नमस्कार, मी पहिल्यान्दाच मिपा वर काहि प्रकाशीत करतोय, इथे प्रकाशीत होणारे साहित्य दर्जेदार आहे, त्यामानाने माझी ही कविता कादाचीत खुपच साधारण वाटेल किन्वा उगीच यमक जुळवण्याचा प्रयत्न वाटेल, पण I think this how I will learn from your comments.
हे कधी बदलणार?
एकविसाव्या शतकातही मुलींचं अस्तित्वं अत्याचाराने तडपलेलं असतं
कारण आजही नवं-तरुणांच मनं हुंडयाच्या वासनेत अडकलेलं असतं
देशाच्या संस्कृतीचा अभिमान मिरवताना वृद्धाश्रम मात्रं भरलेलं दिसतं
ही का त्यांचीच चुक, कमावलेलं सारचं त्यांनी मुलांमधेच पेरलेलं असतं ?
कुठेतरी पटतय नव्या पिढीला, जगण्यासाठी लागतो तो फक्तं श्वासचं नसतो
उपयोग काय? नविन नि वेगळ कही करण्यावर पालकांचा विश्वासच नसतो
सत्य आणि न्याय नेहमीच पैसा नि दादागिरिच्या आड़ लपलेलं असतं
धाव घेउन घेणार कुठे? जेंव्हा हे सरकारच भ्रष्टाचाराने करपलेलं असतं
आमच्या रोजच्याच समस्येंच मुळ नेहमी कुठलतरी पक्षच असतं
बस्स! एवढच बोलून मग मुळ समस्येकडे कोणाचं लक्षच नसतं
"हे कधी बदलणार?” सारखे प्रश्न नुसत्या संवादापलीकडे कधी वळतच नाही
बदल हवेत? मग आधी स्वतः बदल, ही साधी गोष्टं प्रश्न कर्त्याला कळतच नाही
काव्यरस
| लेखनविषय: |
|---|
वाचने
1959
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
प्रतिक्रिया
सुरवात छानचं!!
चांगलंय...
छान संदेश देत आहे कविता
छान लिहिल हो तुम्हि
प्रयत्न-
बदलेल ...अण्णांच्या मागे उभे
बदलेल ...अण्णांच्या मागे उभे
In reply to बदलेल ...अण्णांच्या मागे उभे by अविनाशकुलकर्णी
+१
धन्यवाद!
तीतकी मजा नाय आली
हे कघि बदलणार ?