परवाची बातमी : बिबट्याच्या हल्लयात बालिका ठार शिवरे परिसरातील घटना महिनाभरातील दुसरी घटना
आणखी एक: धोंडेगाव शिवारात बिबट्याचा धुमाकूळ हल्ल्यात युवक जखमी, मक्याच्या शेतात पिंजरा
या आधी मुंबईच्या उपनगरात एका बिबट्याने शाळेत शिरून धुमाकूळ घातला होता. मागे इगतपुरी तालूक्यात आणखी एका बिबट्याने एका वृद्ध स्त्री ला ठार केले होते.
बिबटे मानवी वस्तीत शिकारीसाठी शिरतात हे सत्य आहे. जंगलेच राहीली नाही तर त्यांनी जावे कुठे? (अशाच प्रकारे मोर, हरणे देखील मानवी वस्तीत पाण्यासाठी येत आहेत.) इतर प्राण्यांचे सोडा पण बिबटे व तत्सम हिंस्त्र प्राणी मानवी वस्तीत येण्याचे चिंताजनक प्रमाण आहे.
दुसरीकडे गावोगावी भटक्या कुत्र्यांचे प्रमाण वाढलेले आहे. ही भटकी श्वापदे टोळीटोळीने राहण्याचे प्रमाण वाढले आहे. कुत्र्यांचे हे प्रमाण अनेक प्रश्नांना तोंड फोडतो. रात्रीबेरात्री कामगारांवर हल्ले करणे, चावणे, शेळी बकरी यांचा फडशा पाडणे, भुंकणे, रेबीज रोग पसरवणे आदी प्रकार आताशा वाढलेले आहे. अगदी एकटी खेळणारी लहान बालकेसुद्धा या भटक्या कुत्र्यांच्या तोंडी गेल्याच्या बातम्या आहेत.
आस्ट्रेलीयात मागे उंटांचे प्रमाण फार वाढले असता तेथील सरकारने उंट मारण्याला प्राधान्य दिले असल्याची बातमी वाचनात आली असेलच.
बरोबर. तुमची विचार करण्याची दिशा योग्य आहे.
या भटक्या कुत्र्यांना मारण्याची जरी परवानगी नसेल पण त्यांना जंगलात तर सोडू शकतो की नाही? या मुळे हिंस्त्र श्वापदांना शिकार करणे थोडेतरी सोपे जाईल. कुणी या उपायाला अमानुष समजतीलही. पण यामुळे प्राण्यांचे जैविक चक्र पुन्हा सुरू राहणार आहे. जीवो जिवस्य जीवनम:
प्रश्न चर्चीला जावा म्हणून आटोपता घेतो.
वाचने
1847
प्रतिक्रिया
5
मिसळपाव
प्रतिक्रिया
लेखात वर्तमान समस्येला हात
आपल्याला लाख वाटतं हो, पण
पण त्या मेनका गांधेबाई लग्गेच
पर्यावणाचा समतोल हवा.
खाण्याची सोय करा...