गेले करायचे राहूनी...
मित्रांनो आपल्याला आयुष्यात अनेक बरे वाईट अनुभव येतात, अनेक आव्हाने येतात. आपल्याला जमेल तसा त्यांचा सामना आपण करतो. कधी यश येते तर कधी अपयश. कधी नशीब साथ देते तर कधी दुर्दैव आड येते. कधी आपण आव्हानाचा धीरोदात्तपणे सामना करतो तर कधी माघारही घेतो. पण एक मात्र नक्कीच आपण नेहमी पुढे चालत असतो. अन बऱ्याच यशस्वी माणसांबद्दल बोलले जाते की त्यानंतर त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही.
खरंच असे काही शक्य आहे? भरपूर यश मिळालं म्हणून कुणी मागे वळून पाहतच नाही. जे आपले स्वतःचे गत आयुष्य असते त्याकडे खरंच कुणी दुर्लक्ष करू शकते? प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्षाचे काही टप्पे असतात जेव्हा ते पार पडतात तेव्हा समाधानी असलेला तो नक्कीच मागे वळून पाहतो.
असं कुठे ना कुठे खोलवर जाणवत असतं की कुठल्या तरी आव्हानाला तोंड देताना आपण स्वतः कमी पडलोच. जिद्द, इच्छाशक्ती, स्वयं अथवा बाह्य प्रेरणा यापैकी काही वापरून त्या आव्हानाशी दोन हात केले असते तर मनाला हि बोच राहिली नसती.
मानवी इच्छा आकांक्षांना कसलीच मर्यादा नसते. मोठे घर, मोठी गाडी, जगातील एकाहून एक ठिकाणांची भ्रमंती... यापैकी बरेच काही आपण भविष्यासाठी योजून ठेवतो. काही योजना सफल होतात तर काही राहून जातात. पण हे झाले भविष्यातल्या गोष्टींबाबत. पण भूतकाळाचे काय?
अशी आव्हाने जी जिंकण्याची क्षमता आपण बाळगून होतो अन केवळ आपल्यातील अवगुणांमुळे त्यांना आपण तोंड देऊ शकलो नाही. जसे कधी आळस आडवा येतो, कधी जिद्द कमी पडते किंवा नको त्या वेळी नको त्या गोष्टींकडे लक्ष विचलित होतं अन आपण आपल्या लक्षापासून भरकटतो. भलेही नंतर दुसरी वाट चोखाळून आपण पुढे गेलेलो असतो तरी पण केवळ स्वतःपुढे स्वतःला सिद्ध करण्यासाठी चार पावले मागे जाऊन त्या आव्हानाचा पुन्हा सामना करावासा वाटतो.
असं काही की जे केल्यास इतरांकडून विशेष काही कौतुक होणार नाही उलट नकारात्मक प्रतिसादच मिळतील पण आपण स्वतः मात्र समाधानाच्या जलधारेत न्हाऊन निघू...
चला तर मग मित्रांनो माझ्यापासून सुरुवात करतो, मला जर एखादी पूर्वी न जमलेली गोष्ट यशस्वीरीत्या करायची असेल तर ती म्हणजे गणित शिकणे. आता असे का तर त्यासाठी जरा फ्लॅशबॅक मध्ये जावे लागेल.
लहानपणापासून मी एक गुणी विद्यार्थी होतो (गुणी चा अर्थ परीक्षेत चांगले गूण मिळवणारा असाच घ्या). शिक्षकांचाही लाडका होतो. ९ व्या वर्गापर्यंत पालकांना काळजी करावी लागणार नाही असेच गुण मिळवत होतो. १० वीतही चांगले गुण मिळवण्यासाठी उत्सुक होतो. पण मला ते आव्हान नाही झेपू शकले. कदाचित वाढलेल्या स्पर्धेमुळे असेल, पाठांतर वाईट अशी भ्रामक कल्पना असल्यामुळे असेन किंवा अभ्यासाचा एकंदरीत आकारमान न सोसल्यामुळे, मनासारखे किंवा स्पर्धेत पुढे जाण्यासारखे यश नाही मिळवू शकलो.
पुढे १२ विज्ञान शाखेत अभ्यासाचे आकारमान कमी करण्यासाठी जीवशास्त्र सोडूनही गणित विषय काही झेपला नाही. त्यामुळे अभियांत्रिकी मध्ये एखाद्या नावाजलेल्या महाविद्यालयात प्रवेशाचा प्रश्नच मिटला व मी बी. एस. सी. (संगणकशास्र) मध्ये गणित विषय न घेता प्रवेशकर्ता झालो. आता विषय रुचीचे असल्याने अन ते नोकरी मिळवण्यास कामाचे असल्याने अभ्यासात बरीच बरी स्थिती होती. ते संपल्यानंतर पुढे एम सी ए ला ही प्रवेशकर्ता झालो. इथे माझ्यातल्या विद्यार्थ्याचा (खरं तर परीक्षार्थ्याचा) पूर्ण कस लागला. संगणकशास्राशी जरी संबंधीत अभ्यासक्रम असला तरी त्याबरोबरच, संख्याशास्त्र, व्यवस्थापन व एका सत्रामध्ये तर अकौंटिंग सुद्धा अश्या एकाहून एक विषयांचा सामना करावा लागला. अन येथील परीक्षापद्धतीही खरंच अवघड होती. एखाद्या विषयात अनुत्तीर्ण होणे मी प्रथमच अनुभवले. अन नावडत्या विषयांच्या ओझ्यामुळे आवडत्या विषयांकडेही लक्ष देऊ शकत नव्हतो.
एका बाबतीत मात्र चांगली सोय होती, पुढील वर्षाच्या प्रवेशासाठी मागील वर्षाचे काही किमान विषयांत उत्तीर्ण व्हायला हवं असा काही नियम नव्हता. त्यामुळे गाडी तर थांबणार नव्हती पण इंजिनावरचे ओझे दर सत्राला वाढत होते. दर वेळी एखादं दुसरा विषय राहत असल्यामुळे इतर विषयांत मिळवलेल्या चांगल्या गुणांना काहीच किंमत नसायची. तुम्हाला आश्चर्य वाटेल ५ व्या सत्रामध्ये गेल्यावर माझ्या काही सहाध्यायींना ६ (५ व्या सेम चे) + १२ (१ ते ४ सेम चे) पेपर १२ दिवसांमध्ये द्यावे लागले. म्हणजे बरेचदा रोज २ पेपर. गंमत अशी असायची की जे लोक दोन्ही विषयांत उत्तीर्ण होण्यासाठी प्रयत्न करायचे ते दोन्हीमध्ये अनुत्तीर्ण व्हायचे. हे दुष्टचक्र काही थांबायचे नाही.
गणित नसले तरी, संख्याशास्त्राने त्याची उणीव माझ्याबाबतीत भरून काढली. Probabilities & combinatories नावाचा दुसऱ्या सेम मधील पेपर उत्तीर्ण व्हायला मला पाचवे सेम लागले. व इतरही विषयांमध्ये अनुत्तीर्ण होण्याचे फळ भोगावे लागले. पण जेव्हा पाणी नाकतोंडापर्यंत पोचले तेव्हा मी फार गंभीरपणे व प्रयत्नपूर्वक अभ्यास करून त्या सर्व विषयात उत्तीर्ण होऊ शकलो व वर्ष वाया ना घालवता शिक्षण संपवले. नशिबाने साथ दिल्याने पहिल्या मुलाखतीतच नोकरीही लागली अन त्यानंतरचा प्रवास बऱ्यापैकी सुखाने झाला किंवा होतोय.
आजही कुठलीही अडचण आली की मी ते दिवस आठवतो, स्वतःच्या प्रगतीत आड येणाऱ्या अवगुणांवर मात करून मी अनेकदा अनुत्तीर्ण झालेले विषय उत्तीर्ण झालो होतो. तर आज केवळ स्वतःच्या समाधानासाठी, स्वतःचा स्वतःबद्दल आदर बळावण्यासाठी मला पुन्हा तेच गणिताचे विषय शिकावेसे वाटतात ज्यापासून मी एकेकाळी पळवाटा शोधत होतो. मला माहीत आहे हा विचार बहुतेकांना बाळबोध वाटेल पण मित्रांनो स्वतःच्या नजरेत स्वतःची चांगली प्रतिमा असणे हे फार महत्त्वाचे असते. लढाईत हरल्याचे दुःख नाहीये पण त्या लढाईतून पळ काढल्याचे शल्य जरूर आहे. त्यामुळे पुन्हा एकदा त्या आव्हानाचा सामना करावासा वाटतोय...
तर मित्रांनो तुमच्याही आयुष्यात अशी न झेपलेली आव्हानं असतील जी आजही तुम्हाला खुणावत असतील. जर असे काही असेल अन इतरांनाही सांगावेसे वाटत असेल तर होऊन जाऊद्या या धाग्यावर त्याबाबतचा उल्लेख. बघूया तर आपल्यासारखे इतर किती लोक आहेत.
या ठिकाणी एका शीतपेयाच्या जाहिरातीत वापरलेले एक वाक्य आठवते...
डर से मत भागों, डर का सामना करो, क्यों की डर के आगे जीत है.
वर्गीकरण
प्रतिक्रिया
छान लिहिले आहे..
रंगा ...कथा "शेम टू शेम "
कठीण वाटले ते सोडून दिले.
अरेच्चा !
साधे
छान लिहिलंय
'शेम टू शेम' :-)
अवांतर-
>> बघूया तर आपल्यासारखे इतर
प्रतिसाद आवडला
विचार आवडले...
मला मराठीचा प्राध्यापक व्हायचे होते !
शुभेच्छा!!
कितीही चान्गले प्रेसेन्तेशन
ढाक्-बहिरी (भैरी)
क्या बात है!!
एक घाव दोन तुकडे
लढ बाप्पु...
कीप इट अप
सहमत
काही अंशी माझेच आत्मवृत्त
जिंकलंस मित्रा!!
तुमचा वेगवेगळ्या विषयांचा
आपल्या चिकाटीला सलाम
प्रतिसाद आवडला
प्रेरणादायी प्रतिसाद!
वा वा क्लिंटनसाहेब, सलाम!
हा साष्टांग दम्डवत स्विकारा _
एखादा महत्वाचा निर्णय घ्यायचा
माझी आवड
शुभेच्छा!!
हे राहून गेले
श्रिरंगाच्या लिखाणाची ढब,
एकंदर लोकांचे पाहून असे वाटते
श्रीरंग_जोशी
स्पष्टीकरण
मी जसा आहे तसाच योग्य आहे