Skip to main content

गुजरात विधानसभा निवडणुक-२०१२

लेखक क्लिंटन यांनी सोमवार, 17/12/2012 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मिसळपाववर मागे जाहिर केल्याप्रमाणे मतमोजणीच्या आधी माझे अंदाज जाहिर करत आहे.या अंदाजांसाठी मी १९८० पासून झालेल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल आणि १९९९,२००४ आणि २००९ च्या लोकसभा निवडणुकांचे निकाल तसेच उमेदवार लक्षात घेतले.विधानसभा मतदारसंघांचे क्षेत्र सर्वसाधारणपणे तालुका हे असते.गुजरातमधील तालुका पातळीवरील राजकारण मला कळते असा माझा अजिबात दावा नाही.तेव्हा या उमेदवारांविषयी गुगलून काही माहिती मिळते का हे बघितले. केशुभाई पटेलांचा गुजरात परिवर्तन पक्ष (गु.प.प) नक्की किती प्रभाव पाडेल याचा मतदारसंघांविषयी माहिती मिळवून सब्जेक्टिव्ह कॉल घेतला.अर्थातच ही माहिती गुगलून आणि गुजरातमध्ये प्रसिध्द होणारे इंग्रजी पेपर वाचून मिळवली आहे.प्रत्येक मतदारसंघातील जातनिहाय मतदारांची संख्या माझ्याकडे नाही.तसेच अनेक उमेदवारांविषयी काहीच माहिती मिळाली नाही.तरीही केंद्र सरकारमध्ये सत्तेत असलेल्या कॉंग्रेस पक्षाविरूध्द किती जनमत गेले आहे,राज्यात ११ वर्षे सत्तेत असलेल्या नरेंद्र मोदींच्या सरकारविरूध्द किती जनमत गेले आहे आणि केशुभाईंचा पक्ष नक्की किती परिणाम करेल याचा एकूण परिस्थितीचा सब्जेक्टिव्ह कॉल घेतला आहे.तसेच मागच्या निवडणुकांचा कल लक्षात घेता हे बदललेले आकडे निकाल फिरविण्याइतका परिणाम करतील का याचे विश्लेषण केले आणि त्या आधारे हे अंदाज व्यक्त करत आहे. या अंदाजांमध्ये नक्की कोणत्या कारणांमुळे त्रुटी होऊ शकेल हे लिहिलेच आहे.आणि एक गोष्ट आणखी सांगतो. माझ्याकडे कोणत्याही एक्झिट पोलचा विदा नाही की इतर कसलेही आकडे नाहीत.हे सर्व अंदाज माझ्या सब्जेक्टिव्ह कॉलवरूनच घेतले आहेत.आणि सब्जेक्टिव्ह कॉल अधिक अचूकपणे घेण्यासाठी खूपच जास्त अभ्यास हवा. पण तितका अभ्यास करायला, वाचन करायला मला खरोखरच वेळ झाला नाही.तेव्हा हे एक कारणही त्रुटी निर्माण करू शकेल. तेव्हा माझा अंदाज पुढीलप्रमाणे: एकूण जागा: १८२ भाजप: १०९ कॉंग्रेस: ७१ गु.प.प: २ माझ्या मते भाजप नक्की जिंकेल अशा जागा पुढीलप्रमाणे: अबाडासा, मांडवी (कच्छ),भूज,अंजार,वाव, दीसा,राधनपूर,चनासमा,विजापूर,हिम्मतनगर,गांधीनगर (दक्षिण),घाटलोडिया,वेजलपूर,वाटवा,एलिस ब्रीज, नारणपुरा, निकोल,नरोडा,ठक्कर बाप्पा नगर,अमराईवाडी,दरियापूर,मणीनगर,साबरमती,दासकरोई,ढोलका, मोरबी,टनकारा,राजकोट (पश्चिम),राजकोट (दक्षिण),द्वारका,मानवदार,जुनागढ,मांगरोल (जुनागढ),कोडीनार, धारी,राजुला,महुवा (भावनगर), तलाजा,गरियाधार,पलीटाणा, भावनगर (पूर्व), भावनगर (पश्चिम), मातर, हलोल,देवगढ बारिया,वाघोडिया, बडोदा शहर, सयाजीगंज, अकोटा,रावपुरा, मंजालपूर, पादरा, भरूच, अंकलेश्वर, ओलपड,कामरेज,सुरत (उत्तर), वारच्छा रोड,करान्ज,लिंबायत,उधना, माजुरा,कटारगाम, सुरत (पश्चिम),चोरयासी,जलालपोर,नवसारी, वलसाड आणि उंबरगाव माझ्या मते भाजप जिंकायची शक्यता जास्त आहे अशा जागा पुढीलप्रमाणे: गांधीधाम, थारड, धनेरा, देवदार, पाटण, खेरालू,उंझा,बेचाराजी,इदर,मोडासा,दानीलिमडा,धांधुका,लिमडी,चोटीला,राजकोट (पूर्व),राजकोट ग्रामीण,जामनगर (उत्तर),जमजोधपूर,खंबालिया,कुटीयाना,लाठी,सावरकुंडला,गधडा,खंबायत,सोजीत्रा, मेहमदाबाद, शेहरा, लिमखेडा, सावली,छोटा उदयपूर,जेतपूर(बडोदा),सानखेडा,करजान,नांदोद,जंबुसार,मांगरोल(सुरत),बारडोली,डांग, गणदेवी आणि पारडी माझ्या मते कॉंग्रेस नक्की जिंकेल अशा जागा पुढीलप्रमाणे: रापड,दांता,वडगाम,पालनपूर,सिधपूर, खेडब्रम्हा, भिलोडा, मनसा,विरामगाव,ध्रांगध्रा,वांकानेर,जसदान,धोराजी,पोरबंदर,केशोद,भावनगर ग्रामीण, बोरसाद, अंकलाव, पेटलाड, महुधा,थासरा,कपडवंज,बालासिनोर,संतरामपूर,फतेपुरा,दाहोद,मांडवी(सुरत) आणि व्यारा. माझ्या मते कॉंग्रे जिंकायची शक्यता जास्त आहे अशा जागा पुढीलप्रमाणे:कांकरेज, विसनगर,काडी, मेहसाणा, बायड, प्रांतिज,देहगाम,गांधीनगर (उत्तर),कलोल (गांधीनगर),सानंद,बापुनगर,जमालपूर-खाडिया,असारवा, दसादा, वाधवान, जेतपूर (राजकोट),कालावड,जामनगर ग्रामीण,जामनगर (दक्षिण), सोमनाथ,तलाला, उना, अमरेली, बोटाड, उमरेठ, आणंद,नडियाद,लुनावाडा,मोरवा हदाफ, गोध्रा, कलोल(पंचमहल), झालोड, दभोई, देडियापाडा, वागरा, झगाडिया, सुरत(पूर्व),महुवा (सुरत),निझार, वंसदा, धरमपूर आणि कपराडा माझ्या मते केशुभाई पटेलांचा 'गुजरात परिवर्तन पक्ष' स्वतः केशुभाईंची विसावदार आणि गोवर्धन झाडपियाचीं गोंडाल या दोन जागा जिंकेल. मला २० तारखेला मतमोजणीच्या दिवशी रजा हवी आहे असे माझ्या बॉसला सांगून ठेवले आहे आणि अशी रजा मिळायला फार अडचण येऊ नये.पण बॅंकेत डिसेंबरचा क्वार्टर एंड जवळ आला असल्यामुळे आयत्या वेळी रजा मिळायला काही अडचण येऊ शकते.तशी अडचण न आल्यास (आणि इंटरनेट कनेक्शन व्यवस्थित असेल) तर मी याच धाग्यावर निकालांचे धावते समालोचन करेनच.

वाचने 15587
प्रतिक्रिया 98

प्रतिक्रिया

१००-१०५ वरून पुन्ह मुसंडी मारून ११७ चा आकडा मागे टाकला

सध्याचा लेटेस्ट आकडा आहे भाजपः १२१, काँग्रेसः ५८ आणि इतरः३. नक्की किती मतदारसंघांमधले अंदाज बरोबर आहे हे आता संध्याकाळीच जाहिर करेन.तरी वरकरणी असे वाटत आहे की १८२ पैकी किमान १५५ मतदारसंघांमध्ये अंदाज बरोबर आले असावेत.या निवडणुकीत एकूण १,६६६ उमेदवार होते.एकट्याला १,६६६ उमेदवारांविषयी माहिती काढणे आणि त्यावरून ते मागच्या वेळेपेक्षा नक्की किती मते फिरवू शकतील याचा कॉल घेणे ही सोपी गोष्ट नक्कीच नव्हती.तरीही १८२ पैकी १५५ म्हणजे या उपक्रमाला बरेच यश मिळाले असे म्हणायला हरकत नसावी. मी १९८९ च्या लोकसभा निवडणुकांपासून राजकारण फॉलो करत आहे. १९९४ मध्ये मी सगळ्यात पहिल्यांदा १९९६ च्या लोकसभा निवडणुकांचे अंदाज व्यक्त केले होते हे आठवते.तेव्हापासून प्रत्येक निवडणुकीत माझे अंदाज व्यक्त करणे हा माझा आवडता प्रकार आहे. यापुढील निवडणुकांमध्ये अधिक अचूक अंदाज व्यक्त करायला जर कोणी मिपाकर इच्छित असतील तर आपण सगळे मिळून हे काम पुढे नेऊ शकू.२०१४ च्या लोकसभा निवडणुकांपर्यंत सगळ्या राज्यांचा अभ्यास करणे आणि त्यावरून कॉल घेणे हे खूपच मोठे काम आहे.एकट्या गुजरातमध्ये माझी दमछाक झाली होती तेव्हा हे काम एकट्या माणसाचे नक्कीच नाही.असे काम करायला कोणाला आवडेल का?असल्यास जरूर कळवा म्हणजे आपण सगळे मिळून हे काम करू शकू.

In reply to by क्लिंटन

राजकारण, नागरिकशास्त्र या विषयात बिलकूल रुची नाही आणि त्यामुळे गती तर बिलकूलच नाही. पण तुमच्या अभ्यासाचं कौतुक वाटतं.

In reply to by क्लिंटन

"यापुढील निवडणुकांमध्ये अधिक अचूक अंदाज व्यक्त करायला जर कोणी मिपाकर इच्छित असतील तर आपण सगळे मिळून हे काम पुढे नेऊ शकू.२०१४ च्या लोकसभा निवडणुकांपर्यंत सगळ्या राज्यांचा अभ्यास करणे आणि त्यावरून कॉल घेणे हे खूपच मोठे काम आहे.एकट्या गुजरातमध्ये माझी दमछाक झाली होती तेव्हा हे काम एकट्या माणसाचे नक्कीच नाही.असे काम करायला कोणाला आवडेल का?असल्यास जरूर कळवा म्हणजे आपण सगळे मिळून हे काम करू शकू." मला नक्कीच यात सहभागी व्हायला आवडेल. निवडणुक निकालांचे विश्लेषण, मतदाता चाचणी निकाल इ. मी उत्सुकतेने वाचतो. 'इंडिया टुडे' हे साप्ताहिक दर ६ महिन्यांनी देशभर मतदाता चाचणी घेऊन त्याचे निकाल जाहीर करते. दरवर्षी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात व जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात हे निकाल ते जाहीर करतात. ते मी उत्सुकतेने वाचतो. ते आता जानेवारी २०१३ मध्ये ओपिनियन पोल घेऊन त्याचे निकाल लगेचच जाहीर करतील.

नरेंद्र मोदींचं भाषण आवडलं,४६५ मि. हिंदीतून भाषण. संजय निरूपम हिंदीतच का बोलले आणि त्यामुळे ६ कोटी गुजराथ्यांचा कसा अपमान झालाय इ. इ. तारे तोडतोय :)

नमस्कार मंडळी, गुजरात निवडणुकांचे सगळे निकाल उपलब्ध झाले आहेत.निकाल पुढीलप्रमाणे: भाजप: ११५ कॉंग्रेस: ६१ राष्ट्रवादी कॉंग्रेस: २ गुपप: २ जनता दल (यु): १ अपक्ष: १ माझ्या अंदाजांपैकी १३३ जागांचे अंदाज बरोबर आले तर ४९ ठिकाणचे अंदाज चुकले.हा आकडा किमान १५० असता तर माझे समाधान झाले असते.काहीही असले तरी या उपक्रमाचे यश आणि अपयश दोन्ही माझेच. या प्रक्रियेत नक्की कुठे चूक झाली हे शोधायला हवे. म्हणजे भविष्यात समजा हा उपक्रम इतर कोणत्या राज्यासाठी करायचा असेल तर तशी सुधारणा करता येईल.पण एक गोष्ट आताच सांगतो आणि ती म्हणजे शेवटी या उपक्रमासाठी जेवढा वेळ देणे गरजेचे होते तितका देता आला नाही. असो. सर्वांच्या शुभेच्छांबद्दल आभारी आहे.

मागच्या तुलनेत मोदी यांनी दोन जागा गमावल्याचे दिसते आहे, जे काही फार विशेष म्हणण्यासारखे अपयश वगैरे नाही. जवळजवळ ७०% मतदान झाल्याचे दिसले. जो एक प्रकारचा रेकॉर्ड आहे. (म्हणजे ६ करोड गुजरातींपैकी ४.२ कोटी लोकांनी मतदान केले म्हणायचे) यापैकी पक्षनिहाय अ‍ॅक्चुअल किती % लोकांनी कोणत्या पक्षाला मते दिलीत याचा काही विदा उपलब्ध आहे काय? तो जाणून घ्यायला आवडेल. (मोदीविरोधी मतदान पटेल व काँग्रेसमधे विभागले गेले असे म्हटल्याचे ऐकू आले.)

In reply to by आनंदी गोपाळ

यापैकी पक्षनिहाय अ‍ॅक्चुअल किती % लोकांनी कोणत्या पक्षाला मते दिलीत याचा काही विदा उपलब्ध आहे काय?
अशा प्रकारचे विश्लेषण लवकरच करणार आहे.पण ते आज नाही.माझी फर्स्ट इन्स्टिन्क्ट अशी आहे की केशुभाईंच्या पक्षाने काँग्रेसचे जास्त नुकसान केले आहे.कारण लेवा पटेल समाजापैकी भाजपला मत न देणारे लोक (जे पूर्वी काँग्रेसला मत देत असत) त्यांनी या पक्षाला मते दिली असावीत आणि या प्रक्रियेत केशुभाईंच्या पक्षाने भाजपपेक्षा काँग्रेसची मते जास्त खाल्ली असावीत.अर्थात हा अंदाज आहे. १९९८ मध्ये वाघेलांच्या पक्षाने नेमका हाच प्रकार केला होता आणि भाजपपेक्षा काँग्रेसचे जास्त नुकसान केले होते.२०१२ मध्ये मनप्रित बादल यांच्या पक्षानेही अकाली दल-भाजप युतीपेक्षा काँग्रेस पक्षाचे जास्त नुकसान केले.

In reply to by क्लिंटन

पटेल लॉबी ही संख्येने प्रचण्ड नसली, तरीही संघटीत आहे, पैशाने मजबूत आहे, व मतदानावार मोठा परिणाम करू शकण्याच्या परिस्थितीत आहे असे ऐकून आहे. याचमुळे तिरंगी लढतीत बीजेपीचा फायदा होईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. भाजपानेही सुमारे ४० एक जागांवर पटेल उमेदवार दिले होते असे ऐकतो.

माझ्या प्राथमिक विदा वापरून केलेला अंदाज आणि श्री क्लिंटन यांचा अभ्यास याची तुलना होऊच शकत नाही. मात्र काही अंदाज, माझी विचारपद्धती मांडतो ज्यामुळे कुठे तृटी राहिली असल्यास त्यावर विचाराला दिशा मिळू शकेल. खात्री आहे यावर जाहिर चर्चेला हरकत नसेल १. जेडीयु चा प्रभाव काँग्रेसची मते खातील असा माझा अंदाज होता तो बराच बरोबर ठरलेला दिसत आहे. त्यांना एक जागाही मिळाली आहे. महाराष्ट्रात जसे कॉ व रा कॉ वेगळे खेळल्यावर अधिक जागा जिंकतात तसेच काहिसे फक्त जेडीयु अगदी छोटा पक्ष असल्याने तितक्या परिणामकरकारक रित्या नव्हे. २. गु.प.प. हा भाजप इतकाच काँग्रेसला हानी पोचवेल असा अंदाज होता. तो काही प्रमाणात बरोबर वाटतो आहे. ३. बसपा एक जागा जिंकु शकेल असे मला वाटले होते. ते सपशेल चुकले. किती ते मतांची टक्केवारी बघुन विश्लेषण करावे लागेल

मोदींना पुन्हा एकदा बहुमताने निवडून दिल्याबद्दल गुजराती जनतेचे अभिनंदन! भाजपचा हा सलग ५ वा विजय व काँग्रेसची ही सलग ६ वी हार आहे. १९९० मध्ये जनता दलाला ७०, भाजप ६७ व काँग्रेस ३३ अशी स्थिती होती. १९९५ मध्ये भाजप १२३ व काँग्रेस ६०, १९९८ मध्ये भाजप ११७ व काँग्रेस ६३, २००२ मध्ये भाजप १२७ व काँग्रेस ५०, २००७ मध्ये भाजप ११७ व काँग्रेस ५९ आणि २०१२ मध्ये भाजप ११७ व काँग्रेस ६१ अशी स्थिती आहे. यावेळी मोदींना निवडणुक बरीच जड गेली. सलग ११ वर्षे सत्तेत असल्याने प्रस्थापितविरोधी होणारी जनभावना, पक्षपाती माध्यमे, केशूभाई पटेलांनी वेगळा पक्ष काढून दिलेले आव्हान व २०१२ मध्ये सौराष्ट्रात पडलेला दुष्काळ यामुळे निवडणुक अवघड गेली. केशूभाई पटेलांच्या पक्षाने २ जागा जिंकून भाजपाचे इतर १०-१२ जागांवर तरी नुकसान केले असावे. अन्यथा भाजप १३० च्या पुढे गेला असता.

काँग्रेसवाल्यांची गंमत वाटते. चिदंबरम आज म्हणाले की "गुजरात मध्ये काँग्रेसचाच खरा विजय झाला आहे". काही दिवसांपूर्वी सोनिया गांधी प्रचारसभेत म्हणाल्या की गुजरातचा विकास काँग्रेसमुळेच झाला आहे. काँग्रेस गेली २३ वर्षे गुजरातमध्ये सत्तेत नाही. बहुतेक रिमोट कंट्रोल वापरून त्यांनी गुजरातचा विकास केलेला दिसतोय. मागे कपिल सिब्बल म्हणाले होते की, "२ जी घोटाळ्यात शून्य तोटा झाला. खरं तर त्या व्यवहारात खूप नफा झाला होता.". आज पुन्हा एकदा सिब्बल म्हणाले की "भाजपाने ३-डी प्रचार केला, पण मते २-डी मिळाली." २-३ दिवसांपूर्वी सुशीलकुमार शिंद्यांनी हफीज सईद चा उल्लेख श्री. हफीज सईद असा केला होता. त्यापूर्वी आधुनिक विदूषक दिग्विजय सिंग यांनी लादेनचा "ओसामाजी" असा गौरवपूर्वक उल्लेख केला होता.

In reply to by श्रीगुरुजी

आजपर्यंत बकवास करायचा मक्ता फक्त दिग्गीचा आहे असे वाटायचे, पण चिदंबरम सुद्धा बकवास करताना पाहून मज्जा वाटली.

केशूभाई पटेलांच्या "गुजरात परिवर्तन पक्षाने" भाजप सुमारे ८ जागांचे नुकसान केले आहे. २ जागा गुपपने जिंकल्या व सौराष्ट्रातल्या काँग्रेस निवडून आलेल्या ६ जागांवर गुपप व भाजपच्या मतांची बेरीज काँग्रेसपेक्षा अधिक आहे. जर गुपप हा पक्ष निवडणुकीत नसता तर भाजपला किमान ८ जागा अधिक मिळून १२३ जागा मिळाल्या असत्या व काँग्रेस ५५ वरच थांबली असती.

हिमाचल प्रदेशात भाजपला ३८.४७ टक्के व काँग्रेसला फक्त १.०७ टक्के अधिक म्हणजे ३९.५४ टक्के मते मिळाली. पण या फरकामुळे काँग्रेसला ३६ म्हणजे भाजपपेक्षा तब्बल १० जागा अधिक मिळाल्या. १९९८ मध्ये राजस्थानमध्ये भाजपला ३८.८ टक्के व काँग्रेसला ३८.४ टक्के मते होती. पण काँग्रेसच्या जागा होत्या ७६ तर भाजपच्या होत्या ९५.

In reply to by आनंदी गोपाळ

गुजरातमध्ये २००७ मध्ये भाजपला ४९ टक्के (११७ जागा) व काँग्रेसला ३८ टक्के (५९ जागा) मते होती. २०१२ मध्ये भाजपला ४८ टक्के (११५ जागा) व काँग्रेसला ३९ टक्के (६१ जागा) मते मिळाली. पण गुजरात परिवर्तन पक्षाला एकूण १.७८ टक्के मते मिळून २ जागा मिळाल्या. ही सर्व भाजपचीच मते होती. ही मते जर भाजपच्या मतांमध्ये मिळविली तर भाजपला एकूण ४९.७८ टक्के मते व अंदाजे १२५-१२७ जागा मिळाल्या असत्या व काँग्रेस फार तर ५० पर्यंत पोचली असती.

भारताचे कीर्तीवान, गुणवान, शक्तीवान युवराज, भावी पंतप्रधान श्री राहुलजी गुजराथमधे मोठ्या प्रमाणात प्रचार करत होते. त्यांच्या कुण्या खाशा चमच्याने आय मीन निष्ठावान सेवकाने असे विधान केले की ह्या थोर विभूतीने जिथे जिथे प्रचार केला तिथे तिथे काँग्रेसला दणकून विजय मिळाला आणि मोदीला धूळ खावी लागली. हे खरे आहे का? का शीला दीक्षितच्या ६०० रुपड्यात पाच लोकांच्या महिनाभराच्या उदरनिर्वाहाप्रमाणे वस्तूस्थितीशी फटकून आहे?

In reply to by हुप्प्या

भारताचे कीर्तीवान, गुणवान, शक्तीवान युवराज, भावी पंतप्रधान श्री राहुलजी गुजराथमधे मोठ्या प्रमाणात प्रचार करत होते. त्यांच्या कुण्या खाशा चमच्याने आय मीन निष्ठावान सेवकाने असे विधान केले की ह्या थोर विभूतीने जिथे जिथे प्रचार केला
राहुल गांधी किर्तीवान, गुणवान इत्यादी आहेत का नाही हे मला माहित नाही आणि त्यात मला इंटरेस्टही नाही. पण काँग्रेस नेत्यांनी असे म्ह्टले की राहुल गांधींनी ज्या ७ मतदारसंघात प्रचार केला तिथे काँग्रेस उमेदवार जिंकले.१८२ पैकी ७ मतदारसंघात प्रचार केला असेल तर तो मोठ्या प्रमाणातला प्रचार नक्कीच नव्हे.आणि हे ७ मतदारसंघ नक्की कोणते होते याची मला कल्पना नाही.म्हणजे अदरवाईजही काँग्रेससाठी सुरक्षित असलेल्या जागीच त्यांनी प्रचार केला होता की काय हे नक्की मला माहित नाही.तेव्हा बाकी काही लिहित नाही.

In reply to by क्लिंटन

युवराज राहुलजींच्या चरणस्पर्शाने पावन झालेली भूमी, त्या विभूतीच्या ओघवत्या, मर्मभेदक वक्तृत्वाने न्हालेली धरती त्या उन्मत्त दैत्याच्या नाकी दम आणेल असा एक कयास होता. पण नव्याने कळपात सामील झालेले काँग्रेसचे खंदे अनुयायीही आपल्या आकडेमोडीत युवराजांच्या प्रचाराचा समावेश न करताना बघून तीव्र खेद झाला. असो.

"काँग्रेससाठी सुरक्षित असलेल्या जागीच त्यांनी प्रचार केला होता"
अगदी हेच केलय ...आणि वर शहाजोगपणाचा आव आणतायत्...काहीही कर्तृत्व नसलेल ते बेण राहुल कशाला आपल अज्ञान पाजळत १८२ मतदारसंघात प्रचार करुन हात दाखवून अवल़़क्षण करुन घेईल..?काँग्रेसपक्षाला देश म्हणजे गांधी घराण्याची खाजगी मालमत्ता व पंतप्रधानपद म्हणजे खिरापत वाटतेय...