Skip to main content

<<ज्योतिष>> आजं म टा (पुणे) मध्ये प्रसिद्ध झाले ला माझा लेख

लेखक युयुत्सु यांनी मंगळवार, 13/03/2012 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
From 2012_03_13" alt="" /> टीप - ही जाहिरात नव्हे.

वाचने 31588
प्रतिक्रिया 125

प्रतिक्रिया

सपूर्ण लेख कसा काय दिला ? मला वाटले अर्ध्या भागाचा फटु असेल आणि उरलेले वाचण्यासाठी मटाची लिंक असेल. असो...

मग म. टा ने ज्योतिषाची ऊपयुक्त्तता पासली का ? ही ऊपयुक्तता कशी तपासतात ? नाडी परीक्षा की पट्टी परीक्षा ?

सर्वसामान्यपणे मानवी मन आपल्याला आवडणारा अनुभव दीर्घ़काळ जपून ठेवते. भविष्य खरे ठरून विपरित घडले तरी भविष्यावरचा विश्वास वाढीस च लागतो. मग सुखपर्यावसायी भविष्याची बातच सोडा. असा अनुभव आला की आहारी जाणे आलेच. मग ती गरज होते मग परत आहारी जाणे आलेच. पिणारे, जुगारी व भविष्याची नादी लागलेले याना कोणताही अनुभव येवो "उधर जानेका" बहाणा ते सहज उत्पन्न्न करतात.

In reply to by चौकटराजा

१०० टक्के सहमत. पेपरातले भविष्य वाचताना माझे धोरण असे असते.वाईट असेल तर भविष्य हा खोटेपणा. चांगलं असेल तर ५ मि. एक सुखांत सिनेमा पहावा आणि विसरुन जावं.

तिकडे अभिनंदन केलेच आहे, इथेही करतो. :) अमोल केळकर

In reply to by अमोल केळकर

युयुत्सु'जी.... आपण आहात तर "हे" राजीव उपाध्ये!!!..... :) आपल्या या लेखामुळे आज सकाळी सकाळी आपण आमचे आणि आमच्या कुटुम्बीयांचे कौतुक शिरोमणि बनलेले आहात!... :) "वैफल्यग्रस्त लोक धैर्य कुठून मिळवणार? अंधश्रद्धा निर्मूलनसमितीच्या ठेल्यावरून की नारळीकरांच्या 'आयुका'मधून ? " ह्या वाक्यासाठी एकदा जोरदार टाळ्या... अत्यंत सणसणीत लेख!!!! :) प्रचंड आवडला....

In reply to by मृगनयनी

आयुका ही वैफल्य ग्रस्तांना धैर्य देण्यासाठी आहे असे काही नाही. तसेच अनिस बाबतही म्हणता येते. वैफल्य-ग्रस्तांनी आपल्या वैफल्याची कारणे शोधावी . कारणा नुसार ऊपाय योजना होते. मनोविज्ञान शास्त्र आता खूप प्रगत झाले आहे. ज्योतिषामुळे वैफल्य जाणार की अधिक वैफल्य पदरी पडणार ? हा ही एक प्रश्न आहेच.

In reply to by तर्री

आयुका काय किन्वा अनिंस काय... कुणालाही धैर्य वगैरे देऊ शकत नाही... ज्योतिष मात्र कमीत कमी "आता सध्या जरी तुम्हाला त्रास असला तरी...पुढचा येणारा काळ मात्र फार चान्गला आहे.." अश्या किन्वा तत्सम गोष्टी / फ्यूचर सांगून एखाद्या वैफल्यग्रस्त माणसाला धीर देऊ शकतात... "बुडत्याला काडीचा आधार" या म्हणीनुसार ज्योतिषशास्त्र किमान एखाद्याची काडीइतकी तरी मदत करू शकते... पण उठसूठ ज्योतिषाला नावे ठेवणार्‍या आयुका किन्वा अंनिस यांच्यामुळे लोकांचं असं काय मोठे कल्याण झाले? कुठल्याही शास्त्रज्ञाच्या दिव्य शोधामुळे किन्वा प्रकाशझोतात लोकांसमोर अन्धश्रद्धानिर्मूलनाचे गोडवे गाणार्‍या आणि प्रत्यक्ष आयुष्यात मात्र धार्मिक कारणे देऊन नवग्रहांच्या अंगठ्या घालणार्‍या अनिस'च्या कार्यकर्त्यांमुळे कोणत्याही वैफल्यग्रस्त माणसाचे आयुष्य सुधारलेले नाही... किन्वा ज्यांना आपले आयुष्य सुधरवायचे आहे अश्या कोणत्याही लोकांनी अनिस किन्वा नारळीकरांचे सल्ले घेतल्या गेल्याचे ऐकीवात नाही. :) ज्योतिष हे शास्त्र असो.. किन्वा नसो.. पण त्याच्या अर्धवट ज्ञानामुळे कुणी आत्माहत्या करत असेल.. तर तो त्याचा मूर्खपणा आहे... पण हे मात्र सत्य की ज्योतिषामुळे अनेक जणांचे आयुष्य आणि संसार वाचलेले आहेत.. कदाचित यापुढेही वाचू शकतील... :)

In reply to by मृगनयनी

"बुडत्याला काडीचा आधार" या म्हणीनुसार ज्योतिषशास्त्र किमान एखाद्याची काडीइतकी तरी मदत करू शकत> हे करण्याचे काम कोणीही सहृद करू शकेल. ज्योतिशीच कशाला पाहिजे. विफलता टाळण्याचे ऊपाय " मानसशास्रात" आहेत. तसे ते "ज्योतिषामध्ये नाहित. अर्थात, मनाच्या आजारांसाठी , मानसोपचाराचा आधार घ्यायचा की ज्योतिषाचा ? हे ज्याचे त्यांनी ठरवायचे. जट आली की शांपू वापरायचा की जोगतीण व्हायचे हा जसा वैयक्तिक प्रश्ण आहे तसाच तो आहे. एवढेच.शेवटचे.

In reply to by तर्री

तर्री'जी... आजही समाजात बहुतांश लोक असे आहेत, की जे कितीही वैफल्यग्रस्त असले तरीही त्यांना स्वतःला मनोरुग्ण म्हणवून घ्यायला आवडत नाही. किम्बहुना ते तसे मानतच नाही. किन्वा बर्‍याचदा असे होते.... की सायकॉलोजिस्टपेक्षा ज्योतिषाला द्यायची दक्षिणा जनसामान्यांना परवडणारी असते. ज्योतिषातही बरेच प्रकार असतात.. जसे कुडमुडे ज्योतिषी, ६५-७० % भविष्य खरे ठरणारे ज्योतिषी (पक्षी: शिकाऊ ज्योतिषी ), नाडीज्योतिषी, सिद्धीप्राप्त ज्योतिषी....... काही ज्योतिषांना म्हणे वाचासिद्धी असते.. उदाह्रणार्थ :- "आदिनाथ साळवी"... साळवी'जींकडे गेलेल्या एखाद्या मनुष्याला त्यांनी त्याच्या दोषपरिहारार्थ एखादा उपाय सांगितला.. तर त्या मनुष्याने तो "केलाच्च्च्च" पाहिजे... नाहीतर त्या मनुष्याच्या आयुष्यात घडणार्‍या वाईट घटनेची शक्यत जवळजवळ ६० % नी वाढते. अर्थात असे खरोखरच अनुभव साळवी'जींकडे जाऊन आलेल्या लोकांना आलेले आहेत. काही लोकांच्या आयुष्यात आदिनाथ साळवींनी पत्रिकेनुसार कथन केलेल्या --घडू शकणार्‍या चांगल्या घटनादेखील तंतोतंत घडत आहेत. आणि हे सगळं ओपनली घडत आहे.. किन्वा यापूर्वीही घडून गेलेलं आहे. त्यामुळे लोकांना आदिनाथ'जींच्या सल्ल्यानुसार आलेल्या अनुभवांमुळे साहजिकच त्यांचा ज्योतिषावर असलेला विश्वास वाढलेला आहे. प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकान्त देसाई यांना बालगंधर्व'च्या वेळेस "आदिनाथ साळवीं"चा आणि त्यांनी सांगितलेल्या उपायांचा प्रचंड फायदा झालेला आहे. आदिनाथ साळवींनी स्वतःच्या पत्नीच्या बाबतीत सांगितलेले भविष्य देखील खरे ठरले... इतकेच कशाला त्यांच्या मुलीच्या जन्माच्या आधीच आदिनाथ'जींनी स्वतःची मुलगी कोणत्या दिवशी, कोणत्या तारखेला किती वाजून किती मिनिटांनी जन्माला येणार... हे देखील लिहून ठेवले होते.. व सर्व नातेवाईकांना सान्गितलेले होते... दरवर्षी आदिनाथ साळवी विश्वकल्याणाच्या उदात्त हेतूने पवित्र वैदिक ब्राह्मणांच्या कडून "नवचंडी होम" करवून घेतात. अत्यंत शास्त्रशुद्ध पद्धतीने आदिनाथ'जी स्वतः सपत्नीक पूजा करतात. यज्ञ, होमहवन, मन्त्रोच्चाराच्या योगेकरून देवीची, आदिशक्तीची भक्तिभावाने पूजा केली जाते. व यज्ञ आणि पूजा पूर्ण झाल्यानन्तर दोन तासाच्या आत हलकाचा पाऊस पडतो. आदिनाथ'जींच्याच म्हणण्यानुसार अर्थात हा "पाऊस" म्हणजे नवचंडीहोम त्या त्या देवतांपर्यन्त पोचल्याची व सफल झाल्याची खूण असते. आणि दरवर्षी या पवित्र नवचन्डीहोमानन्तर असा पाऊस पडतो. आणि तरीही ज्योतिषावर तथाकथित अन्धश्रद्धानिर्मूलन वाल्यांचा विश्वास नसेल.. तर मग हे अनिस वाले व्यक्तिशः "आदिनाथ साळवीं"ना का बरे चॅलेन्ज करत नाहीत? ;) .... की त्यांना कशाची भीती वाटते? की त्यांच्या तथाकथित तत्वांचा पायाच कच्चा आहे? ज्यांचा देव, ज्योतिष वगैरे गोष्टींवर विश्वास नाही.. त्यांनी भले ठेवू नये. पण ज्योतिषामुळे लोक वैफल्यग्रस्त होतात.. अशी विधाने तरी करू नये. किन्वा मग अशी विधाने करताना आधी आजपर्यन्त आपण लोकांचे काय कल्याण केले आहे.. किन्वा समाजाच्या उत्कर्षासाठी मिडीयापासून लाम्ब राहून आणि प्रसिद्धीचा हव्यास न धरता ...स्वतःच्या पोटाला चिमटा आणि खिशाला कात्री लावून काय काय कार्य केले आहे... याचा विचार करावा!

In reply to by मृगनयनी

मृगनयनीजी, आपण दिलेल्या तडफदार प्रतिक्रिया वाचून खालील एक मुलाखत जोडावी असे वाटून देत आहे. ...... विविध नाडीग्रंथ केंद्रवाचकांच्या मुलाखती घेऊन त्यांच्या बद्दलची सामान्य माहिती गोळा करण्याचे काम कार्यशाळा 2011 मधे केले गेले. त्यातील एक मुलाखत भाग ३... उजव्या कोपऱ्यात पहावी. पी बाबुस्वामीचे नाशिकला द्वारका भागात नाडी केंद्र गेले 7-8 वर्षे सुरू आहे. आपल्या कुटुंबासह ते नाशिकात राहतात. अनेक लोकांनी त्यांच्या नाडीकथनातून लाभ घेतला आहे. नाडी वाचक महर्षींच्या कथनातून लोकांच्या समस्या सोडवायला मानसिक आधार देण्याचे काम आनंदाने करतात. श्री श्री रविशंकरांनी आपले स्वतःचे कथन त्यांच्याकडून ऐकले आहे. त्यांच्यासारख्या जगप्रसिद्ध व्यक्तीपासून ते सामान्य लोकांना त्यांच्या कथनाने समस्यापुर्तीचे समाधान लाभले आहे. मी नुसता नाडीग्रंथ वाचक आहे असे न मानता, ज्याअपेक्षेने लोक नाडी महर्षींकडे पहातात त्यामुळे आम्हाला या व्यवसायाचा बाजार करणे मान्य नाही. इतर काय करतात यापेक्षा मी या व्यवसायातील साधन शुचितेचे भान राखतो का याचा सतत विचार करून, ग्राहकाला परतताना आपल्याला समस्येवर काही नविन विचारदिशा मिळाल्याचे समाधान नक्की करून देतो असे त्यांचे म्हणणे आहे. पैकी काही विचार त्यांच्या पुढील भागाच्या टेप मधे आहेत. या टेप मधे त्यांचे बालपण व ते नाडी वाचक कसे झालेचे ही कथन आहे. सत्यनिष्ठ हरिष्चंद्राला ही जीवनात इतक्या यातना का सहन कराव्या लागल्या आदि कथांतून सध्याचे जीवन कितीही निर्मळ असले तरी पुर्वजन्म कृत्ये आपल्याला त्रास देतात. नाडी ग्रंथ तयार करायला या मुळे प्रेरणा मिळाली असावी असे, याचे कथन आहे. पत्नी व बहिण अधुन मधून बोलताना आढळतात. नाडीपट्टीतील मजकूर एका वहीत श्लोकात कसा नोंदला जातो त्याला उद्धेशून ते एके ठिकाणी त्या श्लोकाच्या चार ओळींवर भाष्य करताना अंतादी असे त्या काव्यप्रकाराचे वर्णन करतात. तुटक हिंदीतून जरा लांबलेले असले तरी त्यांचे कथन रसाळ व भावनिक आहे, असे त्यांच्या कथनातून जाणवते.

In reply to by तर्री

"बुडत्याला काडीचा आधार" या म्हणीनुसार ज्योतिषशास्त्र किमान एखाद्याची काडीइतकी तरी मदत करू शकत> हे करण्याचे काम कोणीही सहृद करू शकेल. ज्योतिशीच कशाला पाहिजे. विफलता टाळण्याचे ऊपाय " मानसशास्रात" आहेत. तसे ते "ज्योतिषामध्ये नाहित. आत्महत्या करायला गेलेल्या कामताना विसाव्या मजल्याच्या सेंटरिंग वर उभे राहून काम करणार्‍या रंगार्‍याने परावृत्त केले. तो काय आदिनाथ साळवी होता की अजंता जैन ? खरे तर त्याने काहीच केले नाही. बरा होतो माणूस. वैद्य फक्त औषध देण्याचा धनी. याचे श्रेय कामतानाच. त्यांच्या तील विवेकाच्या एका कोपर्‍याला ! म्हणून म्हणतो मंडळी आत्मारामा सारखा गुरू नाही ... बोला पुंडलिक वरदा .........

In reply to by मृगनयनी

अनिस काय , नारळीकर काय नि अजंता जैन काय हे काय जगन्नियंते लागून गेलेत काय? मी पक्का अनिस वाला आहे. माझ्या आयुष्यात अनेक वाईट माणसानी उच्छाद मांडला , मनस्ताप दिला. पण मी फक्त स्वता: च्या सद्विवेकाला शरण गेलो. ना गुरू ना अनुग्रह ना संप्रदाय , ना शनिवारी माळ , ना उपास तापास , ना प्रार्थना .म्हणून आपणच आपल्याला गुरू म्हणून लाभणे हे अलौकिक भाग्य मला प्राप्त झाले. ब्राह्मणाला जानवे जानवे असले तरी ईसाईच्या नजरेत तो एक फक्त दोरा असतो. म्हणून आत्मारामासारखा गुरू नाही रे जगात , वरून देइ कानशिलात आतून आधाराचा हात !

In reply to by मृगनयनी

अनिस काय , नारळीकर काय नि अजंता जैन काय हे काय जगन्नियंते लागून गेलेत काय? मी पक्का अनिस वाला आहे. माझ्या आयुष्यात अनेक वाईट माणसानी उच्छाद मांडला , मनस्ताप दिला. पण मी फक्त स्वता: च्या सद्विवेकाला शरण गेलो. ना गुरू ना अनुग्रह ना संप्रदाय , ना शनिवारी माळ , ना उपास तापास , ना प्रार्थना .म्हणून आपणच आपल्याला गुरू म्हणून लाभणे हे अलौकिक भाग्य मला प्राप्त झाले. ब्राह्मणाला जानवे जानवे असले तरी ईसाईच्या नजरेत तो एक फक्त दोरा असतो. म्हणून आत्मारामासारखा गुरू नाही रे जगात , वरून देइ कानशिलात आतून आधाराचा हात !

In reply to by मृगनयनी

+१ पण हे मात्र सत्य की ज्योतिषामुळे अनेक जणांचे आयुष्य आणि संसार वाचलेले आहेत.. कदाचित यापुढेही वाचू शकतील... सहमत आहे. कोणी जर डिप्रेशन मध्ये लोकांना आशेचा किरण देऊन जरा मनाला आधार देतात. मला वाटते ज्योतिषशास्त्र हे मनोस्वास्थ्य सांभाळणारे एक मॅनेजमेन्ट टेकनिक आहे.

In reply to by रणजित चितळे

पण हे मात्र सत्य की ज्योतिषामुळे अनेक जणांचे आयुष्य आणि संसार वाचलेले आहेत.. कदाचित यापुढेही वाचू शकतील... सहमत.

In reply to by रणजित चितळे

-१ दुबळ्या मनाच्या लोकांना जोतीष जसा आधार देत, तसच घाबरवतही.. अनेक उदाहरण पाहीलीत अशी.. खरा मुद्दा हा आहे की मनाचा दुबळेपणा दुर करायचा की त्याला गोंजारत बसायच? आणी आशेचा किरण म्हणाल तर तो दाखवणारे जोतीषापेक्षा खुप चांगले मार्ग उपल्ब्ध आहेत.

In reply to by शैलेन्द्र

एकाच प्रकारचे उपाय करुन चालत नाहित. माणसाच्या मानसिक प्रगल्भतेच्या श्रेणी आहेत. त्या त्या मानसिक प्रगल्भतेच्या श्रेणीत, माणूस त्याच्या पुढे येणाऱ्या सगळ्या गोष्टींचे आकलन करून विचार करतो, निष्कर्ष काढतो. समोर येणाऱ्या प्रश्नांना उत्तरं शोधतो. संकटाला तोंड देतो. प्रत्येक मानसिक प्रगतीच्या श्रेणीत त्याचे स्वतःचे मानसिक स्वास्थ्य वाढवायचे ध्येय असते. प्रत्येक श्रेणीत त्याची विचार करण्याची कक्षा ठरलेली असते. तितकीच तो करू शकतो. कधी कधी माणूस कोणत्या लेव्हलला आहे त्यावर उपाय अवलंबून असतात.

In reply to by रणजित चितळे

माणसाच्या "आजाराची" लेव्हलच त्यावरील उपाय ठरवीत असते. एरवी सेल्फ मेडीसिन घातक असले तरी अध्यात्मिक जीवनात ते अमृत आहे. सबब स्वतः चा गुरू विवेकात शोधावा. राम राम अवघे जन म्हणती कोणी न जाणीती आत्माराम !

In reply to by चौकटराजा

आत्मारामासारखा गुरू नाही ही ज्याने त्याने स्वानुभवाने जाणण्याची गोष्ट आहे. आतल्या गुरूशी परिचय होण्यासाठी एखादा बाह्य गुरूची मदत घेत असेल, तर त्याला खजिल करणे, आणि त्यासाठी आत्माराम आत्माराम असा धोशा लावणे पूर्णपणे व्यर्थ आहे. आत्मारामालाच गुरू मान अशी उठसूठ सक्ती करता येत नाही. तसे केल्यास काही उपयोग होणार नाही, कारण आत्मारामालाच गुरू मानण्यासाठीदेखील एक 'लेव्हल' यावी लागते. गुरूतत्व फक्त आतच आहे, आणि ते बाहेर असूच शकत नाही असा आग्रह धरणे देखील पूर्णपणे निराधार आहे. 'अरे अरे ज्ञाना झालासी पावन, तुझे तुज ज्ञान कळो आले, तुझा तुची देव तुझा तूचि भाव, मिटला संदेह अन्यतत्वी' हे अनुभवलेल्या ज्ञानदेवांचेही 'बाह्य गुरू' (निवृत्तीनाथ) होतेच. तेव्हा वैद्य, औषध या सगळ्यांना कवडीमोल ठरवत माझा मीच बरा झालो असे म्हणणार्यानेच सारासार विचार करायला हवा. असो.

In reply to by मूकवाचक

तसे अवघे विश्वच ज्ञानदेवानी गुरू मानले होते. हे त्यांचा दृष्टांताचा आवाका पाहिला की लक्षात येते. आपणही ज्ञानाच्या पातळीवर असे गुरू करीतच असतो. बालादपि सुभाषितं ग्राह्यम.पण परिशीलनाची वेळ आली ही आत्माराम हाच बेस्ट असा माझा तरी अनुभव आहे. बाह्य अध्यात्मिक गुरू वाचून माझे काही अडलेले नाही. माझ्याकडे सुखी माणसाचा सदरा आहे. विपत्ति वाट्याला येउनही ! महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध अध्यात्म गुरू स्वामी स्वरूपानंद नात्याने माझेआते मामा होते. ज्याला दैवदत्त प्रतिकार शक्ती आहे त्याला बाह्य औषधी कमी लागतात .तसेच अध्यात्माचे असेल कदाचित.

In reply to by चौकटराजा

ज्याला दैवदत्त प्रतिकार शक्ती आहे>> दैवदत्त म्हंजे काय हो आजोबा????? नाई, इथे दैववादावरच ( पक्षी= ज्योतिषावर) चर्चा सुरु आहे ना, म्हणून म्हटल, नक्की विचारुन घ्यावे.. :) - ( ठार गोंधळलेली) माउ

In reply to by कवितानागेश

माझा रूढार्थाने देवावर विश्वास नाही पण दैवावर आहे. दैव ही संकल्पना व भविष्य या दोन वेगळ्या आहेत. दैवाचा संबंध भूत, वर्तमान व भविष्य काळ या तिंघांशी ही आहे. दैव या बाबतीत दासबोधातील अधिदैविक हे प्रकरण वाचल्यास बरे. पण ते जाउन द्या. दैव म्हणजे आपण हेतुपूर्वक व अहेतुकपणे जी कर्मे करतो ती सोडून इतरांनी केलेल्या अशाच हेतुपूर्वक वा अहेतुक कर्मांच्या परिणामाचा रिझल्टंट. जन्मतः च सुंदर रूप , आवाज लाभणे यात आपले कर्म काहीच नाही. म्हणून त्याला दैवदत्त म्हणायचे. व्यावहारिक भाषेत सांगायचे तर मी जो दहावीचा अभ्यास करतो ते माझे कर्म व इतर विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचा आवाका हे माझे दैव . तो त्यांचा आवाका कमी पडला तर माझा क्रमांक पहिला नाहीतर दुसरा तिसरा ...... पार शेवटून पाहिला.

In reply to by चौकटराजा

दैव म्हणजे आपण हेतुपूर्वक व अहेतुकपणे जी कर्मे करतो ती सोडून इतरांनी केलेल्या अशाच हेतुपूर्वक वा अहेतुक कर्मांच्या परिणामाचा रिझल्टंट.
भन्नाट व्याख्या. थोडक्यात मी ओवाळले दिवे म्हणजे कर्म, मी ओवाळलेल्या दिव्यांचा पडलेला उजेड म्हणजे कर्माची फलश्रुती आणि दुसर्‍यांनी ओवाळलेल्या दिव्यांचा माझ्यावर पडलेला उजेड म्हणजे दैव. तुमची आधुनिक थेअरी ऑफ कर्मा आवडली बरं. :)

In reply to by कवितानागेश

डॉ.जॉन ड्वायर यांचे इम्युनॉलॉजी वर एक पुस्तक आहे. त्याची अर्पण पत्रिका खालील प्रमाणे त्याचे रुपांतर मराठीत पटकन उढून तो म्हणाला देवा , मी एक चांगले आरोग्यपूर्ण आयुष्य जगण्यासाठी काय करू ? देव हसला व म्हणाला "आपल्या आईवडिलांची निवड काळ्जी पूर्वक कर म्हन्जे झालं " "दैवदत्त "चा अर्थ असा आहे.

In reply to by रणजित चितळे

एकाच प्रकारचे उपाय करा असे मी म्हणत नाही, जोतीष जर कुणाला धीर द्यायच काम करत असेल तर त्यालाही माझा विरोध नाही, पण माझा रोख जोतिषाच्या दुसर्‍या बाजुवर आहे, आज त्रास आहे पण अमुक तारखेनंतर दिवस चांगले येतील हे म्हणण ठीक, पण पुढच्या वर्षी साडेसाती सुरु होतीय, त्रास होइल, अस होइल हे सांगुन दुबळ्या लोकांना घाबरवणे कोणत्या उपायात बसते? थोडक्यात, जोतीष हा लोकांना *त्या बनवायचा धंदा आहे हे माझ वैयक्तीक मत आहे.

In reply to by रणजित चितळे

एकाच प्रकारचे उपाय करा असे मी म्हणत नाही, जोतीष जर कुणाला धीर द्यायच काम करत असेल तर त्यालाही माझा विरोध नाही, पण माझा रोख जोतिषाच्या दुसर्‍या बाजुवर आहे, आज त्रास आहे पण अमुक तारखेनंतर दिवस चांगले येतील हे म्हणण ठीक, पण पुढच्या वर्षी साडेसाती सुरु होतीय, त्रास होइल, अस होइल हे सांगुन दुबळ्या लोकांना घाबरवणे कोणत्या उपायात बसते? थोडक्यात, जोतीष हा लोकांना *त्या बनवायचा धंदा आहे हे माझ वैयक्तीक मत आहे.

ज्योतिष शास्रा वर माझा विश्वास आहे. कारण एका ज्योतिष्याने सांगितलेल्या घटना माझ्या आयुष्यात घडल्या आहेत.

In reply to by गोंधळी

आपल्याला अनुभव आला. की अनेक आले ? मी वरच सांगितले आहे . अनुभव विपरित परिणामी येवो वा सुखद . एकदा घडले की पुढच्या वेळी कावळा बसला की फांदी मोडणारच हा जनरल रूल बनविणे फार सोपे असते. जादूगार रघुवीर म्हणत . मी हे नाणे आता माझ्या उजव्या हातात घेतो की हजारातील किंवा लाखातील एखादाच म्हणतो " ते अजूनही डाव्या हातातच असण्याची ही शक्यता आहे ना !" मानवी मन समांतर विचारधारेचा विचार करण्यात आळशी असते हाच जादुगाराचा फायदा ! "

In reply to by गोंधळी

@ज्योतिष शास्रा वर माझा विश्वास आहे. कारण एका ज्योतिष्याने सांगितलेल्या घटना माझ्या आयुष्यात घडल्या आहेत.>>> अहो...आपल्या आयुष्यात घडणार्‍याच घटना ज्योतिष शास्त्री सांगत असतात... मी टवाळी करित नाही,पण तुंम्ही एक अनुभव घेऊन पहा..तुंम्ही हात/पत्रिका पाहु शकता-असा थोडासा तुमच्या मित्रमंडळींमध्ये बोलबाला करुन पहा... आणी येणार्‍यांचे भविष्य त्यांचं ''इनपुट'' ऐकुन घेऊन सांगायचा प्रयत्न करा ( तत्पुर्वी ज्योतिष सांगायची भाषा/शैली पाहुन शिकुन घ्या..) तुमची दुसर्‍याला सल्ला देण्याची मदत करण्याची तळमळ जितकी अधिक असेल...तेव्हढं तुम्ही सांगितलेलं भविष्यकथन प्रभावी होइल... अहो...अशी मदत आपणच आपल्या कामधामाच्या क्षेत्रातल्या लोकांना करत असतो... तीच ज्योतिषशास्त्रीय भाषेत केली की भविष्यकथन... एखाद्या व्यक्तिच्या आयुष्याचा अंदाज घेऊन त्याला सल्ला देणे,सावध करणे,,,हे हुषारीचे काम आहे...त्यात ज्योतिष-शास्त्राची म्हणुन विशेष अशी कर्तब काहिही नाही

अभिनंदन.....! लेख कै वाचता नै आला पण मिपावरील लेखक मंडळी आपलं मत हिरिरीने मांडत असतात. आणि लेखन दैनिकात छापूनही येतं. सालं आपल्याला मिपाकरांचं लै कौतुक वाटतं. -दिलीप बिरुटे

ज्योतिष शास्त्राला खरे कि खोटे ठरविणार्यांनी आधी स्वताचे लग्न ठरविताना कुंडली पहिली आहे कि नाही हे जरूर आठवावे... ;) ;-) :wink: बाकी युयुत्सु मंजे काय?

In reply to by चेतनकुलकर्णी_85

युयुत्सु हे महाभारतातील एक पात्र, धृतराष्ट्राचा दासीपुत्र. जो महाभारत युद्धाच्या सुरुवातीला पांडवांच्या गोटात सामील झाला.

In reply to by चेतनकुलकर्णी_85

एखाद्याला नसेल बघायची हो, पण पसंत पडलेल्या जोडिदाराकडचे कुनीतरी हटकून "नै नै बघाच", "आमचा विश्वास, आमचा अनुभव" वगैरे इत्कए काही त्रस्त करुन सोडतात , आणि पुन्हा "त्या" पक्षाकडील वजनदारही असतात की झक मारुन इच्छा नसतानाही कित्येकांना, अनेकानेक लोकांना बघावी लागते. आणि त्यांनी असा थेट गंभीर गुन्हा केला की टोचून टोचून बोलत पुन्हा आपल्या प्रतिक्रियांनी ज्योतिषांकडेच ढकलायला लोक तयारच असतात. धाग्यावर प्रतिसाद द्यायचा नव्हता, पण प्रतिसादास उत्तर देणे आवश्यक वाटले.

In reply to by मन१

म्हणजे जर तुम्हाला एखादी पसंद पडली आणि पत्रिका जुळली नाही तर टाटा बाय बाय ?? :O :-O :shock: काय राव असे असते का कुठे? धाग्यावर प्रतिसाद द्यायचा नव्हता, पण प्रतिसादास उत्तर देणे आवश्यक वाटले.

In reply to by चेतनकुलकर्णी_85

काय ते ठाउक नाही. पण "मला पहायची नव्हती पण त्यांच्याकदे कुनीतरी उपताले म्हणून म्हणून पोअहावी लागली", "तशीही जमत होतीच" असे डायलॉग सातत्याने कानावर पडतात. ही के क्याटेगरी. टाटा बाय बाय वाली पण आहे.(तुमच्या प्रतिसादातून फक्त टाटा बाय बाय वालीच आहे असे वाटत होते, म्हणून लिहिण्यास डोकावलो.)

In reply to by चेतनकुलकर्णी_85

म्हणजे जर तुम्हाला एखादी पसंद पडली आणि पत्रिका जुळली नाही तर टाटा बाय बाय ??
अद्याप तुमचे कांदे -पोहे सुरु झालेले दिसत नाहीत. एकदा कांदे पोहे संपले की या आणि अशा इतरही अनेक शंकांचे निरसन होईल. आता ज्योतिषावर विश्वास नसला तरीही हरकत नाही. लग्न जमेपर्यंत तुम्ही पत्रिका कशी पाहावी, गुणमेलन कोष्टक कसे पाहावे, कुंडली ही संगणक प्रणाली कशी वापरावी या विषयांत पारंगत व्हाल. ;)

समजा एखाद्याला हृदयविकारासारखा जीवघेणा रोग आहे. त्याला लांबच्या प्रवासाला जायचे आहे. अशा वेळी तो डॉक्टरकडे तपासणीला न जाता ज्योतिषाकडे हात वा कुंडली दाखवायला गेला. ज्योतिषाने त्याची आकडेमोड करुन सांगितले की खुशाल जा. तुमच्या आयुष्याची रेषा भक्कम आहे. आणि मग प्रवासातील शीणाने तो माणूस मेला तर ज्योतिष ह्या मृत्युची जबाबदारी घेते का? तो ज्योतिषी निष्काळजीपणाची भरपाई देईल का?

In reply to by हुप्प्या

जर डॉक्टरने त्याला माहीत असलेल्या सर्व तपासण्याकरुन प्रवासाला जायला सांगीतले आणी तो माणुस मेला तर डॉक्टर जबाबदारी घेईल? भरपाई देईल? मी ज्योतीषाची बाजु घेल नाही पण तुलना कसताना अपेक्षा सुद्धा दोघांकडुन सारखीच ठेवावी.

In reply to by नेत्रेश

डॉक्टर जबाबदारी घेईल? भरपाई देईल?
डॉक्टरवर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद असते. (कलमं आपली आपण तपासावीत) पुढे?

In reply to by Nile

डॉक्टरचे निदान चुकले या कारणासाठी डॉक्टरवर कोणत्याही कमानुसार कोणतीही कारवाई करता येत नाही. (अक्षम्य निष्काळजीपणा, जाणुन बुजुन चुकीचे औषध देणे, ईत्यादीसाठी खटला दाखल करता येतो. ) तसेच ज्योतीष चुकले म्हणुन ज्योतीषावरही काही कारवाई करता येणार नाही.

In reply to by नेत्रेश

अहो... हे सर्व ठीक समजले तरी डॉक्टरने "खुशाल प्रवासाला जा" म्हणण्यापूर्वी केलेल्या तपासण्या / परीक्षण यांची गुणवत्ता / ऑब्जेक्टिव्हिटी / रीप्रोड्युसिबिलिटी , आणि ज्योतिषाने "खुशाल प्रवासाला जा" म्हणण्यापूर्वी केलेला पडताळा यांची गुणवत्ता / ऑब्जेक्टिव्हिटी /रीप्रोड्युसिबिलिटीयात ढळढळीत फरक वाटत नाही का? कार्डिओग्रामवर प्रत्यक्ष त्या प्रवासेच्छुक व्यक्तीच्या हृदयाचा आलेख आणि कुठेही पुन्हापुन्हा पडताळून पाहता येणारे क्लिनिकल कोरिलेशन (मराठी शब्द येत नाहीये आत्तातरी) याविरुद्ध.. त्या व्यक्तीपासून लाखो मैल दूरचे आणि त्या व्यक्तीवरचा स्पेसिफिक परिणाम मोजता न येणारे ग्रहतारे वगैरे यात काहीच फरक नाही? तात्विक दृष्ट्या सगळंच शक्य आहे हो.. पण आयुष्यात जगताना "सारासार" विवेक म्हणून काही ठेवायचाच नाही का? की तांत्रिक वकिली मुद्दे काढत रहायचे?

In reply to by गवि

अ‍ॅपल आणी ऑरेंज ची तुलना केल्यावर दुसरे काय होणार. मुळात डॉक्टर आणी ज्योतीशाची तुलना करणेच चुकीचे नाही काय?

In reply to by नेत्रेश

आँ.. ? मीही तेच म्हणतोय.. पण इथे तुलना दिसली म्हणून म्हटलं...
डॉक्टरचे निदान चुकले या कारणासाठी डॉक्टरवर कोणत्याही कमानुसार कोणतीही कारवाई करता येत नाही. (अक्षम्य निष्काळजीपणा, जाणुन बुजुन चुकीचे औषध देणे, ईत्यादीसाठी खटला दाखल करता येतो. ) तसेच ज्योतीष चुकले म्हणुन ज्योतीषावरही काही कारवाई करता येणार नाही.
तुलना केली गेलेली नाही म्हणत असाल तर बरंय मग.

आपण ज्योतिषशास्त्राचे काही फायदे आहेत हे क्षणभर मान्य करू. ते तसे प्रत्यक्ष नाहीत हे सहज सिद्ध करता येईल. एक उदा. घेऊ. हे शास्त्र (असेल तर) आपल्याला पांगळे बनवते. सारासार विचार करायची क्षमता नष्ट करते. अडचणींवरचे यांचे उपाय भयंकर असतात. ते माणसाला दुर्बल बनवतात. त्याचे उदाहरण आपण वर कोणीतरी दिलेले आपण बघितलेच. माणूस एकच असतो पण वेगवेगळ्या पद्धतींनी ते सांगितले की आपले भविष्य बदलते हे मला न उलगडणारे कोडे आहे. या शास्त्राचा समाजावर झालेला सगळ्यात घाणेरडा परिणाम आपल्याला पत्रिकेतील मंगळ या ग्रहाने दिसून येतो. या ग्रहाने किती मुलींची लग्ने राहिली हा संशोधनाचा विषय आहे. हा सगळा तद्दन मूर्खपणा आहे यावर आता लोक विश्वास ठेवू लागले आहेत आणि शेवटी आपले प्रश्न आपणच सोडवायचे असतात हे त्यांना पटू लागले आहे. या शास्त्राचे नैसर्गिक मरण फार दूर नाही. पत्रिका पाहून जर सैन्य हालचाली करू लागले, बंदूका चालवू लागले तर जे भविष्य सांगतात त्यांच्या पोरीबाळी त्यांच्या घरात राहतील का ? लोकांच्या काहीवेळा असणार्‍या मनाच्या कमकुवतपणाचा गैरफायदा घेण्याचे हे एक धंदेवाईक शास्त्र आहे. तुमच्या खिशातील पैसे अलगद तुमच्याच संमतीने काढून घ्यायचे हे एक अत्यंत प्रगल्भ शास्त्र आहे. मी स्वतः एकदाही पत्रिका बघितली नाही, माझ्या मुलानेही नाही, व माझ्या मुलीनेही नाही. काहीही बिघडले नाही. जी संकटे आली ती तशीही आलीच असती. आज जगातील सगळ्यात जास्त अनुयायी असणारा धर्म मुसलमान धर्म आहे. यांच्या धर्मात भविष्य पहायला बंदी आहे. कुठे त्यांचे काय बिघडले ? जगावर राज्य केले ते काय पत्रिका बघून ? उलट आपले राजे मुहूर्त/पत्रिका पाहून सैन्य हालवायचे त्याचा परिणाम आपण बाघितलाच आहे. खरे तर आपल्या सगळ्या शंकराचार्यांनी एक सामाजिक कार्य म्हणून हे सगळे थोतांड आहे असे जाहीर करायला पाहिजे. माझी तरूण मित्रांना कळकळीची विन्ंती आहे त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवावा. लाथ मारू तेथे पाणी काढू अशी वृत्ती ठेवावी. कष्ट उपसावेत, बुद्धी चालवावी, कोणाचे वाईट चिंतू नये, कोणाला त्रास होईल असे वागू नये. मग कशाची भिती आणि कशाला चिंता भविष्याची आणि त्या पत्रिकेत काय लिहिले आहे त्याची .......

In reply to by जयंत कुलकर्णी

@माझी तरूण मित्रांना कळकळीची विन्ंती आहे त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवावा. लाथ मारू तेथे पाणी काढू अशी वृत्ती ठेवावी. कष्ट उपसावेत, बुद्धी चालवावी, कोणाचे वाईट चिंतू नये, कोणाला त्रास होईल असे वागू नये. मग कशाची भिती आणि कशाला चिंता भविष्याची आणि त्या पत्रिकेत काय लिहिले आहे त्याची ...>>> अ‍ॅक्सेप्ट सर,,आणी संपुर्ण प्रतिसादास पूर्ण अनुमोदन

In reply to by जयंत कुलकर्णी

कुणाचे वाईट चिंतले नाही तर आपलेही वाईट होणार नाही ही अंधश्रद्धाच नव्हे काय?

In reply to by संपत

नाही... यात चांगले आणि वाईट याच्यातला फरक जो जाणतो त्याने वाईट चिंतू नये व वाईट करू नये एवधाच अर्थ निघतो. मी तसे केले तर माझे ही वाईट होईल असा नाही. असे वाटले की भिती आली मग भविष्य/पत्रिका आल्या.....

In reply to by जयंत कुलकर्णी

चिंतणे व करणे यात काही फरक आहे की नाही. समोरून सुंदर स्त्री आली तर मुका घ्यावा असे वाटणे व तो घेणे यात फरक असतो. पाहिल्यात तोटा तसा काहीच नाही. दुसर्‍यात फायदा इतकाच की ७ सालकी सजा झाल्यावर चिंतना साठी भरपूर वेळ. वाईट करू नये. चिंतण्याने जग चालत नाही त्याचे कृतीत पर्यावसान व्हावेच लागते. धरणात साठलेले पाणी व वहाते पाणी यात हाच फरक आहे. ईच्छा जर घोडा असती तर भिकार्‍यांची त्यावर वस्ती !

In reply to by चौकटराजा

म्हणून पहिले चिंतायचे नाही. जर थोबाडीत बसणार असेल तर ते वाईटच. ते चिंतले नाही तर मग दुसर्‍याचा प्रश्न येत नाही. आपल्या argument मधे contradiction आहे का ? बहुतेक नसेल..

In reply to by जयंत कुलकर्णी

कितीही गप्पा आदर्शाच्या केल्या तरी आपल्या मनाशीच संवाद करावा . आपले काळेपण आपल्याला द्रुग्गोचर होते. आपले मन आपले वैरी. त्याला वैरी हा शब्द वापरला आहे. आजपर्यंत कधीच वाईट मनात आले नाही असे खरेच आपणा आहोत का ? याचा विचार अत्यंतिक निष्ठेने करावयास हवा. माणसाच्या स्खलनशीलतेवर खूप संशोधन झाले आहे. "मनाचा शोधाची सुरस कथा " ही माझी आठवण धोका देत नसेल तर द.पा> खाम्बेटे यानी दीर्घ मालिका लिहिली होती. श्रीराम लागू म्हणतात " इतक्या वर्षांच्या उत्क्रांतीने हे चार पायाचे जनावर आता दोन पायावर चालू लागले आहे "

In reply to by चौकटराजा

बाडीस.. आपण आपल्या मनाशी संवाद करणं किंवा त्यालाच "चिंतणं" म्हणू.. हे आपल्या अस्तित्वाचा एक भाग आहे. तेव्हा अमुक काही "न चिंतणे" ही अशक्य किंवा स्वतःलाच फशीवगंडीव करणारी कल्पना वाटते. संयम फक्त कृतीबाबत असू शकतो.. मनात काय येईल याबाबत नाही.. आणि नसावा.. किंवा आपल्याला तो पर्याय उपलब्ध नाही.

In reply to by जयंत कुलकर्णी

थोतांड किंवा खोट्या गोष्टी जास्त काळ टीकत नाहीत. खोटेपणा लक्षात येताच लोक स्वतःहुनच अशा गोष्टी नाकारतात. मेडीकल हे शास्त्र असुनही सर्व डॉक्टरांचे निदान समान येत नाही. हा अनुभव जवळ जवळ प्रत्येकाने घेतलेला असतो. काही बाबतीत डॉक्टर स्वतःच सेकंड ओपिनीयन घ्यायला सांगतात, तरी सुद्धा आपण मेडीकल हे शास्त्र आहे यावर शंका घेत नाही. जास्तीत जास्त चुकीचे निदान करणार्‍या डॉक्टरला खराब डॉक्टर म्हणुन मोकळे होतो. पण ज्योतीषाच्या बाबतीत मात्र प्रत्येक ज्योतीशाचे प्रत्येक प्रेडीक्शन बरोबर आले पाहीजे अन्यथा ते थोतांड असे ठरउन मोकळे होतो. माणूस १२वी सायन्स नंतर चाचणी परीक्षा पास झाल्यावर ६ वर्षे निश्णात प्राध्यापकांकडे कठीण शीक्षण, प्रात्यक्षीक, रेसीडंसी करुन, युनिव्हरसीटीचे सर्टीफिकेट घेउन मग प्रक्टीस चालु करतात. येवढे असुनही अनेक अर्धशीक्षीत / अशीक्षीत वैदु / बोगस डॉक्टर सर्वत्र आपले दवाखाने टाकुन बसलेले आपण ऐकतो. ज्योतीषी व्हायला ना अशी काही पात्रता लागत, ना कुणाचे सर्टीफीकेट लागत. अशावेळी १ चांगल्या ज्योतीषामागे १०० अर्धशिक्षीत ज्योतीशी असु शकतात. मग ज्योतीषाला बदनाम व्हायला कीती वेळ लागणार? सध्या ज्योतीशाचे प्रशीक्षाण व सर्टीफीकेट कोणतीही युनिव्हर्सीटी देत नसताना चांगले ज्ञानी ज्योतीषी कसे शोधणार? --------------------------- मी स्वतः ज्योतीषी / ज्योतीषाचा समर्थक वगैरे काही नाही. फक्त एखाद्या गोष्टीला सिद्ध व्हायचा / करायचा अवसर न देता थोतांड म्हणणे चुकीचे आहे. येथे कुणी स्वतः १० ते १२ वर्षे पुर्ण वेळ ज्योतीषाचा अभ्यास करुन थोतांड आहे असे सप्रमाण सिद्ध केले आहे का? भारता बाहेरही अनेक देशांत / संस्कृतीत ज्योतीष पाहीले / वर्तवले जाते. प्रगत देशातील बर्‍याच युनिव्हरसीटी मध्ये या (सो कॉल्ड) शास्त्रांचा अभ्यासही होतो. तेथे आपले संपुर्ण जीवन या गोष्टींचा अभ्यास करणारे प्रोफेसर्सही आहेत. आधुनीक शास्त्र / संशोधनात आपल्यापेक्षा २५ ते ५० वर्षे पुढे असलेल्या देशांनीही या पुरातन (सो कॉल्ड) शास्त्रांना अद्याप झिडकारलेले नाही .

In reply to by नेत्रेश

काहीही!!
पण ज्योतीषाच्या बाबतीत मात्र प्रत्येक ज्योतीशाचे प्रत्येक प्रेडीक्शन बरोबर आले पाहीजे अन्यथा ते थोतांड असे ठरउन मोकळे होतो.
कोणत्याही एका जोतिष्याने प्रेडिक्शनचे चॅलेंज सिद्ध करून दाखवाले तरी चालेल. आहे का कोणी?
सध्या ज्योतीशाचे प्रशीक्षाण व सर्टीफीकेट कोणतीही युनिव्हर्सीटी देत नसताना चांगले ज्ञानी ज्योतीषी कसे शोधणार?
=)) =)) मालक जरा झोप वगैरे घेऊन येत जा आधी. युनिवर्सीटीत प्रशिक्षण देण्याकरता "शास्त्राचा" सांगोपांग अभ्यास करावा लागतो म्हणलं. कार्यकारणभाव, मुलभुत तत्वं वगैरे सिद्ध करावी लागतात. आलेत मोठे विज्ञान अन जोतिषाची तुलना करायला.
प्रगत देशातील बर्‍याच युनिव्हरसीटी मध्ये या (सो कॉल्ड) शास्त्रांचा अभ्यासही होतो. तेथे आपले संपुर्ण जीवन या गोष्टींचा अभ्यास करणारे प्रोफेसर्सही आहेत
कोणत्या युनिवर्सीटीतले कोणते प्रोफेसर आहेत हो हे? युगांडात का सोमालियात?
येथे कुणी स्वतः १० ते १२ वर्षे पुर्ण वेळ ज्योतीषाचा अभ्यास करुन थोतांड आहे असे सप्रमाण सिद्ध केले आहे का?
तिच्यायला हे काय नविन? १०-१२ वर्षं अभ्यास केल्यावर काय तपोविद्या मिळते का? काय एकेक तत्तज्ञान असतंय पब्लिकचं! थोतांड आहे हे कळायला दोन तीन तर्क सुद्धा अनेकदा पुरतात. ते सोडा जोतिषामागचं विज्ञान देऊ तर देत कोणाला. मत ते थोतांड आहे का नाही ते सिद्ध कसं करायचं ते पाहू. ज्यांचा विश्वास आहे त्यांनी ते शास्त्र आहे हे दाखवावं, कारण जबाबदारी त्यांची आहे.

In reply to by Nile

अभ्यासाची गोष्ट काढली की पळपुटेपणा करणे हे ज्योतीषावर विना अभ्यास पिंका टाकणार्‍यांचे आणखी एक लक्षण. फिजीक्समधील स्ट्रींग थीयरी, अ‍ॅस्ट्रो फिजीक्समधी ब्लॅकहोल थेअरी २ /३ तर्कात प्रमाण किंवा अप्रमाण करा पाहु. थोडे गुगलुन पाहीलेत तर युरोप / अमेरीकेतील युनिव्हरसीटीतील अशा शास्त्रांचा अभ्यास करणारी डिपार्टमेंटस मिळतील. पण तुमच्या साठी सोमालिया आणी युगाण्डा पुढारलेले / प्रगत देश असतील तर मग बोलणेच खुंटले.

In reply to by नेत्रेश

फिजीक्समधील स्ट्रींग थीयरी, अ‍ॅस्ट्रो फिजीक्समधी ब्लॅकहोल थेअरी २ /३ तर्कात प्रमाण किंवा अप्रमाण करा पाहु.
अं?
तुमच्या साठी सोमालिया आणी युगाण्डा पुढारलेले / प्रगत देश असतील तर मग बोलणेच खुंटले.

In reply to by नेत्रेश

या धाग्याच्या लेखकाने अशाच एका चॅलेंजमधून माघार घेतलेली आहे.... कशाला चॅलेंजच्या गप्पा करायच्या आपण .....

In reply to by जयंत कुलकर्णी

माझे म्हणणे एवढेच की उगीच कुणाचाही दोन तीन तर्कांचा आधारावर आजवर हाजारों / लाखों लोकांनी या क्षेत्रात गेली कित्येक शतके जे काम केले आहे ते निव्वळ थोतांड आहे असे म्हणणे पटत नाही. जर कुणी लायक व्यक्तीने परीश्रमपुर्वक या तथाकथीत शास्त्राचा सखोल अभ्यासकरुन त्यातील थोतांड सिद्ध केले असेल तर मानता येईल. तसेच ते थोतांड का आहे हे सुद्धा समजुन घेता येईल. आणी धागा कर्त्याने कधी कुठल्या चॅलेंजमधुन माघार घेतली होती या वरुन जास्तीत जास्त त्या व्यक्तीचा पळपुटेपणा किंवा त्याचा कच्चा अभ्यास सिद्ध करता येईल. पण ज्योतीष हे थोतांड आहे हे सिद्ध होत नाही.

In reply to by नेत्रेश

@जर कुणी लायक व्यक्तीने परीश्रमपुर्वक या तथाकथीत शास्त्राचा सखोल अभ्यासकरुन त्यातील थोतांड सिद्ध केले असेल तर मानता येईल. तसेच ते थोतांड का आहे हे सुद्धा समजुन घेता येईल.>>> हो ना..? ही भुमिका तुंम्हाला पटते ना..? मग येथिलच एक सदस्य श्री.प्रकाश घाटपांडे(वर/खाली १/२ प्रतिसाद आले आहेत ते..) यांनी आपण म्हणता त्या प्रमाणे अभ्यास करुनच या कथित शास्त्राची निरर्थकता सिद्ध केली आहे... वाचा बर तुंम्ही त्यांच सगळं लेखन...आणी इथेच पुन्हा सांगा बरं... बघु तुंम्हाला तरी हे जमतं का ते..? http://faljyotishachikitsa.blogspot.in/ त्यांच्या सहितही या लिंक्स आहेतच... इथुन जा किंवा तिथुन जा... फक्त समंजसपणाने वाचा म्हणजे झालं.... :-)

In reply to by जयंत कुलकर्णी

कोणाला त्रास होईल असे वागू नये. मग कशाची भिती आणि कशाला चिंता भविष्याची आणि त्या पत्रिकेत काय लिहिले आहे त्याची ....... मन सुद्ध तुझं गोस्ट हाये पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रं गड्या भिति कुनाची पर्वा बी कुनाची