Skip to main content

पुणेरी पुणेकरः काही निरिक्षणे

लेखक डॉ.प्रसाद दाढे यांनी रविवार, 17/08/2008 12:35 या दिवशी प्रकाशित केले.
मी काही जन्मजात पुणेकर नाही. पुण्याला जन्मापासून वर्षातून दोनदा सुट्टीत यायचो व गेली दहा वर्षे नियमित राहतो मात्र आहे. पुणेकरा॑च्या काही सवयी अगदीच अनाकलनीय आहेत १) नाण्याला 'डॉलर' असे स॑बोधणे! सरळ सरळ 'एक रूपयाचा, पाच रूपयाचा डॉलर आहे का' अशी चौकशी करतात २) स्वतः जवळ मोडकी लुना कि॑वा हॉर्न सोडून सर्व पार्ट वाजणारी एम ८० का असेना, तिला 'गाडी' म्हणतात! पुण्यात सायकललासुद्धा गाडी म्हणतात. ३) दुकानात जी गोष्ट मिळते त्या सर्व वस्तू॑ची स्वत॑त्र पाटी लावतात. एकदा जनरल स्टोअर म्हटले की सगळ्या परचूटण वस्तू मिळणार हे आपण गृहीत धरले तरी पुण्यात एकाच दुकानात तुम्हा॑ला श॑भर एक पाट्या दिसतील 'येथे हे मिळेल' अश्या. उदा. कानिफनाथ रसव॑ती गृह' अशी गुर्‍हाळावर पाटी असते (तशीही उसाच्या गुर्‍हाळाला पाटीची गरज नसतेच, सगळा नजारा समोरच असतो) व पुन्हा 'इथे उसाचा ताजा रस मीळेल' अशीही पाटी असते! मी एका हेअर कटी॑ग सलूनवर 'येथे केस कापून मिळतील' अशी पाटी पाहिली होती! ('इथे केस कापून 'परत' कुणाला हवेत? तुमच्याकडेच ठेवा ते' असे म्हणण्याचा मोह टाळला) ४) पुणेकर फक्त (आणि फक्तच) रविवारी सकाळी 'पॅटीस' नामक पदार्थ खातात ५) आमची कुठेही शाखा नाही (ह्याची खरी तर लाज वाटली पाहिजे.. इतके वर्ष॑ ध॑दा करताय, फक्त एकच दुकान?) असल्या पाट्या बिनदिक्कतपणे लावतात. ६) कुठलेही दुकान (मेडिकलचे असो वा चड्डी-बनियानचे) सकाळी दहा ते एक व पाच ते (गिर्‍हाईका॑चा खूपच त्रास असेल तर) फारफारतर नऊ वाजेपर्य॑तच उघडे असते. दुपारी एखाद्याला जुलाब सुरू झाले तर त्याने औषधासाठी पाच वाजेपर्य॑त नुसतेच ता॑ब्या घेऊन धावावे वा घरगुती उपचार करावेत. ७) अभ्यासाची वा इतर पुस्तके फक्त अप्पा बळव॑त नामक नामी चौकातच मिळतील! तिथे एकाला एक लागून पन्नास दुकाने, पण सगळी चालतात. ग॑मत म्हणजे इतर ठिकाणी पुस्तका॑ची दुकाने अजिबात चालत नाहीत! ८) पुण्यात सर्व मुली तो॑डाभोवती दहशतवादी गु॑डाळतात तसे कापड बा॑धतात. हे म्हणे चेहर्‍याचे धुळीपासून व सूर्यप्रकाशापासून स॑रक्षण म्हणे. पण 'ज्या॑च्यासाठी' इतका चेहरा छान ठेवण्याची आस, त्या॑ना तो दिसतच नाही ना मग?? ९) पुण्यात डो॑गरावर फिरायला येणारे पेन्शनर म्हातारे येणार्‍या जाणार्‍या मुली॑चे अष्टा॑गानी दर्शन करतात. आणि आपल्या मित्रानी केलेल्या देहा॑तशासनाच्या लायकीच्या कोटीवर मोठ-मोठ्या॑नी हसतात. कोटी सोडा, साध्यासाध्या वाक्या॑नासुद्धा असेच हसतात. उदा. 'बर॑ का, काल मला आपले आबा भेटले होते..' 'काय सा॑गताय.. हॉ हॉ हॉ.. '(किमान दहा मजले). शिवाय डो॑गरावर एकमेका॑ना ला॑बून पाहिले तरी 'हारी हारी!' अशी घसा सुकेस्तोवर गर्जना करतात. १०) बिल्डी॑गला नाव ठेवता॑ना आपल्या अस्सल मर्‍हाठी नावापुढे इ॑ग्लीश शब्द जोडण्याची हौसही पुण्यात फार आहे. पुण्याबाहेरच्या, विशेषतः मु॑बईच्या लोका॑ना त्याचे फार हसू येते. उदा. पाडळे पॅलेस, पाटील प्लाझा, भोसले-शि॑दे आर्केड, काकडे मॉल इ. ११) बॉम्बेचे अधिकृतरित्या मु॑बई नामकरण होऊन इतकी वर्षे झाली तरी सगळे पुणेकर अजुनही 'बॉम्बेच' म्हणतात. तुम्हीसुद्धा अश्या काही पिक्यूलियर पुणेरी गोष्टी पाहिल्या असतील तर सा॑गा..
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 55679
प्रतिक्रिया 229

प्रतिक्रिया

In reply to by टारझन

टार्‍या, लै भारि प्रतिसाद. जबरि हाणलास. अभिज्ञ.

In reply to by टारझन

ह्यात मराठी माणसाचा किती हात ? तू नक्कीच १००% पुणेकर आहेस. आपला वाद पुण्यातले मराठी विरुद्ध मुंबईतले मराठी असा नसून पुणे शहर विरुद्ध मुंबई शहर असा आहे. आणि तुझंच उदाहरण घ्यायचं तर पेशवाई बुडण्यात आणि महराष्ट्राची राजधानी बदलून मुंबई होण्यात मात्र पुण्यातल्या मराठी माणसांचा १००% हात आहे. वास घेऊन नाक दाबा पुण्यातली सुवासीक हवा आणि प्रदुषणमुक्त वातावरण ह्यावद्दल पुण्यातल्या स्कूटर-धारी अतिरेकी मुलींना विचरून ये. अरारारा .. हसून हसून मेलो आहे ... मला दादर गिरगावाच्या एकाही खायच्या ठिकाणाचं नाव कोण्या नॉन-पुणेकर आणी नॉन-महाराष्ट्रियन माणसाने घेतलेल ऐकिवात नाही... पेठांतून बाहेर या पंत. एशीयाड ने उतरून प्रकाश मधे खाल्ल्याशिवाय पुढची कामे न करणारे किती पुणेकर दाखवू? आता ह्यावर तू पुन्हा भूक लागली की माणूस खाणारच असं बिनबुडाचं विधान करशीलच. मला दादर गिरगावाच्या एकाही खायच्या ठिकाणाचं नाव कोण्या नॉन-पुणेकर आणी नॉन-महाराष्ट्रियन माणसाने घेतलेल ऐकिवात नाही. हा अजून एक खराखुरा बेसलेस पुणेरी पणा. ह्या न्यायाने मी सुर्योदय होतच नाही असं म्हणू शकेन. तुला अनंताश्रम, प्रकाश, जिप्सी, चंद्रगुप्त, दिल्ली दरबार, समर्थ भोजनालय, सत्कार, महेश, तांबे आहारग्रुह, कुलकर्णी, ताराबाग, खाऊ गल्ली, राजधानी, श्रीकृष्ण बोर्डींग हाऊस, मेरवान, माँडेगार, लिओपोल्ड, कॅफे ब्रिटानिया आणि अशी अजून अनेक नावं गेली नसतीलंच. आणि तुझ्या ओळखीचे नसले तरी माझ्या ओळखीचे शेकडो नॉन मराठी लोकं इथले वारकरी आहेत. कारण तुमच्याच म्हणण्याप्रमाणे मुंबईत मराठी टक्का कमी आहे. हाहाहा .... यह तो पूणे की शान है ... थ्री चियर्स फॉर पी.एम.टी. वा... काय पण शान आहे. जियो मेरे लाल. आता बावळटांना जगात कुठेही फसवलंच जातं.... आम्ही मात्र रिक्षाने मस्त फिरुन पैशे जमवून आहोत... हे टिपीकल पुणेरी बिनबुडाचं उत्तर. मुद्दा न कळता वादासाठी वाद. रिक्षा ने जाऊन कंगाल होण्यात रिक्षावाल्यांची बेईमानदारी दिसून येते सोन्या. बाहेर गावाहून आलेल्या लोकांना फसवण्यात शहाणपणा मानणार्‍या पुणेकरांचा विजय असो. वा ! पूण्यात किती करमणूक होते वा वा वा .... आणि एवढी शिस्त पाळून देखील दादरहुन पूणे हायवे ला लागायला २-३ तास लागतात.. मग तिथुन पुढे पूण्याला माणूस १:३० तासातच पोचतो .. वा रे मुंबईच ट्राफिक ... पुण्याची परिस्थीती वेगळी आहे? १:३० माणूस पुण्याच्या वेशीवर पोचतो माणूस. पुढे पोचायचे वांधेच आहेत. आणि अरे पुणे आहेच केवढस्सं... तरी गल्लो गल्ली ट्राफीक जॅम. पुण्याच्या एका टोकापासून दुसर्‍या टोकापर्यंत पोचायला रस्ता मोकळा असेल तर तास पण लागत नाही. त्यामुळे नदीचं पाणी काठावर पसरतं म्हणून तिला मडक्याने आटोपशीरपणाचे धडे देउ नयेत. सिग्नल तोडायला जागा पायजे ना.. गाड्यांना जेट इंजिन असत तर जाम एकमेकांवर गाड्या चढवून हवेत पण ट्राफिक जाम केलं असतं... आता तू स्वतःच लिहीतोस की पुण्यातले रस्ते अरूंद आहेत. आणि तरी तुला असं म्हणायचंय का की तिथे सिग्नल तोडायला जागा असते? नक्की काय ते एक ठरव, नी मग बोल. पूण्यात एवढे अरुंद रोड असुन पण कधी मुंबैच्या १०%पण ट्राफिक नाही अरे पुणे केव्हढं? मुंबई केव्हढी? मुंबईचे एक एक उपनगर पुण्याहून मोठे आहे. संबंध आहे का काही तुलनेचा? पण तू बोल. कारण तू पुणेकर असल्याने कुणी ऐको न ऐको, बोलंणं हा तुझा अधिकार आहे.

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

आपला वाद पुण्यातले मराठी विरुद्ध मुंबईतले मराठी असा नसून पुणे शहर विरुद्ध मुंबई शहर असा आहे. वर कमीत कमी तीन वेळा पुणे शहराचा नाही, पुणेकराचाच उल्लेख झालाय. पेठांतून बाहेर या पंत. आता अजुन किती बाहेर येऊ जोशी ब्वॉ ? एशीयाड ने उतरून प्रकाश मधे खाल्ल्याशिवाय पुढची कामे न करणारे किती पुणेकर दाखवू? आयला आमच्या वाटचं तुम्हीच उत्तर दिलत का? वा वा वा !! लै झाक! खरी गोष्ट बिनबुडाची कशी काय? अच्छा जळजळ होतेय होय .. मग ठीक आहे. माझ्या ओळखीचे शेकडो नॉन मराठी लोकं इथले वारकरी आहेत. ते तिथेच रहातात. जेवायला ते काय युपी-बिहार(किंवा काय असेल ते) तिकडे जातील काय ? .. आता करोडोंची पैदास मुंबैत पैदा करून ठेवल्यावर शे-दोनशे लोक येणारच जवळ खायला.पण पुण्याच्या जंगली महारज रोडची आठवण नक्कीच करत असतील.पण पुण्याच तसं नाय बॉ .. बाहेरची लोक इथे आले की आवर्जुन (अगदी आवर्जुन बरंका) स्पेशल हाटिलात जातात (लिश्ट मोठी आहे, दर वेळी लिहीने शक्य नाही). वा... काय पण शान आहे. जियो मेरे लाल. वा काय पण जोशी आहे. जलो मेरे लाल रिक्षा ने जाऊन कंगाल होण्यात रिक्षावाल्यांची बेईमानदारी दिसून येते सोन्या. आता पुन्हा तेच का?कोणीही फक्त बावळटांनाच फसवू शकतो.रिक्षावाला काही गनपॉइंट वर लुटत नाही. तुला असं म्हणायचय का मुंबै मधे संत तुकारामांचे १ कोटी अवतार रहातात ? बाहेर गावाहून आलेल्या लोकांना फसवण्यात शहाणपणा मानणार्‍या पुणेकरांचा विजय असो. हेच जर आधी बोलला असता तर मिपाचे बरेच किलोबाइट्स वाचले असते रे पितळ्या ... आणि अरे पुणे आहेच केवढस्सं... =)) =)) =)) पुणे क्षेत्रफळ = ७००किमी वर्ग मुंबई क्षेत्रफळ = ४३७.७१ किमी वर्ग आता एवढ बिनबुडाच विधान करण्याची पुणेकराची पातळी नाही, बिनबुडाची विधाने करण्याची ऍड्या मुंबैकरांची हुकूमत मान्य आहे... =)) आरारारा .. मेलो ... =)) तरी गल्लो गल्ली ट्राफीक जॅम. मुंबई मधे एक फ्लायओव्हर पार करायला १ तास पण लागू शकतो. अर्रे पूणे फ्लायओव्हर पेक्षा छोटंस असेल नाही ? अरे पुणे केव्हढं? मुंबई केव्हढी? मुंबईचे एक एक उपनगर पुण्याहून मोठे आहे. संबंध आहे का काही तुलनेचा? डुकरांना,कोंबड्यांना एका खुराड्यात बंद करून ठेवतात, त्यांना एवढी गर्दी पाहुन वाटतं आरे आपलं खुराड पुण्यापेक्षा लै लै मोठं ... =)) =)) बिनबुडाची विधाने बुडापासून करणारा पुणेकर -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

In reply to by टारझन

वर कमीत कमी तीन वेळा पुणे शहराचा नाही, पुणेकराचाच उल्लेख झालाय. अरे माझ्या गोंडस गुलाबा का अक्कल पाजळतोयस स्वतःची. इथे मी कधीही पुणेकर मराठी / पंजाबी / गुजराती असा उल्लेख केलाय का सोन्या?? पुणेकर म्हटलंय. तू ही मुंबईकर म्हण की. आणि पेशवाई बुडण्यात असलेल्या पुणेकर मराठी लोकांबद्दलच तुझं मत अजून मांडलंच नाहियेस. एशीयाड ने उतरून प्रकाश मधे खाल्ल्याशिवाय पुढची कामे न करणारे किती पुणेकर दाखवू? आयला आमच्या वाटचं तुम्हीच उत्तर दिलत का? बाळा हे प्रकाश दादर मधे आहे. आणि ते तुला महिती नसेल तर ते तुझं अज्ञान आहे. प्रकाश फेमस नाहिये असा पुणेरी अर्थ काढू नकोस. ह्यालाच पुणेरी कुपमंडूक व्रुत्ती म्हणतात. आता पुन्हा तेच का?कोणीही फक्त बावळटांनाच फसवू शकतो. रिक्षावाला काही गनपॉइंट वर लुटत नाही. ह्या बाबतीत मात्र पुणेरी भामट्यांना तोड नाही. तसंच फसवणं, समोरच्या माहिती नाही हे जाणून गंडवणं आणि गरजेच्या वेळी नाडणं ह्यातला फरक तुझ्या सो कॉल्ड पुणेरी बुद्धीला कळू नये ह्यात काहिही आश्चर्य नाहिये. पुणे क्षेत्रफळ = ७००किमी वर्ग मुंबई क्षेत्रफळ = ४३७.७१ किमी वर्ग + डुकरांना,कोंबड्यांना एका खुराड्यात बंद करून ठेवतात, त्यांना एवढी गर्दी पाहुन वाटतं आरे आपलं खुराड पुण्यापेक्षा लै लै मोठं ... अर्ध्या हळकुंडाने पिवळं होण्याचा हा अजून एक पुणेरी प्रकार. अरे बाळा ज्या मुंबईत ४८ एकर चं जिजामाता उद्यान, ६४ एकर चं एस्सेल वर्ल्ड, ३० एकर ची फँटसी लँड, ३७० हेक्टर चं बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, १०४ km² चं नॅशनल पार्क आहे तिचा टोटल एरीया ४३७.७१ किमी वर्ग होऊ शकतो हे फक्त तुझ्यासारखा बाळबुद्धी पुणेकरच मान्य करेल. पण अर्थात हे तुला माहिती नसल्याने जगात अजून कुणालाच महिती नाही आणि फक्त मुंबईतलीच लोकं तिथे जातात असं विधानही तू करशीलच. गुगल वर सर्च करून तू फक्त समोर दिसलेले मथळे वाचलेस. खोलात जाऊन माहिती नाही काढलीस. ती मी देतो - पुण्याचे जे हे क्षेत्रफळ तू देतोयस ते चुकीचं आहे. आजूबाजूची बांडगुळं पकडून मोजल्यावर पुण्याचा मेट्रोपॉलीटन एरीया होतो 1,359 km² आणि तशी मी जर नवी मुंबई / पनवेल वगरे मुंबई रीजन मधे येणारी सबर्बस मुंबई मधे जमा केली तर मुंबईचा एरीया होतो - 4,355 km². पण हे सोड. पुणे म.पा. च्या अखत्यारीत येणारा एरीया आहे १८८ km². त्यात पिंपरी चिंचवड म.पा. जमा केलं तर हा एरीया होतो ३१४.११ km² आणि फक्त मुंबई म.पा. च्या अखत्यारीत येणारा एरीया आहे ४८० km². पण तरीही तू पुणेच मोठं असा दावा करशीलंच. (हे सगळे आकडे मी सरकारी वेबसाइट्स वरून घेतले आहेत.) सरकारच्या वेबसाईट नुसार मुंबई भारतातलं सगळ्यात मोठं मेट्रोपॉलीस आहे रे. पण तू पुणेकर असल्याने स्वतःलाच सगळी अक्कल देवानी दिली आहे असा तुझा समज असल्याचं लपत नाहिये. ह्याला म्हणतात पेठांतून बाहेर येणे. पण ह्यातला फरक तुझ्या सो कॉल्ड पुणेरी बुद्धीला कळू नये ह्यात काहिही आश्चर्य नाहिये. आता एवढ बिनबुडाच विधान करण्याची पुणेकराची पातळी नाही, बिनबुडाची विधाने करण्याची ऍड्या मुंबैकरांची हुकूमत मान्य आहे... आरारारा... मेलो... तुझं बिन बुडाचं बुड दाखवलंय मी वर. तरी, गिरे तो भी टांग उप्पर ह्या पुणेरी बाण्या नुसार, तुझं पुणेच महान आहे रे महाराजा.

>>पुणेच महान. धन्यवाद जोशीबुवा शेवटी हे सत्य मान्य केल्याबद्दल!! :) थ्यांकू, थ्यांकू :D

११) बॉम्बेचे अधिकृतरित्या मु॑बई नामकरण होऊन इतकी वर्षे झाली तरी सगळे पुणेकर अजुनही 'बॉम्बेच' म्हणतात.
प्रसाद, हे वरचं एक सोडून बाकी सगळं खरं आहे! :) मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *

एडी भौ!! बरोब्बार ओळखलत !! साहेबाच्या देशाची सवय आहे भो तुम्हाला... तुम्ही आणी तुमची मुम्बै आम्ही कधी म्हतल बॉ की महान नाही......? आमच एव्हढच म्हनन होत की , आमच्या पुण्याला का म्हुन नाव ठेवता....? आणी शेयर मार्केट ,डायमंड मार्केट ई... तुमच्याच मालकीच भो ते........ पुणेकर म्हणे पेठाच्या बाहेर जात नाहीत .... हो!! आता आमची सवय्च आहे ती, काय करणार .. आणी आमच्या वाहतुक व्यवस्थे बद्दल बोलुच नका.... तुम्ही कधी पाहिलये की आपल उगाच !!! पन तरी हम हम है ........... ( इनो घ्याच राव ) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

>>ऍल्युमिनियम ची ओसरी करुन तेथे मिळणार्‍या तीन चमचे चाला अमृततुल्य नाव .... नावाप्रमाणेच तो चहा असतो बरं का ! एकतर अमृततुल्य मधील चहा सतत भल्या मोठ्या पातेलीत उकळत असतो. त्यामुळे पाण्याचा अंश कमी होऊन तो चांगला घट्टमुट्ट झालेला असतो. शिवाय त्यात वेलची वगैरे मसाला घालून दिला जातो. हे नावाचे न उलगड्णारे कोडे वाटत असेल तर पिऊन पहा आधी.

बाहेरुन आलेल्या लोकांना खायच तिथ हा*यची सवय आहे. खाल्या घरचे वासे मोजणारी माणस ही त्यांना काय आपल काम झाल की झाल. परत नावे ठेवायला मोकळी ... शेखर

चांगली चर्चा चालु आहे नवीन माहिती मिळत आहे माझ्या बाजुने कुठेही तेल ओतत नाही जरा नवीन धागा सुरु केला तर अधिक चांगला आस्वाद घेता येइल अर्थात पुणेकर व अपुणेकरांचे यावर एकमत झाले तर.... सर्किट चेंगट (हल्ली नावात सर्किट लावले पाहिजे असा काहि दंडक झाल्याचे आमच्या कानावर उडत उडत आले. आणिबाणित कुठल्याही दंडकाची अवज्ञा होवु नये म्हणुन सहीपुरता नावात तात्पुरता बदल केलेला आहे हे सुज्ञ वाचक लक्षात घेतीलच. ज्यांना समजले नसेल त्याना आता कळेल)

एका लेखाला एवढे प्रतिसाद !!! रेकॉर्ड ब्रेक झालं की पूणे तिथे काय उणे हे मात्र इथेही दिसून आलं. कोणी कितीही पुण्याला नावे ठेवली तरी पुणे हे एकमेवाद्वितीय शहर आहे ह्यात वाद्च नाही. मुंबईपेक्षा पुणे बरं म्हणणारे माझ्या ओळखीतले अनेक अ-पुणेकर पुण्यात स्थायिक झालेले आहेत... ते काय उगाच नाही बाकी चालू देत्...मजा येतेय वाचायला. विरंगुळ्यासाठी 'पुण्याचा चेहरा जपणारी' ही काही चित्रे --- विद्येचे माहेरघर - पुणे विद्यापीठ pune university शनिवारवाडा cricket at shaniwar wada सिंहगड sinhagad वैशाली vaishali दगडूशेठ हलवाई ट्र्स्ट गणपती (मंड्प) dagadusheth halwai मार्झोरिन marz-o-rin दहशतवादी ? तरूणी pune traffic

In reply to by वेलदोडा

वेलदोडेराव, हा दगडूशेठचा फोटो कुठून आणलात हो? "याचे फोटो काढायचे नाहीत, काढलेत तर फिल्म जप्त करू" अशी धमकी मला मागच्या वर्षी मिळाली होती. तो डिगीटल क्यामेरा होता हे त्या रखवालदाराला कळलं नाही ही गोष्ट वेगळी!

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

यमी ताई, प्रत्यक्ष मंदिरात गणपतीचा फोटो काढता येणार नाही...तशी सक्त मनाई आहे. हा फोटो गणेश विसर्जन मिरवणुकीतील मंडळाच्या रथाचा आहे. लक्ष्मी रोड वरील एका उंच बिल्डींग मधुन काढला आहे. अर्थात मी नव्हे...मित्राने शेअर केलाय तो इथे डकवलाय.

छान चर्चा चालू आहे. निरीक्षणे वाचून मजा वाटली पण सर्व काही पटली नाहीत. १) संदिप ने ह्याचे स्पष्टीकरण दिलेच आहे २)टू व्हिलर ला पुण्यात गाडी म्हणतात हे निरीक्षण बरोबर आहे. पण ती दोनचाकी गाडीच नाही का? सायकलला मात्र गाडी म्हणतात हे तुमच्याकडूनच ऐकले (अर्थात वाचले). इथे अमेरिका मध्ये तर सायकल ला बाईक हा शब्द वापरतात. माझ्या मते प्रत्येक शहराची खास एक भाषा असते. ऐकणार्‍याला त्या भाषेची गंमत वाटणे साहजिक आहे पण ती टर उडवण्याइतपत नक्कीच हास्यास्पद नसते. ३)हे पु़ण्यातच काय पण इतरही छोट्या शहरात मी पाहिले आहे. ४) पुण्यात असताना मी स्वतः पॅटिस आठवड्यातील कोणत्याही दिवशी खायचे. ५)आमची कोठेही शाखा नाही ..ही परिस्थिती आता बदलली आहे. गाडगीळ सराफ , अष्टेकर सराफ , चितळे बंधू , कासट (साडीवाले) ....बरीच नावे सांगता येतील ६)हे निरीक्षण बरोबर आहे ...पण ही परिस्थिती आता (पुण्यात) सर्वत्र नाही. ७) अप्पा बळवंत मध्ये ही दुकाने खूप पूर्वीपासून आहेत. उलट इथे भरपूर दुकाने असल्याने निवडीला अनेक पर्याय सहज उपलब्ध होतात. आणि मॉल सारखे पॉश नसले तरी खरेदीला मजा येते. हल्ली नव्याने झालेली क्रॉसवर्ड सारखी दुकाने ही चांगली चालतात की. ८)प्रदूषणा पासून संरक्षण ...पण मुलीच नाही तर हल्ली मुले पण नाक तोंड झाकले जाईल असा त्रिकोणी आकारात मोठा हातरूमाल बांधतात(हेल्मेट नसेल तर). पुण्यात प्रदूषण वाढलय हे मात्र खरय. ९)हे काही मी कधी अनुभवले नाही..तुम्ही निरीक्षण केलय ..असेलही तसं १०)हम्म्...हे बरोबर. तुमच्या यादीत अजून एक भर्...अरोरा टॉवर ११) मी स्वतः म्हणत नाही पण क्वचित कधीतरी इतरांच्या तोंडून ऐकलय खरं. प्रत्येक शहर वासियांची खास एक ओळख असते तशी ती पुण्याची पण आहे. अस्सल पुणेकरांना पुण्याचा जाज्वल्ल्य अभिमान कायम रहाणारच. ईश्वरी

In reply to by ईश्वरी

अस्सल पुणेकरांना पुण्याचा जाज्वल्ल्य अभिमान कायम रहाणारच. तसेच दुसर्‍यांना पण त्यांच्या गावाचा असणार हे लक्षात घेतले पाहिजे. आपले चांगले म्हणताना दुसर्‍याना हिणवु नये(वर काहि प्रतिसादात मागास भाग, गडचिरोलि ई. म्हटले आहे)

अहो, मराठी माणूस, कोणत्या पुणेकराने इथे दुसर्‍यांना हिणवले आहे? पुणेकर स्वतः होऊन हे असले गुर्‍हाळ सुरु करत नाहीत, पण इतर शहरचे/ गावचेच करतात अन् एका मर्यादेनंतर पुणेकरांना बोलणे भाग पडतेच!! इथेही हा धागा पुणेकराने सुरु केलेला नाही हे लक्षात घ्या म्हणजे झाले ... डॉ. साहेब मूळचे पुण्याचे नाहीत

आरे मराठी माणसा जरा वाच !! विषय काय होता? तो कुठे नेला , कुणी नेला... आपल हे चांगल आहे ..... काहीही झाल की पुणे आहेच .... असो ... परत एक्द सगळा टॉपीक वाचा म्हणजे कल्पना येइन ..... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

आता मला आयडी बदलून 'काडी मास्तर' असा केला पाहिजे! कॉलेजमध्ये वाद-विवाद स्पर्धेत बसल्यासारखे वाटले. मजा आली. मु॑बई आणि पुणे ह्यात उच्च-नीच ठरविणे म्हणजे लता श्रेष्ठ की आशा कि॑वा रफी थोर की किशोर असे विचारण्यासारखे होईल. दोन्ही शहरात काही गोष्टी चा॑गल्या आहेत आणि काही वाईट! पण मुळात माझा उद्देश दोन्हीत तुलना करण्याचा नसून पुण्यातल्या वैशिष्ठ्यपूर्ण व ग॑मतीदार गोष्टी लिहिणे हा होता. साक्षात भाईकाका॑नीदेखील ह्या दोन्ही थोर शहरातल्या गमती-जमती लिहिल्या आहेतच. त्या सुप्रसिद्ध लेखात नसलेल्या व आत्ता अनुभवास येणार्‍या मजेशीर अनुभवा॑चे स॑कलन असा मूळ उद्देश आहे.

भाईकाका॑नीदेखील ह्या दोन्ही थोर शहरातल्या गमती-जमती लिहिल्या आहेतच. भाई काका हे मुळचे पुणेकर नव्हते. ते पार्ल्याचे म्हणजे मुम्बैकर होते. पुणेकर स्वतः होऊन हे असले गुर्‍हाळ सुरु करत नाहीत, पण इतर शहरचे/ गावचेच करतात हेच खरे :::::::पार्लेकर विजुभाऊ पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

ही चर्चा (वाद?) पुणेरी पुणेकरांच्या सवयी/ वैशिष्टे यांबद्दल होती ना :? मग यात अ-पुणेकरांनी लुडबुड का करावी? अन् करायची असलीच तरी लुडबुड करणार्‍या जवळपास सर्व प्रवेशिका मुंबईतुनच का याव्यात? याचा अर्थ बाकी महाराष्ट्राने पुण्याचे श्रेष्ठत्व मान्य केले वाट्टं ;) असो, मुंबईच्या छत्रछायेत असणार्‍या ठाणे,कल्याण अन् डोंबिवलीत खडीवाले वैद्यांचा पाचक काढ्याचा खप वाढल्याच्या बातम्या येत आहेत! अभिनंदन पुणेकरहो! (पुणेकर) टिंग्या!

In reply to by ब्रिटिश टिंग्या

मी पुण्याचा नाही पण पुण्यात जवळ जवळ २ वर्षे होतो. मला पुणे शहर अतिशय आवडलं... पुणे तिथे काय उणे हे अगदि समर्पक. मला पुण्याविषयी काहिच तक्रार नाही. थोडीफार तक्रार आहे ती पुण्याच्या लोकांबद्दल. आणि सगळ्याच लोकांबद्दल नाहि बोलत मी. इथल्या बर्‍याच लोकांचा बाहेरुन आलेल्या लेकांकडे बघण्याचा दृष्टीकोण नाही आवडला मला. आपण आणि आपली मराठी बाहेरुन आलेल्या लोकांपेक्षा कशी श्रेष्ठ हे दाखवण्याचा त्यांचा अट्टहास का असतो हे मला न समजलेले कोडे आहे. आणि पुण्याबाहेरुन आलेले लोक पुणे खराब करताहेत हे म्हणणे कितपत योग्य? ज्या लोकांना यवतमाळ हा जिल्हा कि तालुका हे माहित नाही, चंद्रपुर मधे आदिवासी राहतात हि ज्यांची समजूत, अमरावती म्हणजे आंध्रप्रदेशाच्या सीमेवर का असं विचारणे आणि मुख्य म्हणजे पुण्या बाहेरचे (मुंम्बई सोडून) सगळे मागास आहेत असे समजणे हि सगळी पुण्याच्या लोकांची "कुपमंडूक" असण्याची लक्षणे आहेत असे समजावे का? जर आपण ज्या राज्यात राहतो त्याबदलच (पश्चिम महाराष्ट्र सोडून) आपल्याला माहिती नसेल तर मग फक्तं जन्माने पुणेरी असलेल्यांना एवढा जाज्वल्य अभिमान का असावा? हा अभिमान संपूर्ण राज्याबद्दल असायला नको का? तुम्ही मारे बारा देशाचं पाणी प्यायला असाल हो, पण आपल्याच राज्यातल्या लोकांना दोन्-दोन दिवस (नळाच्या) पाण्याची वाट पहायला लागते त्याचं काय? कि आपल्या शहरात तर पाण्याची कमतरता नाही, विज-वितरण अगदि सुरळीत आहे (बाकी ठिकाणी १२ -१६तास लोड शेडींग) हे बघुन आपला अभिमान अजून वृद्धिंगत होतो? मला लेखकाने नमुद केलेल्या मुद्यांबद्दल काहिच तक्रार नाहिये, ठिकाणाप्रमाणे व्यक्तींच्या प्रकृती बदलत जातातच, पण हि जी चर्चा चाललेली आहे ती भलतीकडेच म्हणजे आपण किती श्रेष्ठ हे दाखवण्याकडे घसरलीय. आणि राहता राहिला पुणे श्रेष्ठ असल्याचा प्रश्न तर ते कुणीही मान्य करेल, फक्त तुमच्या पुणेरी लोकांचा इतर लोकांकडे बघण्याचा दृष्टीकोण काय तो बदला! (विदर्भातला) अनामिक. अवांतर - पुणेरी नसल्याने लिहिताना व्याकरणाच्या चुका झाल्यात त्याकडे दुर्लक्ष करा.

In reply to by अनामिक

मला पुणे शहर अतिशय आवडलं... पुणे तिथे काय उणे हे अगदि समर्पक. थ्यांक्स .. तुमच्या सारखी *** या मुंबैकरांची असती तर वादच नव्हता :) इथल्या बर्‍याच लोकांचा बाहेरुन आलेल्या लेकांकडे बघण्याचा दृष्टीकोण नाही आवडला मला. बरं बरं. माझे इतके ओ.एम.एस.मित्र आहेत(महारष्ट्रीयन्स सोडाच) माझं तर सगळ्यांशीच चांगल वर्तन आहे. हा .. आता पुण्यात राहुन कोणी पुण्याला नाव ठेवायला लागला, तर मात्र त्याच्या शाब्दिक मुस्काटात बसनार हे नक्की. आपण आणि आपली मराठी बाहेरुन आलेल्या लोकांपेक्षा कशी श्रेष्ठ हे दाखवण्याचा त्यांचा अट्टहास का असतो अर्रे वा ! पुण्यात २ वर्षे राहुन भाषा सुधारली की हो तुमची. :) पुण्याबाहेरुन आलेले लोक पुणे खराब करताहेत हे म्हणणे कितपत योग्य? पूण्यातच राहून खाऊन पिउन, पूण्यालाच नावं ठेवणं किती योग्य आहे ? हा अभिमान संपूर्ण राज्याबद्दल असायला नको का? आता नवा वाद नका काढु, पोळून घ्याल. आमच्या मराठी अभिमानावर प्रश्नचिन्ह ? तुम्ही मारे बारा देशाचं पाणी प्यायला असाल हो, पण आपल्याच राज्यातल्या लोकांना दोन्-दोन दिवस (नळाच्या) पाण्याची वाट पहायला लागते त्याचं काय? त्याची आम्हाला मनापासून कळकळ वाटते, पण निसर्गाच्या इच्छेपुढे काय करणार आम्ही पुणेकर ? आणि काहो ? आम्ही पण २ किलोमिटर जाऊन डोक्यावर रहाटाचं क्षारयुक्त पाणी पिलो आहे, आणि जिद्दीने प्रगती केली. आता काय प्रगती करू नये असं म्हणत असाल तर मात्र सॉरी बाबा.. काळ आणि पुणेकर कोणासाठी थांबत नाही. तुमच्या पुणेरी लोकांचा इतर लोकांकडे बघण्याचा दृष्टीकोण काय तो बदला! पूण्यात राहून किंवा न राहून , पुण्यातलं उनं काढण्याचा दृष्टीकोण बदला हो जळणार्‍या लाकडांना जरा थंडाई घ्या... इथे कोणी पुणेकराने हा वाद सुरू केला नाही.. जरा पुर्ण प्रतिसादांचा अभ्यास करून बोला हो ! कोणी पुणे का श्रेष्ठ असा सवाल केला म्हणून उत्तरादाखल दाखले दिले आहेत. आता एक रेष मोठी कशी दाखवाल असं विचारलं तर तिच्या शेजारी छोटी रेष मारावीच लागते. असो , पुण्यात माझ्याच क्लास मधे २००+ मुले पुण्या बाहेरची होती, सगळेच्या सगळेच पुण्याच कौतुक करता थकत नाहीत. त्यांचं इथेच (आमच्या पुण्यात) व्हायचं पक्क होतं... पहा महिमा आमच्या पुण्याचा... रहाटाचं क्षारयुक्त ते पेप्सिकोचं मिनरल पाणी पिलेला राष्ट्राभिमानी पुणेकर -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातातत्त्त

In reply to by टारझन

बरं बरं. माझे इतके ओ.एम.एस.मित्र आहेत(महारष्ट्रीयन्स सोडाच) माझं तर सगळ्यांशीच चांगल वर्तन आहे. हा .. आता पुण्यात राहुन कोणी पुण्याला नाव ठेवायला लागला, तर मात्र त्याच्या शाब्दिक मुस्काटात बसनार हे नक्की. तुमच्यासारखे वर्तन करण्याची बुद्धी देव सगळ्यांना देओ! (देवा कितीवेळा सांगायला लावतोयेस कि मी पुण्याला नावे ठेवतच नाहिये, नपेक्षा मला हे शहर फार आवडतं!) म्हणजे मग माझी किंवा इतरांची काहिच तक्रार राहणार नाही. अर्रे वा ! पुण्यात २ वर्षे राहुन भाषा सुधारली की हो तुमची. हा हा हा.....म्हणतात ना ढवळ्या शेजारी पवळ्या बांधला....... :) पूण्यातच राहून खाऊन पिउन, पूण्यालाच नावं ठेवणं किती योग्य आहे ? अजीबात योग्य नाही. पण भाजीत मीठ कमी असलं तर सांगता कि नाही आईला? आणि तुम्हीच म्हणताय तुमचे मित्र पुण्याच कौतुक करता थकत नाहीत. जसं वागाल तसाच प्रतिसाद मिळेल. आम्हालापण पुण्याबद्दल तक्रार नाहिच. मला जी तक्रार होती/आहे ती मी सांगीतली आणि त्यावर फक्त शाब्दिक मुस्काटातच बसतेय. आमच्या मराठी अभिमानावर प्रश्नचिन्ह ? नाही, मराठी अभिमानावर शंका घेतलेली नाही. पण पश्चिम महाराष्ट्रातल्या किती लोकांना लातूर, परभणी, नांदेड, पुसद, यवतमाळ, वाशिम, चंद्रपुर, गडचिरोली, अकोला, अमरावती भागांबद्दल माहिती आहे? काळ आणि पुणेकर कोणासाठी थांबत नाही मला वाट्टं कि "काळ आणि मुंबई कोणासाठी थांबत नाही" असं बोललं जातं. तुम्ही तुमचा मुद्दा मांडायला वापरलं हरकत नाही. पूण्यात राहून किंवा न राहून , पुण्यातलं उनं काढण्याचा दृष्टीकोण बदला हो मी पहिलेच म्हंटलय "पुणे तिथे काय उणे हे अगदि समर्पक" आणि पुणेकर पण मान्य करतातच नं हे. म्हणजे इथे जसे चांगले आहे तसेच वाईटही आहेच. अन तसं असूनही मला पुणं आवडतच! तुम्हाला उगाचच मझी जळजळ होतेय असं वाट्टंय. मला इनो किंवा थंडाईची गरज नाहिये, पण तुम्हीच (तुमच्या पैकी कोणीतरी म्हंटल्याप्रमाणे) खिंड लढवून थकला असाल तर ग्लुकॉन डी घ्या :) !! पुण्यावर मनापासून प्रेम करणारा अनामिक.

In reply to by अनामिक

माझे अनामिक डेबू... कायले आगांव अढू रायला बे ? आमू तुमाले बोल्लोच नाय... ज्यो पुण्यातलं उणं काडतो त्याले आमी धडा दावतो ... कल्ले काय .(.ते मुंबैकर) ? जळगावच पाणी पिलेला) टारू

अनामिक, कुणीही पुणेकर किंवा टु बी स्पेसिफिक मी तरी कधीच अपुणेकरांना नावं 'उगीच' ठेवत नाही. माझ्या सर्व कॉलेज मैत्रीणी नॉन पुणेकर होत्या. त्यांच्याशी माझं अजुनही मस्त जमतं.. का जमतं, कारण त्या इथे आल्या, शिकायला.. शिकल्या.. आता नोकरी करतात, पुणे त्यांना मनापासून आवडतं.. पुणेकर नसून पुण्यावर त्यांच माझ्याइतकंच प्रेम आहे. असं जर असेल तर मी का नावं ठेवावीत त्यांना.. पण तेच माझ्या दुसर्‍या मैत्रीणीचे वडील, त्यांच्या लग्नापासून इथे राहतात पुण्यात (पंजाबी आहेत..) आणि तेव्हापासून आज पर्यंत २५ वर्षं पुण्याला शिव्याच घालतात.. मराठी शिकले नाहीत. मला का त्यांचा राग येऊ नये? तुम्ही जिथे राहता, जी तुमची कर्मभूमी आहे तिचा तुम्ही आदर केलाच पाहीजे,प्रेम अगदी नाही म्हणत मी, पण पुण्यातच राहून पुण्यालाच शिव्या घालण्याचे काय प्रयोजन? मला अश्या लोकांचा राग येतो .. सरसकट अपुणेकर नव्हे. आणि बहुतांश पुणेकर असाच विचार करत असावेत. काही असतात नग,जे सर्वच ठीकाणी असतात. उडदामाजी काळे गोरे. आणि हो हे भाषेचे मात्र खरे आहे. आय ऍड्मिट , मला कुणी स.पे.स्टाईल मराठी बोलत नसलं तर ऑड वाटतं.. मी फटकळपणे सुधारायला नही जात. पण जमेल तेव्हा मी म्हणते ते उच्चार सांगते. तसं बोलायचं की नाही हा समोरच्याचा प्रश्न असतो,मी त्याचा आदर नेहेमीच करते. सगळेच कदाचित तसे करत नसतील.. मान्य.. पण हे बदलेल असंही वाटत नाही.. मात्र पहीला मुद्दा मला नाही पटला... बाकी चर्चेबद्द्ल मी काही बोलतच नाही. काही लोकांना पुण्याबद्दल उगीच जळजळ असते हे मात्र अगदी खरं.. दिसलीच या चर्चेत.. असो.. प्रत्येकाची मतं असतात.पण उगीचच अती खुसपट काढणे आणि पुण्यात राहून पुण्याला शिव्या देत असलात, तर तुम्ही तुमच्या आवडणार्‍या गावात जा ना.. अवश्य जा!! :)

In reply to by भाग्यश्री

भाग्यश्री, मी पण पुण्याला नावे ठेवतच नाहिये, मला स्वत:ला पुणे हे मनापासून आवडते आणि मी ते पहिलेच स्पष्ट केलयं. माझेसुद्धा पुणेरी मित्र आहेतच. आणि मी सगळ्या पुणेरी लोकांबद्दल नाहि बोलत आहे. पण बर्‍याच पुणेकरांचा दृष्टीकोण मला नाही आवडला. आता ते माझं वय्यक्तिक मत असू शकतं. पण जे वाटलं ते लिहिलं. याच चर्चेमधे उपहासाने गडचिरोलीला मागास म्हणून संबोधलय. मी तरी तिथे कधी गेलो नाहिये, पण ते काहि अगदिच मागसलेलं नाहिये. आणि घरातही अडगळीची खोली असतेच कि. त्यामुळेच तर बाकिच्या खोल्या साफ आणि सुंदर राहतात. आता पुणे होतं /आहे प्रगत आणि त्याला किंवा बाकि शहरांना अजून प्रगत बनवताना सो कॉल्ड मागास भागांकडे दुर्लक्ष होतं. म्हणून त्यांना कमी का लेखावं? तू स्वतः कुणाला कमी लेखत नसशील, पण असेही नग आहेत कि जे फक्त पुणेरी मित्रच पसंत करतात, अगदि अमेरिकेत आल्यावर सुद्धा! परत ते माझं वय्यक्तिक मत असू शकतं. पण वाटलं म्हणून लिहिलं. राग नसावा. आणि जे तुला अशुद्ध वाटतं ति त्या त्या भागातली बोली भाषा असू शकते. उच्चारा बद्दल बोलत नाहिये मी. शिवाजीतला जी जहाजातल्या ज प्रमाणे उच्चारला तर मला पण आवडणार नाही. पण "तो मधेच बोलला" च्या ऐवजी "तो मधातच बोलला" हे म्हणजे बोली भाषेचा परिणाम. (पुण्यावर मनापासून प्रेम करणारा) अनामिक.

In reply to by अनामिक

अनामिक मी तो प्रतिसाद पर्सनली तुम्हाला नाही लिहीला.. जनरलाईज्ड होतं स्टेटमेंट.. आणि हो, पुणं भारी म्हणून बाकीचं मागास मी कधीच म्हणणार नाही.. पुणं देखील सर्वच्या सर्व सुंदर नाहीचे.. जसं अडगळीची खोली म्हण्ता तशी पुण्यातही आहेत.. असो.. मी लिहीण्याच्या नादात जे मनात येईल ते लिहीलं.. तुम्हाल उद्देशून नव्हते.. आणि हो, बोलीभाषेबद्द्ल मी पूर्ण सहमत. मला ऑड वाटतं, कारण मी ती भाषा कधीच ऐकलेली नसते. म्हणून मला खटकतं, याचा अर्थ तो उच्चार्,तो शब्द चूक आहे असेही नाही..

पुणेकरांनो, ऐकदा येवुन नागपुर पहा..म्हणजे तुम्हाला वाटेल, "सगळीकडे ऊणे....हेच काय आपले पुणे"? :D :D :D :D विहीरीतल्या बेडकाला विश्वाची काय पारख....

In reply to by खादाड_बोका

खादाड बोका - तू नागपुरचा का? आणि हो या म्हणाव सगंळ्यांना एकवेळ नागपुरला वेळ कढून... मस्तं तट्टे-गिट्टे लाउ, संत्रे खाऊ... काय म्हणता अ-नागपुरकर? (नागपुरवर मनापासुन प्रेम करनारा) अनामिक.

In reply to by अनामिक

अनामिका, अति जळ्जळ चांगली नाही बरं का? इनो घ्याच आता. :) चर्चा पुणेकरांच्या पुणेरी पणाबद्द्ल चालू आहे (की होती ? ;) ) आणि त्यात पुण्याला उठसूट नावे ठेवू नये हे पुणेकरांचे म्हणणे आहे. ह्यात आता विषयांतर नको. तुमच्या नागपूरला कोणीही नावे ठेवलेली नाहीत. आणि पुणे छान की नागपूर छान असाही वाद इथे चालू नाही. तुम्हाला नागपूर ची वैशिष्ट्ये सांगायची असतील तर दुसरा धागा सुरू करा ना.

In reply to by पक्या

मि. पक्या, मला जळ्जळ होतच नाहिये .... आणि मी पुण्याला नावेपण ठेवली नाहित. मला जे अनुभव आले, जे वाटलं ते लिहिलय. आणि मी नागपुर कसं छान हे सांगायचा प्रयत्नहि करत नाहिये. खादाड बोक्याच्या प्रतिक्रियेवर पुलंचं एक वाक्य आठवलं म्हाणून सहज लिहिलं. त्यात वाईट हेतू नव्हताच. कदाचित हे आपल्या ध्यानात आलेले दिसत नाही. इनोची गरज नसलेला - अनामिक.

In reply to by अनामिक

सगंळ्यांना एकवेळ नागपुरला वेळ कढून... मस्तं तट्टे-गिट्टे लाउ, संत्रे खाऊ... काय म्हणता अ-नागपुरकर? नक्कीच .. पुण्याचा खवय्या सगळी कडचे आस्वाद घेतो (पण तिथलंच खाऊन तिथल्या त्या बाबीला नावे कधीच ठेवत नाही... "सगळीकडे ऊणे....हेच काय आपले पुणे"? आयला या बोक्याच्या घश्यात कोणीतरी इनो ओता हो ...काय खाल्लय काय माहीत. दंतकथा: पूण्यात खाऊन पैसे न देता पळून जाऊन त्या खाऊलाच नावें ठेवल्यावर फार जळजळ होते म्हणे.. सात समुद्र पार केलेला पूणेरी बेडूक टारझन -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

In reply to by टारझन

नक्कीच .. पुण्याचा खवय्या सगळी कडचे आस्वाद घेतो (पण तिथलंच खाऊन तिथल्या त्या बाबीला नावे कधीच ठेवत नाही... पुण्याचेच का सगळेच खवय्ये सगळीकडचा आस्वाद घेतात. त्यात नवल ते काय. आणि मी तरी पुण्याला नावे ठेवलेली नाहित. माझी पसंती मी पहिल्याच प्रतिसादात दिलेली आहे. माझा प्रश्न वेगळाच होता. आणि त्यावर प्रतिसाद देण्याऐवजी मलाच जळ्जळ होतेय हा निष्कर्ष काढल्या गेला. (भाग्यश्रीने प्रतिसाद दिला त्या बद्दल तिचे आभार)

In reply to by अनामिक

अहो अनामिक ब्वॉ .. तुमचं मराठी वाचन पण सुधारावं लागेल का आता ? मी ते बोक्याला म्हंटलेलं आहे. वाद हा चालु झाला कारण आम्ही पुणेकरांनी आमच्या पुण्याचं कौतुक केलं आणि वरच्या दंतकथेतल्या कथानायकांना ते सहन झालं नाही म्हणून आणि तुमच्या प्रश्नांना मी पान-३ वर उत्तर दिले आहे. कळावे लोभ नसावा

In reply to by टारझन

माफ करा पान-३ वरचे उत्तर वाचले नहते. कुणाकडूनच लोभाची अपेक्षा नसलेला, अनामिक.

या नागपूरकर, तुमचीच कमी होती.. भाईकाकांना मानलं.. लेख लिहायला फक्त पुणेकर ,मुंबईकर आणि नागपूरकर घेतले.. इथेही तेव्हढ्याच 'करांना' इंटरेस्ट दिसतोय..! :D

येस्...बरोबर बोललीस भाग्यश्री. पुणं इत़कं असहय होत असेल तर कशाला रहाता पुण्यात? (पुण्यात राहून पुण्याला उठ्सूट नावे ठेवणार्‍यांना म्हणतोय) इथ एक गोष्ट मात्र लक्षात आली...पुण्यात ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आहेत आणि ज्या वाईट आहेत त्या आहेत हे पुणेकर मान्य करतच आहेत. पण आमचं पुणं छान ,पुणे महान, पुण्याचा जाज्वल्य अभिमान असं पुणेकरांनी म्हणता क्षणी ह्या अ-पुणेकरांच्या कपाळाला आठ्या चढतात. स्वतःच्या शहराबद्द्ल अभिमान असणं ही काय चुकीची गोष्ट आहे काय? माझं आत्या कडे नगर ला (अहमदनगर) बरेचदा जाणं व्हायचं . त्यावेळी तिथले लोक (नगर पुण्यापेक्षा छोटं आणि पुण्याएवढं प्रगत नसलं तरी) आमचं नगरच तुमच्या पुण्यापेक्षा कसं चांगलं हे मला ऐकवायचे. 'स्वतःचा तो देशाभिमान आणि दुसर्‍याचा तो देशद्रोह ' ह्या उक्तीप्रमाणे काही अ-पुणेकर पुण्याला नावे ठेवत आहेत.

In reply to by पक्या

हेहे पक्या.. मुद्दा बरोबर आहे. पण माझ्या नो कमेंट्स आता.. :) माझी सासूरवाडी नगर आहे.. :D

In reply to by पक्या

ज्या वाईट आहेत त्या आहेत हे पुणेकर मान्य करतच आहेत !!!!!!!!! :O कुठे दिसले नाही कबूल केल्याचे.. गिरे तो भी हमारी टांग उपर असेच दिसले मला. आणि मला वाटते ह्याच गोष्टीवरून सगळे पुण्याला नावे ठेवतायत. बाकी मला पण पुणे आवडले नाही बॉ अजिबात. २च दिवसात इतका वैतागलो मी पुण्याला की मी क्लास ला ३ आठवडे अप डाऊन केले. १० रिक्षावाल्यांना विचारले की एखादा मेहेरबानी केल्यासारखा घेउन जाणार. आणि रोज त्याच अंतरासाठी कधी रु. १८ तर कधी रू. ४०. आणि सुट्टे पैसे नसायचेच बहुतेक वेळा त्यांच्याकडे. मग आपल्यावरच गुरकावणार. जाऊ देत. मुंबईकर स्वतःच गर्दी वर आणि इतर वाईट गोष्टींवर बोलतो. फालतू च्या गोष्टींचा जाज्वल्य अभिमान बाळगण्यापेक्षा त्या सुधारता कशा येतील ते बघावे असे मला वाटते.

In reply to by लंबूटांग

पुण्याला की मी क्लास ला ३ आठवडे अप डाऊन केले. पहा .. पहा ... पुण्यात क्लास साठी अपडाऊन करण्याचे एवढे कष्ट का घेतले रे बाबा? पुणं आवडलं नाही तर जायचं ना दुसरी कडे ...(विद्येचे माहेरघर का ते कळालं का आता ?) -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात

In reply to by टारझन

जितके नाव ऐकले होते तितका काही चांगला नव्ह्ता क्लास पण १५००० रू भरले होते ना.. बाकी जे चांगले आहे ते आहेच रे बाबा. मी कुठे म्हणालो की सगळ्याच गोष्टी वाईट आहेत. आणि हो १ क्लास चांगला म्हणून लगेच विद्येचे माहेरघर.. हे बाकी छान!!!!!!!!!!!!!!! वाईट गोष्टी आहेत त्यांचा जाज्वल्य अभिमान बाळगण्याच्या वृत्ती वरून सगळी चर्चा सुरू आहे.

In reply to by टारझन

टारु, तुला काय कलमाडीने पुणे प्रचार समीती प्रमुख बनवले आहे का? अरे इतकी पुण्याची स्तुती करतोस आणि स्वतः तिकडे अफ्रिकेत टारझन बनुन का राहतोस मग? तुझाच, बैलोबा

In reply to by पक्या

प्रतिसाद आवडला, आणि नो कॉमेंटस् ! कारण....भाग्यश्रीसारखेच !! रेवती

जबरा...शतक पार करून वर अर्धशतक ही पार केलं की प्रतिसादांनी. अ-पुणेकरांना पण किती भरभरून बोलावेसे वाटले पुण्याबद्द्ल ह्यातच सर्व आले. पुणे तिथे काय उणे ?

In reply to by वेलदोडा

अ-पुणेकरांना पण किती भरभरून बोलावेसे वाटले पुण्याबद्द्ल ह्यातच सर्व आले. हा आत्तापर्यंतचा सर्वात हिट्ट प्रतिसाद होता! :) - टिंग्या :)

In reply to by वेलदोडा

अ-पुणेकरांना पण किती भरभरून बोलावेसे वाटले पुण्याबद्द्ल ह्यातच सर्व आले. चर्चेचा विषयच पुणेकरांबद्दल आहे मग पुणेकर असो वा अ-पुणेकर सगळेच बोलणार!

In reply to by वेलदोडा

अ-पुणेकरांना पण किती भरभरून बोलावेसे वाटले पुण्याबद्द्ल ह्यातच सर्व आले. गिरे तो भी टांग उप्पर. आम्ही मुंबईकर इथल्या भैयांबद्दलही असेच भरभरून बोलतो :)

In reply to by ऍडीजोशी (verified= न पडताळणी केलेला)

>> गिरे तो भी टांग उप्पर. .... जोशीबुवा, टांग उप्पर करायला आधी पडायला हव ना. इथे पडलयं कोण? पुणेकर तर नक्कीच नाही. >>आम्ही मुंबईकर इथल्या भैयांबद्दलही असेच भरभरून बोलतो . छान छान ..मुंबईकरांची ही सवय म्हणावी काय.. सतत इतरांची उणीदुणी काढण्याची ?

नागपुरकर मंडळि...इथे प्रतिक्रिया देण्या आगोदर अजून एकदा विचार करा. मुंबईकर हे पुणेकरांकडून सपशेल मात खाउन पळून गेलेले पाहिलेच असेल, तशीच गत तुमचीहि करून घेउ नका. हा मोलाचा सल्ला. :) बा़की आपण सुज्ञ आहात. ;) अभिज्ञ.

In reply to by अभिज्ञ

वाईट किंवा चुकिची प्रतिक्रिया दिलेलीच नाही मी. त्यमुळे मात खाण्याचा किवा कसल्याच प्रकारची गत होण्याचा प्रश्नच येत नाही!

In reply to by अनामिक

वाईट किंवा चुकिची प्रतिक्रिया दिलेलीच नाही मी. त्यमुळे मात खाण्याचा किवा कसल्याच प्रकारची गत होण्याचा प्रश्नच येत नाही! माझा ह्या धाग्यावरचा पहिला प्रतिसाद वाचाच.(पृष्ठ क्रमांक १) आपण जे काहि लिहिताय त्याची कारणे मी आधिच दिलेली आहेत अन ती आपल्याला तंतोतंत लागु पडतात. ;) अभिज्ञ.

In reply to by अभिज्ञ

ऐवढे प्रतिसाद होते कि तुमची वाचलेली प्रतिक्रिया डोक्यातून गेली! विशेषत: मुंबईकर,ठाणेकर,विदर्भ,खानदेश,कोंकण, मराठवाडा ह्यातील जनतेला ह्या शहाराविषयी एक प्रकारची वेगळि असुया असून देखील मनात खोलवर कुठेतरी ह्या शहराविषयी जिव्हाळा कायम आहे. मी असुया या शब्दाबद्दल सहमत नाही. हो, जिव्हाळा म्हणाल तर भक्कम आहे! अहो,आपल्या शहराविषयी,गावाविषयी प्रत्येकालाच अभिमान असतोच,परंतु भले बाकिच्या शहरांबद्दल असो वा नसो , मराठी जनतेला पुणे शहराविषयी "मत" हे असतेच ,हे कोडे मला काहि उलगडलेले नाहि. अगदि बरोबर, १००% पटले. (नारायण पेठेत, लक्ष्मी रस्त्यावर २ वर्षे वास्तव्य केलेला) अनामिक.

>> कुठे दिसले नाही कबूल केल्याचे.. गिरे तो भी हमारी टांग उपर असेच दिसले मला. आणि मला वाटते ह्याच गोष्टीवरून सगळे पुण्याला नावे ठेवतायत. लंबूटांगजी वरील वाक्य म्हणण्या आधी खालील वाक्ये पहा -- >>पुणे-३० मधे .. "पाणी घेणार का ? " असला प्रश्न विचारायची देखील पद्धत आहे. ... इति टारझन >>असो लेख आणी प्रतीसाद वाचुन मजा आली.... महाराष्ट्र शासनाच्या रस्ते वाहतुक नियामक मंडळाने देखील पुणेकरांची स्वभाव रचना लक्षात घेउन पुण्यातील वाहनांना एम एच १२ असा कोड दिला असावा. पुणेकरांसारखीच पुण्यातील वाहने देखील हा "बाराचा" शिक्का घेउन मिरवताना पाहुन अंमळ मौज वाटते. हे अगदी चपखल बसते पुण्यातील चालकाना.... इति अनिल हटेला >>पुणे हे कोणत्याच बाबतीत आदर्श शहर नाही, किंवा माझा ते तसं आहे असा दावाही नाही. - इति घाटावरचे भट >> मी एक सदाशिवपेठी पुणेकर असून सुद्धा मला हि निरक्षण वाचून मजा आली....इति एक >> पुण्यात प्रदूषण वाढलय हे मात्र खरय, -- इति ईश्वरी >>पुणं देखील सर्वच्या सर्व सुंदर नाहीचे.. जसं अडगळीची खोली म्हण्ता तशी पुण्यातही आहेत...इति भाग्यश्री अ-पुणेकर पुण्याला उठसूट नावे ठेवत्तात हेच यावरून दिसून येते.

In reply to by पक्या

>>पुणे-३० मधे .. "पाणी घेणार का ? " असला प्रश्न विचारायची देखील पद्धत आहे. ... इति टारझन हे मला कोणत्याही अंगाने कबूल केल्यासारखे वाटत नाही. मजा आली म्हणणे म्हणजे चूका मान्य करणे असा अर्थ विद्येच्या माहेरघरातील पुणेकरच काढू जाणे. पुणं देखील सर्वच्या सर्व सुंदर नाहीचे.. जसं अडगळीची खोली म्हण्ता तशी पुण्यातही आहेत...इति भाग्यश्री >>पुणे हे कोणत्याच बाबतीत आदर्श शहर नाही, किंवा माझा ते तसं आहे असा दावाही नाही. - इति घाटावरचे भट ह्या दोघांचा अपवाद. असो. कोणतेच शहर आदर्श नसते. बहुतांश पुणेकर गिरे तो भी हमारी टांग उपर म्हणतात असे म्हणायला पाहिजे होते. चू.भू.द्या घ्या

In reply to by लंबूटांग

>>मजा आली म्हणणे म्हणजे चूका मान्य करणे असा अर्थ विद्येच्या माहेरघरातील पुणेकरच काढू जाणे. चुका? कमाल आहे तुझी ,लंबूटांग ! इथे चुका मान्य कराव्यात अशा कुठल्या चुका पुणेकरांनी केल्या आहेत? आपल्या शहराविषयी अभिमान बाळगणे ही जर चूक असेल तर ते तुलाही लागू होतेच की. आणि एखाद्या गोष्टीची मजा येते म्हणजेच ती गोष्ट पटलेली असते. नाहीतर मजा कशी येणार? स्वगत : आता या -पुणेकरांनी बोलायला मुद्दे नाहीयेत म्हणुन शब्दांचा किस पाडायला आणि विषयांतर करायला सुरवात केलीये .

In reply to by पक्या

अरे बाबा आता शब्दांचा कीस तुच पाडतो आहेस. मी चुकून चूका लिहीले.. भावना समज ;) ..बॉस ची नजर चुकवून पटापट टंकताना जे शब्द सुचले ते वापरले (स्वगतः आता अ-पुणेकर हापिसात टाईमपास करतात असे ऐकायला तयार रहा लंब्या) ...अभिमान बाळगणे यात काहीच चूक नाही आहे ..पण ज्या काही गोष्टी वाईट आहेत त्या खेळकर पणे मान्य कराव्यात एवढीच अपेक्षा..जसे मुंबई ला प्रचंड गर्दी आहे. चालणे मुश्किल होते. पावसाळ्यात पाणी तुंबते. आणि बरेच काही. ह्या गोष्टी मुंबईकर मान्य करतोच.

आम्हा नागपुरकरांना पुणेकरां सारख्या पा... फुशारक्या माराव्या लागत नाहीत. १. जगप्रसिद्ध संत्र्याचे शहर :-नागपुर २. भारताचे सर्वात "हिरवे" शहर :-नागपुर ३. भारतातील सर्वात सुंदर रस्ते :-नागपुर ४. बौद्ध बांधवांची "दिक्षाभुमी":-नागपुर ५. भारताचा मध्यबिंदु " झिरो माईल" :-नागपुर ६. जगप्रसिद्ध "हल्दिराम" ची सुरवातः-नागपुर ७. भारतातील सर्वात मोठा "कार्गो प्रकल्प मिहान":-नागपुर ८. जगप्रसिद्ध "R S S" चे मुख्यालय :-नागपुर ९. महाराष्ट्राची उपराजधानी :-नागपुर १०. "विधानसभेचे हिवाळी अधिवेशन":-नागपुर लिस्ट ईतकी मोठी आहे की मी पुर्ण लिहीन, तर पुणेकर :O तुम्ही वाचता वाचता म्हातारे व्हाल. =)) =)) =)) नागपुरकर दिवसा स्वप्ने पाहात नाही त....

In reply to by खादाड_बोका

भारताचे सर्वात "हिरवे" शहर :-नागपुर भारतातील सर्वात जास्त हिरवट म्हातारे भेटतात ती जागा पर्वती : पुणे पडत्या पावसाला पाहुन तुम्ही आतुन भिजला नाहीत तर स्वतःच्या कोरडेपणाची तारीफ करु नका तर हे मान्य करा की तुमच्या आयुष्यात भिजवणारे क्षण आलेच नाहीत

In reply to by विजुभाऊ

>> हिरवट.... अहो पण विजूभाऊ, खालील तात्यांचे आवाहन आणि दाढे साहेबांची नम्र विनंती वाचली नाहीत का? आता त्यांच्या विनंतीला मान देऊन पुण्याच्या विषयावरील प्रतिसाद देणे थांबवा अन्यथा ते उडवले जातील ...बघा बॉ

>>लिस्ट ईतकी मोठी आहे की मी पुर्ण लिहीन........... =D> छान छान बोक्या, नागपूर ची वैशिष्ठ्ये सांगायची आहेत ना तुला...तर मग दुसरा धागा सुरू कर ना... तुमचं नागपूर किती छान ह्या विषयी चर्चा चालू नाहीये इथे. विषयांतर कशाला करतोस? अशी पुण्याचीही लिस्ट तयार होईल . पण तो विषय च नाहीये इथे

हे महत्वाचे आणि प्रगती करणारे शहर आहे यात वादच नाही म्हणुन तर पुण्यात आयुका आहे, एनडीए आहे... इन्फोसिस आहे... पुण्यातले लोक प्रत्येक क्षेत्रात नेहमीच आघाडीवर आहेत... (आणि हे फक्त पुणेकर म्हणत नाही तर सगळेच म्हणतात /अनुभवतात ) उडदामाजी काळे गोरे हे असणारच... म्हणुन सगळी डाळ वाईट नसते... पुण्यात कोणाला वाईट अनुभव आले असतील तर ते वैयक्तीक आहेत... (तसे इतर शहरांमधे सुद्धा येउ शकतात्/येतात )म्हणुन पुण्याला नावे ठेवायचे कारण नाही.. समस्या सगळीकडेच असतात.. तशा पुण्यात सुद्धा आहेत म्हणजे तो काय पुण्याचा आणि पुणेकरांचा दोष होत नाही.. आता मुंबई मधे किती बकाल झोपडपट्ट्या आहेत... एअरपोर्ट वर विमान लॅन्ड होताना पहिला नजारा त्या झोपड्यांचाच असतो पण तरीही (मी पुणेकर असले तरी) ते बघुन सुद्धा घरी आल्या सारखच वाटतं (देशप्रेम इ. इ. ) मला वाटतं पुणे- आणि पुणेकरां विषयी बोलणे ..टीका करणे याची अ-पुणेकर लोकांना सवय झाली आहे.. पण इतकी नावे ठेउन सुद्धा घर ते पुण्यात घेतात.. मुलांना शिकायला पुण्यात पाठवतात.. नोकरी (आणि छोकरी सुद्धा ) पुण्याचीच करतात.. आणि तरी सुद्धा पुणे वाईट... ???????? ((अ-पुणेकरांच्या ) स्वभावाला औषध नाही हेच खरे..)

अरे अजून संपली नाही का पुण्याची अन् पुणेकरांची टकळी? :) बरं बुवा, आम्ही हारलो, पुणेकर जिंकले! पुणंच सर्वात गिरेट! मग तर झालं!? :) आपला, (फॉकलंडरोडवरचा मुंबईकर) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्वात जास्त प्रतिसाद खेचणारा विषय म्हणून "पुण्या"चं जाहीर अभिनंदन नानांनी करावं असं मी सुचवत आहे! ;-) यमी (from the middle of nowhere!)

In reply to by विसोबा खेचर

>>अरे अजून संपली नाही का पुण्याची अन् पुणेकरांची टकळी? का हो तात्या - पुणेकरांची ती टकळी आणि -पुणेकरांचे काय - रसाळ शब्द, अमृताचे बोल, मधुर वाणी...? :/ (ह.घ्या.)

नमस्कार बोकोपंत !!! आवडत हो नागपूर देखील आम्हाला .... मुंबई आमचीच आणी पुणे , नागपुर सारा महाराष्ट्र माझा .... मेरा भारत महान.......वादच नाही.................. मुद्दा हा आहे की का म्हणुन बेस लेस विधान करून पुण्याला नाव ठेवता, राजे!!!! हजारदा सांगीतल की विषय काय आहे टॉपीकच तो आधी वाचा ... काय -काय प्रतीसाद आलेत ते वाचा आणी मग बोला.... असो... इथुन पुढे विचार करून टाइप कराल असे वाटते.... ( एकेक काळचा नागपुर च्या जगप्रसिद्ध "हल्दीराम्स" चा पुण्यातील सेल्समन ) बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

त्या राजेन्द्र अग्रवालला (हल्दीराम)ज्या दिवशी ह्या खादाड बोक्याच खरे नाव सांगशील तर तो घरी येईल तुला घ्यायला. बोका काय आहे हे फार कमी लोंकानां माहीत आहे.... तात्या माफ करा... मला तर स्वप्नातही भुक लागते....

धन्यवाद...... पण काहीही गरज नाही.... आणी हल्दीराम ला तलाक ,तलाक ,तलाक झालाये........ असो....... बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

आता हा विषय थांबवण्यात आला आहे. यापुढील प्रतिसाद काढून टाकले जातील याची कृपया नोंद घ्यावी..

सर्व मिपामित्रा॑ना आवाहनः ह्या विषयावरील चर्चा आता था॑बविण्यात आली आहे. (अर्थातच तात्या॑शी चर्चा करूनच हा निर्णय घेण्यात आला आहे) व ह्यापुढे ह्या दुव्यावर कोणीही नवीन लिहू नये (अन्यथा तो उडविला जाईल) प्रतिसाद देणार्‍या व न देणार्‍याही सर्व मिपाकरा॑चे व वाचका॑चे आभार

In reply to by डॉ.प्रसाद दाढे

अणुमोदण आहे