... देवाशी भांडण !
ओ माय गॉड अर्थात देवाशी भांडण
एवढ्यातच 'ओह माय गॉड' पाहीला.
मिसळीवरही खूप चर्चा झालेला हा चित्रपट आहे.
एकाने त्याची गोष्ट मांडली आहे तर दुसर्याने त्या चित्रपटाच्या विषयावर लिखाण केले आहे.
चर्चेला विषय मिळवून देणारा हा चित्रपट आहे हे नक्की.
वरकरणी हा चित्रपट काही वेगळ्या विषयाला हात घालणारा, भाष्य करणारा वाटत असला
तरी
हा विषय नवा नाही.
चावून चोथा झालेला हा विषय आहे त्यामुळे पिळून काढलेल्या चिपाडातून रस काढण्याचा हा प्रयत्न वाटतो.
टिळेमाळा, ढोंग, बकध्यान, बुवाबाजी हे शब्द भाषेत अस्तित्वात येऊन कित्येक वर्षे होऊन गेली आहेत.
विमलदांच्या 'परख' सारख्या चित्रपटातदेखील थोड्या प्रमाणात हा विषय येऊन गेलेला आहे.
सध्या भारतात
जे जे उत्तम उदात्त उन्नत त्या सगळ्याला यथेच्छ शिव्या देणे ही फॅशन झाली आहे.
आपले पूर्वज, आपला इतिहास, आपले आई बाप, आपला देश, आपली संस्कृती यांची निंदा नालस्ती केली की आपण
झालो पुढारलेले अशी अनेकांची समजूत झालेली दिसते.
बरं केवळ भारतीय संस्कृतीवर टीका केली असा आरोप होऊ नये म्हणून विदेशी संस्कृतीबद्दलही यात काही भाष्य केले आहे.
त्यालाच बहुधा सर्वधर्मसमभाव असे म्हणत असावेत.
धर्म याचा अर्थही इथे चुकीचा घेतला आहे.
आपल्याकडे 'धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे' असे म्हटले आहे.
यातल्या धर्माचा नेमका अर्थ ध्यानात घ्यावा.
__
धर्म मनुष्याच्या बाह्य रुपाला महत्व देत नाही.
आज या जगात अनेक पंथ आपले तत्वज्ञान आक्रमकपणे पसरवत आहेत. हे पंथ अनुयायांच्या बाह्यरुपाला फार महत्व देतात.
तुम्ही दिसता कसे, दाढी ठेवता की मिशी ठेवता ? कपडे कसे घालता ? याला महत्व फार.
बाहेरूनच मनुष्याचा पंथ ओळखता यावा अशी सोय पाहीली जाते.
कुठलाही पंथ असे बाह्य रुपाला महत्व देतो तेव्हा तो पंथ, एक समूह किंवा एक दबावगट म्हणून प्रगती करेल, वोटबँक म्हणून मजबूत होइल
पण
ईश्वरापासून लांबच राहील.
एखादा पंथ, पंथनिर्माता काही मते मांडतो आणि त्या मतांना ईश्वराशी जोडून देतो म्हणून तो धर्म नाही होऊ शकत.
कदाचित ही मते हा त्याचा विस्तारवाद असु शकतो.
हीच भाषा बोला, ती भाषा बोलु नका
हेच कपडे घाला, ते घालु नका
हे खा, ते खाऊ नका
असली योग्य अयोग्यची यादी, कर्मकांडाची यादी धर्म देत बसत नाही.
"माल देखील आपल्या पंथाच्या लोकांकडूनच घ्या" हा स्वार्थी विचारही धर्म सागत नाही.
मग धर्माची दुकानदारी म्हणजे नेमके काय हे चित्रपट दिग्दर्शकाने सांगावे.
आमच्या पंथाचे लोक तेवढे चांगले बाकी लोक दुष्ट, राक्षस, पापी.
एकदा पापी म्हटले की इतर पंथीयांना मारण्याचा परवानाही मिळतो
आणि
त्याची प्रॉपर्टी, राज्य जे जे मागे उरेल ते लुटण्याची उपभोगण्याची मुभा मिळते.
यामुळे कदाचित भौतिक विकास होत असेल, अध्यात्मिक नव्हे. त्यामुळे तो धर्म नव्हे.
चित्रपटात गीतेबरोबर कुराण बायबल यांचेही दाखले दिले आहेत. जेणेकरून एकावरच हल्ला केला असा आक्षेप घेतला जाऊ नये.
गीता कुराण बायबल सारे एकच शिकवण देतात असा निष्कर्श काढायचा का ?
याचं उत्तर ज्याचं त्यानं अभ्यास करूनच ठरवावं.
कर्मकांडाला धर्मात स्थान नाही. आपण गीता अभ्यासू शकता.
धर्मात ही यात्रा करा ती यात्रा करा असा आग्रह नसतो, त्यामुळे कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी
म्हणत संत सावतामाळी पंढरीची वारी चुकवतात. ते कृत्य धार्मिकच ठरते.
अलिकडे धर्माचा फार संकुचित अर्थ घेतला जातो, चित्रपटातही तेच झाले आहे.
विवेकानंद ग्रेट, रामकॄष्ण ग्रेट, गीतारहस्य लिहीणारे लोकमान्य टिळकही ग्रेट असे एका बाजूला म्हणायचे पण
त्यांनी सांगितलेला धर्म मात्र समजून न घेता त्याच्या नावाने गळे काढायचे हा आजकालचा प्रकार दुटप्पी, ढोंगी, भंपकपणाचा वाटतो.
--
या चित्रपटातील मोहक गोष्टी-
सुदर्शन चक्र फिरवणारा कॄष्ण, कानजीभाईचे त्याने केलेले सारथ्य, सकाळी सकाळी वाजवलेली बासरी,
दिवे मालवताना सहजपणे झाकून टाकलेला चंद्र या गोष्टी अतिशय मोहक आहेत.
कृष्ण सुरुवातीला प्रकट होतो, एक एक लीला सहजतेने करु लागतो ते पाहणे थरारुन टाकणारे आहे.
--
असाच अनुभव मागे आम्ही सौभद्र पाहताना घेतला होता. थिएटरच्या अंधारात तेजस्वी भगवान श्रीकॄष्ण प्रकट होतात नि वावरतात हा अनुभव शब्दात माडण्यापलिकडचा आहे.
मागे एका मुलाखतीत भारतातल्या एका सुपरस्टारला विचारले होते, 'आपले ड्रीम प्रॉजेक्ट कोणते ?'
तो म्हणाला होता, 'महाभारत'
"मग तुम्ही त्यात कोणती भूमिका करणार'" असे विचारता
तो म्हणाला "भगवान श्रीकॄष्ण"
कॄष्णाच्या भूमिकेचा मोह भल्याभल्यांना का पडतो ते यातील कॄष्णावरून थोडेफार लक्षात येईल.
--
असले चित्रपट पाहून आपल्या संस्कॄतीबद्दल गैरसमज करून घेऊ नये.
'वसुधैव कुटुंबकम' म्हणणारी आपली संस्कॄती आहे
दगडातही देवत्व पाहणारी आपली संस्कॄती आहे आणि स्वत:ला विसरून त्या दगडातल्या देवापुढे नतमस्तक होणारी आपली संस्कॄती आहे.
या देशातली संस्कॄती, तिच्यावर टीका करण्याचे, टीका करणारे चित्रपट बनवण्याचे स्वातंत्र्य देते.
हेच भारतीय संस्कॄतीचे मोठेपण आहे, एवढे फक्त विसरू नये.
आपला
आशु जोग
ashujog @ gmail . com
वर्गीकरण
प्रतिक्रिया
चित्रपट फार चांगल्या हेतूने
>> इथे गो गो गो गोविन्दा हे
>> हेच की गंगाजल / निरांजन या
अर्थात दगडाच्या मूर्तीत देव
> अर्थात दगडाच्या मूर्तीत देव
एक बरोबर मुद्दा
मोठे व्हा
+१
मूळात चित्रपटामधे देवावर टीका
@लोकांच्या भावना दुखावलेल्या
रियली
असो,
बरेचसे मुद्दे पटेबल
आजकाल चित्रपटांचे आशय आणी
थोडातरी फरक पडला..