Skip to main content

ज्योतिष - आह्वानकर्त्यांना एक निवेदन

लेखक युयुत्सु यांनी मंगळवार, 09/08/2011 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
एक निवेदन मला मिसळपाव वर वारंवार आह्वाने देण्यात येतात आणि मी ती स्वीकारत नाही अशी पण तक्रार सारखी ऐकायला मिळते. म्हणून मी आह्वाने स्वीकारायचे ठरवले आहे. परंतु ते काही सुटसुटीत अटींच्या चौकटीत बसत असेल तरच... - आह्वानकर्त्याना बर्‍याच वेळेस आपण दिलेले देत असलेले आह्वान "योग्य" आहे की हे कळायची पण अक्कल नसते असे लक्षात आले आहे. तेव्हा अशी आह्वाने एका स्वतंत्र समितीकडून तपासण्यात यावीत. या समितीत ज्योतिषी आणि ज्योतिषनिंदक यांचा समसमान सहभाग असावा. ही समिती आह्वानांची योग्यता ठरविण्यासाठी काही कसोट्या निश्चित करेल. अशा समितीने आहवान योग्य असल्याचे प्रशस्तीपत्रक दिल्यावरच ते आह्वान मी माझ्या अभ्यासाच्या कक्षेत येत असेल तर ते मी स्वीकारेन - मी आह्वान स्वीकारल्यावर मला प्रत्येक जन्मतारखेसाठी रू, ५००/ (रु पाचशे) एवढे आह्वानशुल्क माझ्या बॅंकेत जमा करावेत. हे शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.या शुल्कावर योग्य तो कर भरायची माझी तयारी आहे. समितीच्या सदस्यांच्या मानधनाची व्यवस्था आह्वानकर्त्याने करावी. - दिलेल्या आह्वानातिल विदा संगणकावर जमा करण्याची व्यवस्था आह्वानकर्त्याने करायची आहे - आह्वानांतर्गत विश्लेषणासाठी लागणारी सर्व गणनसाधने आह्वानकर्त्याने उपलब्ध करून द्यायची आहेत. - समितीचे सर्व कामकाज उघड असावे. त्यांची इंटरनेटवरील एखाद्या ब्लॉगवर यथाकाल नोंद व्हावी, जेणे करून कोणती आह्वाने योग्य आहेत कोणती स्वीकारली गेली आहेत ते जनतेला समजेल. या माझ्या मूलभूत अटी आहेत. गरज पडल्यास यांना पुरवणी-अटी जोड्ण्यात येतील.

वाचने 25527
प्रतिक्रिया 114

प्रतिक्रिया

निकष साधारणतः असे - तुम्हाला व्यक्तीची जन्मतातीख्, जन्मवेळ आणि ठिकाण सांगितले जाईल. त्यावरून तुम्हाला पुढील बाबी सांगायच्या आहेत - १) सदर व्यक्ती स्त्री आहे का पुरुष २) सदर व्य्क्ती जिवंत आहे का मृत ३) सदर व्यक्ती अविवाहित आहे/होती का विवाहीत ४) सदर व्यक्तीस स्वतःची अपत्ये होती का नाही ५) ..... (इतरांनी यादीत भर टाकावी. किमान १० प्रश्न तरी व्हावेत) असे १० व्यक्तींबाबत करावे. थोडक्यात एकूण १०० प्रश्न (१० x १०). त्यावरून यशाची टक्केवारी काढता येईल.

In reply to by युयुत्सु

बरोबर आहे.. ज्यांच्या बाबतीत अंदाज चुकतील त्यांचे पैसे बुडायचेच. पण ज्यांच्या बाबतीत अंदाज बरोबर येतील त्यांना समाधान मिळेल की जोतिष्य हे थोतांड नव्हे.... पण तुम्हाला काय मिळणार सुनिलकाका? बुडीतखात्यावाल्यांच बहुतेक त्या लिष्ट मध्ये नाव आलं असेल. :)

In reply to by युयुत्सु

दहापैकी पाच किंवा जास्त उत्तरे चुकली तर पेनल्टी म्हणून ५०,००० रु. परत दिले पाहिजेत!

In reply to by सुधीर काळे

आव्हान शुल्क वगैरे मान्य आहे मात्र जर अंदाज चुकले तर काय या बद्दल कोणीच काही बोलत नाही. अंदाज बरोबर आले तर विचारणाराने भविष्य वगैरे शास्त्र आहे यावर विष्वास बसेल मात्र अंदाज चुकले तर भविष्य सांगणारा हा व्यवसाय सोडून देईल आणि भविष्य सांगणे वगैरे निव्वळ थोताम्ड असते असे चार जणांना सांगेल का?

In reply to by विजुभाऊ

व्यवसाय सोडणे वगैरेची जरुर वाटत नाही. निदान काय ते स्पष्ट होण्याच्या दृष्टीने पाऊल उचलले जाईल हेसुद्धा थोडे नाही. त्या निकालातून येणारे तथ्य पाहून लोकच ठरवतील काय मानायचे ते.

In reply to by गवि

हे आव्हांन लोकांनी दीले असल्याने ते स्विकारणार्‍या व्यक्तीला जर ते झेपलं नाही तर पेनल्टीची सोय असलीच पाहीजे. आव्हान स्विकारणार्‍या व्यक्तीच्या कश्टाचा योग्य मोबदला देऊ पण त्याबरोबरच सदरील व्यक्तीवरही कोणते तरी दडपण आवश्यक आहे नाही तर सदरील आव्हान स्विकारत बसणे व पैसे कमवणे हा पोरकटपणाचा खेळ बनेल. खरे तर एखादी गोश्ट आव्हान असेल तर आर्थीक लाभ हा केवळ जिंकणार्‍याच्या बाजूने असावा , हारणार्‍याने स्पर्धा केल्याबद्दल पैसा मीळावा अशी अवास्तव मागणी ठेऊ नये .
त्या निकालातून येणारे तथ्य पाहून लोकच ठरवतील काय मानायचे ते.
लोकानी आताही ठरवले आहेच काय मानायचे आहे ते मग आता यूयूत्सूनां हारण्यासाठी पैसा का द्यावा ?

In reply to by युयुत्सु

युयुत्सुंच्या ह्या अटींवरून असे वाटते की हे गृहस्थ काय ज्योतिष-बितिष सांगतात म्हणजे लोकांवर लई उपकार करतात! "ह्या अटी मान्य नसतील तर पुरवणी अटी आहेत" वगैरे- एकदम माजोरडी भाषा आहे!! लोक काय ह्याला सीरियसली घेत बसलेत, राव?! "यस्य कस्य तरोर्मूलं येन केनापि मर्दितम् | यस्मै कस्मै प्रदातव्यं यद्वा तद्वा भविष्यति || - कोणत्यातरी झाडाची मुळे घ्यावीत, ती कशाने तरी ठेचावित, कुणालाही द्यावित, काहीतरी नक्की होईल." हेच ज्यांचं तत्त्वज्ञान आहे त्यांच्यासाठी कशाला वेळ फुकट घालवायचा म्हणतो मी?

बघा सुनील भौ निघाला की नाही तुमची अक्कल?

योग्य ठिकाणी आह्वानशुल्क मागितलेत. इतर काही नाही तरी तुमचे बँक बॅलन्स भक्कम होईल असे माझे भाकित आहे. ;)

शुल्क भरणारे बिन अकलेचे आहेत असे म्हणायचे आहे का तुम्हाला?

मी आह्वान स्वीकारल्यावर मला प्रत्येक जन्मतारखेसाठी रू, ५००/ (रु पाचशे) एवढे आह्वानशुल्क माझ्या बॅंकेत जमा करावेत. हे शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही.
हेच वदवून घेण्यासाठी देवा, केला अट्टाहास :) बाकी आम्ही अंमळ वायझेडच असल्यामुळे आपण दिलेले देत असलेले आह्वान "योग्य" आहे की हे कळायची पण आम्हाला अक्कल नाही. त्यामुळे आम्ही इथेच थांबतो. तेव्हढं आमच्या कमिशनचं बघा. नाही म्हणायला यात आम्हीही तुम्हाला विरोध करुन का होईना पण मदतच केली आहे. ;)

आव्हानशुल्क हा प्रकार विचित्र वाटला. ते कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही हे पण. आव्हान / टक्केवारी / उपयुक्तता वगैरे सर्व बाजूला ठेवून एक पद्धतशीर ट्रायल म्हणून पाहता येईल का? यात एकच ज्योतिषतज्ञ असून उपयोग नाही. ट्रायल अशी व्हावी की त्यात या पद्धतीची सेन्सिटिव्हिटी / स्पेसिफिसिटी / रीप्रोड्युसेबिलिटी / क्रॉस ट्रायल असे सर्व आले पाहिजे. ज्योतिषविरोधक आणि ज्योतिषसमर्थक अशा प्रकारच्या तटबंदींनी ते व्हायचे नाही. दोन वेगळे ज्योतिषी. दोन असंबंधित वेगळे मनुष्यगट (एकाच प्रमाणित संख्येइतके उदा. १०, स्त्री पुरुष एकसमान संख्येने. वयाबाबत रँडम डिस्ट्रिब्युशन पण ज्योतिष्यांना माहीत नसलेले. पूर्ण अनामिक.) -इनपुट म्हणून दिले जाणारे स्टँडर्ड पॅरामीटर्स (जन्मतारीख, वेळ, ठिकाण, अक्षांश, रेखांश आणि काही आवश्यक असल्यास ते..पण आधी ठरवून घेतलेले आणि निश्चित फॉर्मॅटमधे) -आउटपुट म्हणून ज्योतिष्यांकडून येणारे स्टँडर्ड पॅरामीटर्स (मृत्यूचे स्टेटस, विवाहित स्टेटस (हे जन्मतारखेवरुन बर्‍यापैकी ओळखण्यासारखे असते, चाळिशीपुढेही अविवाहित राहणे दुर्मिळ आहे. त्यामुळे वेगळा पॅरामीटर घेता येईल..), नोकरी धंद्याविषयी माहिती, परदेशगमन, शारिरिक स्वास्थ्याविषयी इतिहास आणि स्थिती इत्यादि.. ठरवून घेतलेले) दहा जणांचा एक गट एका ज्योतिष्याकडून तपासला जाईल. मग तोच गट दुसर्‍या ज्योतिष्याकडून तपासला जाईल. यापैकी निम्मे (पाच) लोक प्रत्येक गटातून फॉल्स पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह टाळण्या/तपासण्यासाठी आपली जन्मतारीख चुकीची देतील किंवा एकमेकांची देतील. खरेच गांभीर्याने ट्रायल घेण्याची असल्यास तशी नीट घेता येईल. पण घेणार्‍याने किंवा देणार्‍याने कोणीच आपण आव्हान देऊन किंवा स्वीकारून फार मोठे आउट ऑफ द वे जाऊन काहीतरी करतो आहोत अशा अ‍ॅटिट्यूडने करता कामा नये. आपल्या मार्गावर आपला विश्वास आहे आणि त्याला एक प्रमाणीकरण मिळावे म्हणून करायचे असेल तर त्यात अर्थ आहे.

ते कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही हे पण.
पेशंट मेला तरउपचारांचा खर्च परत केला जातो का? आहवान स्वीकारल्यावर मला डोकंफोड करावी लागणार आहे. त्यांचे कॉंम्पेन्सेशन मला मिळालेच पाहिजे.

In reply to by युयुत्सु

मुद्दा प्रथमदर्शनी पटण्यासारखा. पण तेच उदाहरण पुढे नेऊन म्हणतो की क्लिनिकल ट्रायल्स (उंदीर किंवा मनुष्य कोणावरही) करताना फक्त एमओयूसदृश काही केले जाते. पेशंटकडून ट्रायलच्या औषधाचे पैसे किंवा शुल्क घेतले जात नाही, किंवा पेशंट्सही क्लिनिकल ट्रायलमधे भाग घ्यायला मिळावा / मिळाला म्हणून काही रक्कम भरत नाहीत. संशोधकाच्या बाजूने औषधाची जेन्युइनिटी सिद्ध झाल्यावर होणारे भावी उत्पन्न त्याठिकाणी धरलेले असते , पेशंटच्या बाजूने या उपायाने काही बरे झाले तर चांगले, त्याबदल्यात या परिक्षण न झालेल्या औषधाची रिस्क घ्यायला मी तयार आहे, अशी विचारपद्धती असते. ज्योतिषविषयक अशा "परीक्षा", "आव्हाने" यांच्या चर्च्या खूप झाल्या आहेत. तुम्ही अशी स्पष्ट कसोटी करून त्यातले तत्व सिद्ध केलेत तर नीट प्रसिद्धी देऊन तुम्हाला त्याचा लाभ घेता येईल (एक व्यवसाय म्हणून हवा असल्यास. हा व्यवसाय आहे हे तर तुमच्या शुल्काच्या अपेक्षेवरुन स्पष्टच आहे.) पण अशी टेस्ट घेताना स्वतःच्या अनेक अटी घालणे आणि त्यातून टेस्ट अवघड करणे हे नक्कीच आपल्या पद्धतीविषयी खात्री नसल्याचे लक्षण आहे. समजा अगदी काटेकोर गणिती सिद्धता नाही झाली तरी निदान प्रमाणित एरर काय आहे ती तरी कळेल..!

In reply to by गवि

पेशंटकडून ट्रायलच्या औषधाचे पैसे किंवा शुल्क घेतले जात नाही,
मी आह्वानकर्त्याकडुन शुल्क मागत आहे. जातका कडुन नाही. क्लिनीकल ट्रायल कोणी चॅरीटी म्हणून करत नाहित. करणारे त्यांचा मोबदला घेतातच. शिवाय एकतर्फी अटी कोणता व्यावसायिक घालत नाही? मीच काय पाप केलं आहे?

In reply to by युयुत्सु

होय केला जातो- डॉक्टर ची चूक आहे असं सिद्ध झालं तर! बाकी मेडिकल सायन्स आणि ज्योतिषी थोतांड याची तुलना तुम्ही कुठल्या आधारावर केलीत? तुम्ही ज्योतिष चुकल्यावर पैसे परत करता का? जर करत नसाल- आणि ते ही भोन्दूगिरी करून- तर मेडिकल शास्त्राकडून ही अपेक्षा कशासाठी करता?

डॉक्टर आपल्या स्पेशलायझन ची मिपा वर जाहिरात करत नाही.

In reply to by विनायक प्रभू

डॉक्टर आपल्या स्पेशलायझन ची मिपा वर जाहिरात करत नाही.
ते मिपावर जाहिरात करत नाहित हा त्यांचा प्रश्न आहे. पण ते जाहिरातच करत नाहीत असे म्हणायचे असेल तर मात्र माझा त्याला आक्षेप आहे.

काका, ज्योतिषशास्त्रात काही अर्थ आहे हे सिद्ध होणे ही आव्हानकर्त्याची गरज नाही, असलीच तर तुमची गरज आहे. त्यामुळे सर्व भुर्दंड त्याने भरायचा हे जरा अजबच आहे. एकूणच कुणी तयार होणार नाहीत अशा अटी घालू आणि मग "मी आव्हान स्वीकारायला तयार होतो, कुणी पुढे आले नाही" असा युक्तिवाद करायला आपण मोकळे राहू अशी विचारसरणी दिसते.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

असलीच तर तुमची गरज आहे.
ही माझी गरज आहे हे तुम्ही परस्पर कसे ठरवलेत? मला त री काहीही सिद्ध करायची गरज नाही.

In reply to by युयुत्सु

>>ही माझी गरज आहे हे तुम्ही परस्पर कसे ठरवलेत? मला माहित असलेली माहिती आणि थोडासा तर्क यावरून खालील प्रमाणे १) तुम्हाला ज्योतिषशास्त्रात गती आहे आणि तुम्ही त्यासाठी लोकांकडून मानधन घेऊन त्यांना माहिती / सेवा देता २) अनेक लोकांचा ज्योतिषावर विश्वास नाही म्हणून ते त्याच्या वाटेला जात नाहीस (शिवाय प्रसंगी -ve पब्लिसिटी पण करतात) ३) ज्योतिषशास्त्रात तथ्य आहे हे सिद्ध झाले तर वरीलपैकी काही / अनेक जण या सेवांचा लाभ घेऊ इच्छितील. ४) त्यामुळे ज्योतिषशास्त्रात गती असणाऱ्यांची मागणी वाढेल. ५) मुद्दा १ आणि मुद्दा ४ यांची सांगड घातली असता, तुमचा फायदा होईल असे कळते. ६) म्हणून असलीच तर ही तुमची गरज आहे. >>मला तरी काहीही सिद्ध करायची गरज नाही. मग धागा काढायचे प्रयोजन काय होते?

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

या प्रश्नाचे उत्तर मूळ मजकूर वाचलात तर मिळायला हरकत नाही. बाकी तुमचं तर्कशास्त्र कवीच्या कल्पनाशक्तीपेक्षा अजब आहे एव्हढच म्हणेन.

In reply to by युयुत्सु

>>या प्रश्नाचे उत्तर मूळ मजकूर वाचलात तर मिळायला हरकत नाही तुम्ही म्हणालात म्हणून परत एकदा धागा वाचला. खालील एक वाक्य वरील संदर्भात लागू पडते. पुढे अटी सुरु होतात. "मला मिसळपाव वर वारंवार आह्वाने देण्यात येतात आणि मी ती स्वीकारत नाही अशी पण तक्रार सारखी ऐकायला मिळते. म्हणून मी आह्वाने स्वीकारायचे ठरवले आहे." १) इथे मला खालील गोष्टी कळल्या. तुम्ही आव्हाने स्वीकारत नाहीत हि तुमच्या विरुद्ध सर्वसाधारण तक्रार आहे. २) अशी तक्रार आपल्याविरुद्ध व्हावी हे तुम्हाला खटकले (कृपा करून खटकले नाही म्हणू नका). ३) ही तक्रार मुळातूनच रद्दबातल करावी म्हणून तुम्ही आव्हान स्वीकारायचे ठरवेल आहे. इथे तक्रार होते तुमच्या विरुद्ध, ते खटकते तुम्हाला, म्हणून तुम्हीच आव्हान स्वीकारता आहात. मग हे आव्हान स्वीकारणे ही तुमची गरज का नाही? तुम्ही समाजसेवा म्हणून तर नक्की करत नाही आहात (तसे असते तर फुकट केले असतेत किमान) >>बाकी तुमचं तर्कशास्त्र कवीच्या कल्पनाशक्तीपेक्षा अजब आहे एव्हढच म्हणेन तर्कशास्त्र आमचे नाही हो. कालिजात शिकवले होते. १२वी ला. कला आणि विज्ञान दोन्ही शाखांना शिकवतात. तुम्हाला पण शिकवले असेलच की. नसेल तर व्यनी करा, मी शिकवतो, ते पण फुकट, ५०० पैसे पण नाही घेणार. बाकी कवी होण्याचे म्हणाल तर इच्छा खूप होती, पण माझ्या पत्रिकेत कवी होण्याचा योग नाही असे एकाने सांगितले, म्हणून नाही होऊ शकलो. ;-) तळटीप :- मी पराकोटीचा विज्ञाननिष्ठ नाही आणि १००% पत्रिका द्वेष्टा पण नाही. त्याबद्दल पुन्हा कधीतरी.

In reply to by विश्वनाथ मेहेंदळे

श्री मेहेंदळे
अशी तक्रार आपल्याविरुद्ध व्हावी हे तुम्हाला खटकले
ही परत एक कवि-कल्पना
३) ही तक्रार मुळातूनच रद्दबातल करावी म्हणून तुम्ही आव्हान स्वीकारायचे ठरवेल आहे.
ही दूसरी कविकल्पना मी आह्वान स्वीकारायचे ठरवले (विशिष्ट चवकटीत) एव्हढेच यातले सत्य आहे.

ओ युयुत्सु, त्या श्याम मानवांनी लाखांचं आव्हान दिलंय. तिकडे जाऊन करा काय खरं-खोटं ते. इकडे उगाच अ.श.पु.प्र. करू नका. त्यांचे आव्हान स्विकारून व त्यानंतर हरवून त्यांना गप्प करा मग इकडचे ’बेअक्कल’ लोक तुमच्यासारख्या ’अक्कलवान’ लोकांची पूजाच बांधतील. अवांतर: ते श्याम मानव डिपॉझिट वगैरे काही चार्ज करत नाहीत बहूतेक. भारी समर्थ

In reply to by भारी समर्थ

त्या श्याम मानवांनी लाखांचं आव्हान दिलंय
श्याम मानवांना माझ्या अटी मान्य असतील तर त्यांनी माझ्याशी संपर्क करावा.

In reply to by युयुत्सु

सत्य आणि शास्त्र हे निर्विवाद असतात असं ऐकलं होतं. आणि तुम्हाला ज्योतिष हे शास्त्र आहे ह्याची पूर्ण खात्री आहे ना, मग तुम्ही का नाही त्यांना अप्रोच करत राव. शिवाय तुमच्या काय अटी आहेत ते तरी कळू द्या. आणि एवढाच तुमच्या शास्त्रावर तुमचा विश्वास आहे ना, तर मग एक कराच काका. श्याम मानवांची फेसबुक प्रोफाईल आहे. त्यावर तुमच्या अटींसह त्यांना आव्हान स्विकारल्याबद्दल सुचित करा. आणि काय ती प्रोग्रेस आहे त्याची अपडेट देत र्‍हावा. इकडे मानवांएवढे निष्णात ’ज्योतिष-किलर’ नसावेत बहुदा. अवांतर: तुमची प्रोफाईल पाहिली. ’आयआयटीयन’ जोतिष? काय राव उपाध्ये काका? भारी समर्थ

In reply to by भारी समर्थ

शिवाय तुमच्या काय अटी आहेत ते तरी कळू द्या
इतक रामायण झालं तरी रामाची सीता कोण म्हणून विचारता?

In reply to by युयुत्सु

सत्य आणि शास्त्र हे निर्विवाद असतात असं ऐकलं होतं. आणि तुम्हाला ज्योतिष हे शास्त्र आहे ह्याची पूर्ण खात्री आहे ना, मग तुम्ही का नाही त्यांना अप्रोच करत राव. शिवाय तुमच्या काय अटी आहेत ते तरी कळू द्या.
तुमच्या अटी काय आहेत हे शाम मानवांना कळू दया असे त्यांना म्हणायचे असावे.

In reply to by धन्या

तुमच्या अटी काय आहेत हे शाम मानवांना कळू दया असे त्यांना म्हणायचे असावे.
श्याम मानवांचा ज्याना कळवळा आहे त्यांनी हे कष्ट घ्यायला काहीच हरकत नाही.

In reply to by युयुत्सु

या माझ्या मूलभूत अटी आहेत. गरज पडल्यास यांना पुरवणी-अटी जोड्ण्यात येतील.
ही पुरवणी सीता कवा भाइर काडणार? आणि श्याम मानवांच्या प्रोफाइलवर जाऊन आव्हान केव्हा स्विकारणार ते बोला काका. कारण कसं आहे ना, इकडे पैसे वगैरे भरून तुम्हाला खोटं वगैरे पाडण्या च्या फंदात कोणी पडेल असं वाटत नाही. मानवांचं आव्हान तुम्ही स्विकारलत ना, की दुधाचं दुध आन् पाण्याचं पाणी होईल. आणि मी तुमच्यापेक्षा वयाने बराच लहान असल्याने मला अरे-तुरे केल्यास माझी हरकत नाही. जमल्यास खालील दुवे पाहून आपल्या प्रतिक्रिया संबंधितांकडे जरूर कळवाव्यात. बाकीही बरंच आहे. पण तुर्तास एवढच. भारी समर्थ

मिपावर जाहिरात करत नाहीत आणि त्याचा आर्थिक फायदा घेत नाहीत. बाहेर काय करतात ह्याच्याशी मला काहीही देणे घेणे नाही. तुम्ही तशी सुरवाती पासुन करताहात हा आक्षेप आहे. त्या बाबत तुम्ही सोयिस्कर मौन बाळगत आहात यूयूस्तू राव.

In reply to by विनायक प्रभू

मी माझा सल्ला मागायला या असे मिपावर कधिही म्हटल्याचे आठवत नाही. असे अ सताना मी जाहिरात केलि असे कसे म्हणता तुम्ही.

असलीच तर तुमची गरज आहे.
ही माझी गरज आहे हे तुम्ही परस्पर कसे ठरवलेत? मला त री काहीही सिद्ध करायची गरज नाही.

In reply to by युयुत्सु

...आपल्या ज्योतिषविषयक सेवेची गरज येथे कोणालाच आहे, असे वाटत नाही. सबब, (गरज असल्यास) आपल्या तेलाच्या बाटलीचा खर्च आपणच उचलावा, आणि (आपले नाही तरी आपल्या ज्योतिषविषयक लेखांचे) प्रस्थान येथून हलवावे, हे उत्तम, असे सुचवावेसे वाटते.

In reply to by पंगा

का म्हणुन युयुत्सुंनी त्यांचे इथले लेखन हलवावे? जर कुणाला पटत नसेल तर त्यांनी त्यांच्या धाग्यांना प्रतिसाद देउ नयेत. जर त्यांच लेखन मिपाच्या धोरणांत बसत नसेल तर त्या बाबतीत सर्वाधिकार संम आणि संचा यांचा आहे.

In reply to by गणपा

असे सुचवावेसे वाटते.
बाकी चालू द्या.

In reply to by गणपा

पंगा यांचे विधान आधीच्या संवादाच्या संदर्भाने ओघात आलेले असावे असे मला वाटते. .. "असलीच तर तुम्हाला आहे" "मला सिद्ध करण्याची गरज नाही" तर मग "..त्याचप्रमाणे..." मला वाटते त्यांना ते विधान इफ देन स्वरुपात म्हणायचे असावे.

In reply to by पंगा

अरेरे पंगाशेठ, तुमचं वैचारीक अधःपतन होतंय... ही वैचारीक, तात्विक चर्चा आहे... त्यामुळे ती कोणत्याही परिस्थीतीत वैयक्तिक होऊ नये असे आम्हांस वाटते. त्यांनी त्यांच्या अकलेप्रमाणे आपली अक्कल काढली म्हणून आपण का त्यांच्याच पातळीवर जाऊन त्यांचे लेखन काढण्यास सुचवावे? त्यांनी गाय कापली म्हणून आपण का वासरास कापावे? असो. सुज्ञांस अधिक सांगणे न लगे :)

In reply to by धन्या

त्यांनी गाय कापली म्हणून आपण का वासरास कापावे?
कारण आम्हालाही ष्टेक आवडते म्हणून. बाकी चालू द्या.

In reply to by धन्या

युयुत्सुराव, तुमचा तोल गेला असे खेदाने म्हणावेसे वाटते...
माझा तोल गेला असे मला वाटत नाही. त्यांनी ्तेलाची भाषा वापरली मी मिरच्यांची वापरली. फिट्टंफाट.

धोरणात बसत असेल तर माझ्या सर्व प्रतिक्रिया सखेद परत. नसेल तर बाटली चा खर्च माझा. रें गणपा बाद वे तुझे आवडते तेल कोणते? (पाकृ करता वापराबद्दल बोलतोय हो)

In reply to by विनायक प्रभू

रें गणपा बाद वे तुझे आवडते तेल कोणते?
कॉड लिवर ऑइल? ;)

प्रत्येकाचे ज्ञान वेगवेगळ्या गोष्टीत असते. काहींचे कलेमध्ये असते, काहींचे ज्योतिषामध्ये काहिंचे विज्ञानामध्ये. मला असे वाटते ज्या गोष्टीचे आपल्याला ज्ञान नाही त्याच गोष्टींसाठी इतरांची परिक्षा पाहण्याची आपली कुवत नाहि असे समजुन आपण वागले पाहिजे. पुढच्याच्या गोष्टी आपल्याला पटत नसेल(किंवा पुढची व्यक्ती योग्य वाटत नसेल) तर त्याकडे दुर्लक्ष करावे, हा जर कोणी आपल्याला वयक्तीक येवुन आपले म्हणणे ठासुन सांगत असेल तर वेगळी गोष्ट. पण मिपा म्हणजे स्वत:चे हक्काची जागा नाहि. त्यामुळे वयक्तिक कोणावर काही आरोप केले असतील तर त्याने प्रथम बोलावे. उगाच हा जाहिरात करतो तो जाहिरात करतो हे सांगणे हे संपादकिय मंडळींचे काम आहे इतरांचे नाही. @ युयुत्सु मला असे वाटते, आपले ज्ञान आपल्या कार्यात छान आहे, आपण जी शक्ती .. वेळ येथे उत्तरे देण्यात घालवत आहात, तोच वेळ तुम्ही तुमच्या कामात घालवला तर तो सत्कारणी लागेल. या काळात एका जरी व्यक्तीसाठी तुम्ही योग्य योगदान देवु शकला तर येथे १००० रिप्लायमध्ये जे सांगताल त्या पेक्षा जास्त आनंद मिळेल असे वाटते. आपल्या बद्दल शंका नाहि... पण . ---------- असो थांबतो. मला स्वताला भविष्याबद्दल जास्त स्वारष्य नाहि.. त्यामुळे ज्योतिषाच्या धाग्यावर जास्त काथ्याकुट कधीच करत नाहि मी.. पण मला चांगले माहित आहे की वेळ्प्रसंगी मी स्वताही ज्योतिषाचा सहारा घेतला आहे. त्यामुळे कुठल्या गोष्टींकडे किती कधी आणि का लक्ष द्यायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.

In reply to by गणेशा

मला स्वताला भविष्याबद्दल जास्त स्वारष्य नाहि.. त्यामुळे ज्योतिषाच्या धाग्यावर जास्त काथ्याकुट कधीच करत नाहि मी.. पण मला चांगले माहित आहे की वेळ्प्रसंगी मी स्वताही ज्योतिषाचा सहारा घेतला आहे.
गणेशाभाऊ, वरच्या तीन वाक्यांमधील मधलं वाक्य काढलं की परस्परविरोधी दोन वाक्ये एका पाठोपाठ एक येतात. :)

In reply to by गणेशा

@गणेशा - युयुत्सुंची जाहिरात नक्कीच होते आहे असे वाटते. (संपादक म्हणून म्हणत नाही, सध्या सुटीवर असल्याने). लोकांना आधी भिती घालायची (अमूक पौर्णिमा अनर्थकारी आहे) आणि मग आपल्या ब्लॉगकडे बोलवायचे हा युयुत्सुंचा नेहमीचा खाक्या झाला आहे. जे अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात ते युयुत्सुंना त्यांच्या सेवेचे ग्राहक म्हणून मिळत असतील. यातून जो वैयक्तिक थेट आर्थिक फायदा त्यांना होतो आहे त्याबद्दल मिपाला कसलेही मानधन मिळत नाही किंवा युयुत्सु मिपाला ग्राहक मिळवून दिल्याचे नावापुरतेही क्रेडिट देत नाहीत. मी युयुत्सुंना जे आव्हान दिले होते त्याला उत्तर असे मिळाले http://misalpav.com/node/18744#comment-328880. यात जे तांत्रिकी कारण असल्याने माझे आव्हान ते घेत नाहीत ते नक्की काय आहे? जे सॉफ्टवेअर वापरून एवढी मोठी लिस्ट त्यांनी बनवली आहे तशी लिस्ट त्यांना मागते आहे. ती वन इन टू मेनी असली तर आत्ता दिलेली लिस्टही वन इन टू मेनी आहे. मिपाकरांचे नुसते नव्हे तर मिपाकरांच्या मित्रांचे, सुहृदांचे आणि आप्तांचे वाढदिवस त्या मोठ्याच्या मोठ्या लिस्टमध्ये आहेत. नीट पाहिले तर युयुत्सुंचे सॉफ्टवेअरच त्यांना भरपूर क्लायंट मिळवून देते आहे हे कळेल. त्यांच्या उत्तरातही काही दम नाही. त्यांच्या सॉफ्टवेअरप्रमाणे खरे तर जन्मतारखेवरून घातदिन आणि घातदिनावरून जन्मतारीख कळायला हरकत नाही. तरी युयुत्सु गंमत म्हणून हे करायला तयार आहेत आणि त्यासाठी ते आता पैसे मागत आहेत हे गंमतीचे आहे. @ युयुत्सु: >>पेशंट मेला तरउपचारांचा खर्च परत केला जातो का? आहवान स्वीकारल्यावर मला डोकंफोड करावी >>लागणार आहे. त्यांचे कॉंम्पेन्सेशन मला मिळालेच पाहिजे. हे लॉजिक कळले नाही. तुमचे 'उपचार' वैज्ञानिक आहेत किंवा काही कसोट्यांवर घासून सिद्ध झाले आहेत, रीपीटीटिव आहेत असा तुमचा दावा आहे का? आणि उत्तरासाठी डोकेफोड करण्याची काय गरज? तुमच्या प्रसिद्ध सॉफ्टवेअरमध्ये केवळ तारखा घालायच्या आणि उत्तर काढायचे एवढेच काय ते. आव्हान देणार्‍या व्यक्तीकडून पाचशे घ्यायचे याचा अर्थ त्याला ग्राहक करून घेतल्याशिवाय काही करायचे नाही. मुळात जी व्यक्ती आव्हान देते ती तुमचा ग्राहक होण्यास नकार देत असते. आधीच अशा व्यक्तीकडून पैसे काढायचे याची गंमत वाटते. इथे जाहिरात केली म्हणून आव्हानाचा प्रश्न आला. तुम्ही जाहिरात करू नका, तर आम्ही आव्हान देत नाही. इतके सगळे साधे असताना हा प्रकार म्हणजे आव्हानापासून पळून जाणे आहे.

In reply to by चित्रा

त्यांच्या उत्तरातही काही दम नाही. त्यांच्या सॉफ्टवेअरप्रमाणे खरे तर जन्मतारखेवरून घातदिन आणि घातदिनावरून जन्मतारीख कळायला हरकत नाही. तरी युयुत्सु गंमत म्हणून हे करायला तयार आहेत आणि त्यासाठी ते आता पैसे मागत आहेत हे गंमतीचे आहे.
चित्रातै, तुम्ही इतकी पराकोटीची गल्लत कराल असे मला वाटले नव्हते. "समग्र ग्रंथ वाचल्यावाचून" या उक्तीची आठवण झाली. माझे सॉफ्ट्वेअर काय करते आणि काय नाही हे प्रत्यक्ष न बघता तुम्ही ही विधाने कशी काय केलीत. तसेच एक प्रयोग मी अपवाद म्हणुन "गंमत" म्हणून स्वीकारायला तयार आहे पण अनेक प्रयोग/आह्वाने मी फुकट स्वीकारावीत हे सध्या तरी मला शक्य नाही.

In reply to by युयुत्सु

सॉफ्टवेअर नसल्यावर तुम्ही भविष्य वर्तवूच शकणार नाही हे तुम्हीच मान्य केले आहे. http://www.misalpav.com/node/18744#comment-329035

In reply to by चित्रा

चित्रा जी, प्रथमता आपण संपादक मंडळात आहात हे माहित नव्हते( ऐकुन छान वाटले.) दूसरी गोष्ट माझे हे म्हणणे नाहियेच की ते जाहिरात करत नाहि. त्यांना संपादक मंडळ का उत्तर देत नाहि ते कळत नाही त्यामुळे मग असे वयक्तीक रोश.. रिप्लाय येत राहतात आणि मग संपुर्ण मिपा जे एकदम छान लिखानानी सजलले असते ते असल्या धाग्यात आरोप गृप यांच्या मागे लागते. बाकी मला एव्हडेच म्हनावयाचे होते. तुम्हाला व्यक्ती आवडत नाहि किंवा त्यांनी चालवलेल्या कृती तर तुम्ही त्या व्यक्तीस तसे बोला पण त्याच्या ज्ञानावर, अभ्यासावर, भले सॉफ्टवेअर असो नाहि तर काही पण पध्दतीवर विनाकारण बोलु नये. माझ्या मते व्यक्तीला शिव्या दिल्या तरी चालतात पण त्याच्या कार्यावर किंवा कलेवर्(कलाकार असला तर) आघात केला तर ती व्यक्ती कधीच शांत बसत नाहि. आपण सर्वांनी मिपाच्या सिमामध्ये राहावे हिच इच्छा होती. वयक्तीक माझे मत ( मुद्दामुन लिहितो नाहि तर विनाकारण गृपबाजी बोलतात म्हणुन स्पष्ट लिहितो) हे आहे की, युयुत्सु यांनी असे धागे टाकलेले मला अजिबात आवडत नाहि.. मी शक्यतो त्या धाग्यांवर जात नाहि आणि गेलो तरी विशेष काही लिहित नाहि.. पण संपादक मंडळ काही म्हणत नाहि तर आपण वयक्तीक लेवल ला जावुन का बोलायचे. जर आपल्याला नाहि आवडले तर तसे व्यव्स्थीत संपादक मंडळाला सांगावे. असे नसेन तर उद्या कोन्ही उठेल आणि काहि म्हणेन. (कृपया मला हे म्हणाय्चे नाहि मी खालील थ्रेड चा नियमित वाचक आहे) एखादा म्हणेन कलादालनात कायम स्वताच्या बागेतलेच फोटो देणारे धागे बंद करा. एखादा म्हणेन शेतकर्‍यांचे प्रश्न घेवुन उगाच सारखे तेच तेच लिहुन स्वताचे मत मांडणे बंद व्हावे. एखादा उठुन बोलेन रोज हा अमुक का कविता टाकतो. हे प्रश्न सांपादक मंडळाकडुन सोडवले नाहि गेले तर वातावरण खराब होते आहे. असो कोणीही माझे रिप्लाय वयक्तीक घेवु नये. आणि हा धनासाहेब. त्या ३ ओळीनंतरची चौथी ओळ पण वाचा की त्याबरोबर.

In reply to by गणेशा

प्रथम अनेक धन्यवाद, कारण तुम्ही इथे स्पष्ट आणि खरेखुरे मनापासून आलेले लिहीले. तुमच्याप्रमाणेच मलाही या धाग्यांवर येण्याचा उत्साह नसतो. पण युयुत्सु यांनी टाकलेली मोठी लिस्ट बघून राहवले नाही. एक स्पष्टीकरण देते - ग्रहतारे यांचा अभ्यास, अगदी हवेतर जन्मवेळेचा आकाशस्थ ग्रहांचा नकाशा मांडणे चुकीचे आहे असे मी समजत नाही. माझे मत यापुढच्या फलज्योतिषासंबंधी आहे.कुंडलीत अमूक ठिकाणी हा ग्रह असला म्हणजे अमूक एक फळ मिळते असे समज लोकांमध्ये असतात. यामुळे अनेकांची लग्ने मोडली आहेत. अनेक मुलींना मंगळाच्या मुली म्हणून आयुष्यभर मन मारून लग्न न करता राहावे लागले असेल. अनेक तरुणांचे थोराड पुरुष होईपर्यंत विवाह झालेले नाहीत. आणि कुठचीतरी शांत केली की असे ग्रह सुधारतात, वेडावाकडा प्रभाव टाकत नाहीत असे समज आयुष्यभर धरून आपण किती खुजे आयुष्य जगत राहतो. किती ठिकाणी स्वतःला बंदिस्त करून घेत असतो. हे सर्व लक्षात घेतले तर कळेल ही कला महत्वाची नाही.कुंडली मांडण्याइतपतच मदत घेतली तर वेगळे आहे, पण पुढचे फळ सांगून आपण मुले जन्मल्यापासून त्यांना कुठच्यातरी दूरस्थ ग्रहांच्या विळख्यात अडकवून टाकतो, त्यांचे आयुष्य खुलण्याआधीच भितीने दाबून टाकतो. युयुत्सुंच्या कलेचा उपयोग अमूक तारीक किती सुखाची आहे हे सांगायला ते कधी का करत नाहीत असा विचार करून पहा. ते असे करत नाहीत याचे कारणभितीपोटी ग्राहक मिळतात. सुखात असताना कसले आले आहेत ग्राहक?* (*नंतर जोडलेली टीपः युयुत्सु यांनी शुभकारी अमावस्येबद्दलही लिहीले आहे. पण तेथे त्यांना ग्राहक मिळवण्यासाठी थेट लिहावे लागलेले आहे. http://misalpav.com/node/15999 येथे "पैकी कुणाला जन्मपत्रिकेचे एबर्टिनप्रणित तंत्राने विष्लेषण करून हवे असेल तर माझ्याशी ई-मेल (**)वर संपर्क साधावा. हे विश्लेषण फक्त इंग्लिश मध्ये पुढील काही दिवस माझ्या ब्लॉगच्या वाचकाना नि:शुल्क करून मिळेल. काही विशिष्ट समस्यांसाठी मार्गदर्शन हवे असल्यास त्यासाठी शुल्क भरावे लागेल." असे म्हटलेले दिसले. ) तुम्ही जे काही म्हटले आहे - उदा. बागेतले फोटो, कविता, या सर्व कला, एक्स्प्रेशन आहेत. त्या मनाला आनंद देतात, आपली जगाकडे बघण्याची बुद्धी विकसित करतात. त्यातून जाहिरात झाली तरी म्हणूनच मिपावरील कोणी फारसा आक्षेप घेतलेला दिसणार नाही. युयुत्सु यांच्या या लेखांना कलेचा आविष्कार म्हणवत नाही. ते कधी आकाशस्थ ग्रहांचा नकाशा कसा तयार करायचा यावरून लेख टाकतात का? त्यांची खरी कला तेव्हा दिसेल जेव्हा ते काही शिकवतील, नुसतीच भिती घालणार नाहीत. सॉफ्टवेअरबद्दल लिहीले कारण ते जे न्यूरल नेटवर्क वगैरे लिहीत आहेत ते लोकांना आकर्षित करून घेण्याचे उद्योग आहेत. न्यूरल नेटवर्क हे या फलज्योतिषासाठी कसे वापरतात, कसले ऑप्टिमायजेशन करतात हे सगळे त्यांनी जरूर सांगावे, तर त्यांची ही कला आहे हे मी मान्य करेन. असो. बाकी मी अधिक लिहीत नाही. मला वातावरण गढूळ करण्याची इच्छा नाही. गैरसमज नका करून घेऊ. आणि तुम्ही-मी म्हटले म्हणून युयुत्सु लेख लिहायचे थांबवणार आहेत का? :-)

In reply to by चित्रा

सदस्य युयुत्सु यांच्याकडून जाहिरात होते आहे, आणि मिसळपावावर होऊ नये याबाबत अनुमोदन. वरील मुद्द्यांबाबत चित्रा यांचे समर्थन करतो आहे.

आज युयुत्सुंची हालत १७५(१५४) चेंडुत अशी काहीशी होणार असं दिस्तंय.... पण तरीही सामना ऑसीच जिंकतील... काय म्हंता ??? वाकडे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.....

युयुत्सुंना कॉर्नर करण्याचा प्रयत्न ! निषेध !! युयुत्सु काका 'कुणी वंदा कुणी निंदा....' असे म्हणत तुम्ही तुमचे कार्य चालु ठेवा बरे. उगाच शब्दानी शब्द कशाला वाढवायचा ? तुम्ही सगळ्यांचे एकाचवेळी समाधान करु शकणार नाही हे तर सत्य आहे ना ? मग कशाला विनाकारण वादाल वाद वाढवायचा ? एकदा सष्ट शब्दात सांगायचे. लोक पटवून घेतील नाहीतर तुमच्या सामर्थ्याची टिंगल तरी करतील. जे टिंगल करतील त्यांना करु द्या. योग्य वेळेची वाट बघा :)

परा, तुमचा प्रतिसाद आवडला. पण काय आहे की आह्वान देण ही एक गंभीर गोष्ट असा वी असं मला वाटतं. उगीच कुणिही बेछुट आरोप करावेत हे मला मान्य नाही. मला मात्र ही चर्चा ऐतिहासिक ठरेल असे मला वाटते