Skip to main content

ब्राह्मणांनी आत्मपरीक्षण करावे भाग -१

लेखक अजातशत्रु यांनी शनिवार, 14/05/2011 22:25 या दिवशी प्रकाशित केले.
सुरुवात करण्याआधी त्या वादग्रस्त लिखाणा बद्दल- श्री.खेडेकर यांनी जे काही लिखाण केले आहे, ते अश्लाघ्य,आक्षेपार्ह, द्वेषमूलक आणी विशेषत:स्त्रियां बद्दल विकृत स्वरुपात असल्यामुळे कोणत्याहि विवेकशील माणसाला आवडणार नाही, त्याचं कुणी समर्थनहि करणार नाहि.असे लिखाण फक्त समाजात दुरावाच निर्माण करेल, त्यामुळे त्यावर शासनाने बंदि घालावी असे माझेहि मत आहे, ब्राह्मणस्त्रियांनी इतर समाजा वर अन्याय/अत्याचार केल्याचे वाचनात/ऐकिवात नाहि कारण त्यांनाहि इतर समाज/शुद्र या बरोबर गुलामित जगावे लागत असे, त्यामुळे विरोध,राग ब्राह्मण्याला असू शकतो संपुर्ण जात समुहाला असता कामा नये, थोर समाजसुधारक महात्मा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सुध्दा ब्राह्मणशाहिला विरोध केला,म्हणजे ब्राह्मण्याला केला ब्राह्मणांना न्हवे,ब्राह्मण्यवाद हि व्याख्या त्यांचीच,त्यामुळेच तर त्यांना त्यांचे कार्य साध्य करता आले हे कुणीहि नाकारु शकत नाहि. सद्य काळात नेहमीच ब्राह्मणांना शिव्या-शाप देणं आरोप करणं याला सुध्दा काहि अर्थ नाहि. कारण सगळेच ब्राह्मण वाईट अत्याचारी न्हवते, एक उदा.स्वातंत्र्य पुर्व काळात जेव्हा स्वातंत्र्य लढ्याच्या/समाजहिताच्या ज्या काहि चर्चा/बैठका गांधींच्या आश्रमात, मुस्लिम लीग,हिंदु महासभा या संघटनांच्या कार्यालयात चालत त्या चर्चा/बैठका या अत्यंत गुप्तपणे चालत आणी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या परेल येथील कार्यालयात व पुढिल मैदानात उघडपणे चालणार्‍या चर्चा/बैठका यात जमिन अस्मानाचा फरक होता त्या मुळे बाबासाहेबांच्या विद्वत्तेला, चारित्र्याला व कर्तुत्वाला मोहून अनेक सवर्ण हिंदु व्यक्ती त्यांच्याकडे आकर्षित झाल्या होत्या, ते जाणत होते की जातीभेद हे थांबायला हवे बदलायला हवे,हि फार मोठी ऐतिहासीक गोष्ट होती,त्या सवर्ण हिंदुंचे मन मोठे होते म्हणुन हे घडु शकले त्यामुळे त्यांच्या नावांचा उल्लेख इथे करावाच लागेल १. अनंत चित्रे २.गं नी.सहस्त्रबुद्धे ३.बॅ.समर्थ ४.देवराव नाईक ५.प्रिन्सिपोल दोंदे ६.प्रो.व्ही.जी.राव ७.ए.बी गजेन्द्रगडकर ८.डि.व्हि.प्रधान९.राव बहादुर बोले १०. दादासाहेब केळूसकर ११. प्रा.मनोहर चिटणीस १२.रेगे १३.प्रिन्सिपल सुरबा टिपणीस. हि नावं काय दर्शवितात ? यात काही राहून गेली असतील ज्यांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष पाठींबा मिळाला असेल, या वरुन तरी सर्वच सवर्ण हिंदु/ब्राह्मण हे अहंकारी अत्याचारी न्हवते असे म्हणता येते, मग सरसकट ब्राह्मणांच्या नावाने कंठशोष करण्यात काय हशील? तसेही लोकसंख्येच्या प्रमाणात ब्राह्मण वर्ग आहे किती ३:५/४ टक्के,म्हणजे लोकसंख्ये नुसार बहुजनच जास्त आहेत (त्यामुळे बहुजन आणी अभीजन हे २ वर्ग निर्माण झाले असावे) मग अशा प्रकारच्या द्वेषावर आधारीत चळवळी उभारुन हे कोणती संस्कृती जपत आहेत? आणी यातून कोणती नवीन आदर्श समाज व्यवस्था निर्माण करनार आहेत? ते एकदा जाहिर करा,तुम्हाला तुमचीच धर्म/ राजकिय सत्ता हवी आहे, एका धिकारशाहि हवी आहे? पण हे विसरु नका इथे लोकशाही आहे, लक्षात असू द्या ज्या चळवळी,पक्ष कोणत्याही गोष्टिचा अतिरेक करतात त्या ज्या गतीने लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचतात त्याच तिव्रतेने त्या रसातळाला जातात,वर्तमानात द्वेषावर आधारीत पक्ष/संघटना/ चळवळ भविष्यात कधिच टिकू शकत नाही हा इतिहास सर्वज्ञ आहे, हिटलरची चळवळ ही द्वेषावर आधारीत होती, नाझी धर्मसत्ता स्थापन करण्यासाठी त्याने हजारो लाखो ज्यु लोकांची अमानुषपणे कत्तल केली, या अत्यंतीक द्वेषामुळे तो संपला व त्याची चळवळ हि संपली.! देशात हिटलरशाहि असावी असे माननार्‍या आणी लोकशाहिला सुरुवाती पासून विरोध करणार्‍या शिवसेनेलाहि पक्ष स्थापन करण्यासाठी आपल्या तत्वात बदल करुन शेवटी लोकशाहिच मान्य करावि लागली, थोडं विषयांतर आहे पण सुरुवातीच्या काळात उठाव लुंगी बजाव पुंगी अशी क्याच लाईन घेऊन मराठी माणसां साठी चळवळ करणार्‍या शिवसेनेचे साऊथइंडीयन/गुजराथी(शेटजी-भटजी)हे लोक प्रामुख्याने टार्गेट होते, (तेव्हा भय्यांची संख्या नगण्य होती नाहितर तेहि असते) त्यांच्याविरुद्ध भावनीक राजकारण करुन मराठी माणसासाठी पक्ष स्थापन करणार्‍या शिवसेनेला शेवटि आपल्या ध्येय धोरणात बदल करावे लागले आज हेच लोक सेनेत आहेत, १९७७ च्या निवडणूकीत शिवसेनेने नवल टाटांना पाठींबा दिला. राज्यसभा व विधानपरिषदेत नेहमीच चंद्रिका केनीया,गिडवानी, जेठमलानी प्रितीश नंदी असे बिगरमराठी उमेदवार निवडून आणले. (शिवसेनेने मराठी माणसाला काय दिले यापेक्षा मराठी माणसाने शिवसेनेला किती दिले,असे जर आज कुणी विचारले तर ती अतीशयोक्ती ठरु नये) शेवटि याच मराठी माणसाने शिवसेनेला पराभवाची धुळ चारली हे जिव्हारी लागल्या मुळे दस्तुरखुद्द बाळासाहेब ठाकरेंना आपल्या अग्रलेखात मराठी माणसावर विश्वास राहिला नाही, मराठी माणसाने पाठीत खंजीर खुपसला असे म्हणावे लागले.याचा अर्थ मराठी माणूस खरच तसा मतलबी आहे?निदान जे शिवसेनेचे पारंपारीक वोटर आहेत ते? नक्कीच नाहि अहो नुसते नावं देउन आणी मराठी शाळेत शिकून मराठी माणसाचा विकास कसा होईल? शेवटि द्वेषाच अतिरेक होणं आणी ज्यासाठी आपण कार्य करत आहोत ते ध्येय-धोरण यामध्ये असलेली तफावत दुट्टपीपणा याचा हा परिणाम आहे. हिच परिस्थिती भविष्यात संभाजीब्रिगेड आणी त्यांच्या समविचारी संघटना यांचेवर येणार आहे, अशा अतेरिकी संघटनांना फार काळ लोकाश्रय मिळत नाहि,सध्या तरी त्यांच्याच संघटना/समाजात त्याच्या बद्दल सहानूभुती विश्वास अत्यल्प आहे,एक गट असा आहे ज्यांना आरक्षण नको आहे त्याने त्यांचा अहंकार दुखावला जातोय, त्यात एक गट असाहि आहे की ज्याला आंबेडकरी चळवळी बद्दल काहि देणे-घेणे नाहि उलट त्या लोकां बद्दल कटूता आणी आकसच खुप आहे,आणी एक गट असा आहे की ज्यांना यात पडायचे नाही त्यांना २ वेळ ची भाकरी कशी मिळेल याची भ्रांत असते,माहित असावे सध्या सर्वत्र सर्रास संभाजीब्रिगेड आपल्या जाहिर कार्यक्रमां मधे छ.शिवाजी महाराज,म.ज्योतिबा फुले,शाहू महाराज,आणी बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतीमा लावत असतात, या महापुरुषांच्या विचारांशी आम्हि बांधील आहोत,त्यांचे विचार आम्हि अंगीकारले आहेत,त्यांचे विचार समाजात पसरवण्याचे कार्य आम्हि करत आहोत असे म्हणून ते बहुजन समाजाची सहानूभुती मिळवून ब्रिगेड आपले इस्पित साध्य करत आहेत, दलित,मागासवर्गीय लोकांवर सर्वात जास्त अन्याय अत्याचार करणारे हे लोक आहेत हे न समजण्या इतके इथला बहुजन दुधखुळा नाहि, त्या उलट म.फुलेंची सत्यशोधक चळवळी ने तमाम स्त्रि वर्ग व दलित शुद्र वर्गाला शिक्षणाची बंद दारे उघडली, आंबेडकरांनी जी संघटना बनवली ती आंबेडकरीचळवळ हि बहुजनांच्या हक्कांसाठी सनदशीर मार्गाने लढा देनारी समतेची मूल्य जपणारी संघटना बनली, आंबेडकरांनी मनुवादाशी लढताना नेहमी विवेकाने,विचाराने, आणी आपल्या प्रकांडपांडित्याने लढा दिला आणी यात ते यशस्वीहि झाले,अशा महामानवांचे नाव घेउन आपली वैचारीक दिवाळखोरी दाखउवून विवेकहिन आणी विकृत लिखाण करुन दोन समाजात दुहि निर्माण करण्याचे काम ब्रिगेड करत आहे. (सकाळी उठले की आज बामनाला एकतरीशिवी द्यावी असे ब्रिगेडचा नित्यनेम चालू असावा) आंबेडकरांनी जर अशी खालच्या पातळीवर येउन स्त्रियांवर टिका केली असती तर ते कधी यशस्वी झाले असते का? उलट स्त्रियां विषयी तर ते खुपच Sensitive होते कुटुंबातील एक स्त्रि शिकली तर ते संपुर्ण कुटुंब शिकतं असे त्यांचे विचार होते,त्यामुळेच भारताच्या राज्यघटने मधे त्यांनी सर्व वर्गातील स्त्रियांना समान मत/समान कायदा/ घटस्फोट घेण्याची मूभा अशा तरतुदी करुन ठेवल्या अर्थात स्त्रिमुक्तीचा प्रभावी जाहीरनामा म्हणजे हिंदूकोडबिल होय. डॉ.आंबेडकरांनी हिंदूकोडबिलाचा आग्रह करून स्त्रियांवरील अन्याय दूर करण्यासाठी आणि त्यांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क मिळवून देण्यासाठी आकाशपाताळ एक केले.या कायद्याने विधिवत लावलेले आणि नोंदणी पद्धतीने झालेले विवाह कायदेशीर ठरविले. लग्नाचे वय मुलासाठी २१ आणि मुलीसाठी १८ किंवा त्याहून अधिक असावे ही तरतूद झाली.(चु.भु.) त्यामुळे कायद्यानुसारच बालविवाह मोडीत निघाले.बालविवाह बंद झाले.सतीप्रथा, विधवांचे केशवपन याबाबीही बंद झाल्या.हिंदूकोडबिल म्हणजे भारतीय स्त्रीच्या स्वातंत्र्याची सनद स्त्रि मुक्तीला कायद्याची शक्ती देऊ पाहणारे,स्त्रीमुक्तीचा जाहीरनामा असे कांतीकारी रूप असलेले,स्त्रीला समतेचे आणि स्वातंत्र्याचे पुरूषाच्या बरोबरीने हक्क देणारे हिंदुकोडबिल पास झाले तरी ते सगळ्याच तरतूदिंनी पास झाले नाहि,त्यास पं.नेहरु,कर्मठ हिंदू आणी हिंदूमहासभा जे अखंड हिंदुंचे हित जपतात त्यांनीच घेतला होता, मसुदासमिती मधील सदस्यांनीही तीव्र विरोध केला होता, पण जर मनुस्म्रुतीत असणारे कलमे घटनेत अंतर्भुत केली असती तर आजची स्त्रि हि शिक्षण,नोकरी तर दुरच घराबाहेर हि पडली नसती म.फुलेंनी,व त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठीची पहीली शाळा पुण्याच्या भिडे वाड्यात सुरु केली,विधवा/बाल विधवा आश्रम सुरु केला.त्यामुळे या महापुरुषांचे ऋण आपण कदापी विसरु नये, अशा महापुरुषांच्या नावाने चळवळ चालवून ब्रिगेड त्यांना बदनाम करत आहे, ज्यांच्या नावे संघटना स्थापन केली त्या आदरणीय संभाजी महाराज आणी छ.शिवाजी महाराज यांचे विचार,आदर्श यांचे मधे आहे का?कुठे पर स्त्रि ला आई समान माननारे छ.शिवाजी आणी कुठे हे, इतिहासात रांझ्या पाटलाची गोष्ट प्रसिध्द आहे,या गावच्या वतनदार पाटलाने एका गरिब शेतकर्‍याच्या तरण्या ताठ्या पोरीला सर्वां समक्ष उचलून नेली अन् भोगली,माती झालेल्या जिण्या पेक्षा मरण बरं म्हणून पोरीने जीव दिला,सारा गाव हळह्ळला पण मुकाच राहिला,महाराजांच्या कानी हि गोष्ट गेली,पाटलाला मुसक्या बांधून पुण्याला आणले गेले आणी हात-पाय तोडायची शिक्षा झाली, आज जर महाराज असते तर काय केले असते या ब्रिगेडचे, आज यांच्या अजेंड्या वर फक्त ब्रह्मण समाज आहे त्यांच्या बद्दल विखार इतका की कापून टाका, संपवून टाका,आणी कहर म्हणजे दंगलीची चिथावणी देणे,यावर सरकारने मुग गिळून गप्प बसणे पसंत केलेले दिसतेय, बरं उद्या सगळे ब्राह्मण (वाद) संपले किंवा भितीने ते स्थालांतरीत झाले मग पुढे अजेंड्यावर कोण? दलित-ओबिसी का भटके-विमुक्त,आदिवासी? का मुस्लिम/जैन/कॅथलिक? अशा टोकाच्या आणी ज्वलंत द्वेष असणार्‍या संघटना या देशाला घातक आहेत, इथे लोकशाही आहे आपले वाद असतील जीव्हाळ्याचे प्रश्न असतील ते चर्चा करुन सनदशीर मार्गाने सोडवायला हवेत इतर मार्ग आहेत,त्यासाठी वैचारीक लढा द्या अशा चिथावणीखोर भाषणे देउन रक्तरंजीत लढाईने जग जिंकता येत नाही, नाहि तर अजातशत्रु कधी हरला नसता;) अवांतर:स्वतः स्त्रि असून खैरलांजी सारख्या घटनेचे समर्थन करणार्‍या बाई ला हे लोक मराठा भुषण पुरस्कार देतात (त्या पिडित लोकांचे फोटो डोंबिवली स्टेशन जवळ लावले होते ते पाहूनच अंग शहारले,अगांवर काटा आला इतक्या क्रूरपणे त्यांच्यावर बलात्कार करुन त्यांचे खून केले होते आज ते पुन्हा डोळ्यासमोर आले) आणी Atrocities Act रद्द करा म्हणनारे ब्रिगेड आणी संघटना या कायद्याचा गैर वापर होतोय असा कांगावा करतात,मुळात त्या कायद्याने किती जणांना न्याय मिळाला हे पाहिलं आणी ते गुन्हे करणारे कुठल्या समाजाचे लोक जास्त आहेत हे पाहिलं तर त्याचा विरोध ते का करतात हे सुज्ञास सांगने न लगे;) (कुठल्याहि ग्रेड मध्ये नसलेला)

वाचने 47217
प्रतिक्रिया 144

प्रतिक्रिया

त्या ही पेक्षा बरीच जेष्ठ मंडळी प्रतिसादा वर प्रतिसाद का देत आहेत हेच कळत नाही. काही गोष्टी वाचायच्या आणि विसरून जायच्या असतात. BTW संपादक मंडळ काय करत आहे?

आपल्या प्रथम भागा वर साधक -बाधक चर्चा झली आहे . पुढील भागा च्या प्रतीक्शेत !!

In reply to by शाहिर

यावा अशी आपली अपेक्शा आहे काय?
आपल्या प्रथम भागा वर साधक -बाधक चर्चा झली आहे
या भागा वर काय साधले अन् काय बाधले ते कळेल काय? . . . . . . . असो, तेव्हढा वेल मिलाळा की टंकेन दुसरा भाग