सलाम!
गेल्या आठवड्यात भाउबीजेच्या मागे-पुढे जेंव्हा बाळासाहेबांच्या प्रकृतीबद्दल शेवटची काळजी वाटणे चालू झाले तेंव्हा (केवळ माध्यमात वाचल्यावरूनच, जास्त कल्पना नाही) थोडेफार बंदसदृश प्रकाराचे केलेले समर्थन आणि काल-परवा पालघरला घडलेला प्रसंग सोडल्यास जे काही शिस्तीत पार पडले ती काही सामान्य बाब नव्हती. आता हे सर्वशृत झाले आहे की मुंबईच्या इतिहासात लोकमान्य टिळकांच्या नंतर सार्वजनिक ठिकाणि अंत्यसंस्कार झालेले बाळासाहेब हे दुसरे व्यक्तीमत्व ठरले. अर्थातच दोन्हींच्या संदर्भात तसे होण्याचे कारण एकच होते, प्रचंड जनस्मुदाय असलेली ही अंत्ययात्रा.
कालच्या रविवारी मुंबईत केवळ या अंत्ययात्रेत भाग घेण्यास वीस लाखांचा समुदाय सामील झाला. या संदर्भात अमिताभचे ट्वीटरवरील खालील वक्तव्य वाचण्यासारखे होते:
Mumbai was never, ever, in my 45 years here, been as quiet, disciplined and peaceful, as today !! The silence from the 2 million gathered at Shivaji Park during the last rites, demonstrated two things - the respect for Bala Saheb Thackeray and secondly the deep ingrained culture of the Maharashtrian ... 'sanskaar' !!!गेले दोन-चार दिवस बरेव काही माध्यमांमधून वाचले, पण एक भाईंदरची दुर्दैवी आणि अयोग्य घटना आणि त्यावर पोलीस कसे चुकले हे छापल्याचे सोडल्यास एकाही माध्यमाला पोलीसांची, राज्यकर्त्यांची, शिवसेनेच्या नेतृत्वाची आणि २० लाखाच्या घरात जमलेल्या तमाम जनते बद्दल काहीच (किमान ठळकपणे) लिहावेसे वाटले नाही याचा खेद वाटला. अमिताभने पोलीसांचे आणि जनतेचे/शिवसैनिकांचे कौतुक केले आहेच. पण ते वाचताना येथे देखील त्याचा पुनरुच्चार करावासा वाटला. त्याच संदर्भात मला वाटले, यातील प्रत्येक जबबदारी असलेल्या व्यक्तीकडून सर्व बरोबर/परफेक्ट अथवा प्रोफेशनली झाले असेल असे माझे म्हणणे अथवा दावा नाही. किंबहूना प्रकृती गंभीर असताना शिवसेनेच्या जबाब्दार व्यक्तींकडून जनतेशी सातत्याने योग्य संवाद साधायला हवा होता असे वाटते खरे, पण... आज लक्षात रहाताना काय राहीले?
- निधनसमयी ठाकरे कुटूंबिय आणि शिवसेना नेतृत्वाने दाखवलेला संयम... (उद्धव यांच्यावर पण गेल्या १-२ आठवड्यातच कधीतरी अँजिओप्लास्टी झाल्याचे ऐकले होते)
- जे काही वाचले, निरीक्षले त्यावरून दिसले ते वैचारीक दृष्ट्या विरोधी सरकारशी आणि त्या सरकारने या विरोधकांशी केलेले संयामाने प्लॅनिंग
- दिवाळीच्या वेळचा आलेला भावनेचा पूर ओसरल्यावर शिवसैनिकांनी दाखवलेला संयम
- तमाम राजकीय पक्षांच्या नेत्यांनी (दिग्विजय सिंग यांनी आधी घातलेला गोंधळ सोडल्यास) केलेले संयमीत शोकसंदेश
- आणि सर्वात महत्वाचे म्हणजे पोलीस आणि आपत्काल स्थितीत लागणार्या यंत्रणांनी हा विशेष ताण ज्या पद्धतीने सहन करत सर्व सुखरूप पाडले त्या या कायदा-सुव्यवस्थेचा संयम!
प्रतिक्रिया
मते वेगळी असल्याने गप्प बसते.
+१
+२
आश्चर्यकारक
थोडे अधिक
मला समजले नाही असे वाटते
केवळ
त्यापैक्षा अधिक काही नसावे
पक्षाने म्हणून कुठला बंद केला नाही
भीती
हॉस्पिटल
किती कॉन्स्पिरसी थिअरीज
पुण्यातील दुकान 'उस्फूर्त'
+१
संजय राउत वगैरेंच्या बाबतीत
सहमत
+१
प्रामाणिकपणे
होय दिघेंचा म्रुत्यु हा
आनंद दिघेंचा मृत्यु हा
शिस्त
एक शक्यता
होय तर, भिवंडीत दिवाळी जोरदार
सहमत
फटाके नाही पण ..
पाकिस्तानचे सामने
विनंती
अफवा आणि संयम
अफवांबाबत
काही सहमती
ते तर पाकीस्तान जिंकल्यावरही
नुकतेच उत्तर भारतात एका
माफ करा दंगली ऐवजी
मी मत व्यक्त केले नाही
+१
भावना आणि व्यवहार
+१
मी पण
+१
अगदी मनातलं बोललात भाऊ
छ्या या आज्जीनं आणि
१००% सहमत
+1
साक्षीदेवा, मी सांगितलेले आणि
+१
+१००% सहमत
नक्की कुणाच्या बाजुनं उभं
दोन्ही मते पटली. दोन्ही
असे धागे
असे धागे
Pagination