यांना विसरुन कसे चालेल ?

कुंदन जनातलं, मनातलं
तुम्ही आम्ही सर्व जनता विश्वचषक अंतिम सामन्याचा आनंद लुटत असताना , मुंबईतील कायदा व सुव्यवस्था राखणार्‍या मुंबई पोलिस दलाला प्रचंड तणावाखाली काम करावे लागलेले असणार आहे. ही सर्व जबाबदारी समर्थपणे पार पाडल्याबद्दल त्यांना सलाम. या संबंधीची एक बातमी "इथे"
वर्गीकरण

23 टिप्पण्या 4,042 दृश्ये
शेअर करा: 📱 WhatsApp

Comments

निनाद मुक्काम … नवीन

आमचे मित्र मंडळ पोलीस वसाहतीत नेहरू नगर ,कुर्ला पूर्व येथे असल्याने मी त्यांच्या पालकांचे मुंबई साठी असलेले योगदान समजू शकतो ह्या लेखासंबधी विशेष आभार ह्या निमित्ताने ह्या मामा लोकांना विशेष आभार

सखी नवीन

मुंबई आणि इतर भागातील पोलिसांचेही कौतुक, धन्यवाद, अभिनंदन. खर तर शब्दात मावत नाहीयेत सगळ्या भावना आज, त्यांच्याबद्दल, आणि भारतीय संघाबद्दल.

विकास नवीन

पोलीस आणि कायदा सुव्यवस्थेच्या यंत्रणेचे कौतुक आहेच पण माझ्या लेखी हॅट्स ऑफ हे पब्लीकला...! दहशतवाद्यांना आजपर्यंत हिंसाचार यशस्वीरीत्या करता आला पण त्यांना दहशत बसवता आली नाही. तमाम पब्लीक स्टेडीयमवर हजर होते. सर्व सुरक्षा यंत्रणेतून मुकाट्याने जात होते आणि घाबरले ते फक्त आपण आता वर्ल्डकप हरणार का काय इतक्याच भितीला! त्यात असेच श्रेय जे कोणी व्हिआयपीज असतील त्यांना देखील आहे. जे घरात बसून बघू शकले असते पण ते भले स्पेशल सेल मध्ये असतील, पण स्टेडीयममधे होते... आज वास्तविक इस खुशीके मौके पर सरकारने मॅचनंतर मैदानात कसाबला सोडायला हवे होते. मग कळले असते... असो.

आत्मशून्य नवीन

In reply to by विकास

इस खुशीके मौके पर सरकारने मॅचनंतर मैदानात कसाबला सोडायला हवे होते. मग कळले अस
हा हा हा... ही गोश्ट पाक वीरूध्दच्या सामन्यात करायला हवी होती.........

आळश्यांचा राजा नवीन

(आतापर्यंत आलेल्या) सात प्रतिक्रियांमध्ये पाच महिला आयडी आणि दोन पुरुष आयडी. यावरुन (मॅच जिंकल्यावर) पुरुषांना धिंगाणा घालायला आवडतो, आणि स्त्रियांना धिंगाणा आवरणार्‍या मंडळींची आठवण होत राहते असा निष्कर्ष काढावा काय? (धिंगाणा नियंत्रण यंत्रणेकडून त्रस्त झालेला पीडित पती!)

भडकमकर मास्तर नवीन

म्याच व्यवस्थित पार पडल्याबद्दल सर्व सुरक्षा यंत्रणांचे आणि पोलिसांचे अभिनन्दन... :)

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे नवीन

In reply to by गणपा

म्याच व्यवस्थित पार पडल्याबद्दल सर्व सुरक्षा यंत्रणांचे आणि पोलिसांचे अभिनन्दन... -दिलीप बिरुटे

यशोधरा नवीन

कुंदूभाव, दुव्याबद्दल धन्यवाद. म्याच व्यवस्थित पार पडल्याबद्दल सर्व सुरक्षा यंत्रणांचे आणि पोलिस यंत्रणेचे मनापासूनअभिनंदन आणि सॅल्यूट! अतिशय अभिमान वाटतो तुमचा!

पंगा नवीन

फार्फार पूर्वी (म्हणजे आमच्या लहानपणी) 'गाय वासरू* नका विसरू' असायचे. तेव्हा काँग्रेसी राज्य होते. आता 'यांना विसरून कसे चालेल' म्हणताय, म्हणजे कसले राज्य आले म्हणायचे? (सर्वांनी हलकेच घ्या बरे!)
* (अतिअतिअवांतर:) बाकी, 'गोमाता आणि गोमातेचा पुत्र' ही (बाकी सर्व सोडून) काँग्रेसची निशाणी असावी, यालाच 'दैवदुर्विलास' म्हणत असावेत काय?

विनायक बेलापुरे नवीन

In reply to by पंगा

पूर्वी निशाणी "बैल" होती. तेंव्हा आला रे आला काँग्रेसचा बैल आला असं पब्लिक ओरडायचे. नंतर " गाय-वासरु " झाली. तेंव्हा गाय (बाईसाहेब) आणि वासरु (धाकटे बाळ) अशी फोड लोकांनी केली. हरल्यानंतर "हात" निशाणी केली (तुर्कमान गेट आणि नसबंदी अभियान आधीच झालेले असल्याने रोष कमी व्हायला " पंजा" आला ) आणि मग सत्ता आली.

पंगा नवीन

In reply to by विनायक बेलापुरे

पूर्वी निशाणी "बैल" होती. तेंव्हा आला रे आला काँग्रेसचा बैल आला असं पब्लिक ओरडायचे.
हो याबद्दल बुजुर्गांकडून ऐकले आहे खरे.
नंतर " गाय-वासरु " झाली. तेंव्हा गाय (बाईसाहेब) आणि वासरु (धाकटे बाळ) अशी फोड लोकांनी केली.
हो हे स्वतः ऐकलेले आहे.
हरल्यानंतर "हात" निशाणी केली (तुर्कमान गेट आणि नसबंदी अभियान आधीच झालेले असल्याने रोष कमी व्हायला " पंजा" आला ) आणि मग सत्ता आली.
'रोष कमी व्हायला'बद्दल साशंक आहे. कारण या 'हाता'बद्दलच (चिन्ह नवेनवे असताना, ऐन निवडणुकींच्या काळात) 'यह हाथ नहीं, फाँसी का फंदा है' अशी (थेट 'शोले'मधून उचललेली) कमेंटही ऐकलेली आहे.

निनाद मुक्काम … नवीन

आता भारतीय खेळाडूंवर पारितोषिकांचा वर्षाव होईन पण ह्या मामा लोकांना हक्काची रजा व घरे कधी मिळणार ? बेकायदेशीर झोपड्यांना संरक्षण व मोफत घरे हा ह्या दशकातील एक क्रूर विनोद .... आता मी अनिवासी म्हणून मला भारतात अनेक गोष्टी खुपतात असे कुणी म्हटले तरी मी वाईट वाटून घेणार नाही . पण आमच्या कुर्ल्यात नेहरूनगर (पूर्व ) व वेस्ट ला तक्क्या वाद येथे पोलीस कोलेनी असून माझे अनेक मित्र आहेत .( पोलीस सर्व खात्यात ओळख आहे असे समजा ) त्यामुळे मला आलेल्या वयक्तिक अनुभवावर हे माझे मत लिहित आहे .ह्याद्वारे कुठल्याही राजकीय पक्षाची तळी मी उचलत नाही आहे . मला सर्व सारखेच

परिकथेतील राजकुमार नवीन

आमचे मित्र मंडळ येरवडा जेल, तिहार येथे असल्याने मी त्यांच्या पालकांचे पोलिस खात्यासाठी असलेले योगदान समजू शकतो ह्या लेखासंबधी विशेष आभार ह्या निमित्ताने ह्या सखाराम लोकांना विशेष आभार. आता मी निवासी म्हणून मला भारतात अनेक गोष्टी सुखावतात असे कुणी म्हटले तरी मी वाईट वाटून घेणार नाही . पण आमच्या पुण्यात येरवडा जेल (पुरुष ) व तिहारला काली कोठी येथे तुरुंग असून माझे अनेक मित्र आहेत .( गुन्हेगारी सर्व क्षेत्रात ओळख आहे असे समजा ) त्यामुळे मला आलेल्या वयक्तिक अनुभवावर हे माझे मत लिहित आहे .ह्याद्वारे कुठल्याही अनिवासीचे धोतर मी ओढत नाही आहे . मला सर्व सारखेच