वृद्ध मातापित्यांची समस्या
एकत्र कुटुंबपद्धतीच्या घरांमधे वृद्धांचा प्रश्न फारसा त्रासदायक नव्हता. पणज्या, आजी-आजोबा, आई-वडील, काका-काकू, मुलं, नातवंडं सगळीच मंडळी एका घरात रहायची. घरात अनेक माणसं असल्यामुळे वृद्धांना एकटेपणा काय ते माहित नव्हतं, घरातले कर्ते पुरूष पैसा कमावण्यासाठी घराबाहेर असायचे, स्त्रिया घर चालवण्याच्या (ज्याला आपण आता बॅकएंड किंवा पडद्याआडची कामं म्हणू शकतो) कामात गर्क असल्या तरी पोरांकडे लक्ष द्यायला आजी-आजोबा होतेच, अतिवृद्धांची काळजीही घरात घेतली जायची.
औद्योगिकीकरणानंतर ही परिस्थिती झपाट्याने बदलत गेली. आपल्या मूळ गावात नोकरी-धंदा नसल्यामुळे किंवा त्यात आवड नसल्यामुळे अनेक मुलं आणि कालांतराने मुलीही तालुका, शहरांच्या ठिकाणी येऊन राहू लागल्या. मुलं जगण्याची शक्यता खूपच वाढली, त्याचबरोबर घरांच्या, स्थावर मालमत्तांच्या किंमतीही वाढल्या, विशेषतः शहर आणि आजूबाजूच्या भागात. आता एकत्र कुटुंब असणं जागा कमी असणे, जीवनपद्धतीमधला फरक यामुळे थोडं कठीण होतं आहे.
पण त्याच्याच जोडीला इतर अनेक घटकांच्या बरोबरीनेच आधुनिक औषधांच्या मदतीने जीवनमान उंचावत आहे. एकेकाळी माणसांची साठी आली की उत्सव असायचा, आता आपल्या आजूबाजूला ऐशी वर्ष जगणारे अनेक वृद्ध दिसतात. पण अनेक कारणांमुळे मुलग्यांबरोबर रहाणं वृद्ध मातापित्यांना शक्य नसतं. एकच अपत्य आणि ती मुलगी असणं, पुरूष अपत्य नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने मूळ गावापासून फार लांब किंवा परदेशात असणं आणि परगावी, परदेशात अजिबातच न करमणं, व्यक्तीस्वातंत्र्याच्या पुरूष अपत्यांच्या कल्पना इत्यादी अनेक कारणांमुळे वृद्ध पालकांवर आपल्या लग्न झालेल्या मुलीकडे रहाण्याची वेळ येऊ शकते.
तसंही मुलीचं बाळंतपण माहेरी करण्याची पद्धत आहे. जेव्हा मुलीला काही कारणांमुळे माहेरी येऊन रहाणं शक्य नसतं तेव्हा तिचे पालक तिच्याकडे जाऊन रहातात आणि कौतुकाने मुलगी आणि नातवंडांची देखभाल करतात. जर हे शक्य आहे तर म्हातारपणाची काठी म्हणून मुलीकडे का पाहू नये? मुलगी-जावयानेही (मुलीच्या) वृद्ध पालकांची देखभाल का करू नये?
-------
जाता जाता: (घरच्या घरी केलेलं एक निरीक्षण. या निरीक्षणात आई-मुलींच्या साधारण दहा जोड्याच अंतर्भूत आहेत, पण सगळीकडे एकसारखंच निरीक्षण आढळलं म्हणून नोंदवावसं वाटलं.) विभक्त कुटुंबात, जिथे नवरा-बायको एकत्र रहात आहेत आणि पुढे मुलं झाल्यानंतर ती, तिथे घरातल्या पद्धती या मुलीच्या घरासारख्या होतात. उदा: घरचं जेवण बनवण्याची पद्धत; आई भाजीत गूळ घालत नसेल तर मुलगीही घालत नाही. मुलीचा नवरा घरी स्वयंपाक करत असेल तरीही मुलगी त्याला तिच्या आवडीप्रमाणेच जेवण बनवायला शिकवते/सांगते. पुरूषप्रधान व्यवस्थेत घर पुरूषाचं असतं पण आतला बहुतांश किंवा सर्व कारभार मुलीच्या घरासारखा असतो.
तर मग मुलाने सासर्याकडेच रहाण्यास काय हरकत आहे? तिथे सासर्याची सहानुभूतीही मिळेल आणि सासू कौतुकही करेल. ;-)वर्गीकरण
प्रतिक्रिया
छान
नायल्या मेल्या
+१
काय करावं या म्हातार्यांच बुवा!
कारुण्य
एवढ्या सगळ्यांनी सगळं बोलून
च्यायला!!!
वेगवेगळी उत्तरे
खरे तर मला आजपर्यंत कधीच
इतके मोकळे विचार अलीकडे स्त्रियांच्याच पचनी पडत नाहीत असे वाटते.
शिवाय स्वतःची सांपत्तिक
पैसे जास्त हवे असणं हे
'अमुक' विधानाच्या उलटेच
लग्नाच्या बाजारात
- गोरी आणि सुंदर बायको हवी.
- किमान ५-१० तोळे सोनं तिच्या अंगावर पालकांनी घालायला हवं.
- सासूसासर्यांच्या आज्ञेत राहणारी हवी
- बँकेत नाहीतर शाळेत नोकरी करणारी हवी
अशा अटी येत. मुलीकडच्यांनी अपेक्षा मांडल्या तरी त्यात दम नसे, तडजोड अधिक असे. आता परिस्थिती बदलली आणि दोन्ही कडून अटी येणे सुरू झाले, निदान तेथे समानता येऊ पाहते आहे ते उत्तम झाले.>> आता परिस्थिती बदलली आणि
लग्नाच्या बाजारात
लग्नाच्या बाजारात आता अटी
यावरून आठवले... (समांतर अवांतर)
जन्माला आलेल्या मुलींना खचाखच
कार्यकारणभावाबद्दल साशंक
गट अ आणि ब हे साहजिकच वेगळे
असे बोला ना!
वाद घालण्यासाठी आज मी सापडले
बरीचशी सहमत आहे.
?
ठीक. 'असले' म्हणजे नेमके
गोरी आणि सुंदर बायको
चांगला चर्चा प्रस्ताव.
एका भरटण्याची शक्यता असलेल्या
बर्याच जणानी परदेशात स्थाईक
धागा तेवत कसा ठेवावा याचे
तीनाचा इरॅशनल अपूर्णांक.