Skip to main content

स्त्री पुरुष समानता म्हणजे काय?

लेखक सोत्रि यांनी मंगळवार, 13/03/2012 04:00 या दिवशी प्रकाशित केले.
स्त्री पुरुष समानता म्हणजे नेमके काय? हा प्रश्न फार दिवसा झाले पडला आहे. अदितीच्या ह्या लेखामुळे त्यावर जरा विचार करून उत्तर शोधून काढावेच असे वाटते. ह्या बाबतीत मला असे वाटते किंबहूना आजवरचे माझे मत असे की पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्री
  • आर्थिकदृष्ट्या परावलंबी असते
  • शिक्षणापासून वंचित राहते
  • सत्तेत किंवा अधिकारामध्ये तिला वाटा नसतो
  • चूल आणि मूल ह्या संकल्पनेत तिला जखडून टाकले गेले असते (हे समाजातील तळागाळापासून एलिट असे सर्व थर गृहीत धरून व्यक्त केलेले मत आहे)
तर, तिला शिक्षण मिळून ती आर्थिकदृष्ट्या स्वाबलंबी होऊन तिला सत्तेत किंवा अधिकारामध्ये वाव मिळायला हवा ही झाली स्त्री मुक्ती आणि त्यासाठी ‘सर्व पातळीवर समान संधी’ मिळणे म्हणजेच शिक्षण, करियर, सत्तेत (अधिकारात) वाटा ह्यामध्ये स्त्री पुरूष असा लिंगभेद न होता समान संधी मिळणे म्हणजे स्त्री पुरुष समानता. त्या अनुषंगाने आंतरजालावर जरा शोध घेतला तर फार काही हाती लागले नाही. खरंच हे जरा विस्मयकारकच होते. पण जे काही थोडे बहुत वाचायला मिळाले, काही चर्चा वाचायला मिळाल्या तेथेही मुळात स्त्री पुरुष समानता म्हणजे काय हेच स्पष्ट नाही. एके ठिकाणी स्त्रिया कुंकू लावतात पुरूष नाही, पुरुषाला फक्त मिस्टर असे संबोधन तर स्त्रियांना मिस आणि मिसेस असे वैवाहिक स्टेटस असलेले संबोधन असे काहीसे मत मांडून समानता आणि (अ)समानता असा उहापोह केला होता. हे वाचून हसू तर आलेच पण कीवही आली. सांख्यिकीच्या आधारे ही समानता मोजण्याचा प्रयत्न वर उल्लेखलेल्या अदिती ह्यांच्या लेखात झाला आहे. ज्या ज्या गोष्टी पुरूष करू शकतात त्या त्या स्त्रियांनी करणे म्हणजे समानता का? किंवा मग तसे नसेल तर निदान ज्या गोष्टी स्त्रिया करू शकतात त्यात त्यांची संख्या पुरुषांएवढी(च) हवी का? म्हणजे कुठल्याश्या सर्वे नुसार जर १०० पुरूष एखादी गोष्ट करतात तर तेथे स्त्रियांची संख्या पण १०० च असायला हवी का आणि तशी असली तर समानता आली का? ही स्त्री पुरुष समानता नेमकी काय हा विचार करता करता ‘दिमाग का दही’ का काय म्हणतात तसे झाले आणि अचानक एक छान लेख वाचायला मिळाला (हिंदीत आहे). ह्यात म्हटले आहे की स्त्री पुरूष हे अर्धनारीश्वर (शीव-पार्वती) असून ते एकमेकांना पूरक आहेत आणि समानता म्हणजे एकमेकांना Complement करणं आणि निर्भेळ सहजीवन अनुभवणं. मला हे एकदम भावले आणि पटले. साधक-बाधक चर्चा होऊन ह्याचे उत्तर इथे मिळेल असे वाटते ब्वॉ.

वाचने 128379
प्रतिक्रिया 247

प्रतिक्रिया

In reply to by स्पा

:bigsmile: :bigsmile: :bigsmile:

In reply to by किचेन

आधि गवि आणि गणपाशी बाडिस होतो. :)
स्त्री पुरुष समानता वगैरे मूर्खपणा आहे.
हे विधान जरा अ‍ॅग्रेसिव्ह वाटते आहे. जशी तुम्ही दुसरी बाजू मांडलीत तसेच मकी, बिका, सन्जोपरावांच्या प्रतिसादांचा विचार करता तो मूर्खपणा आहे असे अजिबात नसावे. - (शहाणा) सोकाजी

In reply to by किचेन

किचेनतै, कुणीतरी दुसरी बाजु घेणं अतिशय गरजेचं होतं, ती घेतल्याबद्दल धन्यवाद. अर्थात तुमच्या व्यवसायामधला अनुभव पाहता या मताला विशेष महत्व आहे हे निश्चित. अर्थात ही दुसरी बाजु मांडताना थोडासा एकटोकीपणा आला आहे, पण चर्चेसाठी ते आवश्यक आहे.

In reply to by ५० फक्त

पन्नासशी-शंभर टक्के सहमत ... :-) @राहिली गोष्ट गर्भवती स्त्रियांची किवा ज्यांच्या कडेवर मुल आहे अशा स्त्रियांची.त्यांना बसायला पुरुष जागा करून देतात...पण स्त्रिया नाही.अनेकदा पुरुषही बस मध्ये तान्हा बाळाला कडेवर घेऊन येतात पण त्यांना कोणी जागा देत नाही.अगदी प्रामाणिकपणे मीही दिली नव्हती.उलट त्यालाच मी घेते बाळाला म्हणून ते बाल पूर्णवेळ माझ्याकडे ठेवाल होत.>>> आणी किच्चुतैच्या या नम्र कथनाला सलाम ---^---

In reply to by किचेन

ताई तुमचे अतिरेकी प्रतिसाद पुर्वीही वाचले आहेत... तरी आपले अमुल्य मत स्त्री भ्रुण हत्या, मुलींची शाळेतुन वरच्या इयत्तांमध्ये होणारी गळती, बलात्काराचे वाढते प्रमाण, हुंडाबळी, घरात निर्णय स्वातंत्र्य नसणे, कंपन्यामध्ये मोठ्या पदांवर नगण्य (०.५ %) इ अनेक " मुर्ख" विषयांवर द्यावे... कसय ना ताई... स्त्री - पुरुष समानता म्हणताना पुरुषांना काही दु:ख नाहीच असं कोणी म्हणत्च नाहीये हो... पण मी वर उल्लेखलेल्या बर्याच गंभीर समस्या स्त्री च्या बाबतीत दिसतात... त्यांच काय? जगात मुर्ख, कजाग, भांड्खोर बाई आणि वरील समस्या समजु शकणारे पुरुष नाहीतच असं कोणी म्हणलच नाहीये.. पण स्त्री म्हणुन भेडसावणार्या समस्या सहन करणार्या बायका आणि त्याची जाणिव अजिबात नसणारे पुरुष थोडे जास्त आहेत हो...
मुलींना मोफत शिक्षण आणि मुलांना?
मुलगी म्हणजे खर्च असं सोप्प समीकरण लावुन मुलींना अगदी पुरुन टाकणारे, कचर्यात टाकणारे पालक आहेत हे तुम्हाला माहित नाही काय? असे लोक मुलींवर शिक्षणाचा खर्च करतील का?? ~`^
जेव्हा लग्नाची वेळ येते तेव्हा नोकरी नसलेल्या किवा अगदी टुकार पगार असलेल्या मुलींची देखील मुलाला तिच्याहून दहापट अधिक पगार हवा असतो
किती ते जनरलाय्जेशन?? किती मुलं आपल्या पेक्षा जास्त पगार असणार्या मुलीला स्विकारायला तयार असतात? किती पालक असे आहेत जे "मुलगी लग्ना नंतर नोकरी सोडणार नाही" असं ठणकावुन सांगु शकतात? किती मुलिंना वडिल खरच १/२ हिस्सा देतात मालमत्तेतला? किती मुली बुद्धी असुन परवानगी नाही म्हणुन शिकत नाहित??
बसमध्ये काय गरज आरक्षण करण्याची?
मासिक धर्म ज्यात अनेक मुली बराच त्रास सहन करतात.. अशा वेळी गर्दी मध्ये पुरुषांचे स्पर्श आणि धक्के सहन करण्या पेक्षा त्यांना हकाची जागा मिळु नये का?? तुमच्या महिती साठी मी कधीही जागे साठी भांडत नाही आणि गरजु पुरुषाला जागाही करुन देते...
हि समानता वगैरे फक्त मूर्खपणा आहे.आम्ही नौ महिने पोटात बाल ठेवतो.आणि डिलीवरी पेन सहन करतो म्हणून आम्ही खूप महान हे सांगण्याचा हा एक स्टुपिड मार्ग आहे.
खर तर तुमच्या ह्या वाक्या नंतर प्रतिक्रिया देण्याची इच्छा मेली होती....

In reply to by पिलीयन रायडर

भ्रुण हत्या, मुलींची शाळेतुन वरच्या इयत्तांमध्ये होणारी गळती, बलात्काराचे वाढते प्रमाण, हुंडाबळी, घरात निर्णय स्वातंत्र्य नसणे, कंपन्यामध्ये मोठ्या पदांवर नगण्य (०.५ %)
किती मुलिंना वडिल खरच १/२ हिस्सा देतात मालमत्तेतला? किती मुली बुद्धी असुन परवानगी नाही म्हणुन शिकत नाहित??
स्त्री-पुरुष समानतेच्या चर्चेत विषमता म्हणजे खरोखर काय हे सांगणारा एकमेव प्रतिसाद. वरचे मुद्दे सोडून उंची, बसमध्ये जागा, पेताडगिरी वगैरे मुद्दे मांडलेले पाहून गंमत वाटली.

In reply to by पिलीयन रायडर

पिलीयन रायडर यांच्याशी +१ ताई तुमचे अतिरेकी प्रतिसाद पुर्वीही वाचले आहेत.. याला तर एक्सक्लुसिव +१. आणि खरचं आपले अमुल्य मत स्त्री भ्रुण हत्या, मुलींची शाळेतुन वरच्या इयत्तांमध्ये होणारी गळती, बलात्काराचे वाढते प्रमाण, हुंडाबळी याविषयी द्यावे. वाचायला आवडेल.

In reply to by पिलीयन रायडर

१.सरकारने गर्भलिंग चाचणीवर बंदी घालूनही गर्भलिंग निदान केले जाते आणि त्यात अनेक मुलींचा बळी जातो हि अतिशय लांच्छनास्पद गोष्ट आहे. २.वरच्या इयत्तांमध्ये होणारी गळती हि ग्रामीण भागात जास्त असते.ग्रामीण भागात मुळातच पुस्तक वाचल्यान पोट भरणार नाहीये हे तत्वाद्यान असत.अनेक शाळांमध्ये मुलं आणि मुली फक्त हजेरीलाच असतात.नंतर हळूच पळून जाऊन मुल, मुली गुर राखायला, शेतीच्या कामाला घरच्यांना मदत करतात.त्यामुळे मुलांचही शिक्षण थांबत आणि मुलींचाही. ३.शहरांमध्ये आर्थिक परिस्थिती साधारण असलेल्या घरात मुलगी शिकली तर तिला उच्चशिक्षित आणि चांगल्या पगाराचा नवरा मिळेल या अपेक्षेने शिकवले जाते.(हेही नसे थोडके.) परिस्थिती चांगली असेल तर मुलीला तिच्या आवडीच्या खेत्रात करिअर करण्याची पूर्ण मुभा असते. ४. एखाद्या घरातील जेव्हा करता माणूस हरोपतो तेव्हा घर चालवण्याची जबाबदारी त्या घरातील मुलावर येऊन पडते.मग तो थोरला असो कि धाकटा.अनेकांना आपल शिक्षण अर्धवट सोडून जे मिळेल ते काम करून पोटापाण्याची सोय करावी लागते.पण असे भाऊ मात्र बहिणींना शिक्षणासाठी फुल सपोर्ट करतात. ५. मोठ्या पदांची स्वप्न सगळेच बघतात.पण संधी त्यांनाच मिळते ज्यांच्याकडे गुणवत्ता असते.जर हि चर्चा स्त्र पुरुष समानतेवर चालू असेल तर गुणवत्तेचे निकष हे दोघांकरिता एकचं हवेत.जर तुमच्यात गुणवत्ता, निर्णय घेण्याची क्षमता आणि त्या पोजिशन साठी लागणार न्यान असेल तर तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही. प्रत्येकवेळेस मुलांकडे वंशाचा दिवा म्हणून बघितले जात नाही.जसा जसा मुलगा मोठा होतो तसं तसं ह्या वंशाच्या दिव्यच रुपांतर म्हतार्पांच्या काठीत होत.बहिणीची लग्न झाली कि मुलगा हा आई बाबांचा एकमेव आधार असतो.मग कधी मोतीबिंदू,कधी हिअरिंग एड , डायबेटीस, दवाखाने सगळ्या गोष्टींमध्ये मुलगा आई वडिलांची सेवा करतो. हे जाणीवपूर्वक लोक का विसरतात?दवाखान्याची बिल लाखांमध्ये येतात.त्यामध्ये मुली का ५०-५० करत नाही?वाटणीच्या वेळेस येतात मात्र ५०% पाहिजे म्हणत. बसमध्ये उभ्या/बसलेल्या प्रत्येक बाईला मासिक धर्म असतोच का हो?एखादे वृध्द आजोबा जर उभे असतील तर तुम्ही त्यांना बसायला जागा करून द्याल कि स्वतःचा मासिक धर्म साम्बालात बसाल?बर हाच मासिक धर्माचं कौतुक करत बसलात तर उच्चपदस्थ व्हायची स्वप्न कधीच प्रत्यक्षात येणार नाहीत.ह्या चार दिवसात घरी बाजूला बसवलं तर तो अन्याय आणि बसमध्ये बसूला बसण्यासाठी तर आम्ही सदा रेडी असतो. (मी कराटे खेळायचे.आणि ह्यामध्ये माझा मासिक धर्म कधीही मध्ये आला नाही.माझाच नाही तर माझ्याबारोर्च्या इतर मुलींनाही कधी मासिक धर्म म्हण्जे कटकट वगैरे वाटला नाही.) शेवटी काय समानता हवी असेल मी स्त्री आहे हे बाजूला ठेवून मी एक माणूस आहे अस बोलायला शिकलं पाहिजे.

In reply to by पिलीयन रायडर

१.सरकारने गर्भलिंग चाचणीवर बंदी घालूनही गर्भलिंग निदान केले जाते आणि त्यात अनेक मुलींचा बळी जातो हि अतिशय लांच्छनास्पद गोष्ट आहे. २.वरच्या इयत्तांमध्ये होणारी गळती हि ग्रामीण भागात जास्त असते.ग्रामीण भागात मुळातच पुस्तक वाचल्यान पोट भरणार नाहीये हे तत्वाद्यान असत.अनेक शाळांमध्ये मुलं आणि मुली फक्त हजेरीलाच असतात.नंतर हळूच पळून जाऊन मुल, मुली गुर राखायला, शेतीच्या कामाला घरच्यांना मदत करतात.त्यामुळे मुलांचही शिक्षण थांबत आणि मुलींचाही. ३.शहरांमध्ये आर्थिक परिस्थिती साधारण असलेल्या घरात मुलगी शिकली तर तिला उच्चशिक्षित आणि चांगल्या पगाराचा नवरा मिळेल या अपेक्षेने शिकवले जाते.(हेही नसे थोडके.) परिस्थिती चांगली असेल तर मुलीला तिच्या आवडीच्या खेत्रात करिअर करण्याची पूर्ण मुभा असते. ४. एखाद्या घरातील जेव्हा करता माणूस हरोपतो तेव्हा घर चालवण्याची जबाबदारी त्या घरातील मुलावर येऊन पडते.मग तो थोरला असो कि धाकटा.अनेकांना आपल शिक्षण अर्धवट सोडून जे मिळेल ते काम करून पोटापाण्याची सोय करावी लागते.पण असे भाऊ मात्र बहिणींना शिक्षणासाठी फुल सपोर्ट करतात. ५. मोठ्या पदांची स्वप्न सगळेच बघतात.पण संधी त्यांनाच मिळते ज्यांच्याकडे गुणवत्ता असते.जर हि चर्चा स्त्र पुरुष समानतेवर चालू असेल तर गुणवत्तेचे निकष हे दोघांकरिता एकचं हवेत.जर तुमच्यात गुणवत्ता, निर्णय घेण्याची क्षमता आणि त्या पोजिशन साठी लागणार न्यान असेल तर तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही. प्रत्येकवेळेस मुलांकडे वंशाचा दिवा म्हणून बघितले जात नाही.जसा जसा मुलगा मोठा होतो तसं तसं ह्या वंशाच्या दिव्यच रुपांतर म्हतार्पांच्या काठीत होत.बहिणीची लग्न झाली कि मुलगा हा आई बाबांचा एकमेव आधार असतो.मग कधी मोतीबिंदू,कधी हिअरिंग एड , डायबेटीस, दवाखाने सगळ्या गोष्टींमध्ये मुलगा आई वडिलांची सेवा करतो. हे जाणीवपूर्वक लोक का विसरतात?दवाखान्याची बिल लाखांमध्ये येतात.त्यामध्ये मुली का ५०-५० करत नाही?वाटणीच्या वेळेस येतात मात्र ५०% पाहिजे म्हणत. बसमध्ये उभ्या/बसलेल्या प्रत्येक बाईला मासिक धर्म असतोच का हो?एखादे वृध्द आजोबा जर उभे असतील तर तुम्ही त्यांना बसायला जागा करून द्याल कि स्वतःचा मासिक धर्म साम्बालात बसाल?बर हाच मासिक धर्माचं कौतुक करत बसलात तर उच्चपदस्थ व्हायची स्वप्न कधीच प्रत्यक्षात येणार नाहीत.ह्या चार दिवसात घरी बाजूला बसवलं तर तो अन्याय आणि बसमध्ये बसूला बसण्यासाठी तर आम्ही सदा रेडी असतो. (मी कराटे खेळायचे.आणि ह्यामध्ये माझा मासिक धर्म कधीही मध्ये आला नाही.माझाच नाही तर माझ्याबारोर्च्या इतर मुलींनाही कधी मासिक धर्म म्हण्जे कटकट वगैरे वाटला नाही.) शेवटी काय समानता हवी असेल मी स्त्री आहे हे बाजूला ठेवून मी एक माणूस आहे अस बोलायला शिकलं पाहिजे.

In reply to by किचेन

कधीपासून याच मुद्द्यांवर लिहायचे होते, पण ...... फक्त एकच टिप्पणी करतेय... अनेक घरांमधून दिसणारी गोष्ट आहे. जेंव्हा एखाद्या घरात मुलीला 'परकी' होनार म्हणून कमीपणाची वागणूक आणि मुलाला मात्र 'आपला सांभाळ' करणार म्हणून 'प्रेमाची' वागणूक मिळते तेंव्हा तिथे दोन्हीकडेही 'अर्थकारण'च असते. मुलाला काही 'निरपेक्ष प्रेम' वगरै मिळालेले नसते. त्याच्यापुढची आव्हाने वेगळी असतात. थोडक्यात मुलीला डायरेक्ट एरंडेल आणि मुलाला मात्र शुगर कोटेड जुलाबाची गोळी इतकाच फरक असतो! मूळ मुद्दा हा आहे, की माणसे प्रेमाची, वात्सल्याची नैसर्गिक अंतःप्रेरणा विसरून अती-भौतिक होतात, तेंव्हा वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन हे असे तट पडतात.

In reply to by किचेन

किचेन ताई तुमची मते चांगलीच जहाल आहेत.
शहरांमध्ये आर्थिक परिस्थिती साधारण असलेल्या घरात मुलगी शिकली तर तिला उच्चशिक्षित आणि चांगल्या पगाराचा नवरा मिळेल या अपेक्षेने शिकवले जाते.(हेही नसे थोडके.) परिस्थिती चांगली असेल तर मुलीला तिच्या आवडीच्या खेत्रात करिअर करण्याची पूर्ण मुभा असते.
करिअर करण्याची मुभा असते, म्हणजे तो त्यांचा हक्क नसतो का?
एखाद्या घरातील जेव्हा करता माणूस हरोपतो तेव्हा घर चालवण्याची जबाबदारी त्या घरातील मुलावर येऊन पडते.मग तो थोरला असो कि धाकटा.अनेकांना आपल शिक्षण अर्धवट सोडून जे मिळेल ते काम करून पोटापाण्याची सोय करावी लागते.पण असे भाऊ मात्र बहिणींना शिक्षणासाठी फुल सपोर्ट करतात.
माझ्या पहाण्यात अशी काही उदाहरणे आहेत की बहीणीने स्वतः अविवाहीत राहून घर सावरले. जेव्हा घरावर एखादी आपत्ती येते तेव्हा घरातील प्रत्येकजण आपापल्या परीने त्याचा मुकाबला करतात. त्यात मुलगा, मुलगी असा भेद नसतो.
मोठ्या पदांची स्वप्न सगळेच बघतात.पण संधी त्यांनाच मिळते ज्यांच्याकडे गुणवत्ता असते.जर हि चर्चा स्त्र पुरुष समानतेवर चालू असेल तर गुणवत्तेचे निकष हे दोघांकरिता एकचं हवेत.जर तुमच्यात गुणवत्ता, निर्णय घेण्याची क्षमता आणि त्या पोजिशन साठी लागणार न्यान असेल तर तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही.
हे जरी खरे असले तरी तडजोड करायची वेळ आली तर ती स्त्रीलाच करावी लागते.
प्रत्येकवेळेस मुलांकडे वंशाचा दिवा म्हणून बघितले जात नाही.जसा जसा मुलगा मोठा होतो तसं तसं ह्या वंशाच्या दिव्यच रुपांतर म्हतार्पांच्या काठीत होत.बहिणीची लग्न झाली कि मुलगा हा आई बाबांचा एकमेव आधार असतो.मग कधी मोतीबिंदू,कधी हिअरिंग एड , डायबेटीस, दवाखाने सगळ्या गोष्टींमध्ये मुलगा आई वडिलांची सेवा करतो. हे जाणीवपूर्वक लोक का विसरतात?दवाखान्याची बिल लाखांमध्ये येतात.त्यामध्ये मुली का ५०-५० करत नाही?वाटणीच्या वेळेस येतात मात्र ५०% पाहिजे म्हणत.
या मुद्द्याचा तुम्हीच विचार करा. म्हणजे त्यातला विरोधाभास कळेल. मुलीचे लग्न झाले की तिचा माहेरशी संबध कारणपरत्वे असतो. तसेच मुलीच्या सासरी आई वडिल सारखे सारखे जाऊ शकत नाही कारण लगेच त्यांना "लेकीकडे जाईन, तुपरोटी खाईन, धष्ट पुष्ट होईन ..." इत्यदि कथा + टोमणे ऐकवले जातात. पण हेच आईवडिल स्वतःच्या मुलाकडून आणि सुनेकडून फक्त सेवा घेत नाहीत तर त्याच्या संसाराला सर्वोतोपरी मदत करतात. काही लेकुरवाळे आजीआजोबा माझ्या माहीतीमधे आहेत जे आपले वय, दुखणी विसरून नातवंडांचे संगोपन करतात, घरच्या सर्व जबाबदार्‍या पार पाडतात. आणि निवृत्तीच्या वयात देखील घरातील कामे करत नाही म्हणून मुलाची आणि सुनेची बोलणी (काही जण) ऐकून घेतात. मुलीप्रमाणेच मुलाच्याही शिक्षणाला, लग्नाला खर्च येतोच. मग त्या मुलाने आईवडिलांसाठी काही केले तर त्याची एव्हढी जाहिरात करण्याचे काय कारण ? राहता राहीला प्रश्न ५०-५० करण्याचा. बहीणीने मागीतले तर तिला लालची म्हणता, आणि त्याच भावाच्या पत्नीने तिच्या वडिलांच्या संपत्तीतून मागीतले तर तो मात्र तिचा हक्क?
(मी कराटे खेळायचे.आणि ह्यामध्ये माझा मासिक धर्म कधीही मध्ये आला नाही.माझाच नाही तर माझ्याबारोर्च्या इतर मुलींनाही कधी मासिक धर्म म्हण्जे कटकट वगैरे वाटला नाही.)
असा मुद्दा मांडताना तुम्ही फक्त स्वतःचा विचार करता आहात. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात हे तुम्हाला सांगायला हवे असे नाही. तुम्हाला त्रास झाला नाही/होत नाही म्हणजे इतरांना तो होत नसेलच असे नाही ना? आणि या व्यतिरिक्त इतरही कारणे आहेत. गर्दीमधे ,प्रवास करताना स्त्रियांना (भारतात) अनेक त्रास होतात. त्याचा अगदी शब्दशः उल्लेख करायची जरूरी नाही. त्यामुळे अशा तर्‍हेचे आरक्षण जर स्त्रियांसाठी असेल तर ते योग्यच आहे. फक्त यात स्त्रियांनी थोडे तारतम्य दाखवायला हवे. प्रत्येक ठिकाणी केवळ अधिकार गाजवू नये.
शेवटी काय समानता हवी असेल मी स्त्री आहे हे बाजूला ठेवून मी एक माणूस आहे अस बोलायला शिकलं पाहिजे.
हे लाखमोलाचे वाक्य आहे. पण हे फक्त स्त्रियांनी बोलून उपयोगी नाही तर पुरूषाना देखीत ते कळले पाहिजे.

In reply to by मनीषा

किचेन ताई तुमची मते चांगलीच जहाल आहेत. +१००, आणि ती व्यावसायिक अनुभवातुन आलेली आहेत, त्यामुळे जास्त महत्वाची. (संदर्भ. मा. किचेनतैंचे प्रोफाईल) शहरांमध्ये आर्थिक परिस्थिती साधारण असलेल्या घरात मुलगी शिकली तर तिला उच्चशिक्षित आणि चांगल्या पगाराचा नवरा मिळेल या अपेक्षेने शिकवले जाते.(हेही नसे थोडके.) परिस्थिती चांगली असेल तर मुलीला तिच्या आवडीच्या खेत्रात करिअर करण्याची पूर्ण मुभा असते. करिअर करण्याची मुभा असते, म्हणजे तो त्यांचा हक्क नसतो का? - प्रश्न विचारताना एक अतिशय महत्वाचा शब्द गाळलात तुम्ही ' आवडीच्या' , हेच मुलांबद्दल ही होते. - घराची परिस्थिती सांभाळण्यासाठी करियर करणे आणि आवडीच्या क्षेत्रात करीयर करणे यात फरक आहे, मनुष्यजन्म एकदाच मिळतो अशी माझी तरी समजुन आहे. एखाद्या घरातील जेव्हा करता माणूस हरोपतो तेव्हा घर चालवण्याची जबाबदारी त्या घरातील मुलावर येऊन पडते.मग तो थोरला असो कि धाकटा.अनेकांना आपल शिक्षण अर्धवट सोडून जे मिळेल ते काम करून पोटापाण्याची सोय करावी लागते.पण असे भाऊ मात्र बहिणींना शिक्षणासाठी फुल सपोर्ट करतात. माझ्या पहाण्यात अशी काही उदाहरणे आहेत की बहीणीने स्वतः अविवाहीत राहून घर सावरले. जेव्हा घरावर एखादी आपत्ती येते तेव्हा घरातील प्रत्येकजण आपापल्या परीने त्याचा मुकाबला करतात. त्यात मुलगा, मुलगी असा भेद नसतो. मोठ्या पदांची स्वप्न सगळेच बघतात.पण संधी त्यांनाच मिळते ज्यांच्याकडे गुणवत्ता असते.जर हि चर्चा स्त्र पुरुष समानतेवर चालू असेल तर गुणवत्तेचे निकष हे दोघांकरिता एकचं हवेत.जर तुमच्यात गुणवत्ता, निर्णय घेण्याची क्षमता आणि त्या पोजिशन साठी लागणार न्यान असेल तर तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही. हे जरी खरे असले तरी तडजोड करायची वेळ आली तर ती स्त्रीलाच करावी लागते. - आता आपल्या क्षेत्रात मोठ्या पदावर जाण्यासाठी पुरुषांना काय तडजोडी कराव्या लागतात यावर एक लेख लिहावा लागेल असं वाटतंय. प्रत्येकवेळेस ...करण्याचे काय कारण ?(बराच भाग गाळला आहे, उगा मेगाबायटी प्रतिसाद व्हायला नको) राहता राहीला प्रश्न ५०-५० करण्याचा. बहीणीने मागीतले तर तिला लालची म्हणता, आणि त्याच भावाच्या पत्नीने तिच्या वडिलांच्या संपत्तीतून मागीतले तर तो मात्र तिचा हक्क? - मुलगी, सासर, माहेर, पगार आणि खर्च यावर एक वेगळी चर्चा इथं झाली आहे आधी. आणि वर लिमाउजेटनी लिहिलंय तसं, या समानतेच्या ओढाताणीत 'थोडक्यात मुलीला डायरेक्ट एरंडेल आणि मुलाला मात्र शुगर कोटेड जुलाबाची गोळी इतकाच फरक असतो! - हे आपण विसरुनच जातो. मूळ मुद्दा हा आहे, की माणसे प्रेमाची, वात्सल्याची नैसर्गिक अंतःप्रेरणा विसरून अती-भौतिक होतात, तेंव्हा वेगवेगळ्या मुद्द्यांवरुन हे असे तट पडतात.' + १००००

In reply to by ५० फक्त

किचेन ताई तुमची मते चांगलीच जहाल आहेत. +१००, आणि ती व्यावसायिक अनुभवातुन आलेली आहेत, त्यामुळे जास्त महत्वाची. (संदर्भ. मा. किचेनतैंचे प्रोफाईल)
विवाह जुळवण्याच्या व्यवसाय ....... ...... ........ !!! असो. २. माझा आक्षेप मुभा म्हणजे परवानगी या शब्दाला होता. तिने आवडीच्या किंवा कुठल्याही क्षेत्रात काम करावे की न करावे या साठी तिला इतरांची परवानगी कशासाठी हवी. मनुष्यजन्म एकदाच मिळतो अशी माझी देखील समजूत आहे. पण हे ही माहीती आहे की प्रत्येकाला आपल्याला हवं तेच करायला मिळते असे नाही. पण त्यातही स्त्रियांना करायला लागणार्‍या तडजोडीचे प्रमाण खूपच जास्त आहे. ३..... ४.
आता आपल्या क्षेत्रात मोठ्या पदावर जाण्यासाठी पुरुषांना काय तडजोडी कराव्या लागतात यावर एक लेख लिहावा लागेल असं वाटतंय.
मी व्यावसायिक तडजोडीबद्दल बोलत नाहीये. ५०-जी ... तुम्ही माझीच वाक्ये तुमच्या प्रतिसादात कॉपी-पेस्ट केली आहेत. आणि त्यावर तुमची मते फारच संक्षिप्त दिली आहेत. नीटसे काही कळले नाही, की तुम्हाला नक्की म्हणायचे काय आहे?

In reply to by मनीषा

>>५०-जी ... तुमची मते फारच संक्षिप्त दिली आहेत. नीटसे काही कळले नाही, की तुम्हाला नक्की म्हणायचे काय आहे?>> +१ प्रतिसादावरून तुम्हाला काय म्हणायचे आहे ते खरचं कळत नाहिये. थोडे विस्कटून सांगाल का.

In reply to by मनीषा

१. मी तर म्हणतो, निदान मुलींना परवानगी मागावी लागते म्हणजे एक पर्याय उपलब्ध तरी आहे, एक जर - तर चं स्टेटमेंट तरी आहे, पण मुलांना हा पर्यायच नाही, शिक्षण झालं की लगेच किंवा ते अर्धवट सोडुन सुद्धा संसाराची, मग तो कुणाचाही असो, कारण रुढार्थानं लग्न झाल्याशिवाय स्वताचा संसार नसतो, मग वडिलांने जे काही निर्माण करुन ठेवलं आहे, मग ती मुलं असोत किंवा कर्ज याची जबाबदारी घ्यावीच लागते, हा अन्याय नाही का ? एखादी गोष्ट करायची किंवा करायची नाही हा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य नसणं हा अन्यायच ना ? मुलीनं नोकरी नाही केली तर घरकाम करेल अन लग्न करुन जाईल तिच्या घरी हा राजमार्ग आहे, पण मुलाला हा / किंवा असा कोणताही पर्याय उपलब्धच नाही असं का ? २. मी व्यावसायिक तडजोडीबद्दल बोलत नाहीये. - मग सासरच्या घरात जी काही मोठी पदं असतात ती एकतर वय वाढल्यानं मिळतात किंवा घरातल्या जबाबदा-या व्यवस्थित पार पाडल्यानं मिळतात, उगा लग्न करुन सासरी आलात की त्या घरातलं सगळ्यात महत्वाचं पद, अधिकाराचं पद, निर्णय घेणारं पद मला लगेच मिळावं हा अट्टाहास कशासाठी ? आणि कराव्या लागल्या यासाठी तडजोडी तर काय हरकत आहे ? मागच्याच आठवड्यातले उदाहरण, सासु नोकरी करु देत नाही म्हणुन सुनेने आयब्रो करण्याच्या निमित्ताने तिचा खुन केला, केली तडजोड खुन करुन तुरुंगात जाण्याच?, आता तुरुंगातुन नोकरी करायला जाउ देत नाहीत म्हणुन जेलरचा खुन करणार ? मा. पिलियन रायडर यांचे 'माझ्या मते विवाह हे तर स्त्री -शोषणाचे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.. ' हे मत, विमे म्हणतात तसं ' ते एक केवळ blanket स्टेटमेंट आहे , जसं की माजलेली विवाहसंस्था वगैरे ' की याबाबत काही अनुभव आहे, हे समजले म्हणजे त्यावर पुढे चर्चा करता येईल. याबाबत विमेंशी सहमत.

In reply to by ५० फक्त

किचेन ताई तुमची मते चांगलीच जहाल आहेत. +१००, आणि ती व्यावसायिक अनुभवातुन आलेली आहेत, त्यामुळे जास्त महत्वाची. (संदर्भ. मा. किचेनतैंचे प्रोफाईल)
हे वाक्य बर्‍याचदा वाचलय म्हणुन... ह्याच ताईनी मागे एकदा "ईंजिनिअर" मुलींबद्दल पण मत व्यक्त केले होते.. आता तेव्हा आमच्या सारख्या "पुरुष्प्रधान" मेकॅनिकल मध्ये काम करणार्या मुलींनी मत मांडले होते तेव्हा नाही कुणि आमचे प्रोफाईल ग्रुहित धरले... उलट, माझ्या मते विवाह हे तर स्त्री -शोषणाचे सर्वात मोठे व्यासपीठ आहे.. किचेन ह्यांना जास्त जाणीव हवी...आणि बोलण्याचे तारतम्य सुद्धा.... (दुवा: ताईंची शब्दकमले: मुर्खपणा..स्टुपिडिटि...)

In reply to by पिलीयन रायडर

पिलियन ताई मीही इंजीनियाच आहे .हा व्यवसाय सुरु करण्याआधी मी एका कंपनीमध्ये तपासणी अभियंता होते.पूर्ण कंपनीत एकटीच मुलगी.पण मला कुठेही मुल माझी टिंगल करतायत किवा मदत करत नाही, दुय्यम लेखतात, एकात पडतात असा अनुभव आला नाही.त्यामुळेच मी पुरुषांच्या विरोधात नाही.तिथेच मुलगा होण्याचे तोटे कळायला सुरुवात झाली.नंतर वधू वर सूचक केंद्रात आणखीन अनेक तोटे कळले.निदान आठवड्यातून एकदा तरी देवाला मी मुलगा नाही म्हणून धन्यवाद बोलायचे.

In reply to by किचेन

पिलियन ताई मीही इंजीनियाच आहे .हा व्यवसाय सुरु करण्याआधी मी एका कंपनीमध्ये तपासणी अभियंता होते.पूर्ण कंपनीत एकटीच मुलगी.पण मला कुठेही मुल माझी टिंगल करतायत किवा मदत करत नाही, दुय्यम लेखतात, एकात पडतात असा अनुभव आला नाही.त्यामुळेच मी पुरुषांच्या विरोधात नाही.तिथेच मुलगा होण्याचे तोटे कळायला सुरुवात झाली.नंतर वधू वर सूचक केंद्रात आणखीन अनेक तोटे कळले.निदान आठवड्यातून एकदा तरी देवाला मी मुलगा नाही म्हणून धन्यवाद बोलायचे. अग काय हे किचन तै ? मी सुद्धा एका कंपनीमध्ये तपासणी अभियंता आहे ,मागे ही तु एकदा असच म्हणाली होती एका धाग्यावर की, म्याकेनिकल फिल्ड मधल्या मुलीना "अप्रन " घालायची लाज वाटते,हाताला ऑइल ,ग्रीस,बर , लागुन हात खराब होउ नयेत म्हनुन मुली फार काळजी घेतात वैगेरे वैगेर ..... मला एक कळत नाही ति एक स्त्री असौन नेहमी विरोधी पार्टीची च का साइड घेते ? तुला मुलाचीच बाजु नेहमी योग्य वाट्ते अग जशी परिस्थिती तसे प्रत्येकाचे वेगवेगळॅ अनुभव असतात ,समस्त स्त्री - पुरुषाना एकाच पारड्यात कस तोलणार? केवळ मुलगा आहे म्हणुण तो आपल्या आइ-वडिलाची म्हातरपणाची काठी आहे अन तो शेवट्पर्यन्त साम्भाळेल याची काहीच शाश्वती नाही ,उलट एका घरात राहुन सुद्धा म्हातार्या आइच्या सुष्रुसेसाठी कामवाली बाइ ठॅवलेली मी रोज पाहते आहे ,त्या उलट वडील नाहित अन तीनही बहिणी आहेत म्हणूण नोकरी करणार्या ,अन घर साम्भाळ्नार्या मुलीही मी रोज पाहते " स्त्री - पुरुष समानता वैगेरे वैगेर कोणत्या मापद्ण्डाने तोलन्याची मुळात गरजच काय ? प्रत्येकाचे आयुष्य हे वेगवेगळ अण अनुभव वेगवेगळॅ जगण्याची धड्पड वेगवेगळि , इथे समाजातल्या काही वर्गाला दोन वेळ्च्या जेवणाची भ्रान्त पड्ली आहे ,असे वर्गातले स्त्री - पुरुष कसलाही भेदभाव अथवा समानता न ठॅवता कम्बर कसुन काम करतात हे रोज पाहतोच की आपण :) " एकुणच काय प्रत्येकाचे जगण्याचे निकष हे ज्या त्या कुटुम्बाच्या (आर्थिक्,सामाजिक,भावनिक)परिस्थीतीवर अवलम्बुन असतात स्त्री-पुरुष समानतेवर अथवा भिन्नतेवर नाही :) अजुन काय बोलणार या मुद्द्यावर? असो........

In reply to by पियुशा

मी जेव्हा तपासणी अभियंता म्हणून काम करत होते तेव्हा मुलांनी मला खरच खूप मदत केली.जेव्हा जड जोब वरच्या मजल्यावर न्यायचे असायचे तेव्हा मुल मला मदत करायची.मीही त्यांना .आमचे सगळ्यांचेच कपडे ग्रीस आणि धूळ वगैरेनी भरलेले असायचे.हात धुवायला आमच्या कंपनीत रीन साबण वापरायचे.पण कोणाची तक्रार नव्हती.ती सुरु झाली ती दुसरी एक मुलगी आल्यावर.याव उचलणार नाही, त्याला हात लावणार नाही,रीन्ने हात धुणार नाही,तुझा जोब तू ने कि वर मी का तुला मदत करू? वगैरे सुरु झाल,मी फक्त टेबलवर पी सी बी तपासणार अस सुरु झाल..साहजिकच जी मुल तिला मदत करत होती त्यांनी तिला मदत करण्यात फार उत्साह दाखवला नाही.तिने वारीस्थांकडे जाऊन फक्त टेबलवर काम करण्याची परवानगी मागितली.ती तिला मिळाली हि.कारण ती मुलगी होती. पिलियन तै, पियुषा ततुम्हि दोघि इंजिनियर आहात.तुझ्याबरोबर काम करण्यार्या ,तुझ्या वयाच्या मुलांबरोबर तू एकदा स्वतःला कमपेअर करून बघ.तुझ्या मित्रांपैकी एक असेल तर उत्तमच.निदान आपले वडील, किवा भाऊ, नवरा, दीर यांच्या बरोबर पण स्वतःला कम्पेअर कर. माझी खात्री आहे त्यानंतर तूला जाणीव होईल कि पुरुषाचा जन्म सोपा नाही. मी आधी बोलल्याप्रमाणे निदान एकदा तरी पुरुषाच्या चपलेत पाय घालून बघा.जेवढ वाटत तेवढ सोप नाहीये. मी स्त्री आहे म्हणून मी स्त्रियांचीच बाजू घेतली पाहिजे ..ये बात कूच हजम नही हुई.आणि जेव्हा दिसतंय कि पुरुषांनाही अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतंय, अशा अडचणी ज्या माझ्यावर आल्या तर मी किवा आपल्यापैकी अनेक स्त्रिया त्यांना तोंड देण्याऐवजी तोंड फिरवून निघून जाईल, तेव्हा मी स्त्रियांचीच बाजू घेईल अशी अपेक्षा का?

In reply to by किचेन

पिलियन तै, पियुषा ततुम्हि दोघि इंजिनियर आहात.तुझ्याबरोबर काम करण्यार्या ,तुझ्या वयाच्या मुलांबरोबर तू एकदा स्वतःला कमपेअर करून बघ.तुझ्या मित्रांपैकी एक असेल तर उत्तमच. अस्स असेल तर मग मी त्या मुलापेक्षा नक्कीच १०० % आउट पूट देत असेल निश्चित एक सान्गते आमच्याकडे १०० % इन्स्पेक्शन आहे नो एक्स्क्युज , तरीही मुल जॉब चेक करण्यात जो आळशीपणा दाखव्तात तो मी रोजच पाहते आहे भलेही तो माझा मित्र का असेना :)

In reply to by पिलीयन रायडर

उलट, माझ्या मते विवाह हे तर स्त्री -शोषणाचे सर्वात मोठे व्यासपीठ आहे
बाकीचे मुद्दे राहूदेत, त्यावर बरीच चर्चा झाली आहे. या तुमच्या मौलिक मतावर अजून जाणून घेणे आवडेल. एक धागाच काढा ना तुम्ही. स्वगत :- टोकाची मते मांडून आपण आपलीच गोची करतो हे लोकांच्या का लक्षात येत नाही ??

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

हे कसं चुक ते तुम्ही का नाही पटवुन देत? प्रतिवाद तुम्ही करताय म्हणुन विचारलं.

In reply to by शिल्पा ब

यात प्रतिवाद कुठे दिसला तुम्हाला ?? मुळात प्रतिवाद करायला त्यांनी "वाद" कुठे केलाय. मुद्दे मांडलेच नाहीत या बाबतीत. ते एक केवळ blanket स्टेटमेंट आहे. अशा प्रत्येक blanket स्टेटमेंटचा प्रतिवाद करायला वेळ/शक्ती/कुवत/इच्छा/हौस नाही माझ्याकडे. त्यांना त्यांचे मुद्दे सप्रमाण मांडू देत, मग बोलू ...

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

एवढं माझ्या मताला मौलीक वगैरे म्हणल्य बद्दल धन्यवाद... कसय ना काका/दादा... (मला तुमचे वय माहीत नाही) मुलगी जन्मली की पहिला विचार काय असतो... आता हिच्या लग्नाचे पैसे?? मुलगी वयात आली की दाखवण्याचे कार्यक्रम्..त्यात मुलीला नकाराचा दुय्यम अधिकार... तिला बघितलं जाणार ते रंग्-रुप ह्या वरुन.. तिने नोकरी करायची की नाहि हे पण मुलगा ठरवणार.. तिला घरकाम आलं पाहिजे ( काही ठिकाणी चालुन दाखव..सुइत दोरा ओवुन दाखव..हे प्रकार पण होतात).. काळ्या मुलीम्ची तर वाट लागते ह्या प्रकारात.. सतत नकार पचवुन ह्या मुली निराश झालेल्या असतात... आप्ल्याकडे सर्व साधारणपणे लग्न मुलीकडचे करुन देतात.. वर पुन्हा हुंडा (लाखात), सोनं (तोळे -किलोत), जमल्यास फ्लॅट, गाडी वगैरे मुली कडचे मुलाला देतात... किमान लग्न तरी लावुन देतातच.. त्यात मग मान्-पान आलंच.. मान हा वरपक्षाला असतो.. ते जे म्हणतील ते आणि तसं होतं.. लग्ना नंतर पण भरपुर काही नाटकं असतात्..पहिला सण.. बाळांतपण.. सगळं काही मुलीचा बाप करतो..प्रत्येक वेळेस आहेर... कधी कधी पैशाची मागणी सुरुच रहाते.. त्यातुन मग मारहाण्..जाळुन टाकणे.. दुसरे लग्न लावण्याची धमकी... सासुरवास.. मुलगी लग्न करते..आपलं घर -नाव सगळं मागे सोडते.. बापचा पैसा सासरी आणते.. "म्हातार पणाची काठी आणि वंशाचा दिवा" बनु शकत नाही.. म्हण्जे माहेरी तिचा काय "फायदा"?? उलट आई-वडिल जन्माची मानहानी आणि खर्च ह्या एका लग्नात पहातात.. आता मला सांगा काय चुकीचं लिहिला मी?? हे सगळे प्रकार नसते तर झाल्या असत्या मुली नकोशा?? आता असं म्हणु नका की मुलींनिच हिम्मत दाखवली पाहिजे नाही तर काही होउ शकत नाही... ज्या मुली शिकतात्..ज्यांच्या घरात वर सांगितलेली परिस्थिती नसते त्या मुलिंच्या बाबतीत हे होतंच नाही हो... त्या होउ देतच नाहित.. पण एखाद्या खेड्यातल्या बिहार्,राजस्थान मधल्या मुलीला फार अवघड आहे हे चक्र मोडणं... अणि हो.. एका मोठ्या प्रतिसादातिल वाक्ये चिवडुन चिवडुन एका ओळीला पकडुन प्रतिसाद देण्या पेक्षा तुमचा स्वतःच म्हणण काय हे ह्या सगळ्या विषयावर हे जाणुन घ्यायला आवडेल.. या धाग्यावर कुठे दिले असल्यास लिंक द्यावी...

In reply to by पिलीयन रायडर

कसय ना काका/दादा...
ते आजोबा आहेत.
(मला तुमचे वय माहीत नाही)
वय काही का असेना! ;-) बाकी पर्ल, पिलीयन राईडर, मनीषा इत्यांदींचे चांगला प्रतिवाद केल्याबद्दल अभिनंदन. (पण इथे बरेच पालथे घडे आहेत हे लक्षात असू द्या हा प्रेमळ सल्ला!) ;-) बाकी चालू द्या. (पालथा टँकर)

In reply to by Nile

(पण इथे बरेच पालथे घडे आहेत हे लक्षात असू द्या हा प्रेमळ सल्ला!)
म्हणुन तर नुकताच एका घड्याला रामराम ठोकलाय..!!!

In reply to by मनीषा

(मी कराटे खेळायचे.आणि ह्यामध्ये माझा मासिक धर्म कधीही मध्ये आला नाही.माझाच नाही तर माझ्याबारोर्च्या इतर मुलींनाही कधी मासिक धर्म म्हण्जे कटकट वगैरे वाटला नाही.) असा मुद्दा मांडताना तुम्ही फक्त स्वतःचा विचार करता आहात. व्यक्ती तितक्या प्रकृती असतात हे तुम्हाला सांगायला हवे असे नाही. तुम्हाला त्रास झाला नाही/होत नाही म्हणजे इतरांना तो होत नसेलच असे नाही ना? आणि या व्यतिरिक्त इतरही कारणे आहेत. गर्दीमधे ,प्रवास करताना स्त्रियांना (भारतात) अनेक त्रास होतात. त्याचा अगदी शब्दशः उल्लेख करायची जरूरी नाही. त्यामुळे अशा तर्‍हेचे आरक्षण जर स्त्रियांसाठी असेल तर ते योग्यच आहे. फक्त यात स्त्रियांनी थोडे तारतम्य दाखवायला हवे. प्रत्येक ठिकाणी केवळ अधिकार गाजवू नये.
अगदी बरोबर, माझ्या शाळेत ह्या काळात "कबड्डी " खेळणार्या मुली होत्या तशाच ४ दिवसा पैकी २ दिवस सुट्टीची परवानगी असणार्‍या सुद्धा.. त्यांची केवळ ह्या त्रासासाठी ट्रीटमेंट घेत होत्या, पण पुढे त्यांना नोकरीत प्रवास करवा लागायचा तेव्हा रडकुंडीला यायच्या बिचार्या... दर महिन्याला हिच कहाणी... माझी एक बहीण ह्या दिवसात गडाबडा लोळायची म्हणे.. आणि बसमधील भयंकर अनुभवा नंतर मी एका मोठ्या कॉलेजला प्रवेश घ्ययचाय नाही म्हणजे प्रवास टळेल ह्या विचारापर्यंत आले होते..

In reply to by किचेन

१.सरकारने गर्भलिंग चाचणीवर बंदी घालूनही गर्भलिंग निदान केले जाते आणि त्यात अनेक मुलींचा बळी जातो हि अतिशय लांच्छनास्पद गोष्ट आहे.
बर मग?? ह्याला असमानता म्हणायचं की नाही?? तुमच्या लक्षात येतंय का, इथेच सगळी सुरवात झालीये? म्हणजे कसय ना ताई... बस मधली जागा ह्या पेक्षा ह्या मुद्द्यवर जास्त बोलायला हव होतत तुम्ही... तुमची जहाल आणि विस्त्रुत मतं आवडली असती वाचायला...
२.वरच्या इयत्तांमध्ये होणारी गळती हि ग्रामीण भागात जास्त असते.ग्रामीण भागात मुळातच पुस्तक वाचल्यान पोट भरणार नाहीये हे तत्वाद्यान असत.अनेक शाळांमध्ये मुलं आणि मुली फक्त हजेरीलाच असतात.नंतर हळूच पळून जाऊन मुल, मुली गुर राखायला, शेतीच्या कामाला घरच्यांना मदत करतात.त्यामुळे मुलांचही शिक्षण थांबत आणि मुलींचाही.
अभ्यास वाढवा... तुमचं जर हे मत असेल की याही बाबतीत मुला-मुलिंना समान निकष आहेत तर कमाल आहे.. तेही ग्रामीण भागात? इथे शहरात माझी कामवाली बाई १० वीत मुलीच लग्न लावुन देते का तर डोक्याला ताप नको आणि मुलाला मात्र परवडत नसुन इंग्लिश मिडियम मध्ये घालते.. तर तुम्ही काय सांगताय... ती पोरगी पण पुढे धुणि-भांडी करणार.. आणि हो, ग्रामीण भाग म्हणजे फक्त गुरं हाकायला जातात का लोक?? मग सरपंच इ खुप पैसा असणार्‍या घरी स्त्रिया एक्दम खुप शिकत असतील ना? त्यांची काही १६-१८व्या वर्षी लग्न होत नसतील.. आणि नोकरी पण करत असतील त्या... (राजकारणा बद्दल तर बोलुच नका.. कारण कुणाच्या हातात 'खरी' सत्त असते हे सगळ्यांना माहित आहे.
३.शहरांमध्ये आर्थिक परिस्थिती साधारण असलेल्या घरात मुलगी शिकली तर तिला उच्चशिक्षित आणि चांगल्या पगाराचा नवरा मिळेल या अपेक्षेने शिकवले जाते.(हेही नसे थोडके.) परिस्थिती चांगली असेल तर मुलीला तिच्या आवडीच्या खेत्रात करिअर करण्याची पूर्ण मुभा असते.
समजा घरात परिस्थिति वाईट आहे, एक मुलगा आणि एक मुलगी आहे... कुणाला शिकवतात हो?? आणि मुलींच्या लग्नाचा आणि शिक्षणाचा संबध काय?? एखद्या मुलीला नुसतंच शिकायच असेल तर? लग्न नको असेल तर..सौदा घाट्यात का??
४. एखाद्या घरातील जेव्हा करता माणूस हरोपतो तेव्हा घर चालवण्याची जबाबदारी त्या घरातील मुलावर येऊन पडते.मग तो थोरला असो कि धाकटा.अनेकांना आपल शिक्षण अर्धवट सोडून जे मिळेल ते काम करून पोटापाण्याची सोय करावी लागते.पण असे भाऊ मात्र बहिणींना शिक्षणासाठी फुल सपोर्ट करतात.
भले शाब्बास... वर तर लिहिलय की मुलीला चांगल्या नवर्‍याच्या अपेक्षेने शिक्वायच.. तिला "हे काही तुझं घर नाहि" , " लग्ना नंतर आई-वडिल मुलीच्या घरच पाणी पण पित नाहीत" असले फलतु विचार शिकवायचे.. आणि मग म्हणायच की 'तु थोडिच आमचा आधार होणारेस"... ।याच..असल्याच गलिच्छ मानसिकतेतुन मुलिंना गर्भात मारतात, त्यांना शिकु देत नाहीत, संपत्तीमध्ये वाटाही देत नाहीत, इकडे सासरी काडिचीही सत्ता नाही..दिलेला हुंडा -सोनं पहायला पण मिळत नाही.. काहो, जर मुलीला शिकवलं आणि समानतेने वागवलं तर त्या आई वडिलांना सांभाळ्णार नाहीत??? तुम्ही स्वतःच लग्न थांबवुन भावाच शिक्षण करणार्‍या बहीणी पाहिल्या नाहिएत?? (मी पाहिल्यात..) मला बहीणच आहे.. भाउ नाही.. मग अता आमच्या आइ-वडिलांच काय?? हे असले दरिद्री विचार माझ्या आई वडीलांनी केले असते तर जन्मलो असतो का आम्हि? नाही तर ढिग भर बहीणी नंतर एक "वंशाचा दिवा" उगवला असता आमच्याही घरात... आज माझ्या आई -वडीलानी मला शिकवलं आणि मुलगी म्हणुन बिनकामचे विचार माझ्या डोक्यात भरले नाहीत, म्हणुन मी त्यांनी अपेक्षा न ठेवता पण मी त्यांना सांभाळान्याच्या पुर्ण तयारीत आहे..
५. मोठ्या पदांची स्वप्न सगळेच बघतात.पण संधी त्यांनाच मिळते ज्यांच्याकडे गुणवत्ता असते.जर हि चर्चा स्त्र पुरुष समानतेवर चालू असेल तर गुणवत्तेचे निकष हे दोघांकरिता एकचं हवेत.जर तुमच्यात गुणवत्ता, निर्णय घेण्याची क्षमता आणि त्या पोजिशन साठी लागणार न्यान असेल तर तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही.
तर मग नाहिये का बायकां मध्ये "गुणवत्ता, निर्णय घेण्याची क्षमता आणि त्या पोजिशन साठी लागणार न्यान"??? ताई, शिकुच दिलं नाही तर येणार कुठुन? नोकरी करुच दिली नाही तर पोझिशन मिळणार कुठुन? आपल्या घरासठी खुप तडजोड करतात बायका... नोकरी मध्ये आधी घराला प्राधान्य देतात..कारण मुख्य हे असतं की " सामान्यतः" नवरा हे करत नाहि .... मी आधीही तुम्हला दिलेल्या प्रतिसादात लिहिलं होतं, परत लिहिते... पुरुषांना दु:ख नाहीत, ते जवाबदारी पार पाडत नाहीत, ते स्तियांवर फक्त अन्याय करतात असं नाहीये.. पण त्यांच्या दःखापेक्षा "बाई म्हणुन असणारी दःख" खुप जास्त आणि खुप मोठी आहेत... तुम्ही 'स्टुपिडीटी' अशा उथळ शब्दात त्याची वासलात लावलीत... नक्कीच परिस्थिति अशी नाहीये.. मुलगा "म्हातार पणाची काठी, वंशाचा दिवा" तरी असतो.. त्या स्वर्था साठी तरी तो जन्मला येतो...मुलगी जन्मायच्या आधी पासुन्च "ओझं" असते.. तिलाही आवडेल ना "म्हातार पणाची काठी, वंशाचा दिवा" बनायला..पण ती संधी सुद्धा मिळत नाही... देउन बघा.. सोनं असतात मुली... (एका ८० वर्षाच्या खेड्यातल्या आजोबांनी माझ्या बाबांना विचारलं होतं की तुम्हला किती मुलं?.. बाबा म्हणाले "दोन मुली".. मी "मुलीच? मुलगा नाहि????" ह्या वाक्याची तयारी ठेवली होती...तर आजोबा म्हणाले "सुखी आहात... मुलगीच प्रेमानी सांभाळते... तिला माया असते ना" ) आणि हो.. एवढ्या मोठ्या प्रतिसादा नंतर सुद्धा " स्त्री-पुरुष समानता " हा मुर्खपणा आहे असं आपलं मत आहे की नाही हे नीटस कळालं नाहि... म्हणजे भ्रुणहत्या, बलत्कार, हूंडाबळि असं काही नाहिचे का?? की त्यलाही पॅरेलल पुरुषांचे त्रास सांगणार अता?

In reply to by किचेन

बहिणीची लग्न झाली कि मुलगा हा आई बाबांचा एकमेव आधार असतो.मग कधी मोतीबिंदू,कधी हिअरिंग एड , डायबेटीस, दवाखाने सगळ्या गोष्टींमध्ये मुलगा आई वडिलांची सेवा करतो. हे जाणीवपूर्वक लोक का विसरतात?दवाखान्याची बिल लाखांमध्ये येतात.त्यामध्ये मुली का ५०-५० करत नाही?वाटणीच्या वेळेस येतात मात्र ५०% पाहिजे म्हणत.
ह्या साठी स्पेशल प्रतिसाद... म्हणजे एकंदरीत काय... मुलगी जन्मु द्यायची नाही... जन्मलीच तर मुलींना जास्त शिकवायचे नाही... परत "हे घर तुझे नाही" असं बिंबवायच... मुलगा हाच आमचा आधार असं मानायच... तिचं लग्न करताना "नोकरी करणार नाही" अशा अटी मुलीच्या वतीने स्वतःच मान्य करायच्या... हुंडा-सोनं द्यायचं आणि "हाच तुझा संपत्तीतील वाटा" असं म्हणायचं.. तिकडे नवर्याकडे तर आनंदी-आनंद... नोकरी नाही.. सत्ता नाही... स्वतःचा असा पैसा नाहिच हातात तर कुठुन म्हणायचं भावाला "५०-५०" % खर्च करते??????? आणि अशा घरात जेव्हा मुली ५०|% वाटा मागतात तेव्हा शक्यतो सासरचा दबाव असतो... आता..ज्या घरात मुली शिकतात... तुमच्या-आमच्या सारख्या.... का हो..तुम्ही नाही करणार भावाला मदत खर्चात?? मी तर नक्कीच केली असती.. (मला भाउच नाहीये..त्यामुळे सगळाच मी करते) आणि अता त्या मुली ज्या नोकरी करत असुन मदत करत नाहीत पण वाटा मागतात... असं तर बरीच मुलं पण करतात.. आई-वडिलांकडे बघतही नाहीत आणि वाटा मिळावा म्हणून भांडत बसतात.. परत एकदा.. हा "व्यक्तीसापेक्ष" मुद्दा आहे.. "लिंगसापेक्ष" नाही....

In reply to by पिलीयन रायडर

प्रतिसादांचि शंभरी गाठेल एवढं मटेरिअल आहे तुमच्याकडे.एखादा धागा का नाहि काढत?

In reply to by किचेन

१०० काय हो १००० गाठेल एवढं मटेरिअल आहे माझ्यकडे.. पण असो... प्रत्येक ठिकाणीच चांगली /वाईट कशी का असेना पण प्रसिद्धी मिळवण्याचे प्रयत्न करणारे लोक असतात.. आम्ही group discussion मध्ये हाच फंडा वापरायचो.. सर्वांच साधारणपणे जे मत असेल त्याच्या अगदी विरुद्ध मत द्ययचो.. त्यामुळे १ Vs सगळे अशी स्थिती व्हायची आणि निवड पक्की... पण तिथे आम्हला खुप अभ्यास करुन मत द्यावे लागयचे कारण त्याला फाडुन खाणारे १० लोक समोर असायचे.. तुमचंही हेच चाललं आहे..पण फक्त उथळ पणे वर वर विचार करुन... अन्यथा " स्टुपिडिटी" असले शब्द निघाले नसते.. माझ्या एवढ्या मोठ्या प्रतिसादाला तुमची एवढी एक्च ओळ?? तुमचा अभास कळला... हूंडाबळी, भ्रुण्हत्या असल्या गंभीर विषयांना मारलेली टांग सांगुन जाते काय ते... बस मधील जागा, म्हातार पणाची काठी असल्या मुद्द्यां पलीकडे काही असेल बोलण्यासरखं तर ऐकायला आवडेल अन्यथा राहु द्या... तशीही मला तुमच्या कडुन फार अपेक्षा नाही... इथे भर्पुर मुली सक्षम पणे आपले मत मांडत आहेत... तुमच्या सारख्या एकीचे विचार तेही एकांगी... सहज ओलांडुन पुढे जाता येइल... माझ्या मते मी तुम्हाला माझा भर्पुर वेळ आणि संधी दिली होती... पण तुमच्या कडे मुद्द्द्लात "मटेरिअल " नाही हे लक्षात आल्याने तुमच्याशी बोलण्याची माझी इच्छा नाही... धन्यवाद...

In reply to by किचेन

किचेन ताई, मस्त प्रतिसाद आहे. यातले काही मुद्दे आधी असे अधोरेखित झाले नव्हते (माझ्यापुरते बोलत आहे).
शेवटी काय समानता हवी असेल मी स्त्री आहे हे बाजूला ठेवून मी एक माणूस आहे अस बोलायला शिकलं पाहिजे.
लाख रु की बात कही है !!!
मी कराटे खेळायचे
point noted.... आजपासून मस्करी बंद.. ए सगळ्यांनी नोंद घ्या रे ;-) (मी वेगळ्याच प्रतिसादाला उत्तर देत आहे. पण माझा प्रतिसाद चुकीच्या ठिकाणी येत आहे. तांत्रिक मंडळाने लक्ष द्यावे.)

In reply to by किचेन

किचेनताई, तुमची एकूणच सगळी मतं पाहता तुम्हाला अभ्यास वाढवण्याची गरज आहे असं सांगावसं वाटत आहे. आपण आपल्या भोवतीची(च फक्त), चार (सोयीस्कर) उदाहरणं पहायची. त्यावरून काहितरी निष्कर्ष काढायचा. असा एकूण प्रकार वाटतो. त्यामागे ओपन माइंड ठेवून चर्चा करण्याची बिलकूल तयारी दिसत नाहिये. (तसे नसते तर बलात्कार, हुंडाबळी, स्त्रीला घराबाहेर पडताना वाटणारी आणि दिवसेंदिवस वाढत जाणारी असुरक्षितता याबद्दल तुम्ही मौन पाळले नसते.) आणि तुमच्याकडे रोजचे वर्तमानपत्र अजिबात येत नसावे असा अंदाज आहे :-) रात्री बेरात्री कामावरून परततानाचा बस, लोकल, ट्रेन ने प्रवास करणारी स्त्री सुरक्षित आहे का?. इतकच काय कंपनीच्याही कॅबने प्रवास करणं सुरक्षित राहिलं आहे का. आणि जीव गेला तरच फक्त त्रास होतो असं नाहिये हो. येता-जाता सार्वजनिक ठिकाणी (संधी मिळताच) स्त्रीला (कमेंट पास करणे, लगट करणे, ..............इत्यादी) अनेक प्रकारचे त्रास (केवळ स्त्री असल्याने) सहन करावे लागतात त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचे आहे. >>१.सरकारने गर्भलिंग चाचणीवर बंदी घालूनही गर्भलिंग निदान केले जाते आणि त्यात अनेक मुलींचा बळी जातो हि अतिशय लांच्छनास्पद गोष्ट आहे.>> बसं. संपल?? तुमच्या लेखी एवढीच सिविअ‍ॅरिटी आहे या गोष्टीची. हे इतक साधं, सरळ, सोपं नाहिये. जाऊ दे परत रिपिट नाही करत. http://www.misalpav.com/node/20997#comment-380517 हे वाचा. आणि या प्रश्नांची उत्तर द्या अशी विनंती आहे. १)स्त्री आणि पुरूष दोघांना समाजात समान (सारखचं) स्थान असेल, तर ज्यांना असे वाटते त्यांनी स्त्री-भ्रूण हत्येचे रूट-कॉज अ‍ॅनालिसिस करावे आणि का लोकांना मुली नकोशा झाल्या आहेत ती कारणे स्पष्ट करावीत आणि त्यावर काय उपाय करता येतील सुचवावेत. २)अगदी भ्रूणहत्या तर लांब राहिली, मुलगी झाली की ज्यांना मुलगी झाली आहे ते माता-पिता, बाळाचे आजी-आजोबा, नातेवाईक यासगळ्यांच्या मनात काय भावना येते?, पहिली प्रतिक्रिया काय असते?, ते खूष होतात का दु:ख्खी होतात?. जर समान स्थान असतं तर का वाईट वाटलं असतं लोकांना. [याला अपवाद असतात. नाही असं मी म्हणत नाही. पण %चा विचार करा.] मुलगी झाली की लोकांना वाईट का वाटतं? किंवा का वाईट वाटत असेल याचा विचार करा. याचाही रूट-कॉज अ‍ॅनालिसिस करा ना. काय कारण आहेत? ती दूर करणं आवश्यक आहे की नाही. >>२.वरच्या इयत्तांमध्ये होणारी गळती>> या विषयावर माझा जास्त अभ्यास नाहिये. म्हणून तूर्तास मुद्दा बाजूला ठेवत आहे. >>३.शहरांमध्ये आर्थिक परिस्थिती साधारण असलेल्या घरात मुलगी शिकली तर तिला उच्चशिक्षित आणि चांगल्या पगाराचा नवरा मिळेल या अपेक्षेने शिकवले जाते.(हेही नसे थोडके.) परिस्थिती चांगली असेल तर मुलीला तिच्या आवडीच्या खेत्रात करिअर करण्याची पूर्ण मुभा असते.>> असं सरसकट विधानं करणं चुकीचं आहे. >>४. एखाद्या घरातील जेव्हा करता माणूस हरोपतो तेव्हा घर चालवण्याची जबाबदारी त्या घरातील मुलावर येऊन पडते.मग तो थोरला असो कि धाकटा.अनेकांना आपल शिक्षण अर्धवट सोडून जे मिळेल ते काम करून पोटापाण्याची सोय करावी लागते.पण असे भाऊ मात्र बहिणींना शिक्षणासाठी फुल सपोर्ट करतात.>> असं काही नाहिये. जर घरातील करता माणूस हरपला तर पहिली जबाबदारी त्याच्या वैवाहिक सहचर्‍यावर येऊन पडते. आणि आई आणि वडिल दोघही निर्वतले आणि मुलं लहान असतील तर सर्वात मोठ्या अपत्यावर (मग मुलगा असो किंवा मुलगी) घरची जबाबदारी येऊन पडते. तेव्हा त्याला/तिला अकाली मोठं होऊन घर आणि भावंड सांभाळावं लागतं. मुलींनीही हे केलेलं नक्कीच पाहिलं आहे. >>५. मोठ्या पदांची स्वप्न सगळेच बघतात.पण संधी त्यांनाच मिळते ज्यांच्याकडे गुणवत्ता असते.जर हि चर्चा स्त्र पुरुष समानतेवर चालू असेल तर गुणवत्तेचे निकष हे दोघांकरिता एकचं हवेत.जर तुमच्यात गुणवत्ता, निर्णय घेण्याची क्षमता आणि त्या पोजिशन साठी लागणार न्यान असेल तर तुम्हाला कोणीही अडवू शकणार नाही.>> हे अगदी मान्य आहे. पण हेही तितकच खरं आहे की, लग्नानंतर करियर करताना स्त्रियांना अनेक अडथळे येतात आणि मग नाइलाजाने काही वेळा करियरला दुय्यम स्थान द्यावे लागते. (यामध्ये स्त्रियांची दोन्हीकडून मानसिक ओढाताण होत असते. करियरला दुय्यम स्थान दिले तरी आणि नाही दिले तरी.) १) नवरा आणि बायको वेगळ्या ठिकाणी(शहरात/देशात) नोकरी करत असतील तर लग्नानंतर मुलींना आपली कष्टाने मिळवलेली, रूळलेली, जम बसवलेली, स्वत: प्रयत्न करून मेहनत घेऊन स्वतःचे काही स्थान निर्माण केलेली नोकरी सोडून दुसर्‍या जागी जावे लागते. तिथे परत (नोकरी मिळवण्यासाठी, तिथे जम बसविण्यासाठी) शून्यातून प्रयत्न करावे लागतात. स्ट्रगल करावं लागतं. म्हणजे बॅक टू स्क्वेअर वन. कारण अशा वेळी नवीन नोकरी धरताना काही वेळा (नवीन ठिकाणी आधीपेक्षा कमी पगार मिळणे, कमी पद मिळणे, सिनिअ‍ॅरिटी नसणे(प्रमोशनसाठी वगैरे), नव्या पॉलिटिक्सचा सामना करणे, तिथे नवा जम बसवणे,) काही तडजोडी कराव्या लागतात. २)लग्नानंतर जर नवरा घरकामात पुरेसा हातभार लावत नसेल तर परत शारिरिक आणि मानसिक ओढाताण. आणि ओव्हर एक्जर्शन. ३)मुलं झाल्यावर तर मग काय कथा सांगावी. (प्रेग्नन्सी आणि डिलीव्हरी या नैसर्गिक गोष्टी असल्या तरी त्यामुळे येणार्‍या मर्यादांमुळे पण करियरला ब्रेक लागतो. मुलं दोघांच म्हणून जन्माला येणार असलं तरी करियर फक्त आईच बाजूला रहातं. पण हे तूर्तास बाजूला ठेवू.) मुलं लहान असताना त्याच्या संगोपनासाठी बर्‍याच आयांना करियरमधून ब्रेक घ्यावा लागतो. ह्यामुळे करियरमध्ये गॅप पडते, करियर पुन्हा सुरू करताना परत बॅक टू स्क्वेअर वन. पुन्हा नोकरी मिळवण्यासाठी तिच स्ट्रगल, तिथे स्थान मिळवण्यासाठी स्ट्रगल. यामुळे करियरमध्ये तडजोड करावी लागते. बर हे करताना पॅरलली मुलांच करणं, घर सांभाळणं. (यामध्येही नवर्‍याचा सहभाग असेल तर ठीक नाहितर अजून लोड) मुलांचं दुखणं-खुपणं, आजारपणं, यासाठी रजा घ्या. सणावारासाठी रजा घ्या नाहितर स्वतःची लिमिट्स स्ट्रेच करून ऑफिसमधून आल्यावर हे सगळं करा. मुलांचा होमवर्क घ्या. आल्यागेल्याच बघा. हे सगळ आलं. साधी कामवाली आली नाही तरी त्रेधा-तिरपीट उडते कारण घरी आल्यावर वेळ आणि एनर्जी कमी असते. हे सगळ सांभाळून (घरीच द्यायला वेळ नाही तर) ऑफिसमध्ये द्यायला एक्ट्रॉ टाईम कोठून द्यायचा मग काय तडजोड आलीचं ना. >>प्रत्येकवेळेस मुलांकडे वंशाचा दिवा म्हणून बघितले जात नाही.जसा जसा मुलगा मोठा होतो तसं तसं ह्या वंशाच्या दिव्यच रुपांतर म्हतार्पांच्या काठीत होत.>> मुलांच्या आई-वडिलांना निदान म्हातारपणीची काठी तरी आहे.आणि मुलीच्या किंवा फक्त मुली असणार्‍या आई-वडिलांच्या म्हातारपणीच्या काठीबाबत तुमचं काय मतं आहे. त्यांना कोणती काठी. त्यांनी पण मुलींना जपलं, वाढवलं, शिकवलं, मोठं केलं. मग आता त्यांनी म्हातारपणीची काठी म्हणून कोणाकडे पहाव? >>बहिणीची लग्न झाली कि मुलगा हा आई बाबांचा एकमेव आधार असतो.>> प्रत्येक दांपत्याला एक तरी मुलगा असतोच. ह्या गृहितकाला धरून तुमचं सर्व बोलणं चालू आहे/असतं. कमाल आहे तुमची. फक्त मुली(किंवा १ मुलगीच) असणार्‍या आई-वडिलांना तुमच्या मते कोणी आधार द्यावा. >>मग कधी मोतीबिंदू,कधी हिअरिंग एड , डायबेटीस, दवाखाने सगळ्या गोष्टींमध्ये मुलगा आई वडिलांची सेवा करतो. हे जाणीवपूर्वक लोक का विसरतात?दवाखान्याची बिल लाखांमध्ये येतात.>> तुमच्या मते फक्त मुली(किंवा १ मुलगीच) असणार्‍या आई-वडिलांची सेवा कोणी करावी? खर्च कोणी करावा? हे सगळ करू शकणार्‍या आणि करू इच्छिणार्‍या मुलींच्या नवर्‍यांचा याला किती सपोर्ट असतो? >>त्यामध्ये मुली का ५०-५० करत नाही?वाटणीच्या वेळेस येतात मात्र ५०% पाहिजे म्हणत.>> जी अपत्य सेवेच्या वेळेस येत नाही आणि फक्त वाटणीच्या वेळेस येतात त्या अपत्यांचा निषेध. असं वागणं चूकच आहे. (मग तो मुलगा असो वा मुलगी) मी तरी खूपशी उदाहरणं पाहिली आहेत ज्यामध्ये बहिणींनी आपल्या वाट्याची मालमत्ता स्वखुशीने भावांच्या नावावर केली आहेत. >>बसमध्ये उभ्या/बसलेल्या प्रत्येक बाईला मासिक धर्म असतोच का हो?एखादे वृध्द आजोबा जर उभे असतील तर तुम्ही त्यांना बसायला जागा करून द्याल कि स्वतःचा मासिक धर्म साम्बालात बसाल?बर हाच मासिक धर्माचं कौतुक करत बसलात तर उच्चपदस्थ व्हायची स्वप्न कधीच प्रत्यक्षात येणार नाहीत.ह्या चार दिवसात घरी बाजूला बसवलं तर तो अन्याय आणि बसमध्ये बसूला बसण्यासाठी तर आम्ही सदा रेडी असतो.>> १)मासिक धर्माचं कौतुक कोणालाच नसतं. झालाच तर त्रास असतो. आणि तो प्रत्येकीला कमी जास्त प्रमाणात होतो. तुम्ही खूप त्रास अनुभवला नसेल तर चांगलचं आहे. पण त्यावरून उगाच टिपण्णी करू नये. काही काही जणींना त्या दिवशी ऑफिसला/शाळेला सुट्टी घेण्यावाचून पर्याय नसतो, प्रचंड विकनेस येतो, काहिंना एक क्षण उभं रहाताही येत नाही हे पाहिलं आहे. २)शिवाय बसमध्ये मुलींना त्रास देणे, छेडछाड, लगट करणे हे प्रकारही सर्रास चालू असतात ना. ३)आणि बसमध्ये प्रेग्नंट स्त्रिया, लेकुरवाळ्या स्त्रिया असतातच ना. ज्यांना बसायला जागा मिळणे/देणे अत्यावश्यक आहे. हेही मान्य आहे कि अपंग/वृद्ध, स्त्री/पुरूषांनाही बसायला जागा मिळणे/देणे अत्यावश्यक आहे. आणि जितक्या सहजपणे तुम्ही एखाद्या वृद्ध आजोबांना तुम्ही एक माणूस म्हणून समजून घेता आणि ते वृद्ध असल्याने जे प्रोब्लेम आहेत ते समजून घेता. तसेच स्त्रीलाही ती एक स्त्री आहे म्हणून फेस करावे लागणारे प्रोब्लेम समजून घेतले पाहिजेत. >>शेवटी काय समानता हवी असेल मी स्त्री आहे हे बाजूला ठेवून मी एक माणूस आहे अस बोलायला शिकलं पाहिजे.>> एक माणूस म्हणूनच जो सगळ्यात बेसिक अधिकार आहे जन्म घेण्याचा. तोच मिळत नाहिये, तर बाकीच्या अधिकारांची काय कथा.

In reply to by किचेन

>>स्त्री पुरुष समानता वगैरे मूर्खपणा आहे.>> माझी तुम्हाला विनंती आहे की असं असेल तर कृपया मला काही प्रश्न पडले आहेत त्यांची उत्तरे द्यावीत. http://www.misalpav.com/node/20997#comment-380517 बाकीच्या मुद्द्यांवर 'पिलीयन रायडर' शी सहमत असल्याने तेच मुद्दे रिपीट करत नाहिये.

लेख आवडला. म्हणजे कुठल्याश्या सर्वे नुसार जर १०० पुरूष एखादी गोष्ट करतात तर तेथे स्त्रियांची संख्या पण १०० च असायला हवी का आणि तशी असली तर समानता आली का? माहीत नाही . पण असं नसावं. त्या १०० जणांची निवड स्त्री कि पुरूष हे न पाहता व्हावी आणि एकमेकांचा आदरही स्त्री / पुरूष याचा विचार न करता व्हावा..

In reply to by सांजसंध्या

म्हणजे कुठल्याश्या सर्वे नुसार जर १०० पुरूष एखादी गोष्ट करतात तर तेथे स्त्रियांची संख्या पण १०० च असायला हवी का आणि तशी असली तर समानता आली का?
म्हणजे काय? तुम्ही लिटरेचर वाचत नाही का?
त्या १०० जणांची निवड स्त्री कि पुरूष हे न पाहता व्हावी आणि एकमेकांचा आदरही स्त्री / पुरूष याचा विचार न करता व्हावा..
ह्या ह्या ह्या... फारच मागासलेले विचार ब्वॉ तुमचे. ही १७६० सालची व्याख्या झाली. आजची स्त्री पुरुष समानतेची व्याख्या अशी नाही.

जगाच/समाजाच माहीत नाही. पण समानतेच्या उपदेशाचे डोस इतरांना पाजण्या पेक्षा ह्या चांगल्या कामाची सुरवात स्वतःच्या घरापासुनच करावी. ह्याच संस्कारांच केवळ बाळकडू आई बाबांनी आम्हा बहिण भावंडाना पाजल नाही तर स्वतःच्या आचरणातुन आम्हाला ते दाखवून दिल. तेच संस्कार आता पुढच्या पीढीत उतरवण हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो. जर प्रत्यकाने अशी सुरवात आपल्या घरापासुन केली तर लगेच नाही पण पुढल्या एक दोन तपांत आपल्याला या अश्या चर्चांची आणि त्यातुन उद्भवणार्‍या विवादांची गरज भासु नये.

पेदाड या शब्दाप्रमाणे पेदाडी हा शब्द जेंव्हा मराठी भाषेत येईल त्यावेळेस समानता आली असे मानायला हरकत नसावी. बाकी हल्ली बर्‍याच ठिकाणी फुंक्यांसोबत फुंकीण्या एकेकट्याही दिसतात. त्यामुळे ही समानता फार दूर नाही असे वाटते

In reply to by परिकथेतील राजकुमार

पराशेठ, विजूभाऊ की भावनाओंको समझो! :D - (पेदाड) सोकाजी

पुरुषापुरूषांमध्ये तरी कुठे समानता आहे? शारीरिक, मानसिक, भावनिक दुर्बल पुरूषावरही इतरांकडून (त्यात सबल स्त्रियाही आल्याच) दडपशाहीचा अवलंब होतोच. स्वतः विचार करू न शकणारे पुरुषही कधी एकाच्या तर कधी दुसर्‍याच्या विचारांचे 'गुलाम' असतात. स्त्री-पुरुष असमानता किंवा समानता अन्याय्य नसावी.

In reply to by प्रभाकर पेठकर

पुरुषांनी पुरूषप्रधान संस्कृतीची तक्रार करणं हे मला पाकीस्तानने स्वतःला दहशतवादपिडीत संबोधण्यासारखं वाटतं. (हे ह.च घ्या)

खालील प्रश्नांची थोडक्यातच उत्तरे घ्या १> स्त्री पुरूष समानता म्हणजे काय त्याची व्याख्या द्या:- "स्त्रीची उंची जर साडेपाच फूट असेल तर पुरुषाची उंची सुद्धा साडेपाचच असणे म्हणजे स्त्री पुरुष समानता होय!" किंवा "स्त्रीची उंची पुरुषाच्या उंचीएवढी वाढणे म्हणजेच स्त्री-पुरुष समानता होय." २> स्त्री-पुरूष समानतेसाठी काही उपाययोजना:- १> स्त्रीला रोज कॉम्लॅन बॉर्नविटा यांसारख्या वस्तू चघळायला देणे २> आणि सगळ्यांच स्त्रीयांना उंच टाचांचे सॅन्डल्स वापरायला देणे. आता हे स्त्रीयांनी करावयचे काही जालीम उपाय:- ३> पुरूषांच्या उंचीवर आळा घालणे, त्यासाठी त्यांना बॉर्नविटा म्हणून शिळ्या नाचणीच्या भाकर्‍या कुटून देणे ४> दुध म्हणून त्यांना चुन्याची निवळी देणे. ५> एका वेळेत किमान ५०० बैठका त्यांना रोज काढायला लावणे. काही महिन्यांतच स्त्री-पुरुष समानता नक्कीच प्रस्थापित होईल! ;) (रेफरन्स:- ताईचा सल्ला साभार!)

परा मोड ऑन> वांझोटी चर्चा वाचण्यापेक्षा ,आज जरा लवकरच कावेरीचा रस्ता धरावा हेच बरे परा मोड ऑफ >

सोका, ल्येका, पुन्यांदा होळी पेटविलीस का? पब्लिक काय बोंबा मारायला येका पायावर तयार आसतंय म्हना. मला काई स्वतःचे इच्यार न्हाईत. दत्तगुरुंनी २४ गुरु केले तसं मीबी माज्या गाडवाला गुरु क्येलं हाय. तर सांगायचं म्हनजी दरसाल महिला दिनाच्या आसपास ही धुळवड लोक न्येमानं ख्येळत्यात. माजा घोळ व्हतो. कदी वाटतं बायांच बरुबर हाय, कदी वाटतं बाप्येबी बरुबर हाईत. मंग कंटाळून म्या माज्या गुरु म्हाराजांना इनंती क्येली. आदुगर त्ये बोलायला तयारच नव्हते. त्वांडात कायतरी काडं चगळीत व्हते. त्यात त्यांची उकेरड्यात लोळाया जायाची येळ झालेली. म्या लईच पिच्छा पुरवला त्येंचा. तवा सद्गुरु गाडव म्हाराज म्हनाले, ' नीट आईक रं शिष्या भा*. पुन्यांदा इच्चारु नगंस. सगळे सद्गुन आन् दुर्गुन पुरुष आनि स्त्रियांमदे समान आसत्यात. ज्या घरांमदी बाया नमतं घ्येत्यात तितं पुरुष माजलेले असत्यात. मंग 'बळी त्यो कान पिळी' म्हनून बाया मुकाट सहन करत्यात. दुसरीकडं ज्या घरात बाया माजलेल्या असत्यात तितं 'दुभत्या गाईच्या लाथाबी गोड' आसं म्हनून पुरुष आन त्यांच्या घरातले पडती बाजू घ्येत्यात. बायांना संधी मिळंल तितं त्या पुरुषाच्या धनावर डल्ला मारत्यात आन पुरुषांना संधी मिळंल तितं त्ये बायांच्या डबोल्यावर हात मारत्यात. येळ आली, की दोगंबी शोषण करत्यात, अन्याव करत्यात, येकमेकांची आन मुलाबाळांची फरपट करत्यात, कचाकचा भांडत्यात, कायद्याचं हिस्कं दाखिवत्यात. परत्येक घरात 'डॉमिनेटिंग फॅक्टर' कोन हाय, ह्ये महत्त्वाचं. (आमचं गुरुम्हाराज रद्दीतलं विंग्रजी प्येपर चगळीत आसल्यानं सायबाची भाषा येकदम फर्डी बोलत्यात) 'म्हाराज! मग खरी समानता कशी येनार?' मी भाबडेपनानं इच्यारलं. 'आईक मग. स्त्री आन् पुरुषाचं स्वतंत्र आस्तित्व कुटपर्यंत? तर जोवर दोगं येकमेकांच्या रक्तामासापासून नवा जीव पैदा करत न्हाईत तोपर्यंतच. येकदा का प्वार झालं का मग पुडचं आयुष्य दोगानाबी 'एक आत्मा एक शरीर' म्हनून घालवावं लागतं. खरी मुक्ती त्यातच आसतीय. ज्यांना स्वतःचं प्वार नसंल त्यानी समाजातल्या निराधार बालकाला आधार द्यावा, पन ह्यो मंत्र इसरु नये. ह्ये ज्यांना समजत न्हाई त्ये जनमभर आसंच खुनशी वागत राहत्यात. म्हनून दोगानीबी येकमेकांना समजून घ्यावं. कमी पडंल तितं हात द्यावा. जोडीदार खुश-पोरं खुश की आपनबी खुश असावं. आमा गाडवांपासून काई शिका. 'लाथाळ्या' बी आमच्याच आनि 'गाडवी प्रेम' बी आमचंच.

In reply to by योगप्रभू

फुकाची चर्चा सोडून एक नंबरचा प्रतिसाद! योगप्रभू म्हणजे शब्दप्रभू. आमचाही दंडवत स्विकारावा! - (योग'प्रभू' भक्त) सोकाजी

In reply to by योगप्रभू

महिला दिनाच्या आसपास ही धुळवड लोक न्येमानं ख्येळत्यात. माजा घोळ व्हतो. कदी वाटतं बायांच बरुबर हाय, कदी वाटतं बाप्येबी बरुबर हाईत
हॅहॅ ! स्त्री- पुरुष समानता ऐवजी मानव मादी -नर समानता असा शब्दप्रयोग केला तर ल्वॉक काय म्हंतीन? समान म्हनायच्या ऐवजी यकमेकांना पूरक अस म्हनल तर काय बिघडतय!