✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

हिदूंनो! निष्क्रिय राहू नका - स्टीफन नैप

व
विश्वास कल्याणकर यांनी
गुरुवार, 04/07/2011 - 14:40  ·  लेख
लेख
हिंदूंना ख्रिश्चन किंवा मुस्लिम धर्मामध्ये धर्मांतरित करण्याच्या भरतातील अनेक घटनांबाबत आपण अनेक वर्षांपासून ऐकत आहोत. मात्र गेल्यावेळी मी भारतात जेव्हा गेलो तेव्हा भारतातल्या परिस्थीतीबाबत चे अधिक स्पष्ट चित्र समजले. भारतातील बहुसंख्य हिंदूंना हे माहितच नाही, की हिंदुत्वाच्या विरोधात एक युध्द पुकारले गेले आहे आणि त्याचे गांभीर्य किती भयानक आहे. हिंदुत्वाला अनेक ठिकाणी अनेक मार्गांनी विरोध केला जात आहे. त्यामुळे भारतातील काही ठिकाणांमध्ये हिंदूमधील उपासनेचे प्रमाण दिवसेंदिवस घटत चालले आहे. २००१ मधील जून महिन्यात वैदिक संस्कृतीबाबात प्रवचनांच्या निमित्ताने मी भारतातील अनेक शहरांमध्ये प्रवास केला. मुंबई, नागपूर, वरंगळ, विशाखापट्टणम, विजयवाडा, हैद्राबाद, बंगलोर , त्रिवेंद्रम आणि चेन्नई येथे गेलो असताना तिथल्या काही आध्यात्मिक क्षेत्रातल्या श्रेष्ठ व्यक्तींशी माझी भेट झाली. त्यानंतर धर्मांतर हा किती भयंकर विषय आहे, हे मला समजले. मी जन्माने ख्रिश्चन आहे. माझे शिक्षण , बालपण सर्व काही ख्रिश्चन संस्कृतीत झाले. पण आता माझा ख्रिश्चन परंपरेशी काहीही संबंध राहिलेला नाही. पण मला ख्रिश्चन धर्मांतरणाची पध्दत चांगली माहित आहे. जीजसने सांगितलेल्या प्रेम आणि मानवतेच्या संदेशाचे विकृत रुप जगाच्या समोर मांडले जाते. दुसर्‍या धर्माची कायम स्वरुपी निंदा नालस्ती करण्याची ख्रिश्चन धर्मोपदेशकाची सवय असते. ख्रिश्चन सोडून इतर धर्माबाबतच अशी निंदा केली जाते, असे नाहि. ख्रिश्चन धर्मातच कैथोलिक , प्रोटेस्टंट आणि अन्य संप्रदाय एकमेकांवर अशीच चिखलफेक करत असतात. हिंदू चालीरीती, संस्कृती आणि वेशभुषा करुन भारतात खोलवर रुजलेल्या संस्कृतीमध्ये ख्रिश्चनीटी घुसवण्याचा प्रयत्न केला जातो. चर्चच्या चिन्हामध्ये कमळातुन उगवलेला क्रॉस , भगव्या वेशातील धर्मगुरु आणि काही चर्चचे बांधकाम एखाद्या मंदिराप्रमाणे असल्याचे, आपल्याला याच कारणामुळे पहावयास मिळते. हे जर असेच सुरु राहिले, तर एक दिवस भारतात हिंदूंपेक्षा ख्रिश्चन अधिक झालेले दिसतील . उत्तर भारतात प्रवास करताना ख्रिश्चन धर्मगुरु धर्मांतरासाठी करत असलेल्या अनेक युक्त्या मला समजल्या. ईशान्य भारतातील एखादा आदिवासी जर ख्रिश्चन व्हायला तयार झाला, तर त्याला पॉलिस्टरची स्वस्तातली पैंट दिली जाते. तर आपल्या भावाला ख्रिश्चन करायला मदत करणार्‍याला मोटरसायकल दिली जाते. मध्यप्रदेशात काही मिशनरी आदिवासींना व्याजाने कर्ज देतात. हे कर्ज आदिवासि परत फेडू शकत नाहीत. जर ते ख्रिश्चन झाले तर त्याचे कर्ज आणि त्यावरचे व्याज दोन्ही माफ केले जाते. मिशनर्‍यांकडून नेहमी वापरण्यात येणारी आणखी एक युक्ती म्हणजे आजारी आदिवासींना सर्वसाधारण औषध घ्यायला सांगितले जाते. त्या औषधामुळे अर्थातच काहीही गुण येत नाही. त्यानंतर योग्य औषध दिले जाते आणि जिजसच्या प्रार्थनेनंतर ते ऋंग्णाला दिले जाते. साहजिकच ऋग्णाला बरे वाटते. अर्थात त्याचे कारण औषध हे आहे. जिजसशी त्याचे काहीही घेणे देणे नाही. धर्मसभेमध्ये ख्रिश्चनेतरांना सामुदायीक उपचार करणे ही आणखी एक महत्वाची युक्ती आहे. यावेळी 'आपण आजारी असल्याचे भासवण्यासाठी' काही जणांना पैसे देऊन तयार केले जाते. धर्मसभेमध्ये त्यांना समोर बोलावले जाते आणि त्यांचे आजारपण अचानक चमत्कारासारखे नाहीसे होते, यामुळे ख्रिश्चन झाल्यास आपल्यालाही काही लाभ होऊ शकतो , असे साध्या भोळ्या आदिवासींच्या मनात आले, तर त्यात त्यांची काहीच चूक नाही. सुशिक्षीतांवर या युक्त्यांचा काहीही परिणाम होत नाही. मात्र अशिक्षीत आणि भोळ्या आदिवासींवर याचा परिणाम होतोच आणि ते ख्रिश्चनांकडे आकृष्ट होतात. म्हणूनच ख्रिश्चन धर्मगुरु हे नागरी भागापेक्षा आदिवासि भागातच धर्मांतराचे काम करतात. फसवणुकीने त्यांना आपले धर्मांतराचे काम अव्याहतपणे सुरु ठेवता येते. हे धर्मांतर बायबलमध्ये कोठेही सांगण्यात आलेले नाही. केवळ धार्मीक कारणासाठी धर्मांतरण करणार्‍यांबद्दल हिंदूंचा काहीही आक्षेप नाही पण फसवणुकीनी केलेल्या धर्मांतरणाबाबत हिंदू ना आक्षेप आहे. ख्रिश्चन झाल्यावर दलितांना कमी दर्जाच्या जातीसारखी वागणूक मिळणार नाही, असे आश्वासन नवख्रिश्चनांना दिले जाते. मात्र एकदा धर्मांतर झाल्यानंतर या आश्वासनात काहीही तथ्य नसल्याचे लक्षात येते. ख्रिश्चनांमध्ये जातीचे पडदे अधिक भक्कम असल्याचेच निदर्शनास आलेले आहे. जातीभेद ही तर ख्रिश्चनांची मानसिकता आहे. नीच जातीतल्या ख्रिश्चनांसाठी वेगळे प्रवेशद्वार , वेगळी बैठकव्यवस्था किवा अन्य व्यवस्था केल्या जातात. लहान जातीतल्या ख्रिश्चनांच्या दफनविधीसाठी सिमिट्रीही वेगळ्या असतात. याचे खरे स्वरुप समजल्यावर नव्याने ख्रिश्चन झालेले अनेक जण आपल्या मूळ हिंदू धर्मात परत येतात. त्यांना विश्व हींदू परिषद हिंदू धर्मात येण्याचा मार्ग उपलब्ध करुन देत आहे. धर्मांतरासाठी असली फसवणूक आणि दुहेरी मापदंड ख्रिश्चन नेहमी वापरतात. विश्व हींदू परिषदेने सुरु केलेल्या या शुध्दीकरणाला ख्रिश्चन नेहमीच आक्षेप घेतात. त्यांनी बर्‍याच वेळा या शुध्दीकरणाच्य विरोधात आक्रमक भूमिकाही घेतली आहे. नागालैण्ड्च्या बाप्टिस्ट कन्वेन्शनचे सचिव रेव्हरंड व्ही के नूह यांनी तसे उघड म्हटले आहे. 'जर कोणी ख्रिश्चनांवर श्र्ध्दा लादण्याचा प्रयत्न केला तर ख्रिश्चन ते सहन करणार नाहीत. शुध्दीकरणाविरोधात ख्रिश्चन युध्द करायलाही तयार आहेत.' हिंदूंच्या शुध्दीकरणाच्या चळवळीमुळे ख्रिश्चन धोक्यात आले आहेत, अशी ओरड सुरु केली गेली होती(महाराष्ट्र हेराल्ड ११/७/१९९८) ख्रिश्चनांच्या धर्माबाबत हिंदू नेहमीच सहिष्णु असतात. कारण सर्व धर्म एकाच चिरंतन सत्याकडे घेऊन जातात, असे हिंदू धर्म मानतो . म्हणून अन्य कोणत्याही धर्माला हिंदू कधीच विरोध करत नाहीत. मात्र सर्व धर्माचे मत हिंदूंप्रमाणे नाही. हिंदू संस्कृती उखडून फेकून द्यायला हवी असे काहींना वाटते. पूर्वांचलातिल आसाम, नागालैंण्ड आणि मिझोरामसारख्या राज्यांमध्ये गेल्या २५ वर्षामध्ये ख्रिश्चनांची लोकसंख्या २०० टक्के वाढली आहे. काही भागात तर हिंदू उपासना पध्दतीवरच बंदी आहे. लोकशाहीने दिलेले धार्मिक स्वातंत्र्य गेले कोठे? या भागात हिंदू उघडपणे आरतीही करु शकत नाहीत. दुर्गेच्या मूर्त्या चोरल्या गेल्या, फोडल्या गेल्या म्हणून या भागातला दुर्गापूजा उत्सव बंद झाला आहे. हा भाग भारतापासुन वेगळा करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. प्रेमाचा खरा संदेश जर कैथोलीक चर्चला सर्वांना द्यायचा असेल आणि त्याद्वारे सर्व मानवांचे जीवन प्रेममय करायचे असेल तर दुसर्‍या धर्माच्या बाबतीतही तसेच प्रेम दाखवले गेले असते. पोपनी सर्व आशिया खंड ख्रिश्चन करण्याचा संदेश दिला आहे. त्यावरुन तरी सर्व धर्मामध्ये हा प्रेमाचा संदेश दिला जाणार नाही , असेच स्पष्ट होते. ख्रिश्चनांच्या सर्व संप्रदायामध्ये हीच शिकवण दिली जात आहे. नवी दिल्लीमध्ये असताना मी 'नैशनल कमिटी फॉर वुमेन' च्या सदस्या , शांती रेड्डी यांना भेटलो होतो. भारतीयांच्या तरुण मुलांना ख्रिश्चन पळवुन नेतात असे त्यांनी मला सांगितले. गरिब आदिवासी दांपंत्याकडून त्यांची लहान मुलगी चक्क २ त ५ हजार रुपयांना विकत घेतली जात असे. हीच मुलगी नंतर परदेशात ३० तो ४० हजार डॉलरला विकली जाते. ख्रिश्चन मिशनर्‍यांच्या घरात सापडलेल्या नोंदीनुसार हा एक चांगला व्यवसाय आहे. आतापर्यंत मुलींच्या विक्रीच्या किमान २५ तरी घटना घडून गेल्या आहेत. भारतीय प्रशासनाने आतापर्यंत त्यांना मिळालेल्या माहितीनुसार ३०० मुलींना या नरकात जाण्यापासुन वाचवले आहे. ज्या कामासाठी मिशनरि जेथे काम करत असतात तेथे त्या व्यतिरीक्त असे नफा कमावण्याचे उद्योग सर्रास केले जातात. जेव्हा हिंदू अशा दुष्प्रवृत्तींच्या विरोधात आवाज उठवतात, तेव्हा त्यांना मुलतत्ववादी, संकुचित विचार करणारे आणि जातीयवादी असे ठरवले जाते. हिंदूंनी आक्रमक प्रतिक्रिया देऊ नये असे कां म्हटले जाते? भारतातील वैदिक संस्कृती हळू हळू नष्ट होत जाण्याचे , शिक्षण क्षेत्र हे आणखी एक कारण आहे. भारतीय शिक्षणक्रमा मधुन वैदिक पाठ्यपुस्तके केव्हाच हद्दपार झाली आहेत. भारतीय मुलांना या वैदिक साहित्याचा काहीही अभ्यास मिळत नाही. मात्र ख्रिश्चन मिशनर्‍यांच्या शाळेत ख्रिश्चन संस्कृतीचेच शिक्षण सक्तीने दिले जाते. उर्दू शाळेत कुराणचे आणी ख्रिश्चनांच्या शाळांमध्ये बायबलचे शिक्षण तर दररोजच दिले जाते. तथाकथित धर्मनिरपेक्ष सरकारने त्यांना याबाबत सूटच दिली आहे.मध्यम वर्गीय भारतीय याच शाळांमध्ये आपल्या मुलांना शिक्षणासाठी पाठवतात. शैक्षणिक क्षेत्रात हिंदु संस्कृती अशाने लुप्त होईल अशि भीति यामुळे वाटायल लागली आहे. 'भगवत गीता', 'रामायण', 'पुराण' आणि अन्य वैदिक साहित्य हे केवळ पुराणकथा नाहीत. जगातल्या अतिपुरातन हिंदु संस्कृतीचा एक भाग म्हणजे हे साहित्य आहे. अन्य धर्म खोटे आणि राक्षसि आहेत , केवळ जिजसचा मार्ग अंतिम सत्यापर्यंत घेऊन जातो असे ख्रिश्चन मानतात. नवी दिल्लीत 'ईस्कॉन' च्या मंदिरातले काही साधक शाळांमध्ये जाऊन मुलांना वैदिक शिक्षण देतात. 'तुमचा देव कोणता?' 'तो देव आमच्यासाठी काय करु शकतो?' असे प्रश्न तिथली मुले विचारत असतात. त्यांच्या मनात हे प्रश्न ख्रिश्चन मिशनर्‍यांनीच भरलेले असतात. धर्मांतर करण्याची ही चाल नाही का? आपल्या धर्म, संस्कृती, इतिहास आणि परंपराबाबत अनादर दाखवण्याचे विष , मिशनरीच मुलांच्या मनात पेरत असतात. भारतात सगळीकडे 'सेंट झेवियर स्कूल' नावाच्या शाळा दिसतात. हा फ्रान्सिस झेवियर कोण होता हे लोकांना माहितही नाही. तो धर्मगुरु, संत होता असेच सर्व समजतात. 'धर्मांतर केल्यानंतर माणसांना त्यांची मंदिरे आणि मुर्त्या फोडून टाकण्याचे आदेश' या झेवियरने दिले होते. 'ज्या हातांनी मूर्त्यांची पूजा केली तेच हात त्या मूर्त्या फोडून टाकतांना मला अतिशय आनंद होतो' असे त्याचे वक्तव्य होते. भारतीय संस्कृती नष्ट करण्याचेच काम त्याने आयुष्यभर केले. गेल्या ६० वर्षात भारतातल्या राजकारण्यांनीही हिंदू विरोधी धोरण राबवण्याचेच काम केले आहे. शैक्षणिक आणि आर्थिक धोरण देशाच्या नशीबी मारले जाते, त्यात धार्मिक अल्पसंख्याकांसाठीच सुधारणा सुचवल्य जातात. केवळ मते मिळवण्यासाठी काँग्रेसने नेहमीच हिंदूंच्या विरोधात धोरण राबवले आहे. भारतातील १५ तो २५ वर्षातील पाश्चात्यांच्या परिणामामुळे लोकांनी वैदिक संस्कृतीकडे पाठ फिरवली आहे. चित्रपट, फैशन आणि तीच जिवन पध्दती स्वीकारायचे वेड या मुलांना लागले आहे. 'लिव्ह इन रिलेशनशीप' सारखी विकृती यामुळेच वाढीस लागलि. मंदिरामधील संस्कृत पंडीतही आता दिसेनासे होऊ लागले आहेत. 'रामायण' आणि 'महाभारत' केवळ टीव्ही वरच्या मालिकांमध्ये राहिले आहेत. आपण केवळ जमीन आणि प्रोपर्टिची काळजी करत आहोत, मात्र संस्कृती नष्ट होत आहे याकडे कोणाचेही लक्ष नाही. भारतावर आक्रमणकर्त्यांनी अनेक वेळा आक्रमण केले आणि भारत त्यातूनही अस्तित्वात राहीला. भारतातील ऐश्वर्य जरी लुटले गेले, तरी वैदिक संस्कृति अबाधित आहे. आजच्या पिढीने जर या वैदिक ज्ञानाकडे पाठ फिरवली, तर आणखी काही दशकांनी हे ज्ञान उपलब्धही असणार नाही. भारतात ८५ टक्के हिंदू लोकसंख्या आहे. पण यामध्ये १५ टक्के बॉध्द, शिख आणि जैनही समविष्ट आहेत. म्हणजे हिंदूंची लोकसंख्या ७० टक्के आहे. धर्मनिरपेक्ष म्हणवणार्‍या (मुस्लिम आणि ख्रिश्चन) शिक्षणापुअढे आणि ख्रिश्चनांच्या धर्मांतराच्या सध्याच्या वेगापुढे हे ७० टक्के आणखी किती दिवस शिल्लक राहू शकतील. आणखी काही पिढ्यांनंतर भारतात हिंदू बहुसंख्य राहणार नाहीत. सरकारकडे केल्या जाणार्‍या मागण्या आणि निवडणुकीत मतदान करणारे सगळे, बदलण्याच्या वाटेवर आहे. याशिवाय हिंदूंची संख्या घटल्यामुले कायदेही वाढणार्‍या अल्पसंख्याकांच्या हिताचे असतील. आणि एखाद्या धर्मक्षेत्राच्या ठिकाणीच हिंदू बघायला मिळतील. या सर्व माहितीचा हेतू हा, की हिंदू सनातन धर्मियांनी सत्य परिस्थिती ध्यानात घ्यायला हवी. प्रतिक्रिया न देण्याचे त्यांचे धोरण अस्तित्वावरच घाला घालू शकते. निष्क्रिय राहण्याचा फायदा अनेकजण घ्यायला टपून बसले आहेत. आपल्या वैदिक संस्कृतीचे आपल्यालाच रक्षण करायल हवे आहे. त्यासाठी एक्त्रितपणे प्रयत्न करण्याची नितांत आवश्यकता आहे. काही काळापुर्वीच १ टक्क रशियन नागरिकांनी आपण हिंदू असल्याचे जाहीरपणे मान्य केले होते. 'ईस्कॉन' च्या शिकवणुकीमुळेच हे शक्य झाले. याचा एक मोठा सामाजिक परिणाम झाल. 'वैश्विक वैदिक समाज' म्हणुन आपण जगभरातल्या हिंदूंना एकत्र केले पाहिजे. सनातन वैदिक परंपरेचे केंन्द्र म्हणुनच भारताचे रक्षण व्हायला पाहिजे ऐनी बेझंट यांनी या परंपरेचे अगदी यथार्थ शब्दात वर्णन केले आहे. डॉ. जगतियानी यांनी त्यांच्या 'हिंदू लाईफ लाईन ऑफ इंडिया' या पुस्तकात या वैदिक परंपरेची महती वर्णन केली आहे. हिंदू धर्मापेक्षा अधिक शास्त्रशुध्द, सनातन, तत्वज्ञानी आणि आध्यात्मिक विचार अन्य कोणत्याही धर्मात सापडत नाहीत. याबद्दल जेवढे अधिक जाणून घेतले जाईल. तेवढेच ते आवडू लागतील. हिंदुत्वाच्या पायातच भारताचि मुळे रुजलेली आहेत. त्यामुळे येथे असलेल्या सर्व संप्रदाय आणि उपासना पध्दतीचा पायाही, हिंदुत्व हाच आहे. जर हिंदूनीच हा पाया ऑळखला नाही तर हिंदूंना वाचवण्यासही कोणी येणार नाही. निष्क्रिय राहून वाद विवाद करत बसणे चुकीचे आहे. आपली संस्कृती जिवंत राहिली तरच भविष्यात आपल्या पिढ्या हिंदू म्हणुन जिवंत राहतील . समाजातल्या हिंदुविरोधी आव्हानांना ऑळखुन आजच त्यांचा सामना करायला तयार व्हायला हवे. स्टिफन नैपयांच्या लेखाचा श्री संदीप कुलकर्णी द्वारे केलेला अनुवाद साभार वाचकांसाठी :-
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
संस्कृती
लेखनप्रकार (Writing Type)
लेख

प्रतिक्रिया द्या
33391 वाचन

💬 प्रतिसाद (132)

प्रतिक्रिया

वास्तव

तर्री
गुरुवार, 04/07/2011 - 15:10 नवीन
वास्तव. ऊत्तम अनुवाद. हिंदूचे संघटन हा चिंतेचा विषय. हिंदूची सहिष्णुता निंदेचा विषय.
  • Log in or register to post comments

+१

टारझन
गुरुवार, 04/07/2011 - 15:23 नवीन
असेच म्हणतो . -(बदाम) तिर्री
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: तर्री

नुसता आक्रोश करुन काय उपयोग?

योगप्रभू
गुरुवार, 04/07/2011 - 15:22 नवीन
(हा प्रतिसाद कल्याणकरांना किंवा कुणा व्यक्तीला उद्देशून नाही. लेख वाचून मनात आले ते पुढे मांडले इतकेच.) जे आजवर सक्तीने बाटवले गेले आहेत त्यांचे पुन्हा शुद्धीकरण करण्यासाठी हिंदू धर्म आणि त्याचे सनातनी रक्षक किती व्यापक प्रयत्न करत आहेत? मुंबईत पूर्वी मसुराश्रमातच शुद्धीकरण विधी होई. अशा संस्था गावोगावी का नाही स्थापन झाल्या? बरं हिंदू धर्मात सोपेपणा कधी येणार? पूर्वी वसई भागात पोर्तुगिज मिशनर्‍यांनी एक साधी युक्ती वापरली. लोक ज्या विहिरीचे पाणी पितात त्यात आम्ही काल पाव टाकला होता, एवढे नुसते जाहीर केले तरी भोळ्याभाबड्या आणि मनाशी प्रामाणिक लोकांनी आपण धर्मांतरित झाल्याची समजूत करुन घेतली. अशावेळी गावच्या धर्मपंडितानेही त्याचा प्रतिकार तेवढ्याच सोप्या मार्गाने करायला हवा होता. पळीभर गोमूत्र/गंगाजल किंवा ग्रामदेवतेचा प्रसाद देऊन ते लोक पुन्हा शुद्ध झाले, असे का नाही जाहीर केले? म्हणजे हिंदूला धर्मांतरित करण्यासाठी एक थापही पुरेशी असते, पण त्याला पुन्हा हिंदू होण्यासाठी मात्र चार चार दिवसांचे होमहवन आणि शुद्धीक्रिया. आधी हिंदू धर्माचा समानतेचा पाया मजबूत करा, संघटित व्हा आणि मग प्रतिकार करा. अन्यथा 'त्याने मला मारले, मला त्याने मारले' ही ओरड हिंदू अल्पसंख्य होईपर्यंत सुरुच राहील.
  • Log in or register to post comments

त्याची तरी काय गरज?

पंगा
गुरुवार, 04/07/2011 - 20:45 नवीन
अशावेळी गावच्या धर्मपंडितानेही त्याचा प्रतिकार तेवढ्याच सोप्या मार्गाने करायला हवा होता. पळीभर गोमूत्र/गंगाजल किंवा ग्रामदेवतेचा प्रसाद देऊन ते लोक पुन्हा शुद्ध झाले, असे का नाही जाहीर केले?
त्याची तरी काय गरज होती? पाद्र्यांनी विहिरीत पाव टाकला असो वा नसो, त्याने कोणीही बाटतबिटत नसते, हिंदुधर्माबाहेर वगैरे जात नसते असा स्टँड मुळात घ्यायला कोणी अडवले होते? जो बाहेरच गेला नाही (किंवा 'अशुद्ध'च झाला नाही) म्हटले, त्याला 'परत आत घेण्या'ची (त्याच्या 'शुद्धी'ची) गरज ती काय? पण नाही. आमच्याच लोकांना आपल्याच लोकांना 'बाहेर' ढकलण्याची खाज अधिक घाई. पाद्र्याच्या पावाचे केवळ निमित्त.
जे आजवर सक्तीने बाटवले गेले आहेत त्यांचे पुन्हा शुद्धीकरण करण्यासाठी हिंदू धर्म आणि त्याचे सनातनी रक्षक किती व्यापक प्रयत्न करत आहेत?
आजवर, आणि विशेष करून पिढ्यानपिढ्यांपूर्वी, जे लोक (सक्तीने किंवा कसेही) बाटवले गेले आहेत, ते हिंदू धर्मात परत यायला तडफडताहेत हे मुळात कोणी सांगितले? म्हणजे हे पुन्हा उलटे बाटवणेच झाले ना? आणि ही उलट्या बाटवाबाटवीची गरज नेमकी कोणाची आहे? जे काही पिढ्यांपूर्वी बाटले होते त्यांची, की त्यांना उलटे बाटवू पाहणार्‍यांची? हे जे कोणी काही पिढ्यांपूर्वी बाटलेले लोक आहेत, त्यांचे जर ठीक चालले असेल, पोटापाण्याला व्यवस्थित मिळत असेल, तर त्यांना मुद्दाम उलटे बाटवून घेण्याची गरज किंवा त्यात हशील ते काय? राहू देत की त्यांना आहेत तसेच सुखाने. (मुळात पोटापाण्याला जर व्यवस्थित मिळत असेल, तर आपण होवून किती लोक आणि कशासाठी बाटवून घेतील? उलट किंवा सुलट?)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: योगप्रभू

थोऽऽडीशी शोधाची गरज..

धमाल मुलगा
गुरुवार, 04/07/2011 - 20:51 नवीन
तात्विकदृष्ट्या पंगांचे मुद्दे अगदी बरोबर आहेत. पण सध्याची वस्तुस्थिती काय आहे, किती वाईट आहे ह्याच्या थोऽड्याशा शोधाची आणि माहिती गरज आहे असं प्रामाणिकपणे नमुद करावंसं वाटतं इतकंच म्हणेन.
त्याची तरी काय गरज होती? पाद्र्यांनी विहिरीत पाव टाकला असो वा नसो, त्याने कोणीही बाटतबिटत नसते, हिंदुधर्माबाहेर वगैरे जात नसते असा स्टँड मुळात घ्यायला कोणी अडवले होते? जो बाहेरच गेला नाही (किंवा 'अशुद्ध'च झाला नाही) म्हटले, त्याला 'परत आत घेण्या'ची (त्याच्या 'शुद्धी'ची) गरज ती काय? पण नाही. आमच्याच लोकांना आपल्याच लोकांना 'बाहेर' ढकलण्याची खाज अधिक घाई. पाद्र्याच्या पावाचे केवळ निमित्त.
त्यावेळच्या जात-धर्मभावनांच्या पगड्याचा विचार करता हे फारच दुरापास्त नव्हतं काय? आज बदललेल्या काळानुसार बदललेल्या समाजात आपण फिरतो, त्या पगड्याखाली हे म्हणणं आजच्या काळात अशी घटना घडता योग्य ठरु शकतंच. पण काळ जुना आणि विचार नव्या बदललेल्या काळातले ह्यांची मोट कशी जुळावी?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

मान्य

पंगा
गुरुवार, 04/07/2011 - 21:12 नवीन
त्यावेळच्या जात-धर्मभावनांच्या पगड्याचा विचार करता हे फारच दुरापास्त नव्हतं काय?
होते ना! पण ही आपलीच चूक नव्हती काय? आम्हीच आमची वाट लावून घ्यायला जर इतके इच्छुक होतो, तर पाद्र्यांना दोष का द्यायचा? ते आपला धंदा करत होते, आणि आपला धंदा चालावा म्हणून जो काही बरावाईट मार्ग सुचेल (आणि चालेल) तो अवलंबत होते. कोणताही व्यापारी हे करेल. आम्हाला जर त्यांच्या खेळात सामील व्हायला (आणि आपल्याच लोकांना दुरावून आपल्याच पायावर धोंडा पाडून घ्यायला) अडचण नव्हती, तर पाद्र्यांना का दोष द्या? ते तर आपला माल विकायला बसले होते!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

अलबत!

धमाल मुलगा
गुरुवार, 04/07/2011 - 21:47 नवीन
आज 'होय, ही चूकच होती.' हे कुणीही बिनशर्त मान्य करेल असं मला वाटतं. पण परत तेच होतंय, ती चूक होती हे आज कळतं, तेव्हा ती जीवनशैलीचा भागच होती म्हणा, किंवा त्याद्वारे जीवनशैली ठरत होती म्हणावं लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

ठीक

पंगा
गुरुवार, 04/07/2011 - 21:59 नवीन
तसे म्हटले तर मग आज त्याबद्दल रडत बसायचे काहीच कारण नाही, नाही का? ज्यांचे धर्मांतर झाले ते झाले, ज्यांचे नाही झाले ते हिंदू राहिले. मामला खतम. दु:ख कशाचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

नाही..तसं नाही.

धमाल मुलगा
गुरुवार, 04/07/2011 - 22:06 नवीन
खरं तर म्हणूनच पहिल्या प्रतिसादातलं वाक्य 'सध्याची वस्तुस्थिती काय आहे आणि किती वाईट' ह्याच्या योग्य माहितीच्या शोधाची गरज आहे' असं जे सर्वसामान्यतः म्हणलं ते त्यासाठीच.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

ठीक

पंगा
गुरुवार, 04/07/2011 - 22:09 नवीन
.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: धमाल मुलगा

अवांतर

३_१४ विक्षिप्त अदिती
गुरुवार, 04/07/2011 - 22:09 नवीन
ती म्हण काय आहे, 'पाद्र्याला पावाचे निमित्त' का 'पाद्र्याला पावट्याचे निमित्त'?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

कशीही म्हणा हो...

पंगा
गुरुवार, 04/07/2011 - 22:15 नवीन
... आपल्याला उपयोगास आल्याशी मतलब.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ३_१४ विक्षिप्त अदिती

@ कल्यान्कर साहेब, छोटा मुह

पियुशा
Fri, 04/08/2011 - 11:07 नवीन
@ कल्यान्कर साहेब, छोटा मुह बडी बात ......... एक सांगावेसे वाटते ज्यावेळेस भारतावर इंग्रज /.पोर्तुगीजांचे राज्य होते, तेव्हा आपले (काही) पूर्वज कि ज्यांचा डोळ्यावर जातीयतेचा पगडा होता त्यांनी दलितांना कशी वागणूक दिलीये हे सर्वश्रुत आहे गावकुसाबाहेरचा दलित समाज ज्याला कधी आपल्याच बांधवांनी मिसळू दिले नाही , अन्न वस्त्र निवारा ह्या गोष्टी तर त्यांच्यासाठी स्वप्नवत होत्या , गावातील घाण काढणे ,शिळ्या भाकरीच्या मोबदल्यात मनभर लाकडे फोडून घेणे ,हातात गाडगे आणि पाठीला झाडू का? कशासाठी ? आपण बाटले जाऊ म्हणून? गाव अपवित्र होईल ,एखाद्या हरीजानाचा स्पर्श झाला तरी घाटावर जाऊन १० वेळा आंघोळ?का ? त्यांना माणूस म्हणून आपणच जगू दिले नाही , त्यांची उपासमार (मी तर कुठे तरी वाचलेलं कि हा समाज कधी कधी इतका अगतिक झालेला कि मेलेली गुरे - ढोरे सुधा खायची वेळ आलेली ) काय बोलणार ?काय हे ?सवर्ण आणि हरिजन हा भेद पुरातन काळापासून चालत आलेला . मी तर म्हणेन इंग्रजांनी याचाच फायदा घेतलाय आपण ज्यांना वाळीत टाकले अशांना जवळ त्यांनी केले ,त्यांना सामाजात सामावान्यासाठी धर्मानंतर केले खरे पण ते बळेबळे नाही आपला सामाज आपल्याकडून मिळालेल्या उपेक्षेमुळे स्वतः धर्म बदलण्यास प्रवृत्त झाला हे सांगणे न लागे ..... "आपण जर आपल्या घटकांना आतापर्यंत न्याय देऊ शकलो नाही तर धर्मातारचे काय घेऊन बसलात ?" ज्याचा त्याचा इच्छिक मामला आहे ,आणि भारतीय कायदा समती देतो ,खरेच बळे-बळे धर्मातर होतेय का ? (स्वत त्यासाठी तयार आहेत ) ?हे पण पाहायला पाहिजे ना !
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

असो तुम्ही "ल्हान तोंडी मोठा

llपुण्याचे पेशवेll
Fri, 04/08/2011 - 12:06 नवीन
असो तुम्ही "ल्हान तोंडी मोठा घास" असे लिहीलेच आहे म्हणून प्रतिसाद देण्यात वेळ घालवत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पियुशा

नक्कीच

विनीत संखे
गुरुवार, 04/07/2011 - 15:30 नवीन
माझ्या वडिलांनी सांगितलेली, ते लहान होते, तेव्हाची ही गोष्ट... आमच्या गावात बर्‍याच वर्षांपूर्वी एक मिशनरी आला होता. फियाट मध्ये बसून आल्याने गावातल्या लोकांना त्याचे अप्रुप होते. त्याने अर्धातास वेशीवरच्या शाळेत त्याचा उपदेश केला आणि ख्रिशचन धर्म का चांगला हे पटवण्याचा प्रयत्न केला. निघताना त्याने त्याची फियाट सुरू केली. पण ती सुरू होईना. त्याने काही तरूण मुलांना गाडीस धक्का मारायला सांगितले. सुरूवातीच्या काही असफल प्रयत्नांनंतर त्याने देवाचे नाव घेऊन गाडीस धक्का मारायला सांगितले. ग्रामदेवीचे नाव घेऊन सगळे धक्का मारू लागले पण गाडी सुरू होईना. मग त्याने जिजसचे नाव घेऊन धक्का मारायला सांगितले आणि काय आश्चर्य इतका वेळ ढिम्म बसून राहिलेली ती गाडी झटक्यात सुरू झाली. गावक्र्‍यांच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही आणि तो मिशनरी "ही जिजसची कृपा" असं जोरात आरोळी ठोकत निघून गेला. नशीबाने आमच्या गावात कुणीच ख्रिश्चन झाले नाही कारण गावचे शाळेचे हेडमास्तर हिंदू विशारद होते. त्यांनी सर्वांना त्या फसव्या मिशनरीविषयी वेळीच सावधान केले होते.
  • Log in or register to post comments

ऐकीव

विकास
गुरुवार, 04/07/2011 - 20:51 नवीन
अशीच अजून एक सत्य आहे असे म्हणतात पण माझ्यासाठी ऐकीव कथा: काही मिशनरी वनवासी भागात गेले आणि त्यांनी स्थानिकांची देवाची दगडी मुर्ती आणि लाकडी क्रूस तळ्यात टाकला. अर्थातच मुर्ती बुडाली आणि क्रूस तरंगला. मग ते मिशनरी म्हणाले, बघा, तुमचा देव बुडाला पण आमचा देव तरंगू शकला म्हणजे तुम्हाला तो वाचवू शकेल. सर्व विचार करायला लागले. तेव्हढ्यात एक शहाणी व्यक्ती म्हणाली, की पण आमच्यात देवाला पण अग्नीपरीक्षेतून जावे लागते, तेंव्हा आमचा देव आणि तुमचा (लाकडी) क्रूस यांना देखील अग्नीपरीक्षेतून जाउंदेत... ;) अर्थात प्रकरण तिथेच मिटले. असो. मात्र केवळ मिशनर्‍यांना नावे ठेवण्याऐवजी, ते भले त्यांच्या स्वार्थासाठी काम करतात, धर्मात सांगितलेली सेवा करतात, तशी आपण किती करू शकतो/करतो? ह्या मुद्याचा विचार होणे महत्वाचे आहे. अतिअवांतरः (हा केवळ विनोद आहे, अमेरिकेत अमेरिकन्स कडून कधीकाळी ऐकलेला):
एकदा एका घनदाट आणि रिमोट जंगलातील टोळीत (ट्राईबल भागामधे) काम करणारा मिशनरी मेल्याचे कळते म्हणून पोप त्या ठिकाणी नवीन मिशनर्‍याला पाठवतो. तो मिशनरी तिथल्या टोळीप्रमुखाला भेटायला जातो. त्याचे चांगले स्वागत होते. मिशनरी त्याल पोपने पाठवलेल्या भेटवस्तू देतो. नंतर जेवण चालू असताना विचारतो की आधीचा मिशनरी कसा होता? त्याला उत्तर मिळते, चविष्ट! :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनीत संखे

एक हकिकत याच विषयावर

विश्वास कल्याणकर
Fri, 04/08/2011 - 12:21 नवीन
आसाममध्ये ख्रिस्ती धर्मांच्या प्रसाराचे काम करणारे फादर क्रुझ दादींजींच्या घरि गेले. दादीजींच्या हातात पेढा ठेवून ते म्हणाले, 'हा घ्या प्रसाद!' दादीजी दिलेला प्रसाद खातील की नाही? अशि शंका फादरना होती. पण दादीजींनी प्रसाद ताबडतोब खाऊन टाकला. फादर क्रुझ प्रसन्नपणे हसले आणि म्हणाले 'दादीजी!, आपण चर्चचा प्रसाद खाल्ला आहे. आपण ख्रिश्चन झाला आहात. आता आपल्याला बाप्तिस्मा घ्यायला यावे लागेल.' 'कमाल आहे!' असे होणे कधी शक्य आहे का?' 'दादीजि लक्षात ठेव , आपण चर्चचा प्रसाद खाल्ला आहे.' 'अरे खाल्ला ! पूर्ण खाल्ला! त्याने काय बिघडले? तुम्ही दिलेला पेढा इथला आहे. हिंदुस्थानच्या गायिंच्या दुधापासून बनलेला पेढा, साखर येथिल मातितून उगवलेल्या उसापासुन बनलेली. सरपण येथील झाडांच्या फांद्यांचे, केवळ तुम्ही हात लावला, तर सगळे काही बिघडले. आमचा स्वधर्म निकालात निघतो अगदी साफ धुऊन निघतो! खरं म्हणजे मामला उल्टा आहे. आपण वर्षानुवर्षे येथे राहत आहात. आपण येथे खाता, येथे पिता, आपल्या फेफड्यातील वायुदेखील इथलाच. विचार करा. येथील पदार्थापासून बनलेला प्रसाद खाऊन आपली काय अवस्था झाली पाहिजे?' फादर क्रुझ निरुत्तर झाले. फादरना चोख उत्तर देऊन निरुत्तर करणार्‍या दादीजी म्हणजे आसाम मधील सुप्रसिध्द क्रांतिकारी महिला कमलादेवी हजारिका, गुवाहाटीत त्यांचे स्मारक दिमाखात उभे आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनीत संखे

थोडक्यात...

पंगा
Sat, 04/09/2011 - 18:55 नवीन
... एखाद्याला जर बाटवून घ्यायचे नसेल, तर पाद्रीच काय, पण खुद्द आकाशातला बाप जरी बाटवायला आला, आणि त्याने (बाटवण्याच्या दृष्टीने) काहीही युक्तिवाद केला, तरी अशी व्यक्ती बाटणे शक्य नाही, हेच यातून सिद्ध होत नाही काय? मग दु:ख कशाचे? लोक बाटवून न घेण्यास पुरेसे उत्सुक नाहीत याचे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वास कल्याणकर

एक प्रसंग...

क्राईममास्तर गोगो
गुरुवार, 04/07/2011 - 15:45 नवीन
मलाही आठवतोय एक प्रसंग... एकदा माझ्या काकांनी (ते जर्नलिस्ट आहे आणि पक्के हिंदुत्ववादीसुद्धा) एका पाद्रीला विचारलं की हिंदू धर्माने आर्यभट्टाला वाळीत टाकले नाही जेव्हा त्याने पृथ्वी गोल आहे किंवा पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे विधान केले, पण मग गॅलिलिओला चर्चने का मारलं? तेव्हा त्या पाद्रीने निरूत्तर होऊन संतापून काकांना त्याच्या सभेतून हाकललं. ह्याचा फायदा हा झाला की काकांच्या प्रश्नाला उत्तर देता न आल्यानं कितीतरी श्रोते स्वत:ची विवेकबुद्धी वापरून निघून गेले होते.
  • Log in or register to post comments

हाण्ण

आनंदयात्री
गुरुवार, 04/07/2011 - 20:11 नवीन
>>पण मग गॅलिलिओला चर्चने का मारलं? हाण्ण तिचायला !! लै भारी रे. काकांना रामराम सांग !!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्राईममास्तर गोगो

काका आजकल अण्णा हजारेंना कवर

क्राईममास्तर गोगो
गुरुवार, 04/07/2011 - 20:35 नवीन
काका आजकल अण्णा हजारेंना कवर करतायत... :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री

कारण

पुण्याचे वटवाघूळ
Tue, 12/06/2011 - 08:27 नवीन
एकदा माझ्या काकांनी (ते जर्नलिस्ट आहे आणि पक्के हिंदुत्ववादीसुद्धा) एका पाद्रीला विचारलं की हिंदू धर्माने आर्यभट्टाला वाळीत टाकले नाही जेव्हा त्याने पृथ्वी गोल आहे किंवा पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे विधान केले, पण मग गॅलिलिओला चर्चने का मारलं?
अहो याचं कारण म्हणजे आर्यभट हा उच्चवर्णीय होता. हिंदू धर्म सहिष्णू की काय म्हनतात तो उच्चवर्णीयांसाठीच. इतरांनी राहायचे गावाबाहेर आणि अमक्या एका जातीत जन्मला म्हनून झाडू मारायचे किंवा मेलेली गुरे ओढून न्यायची. दुसरे म्हणजे हिंदू धर्माने आर्यभट्टाला वाळीत टाकले नाही म्हनजे नक्की कोणी वाळीत टाकले नाही? जे आपल्याच माणसांवर अमक्या एका जातीत जन्मला म्हणून अन्याय करतात त्यांनी सहिष्णूतेचे गोडवे गाऊ नयेत. हे म्हणजे स्वतःच्या घरच्यांना लाथा घालून बाहेर जाऊन समाजसेवा करून स्वतःला फार मोठा समाजसेवक म्हटल्याप्रमाणे झाले. बरं आर्यभट्टाला वाळीत टाकले नाही पण नंतर काही शतकांनी द्यानेश्वरांना आणि त्यांच्या भावंडांना संन्याशाची पोरे म्हणून वाळीत टाकलेच ना? तुकाराम महाराजांची गाथा नदीत टाकलीच ना? फुले-आंबेडकरांना पण कधी आपले म्ह्टले का? पुण्याचे वटवाघूळ
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: क्राईममास्तर गोगो

असाच एक लेख वाचला.....

स्वछंदी-पाखरु
गुरुवार, 04/07/2011 - 18:03 नवीन
असाच एक डोके फिरवणारा लेख वाचला होता. त्यात तर चक्क केरळ राज्य सरकारने च अशी योजना केली कि जो पण ख्रिश्चन धर्मांतर करेल त्याला कर्ज माफ केले आहे .इथे बघा स्व. पा. उगाच हं
  • Log in or register to post comments

पंगा साहेब

चिंतामणी
Sun, 04/10/2011 - 20:54 नवीन
केरळ राज्य सरकारने च अशी योजना केली कि जो पण ख्रिश्चन धर्मांतर करेल त्याला कर्ज माफ केले आहे . याबद्दलचा आपला प्रतीसाद वाचायला आवडेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वछंदी-पाखरु

काही शंका

पंगा
Sun, 04/10/2011 - 22:49 नवीन
बातमी अत्यंत त्रोटक आहे, त्यावरून अनेक बाबींसंबंधी नीटसा अर्थबोध होत नाही. अधिक अधिकृत तपशील कोठे मिळू शकेल याचा शोध घ्यावा लागेल. जे काही त्या बातमीत वाचावयास मिळाले, त्यावरून काही महत्त्वाच्या शंका उद्भवतात. - ही कर्जमाफी ते केवळ ख्रिस्ती धर्मांतरित आहेत म्हणून आहे, की ते समाजातील सर्वात आर्थिकदृष्ट्या दुर्बल स्तरातील आहेत (आणि समाजातील सर्वात मोठा आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक दुर्बल गट हा योगायोगाने अनुसूचित जातींतील ख्रिस्ती धर्मांतरितांचा आहे - केरळाचे डेमोग्राफिक्स नेमके कसे आहे ते तपासावे लागेल) म्हणून आहे, हे बातमीतून स्पष्ट होत नाही. - ही योजना अधिकृतरीत्या धर्मांतरास सरकारी प्रोत्साहन देण्यासाठी आहे असेही प्रथमदर्शनी आढळून येत नाही. ही सवलत लागू झाल्याच्या दुसर्‍या दिवशी किंवा एका महिन्यानंतर धर्मांतर करणाराससुद्धा ही सवलत मिळेल किंवा कसे हे यातून सूचित केल्याचे दिसत नाही. बहुधा अगोदरपासूनच ख्रिस्ती धर्मांतरित असणार्‍या एका अत्यंत मोठ्या (आणि बहुधा गरजू) गटाकरिता ही सवलत असावी, आणि ('देवीचा रोगी कळवा, हजार रुपये मिळवा'च्या धर्तीवर) 'धर्मांतर करा, कर्जमाफी मिळवा' छापाचा हा प्रकार नसावा, हीदेखील शक्यता लक्षात घेण्यास जागा आहे. अर्थात, बातमी ज्या पद्धतीने लिहिलेली आहे त्यावरून (आधी म्हटल्याप्रमाणे) नेमके काय ते काहीच स्पष्ट होत नाही. हा वाईट वृत्तपत्रीय शैलीचा उत्कृष्ट नमुना समजावा, की जाणूनबुजून केलेली दिशाभूल मानावी, हे कळण्यास मार्ग नाही. 'हिंदू'सारख्या आदरणीय दैनिकात ही बातमी छापून आलेली असल्याने पहिली शक्यता असावी अशी आशा आहे. अर्थात, अर्धवट बातमीवरून आपापल्या मगदुराप्रमाणे उचित वाटेल तो ग्रह करून घेण्याची (आणि तो पसरविण्याची) सर्वपक्षीय मुभा आहेच. आभारी आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

स्वच्छ शब्दात लिहीले आहे........

चिंतामणी
Mon, 04/11/2011 - 01:33 नवीन
- ही कर्जमाफी ते केवळ ख्रिस्ती धर्मांतरित आहेत म्हणून आहे, की ते समाजातील सर्वात आर्थिकदृष्ट्या दुर्बल स्तरातील आहेत तीथे स्वच्छ शब्दात लिहीले आहे की He was speaking after inaugurating a loan waiver scheme offered by the Kerala State Development Corporation for Christian converts from Scheduled Castes.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

केरळमधील समाजातील आर्थिकदृष्ट्या सर्वाधिक दुर्बल स्तर...

पंगा
Mon, 04/11/2011 - 09:07 नवीन
... हा जर योगायोगाने बहुसंख्येने अनुसूचित जातींमधून झालेल्या ख्रिस्ती धर्मांतरितांचा असेल (पक्षी: 'अनुसूचित जातींमधील ख्रिस्ती धर्मांतरित' हे जर केवळ एक factual label असेल), आणि या स्तरातील हिंदूंचे (हिंदू राहिलेल्यांचे) आजचे प्रमाण जर नगण्य असेल (तसे आहे काय, केरळाचे डेमोग्राफिक्स नेमके कसे आहे, या सर्व बाबी अर्थातच पडताळून पहाव्या लागतील), तर अशा योजनेचे वर्णन हे 'ख्रिस्ती धर्मांतरितांकरिता योजना' असे करणे हे केवळ त्याचा राजकीयदृष्ट्या वाकडा अर्थ काढला जाऊ शकतो म्हणून करू नये, असा आपला दावा आहे काय? (तसा दावा असल्यास सहमत आहे.) बाकी, ही सवलत लागू झाल्यानंतर (बहुधा तिचा लाभ घेण्याच्या उद्देशाने) धर्मांतर करणार्‍या केरळीय अनुसूचित ज्ञातिबांधवांनासुद्धा हा लाभ मिळेल किंवा कसे, हे अजूनही स्पष्ट होत नाही. ही सवलत धर्मांतरास सरळसरळ सरकारी उत्तेजन देण्याकरिता आहे किंवा कसे, हे ठरवण्याच्या दृष्टीने, मला वाटते, अशी माहिती असणे अत्यावश्यक आहे. (शिवाय, अनुसूचित जातींतील ख्रिस्ती धर्मांतरितांव्यतिरिक्त इतर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांकरिता इतर कोणत्या योजना कार्यरत आहेत किंवा नाहीत, याचीही माहिती उपलब्ध नाही. कदाचित अशी माहिती पुरवणे हे या विशिष्ट बातमीच्या कक्षेत येतही नसावे, आणि ते समजण्यासारखेही आहे. परंतु तो मुद्दा तूर्तास सोडून देऊ.) बाकी, अपुर्‍या माहितीच्या आधारावर, ही 'योजनेच्या वर्णनातील राजकीय घोडचूक' आहे, की हे 'सरकारचे धर्मांतरवादी शक्तींशी उघडउघड संगनमत' आहे, याबद्दल काय वाटेल त्या निष्कर्षाप्रत यायला आणि त्याचा हवा तसा आणि हवा तितका प्रचार करायला, मला वाटते, उभयपक्षी भरपूर वाव आहे. So, have fun! 'भारत सरकार आणि भारतातील तमाम राज्यसरकारे ही दुष्ट, दुष्ट, राष्ट्रद्रोही आहेत, परकीय आणि हिंद्वेतर शक्तींच्या घशात राष्ट्र सारायला टपून बसलेली आहेत; अशा परिस्थितीत या अंधःकारात एकाच संघटनेला काय ती राष्ट्रहिताची तमा आहे, ती धुरा एकाच संघटनेच्या खांद्यावर काय ती येऊन पडलेली आहे, सबब या संघटनेवाचून राष्ट्राचे कसे होणार!' असे मत बाळगण्यास आणि त्याचा प्रचार करण्यास भारतीय घटना कितपत आड येत असावी याबद्दल साशंक आहे, किंबहुना आड येत नसावी, तेवढे मतस्वातंत्र्य आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य भारतीय घटना निश्चितच देत असावी, याची जवळपास खात्री आहे. त्यामुळे खुशाल आपणास हवे तसे मत बाळगावे आणि त्याचा प्रचार-प्रसार करावा. आम्हांस त्या मतात काहीही तथ्य वाटत नाही, इतकेच. बाकी चालू द्या.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

१५९ कोटी.

चिंतामणी
Mon, 04/11/2011 - 09:51 नवीन
Mr. Balan said loans amounting to Rs.159 crore would be waived under the scheme, benefiting nearly 1 lakh people, mostly belonging to the poorest sections of society. रू.१५९/-कोटी हा आकडा लहान आहे काय? हा दावा कोठे आणि कोणी केला आहे????????? अशा परिस्थितीत या अंधःकारात एकाच संघटनेला काय ती राष्ट्रहिताची तमा आहे, ती धुरा एकाच संघटनेच्या खांद्यावर काय ती येऊन पडलेली आहे, बाकी, अपुर्‍या माहितीच्या आधारावर,.............. अजून माहितीसाठी गुगलू शकता.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

अरे..रे... हिंदुच्यावर खरोखरच वाईट पाळी आली आहे कि...

वेताळ
गुरुवार, 04/07/2011 - 18:08 नवीन
एका ख्रिस्ती माणसाला हिंदु खतरे मैं अशी बांग मारावी लागत आहे. मला देखिल एक प्रसंग आठवतो.. आम्ही लहान असताना ख्रिस्ती मिशनरी आमच्या गावात जिजसच्या कथेची पुस्तके घरोघरी फुकट वाटत असत. त्यात काही पॉकेट बुक्स तर काही लांबपुस्तके असत.आम्ही मुले ती लांब पुस्तके वेगवेगळ्या ठिकाणाहुन त्या मिशनरीज कडुन मागुन घेत असु.व एकत्र करुन रद्दीवाल्याल विकत असु. त्यातुन आम्हाला पॉकेटमनी मिळत असे. आजकाल अशी पुस्तके माझ्या बघण्यात आली नाहीत.
  • Log in or register to post comments

सोव्हिएट देश

विकास
गुरुवार, 04/07/2011 - 20:40 नवीन
त्यात काही पॉकेट बुक्स तर काही लांबपुस्तके असत.आम्ही मुले ती लांब पुस्तके वेगवेगळ्या ठिकाणाहुन त्या मिशनरीज कडुन मागुन घेत असु.व एकत्र करुन रद्दीवाल्याल विकत असु. या वरून आठवले. आम्ही कॉलेजात असताना (सोव्हीएट पडायच्या थोडा आधीचा काळ), गॅदरींगच्या वेळेस "सोव्हीएट देश" या त्यांच्या चकाचक आणि कम्युनिझमची लाल करणार्‍या मॅग्झीनला खूप मागणी असायची. कारण त्याचे कागदी बाण चांगले होत असत. ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: वेताळ

सोविएत देश

पंगा
गुरुवार, 04/07/2011 - 20:47 नवीन
कारण त्याचे कागदी बाण चांगले होत असत.
शिवाय (बहुधा) फुकटातही मिळत असे, असे आठवते. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

१.गुंडोपंतांची आठवण येतेय.

मन१
गुरुवार, 04/07/2011 - 21:19 नवीन
२.विकास रावांशी सहमत. ३.अवांतर :- शिवाजी महाराज सुरतेवरील हल्ल्यात मिशनर्‍यांना म्हणतात :- "तुम्ही किरिस्ताव लोक फार चांगले आहात.रयतेच्या भल्याची कामे करता." संदर्भः- राजा शिवछत्रपती,लेखक बाबासाहेब पुरंदरे. --मनोबा
  • Log in or register to post comments

रोचक

पंगा
गुरुवार, 04/07/2011 - 21:22 नवीन
३.अवांतर :- शिवाजी महाराज सुरतेवरील हल्ल्यात मिशनर्‍यांना म्हणतात :- "तुम्ही किरिस्ताव लोक फार चांगले आहात.रयतेच्या भल्याची कामे करता."
रोचक. अधिक तपशील हवा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

मला वाटते..

विकास
गुरुवार, 04/07/2011 - 21:24 नवीन
मला वाटते किरीस्ताव* लोकं भारतात त्यांच्या (माहीती-तंत्रज्ञान) सर्व्हिसेस आउटसोअर्स करतात आणि आपण त्यांना "सेवा" आउट्सोअर्स करतो. अर्थातच दोघे त्याची किंमत मोजत असतात. कुणाची जास्त हा चर्चेचा विषय होऊ शकतो. :-) *हे मी पाश्चात्यांना जनरलाईझ्ड करून म्हणले आहे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

?

पंगा
गुरुवार, 04/07/2011 - 21:34 नवीन
शिवाजीमहाराजांना एकविसाव्या शतकातले औटसोर्सिंग अभिप्रेत होते? नाही म्हणजे, शिवाजीमहाराजांना प्रचंड दूरदृष्टी असल्याबद्दल ऐकलेले आहे, पण ही म्हणजे जरा जास्त दूरदृष्टी होत नाही काय? अतिअवांतर: शिवाजीमहाराजांना एकविसाव्या शतकातल्या औटसोर्सिंगबद्दल कल्पना होती हे जर खरे असेल, तर मग मी नाडीपट्टीवरही विश्वास ठेवावा किंवा कसे, याबद्दल विचार करावा लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

डिसक्लेमर

विकास
गुरुवार, 04/07/2011 - 21:39 नवीन
शिवाजीमहाराजांना एकविसाव्या शतकातले औटसोर्सिंग अभिप्रेत होते? मी शिवाजीमहाराजांबद्दल बोललो नव्हतो! अतिअवांतर: शिवाजीमहाराजांना एकविसाव्या शतकातल्या औटसोर्सिंगबद्दल कल्पना होती हे जर खरे असेल, तर मग मी नाडीपट्टीवरही विश्वास ठेवावा किंवा कसे, याबद्दल विचार करावा लागेल. माझा नाडी अथवा पट्टी कशाचाच धंदा नाही! तेंव्हा तो देखील उद्देश नव्हता. :-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

शिंचं आउटसोर्सिंग कुठं आलं मधेच?

मन१
गुरुवार, 04/07/2011 - 22:46 नवीन
सुरतेवरच्या पहिल्या हल्ल्यात जेव्हा महाराजांनी हाजी कासम बोहरा का कुणातरी डांबिस धनाढ्य व्यापार्‍याला धरुन आणलं, तेव्हा त्याचा बराचसा पैका घेतला. काही हिंदु व्यापारी गच्च पिंपभरुन सोने-नाणे नेत होते,त्यांनाही पकडलं. (लूटपाट सुरु असलेल्या)त्या श्रीमंत इलाख्याच्या आसपासच्या इतर इलाख्यातही सैन्य पाठवलं. पण त्यात काही ख्रिस्ती लोक (बहुतांश मिशनरी आणि समाजसेवा करणारे) स्वतःहून महाराजांना भेटायला आले, त्यांना अत्यल्प दरात सोडलं. कित्येकांकडे तर काहिच मागणी केली नाही! वर त्यांचं कौतुक केलं. अति अवांतरः- सूरत लूटिमध्ये महाराजांनी दणक्यात लुटले नाहित असे दोनच गट--- १ ख्रिस्ती मिशनरी(वर सांगितलेले) २ जॉर्ज ओक्झिंडेन ह्या सेनानीच्या हाताखालची ब्रिटिश वखार. केवळ दोनेकशे माणसे हाताशी असताना ह्यानं वखारीवर चालुन आलेल्या मराठी सैन्याला कडवा आणि मराठ्यांना अनपेक्षित प्रतिकार केला. बर्‍यापैकी लूट आधिच(अगदि आरामात ) हाताशी लागलेली असताना उगीच आणखी मनुष्यहानी नको, असा विचार करुन महाराजांनीही प्रतिकार दिसताच वखारीला तसच सोडुन, न लुटता जाणं पसंद केलं. जवळ काही हजारांच्यावर सैन्य असणारा सुरतेचा भेकड मुघल सेनापती मात्र अजिबात प्रतिकार न करता किल्ल्यात दडुन बसला होता. अति अति अवांतरः- जॉर्ज ओक्झिंडेनही ख्रिश्चनच!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विकास

मनोबा

विनायक बेलापुरे
Fri, 04/08/2011 - 09:25 नवीन
जॉर्ज ओक्झिंडेन ख्रिस्ती होते म्हणून त्यांना सोडले हे पटत नाही. महाराज झपाटा मारून मुघली मुलखात गेले होते ते भाग जिंकून तिथे कब्जा बसवायला नव्हे तर स्वराज्यासाठी मुघली मुलुख मारून पैसा जमवायला. जिथे सहजासहजी मिळते आहे तिथे उगाचच ताकद आणि मुख्य म्हणजे वेळ वाया घालवायला महाराज वेडे नव्हते. जिथे मोडायचे तिथे ख्रिष्चनांचे ही कंबरडे त्यानी मोडून काढलेले आहे. तोच मुद्दा मिशनरींना लागू होतो. ते ही कफल्लक होते. धर्मविस्तार करत होते पण ज्यावेळी त्यांच्या धर्मविस्ताराला पायबंध घालण्यासाठी ते गेले तेंव्हा त्यांनी ठोकून काढले, कुडाळ प्रांतात मधे. सुरत लूटणे हेच त्यांचे मुख्य उद्दिष्ट होते आणि प्रचंड लूट घेउन मुघली सैन्य येण्याच्या आत परत माघारी स्वतःच्या मुलुखात येणे हीच त्यांची प्राथमिकता होती. त्याचप्रमाणे सुरतेतही त्यांनी सामान्य माणसाला तोषीश दिली नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

+१

मन१
Fri, 04/08/2011 - 13:09 नवीन
विनायकराव, आपल्याशी सहमत. म्हणुनच तर मी वाक्ये वापरलीत ती अशी :- "....बर्‍यापैकी लूट आधिच(अगदि आरामात ) हाताशी लागलेली असताना उगीच आणखी मनुष्यहानी नको, असा विचार करुन महाराजांनीही प्रतिकार दिसताच वखारीला तसच सोडुन, न लुटता जाणं पसंद केलं" आपण बहुतेक एकच गोष्ट म्हणतोय. त्यामुळं "महाराज झपाटा मारून मुघली मुलखात गेले होते ते भाग जिंकून तिथे कब्जा बसवायला नव्हे तर स्वराज्यासाठी मुघली मुलुख मारून पैसा जमवायला. जिथे सहजासहजी मिळते आहे तिथे उगाचच ताकद आणि मुख्य म्हणजे वेळ वाया घालवायला महाराज वेडे नव्हते. जिथे मोडायचे तिथे ख्रिष्चनांचे ही कंबरडे त्यानी मोडून काढलेले आहे. " ह्याच्याशी सहमत. ख्रिश्चनच काय हरेक शतॄला त्यांनी योग्य त्या वेळेस धडा शिकवलाय त्यात मुघल, आदिलशाही सत्ता आल्या, त्या सत्तेच्या आश्रयाने राजकारण करणारे महाराजांचे काही स्वकीयही आले. कुडाळ मधला किस्सा माहिती नाही. इथे अवांतर होत असेल खरडीतुन वगैरे दिलत तर बरं होइल. कुठल्यातरी ब्रिटिश वखारीच्या ड्यांबिस अधिकार्‍यांना त्यांनी शासन केल्याचं माहिती होतं बुवा. जॉर्ज ऑक्झिंडेन ख्रिस्ती होता म्हणुन त्याला सोडलं असं मला म्हणायचं नव्हतं. तेव्हढं वाक्य सोडुन दिलत तरी चालेल. --मनोबा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विनायक बेलापुरे

धर्मनिहाय लोकसंख्या

सुनील
गुरुवार, 04/07/2011 - 22:09 नवीन
भारतात ८५ टक्के हिंदू लोकसंख्या आहे. पण यामध्ये १५ टक्के बॉध्द, शिख आणि जैनही समविष्ट आहेत. म्हणजे हिंदूंची लोकसंख्या ७० टक्के आहे. हे वाक्य सिद्ध करणारा विश्वासार्ह पुरावा दिलात तर उत्तम. २००१ च्या जनगणनेप्रमाणे (ज्याचे निष्कर्ष जालावर उपलब्ध आहेत) भारताची धर्मनिहाय स्थिती अशी आहे - हिंदू - ८०.५% मुस्लिम - १३.४% ख्रिश्चन - २.३% शिख - १.९% बौद्ध - ०.८% जैन - ०.४% इतर - ०.६%
  • Log in or register to post comments

लेख चांगला आहे.

विनायक बेलापुरे
गुरुवार, 04/07/2011 - 22:35 नवीन
वाचनीय आहे.
  • Log in or register to post comments

एक प्रश्न

पंगा
Fri, 04/08/2011 - 09:21 नवीन
काका, तुम्ही रा. स्व. संघाचे नाही म्हणता. मग विहिंपचे म्हणायचे, की इस्कॉनचे, की सनातन प्रभातचे? नाही म्हणजे, आजकाल गाडी ईशान्येकडून भलतीकडेच वळू लागली आहे, म्हणून विचारले. बाकी काही नाही. एरवी चालू द्या. निवांत होऊ द्या. कळावे, लोभ असावा. आपलाच लाडका पुतण्या, पंगा.
  • Log in or register to post comments

कोण म्हणतय नाही म्हणुन?

मन१
Fri, 04/08/2011 - 09:37 नवीन
कल्याणकरांच्याच "माझी समाजसेवा व ईशान्य भारत." (http://www.misalpav.com/node/17187) मध्ये त्यांनी संघाशी कसा परिचय झाला ते इथं मिपावर, जाहीर सांगितलय. तुम्हाला त्यांनी खरड/व्य नि/पार्सल्/पोष्ट्/फॅक्स /sms/फोन कॉल किंवा प्रत्यक्ष भेट किंवा इतर एखाद्या माध्यमाद्वारे खाजगीत काही वेगळं सांगितलय काय ? त्यांच्या सारखे काका आपल्यासारख्या पुतण्याची दिशाभूल करणार नाहित असे वाटते. --मनोबा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

तेच म्हणतात!

पंगा
Fri, 04/08/2011 - 09:41 नवीन
संघाच्या (ईशान्येत कार्य करणार्‍या) लोकांशी परिचय आहे, पण स्वतः संघाचे कार्यकर्ते नाहीत असे त्यांनी जाहीर आणि स्पष्टपणे सांगितलेले आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

परिचय

विश्वास कल्याणकर
Fri, 04/08/2011 - 12:28 नवीन
परिचय होणे म्हणजे त्यात सम्मीलीत होणे नाही. त्यांचे इशान्य भारतातील कार्य हे प्रशंसनीय आहे यात शंका नसावी त्यांच्या तेथील कार्यात खारिचा वाटा आपला असावा हा प्रामाणिक उद्देश. पुण्यात मी फारसा संपर्कात नसतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: मन१

प्रतिसाद

विश्वास कल्याणकर
Fri, 04/08/2011 - 11:54 नवीन
३३ वर्षे १०-५ नोकरित नोकरि करण्याशिवाय कुठेच पहावयास वेळ मिळाला नाही. प्रथमच इशान्य भारतात गेलो . ३ वर्षात तिथली भिषण परिस्थीति ला कारणीभुत ३ गोष्टी आहेत हे प्रामुख्याने लक्षात आले. १) सरकारची कमालीची उदासीनता २) ख्रिस्तीकरणाचा तुफान वेग व ३) बांगलादेशातील घुसखोरी. ख्रिस्तीकरणामुळे तिथे जाणवत असलेला त्रयस्थपणा हा सर्वात का़ळजीचा भाग आहे. नागालैण्ड ला " इंडियन डोग्ज गो बैक" असे फलक हे मिशनरींच्या शिकवणुकीचा परिणाम आहे. आधी म्हटल्या प्रमाणे कुणी कुठल्या धर्मात जावयाचे तो त्याचा त्याचा प्रश्न असतो. पण त्याचे दुरगामी परिणाम जर आपल्याच देशाच्या एखाद्या राज्यात आपल्याकडे परकिय म्हणुन पाहिल्या जात असेल तर कुठे तरी ते खटकते. ख्रिश्चनिटी चे इशान्य भारतात झालेले आक्रमण, पुढे काय वाढून ठेवले आहे याची नांदी तर नाही. हे तिथे गेल्यावर जाणवले आणि त्या दृष्टीने जे काही वाचायला मिळाले आणि त्यासंबंधात जे कुणी प्रयत्न करित आहेत त्यांचे कडुन ऐकतो ते इथे मांडणे एवढाच उद्देश. वस्तुस्थीती मी सांगीतली तितकी भयानक नसेल किंवा काही आशेचे किरण असतील जे मला माहित नाहीत तर ते जाणुन घ्यावयास मला नक्कीच आवडेल. पण मला वाटते. की हींदु हा विषय कुणी ही काढला की त्याला, संघ, वि.ही.प., किवा अन्य तत्सम संबधित असल्याचा जो आरोप होतो तो योग्य आहे काय. लहान पणी आईने रामरक्षा , अथर्व शिर्ष, शिकवले, संध्याकाळी तिन्हीसांजेला देवाल नमस्काराची सवय लावली. मग ती तर संघाची नव्हती मग आजच या विषयावर बोलले की लेबल कां लागते? हा प्रश्न मला नेहमी पडतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: पंगा

आपला हा प्रवासच आश्चर्यकारक

नितिन थत्ते
Fri, 04/08/2011 - 13:02 नवीन
आपला हा प्रवासच आश्चर्यकारक आहे. ३३ वर्षे नोकरी करताना आपण इकडेच राहिलात. त्या काळात आपल्याला इथल्या लोकांचे काय प्रश्न आहेत हे पाहण्यास वेळच मिळाला नाही. त्यानंतर आपल्या मनात काही समाजकार्य करावे असे आले. त्यावेळीही आपल्याला इथले आसपासचे प्रश्न दिसले नाहीत/पहावेसे वाटले नाहीत. त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी काही करावे असे वाटले नाही. (नॉर्मल माणसास आजूबाजूचे प्रश्न दिसत राहिलेच असते आणि आत्ता नोकरीमुळे वेळ नसला तरी वेळ मिळाल्यावर समाजकार्य म्हणून "मी हे करीन" असे त्याने मनातून ठरवून ठेवले असते). एकदम कोणाचे तरी व्याख्यान ऐकून आपल्याला ईशान्य भारतातला प्रश्न खूप महत्त्वाचा वाटला आणि त्यातही महत्त्वाचे काय वाटले? तर तिथे हिंदूंची संख्या घटत आहे. सगळंच गंमतीदार आहे.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विश्वास कल्याणकर

>>(नॉर्मल माणसास आजूबाजूचे

स्वानन्द
Fri, 04/08/2011 - 14:13 नवीन
>>(नॉर्मल माणसास आजूबाजूचे प्रश्न दिसत राहिलेच असते आणि आत्ता नोकरीमुळे वेळ नसला तरी वेळ मिळाल्यावर समाजकार्य म्हणून "मी हे करीन" असे त्याने मनातून ठरवून ठेवले असते) नशीब तुम्ही कोणी मानसशास्त्र तज्ञ नाही. नाहीतर कल्याणकर साहेब अ‍ॅबनॉर्मल आहेत अस सर्टीफिकेट देऊन मो़कळे झाला असता. >>एकदम कोणाचे तरी व्याख्यान ऐकून आपल्याला ईशान्य भारतातला प्रश्न खूप महत्त्वाचा वाटला त्यांना काहीतरी महत्वाचं वाटलं तेव्हा त्यांनी त्याप्रमाणे पावलं उचलली हे महत्वाचं. >> आणि त्यातही महत्त्वाचे काय वाटले? तर तिथे हिंदूंची संख्या घटत आहे. चालायचंच.. तसं ही काही लोक कम्युनिझम मागे पडतोय याची काळजी लागून राहिलेली असतेच की... त्यापेक्शा हे बरं!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते

>>नशीब तुम्ही कोणी

नितिन थत्ते
Fri, 04/08/2011 - 14:57 नवीन
>>नशीब तुम्ही कोणी मानसशास्त्र तज्ञ नाही. नाहीतर कल्याणकर साहेब अ‍ॅबनॉर्मल आहेत अस सर्टीफिकेट देऊन मो़कळे झाला असता. बरोबर. >>त्यांना काहीतरी महत्वाचं वाटलं तेव्हा त्यांनी त्याप्रमाणे पावलं उचलली हे महत्वाचं. मी फक्त आश्चर्यकारक आहे असे म्हटले. समाजकार्य करावे असे वाटल्यावरदेखील स्वतःच्या जवळपासच्या समाजात करण्यासारखे काही दिसले नाही याचे आश्चर्य वाटले. >>चालायचंच.. तसं ही काही लोक कम्युनिझम मागे पडतोय याची काळजी लागून राहिलेली असतेच की... त्यापेक्शा हे बरं! ज्यांना कम्युनिझमची काळजी वाटते ते सहसा लहानपणापासून / जाणत्या वयापासून 'त्यां'च्या संपर्कात असतात. अचानक हा प्रश्न महत्त्वाचा वाटत नाही.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: स्वानन्द

काही गरज नाही...

विकास
Fri, 04/08/2011 - 16:49 नवीन
त्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी काही करावे असे वाटले नाही. बर्‍याचदा ते प्रश्न परत परत पाहून बधीरता आलेली असते. ते प्रश्न वाटत नाहीत. रस्त्यावर भिकारी अपंग अथवा सुदृढ मूल दिसले तर निर्विकार झालेली माणसे स्लमडॉग बघून मुंबईतील भिकार्‍यांबद्दल कळवळा व्यक्त करताना पाहीली आहेत. त्यातील काहींनी तात्कालीन मदतही केली आहे... एकदम कोणाचे तरी व्याख्यान ऐकून आपल्याला ईशान्य भारतातला प्रश्न खूप महत्त्वाचा वाटला आणि त्यातही महत्त्वाचे काय वाटले? तर तिथे हिंदूंची संख्या घटत आहे. तसे वाटणे बरोबर का चूक, तसेच त्यातील इतर मुद्यांवर ह्यावर चर्चा करू शकतात. धर्मांतरामुळे नागालँड व इतरत्र जर फुटीरतावाद येत असेल तर त्याबद्दल काय म्हणणे आहे? कदाचीत श्री. कल्याणकरांना त्यामुळे त्या प्रश्नाचे गांभिर्य जास्त वाटले असेल तर त्यात नवल काय? भारताबद्दलच बोलत आहेत ना? का भारत हा एकसंघ राष्ट्र असायची काही गरज नाही असे आपले म्हणणे आहे?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: नितिन थत्ते
  • 1
  • 2
  • 3
  • ›
  • »

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा