Skip to main content

मृत्युपूर्वीच्या शेवटल्या दिवसातील गूढ संभाषणः काही अनुभव

लेखक चित्रगुप्त यांनी रविवार, 04/09/2011 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
.........मृत्यूपूर्वीचे शेवटले काही दिवस ती व्यक्ती अन्य मृतांच्या संपर्कात येऊन त्यांचेशी संभाषण करते की काय, असे वाटण्याजोग्या या तीन घटना माझ्या प्रत्यक्ष अनुभवतील आहेत...... प्रश्नः हे नेमके काय असावे, मनस्विदांनी यावर कोणते संशोधन केलेले आहे, जगभरातील प्राचीन साहित्यात असे उल्लेख आहेत का, आणि तुमच्या अनुभवात वा ऐकीवात असे काही प्रसंग आले आहेत का? घटना १: माझ्या आईचे (वय ८६) मृत्यू पावण्यापूर्वीच्या शेवटल्या तीन-चार दिवसात वर्तमान ( तथाकथित "प्रत्यक्ष" वा "वास्तविक") स्थळ-काळाचे भान नष्ट होउन ती तिच्या बालपणीच्या काळात वावरत होती. अन्न-पाणी घेणे थांबले होते. आम्ही कोणी जवळ गेलो, की ती ओळखत नसे, मात्र "दादा आले" असे म्हणून तिच्या बालपणीच दिवंगत झालेल्या तिच्या वडिलांना उद्देशून बोलत असे. घटना २: माझ्या एका मित्राचे वडील अंतकाळी त्यांच्या खोलीत सतत कुणाशीतरी बोलत असायचे. मात्र त्यांचे वर्तमानाचे भान शाबूत होते. ते त्यांच्या मुलाला वा सुनेला दहा-बारा कप चहा करून आणायला सांगायचे. एवढा कुणासाठी? असे विचारले, की "अरे हे बघ सर्व जण बसले आहेत... असे म्हणून जमिनीकडे बोट दाखवायचे. कोण कोण आहेत? असे विचारले की ते ज्यांची नावे घेत, ते सर्व त्यांचे मृत नातेवाईक व मित्र असायचे. घटना३: आम्ही पूर्वी रहायचो, तिथे जवळच राहणारे चार तरूण अपघातात सापडून त्यापैकी तिघांचा जागच्या जागी अंत झाला, एकजण मात्र बचावला. नंतर तो नेहमी " वो मुझे बुला रहे है" किंवा "तू भी इधर आजा" कह रहे है" असे म्हणू लागला. काही दिवसांनी काहीही कारण नसता तो पण दगावला. "वातात बरळणे" असे ज्याला म्हणतात, तसा माझा स्वतःचा अनुभव असा, की मी सतरा वर्षाचा असताना टायफॉइड च्या तापात तासनतास उर्दू शेरो-शायरी बरळत असे. मला उर्दू भाषा येत नाही, किंवा शेर वगैरे काहीही माहीत नाहीत.... याचे काय स्पष्टीकरण असावे?

वाचने 164463
प्रतिक्रिया 216

प्रतिक्रिया

In reply to by आत्मशून्य

तुमची गरज नाही. शून्यात अडकून पडायचं नाहीए आम्हाला. बाकी तुम्हाला क्यूअर काय सापडेल असं वाटत नाही. काळजी घ्या.

हा सगळा धागा काल रात्री वाचला, अन् झोपताना अंगावर काठा उभा राहिला. (मी अजून तसा अनुभव घेतलेला नाही, म्हणून असेल कदाचित) ह्यात ब-याच जणांचे अनुभव कमी अधिक प्रमाणात सारखेच आहेत. एक शंका, कोणाला तरुण व्यक्ती (२०-३० च्या आसपास) मरताना पाहण्याचा अनुभव आहे का? कारण वरील सर्व अनुभव वृद्धापकाळातील नैसर्गिक मृत्यूशी निगडित आहेत. अनैसर्गिक, अकाली मृत्यू येणा-यांबद्दल काय अनुभव आहेत.

In reply to by सुधीर

सुधीर यांनी अकाली मृत्यू येणा-यांबद्दल काय अनुभव आहेत, असे विचारले आहे. वरील मूळ लेखात घटना क्र. ३ मधील तरूण विशीतीलच होते: घटना३: आम्ही पूर्वी रहायचो, तिथे जवळच राहणारे चार तरूण अपघातात सापडून त्यापैकी तिघांचा जागच्या जागी अंत झाला, एकजण मात्र बचावला. नंतर तो नेहमी " वो मुझे बुला रहे है" किंवा "तू भी इधर आजा" कह रहे है" असे म्हणू लागला. काही दिवसांनी काहीही कारण नसता तो पण दगावला.

In reply to by चित्रगुप्त

घटना३: आम्ही पूर्वी रहायचो, तिथे जवळच राहणारे चार तरूण अपघातात सापडून त्यापैकी तिघांचा जागच्या जागी अंत झाला, एकजण मात्र बचावला. नंतर तो नेहमी " वो मुझे बुला रहे है" किंवा "तू भी इधर आजा" कह रहे है" असे म्हणू लागला. काही दिवसांनी काहीही कारण नसता तो पण दगावला. याला त्या मुलाची मानसीक स्थिती जबाबदार असू शकते, नव्हे तर तेच कारण असावे असे वाटते. जिवाभावाच्या ३ मित्रांना डोळ्यादेखत अपघातात मृत्युमुखी पडताना बघून त्या तरूणाच्या मनावर (की डोक्यावर?) त्याचा विपरीत परिणाम होण्याची शक्यता दाट आहे. त्यामुळे तो सतत त्यांच्याच विचारात राहून तशी बडबड करत असेल आणि एका क्षणाला त्याच्या मेंदूला ते विचार असह्य होवून तो काम करायचा थांबला असणार. अवांतरः अपघातात वाचलेला तरूण नंतर दगावला यावरून 'फायनल डेस्टीनेशन'ची आठवण झाली.

In reply to by स्मिता.

..... यावरून 'फायनल डेस्टीनेशन'ची आठवण झाली.... व्वा.... तर मग येउ द्या ना या सिनेमाचे परिक्षण. वाचायला नक्कीच आवडेल, आणि या विषयावर आणखी जरा प्रकाश पडेल.

In reply to by स्मिता.

चित्राताईने म्हटले आहे की " एका क्षणाला त्याच्या मेंदूला ते विचार असह्य होवून तो काम करायचा थांबला असणार" ......आता प्रश्न असा की अश्या ताणाने समजा अगदी मेंदू काम करायचा थांबला, (तात्पुरता 'हँग' झाला) तर चक्क मरणच ओढवते का डायरेक्ट? भोवळ वा चक्कर येणे, बेशुद्धावस्था वा कोमात जाणे, असले काही न होता? मग योगी मंडळी समाधीत जातात तेंव्हा काय होते? 'जीव जाणे' आणि 'प्राण जाणे' हे वेगवेगळे असते म्हणतात, ते नेमके काय? वेगवगळ्या वेळी आणि आयुष्यातील वेगवेगळ्या टप्प्यांवरील विविध स्थितीत मनुष्याची संवेदनशीलता व ग्रहणक्षमता वेगवेगळी असते, असे दिसते. अर्भकावस्था व मृत्यूच्या उंबरठ्यावरील अवस्था, यात काय काय जाणिवा होत असतात, हे जाणणे तसे कठीणच. Dr. Brian Weiss यांचे Many Lives, Many Masters' हे पुस्तक वाचावे, असा आजच सल्ला मिळाला आहे. कुणी वाचले असल्यास या पुस्तकाची ओळख करून द्यावी.

In reply to by चित्रगुप्त

चित्राताईने म्हटले आहे की " एका क्षणाला त्याच्या मेंदूला ते विचार असह्य होवून तो काम करायचा थांबला असणार" ......आता प्रश्न असा की अश्या ताणाने समजा अगदी मेंदू काम करायचा थांबला, (तात्पुरता 'हँग' झाला) तर चक्क मरणच ओढवते का डायरेक्ट? ते वरचं वाक्य मी लिहिलंय म्हणून मी उत्तर देत आहे ;) ते वाक्य लिहिल्यानंतर 'असा माझा अंदाज आहे.' हे वाक्य लिहायचे राहून गेले. मला वैद्यकिय क्षेत्रायलं ज्ञान शून्य आहे. त्यामुळे असह्य मानसिक ताणामुळे मेंदूवर नक्की काय परिणाम होत असावा याची माहिती नाही. पण ऐकीव माहितीनुसार (ही माहिती धडधडीत चुकीची असू शकते) अश्या ताणामुळे ब्रेन हॅमरेज का नर्व्हस ब्रेकडाउन होवून जीव दगावू शकतो, असे वाटते.

In reply to by चित्रगुप्त

@चित्रगुप्त, जून २०१८ ला मराठी अनुवाद प्रसिध्द झाला आहे. अनुवादक निता कुलकर्णी किंमत ₹२२५ डाॅ. विज यांची माहिती प्रस्तावनेत पाहू शकाल.

In reply to by सुधीर

एक शंका, कोणाला तरुण व्यक्ती (२०-३० च्या आसपास) मरताना पाहण्याचा अनुभव आहे का? १ मे, २००९ या दिवशी महिपतगड येथे मला स्वतःलाच (वय २० ते ३० च्या मधेच) मरणाच्या दारात जाउन परत येण्याचा अनुभव आलेला आहे. मला तरी अशा प्रकारचा कोणताही अनुभव आला नाही. संकटातून बाहेर पडल्यावर २-३ मिनिटे काही सुचत नव्हते आणि कपाळावर घाम डवरला होता. कोणतीही अतींद्रिय घटना घडली नाही की कोणतेही पूर्वज भेटायलासुद्धा आले नाहीत. आणि माझ्यावर कोसळलेले संकट ज्यांनी पाहिले त्यांनादेखील असे काही जाणवले नाही.

In reply to by अप्पा जोगळेकर

तुमचा अनुभव हा 'मरणाच्या दारात जाउन परत येण्याचा' अनुभव आहे. मी दिलेल्या तीन घटना व अन्य प्रतिसादातील उदाहरणे प्रत्यक्ष मृत्यूची आहेत. यावरून असे म्हणू शकतो, की मनुष्याची खरोखरच प्रत्यक्षात मरणाची वेळ येते, तेंव्हाच असे अनुभव येतात. या विश्वाच्या विराट योजनेत/पसार्‍यात मनुष्याला अद्याप अज्ञात अशी कोणकोणती रहस्ये आहेत, हे सांगणे ती जोवर प्रत्यक्ष ज्ञानाच्या कक्षेत येत नाहीत, तोवर अशक्य. परंतु अश्या अनुभवांवर संशोधन करण्याऐवजी वा संशोधन करण्यापूर्वीच नाकारणे, ही सुद्धा एक अंधश्रद्धाच म्हणावी लागेल. सुमारे वीस वर्षांपूर्वी माझ्या परिचयातील एका तरूण मुलीला एखाद्या व्यक्ती बद्दल असे स्वप्न पडायचे, की त्याच्या भोवती पांढरे बुरखे घातलेल्या व्यक्ती बसल्या आहेत. हे स्वप्न काही दिवस रोज दिसायचे, आणि लवकरच ती व्यक्ती मृत व्हायची.तिला खूप भिती वाटायची या सर्व प्रकाराची. ती अगदी सरळ स्वभावाची, साधी मुलगी होती, अविश्वास करण्याजोगे तिचे व्यक्तिमत्व नव्हते. आता ती कुठे आहे, ठाऊक नाही.

In reply to by सुधीर

माझ्या तिशीतल्या एका नातेवाईक तरुणीने आत्महत्या करुन आयुष्य संपवले. या मुलीत व तिच्या भावंडांत खूप जिव्हाळ्याचे , घट्ट प्रेम होते. पण मृत्यूसमयी , आधी काही दिवस किंवा नंतरही कुणाला काही भास झालेले मला माहीत नाही.

भेंडी!!!! आपण तर मरताना* स्वतःचं संपूर्ण व्हिडिओ (विथ ऑडिओ) शूटिंगच करणार ब्वॉ. उगाच नंतर वरती अनेकांनी लावल्यात तसल्या थापा माझ्या नावाने कोणी खपवायला नकोत!! *जास्त आगावूपणा करून कधी हा प्रश्न विचारू नये.

@ निळे, तुला 'कधी; हा प्रश्न विचारायचा नाही हे मान्य, पण माझं तर ठरलेलं आहे आणि मला माहित पण आहे, त्यावेळी अशी काही शुटिंगची सोय वगैरे करता येईल का, अर्थात त्यावेळि कुठं कसा आणि का असेन हे माहित नाही, आज तरी. तोपर्यंत संपर्क राहिला तर महिनाभर आधी फोन करेन तुम्हाला, हां फक्त त्या शुटिंगचे अधिकारविक्रीतुन आलेल्या रकमेपैकी ५०% रक्कम माझ्या वारसांना द्यावि लागेल.पण शुटिंगसाठी कुणि खर्च करणार नाही.

In reply to by ५० फक्त

@ निळे, शूटींगसाठी प्रेक्षक म्हणून हौशे, नवशे, गवशे लागतीलच, तेव्हा आम्हाला पण बोलवा त्यासाठी, मानधन वैग्रे काही नको, फक्त जायचे यायचे भाडे आणि फस्क्लास जेवण असू द्या.

In reply to by ५० फक्त

त्या कुठल्याश्या हॉलिवूडमधल्या नटीने असेच काहीसे केले होते. त्यातून काही क्लु लागतो का ते बघ रे निळ्या. आपणही तुझे अगदी तस्सेच करु. (तिने भारी जेवण दिले होते म्हणे ;) )

'त्या कुठल्याश्या हॉलिवूडमधल्या ' - त्या कुठल्याश्या हॉलिवुडमधल्या म्हणजे किती हॉलिवुड आहेत असं म्हणायचं आहे तुम्हाला श्री. अन्या दातार. आणि ती नटि कोण हे सांगा की, कारण हॉलिवुडमधल्या नट्या ब-याच गोष्टींच शुटिंग करुन ठेवतात असं ऐकलं आहे.

In reply to by ५० फक्त

आता ते निळेरावांनाच माहिती असेल ना हो ५०, त्यांचा हॉलिवूडबाबत बराच अभ्यास आहे म्हणे.

काही लोकांनी मरणाचेवेळी त्यांचे व्हिडो शुटिंग केले जावे अशी अपेक्षा आम्हाजवळ व्यक्त केली. सदर इच्छेची दखल घेऊन आम्ही इनिशीएटीव्ह घेतलेला आहे. त्या धाग्यावर अवांतर होऊन इतर सदस्यांना अन पर्यायाने संपादकांना भलते सलते अनुभव येऊ नयेत म्हणून आम्ही हा प्रतिसाद वेगळ्या धाग्यात हलवत आहोत.

मित्र हो, या विषयावर चित्रगुप्तांनी मला म्हटले होते की प्रतिक्रियेच्या प्रतीक्षेत. खरे तर माझा हा विषय नाही. म्हणून मी माझ्या वाचनातील एका पुस्तकाचा संदर्भ देत आहे तो वाचकांना आवडेल. 'मनुष्य मेल्यानंतर संपतो हेच करे असून त्याचा आत्मा उरतो हे म्हणणे खोटे आहे' असे म्हणणाऱ्या जडवाद्यांचे मेल्यानंतर मत परिवर्तन होते व तसे मत परिवर्तन झाल्याचा संदेशही त्यांचे मरणोत्तर आत्मे देऊ शकतात, या बद्दल हॅरी हुदिनी या प्रसिद्ध अमेरिकन जादुगाराचे उदाहरण अतींद्रिय संशोधन क्षेत्रात गाजलेले आहे. (असा करार करून दिलेला संदेश - म्हणजे मरणोत्तर आत्मरुपाने असे अस्तित्वात असल्याचा हुदिनीने आपल्या पत्नीला सादर केलेला पुरावा - हुदिनीने फोर्ड या माध्यमा मार्फत दिलेला संदेशच होता.) येथे असाच करार करून मेलेल्या व मरणोत्तर आपण आत्मा म्हणून अस्तित्वात असल्याचे पुराव्यानिशी सिद्ध करणाऱ्या एका प्रसिद्ध चित्रपट लेखकाचे अलिकडील उदाहरण देत आहे. "डॉ. झिवॅगो (१९६५) व ए मॅन फॉर ऑल सीझन्स (१९६६) या प्रसिद्ध ऑस्कर विजेत्या चित्रपटांचा कथा लेखक रॉबर्ट बोल्ट हा नास्तिक होता. तो फेब्रुवारी १९९५ साली वयाच्या ७०व्या वर्षी वारला. त्याच्या पत्नीच्या कथनानुसार तिने आपले (मृत्युनंतर आत्मा उरतो) हे म्हणणे खरे असेल तर आत्म्याच्या रुपाने परत येऊन ते आपल्यापुढे पुराव्यानिशी सिद्ध करावे असा आपल्या पतीशी करार केला होता आणि आश्चर्य म्हणजे त्या करारानुसार मेल्यानंतर तिचे म्हणणे खरे असल्याचे पुरावे तिला दिले. उदा. तो मेल्यानंतर घरातील वस्तू आपोआप इकडच्या तिकडे विचित्र रितीने स्थलांतर करीत असत. तो पिण्याचा भारी शौकीन असल्यामुळे तिने पेल्यात दारू ओतली तर ती आपोआप अदृष्य होई. 'अशा घटना हल्ली वरचेवर घडत असून मी घरात एकटी नाही, नवरा माझ्या अजून सोबतीला आहे' असे बोल्टची विधवा पत्नी सर्रा माईल्स म्हणते. Ref. (Indian Express, Sunday, November 1995.) संदर्भ - विज्ञान आणि चमत्कार (पान २२७ व २२८) लेखक प्रा. अद्वयानंद गळतगे. वैचारिक रंगित खाद्य - 'मृतात्मा' हा शब्द कर्मधारय समास आहे कि षष्ठीतत्पुरुष समास आहे? तज्ञांनी आपली मते मांडावीत... परलोकाच्या म्हणजे स्वतंत्र अतींद्रिय जगाच्या अस्तित्वाचा पुरावा देणारे संदेशही काही वेळा मृतात्म्यांकडून मिळतात.

In reply to by शशिकांत ओक

आलात? चित्रगुप्तांनी आमंत्रण देऊन बोलावले आणि तुम्ही आलात म्हणजे या धाग्याचे खरे सार्थक झाले. >>तो पिण्याचा भारी शौकीन असल्यामुळे तिने पेल्यात दारू ओतली तर ती आपोआप अदृष्य होई. हाहा. ही आयडीया मस्त आहे. मरावे परी दारू पीण्या उरावे.

In reply to by चित्रा

वरला प्रतिसाद वाचून उगीच मला चित्राच्या शरीरात नाईल, परा किंवा तत्सम प्रभृतींचे आत्मे घुसल्यासारखे वाटले. ;)

In reply to by शशिकांत ओक

ह्म्म. दारु अदृश्य होऊन कुठे जात असेल? नाही म्हणजे दृश्य दारु अदृश्य व्यक्तीने प्यायल्यावर ती त्याच्या अदृश्य शरीराचा स्पर्श झाल्यावर अदृश्य होते? हे सगळं कैच्या कैच.

In reply to by शिल्पा ब

अहो, असे काय करता? मागे गणपतीने नाही का प्यायली? दुधाची चरवी? डोळ्यादेखत दुधाच्या चरव्या च्या चरव्या अदृष्य झाल्या होत्या म्हणे.

In reply to by शशिकांत ओक

का हो, आमचा नाडीपट्टीवर आता विश्वास बसला आहे असं सांगणारे आत्मेसुद्धा कदाचित संबंधित लोकांना भेट देत असतील. :)

मित्रांनो, भले आत्म्यांना झिंग चढलेली असेल वा नसेल, इथे अनेकांना नाडीचा नशा असा काही सिर चढलाय कि ओकांच्या लिखाणाचा धसका व नाडीचा हिसका यामुळे अनेकांची झोप उडून गेली आहे.
जडवाद्यांचे मेल्यानंतर मत परिवर्तन होते व तसे मत परिवर्तन झाल्याचा संदेशही त्यांचे मरणोत्तर आत्मे देऊ शकतात, या बद्दल हॅरी हुदिनी या प्रसिद्ध अमेरिकन जादुगाराचे उदाहरण अतींद्रिय संशोधन क्षेत्रात गाजलेले आहे.
जर मेल्यानंतर जडवाद्यांचे मत परिवर्तन होते असा अनुभव आहे तर मग जीवंतपणी नाडीचा अनुभव घेऊन न मरताच मतपरिवर्तन व्हायला काही प्रॉब्लेम नसावा. चित्रगुप्ता, आपल्या (बो)जड वादी मित्रांना आज्ञा द्या की माझ्यासमोर यायच्या आधी नाडीची ताडी घेऊन का आला नाहीस. यमदूतांनो, त्या जडवादी त्याला किंवा तिला पुन्हा खाली दामटा. संदेश द्यायला की लई मज्जा आली वर ... पण नाडी सोडल्याची काही और मजा असते....हलके करून पाठवा. करवा त्याना हिम्मत...

In reply to by शशिकांत ओक

त्या अनूशंगाने लेखन का करत नाही ? ऑटोरायटींगमूळे आपला मृतात्म्यांसोबत संपर्क झाला असेलच की ? म्हणूनच प्रत्यक्ष तूम्हाला याबाबत काही गोश्टी अधीकाराने बोलायचा हक्क असताना असताना उगीच इतरांची उदाहरणे देण्यात वेळ का वाया घालवत आहात ? उत्सूकता आहे तूमच्या ऑटोरायटींग बद्दल.

ओक साहेब, आता जे नवीन यमदूत रिक्रूट होतील, त्यांचेसाठी आपापली नाडी काढवून घेणे आवश्यक, अशी अट घातलेली आहे. बघा: http://misalpav.com/node/19117#comment-338087

लोका सांगे ब्रह्मज्ञान... नव्या दूतांसाठी नाडीची अट केलेली सोय छान. आपण व आपल्या यजमानांना - दस्तूरखुद्द राज यम - ज्यांना प्राण घेण्याचे कॉन्ट्रॅक्ट कायमस्वरुपी मिळालेले आहे - त्यांनाही ती अट लागू करावी नाही तर , .... लोका सांगे ब्रह्मज्ञान... असे व्हायचे.... अण्णां तेथे पोचले की उपोषणाला बसतील तेंव्हा आधीच सावध व्हा म्हणजे तुमची नोकरी पक्की बघा ...

In reply to by शशिकांत ओक

....आपण व आपल्या यजमानांना - दस्तूरखुद्द राज यम, त्यांनाही ती अट लागू करावी ...... पटले, अगदी यमरा़जांनासुद्धा पटले. आता भारतातील सगळ्या शहरात जशी नाडी केन्द्रे उघडली आहेत, तसे इकडे स्वर्गलोकात उघडण्यासाठी यमराजांनी जागा सुद्धा अलॉट केली. बोला, तुमचे ते लुंगीधारी व नाड्यांची बंडले 'उचलून' आणायला यमदूतांना केंव्हा पाठवू ?

चित्रगुप्त जी,
तुमचे ते लुंगीधारी व नाड्यांची बंडले 'उचलून' आणायला यमदूतांना केंव्हा पाठवू ?
मला का विचारत आहात. ते आपले काम आहे. हिशोब चुकता झाला असेल तर कानावरची पेन्सिल काढून, आपण ठरवा अन उचला एकेकांना. पण तेथे आधी पोहोचलेल्या अंनिसवाल्याची नाडी पट्टीनिघाली व त्यांची पळता भुई झाली तर ते बिचारे पृथ्वीतलावर परतू शकणार नाहीत. तेंव्हा ठरवा नक्की काय ते.

सध्या चाललेल्या धाग्यांशी हा विषय काहीसा संबंधित आहेसे वाटल्याने हा धागा पुन्हा वर काढत आहे.

माझ्या आईचे (वय ८६) मृत्यू पावण्यापूर्वीच्या शेवटल्या तीन-चार दिवसात वर्तमान ( तथाकथित "प्रत्यक्ष" वा "वास्तविक") स्थळ-काळाचे भान नष्ट होउन ती तिच्या बालपणीच्या काळात वावरत होती. अन्न-पाणी घेणे थांबले होते. आम्ही कोणी जवळ गेलो, की ती ओळखत नसे, मात्र "दादा आले" असे म्हणून तिच्या बालपणीच दिवंगत झालेल्या तिच्या वडिलांना उद्देशून बोलत असे. माझी आई मे ४ २०१३ रोजी जग सोडून गेली. वरील प्रकारच्या अनुभवाच्या जवळ जवळ ८५ टक्के अनुभव मलाही आला. आमच्या आईच्या बाबतीत दादा आले ऐवजी बाबुराव ( मृत्यू ४० वर्षापूर्वी) असे येई. यावर शास्त्रीय कारण असे की शेवट आला असता बाह्य मेंदू मृत पावत जातो.अंतर्भागात जुन्या आठवणी असल्याने त्याच भागाचा वापर होतो.

वरील विषयाला धरूनच एक माझ्या आठवणीत आहे. माझे आईवडील लवकरच गेले. मी तेवीस वर्षाचा असताना ते एकापाठोपाठ वारले. काही वर्षानंतर माझ्या लग्नाच्या वेळची आठवण आहे. मुलगी पाहायला माझ्या काकांबरोबर आम्ही एका ठिकाणी गेलेलो असतांना, त्या ठिकाणी पहिले कधीही गेले नसतांना काका म्हणाले मी येथे अगोदरच येउन गेलो आहे. माझ्या वडिलांना भाऊ म्हणत. काका म्हणाले माझ्या स्वप्नात भाऊ आले होते व मला म्हणाले चल महेशकरिता मुलगी बघायची आहे. मी व भाऊ याच बिल्डींगमध्ये आलो होतो व भाऊंनी मुलगी लांबूनच बघून छान आहे म्हणाले. आणि स्वप्न संपले. आज आपण या ठिकाणी आलो तेव्हा मला स्वप्नात मी भावूंच्याबरोबर येथे मुलगी बघायला आलो होतो ती आठवण झाली. हा जिना, हि बिल्डींग पूर्ण लक्षात आहे. काय आश्चर्य आहे या पूर्वी आपण येथे कधीही आलो नव्हतो. तरी मला हि जागा पाहिल्याचे पूर्ण आठवते.

नैसर्गीक कारणाने/ वाढत्या वयाने जेव्हा मृत्यु होणार असतो तेव्हा माणसाच्या शरीरात अनेक बदल होत असतात. शरीरातले सोडीयम्/पोटॅशियमचे प्रमाण घटणे हा त्या पैकी एक असावा. माझ्या वडीलांचे मृत्यु पुर्वी असेल सोडीयम्/पोटॅशियम घटले आणि ते एक दिवस लोकांना ओळखणे त्यांना कठीण झाले. प्रश्नांना उत्तरे असयुक्टिक होती. माझा मेहुणा ( बायकोचा भाऊ ) भेटावयास आल्यावर मी विचारले पहा कोण आले आहे ? त्यांनी महाराष्ट्रातल्या एका प्रतिथयश नेत्याचे नाव घेतले जो जिवंत होता आणि त्यांचा माझ्या वडीलांशी कुठलाही वैयक्तीक स्ंपर्क नव्हता. डॉक्टरांनी काही औषधे सलाईन द्वारे दिल्याने सोडीयम्/पोटेशियम नियंत्रणात आले. यानंतर मात्र डॉक्टरांनी वडीलांना घरी घेऊन जा म्हणुन सांगईतले पुढे आणखी काही महत्वाची चिन्हे दिसली ज्यामुळे मृत्यु जवळ आला हे समजले. १. कानाच्या पाळ्या मागच्या बाजुला झुकणे. २. शरीरात बेड सोर्स ( Bed sores ) होणे. ३. जिवेष्णा संपणे ( आयुर्वेदीक टर्म) जगण्यासाठी प्रयत्न करण्याचे सोडणे. यातुन मृत्युचे निदान करता येते. प्रत्यक्ष मृत्यु होण्याचे आधी काही लक्षणे दिसतात. १. घर घर लागणे ( श्वास घेताना मोठा आवाज होणे ) २. पाय गार लागणे या लक्षणावरुन मृत्यु दिवसांवरुन काही तासांवर आल्याचे निश्चित होते.

In reply to by नितीनचंद्र

पुढे आणखी काही महत्वाची चिन्हे दिसली ज्यामुळे मृत्यु जवळ आला हे समजले. १. कानाच्या पाळ्या मागच्या बाजुला झुकणे. २. शरीरात बेड सोर्स ( Bed sores ) होणे. ३. जिवेष्णा संपणे ( आयुर्वेदीक टर्म) जगण्यासाठी प्रयत्न करण्याचे सोडणे. ह्यातील १ विषयी काही माहिती नाही. पण २ हे काही मृत्यू जवळ आल्याचे लक्षण नाही. एकाच पोझिशनमधे दिवसेंदिवस झोपल्याने हे सोअर्स होतात. तसे ते होऊ नयेत, म्हणून उत्तम नर्सिंगची जरूरी असते. बेड सोअर्स होऊनही अनेक वर्षे जगलेली माणसे माझ्या पहाण्यात आहेत. ३ बद्दलचा माझा अनुभव वेगळा आहे. दुर्धर रोगामुळे बिछान्याला खिळलेली, तसेच केवळ वयामुळे अशक्त झालेली माणसे 'आता मला मरू द्या रे' असे अनेकदा म्हणत असतात. जगण्याची उर्मी जाऊनही अनेक वर्षे काढलेली माणसेही माझ्या पहाण्यात आहेत. तेव्हा तुमचे हे दोन्ही निकष चुकीचे व अपुर्‍या माहितीवर/ विदा असतांना बेतलेले आहेत. साती ह्या तिन्हींविषयी व्यवस्थित सांगू शकतील.

In reply to by नितीनचंद्र

१. कानाच्या पाळ्या मागच्या बाजुला झुकणे. २. शरीरात बेड सोर्स ( Bed sores ) होणे. ३. जिवेष्णा संपणे ( आयुर्वेदीक टर्म) जगण्यासाठी प्रयत्न करण्याचे सोडणे. यातुन मृत्युचे निदान करता येते. प्रत्यक्ष मृत्यु होण्याचे आधी काही लक्षणे दिसतात. १. घर घर लागणे ( श्वास घेताना मोठा आवाज होणे ) २. पाय गार लागणे
माझी आजी १९८९ साली वृद्धापकाळामुळे गेली. मृत्युच्या साधारणपणे २४ तास आधी तिचे पाय तळपायापासून थंडगार पडायला सुरूवात झाली होती. ३-४ ब्लँकेट्स पायावर घालुन सुद्धा गुडघ्यापासून खालचे पाय थंडगार पडले होते. मृत्युपूर्वी ६-७ दिवस पूर्ण दिवसरात्र तिचे डोळे पूर्ण मिटलेले असायचे व डोळे मिटलेल्या अवस्थेतच ती बोलत होती, परंतु हाकेला ओ देऊनसुद्धा डोळे उघडत नव्हती. मात्र मृत्युपूर्वी साधारण दीड तास आधी तिचे डोळे लख्ख उघडले होते व दोन्ही बाजूला सतत नजर फिरवित ती सर्वांकडे पहात होती. जणू ती जाण्यापूर्वी सर्वांना डोळ्यात सामावून घेत होती. दीड तासानंतर तिचा श्वास हळूहळू संथ होत गेला व एका क्षणी पूर्ण थांबला आणि एक आत्मा परतात्म्यात विलीन झाला. ती जेथून आली तिथेच परत गेली. म्रुत्युनंतर तिचे कान बरेच काळे पडले होते. या संपूर्ण घटनेच्यावेळी मी तिथेच उपस्थित होतो म्हणून अजूनही सर्व नीट आठवते.

धागा वर काढलाच आहे तर माझा अनुभव नोंदवतो. माझी आई १९९९ साली गेली. ती धडधाकट असताना आम्ही एक करार केला होता. मरणानंतर जर अस्तित्व असेल तर तिने ते कुठल्याही प्रकारे माझ्यापर्यंत पोचवायचं. त्यावर ती गंमतीने असे देखील म्हणाली ती, आत्म्याला जर हात पाय, वाणी, स्पर्श हे काहीच नसेल तर मी कम्युनिकेट कसं करणार ? त्यावर मी तिला म्हणालो, की बघ, जे काही करता येईल ते कर. आमच्या घरांत एक मोठा डबा होता. तो तिने बोहारणीकडून घेतल्यामुळे, त्याचे झाकण नीट लागत नसे आणि लागलेच तरी कधी, मोठ्ठा आवाज करुन उडत असे. तिच्या अंतकाळात आम्ही हे बोलणे विसरुन गेलो होतो. ज्या दिवशी रात्री ती गेली, त्यावेळेस तिच्या उशाशी माझी पत्नी होती. आई तर कोमातच होती. मी घरी मुलांना बघायला थांबलो होतो, पण अस्वस्थ होतो. बरोबर रात्री ८ वाजता फोन वाजला. ही सांगत होती, एक मिनिटापूर्वीच आई गेल्या. मी फोनवर बोलत असतानाच स्वयंपाकघरांत मोठ्ठा आवाज होऊन त्या डब्याचे झाकण निघून आवाज करत खाली पडले होते. याचा अर्थ कसा लावायचा, ते प्रत्येकाने ठरवावे.

येऊ द्या अनुभव. -दिलीप बिरुटे

I Hope कि मिपावर सगळे well educated आहेत.

माझे आजोबा (वय ८४) असतांना त्यांना एकदा अति दक्षता विभाग मध्ये होते. डॉक्टर ने सांगितले दिलेल्या औषधांमुळे पुढचे ५-७ दिवस थोडा असंबद्ध बडबड करतील. मेंदू ला कमी रक्तप्रवाह आणि शक्तिशाली औषधे यामुळे असे होते हेही सांगितले. नंतर ३-४ दिवस ते ३०-३५ वर्षापूर्वी च्या काळात पोचले होते. मला ते त्यांचा लहान मुलगा म्हणून बोलत होते. घरच्यांना पुरेपूर कल्पना दिल्यामुळे आम्हीही तसेच वागत होतो. नंतर ते ठीक झाले पुढचे २ वर्ष अगदी ठणठणित घालवले. शेवटच्या क्षणी मात्र अशी काही बडबड वगैरे केल्याचा आठवत नाही. सगळे सुप्त मेंदू चे खेळ असतात, कोणी केमिकल लोचा म्हणतं तर कोणी भास …

In reply to by प्रकाश घाटपांडे

+१००० मेलेल्या माणसाच्या शरीराचा, शरीरदान अथवा अवयवदान यासारखा उत्तम उपयोग दुसरा नाही !

मेलेल्या व्यक्तीच्या शरीराचा नक्कीच देहदाना साठी उपयोग आहे. चर्चा आहे आत्मा विषयाची. मृत्यु नंतरचे जीवन या बाबत. आपल्या माहिती साठी लिहतो की ही व्यक्ती ( अनिस किंवा अन्य लोकांनी ) कितीही वादग्रस्त ठरवली असली तरी ते नुसतेच एम बी बी एस नाहीत तर पुण्यात अनेक वर्ष प्रॅक्टिस करत आहेत/ होते. आज त्यांचे वय ९० च्या पुढे असेल. डॉ प. वि. वर्तक त्यांचे नाव. त्यांनी पुनर्जन्म या विषयावर पुस्तक लिहले आहे. आपण जर पुर्वग्रह दुषीत न करता वाचले तर आपल्याला अतिशय तर्क शुध्द वाटेल. या शिवाय पुण्यातल्याच मेधा खासगीवाले नावाच्या स्त्री विदुषी २०० तिकीट लाऊन या विषयावर व्याख्यान देतात. आपण वाचावे आणि अनुभव घ्यावा.

In reply to by नितीनचंद्र

माहितीसाठी धन्यवाद ! माझा प्रतिसाद घाटपांडे याच्या देहदानासंबंधीच्या प्रतिसादावर होता... पुनर्जन्माबाबत नव्हता, वा त्यांत तसा उल्लेखही नाही. पुनर्जन्म, मृत्युसमीपचे (नियर डेथ) अनुभव व अश्या सर्वच अतर्क्य वाटणार्‍या घटनांकडे मी नेहमीच कुतुहलाने पाहतो व त्यांची कारणपरंपरा आधुनिक शास्त्राच्या परिघात बसेल काय हे शोधण्याचा प्रयत्न करतो.

माझा एक अनुभव, ऐकलेला. एक वृद्ध गृहस्थ, तसे ठणठणीत, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी अचानक सन्ध्याकाळी म्हणाले, चला पटपट आवरा, माझी जायची वेळ झाली. त्यांनी घाई करून लक्ष्मीपूजन लवकर करायला लावले, आणि १-२ तासांमध्ये गेले पण.

@ मोदक, बरोबर आहे. डॉ प वि वर्तकांचे या विषयातले मुळ लेखन वाचावे. त्याच्या आत्मचरित्रात त्यांनी म्हणले आहे की योगाभ्यासात खालील सुत्र आहेत. यांचा अभ्यास सुरु असताना त्यांनी मंगळ ग्रहावर संयम केला ( धारणा म्हणजे सातत्याने त्याचा विचार - ध्यान म्हणजे एकाग्रता- व समाधी म्हणजे त्या पुढची अवस्था - या तिन्हीच्या एकत्रीकरणाला संयम असे योगसुत्रात म्हणले आहे. ) एक दिवस डॉ प वि वर्तक यांना त्यांच्या सुक्ष्म देहाने मंगळावर पोहोचलो हे जाणवले. त्या अवस्थेत त्यांनी मंगळाची २१ निरिक्षणे केली. जसे मंगळावर कधी काळी पाणी होते इ. परंतु तुमच्या सारखे लोक उपहास करतील म्हणुन मानवाने सोडलेले यान मंगळावर पोहोचण्या आधी एक लेख छापुन २१ निरिक्षणे प्रसिध्द केली. या पैकी २० निरीक्षणे नासा च्या निरीक्षणाशी जुळणारी होती म्हणुन माझा प्रयोग यशस्वी झाला असे ते म्हणतात. या नंतर निव्वळ असुये पोटी लोकांनी त्यांना आव्हान दिले जे त्यांनी मानले नाही. मग तुमच्या सारखे लोक हेटाळणी करत राहिले परंतु एकाही सुशिक्षीत माणसाने त्यांचे तर्कसंगत लेखन वाचुन ते किमान तर्कसंगत असल्याचा निर्वाळा दिला नाही. अर्थातच डॉ वर्तकांना त्याची आवश्यकता वाटली नाही. योगसुत्रातल्या विभुती पादातल्या अनुक्रमे ४२ आणि ४८ सुत्रे व त्याचे विवरण - लेखांक एकूण ४ पैकी ३ रा http://www.maayboli.com/node/12306 घेतले आहे या करीता मायबोली आणि मुळ लेखकांना धन्यवाद. ४२. कायाकाशयोः संबन्धसंयमाल् लघुतूलसमापत्तेश्चाकाशगमनम् । शरीर आणि आकाश ह्यांचा जो संबंध त्यावर संयम केला असता आणि कापसासारख्या हलक्या असणार्‍या पदार्थावर समापत्तिरूप तन्मयता प्राप्त करून घेतल्याने योग्याला 'आकाशगमन' हि सिद्धी प्राप्त होते. ४८. ततो मनोजवित्वं विकरणभावः प्रधानजयश्च । मनाच्या वेगासारखा गतीलाभ शरीरास होणे हे मनोजवित्व आणि कोणत्याही देशांतील आणि काळांतील विषयांचे सेवन इंद्रिय-निरपेक्ष घडू शकणे हा विकरणभाव. मागील सूत्रांत सांगितलेला इंद्रियजय प्राप्त झाला असता मनोजवित्व आणि विकरणभाव ही व्यष्टिनिष्ठ संयमाची फले आणि प्रधानजय हे समष्टिनिष्ट संयमाचे फल अशी तीन प्रकारची फले योग्यास प्राप्त होतात. डॉ म्हात्रे - मृत्यु पुर्वीच्या विषयावर आपली चर्चा सुरु होती. देहदान विषयावरच्या आपल्या म्हणण्याला मी दुजोराच दिला आहे. केवळ सुरवात तिथुन होती म्हणुन मी आपले नाव घेतले इतकेच. यार्कर यांनी I Hope कि मिपावर सगळे well educated आहेत. असे लिहले म्हणुन मी उच्च शिक्षीत व्यक्तीचा हवाला देत पुढचे लिहले. प्रकाश घाटपांडे त्यांनी मृत्यु पुर्वीच्या विषयाला मृत्युनंतर देहदान अशी बगल दिली . मृत्युनंतर जिवात्मा आणि शरीर वेगळे होतात. त्यांनी शरीरासंदर्भात लिहले म्हणुन मी मृताम्या संदर्भात लिहले. लिहताना माझे स्वतः चे संशोधन नसल्यामुळे त्या संदर्भात डॉ प वि वर्तकांच्या पुनर्जन्म पुस्तकाचा उल्लेख केला. हा केला रे केला की मंगळ येणार हे उघड होते म्हणुन त्यावरही लिहले. आता मुळ विषयावर चर्चा सुरु रहाण्यास हरकत नाही.

In reply to by नितीनचंद्र

सुक्ष्म देहानी पाकीस्ताना त जाऊन दाऊद कुठे लपला आहे ते रॉ/छोटा राजन /अजित डोवल ह्यांना सांगण्याची विनंती करणार का वर्तक साहेबांना ( त्यांना डॉक्टर म्हणणे बरोबर वाटत नाही )

In reply to by प्रसाद१९७१

दाउदचा ठावठिकाणा सरकारला नीट माहीत आहे. प्रश्ण त्याला पकडून आणण्याचा किंवा मारण्याचा आहे. त्यासाठी सुक्ष्म देहाचा उपयोग नाही. तिथे "टायगर" सल्लुमिया, एजंट विनोद सैफ किंवा कमांडो अक्षयकुमार यांना पाठवायला हवे.

In reply to by एक सामान्य मानव

अहो मालक - ते उपहासानी लिहीले होते. मला इतकेच म्हणायचे होते की जर मंगळावर जाऊन निरीक्षण करण्यापेक्षा इथल्याच मानवजाती साठी उपयोगी पडतील अशी निरीक्षणे केली वर्तक बाबांनी तर कीती बरे होईल. अमेरीके ने ओसामाचा ठावठीकाणा शोधण्यासाठी कीती कष्ट केले, त्यापेक्षा भारतानी अमेरीकेला वर्तक बाबा १ दिवस भाड्यानी दिले असते तर कीती सोप्पे झाले असते.

In reply to by नितीनचंद्र

परंतु तुमच्या सारखे लोक उपहास करतील म्हणुन मग तुमच्या सारखे लोक हेटाळणी करत राहिले मी उपहास केला किंवा हेटाळणी केली हे अनुमान कशावरून काढलेत?

हे शोधायला डॉ वर्तकांची आवश्यकता नाही. त्याला मारण्याचा प्लॅन मुंबई पोलीसांनी फोडला आणि तो वाचला ही कथा वाचली असेलच. तुम्ही त्यांना डॉ म्हणले नाही म्हणुन काही बिघडणार नक्कीच नाही. वैशम्य अशाचे की त्यांचे लेखन न वाचता हे लिहायचे.

जिवात्म जगाचे कायदे नावाचे पुस्तक एका पारशि स्त्रि ने लिहिले आहे. तिचे जुळे मुलगे अपघातात एकदम गेले त्यानंतर तिचे अनुभव यात सांगितले आहेत. पुढे आत्म्याचे काय होते, त्यांच्या हि लेवल असतात वगेरे आहे.

कहि वर्षापूर्वी तरुण भारत या व्रुत्तपत्रात गूढ्जाल नावाच एक सदर येत असे. त्याचे लेखक बहुदा अ.वि.साठे होते.(९९% खात्रि आहे पण १% नाहि. जाणकार प्रकाश टाकतिलच.) त्यात अशा विषयावर लेख येत असे. अब्राहम लिन्कन आणि त्याच भूत हे प्रकरण तिथेच कळाल. तसच अत्रे यान्च्या बाबत हि कळाल. ते गेल्यानन्तर त्यान्च्या बन्ग्ल्यात ते नोकराला हाका मारत असत अस ऐकिवात आहे.

मनुष्य मृत्यू पावतो म्हणजे नेमके काय होते? तो जिवंत असतो म्हणजे काय असते? हे चैतन्य म्हणजे नेमके काय? मी कोण आहे? असे प्रश्न मला पुर्वीही पडत असत. अलिकडे ही पडतात. विज्ञान या प्रश्नाकडे कसे पहाते? अध्यात्म कसे पहाते? तत्वज्ञान कसे पहाते? असो शतकानुशतके हे प्रश्न असेच आहेत

In reply to by प्रकाश घाटपांडे

मनुष्य मृत्यू पावतो म्हणजे नेमके काय होते? तो जिवंत असतो म्हणजे काय असते? हे चैतन्य म्हणजे नेमके काय?
+१

In reply to by प्रकाश घाटपांडे

नमस्कार प्रकाशजी, मृत्यू नंतर काय किंवा मृत्यू म्हणजे काय या प्रकरणी विज्ञान, अध्यात्म आणि तत्वज्ञान काय म्हणतात हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे म्हणून सुचवतो. प्रा अद्वयानंद गळतगेंची यावर तिन्हीअंगांनी विपुल लेखन केले आहे. ते वाचले तर काही खुलासे होण्यासाठी मदत होईल. आपल्याला गळतगे सरांचे वावडे नसेल तर इतर तपशील सांगता येईल.

In reply to by शशिकांत ओक

गळतगे सरांचे लेखन परिचित आहेच. त्यांची काही मते पटत नसली तरी त्यांच्याविषयी आदर आहेच. विपुल, चिकाटीने व सातत्याने लेखन हे फार कमी लोक करतात. मी,रिसबूड व ते असा पत्रव्यवहार आठवतो. त्यांच नवीण विज्ञान व अंधश्रद्धा निर्मूलन पुस्तक वाचायला पाहिजे एकदा. http://www.bookganga.com/eBooks/Books/details/5607134768146518443?BookN…

In reply to by प्रकाश घाटपांडे

नमस्कार प्रकाशजी, जेंव्हा आपण (कै रिसबुड आणि तुम्ही) हे पुस्तक वाचा म्हणून आम्ही म्हटलं तेंव्हा वाचलेत कि नाही माहित नाही. कदाचित असेल. पण आता ही वाचायची उत्सुकता आहे ते ही चांगले आहे. नाडी ग्रंथांवर आपले विचार सध्या काय आहेत माहिती नाही. पण प्रत्यक्षात प्रमाण पहायला, आपले नाव वअन्य माहिती घेतली पाहिजे आहे. ती घेतली काय? आता माझा इंटरेस्ट संपला आहे. असे म्हणून आपण पळ काढू शकत नाही. कारण आपले नाडीग्रंथांचे खंडन करणारे पुस्तक बाजारात उपलब्ध आहे. म्हणून नाडी ग्रंथांवर 'मला काय त्याचे?' अशी भूमिका घेऊन चालणार नाही. म्हणून आपल्याला विनंती करतो आहे.

In reply to by शशिकांत ओक

आता माझा इंटरेस्ट संपला आहे. असे म्हणून आपण पळ काढू शकत नाही. कारण आपले नाडीग्रंथांचे खंडन करणारे पुस्तक बाजारात उपलब्ध आहे.
असेल ना! त्यातील मते सर्वांना पटतील असे नाही हे ही उघड आहे. पण ती कोणत्याही परिस्थितीत पटलीच पाहिजे असाही आग्रह नस्तो. तेच तेच प्रतिवाद करण्याचाही कंटाळा येतोच की! प्रतिवाद केला नाही म्हणजे पळ काढला अशी समजूत कोणी करुन घेतली तर घेवो. राजा भिकारी माझी टोपी चोरली राजा घाबरला माझी टोपी दिली ही गोष्ट आपल्याला माहित असतेच. आपली मते मधून मधून तपासत राहावी त्यात बदल करावासा वाटला तर तोही करावा असे माझे मत आहे. विज्ञानात अंतिम सत्य शाश्वत सत्य अशी भानगड नस्से. आता काही विज्ञानांध ही लोक असतात. असो!

In reply to by प्रकाश घाटपांडे

आपण असे म्हणता का की मी नाडीग्रंथ प्रत्यक्ष अनुभवून पाहून मत तपासणी करून बदल करायला तयारआहे. तर वरील इश्वरन यांनी केलेले निवेदन वाचून पूर्व ग्रह न ठेवता प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा प्रयत्न करावा ही विनंती.

In reply to by शशिकांत ओक

आपण असे म्हणता का की मी नाडीग्रंथ प्रत्यक्ष अनुभवून पाहून मत तपासणी करून बदल करायला तयारआहे
मी अस म्हणालोच नाही. मी फक्त एक जनरल विधान केल. त्याचा तुम्ही तो अर्थ काढलात. माझी नाडी सापडलीच नव्हती तेव्हा. असो पण त्यासाठी वेळ व श्रम खर्च करायची तयारी नाही. कारण त्यात रस नाही. प्राधान्यक्रमावर ही ते नाही