मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

अलख

क्रान्ति · · दिवाळी अंक
हा अलख कुणा जोग्याचा ही गहन कुणाची वाणी प्राणांच्या कंठी रुजली संध्यापर्वाची गाणी झाकोळुन नभ गंगेच्या पाण्यात उतरले थोडे क्षितिजाच्या पार निघाले अन् सूर्यरथाचे घोडे या मूक उदास जलावर धूसर वलये वाटोळी रेखाटत बसली कुठल्या कवितेच्या अनवट ओळी? ज्या सांद्र वनातुन घुमले अस्वस्थ क्षणांचे पावे ते वन सोडून निघाले अज्ञात दिशेला रावे ढळत्या सांजेच्या पदरी अस्फुटसा लुकलुक तारा परतून चालला जोगी अन् अलख घुमवितो वारा footer

वाचने 2729 वाचनखूण प्रतिक्रिया 9

पैसा Tue, 11/20/2012 - 19:31
पण इथे थांबू नको अशी विनंती करते. मिपावर तुझ्या कविता येत राहू देत!

चाफा Wed, 11/21/2012 - 17:17
क्रांतीतै , कविता अप्रतीम नव्या घटनेनं आणखी पार्श्वभुमी गुढ झाली