरकारचे धोरण वा मत मानले जात असते. जगभर पाकिस्तानी जिहादी धुमाकुळ घालत आहेत. मुंबई हल्ल्यातला हाती लागलेला एकमेव फ़िदायिन अजमल कसाब; यानेही हफ़िज़च आपल्या हल्ल्याचा सुत्रधार असल्याची कोर्टात कबुली दिलेली आहे. त्याचा फ़ोनवरचा आवाजही नोंदला गेलेला आहे. त्याच्या आवाजाचा नमूना द्यायचेही पाकिस्तानने नाकारले आहे. त्याच्यासह लष्कर विरोधातले पुरावेही पाकने नाकारले आहेत. फ़ार कशाला जगाकडे पुरावे असताना लष्कर नावाची संघटना पाकिस्तानात कार्यरत आहे; हे सुद्धा स्विकारण्यास नकार दिला आहे. आणि दुसरीकडे आमचे गृहमंत्रीच ज्या संघटनांबद्दल काही संदिग्ध पुरावे किरकोळ प्रकरणातले आहेत. त्याचा हिंदू दहशतवाद म्हणून जगभर डंका पिटणार असतील, तर पाकने त्याचा गैरवापर करू नये असे कोणी म्हणू शकेल का? आपण भाजपाला शह देण्याचे राजकारण करताना भारत सरकारच्या पायावर धोंडा मारतोय याचे तरी भान शिंदे यांनी ठेवायला नको का? त्याच्या परिणामांचा विचार नको करायला? हफ़िज़ने त्याच्याही पुढे जाऊन अनेक मागण्या केलेल्या आहेत. भारताचे गृहमंत्रीच इथे दहशतवादी संघटना आहेत व त्या घातपात हिंसेचे प्रशिक्षण देतात. तेव्हा या निवेदनाच्या आधारे भारताला दहशतवादी राष्ट्र घोषित करावे, अशीही मागणी हफ़िज़ने केली आहे. नशीब अजून पाकिस्तानने तशी मागणी केलेली नाही. पण उद्या नजिकच्या काळात पाकिस्तान तशी मागणी करणार नाही, याची कोणी हमी देउ शकते काय? कारण तशी मागणी करण्यासाठी पाकिस्तानला कुठले पुरावे देण्याची गरज नाही. कारण तसे पुरावे आहेत व तसा अहवालच आपल्या हाती आलेला आहे, असे भारताच्या गृहमंत्र्यानेच खुलेआम सांगून टाकलेले आहे. तेव्हा ती एकप्रकारे भारतात दहशतवादी प्रशिक्षण शिबीरे असल्याची भारत सरकारचीच कबुली ठरते. त्याचे पुरावे राष्ट्रसंघाने पाकिस्त्तानकडे मागायची गरज उरत नाही. ते पुरावे आहेत म्हणणार्‍या भारत सरकार व गृहमंत्री शिंदे यांनाच द्यावे लागणार आहेत. म्हणजेच त्यांनी जे काही नंतर वा आधी भाजपच्या तोंडावर खुलासे टाकले आहेत, ते पुरेसे नाहीत. त्यांना तशी वेळ आली तर जगासमोर त्याचे पुरावे सादर करावे लागणार आहेत. आणि ते पुरावे भाजपा किंवा संघाच्या विरोधातले देऊन चालणार नाही. तर त्यांनाच निर्दोष ठरवणारे पुरावे द्यावे लागतील. कारण भाजपा किंवा संघ दहशतवादी संघटना असतील तर त्यावर भारत सरकारला बंदी घालावी लागेल. कारण तशी माग्णी पाकिस्तानने लावून धरली तर त्यासाठी समोर भाजपा किंवा संघाचा कोणी प्रवक्ता नसेल. समोर असेल राष्ट्रसंघ व अवघे जग. त्यामुळेचे जे कोणी पोपटासारखे भाजपा व संघाला दहशतवादी ठरवण्यासाठी आपली बुद्धी पणाला लावून अकलेचे तारे तोडत आहेत, ते शिंदे यांचे समर्थन करीत नसून भारताला सापळ्यात अडकवत आहेत. मग ते माध्यमातले बावळट सेक्युलर असोत किंवा कॉग्रेसचे मुर्ख नेते असोत. कारण पाकिस्तानने त्याचा आधार घेतला तर जगासमोर नाचक्की भाजपाची होणार नाही ती नाचक्की भारत सरकारची होणार आहे. त्याचे उत्तर भारत सरकार म्हणजे प्रत्यक्षात कॉग्रेसलाच द्यावे लागणार आहे. कारण या आरोप व भाषणाचा आधार पाकिस्तानने घेतला तर भाजपा व संघ बाजूला पडून देशाची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे.-भाऊ तोरसेकर

साह्यबांच्या विधानाचा योग्य अर्थ फक्त सोलापूरसाठीच आहे. हा मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवरचा जिल्हा आहे. सध्या येथील राष्ट्रवादीचे अल्पसंख्यांक सेलच्या धडाकेबाज मोहिमेला दिलेले उत्तर आहे ते. देशपातळीवर जरी याचा परिणाम झाला तरी तो काँग्रेसला हवाच आहे. किंबहुना धर्मांध आणि निधर्मांध असे कथित ध्रुवीकरण इलेक्शनपर्यंत झाले तरी ते काँग्रेसला फायद्याचे आहे. त्याचाच हा एक बाण आहे. शिकार किती होतील कुणास ठाऊक?

दहशतवाद हा दहशतवाद असतो. त्याला धर्माची लेबल लावण चुकच. पण मुस्लिमाणा सरसकट दहशतवादी ठरवणे पण चुक आणि सरसकट सगळे हिंदू दहशतवादी आहेत असे म्हणे पण चुकच.

In reply to by पिंपातला उंदीर

कुठल्याही व्यक्तीवर आरोप सिद्ध न करता, त्या अरोपांना न्यायालयात तडीस न नेता, नुसते वर्षानुवर्षे डांबून ठेवून, त्याचा नुसताच राजकीय वापर त्या व्यक्तीपेक्षा गिल्ट बाय असोसिएशन ने इतर संघटना/संस्थांच्या विरोधात करणे हे महाचूकच, मानवाधिकारच्या विरोधात आहे. अर्थात अशा ठिकाणी ते बोलायला जात नाहीत हा वेगळा मुद्दा आहे. असो.

In reply to by पिंपातला उंदीर

फक्त माहिती साठी ...सध्या कॉंग्रेसचे तहहयात रोजंदारी कामगार असलेले सुशील कुमार .ज्याना सध्या कॉंग्रेसने दहशतवादाचे रंगारी म्हणुन कंत्राट दिलेय त्यांना हा तपशिल अंमळ माहित नसावा "प्रत्येक मुसलमान हा दहशतवादी नसतो पण पकडला जाणारा प्रत्येक दहशतवादी हा मुसलमान असतो" हे गृहितक संघ अथवा भाजपाचे नसून "It is a certain fact that not all Muslims are terrorists, but it is equally certain, and exceptionally painful, that almost all terrorists are Muslims"-Abdel Rahman al-Rashed

'विश्वरूपम' या चिपत्रटाच्या प्रदर्शनाला घातलेल्या दोन आठवड्यांच्या बंदीच्या पार्श्वभूमीवर कमल हसन यांनी हा 'सांस्कृतिक दहशतवाद' असल्याचे म्हटले आहे. यावर उपाय काय ?

In reply to by नितिन थत्ते

ते असो. पण चिचाजी, आपले या विषयावर मत काय? (पूर्व)ग्रहमंत्री शिंदेसाहेब योग्य बोलले की नाही? दहशतवादाला रंग देणे योग्य की अयोग्य?

In reply to by नितिन थत्ते

इंटरनेट हिंदू हा वेगळा धर्म नाही. ते एक Behavioral Trait आहे. जसे शंकरपाळी मध्ये शंकराचे अस्तित्व नसते तसे इंटरनेट हिंदूंचे खऱ्याखुऱ्या हिंदुत्वाशी काही नाते नसते.

In reply to by आजानुकर्ण

जसे शंकरपाळी मध्ये शंकराचे अस्तित्व नसते शंकरपाळी हा शब्द हिंदीतील ‘शक्करपारे’ ह्या शब्दाचा अपभ्रंश असल्याचे वाचल्याचे आठवते, खूप दिवसापूर्वी वाचले होते त्यामुळे देण्यासाठी संदर्भ सापडत नाहीये..........

आजकाल काहीही झाले तरी संघपरिवारावर ठपका ठेवला जातो. माझ्या मते संघपरिवारात फक्त ४-५ संघटना येतात. त्या म्हणजे रा.स्व.संघ, भाजप, अभाविप, भारतीय मजदूर संघ व वनवासी संघ. शिवसेना, भारतीय कामगार सेना, भारतीय विद्यार्थी सेना, पतितपावन संघटना, श्रीराम सेने, हिंदू एकता आंदोलन, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, अभिनव भारत, सनातन भारत, श्रीरामजन्मभूमी न्यास इ. संघटना/पक्ष संघाच्या नियंत्रणात नाहीत. परंतु या इतर संघटनांनी काहीही केले तरी संघपरिवारावर म्हणजे पर्यायाने रा.स्व.संघावर ठपका ठेवला जातो.

In reply to by श्रीगुरुजी

हम्म. हे रोचक आहे. संघ परिवारात फक्त ४-५ संघटना येतात हे केवळ तुमचे मत आहे की तथ्य आहे? येथे थोडी माहिती पाहा. http://www.sanghparivar.org/organization-profiles http://en.wikipedia.org/wiki/Sangh_Parivar

In reply to by आजानुकर्ण

मी वर दिलेल्या यादीपैकी फक्त विश्व हिंदू परिषद या एकाच संघटनेचा संघाच्या संकेतस्थळावर उल्लेख आहे. बाकी इतर संघटनांचे नाव आपल्याशी संबंधित असल्याचा संघाच्या संकेतस्थळावर उल्लेख नाही. म्हणजे विश्व हिंदू परिषद वगळता मी दिलेली उर्वरित यादी बरोबर आहे. या उर्वरित संघटना संघाशी संबंधित नाहीत म्हणजेच संघ त्यांचे व्यवस्थापन करित नाही किंवा संघाचे त्यांच्यावर नियंत्रण नाही.

In reply to by आजानुकर्ण

सदरचा लेख फक्त माहितीसाठी बाकी चालू द्या .. Do u know who said this "It is a certain fact that not all Muslims are terrorists, but it is equally certain, and exceptionally painful, that almost all terrorists are Muslims" A Wake-up Call : Almost all terrorists are Muslims.. Arab News ^ | Abdel Rahman al-Rashed Posted on Sunday, October 3, 2004 6:58:34 AM by paltz It is a certain fact that not all Muslims are terrorists, but it is equally certain, and exceptionally painful, that almost all terrorists are Muslims. The hostage-takers of children in Beslan, North Ossetia, were Muslims. The other hostage-takers and subsequent murderers of the Nepalese chefs and workers in Iraq were also Muslims. Those involved in rape and murder in Darfur, Sudan, are Muslims, with other Muslims chosen to be their victims. Those responsible for the attacks on residential towers in Riyadh and Khobar were Muslims. The two women who crashed two airliners last week were also Muslims. Osama bin Laden is a Muslim. The majority of those who manned the suicide bombings against buses, vehicles, schools, houses and buildings, all over the world, were Muslim. What a pathetic record. What an abominable "achievement." Does all this tell us anything about ourselves, our societies and our culture? These images, when put together or taken separately, are shameful and degrading. But let us start with putting an end to a history of denial. Let us acknowledge their reality, instead of denying them and seeking to justify them with sound and fury signifying nothing. For it would be easy to cure ourselves if we realize the seriousness of our sickness. Self-cure starts with self-realization and confession. We should then run after our terrorist sons, in the full knowledge that they are the sour grapes of a deformed culture. Let us listen to Yusuf al-Qaradawi, the sheikh – the Qatar-based radical Egyptian cleric – and hear him recite his fatwa about the religious permissibility of killing civilian Americans in Iraq. Let us contemplate the incident of this religious sheikh allowing, nay even calling for, the murder of civilians. This ailing sheikh, in his last days, with two daughters studying in "infidel" Britain, soliciting children to kill innocent civilians. How could this sheikh face the mother of the youthful Nick Berg, who was slaughtered in Iraq because he wanted to build communication towers in that ravished country? How can we believe him when he tells us that Islam is the religion of mercy and peace while he is turning it into a religion of blood and slaughter? In a different era, we used to consider the extremists, with nationalist or leftist leanings, a menace and a source of corruption because of their adoption of violence as a means of discourse and their involvement in murder as an easy shortcut to their objectives. At that time, the mosque used to be a haven, and the voice of religion used to be that of peace and reconciliation. Religious sermons were warm behests for a moral order and an ethical life. Then came the neo-Muslims. An innocent and benevolent religion, whose verses prohibit the felling of trees in the absence of urgent necessity, that calls murder the most heinous of crimes, that says explicitly that if you kill one person you have killed humanity as a whole, has been turned into a global message of hate and a universal war cry. We can't call those who take schoolchildren as hostages our own. We cannot tolerate in our midst those who abduct journalists, murder civilians, explode buses; we cannot accept them as related to us, whatever the sufferings they claim to justify their criminal deeds. These are the people who have smeared Islam and stained its image. We cannot clear our names unless we own up to the shameful fact that terrorism has become an Islamic enterprise; an almost exclusive monopoly, implemented by Muslim men and women. We cannot redeem our extremist youths, who commit all these heinous crimes, without confronting the sheikhs who thought it ennobling to reinvent themselves as revolutionary ideologues, sending other people's sons and daughters to certain death, while sending their own children to European and American schools and colleges. *Abdel Rahman al-Rashed is general manager of Al-Arabiya news channel. This article first appeared in the London-based pan-Arabic newspaper Al-Sharq Al-Awsat.

In reply to by श्रीगुरुजी

एक प्रश्न आहे, उत्तर कोण देऊ शकेल माहित नाही. १९८९ - ९० च्या दरम्यान विहिंपने अयोध्येतल्या प्रस्तावित राममंदीरासाठी वर्गणी गोळा केली होती. ते मंदीर अजूनही प्रस्तावितच आहे. एवढ्या सार्‍या पैशांचे पुढे काय झाले? माझ्याही घरून काही वर्गणी गेली होती. दहा बारा वर्षांपूर्वी वर्गणी गोळा करणारर्‍यांना हा प्रश्न गमतीने विचारला असता ते म्हणाले पावती दाखवा वर्गणीचे पैसे परत करू....

In reply to by श्रीरंग_जोशी

मी (आम्ही/घरच्यांनी) काही वर्गणी दिली असे वाटत नाही. एकूणच त्यात गुंतलेले नव्हतो. दहा बारा वर्षांपूर्वी वर्गणी गोळा करणारर्‍यांना हा प्रश्न गमतीने विचारला असता ते म्हणाले पावती दाखवा वर्गणीचे पैसे परत करू.... हा हा! मस्तच उत्तर. तरी देखील उत्सुकतेपोटी गुगलले तर Clouds of uncertainty looms over VHP workshop ही टाईम्स मधील बातमी वाचायला मिळाली. त्यात म्हणल्याप्रमाणे ७०% मंदीर तयार आहे. उर्वरीत ३०% "वही बनाएंगे" ;) असल्याने राहीले आहे. त्यातील मुद्द्याचा परीच्छेद खाली देत आहे: There have been other hiccups too. In 1989, the VHP raised an amount of Rs 2.75 crore after accepting donations of Rs 1.25 each from Ramlala's followers. By the time the construction on the temple began, the interest capitalised on the funds gave the VHP a whopping Rs 7.5 crore with which to order material needed for construction. Spokesperson for VHP's Awadh region, Sharad Sharma confirmed all the money had been spent on acquiring material. "We exhausted the entire funds in acquiring materials for construction. थोडक्यात पैसे वापरले गेले आहेत. तेंव्हा परत मागायला जाऊ नका...पण अजून देण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधू शकता. ;)

In reply to by विकास

२३-२३ वर्षांपूर्वीची गोष्ट असली तरी केवळ २.७५ कोटी रु. एवढीच रक्कम जमली असेल यावर विश्वास बसत नाही. तुमच्या प्रतिसादानंतर आठवले की बातम्यांमध्ये एकदा उ.प्र. मधील एका मार्बल फॅक्टरीमध्ये राममंदिरासाठी तयार असलेले संगमरवर वगैरे दाखवले होते.

In reply to by श्रीरंग_जोशी

२३-२३ वर्षांपूर्वीची गोष्ट असली तरी केवळ २.७५ कोटी रु. एवढीच रक्कम जमली असेल यावर विश्वास बसत नाही. कल्पना नाही. पण आता इतकी(शी) रक्कम एखादा नगरसेवकही त्याच्या एका खिशातून काढून देऊ शकेल असे वाटते. :-)

In reply to by विकास

तेव्हा तालुक्याच्या ठिकाणीसुद्धा विहिंपचा साधा कार्यकर्ता दिवसाला हजार दिड हजार रुपये सहज जमवत असे. देशभरातील मोठी शहरे व धनाढ्यांकडून मिळालेल्या देणग्या पाहता रक्कम किमान १ अब्ज तरी असायला हवी...

In reply to by श्रीरंग_जोशी

रा.स्व. संघाचे एक निष्ठावंत वृद्ध पदाधिकारीकार्यकर्ता आमच्या घरी येत असत.वनवासी कल्याणाशी संबंधित काम असे. नंतर जन्मभूमी चळवळ उफाळून आली तेव्हा मदतीचा प्रश्न आला.त्यातले हेतू व अंमलबजावणीची दिशा मान्य नसल्याने थोडा मैत्रीपूर्ण वाद झाला.त्या काळात मंदिरनिर्मितीसाठी गावागावांतून समारंभपूर्वक विटा गोळा करण्याचा कार्यक्रम चालत असे.सुंदर वस्त्रालंकारयुक्त स्त्रीपुरुषांनी या विटा माथ्यावरून वाजत गाजत वाहून आणायच्या,गावातल्या मध्यवर्ती ठिकाणी समारंभपूर्वक पूजा वगैरे करायची आणि नंतर त्या राममंदिरासाठी अयोध्येकडे रवाना करीत आहोत असे सांगून तिथून हलवायच्या अशी साधारणतः कार्यपद्धती असे.याबद्दल आम्ही नापसंती व्यक्त करताच ते वृद्ध गृहस्थ म्हणाले होते, अहो,आम्ही घराघरांतून मदत मागतो ते संपर्क,प्रचार आणि वातावरणनिर्मितीसाठी. मंदिरासाठी अशा किरकोळ वैयक्तिक देणग्यांची गरज नाही. परदेशांतून इतका पैसा आला आहे की त्यात कितीतरी मंदिरे उभी राहू शकतील. काहींनी तर खर्‍याखुर्‍या सोन्याच्या विटा पाठवल्या आहेत.आहात कुठे!

In reply to by राही

हे सहीच. :) असाच एक संघाचा माणुस मला म्हणाला होता की जेव्हा भाजपा ह्या राममंदिरा च्या इश्यु मधे घुसला, सर्व बट्ट्याबोळ झाला. नाहीतर मंदिर कधीच बांधुन झालं असतं.

In reply to by राही

ज्या कामासाठी करोडो रुपये जमा केले तो मुद्दा च सोयीस्कर पण खुंतीवर टांगुन ठेवणे हा एक प्रकारचा भ्रष्टाचार च की. त्या जमा केलेल्या पैशाच पुढे काय झाल हा वेगळाच भाग. पण आपला तो बाब्या आणि दुसर्‍याचा तो.....

In reply to by श्रीगुरुजी

(संघद्वेष्टे किंवा संघाशी संबंध नसलेले सोडून देऊ.) संघाबद्दल सहानुभूती, आपुलकी, इ. इ. आहे असं दिसणारे प्रतिसाद लिहीणार्‍या व्यक्तीलाही, संघाशी संबंधित किंवा संघाच्या नियंत्रणाबाहेर असणार्‍या संघटनांची यादी बनवताना समिती आठवतही नाही.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

लैच जीवघेणा सिक्सर मारला बघा तुम्ही. एका धाग्यावर संघ कसा बायकाणा समानतेने वागवतो यावर अहमहीकेने वाद घालणारे महाभाग आठवले ; )

सव्वीस नोव्हेंबर, आझाद मैदान ह्या दहशतवाद, दंगेखोरीला हिरवा रंग दिला तर चालेल का?

In reply to by हुप्प्या

त्या दहशतवादाला नेहमीच* रंग दिला गेला आहे म्हणून तर दुसरा रंगही दाखवला जात आहे. प्रत्येक ...... दहशतवाई नसतो पण..... वगैरे

In reply to by नितिन थत्ते

पण दहशतवादाचा हा दुसरा रंग अस्तित्वात आहे का? या रंगाच्या किती जणांवर आजतगायत दहशतवादाचे आरोप न्यायालयात सिद्ध झाले आहेत?

In reply to by पिंपातला उंदीर

दहशतवाद/अतिरेकी हल्ले आणि जातीय दंगली या वेगळ्या आहेत. जातीय दंगली भारतात स्वातंत्र्यापूर्वीपासूनच सुरू आहेत. त्या जशा दोन धर्मात होतात, तशाच दोन जातींमध्ये पण होतात आणि एकाच धर्माच्या दोन पंथांमध्ये पण होतात. या दंगली बर्‍याचदा उस्फूर्त किंवा काही तात्कालिक कारणामुळे होतात व बहुतेकवेळा त्या योजनाबद्ध नसतात. जातीय दंगलीत आजवर अनेकांना (सर्व जातीधर्माच्या) शिक्षा झालेली आहे. अतिरेकी हल्ल्याला कोणतेही कारण लागत नाही. कुठेतरी जाऊन माणसे मारायची व दहशत निर्माण करायची हाच उद्देश दहशतवादामागे असतो. २६/११ पाकिस्तानमधून येऊन मुम्बईत निरपराध नागरिकांना मारणार्‍या अतिरेकी हल्ल्यामागे किंवा जुलै २००६ मध्ये मुम्बईत लोकलमध्ये प्रेशरकुकर मध्ये बॉम्ब ठेवून जवळपास २०० लोकांना मारणार्‍यांकडे पाकिस्तानकडे समर्थनीय कारण नव्हते. अतिरेकी हल्ले हे उस्फूर्त किंवा तात्कालिक कारणांमुळे होत नसून त्याची अतिशय थंड डोक्याने योजना बनविलेली असते. धर्माच्या नावावर भडकावून, धर्मग्रंथांचा हवाला देऊन, अनेक महिन्यांपासून ब्रेनवॉशिंग करून अतिरेकी घडविले जातात.

In reply to by श्रीगुरुजी

मुळात दुसर्या माणसाला तो निव्वळ दुसर्या धर्माचा आहे म्हणून लोकाना थंड डोक्याने मारणे हा बाबू बजरंगी आणि कसाब यांच्यामधला समान दुवा. कर्नल पुरोहित, साधवी प्रज्ञा आणि सनातन सारख्या संघटणावर खटले चालू आहेत. आणि जोपर्यंत न्यायालयात गुन्हा शाबित होत नाही तोपर्यत संबंधित इसम गुन्हेगार नाही हा युक्तिवाद अजित पवार, राजा, गडकरी पासून ते एदियुरप्पा पर्यंत सगळे जण वापरतात हा भाग अलाहिदा.

In reply to by नितिन थत्ते

__/\__ (घिसी पिटी वाक्य टाकल्याबद्दल.)

In reply to by नितिन थत्ते

नेहमीच म्हणजे काय? आजपर्यंतचे तमाम गृहमंत्री हिरव्या दहशतवादाबद्दल उच्चरवाने सांगत होते आणि आजचे व्यासंगी गृहमंत्री अद्ययावत संशोधनाच्या आधारावर भगव्या दहशतवादाबद्दल कंठशोष करत आहेत असे म्हणत आहात का चिचाजी? तसे असेल तर अधिकृत पातळीवरून, गृहमंत्र्यासारख्या उच्च स्थानी बसलेल्या कोणी हे हिरवे विधान केले ते जरा उलगडून सांगा. आम्हा अज्ञानी लोकांना तसे असल्याचे माहित नाही.