Skip to main content

आनंदसागर

लेखक श्रिया यांनी मंगळवार, 22/01/2013 11:10 या दिवशी प्रकाशित केले.
आपला परमात्म्याशी नित्य आणि शाश्वत संबंध आहे.तो धूसर होऊन ह्या जगातील जीवनास प्रारंभ ती "सुरूवात" आणि परमात्म्याशी पुन्हा नित्य,आनंददायी संबंध प्रस्थापित होणे हा "शेवट" किंवा "मोक्ष".ह्या संकल्पनेवर आधारीत ही रचना आहे. कशी वाटली जरूर सांगा!

आनंदसागर

सुरूवात ही तुझ्याकडून शेवट ही तुझ्याकडेच पण मधला प्रवासच भरकटलेला अशाश्वतात गुरफटलेला ह्या भरकटलेल्या वाटेवरती पुन्हा गवसतो तोच गांव विस्मरून ते पावन तत्व अन् मीही मांडते तोच डाव खुणा, तुझ्या नि माझ्या साम्यत्वाच्या इथे मिटवीते माया ममतेचे कच्चे बंध इथे निर्मिते काया नसे अशक्य जरी मिळविणे त्रैलोक्याचे अवघे धन तरीही आनंदाच्या एका थेंबासाठी आसुसलेले अवघे जन व्यर्थ शिणूनी मीही विसरते कोठे गवसेल तो आनंदसागर अंतरातूनी येते पावन साद मी तुझ्या हृदयातील गिरिधर नागर!
लेखनविषय:

वाचने 2378
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

In reply to by समयांत

व्यर्थ शिणूनी मीही विसरते कोठे गवसेल तो आनंदसागर अंतरातूनी येते पावन साद मी तुझ्या हृदयातील गिरिधर नागर!
अप्रतिम!

In reply to by ५० फक्त

मला माहीत असलेला "नागर" या शब्दाचा अर्थ "सुंदर" असा आहे."गिरिधर नागर" हि नाममुद्रा संत मीराबाईंची देणगी आहे. त्यांच्या अनेक पदांत ती असते.

अवघड विषय सोपा करुन सांगणे सगळ्यांना जमत नाही. आपल्याला जमले आहे. फार सुंदर.

समयांत,पियुशा,अनिल तापकीर,रणजित चितळे,शुचि,अपर्णा अक्षय,मूकवाचक,पैसा,५० फक्त,मिसळलेला काव्यप्रेमी , तुम्हा सर्वांच्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

लाजवाब!लई भारी कविता. फकस्त मी आन् माझं विचार करण्याच्या ह्या दुनियेत असं काही सूचणं लाई दुर्मिळ गोष्ट हाये. तुमची प्रतिभा अशीच बहरू दे.