Skip to main content

"गांधीजींनंतरचा महान नेता"

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 05/06/2012 या दिवशी प्रकाशित केले.
IBN Group ने महान भारतीयाची निवड शोध सुरु केला आहे. या शोधाचा मथळा "गांधीजींनंतरचा महान नेता" असा आहे मुळात नेहरू असो वा राजाजी..डॉक्टर साहेब असो वा पटेल प्रत्येक जण महानच आहेत.. प्रत्येकाने आपापल्या परीने देशाची सेवा व कार्य केलेल आहे. समस व झापडबंद पॅनेल याच्या वर कोण नेता गांधी नंतर महान असे ठरणार आहे. असो बघू यात नेमके काय होते ते.. स्वा.वीर सावरकरांचे नाव जजेस पॅनेल ने जाणीवपूर्वक वगळले आहे हे सहज लक्षात येते. पण दुसर्‍या अंगाने ते बरेच झाले कारण या शोधाचा मथळा "गांधीजींनंतरचा महान नेता" असा आहे आणि सावरकर गांधीजींपेक्षाही महान असल्याने त्यांचे नाव समाविष्ट केले नसावे का?. आले वागळेच्या मना तेथे कोणाचे चालेना

वाचने 21360
प्रतिक्रिया 128

प्रतिक्रिया

अहो कसला तो IBN आणि कसला तो माहिमचा वागळे घे॑वून बसलात? हल्ली बर्‍याच वर्षांनी बघितला टी.व्ही.वर. डोक्यावरचे केस कमी झालेत आणि सोनेरी फ्रेमचा चष्मा आलाय. आता ज्येष्ठ पत्रकार वाटतो.

>>>डॉक्टर साहेब म्हणजे नक्की कोण??????? >>>सावरकर गांधीजींपेक्षाही महान असल्याने त्यांचे नाव समाविष्ट केले नसावे का?. तुम्हाला नक्की काय वाटते???????? असो. लोकमत ग्रुपच्या दर्डांची निष्ठा कुठे वाहिलेली आहे हे जगजाहीर असल्याने आश्चर्य वाटले नाही की राग आला नाही. बाकी तुमचा रोख जर लौकर स्पष्ट करा.

आता तुम्हीच म्हनले ते गांधिजींपेक्षा महान हुते म्हनुन , मग आनि आय बी एन च्या यादीत त्यांचे नाव का नाही, म्हनुन परत धागाही काढलात..

In reply to by सुनील

गहू, तान्दूळ, डाळ, रवा, शेवया.. इ. सारख्या नेहमी लागणार्‍या अन्नधान्यासाठी "दर्डा" ची क्वालिटी अत्युत्तम असून ते आर्थिक दृष्ट्याही आम्हाला मॉलपेक्षा किफायतशीर वाटते!!!! :) त्यामुळे "दर्डा"कडे न मिळणार्‍या गोष्टी आम्ही मॉलमधून आणतो!! :)

In reply to by सुनील

तुम्ही जिलब्या कुठून आणता? आम्ही बर्‍याचदा रसमलाई, काजूकतली वगैरे आणतो!!!....जिलबी आम्हाला जास्त आवडत नाही!!! मागे एकदा कुठल्याश्या थन्डीतल्या सणाच्या दिवशी दान्डेकर पूलावर काही गरीबांना आम्ही जिलब्या वाटल्या होत्या.... ;) बाकी आपण कुठून आणता जिलब्या? :)

In reply to by मृत्युन्जय

त्यानी डॉक्तरसाहेब असा उल्लेख केला आहे, ते बहुदा तेच असावेत. याना डॉक्टरांचं नाव घ्यायला लाज वाटते... आणि हे इचारतात ते कुणीतरी आहेत ते सावरकरांचं का नाव घेत नाहीत? :) का, नुसतं डॉक्टर असे म्हनुन संशयाचा फायदा हेगडेवाराना द्यायचा डाव आहे की काय? :)

In reply to by JAGOMOHANPYARE

काय मिस्टर मारोपिछेसेसारे ?? परत वेडाचा झटका आला वाटते?? की ब्रिगेड विचारसरणी ची कावीळ उमळली परत?? :sick: काळजी घ्या ब्वॉ ... :crazy:

In reply to by JAGOMOHANPYARE

याना डॉक्टरांचं नाव घ्यायला लाज वाटते.
या साठी न चुकता रोज ते वैद्यांचा पाटणकर काढा घेत असतात सकाळ-संध्याकाळ ;-) . . . . . . . (लुगडेवार )

धाग्याची शंभरी लवकर गाठण्यासाठी माझा खारीचा वाटा .....

आर्थिक परिस्थितीला घरघर लागलेल्या चॅनेलचे पैसे मिळवण्याचे प्रयत्न असतात असल्या एसएमएसने स्पर्धा आयोजित करण्याच्या कल्पना... . सोडून द्या ! :) किंवा एक काम करा त्यांना मदत म्हणून रु.१/- (रुपये एक मात्र) चा चेक पाठवून द्या. :)

In reply to by संजय क्षीरसागर

मी का नाही आज फुला फुलांचा रंगीबेरंगी शर्ट घातलाय आणि मला तद्दन टुकार चारोळ्या पण सुचत आहेत.

In reply to by नाना चेंगट

पाडा जिलब्या पटापट प्रतिसाद मिळतील सटासट संपादक धावतील झटाझट पंख लागतील फटाफट 'ट' वृत्तातली आणि 'टा' गणातली ही चारोळी नानाला समर्पीत.

In reply to by परिकथेतील राजकुमार

फट तिथे खटपट भाता चाले रटरट आमचा नेता नटखट बोंबा मारे पटपट आमचे बडबडगीत पराला समर्पित.

In reply to by मृत्युन्जय

आमचे बडबडगीत पराला समर्पित.
हे गर्दूलविकृतीडीत वृत्तातील गीत अतिशय आवडले.

In reply to by JAGOMOHANPYARE

गांधीनंतर कोण???? इंदिरा गांधी राजीव गांधी सोनिया गांधी
... ओह याssss... राजीव गान्धी!!!!... .. राजीव'जी इज ( माईट बी ओन्ली) द पर्फेक्ट मॅन आफ्टर मोहनदास करमच्न्द गान्धी!... .दॅट्स व्हाय.....आय लव हिम सो मच!!!.... राजीव'जी.. इवन इफ आय डोन्ट लाईक 'बनाना'....बट......................खूप छोट्या छोट्या गोष्टींमुळे आजकाल तुमची आठवण येते!!... प्लीज कम बॅक.. (इफ पॉसिबल)!!!! तुमच्या वेड्या मुलाकडे पाहिलं.. की देशापेक्षा त्याच्याच भविष्याची जास्त चिन्ता वाट्टे! ;) ओह.. जोक्स अ पार्ट........बट... राजीव'जी....स्टील वी लव यु... मिस यु!!!!!! :) ~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~*~

In reply to by JAGOMOHANPYARE

थोडक्यात तुमचा ब्राह्मणांवर जो राग आहे तो कशाही प्रकारे निघालाच पाहीजे.. बाकी सावरकरांवर बरंच लिखाण वाचलंय त्यामुळे वरचा मुर्खपणा बाद.

In reply to by JAGOMOHANPYARE

त्यात पण मोहन आलाच.. किती रे गाधीं प्रेम ऊतु जाते तुझे... प.पू. नथुरामजी आज हवे होते आज, म्हणजे या मोहनला ही जागो च्या जागो भगवान को प्यारे केले असते.. :cry:

In reply to by JAGOMOHANPYARE

इथे काय संदर्भ? हे अधिकृत दस्तावेज आहेत काय? मला तरी वाटते कोल्हापुरच्या शाहुच्या सुनहर्‍या कहाण्यांइतकेच तथ्य आहे यात. काय म्हणता?

In reply to by मृत्युन्जय

त्याच्या वर एक धागा निघु देत.. प्रतिक्रियन्ची डबल सेन्चुरी झालीच म्हनुन समजा.. :wink:

In reply to by कौतिक राव

होय होय मी त्याच कहाण्यांबद्दल बोलतो आहे. कोल्हापुरात गेल्यावर मी प्रत्येक घसरगुंडीकडे अतीव आदराने बघत असतो. ;)

In reply to by मृत्युन्जय

मे महीन्याच्या सुट्ट्यान्मधे त्या ऐतिहासिक कहाण्या चवीने चावल्या जाय्च्या.. तुम्च्या मुळे आज त्या सुखद आठवणी परत ताज्या झाल्या.. :)

In reply to by मृत्युन्जय

'मर्दानी आणि मैदानी व कसरतीच्या' या खेळांमुळे मीदेखील प्रत्येक घसरगुंडीकडे अतीव आदराने बघत असतो. हे खरे पौरुष! त्यापुढे शनिवारवाड्यातली "ती" वरणभात घट**की म्हंजे किस घटकी **की :P

In reply to by JAGOMOHANPYARE

याच लेखाच्या खाली हे लिहिले आहे. ते वाचले असेलच (' आऊटलूक ' च्या या अंकातच गांधी हत्या कटातील सावरकरवाद्यांच्या सहभागाविषयी पूर्ण विरुद्ध भूमिकाही मांडण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पांचजन्य या मुखपत्राचे संपादक असणा-या तरुण विजय यांचा लेखही तुम्हाला ' सलाम सावरकर ' मध्ये वाचता येईल) अर्थात आपल्या पूर्व-निष्कर्षाला सोयीचे तेवढेच वाचणार्‍या तुम्ही दुसरी बाजू वाचण्याची तसदी घेतली नसेल याची खात्रीच आहे.

गांधीं"नंतर"चे म्हणजे ३० जानेवारी १९४८ नंतर महान समजले केलेले का?

>>बाकी आपण कुठून आणता जिलब्या? दान्डेकर पुलावरून दांडेकर पुलाखालीही उत्तम प्रतीच्या मिळतात जिलब्या

In reply to by नर्मदेतला गोटा

अहो आता कुठे ३२ खपल्यात. अजून ६८ बाकी असतीलच ;) पण तरी काही भरवसा नाही. काही ठिकाणच्या मंडळींना "उपलब्ध आहेत" पेक्षा "संपले" अश्या पाट्या लावण्याचाच उत्साह जास्त !!

In reply to by अविनाशकुलकर्णी

यामध्ये 'कुमारी सुशेरी बेहेन मायावती' यांचे नाव नसल्याबद्दल तीर्व निशेध!! हा समस्त स्त्री जातीवर अन्याय आहे!..

In reply to by अविनाशकुलकर्णी

या लिस्ट मध्ये काहीतरी कट शिजत असल्याचा वास येत आहे. कारण रजनीकांत २० व्या क्रमांकावर आहे. ते शक्यच नाही. गांधीजींच्या आधी, वेळेस आणि पश्चात फक्त एक आणि एकच महान नेता आहे आणि तो म्हणजे रजनीकांत!
------------

In reply to by अविनाशकुलकर्णी

नेत्यांच्या यादीत सचिन, तेंडुलकर, कलाम, मदर तेरेसा आणि जे आर डी टाटा यांची नावं पाहून मौज वाटली. यादीत सुधीर मुतालिक, झाकिर नाईक आणि आदित्य ठाकरे यांची नावं नसल्याबद्दल निषेध.

In reply to by नितिन थत्ते

+१ सहमत!

In reply to by नितिन थत्ते

आँ!!! सुधीर मुतालिक?? चिच्चा, बिच्चारे जीव देतील हो हा प्रतिसाद वाचून. बरं चिच्चा ते चिच्चा.. प्ण ऋ आणि विकास पण कसे काय गंडलेत? अवांतरः तुम्हाला प्तमोद मुतालिक म्हणायचं आहे का?

In reply to by मस्त कलंदर

प्ण ऋ आणि विकास पण कसे काय गंडलेत? ऋ बद्दल ऋ च सांगेल! :-) पण मी विचार केला, नितिनराव म्हणताहेत म्हणजे बरोबरच असणार म्हणून नेहमी प्रमाणे सहमती दाखवली. ;)

In reply to by नितिन थत्ते

यादीत सुधीर मुतालिक, झाकिर नाईक आणि आदित्य ठाकरे यांची नावं नसल्याबद्दल निषेध. >>>>>> =)) =)) =)) =)) हसून हसून जीव गेला की ओ थत्तेचाचा !! ;) मायला काही कंट्रोल ठेवत जा की ;)

In reply to by अविनाशकुलकर्णी

मुलायम , लालू, इमाम बुखारी, निहाल अहमद, टिपू सुलतान, औरंग्जेब, राघोबादादा,जावळीचेमोरे वगेरे लोकांची नावे असती तर लज्जत आली असती पोल ला...

डॉ. आंबेडकरांची विद्वत्ता, कष्ट, त्याग, समाजासाठी व लोकशाहीसाठीचे योगदान, त्यांचा दूरदर्शीपणा व इतर अनेक गोष्टी... या यादीमध्ये माजी पंतप्रधान स्व. पी. व्ही. नरसिंहराव यांचे नाव नसल्याचे आश्चर्य वाटले. त्यांच्या दूरदर्शीपणाची फळे आज आपण उपभोगतो आहे.

पहिल्या फेरीमध्ये १० मते देता येतात. त्यापैकी ९ मते मी दिली. माझी ९ मते: (in no particular order) जवाहरलाल नेहरू, Dr. आंबेडकर, वल्लभभाई पटेल, होमी भाभा, विक्रम साराभाई, Sam Manekshaw, इला भट, बाबा आमटे , मदर टेरेसा. या यादीत नरसिंह रावांचे नाव नसल्याचे बघून वाईट वाटले. तसेच भारतीय judiciary मधील कोणाचेच नाव नाही हे बघूनही वाईट वाटले. निदान न्यायमूर्ती हंसराज खन्ना, (त्यांच्या डाव्या विचारांना समर्थन नसले तरी) न्यायमूर्ती कृष्ण अय्यर किंवा एस. एम. सिकरी यांच्यासारखी नावे या यादीत हवी होती असे वाटते. निदान bollywood मध्ये अंगप्रदर्शनाची लाट आणणारे राज कपूर किंवा रजनीकांत यांच्यापेक्षा या धुरीणांचे योगदान अधिक आहे असे माझे वैयक्तिक मत आहे.

In reply to by क्लिंटन

नेहरु? का बॉ? नेहरुंनी तर गांधींना ब्लॅकमेल करुन पंतप्रधानपद पदरी पाडुन घेतलं म्हणे! काश्मीर प्रश्नाचं घोंगडं अजुन भिजकटच आहे.. :( आग्रह नाही पण कारण सांगितलं तर आवडेल.

In reply to by शिल्पा ब

अगदी बरोबर आपले नेते सुब्रमण्यम स्वामी ज्यांनी नुकताच ३जि घोटाळा बाहेर काढला त्यांनी पाकिस्तानी वाहिनीवर लाइव मुलाखतीत आय एस आय च्या माजी प्रमुखांना सांगितले की ते नेहरू आणि त्यांनी युन मध्ये नेलेला काश्मीर प्रश्न अजिबात मानत नाही त्यामुळे घोगड भिजत पडलाय. नेहरू ह्यांनी हा निर्णय लोकशाही पद्धतीने सल्ला मसलत न करता घेतला हे देखील सांगितले.

In reply to by निनाद मुक्काम …

कोण सुब्रमण्यम स्वामी? तो तर राजकारणात दुर्लक्षला गेलेला आणि काहीही करून प्रसिध्दीच्या झोतात राहावे यासाठी धडपड करणारा मनुष्य आहे.१९९१ मध्ये चंद्रशेखर सरकारमध्ये कायदामंत्री असताना यानेच लोकसभा अध्यक्ष रवी रे यांना चंद्रशेखर यांच्याबरोबर फुटलेल्या ५ मंत्र्यांना पक्षांतरबंदी कायद्याअंतर्गत अपात्र ठरवायच्या प्रश्नावर "मी तुम्हाला अटक करीन" अशी धमकी दिली होती असे वर्तमानपत्रात वाचल्याचे पक्के आठवते संदर्भ . लोकसभा अध्यक्ष म्हणजे राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधानांनंतर चौथ्या क्रमांकाचे पद असते. अशा पदावरील व्यक्तीला आपला राजकीय स्वार्थ साध्य होत नाही म्हणून अटक करण्याची धमकी देणारा मनुष्य कायदामंत्री कसा होऊ शकतो? पुढे जयललितांविरूध्द याने भ्रष्टाचाराचे आरोप केले. १९९८ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये परत त्याच जयललितांबरोबर युती करून त्याने खासदारकी पदरात पाडून घेतली. त्या निवडणुकांसाठी वाजपेयी पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत हे अलम दुनियेला माहित होते. तरीही त्यांना पाठिंबा देत असलेल्या जयललितांबरोबर युती करून खासदारकी तर पदरात पाडलीच पण पुढे तीन महिन्यात "जातीयवादी" सरकारचा पाठिंबा काढून घ्यायचा शाहजोगपणा त्यांनीच दाखवला. २००४-०५ मध्ये रामसेतू या अजिबात महत्वाच्या नसलेल्या प्रश्नावर त्याने रान उठवायचा व्यर्थ प्रयत्न केला. ए.राजाने २जी स्पेक्ट्रम मध्ये सरकारी खजिन्याचे मोठे नुकसान केले आहे असे २००८ पासून वर्तमानपत्रात येतच होते.त्यावरूनच पंतप्रधान कार्यालयाला पत्र लिहून स्वामींनी फुकटची प्रसिध्दी लाटायचा प्रयत्न मात्र जरूर केला. अशा माणसाला फारसे गांभीर्याने घ्यायची गरज मला तरी वाटत नाही.

In reply to by क्लिंटन

सिब्बल साहेब आता कुठे गेलात?? यावर बंदि का बरे नाही घालत? या लिस्ट मधे सावर्कर १ क्रमांकावर असते तर मात्र ताबडतोब घात्ली असती बंदी.. :tired:

In reply to by क्लिंटन

या यादीत नरसिंह रावांचे नाव नसल्याचे बघून वाईट वाटले. अहो त्यांनी संधी मिळालेली असताना देखील गांधीजींची इच्छा* साकार केली नाही, म्हणून कदाचीत त्यांचे नाव नसेल. :-) (* स्वातंत्र्योत्तर काळात, काँग्रेस राजकीय पक्ष करण्याऐवजी विसर्जीत करण्यात यावी अशी गांधींजींची इच्छा होती. ;) )

In reply to by विकास

अजून एक गाळलेले नावः अण्णा हजारे.

आमच्या एन. डी. तिवारींचे नाव का नाही यात ? आणि कलमाडी, शरदचंद्रराव पण दिसत नाहीयेत. हाय रे ह्या देशाचे दुर्दैव.

In reply to by परिकथेतील राजकुमार

+ १ आणी आणि बहन मायावती? आणि प्रकाश आंबेडकर? आणि आणि दादा? छ्या. एक डाकटरच आणी स्व. श्री. काशिराम यांचे नाव सोडले तर लिष्ट खुपच टाकाऊ आहे,.

In reply to by मृत्युन्जय

सहमत. आणि रामदास आठवले, ज्योतीराव फुले, सावित्रीबाई, प्रकाश आंबेडकर, रा. सु. गवई ह्यांची पण नावे का नाहीत ?

In reply to by परिकथेतील राजकुमार

+ १ आणी आणि बहन मायावती? आणि प्रकाश आंबेडकर? आणि आणि दादा? छ्या. एक डाकटरच आणी स्व. श्री. काशिराम यांचे नाव सोडले तर लिष्ट खुपच टाकाऊ आहे,.

In reply to by परिकथेतील राजकुमार

दिग्गूजींना विसरून कसे चालेल? ;)

In reply to by बॅटमॅन

हा हा हा! त्यांचे नाव त्या लिष्टमध्ये नसण्यात आरेसेस चा हात आहे हे नक्की "हात" म्हणले की फक्त काँग्रेसच डोळ्यासमोर येते ! :-)

पोल सर्व्हेचा तक्ता ' द ग्रेटेस्ट इंडियन' असे म्हणतो आहे. (आणि हो, 'आमच्या' श्री. आण्णा हजारेंचे आणि 'थोड्या आमच्या' बाबा रामदेव यांचे नाव का वगळले आहे?)

काही मिपाकर अगदी जिलेबी सारखे सरळ आहेत. अगदी नाका समोर बघून चालणारे. आता नाकच वाकडे असल्यामुळे असे विचित्र प्रतिसाद देतात. बाकी आपण महाराष्ट्रातीलच लोक जर सावरकरांसारख्या व्यक्तीचा आदर ठेवू शकलो नाही तर बाकीच्या राज्यातील लोकांकडून तरी काय अपेक्षा ठेवणार? मागे मला वाटते मागे (बहुतेक मनी शंकर ऐयरने) पण सावरकरांच्याबद्दल अनुद्गार काढले होते. त्यांना माहित आहे महाराष्ट्रात डरकाळ्या फोडणारे दिल्लीत गेले कि शेपटी आत घालून बसतात. वाईट ह्या गोष्टीचेच वाटते कि आपलीच माणसे ह्याला खतपाणी घालतात. सावरकरांनी जी बोटीतून उडी मारली तशी उडी ह्या तथाकथित टीकाकारांनी १० फुटांवरून मारून दाखवावी. नेसलेले वस्त्र बदलायची वेळ येईल. बाकी अगदी fashion म्हणून उचलली जीभ आणि लावली टाळ्याला अशीच अवस्था आहे.

In reply to by Madhavi_Bhave

अगदी. अगदी... कुणीतरी जाब विचारायला हवा सावरकरांचे नाव का नाही म्हणून... काही मिपाकर अगदी जिलेबी सारखे सरळ आहेत. सरळ जिलेबी कशी असते? आमच्याकडे तर जिलब्या वाटोळ्याच असतात.

In reply to by Madhavi_Bhave

'अनुद्गार' हा शब्द वाचून सावरकरांचा आत्मा (सावरकर असल्याने तो असण्याची शक्यता नाही हा भाग वेगळा) तळमळेल हे मत्र नक्की.

In reply to by श्रावण मोडक

अनुदार + उद्गार = अनुद्गार. :) आणि सावरकरांना कदाचित आत्मा नसला तरी तळमळणारा 'प्राण' होता हे त्यांनी स्वतःच 'सागरास' सांगितले आहे, मोडक साहेब. ;)

In reply to by विसुनाना

अनुदार + उद्गार = अनुद्गार.
इतका 'संधी''साधू'पणा आम्हाला कळतच नाही ना! ;-)

In reply to by JAGOMOHANPYARE

तुमच्यासारख्या त्रिकालज्ञाला राजाजी ठाऊक नाहीत, आश्चर्य आहे ब्वॉ. राजाजी म्हणजे 'चक्रवर्ती राजगोपालाचारी'. बाकीची माहिती तुम्ही गुगलून मिळवालच.

सॉरी जीलबी चालली आहे ना जीलब्या टाकलेले प्रतिसाद फारच रोचक आणि मनोरंजनात्मक आहेत :-) त्यातल्या त्यात माधवी भावे यांचा एकच प्रतिसाद जबरा वाटला,
सावरकरांनी जी बोटीतून उडी मारली तशी उडी ह्या तथाकथित टीकाकारांनी १० फुटांवरून मारून दाखवावी. नेसलेले वस्त्र बदलायची वेळ येईल.
अक्षरशः अंगावर काटा आला :bigsmile: बाकी जसे हि शोध मोहिम टुकार लोकांची भिकार विचारसरणी आहे तसे इथले काही सन्माननीय सदस्यांचे नेहमी येणारे प्रतिसादही त्याच पठडितले, . . . . . अवांतरः- ठाकरे काका ,बाबासाहेब पुरंदरें , P L देशपांडे, मनोहर जोशी,गडकरी,अडवाणी, गीडवाणी, राजपुरोहित यांची नावं नसल्यामुळे तीव्र णीषेद (टरकूराम रामसे)

हा निवडशोध म्हनजे बोलाचाच भात......बोलाचीच कढी.... खुप नावे ह्यात नाहित. विनोबा भावे, जय प्रकाश , बाबा आमटे . निवडशोध वाले पण त्याच लायकीचे पाहज्येतना .

In reply to by नाना चेंगट

तात्यारावांचे नाव का नाही, हीच तर चर्चा आहे... तात्यारावांचे नाव आले की त्यांचेही नाव आपोआप येईल. :)

अरुण गवळी उर्फ डेडी ( किंवा युपी मधील राजाभय्या प्रकाश आंबेडकर राहुल ,सोनिया ,राजीव ( गांधी ) मनमोहक मनमोहन आमचे आदर्श व स्फूर्तीस्थान बरीच आहेत. सध्या इतकेच

रविंद्रनाथ ठाकुर कुमार गंधर्व ओपी नय्यर त्रिंदाद मास्तर जी ए कुलकर्णी पुल चिं वि जोशी हरिप्रसाद चौरसिया... ....असे अनेक कलावंत, लेखक, कवी, संगीतकार... हे खरे ग्रेटेस्ट इंडियन्स... ....नेत्यांबद्दल काही न बोलणेच बरे.

सेंचुरी झाली.

In reply to by चिरोटा

वाह... काय "शॉट" निवडलाय सेंचुरी कंप्लीट करायला !!! अर्धवटराव

४५ वर्षे सलग सत्तेवर असलेले देशातील सर्वात कमी वयात मुख्यमंत्री बनलेले(नं २ चे ) जाणता राजा नावाने ओळखले जाणारे 'शेतकर्‍यांचा राजा' देशाचे संरक्षणमंत्री असलेले (९३ सालचे बॉम्बस्फोट विसरा) भारतीय क्रिकेटला चांगले दिवस आणणारे (आय पी ल ला १००० कोटी ची करमाफी मिळवणारे) इतके वर्षे सत्तेत असून पैसे खाण्याच्या आरोपावरून कधीही सत्तेवरून पाय उतार न व्हावे लागलेले. वन अँड ओनली शरद पवार यांचे नाव कुठेच नाही

In reply to by आशु जोग

पुरावा द्या हो.असे बोंबलुन काय होनार आहे. त्यांच साम्राज्य MALAYSIA,DUBAI,SINGAPORE,.,.,.पर्यंत पसरले आहे. असे म्हणंतात. त्यांच्या राजकुमारीकडे म्हणे मलेशियाचेही नागरिकत्व आहे, ........त्या केस च काय झाले कोणी सांगेल का?

ताजी स्थिती काय आहे? कोण पुढे, कोण मागे वगैरे ...

अशी चाचपणी असेलही. येत्या निवडणूकां मध्येही वोटींग SMS द्वारे करण्याची मुभा असावी उगा चालायचे कष्ट कोण घेणार? वागळे ,अण्णा हजारे आणि गँगने अशी एक मागणी लावून धरली पाहिजे.

In reply to by विकास

नाय हो.... पूज्य नथुराम’जी’ गोडसे. त्यांनी गांधी महान असल्याचे सर्टिफाय केले होते असे ऐकून आहे. [त्यांना आधुनिक भारताचे दधिची ही उपाधी मराठीतले श्रेष्ठ नाटककार दळवी यांनी दिल्याचे समजते]

In reply to by नितिन थत्ते

[त्यांना आधुनिक भारताचे दधिची ही उपाधी मराठीतले श्रेष्ठ नाटककार दळवी यांनी दिल्याचे समजते] खुलाशाबद्दल धन्यवाद! बाकी आपण प्रदीप दळवींचे फॅन दिसताहात! ;)

In reply to by विकास

१. तुम्हाला नेहरू हे आधुनिक भारताचे दधिची वाटतात का? - आधिनिक भारताचे दधिची म्हटल्यावर म्हणजे नेहरू का? असं तुम्ही विचारलं म्हणून हा प्रश्न. २. गांधी महान आहेत हा जावैशोध नेहरूंनी लावला असं तुम्हाला वाटतं का? असो.

In reply to by नितिन थत्ते

तुम्हाला नेहरू हे आधुनिक भारताचे दधिची वाटतात का? नेहरूंना अधुनिक भारत कसा असावा याबद्दलचे प्रामाणिक vision होते, जे त्यांचे विरोधक देखील नाकारणार नाहीत. पंतप्रधान झाल्यावर अधिकृत नेतृत्व म्हणून नेहरूंनी अनेक प्रकल्प चालू केले ज्यातून अधुनिक भारत घडू लागला. त्या त्यांच्या अथक प्रयत्नांसाठी त्यांनी हाडाची काडे केली असे म्हणणे अतिशयोक्तीपर ठरणार नाही. म्हणून अधुनिक भारताचे दधिची म्हणणे काही गैर ठरणार नाही. आधिनिक भारताचे दधिची म्हटल्यावर म्हणजे नेहरू का? असं तुम्ही विचारलं म्हणून हा प्रश्न. तुमचा नेहरूंबद्दलचा अभ्यास आणि आदर लक्षात घेता, तसेच काही असू शकेल असे वाटले. गांधी महान आहेत हा जावैशोध नेहरूंनी लावला असं तुम्हाला वाटतं का? हा प्रश्न ज्या मूळ प्रतिसादात होता, त्यातील "जावई शोध" वाक्प्रयोग मला तो पटला नाही आणि उपहास आहे म्हणून मी सोडून दिला होता.

जी हे विशेषण नथुराम ला ? ते तर ओसामाचे विषेशण ना ?

जी हे विशेषण नथुराम ला ? ते तर ओसामाचे विषेशण ना ?