काल मुंबईवर आतांकवादी हल्ला झाला...नेहमीप्रमाणेच.. खरंतर हे दुर्दैव की 'नेहमीप्रमाणे' हा शब्द वापरावा लागावा! :(
आधी बसलेला धक्का, मग दु:ख, मग उद्वेग आणि शेवटी चीड या क्रमाने माझ्या भावना बदलल्या. मग सुरू झाले ते प्रतिक्रीयांचे पूर. "नालायक सरकार" पासून ते "कसाब" आणि "षंढ समाजा"पासून ते "परकीय शत्रु" पर्यंत मी अनेकांना दुषणे दिली. आणि तुमच्या-माझ्यासारख्यांच्या या कोलाहलाचे रुपांतर "सरकार" या आपल्यातील एका संस्थेला टारगेट करण्यात झाले. सरकारचा यावेळी दोष आहे की नाहि हे तूर्त बाजूला ठेवले तरी हे नाकारता येणार नाही सरकार दहशतवादाशी दोन हात करण्यात अयशस्वी ठरलं आहे हे नक्की!
पण फक्त सरकार अपयशी ठरलं आहे म्हणून आपण वेगळे राहु शकतो का? सरकार अपयशी ठरलंच मात्र अहेही तितकंच खरं आहे की सरकार आपल्यातूनच बनलंय. तेव्हा, गेल्या अनेक वर्षातील घडामोडी बघता हे स्पष्ट आहे की कोणतेही सरकार असो, आपण भारतीय समाज म्हणून दहशतवादाशी लढण्यात अपयशी ठरलो आहेत. (ज्यात सरकार आले, सरकारी संस्था आल्या व तुम्ही-आम्हीही आलोच)
मात्र प्रश्न असा पडतो की या दहशतवादाशी लढायला आपल्याकडे काय योजना आहे? या दहशतवादाशी कसं लढावं?
यासाठी काहि उपाय अनेकदा सुचवले जातात
उपाय१: बहुतांश अतिरेकी शेजारील देशांतून येतात तेव्हा त्या देशांवर हल्ला करून 'एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लाऊन टाकावा'. असं षंढासारखं जिण्यापेक्षा / अश्या भ्याड हल्ल्यात मेल्यापेक्षा युद्धात मेलेलं काय वाईट? किंवा अतिरेकी क्यांपांवर हल्ला करून 'एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लाऊन टाकावा' किंवा कसंही करून कोणती तरी 'अग्रेसीव' अॅक्शन घेऊन 'एकदाचा काय तो सोक्षमोक्ष लाऊन टाकावा' (मात्र युद्ध करून हा प्रश्न सुटेल की चिघळेल याचे उत्तर चिघळेल असेच येते)
उपाय२: चर्चा हाच प्रश्न सोडवण्याचा एकमेव मार्ग आहे. सरकारने विविध घटकांशी चर्चा करून हा प्रश्न सोडवावा. (मात्र अतिरेकी चर्चेस तयार नाहीत, त्यांच्या मागण्या माहित नाहित, असल्याच तर त्या कोणतेही सार्वभौम राष्ट्र मान्य करु शकणार नाही मग चर्चा कसली करायची?)
उपाय३: अंतर्गत बचाव (संरक्षण) फळी सक्षम करणे. गुप्तहेर, स्पेशन कमांडोज, प्रगत पोलिसिंग वगैरे वगैरे (काहि प्रमाण योग्य वाटते. मात्र किती व कसे याची उत्तरे नाहीत. शिवाय हा बचावात्मक पवित्रा असल्याने इतके करूनही हल्ला होण्याचा धोका आहेच. अनेकांना भारताने या मुद्द्यावर बचावात्मक होऊ नये असे वाटते)
तेव्हा चर्चेसाठी प्रश्न असे आहेतः
- वरीलपैकी एखादा उपाय तुम्हाला योग्य वाटतो का? नसल्यास तुमच्यामते काय उपाय आहे?
- दहशतवादाला प्रभावीपणे संपवू शकेल असा प्रॅक्टिकल उपाय मुळात भारतीय समाजाकडे आहे का?
वाचने
29273
प्रतिक्रिया
100
मिसळपाव
प्रतिक्रिया
चांगली चर्चा आहे
उपाय
हम्म....या धाग्यावर मारे लोक
सहमत आहे. त्याच प्रमाणे ज्या
In reply to हम्म....या धाग्यावर मारे लोक by शिल्पा ब
+१०००००
In reply to सहमत आहे. त्याच प्रमाणे ज्या by नितिन थत्ते
तुमचं पुराण चालू द्या...
In reply to +१००००० by sagarparadkar
उपाय !!
(१) लोकसंख्या नियंत्रणात आणा.
उपाय १ अतिशय जालीम आहे. पण
हो नक्कीच आहे.
प्रचंड सहमत
In reply to हो नक्कीच आहे. by निनाद
उपाय २ व उपाय ३ व शिस्त
पुरवणी
३. न्यायव्यवस्था वेगवान
In reply to पुरवणी by ऋषिकेश
प्रदीर्घ (उन्हाळी) सुट्ट्या आणि रिक्त पदे.
In reply to ३. न्यायव्यवस्था वेगवान by ३_१४ विक्षिप्त अदिती
मी वेगळ्या दृष्टीकोनातून वेगवान म्हणतोय
In reply to ३. न्यायव्यवस्था वेगवान by ३_१४ विक्षिप्त अदिती
अमेरिकेच्या धर्तीवर आपले प्रयत्न बेतावेत असे मला वाटते
जरी या प्रतिक्रीयेवर प्रतिसाद
In reply to अमेरिकेच्या धर्तीवर आपले प्रयत्न बेतावेत असे मला वाटते by सुधीर काळे
नाहीं तर आहेच "ये रे माझ्या मागल्या"!
In reply to जरी या प्रतिक्रीयेवर प्रतिसाद by ऋषिकेश
क्षमस्व.
In reply to नाहीं तर आहेच "ये रे माझ्या मागल्या"! by सुधीर काळे
अमेरीका
In reply to जरी या प्रतिक्रीयेवर प्रतिसाद by ऋषिकेश
समारोप
मात्र सरकारवर असाच
In reply to समारोप by ऋषिकेश
हल्ला अशा जागी करायचा कीं सार्या जगाची सहानुभूती आपल्यामागे हवी
In reply to मात्र सरकारवर असाच by समंजस
'एक षंढ राष्ट्र' अशी आपली जगातील प्रतिमा बदललीच पाहिजे!
शक्य वाटत नाही
In reply to 'एक षंढ राष्ट्र' अशी आपली जगातील प्रतिमा बदललीच पाहिजे! by सुधीर काळे
अपना-अपना खयाल है!
In reply to शक्य वाटत नाही by ऋषिकेश
दहशतवादी कुणा (कुणा) ला म्हणावे?
पेशवे साठ लाख, ऐशी लाख घेऊन
In reply to दहशतवादी कुणा (कुणा) ला म्हणावे? by चित्रगुप्त
अँ?
In reply to दहशतवादी कुणा (कुणा) ला म्हणावे? by चित्रगुप्त