खुपच त्रोटक माहीती आहे पण एका वेगळ्या स्थळाची माहीती मिळाली त्यामुळे उत्सुकता वाढली आहे.
ही जागा, कसे जायचे [महाराष्ट्रातुन इ.] , किती दिवस मुक्काम का फक्त विकएन्ड सहल, फोटो, व तिथे उपलब्ध असलेल्या लोकल टुर्स, जमल्यास खर्चाचा अंदाज आदी माहीती दिल्यास मिपाकरांना सहलीला एक रेडिमेड पर्याय उपलब्ध असेल.
तुम्ही हाच लेख अजुन विस्तारपुर्वक लिहा व सरपंच किंवा विसोबा खेचर यांना पाठवा. ते नक्की बदल करतील.
राजमुंद्री हे गाव मी आतून कधी पाहिले नाही, पण प्रवासात हे शहर अनेकदा पास झाले आहे.(रेल्वे या पुलावरुन जात असे.) खाली प्रचंड पाणी असताना आणि आजिबात पाणी नसताना गोदावरीच्या मोठ्या पात्राचा आवाका लक्षात येतो.
असो.
रेल्वे प्रवासः
राजमुंद्रीला रेल्वे पुणे, मुंबईतून सोयीची पडते. कोणार्क एक्सप्रेस ही त्याकरता उत्तम.जर वेळ वगैरे बदलली नसेल तर सकाळी ब्रेकफास्टला आपण तिथे पोहोचतो.
औरंगाबाद वगैरे शहरातूनही विशाखापट्टणमकडे जाणारी कुठलीशी एक्सप्रेस आहे, तीही राजमुंद्रीला थांबते.
रेल्वेच्या प्रवासात तुम्हाला रसाळ ताडफळे चाखायला मिळतील. त्या चवीला तोड नाही.
बस प्रवासः
सोलापूर हे बस प्रवासासाठी अत्यंत सोयीचे ठिकाण आहे. सोलापूरहून विजयवाडाला जाणारी बस पकडून विजयवाडा गाठावे. विजयवाडा हे बहुदा सर्वात मोठे बस स्टँड आहे. तिथून राजमुंद्रीला बर्याच बसेस आहेत.
अवांतरः विजयवाडा सारखी स्वच्छता जर महाराष्ट्रातील बसस्टँडवर ठेवली तर रा.प. म्.ला नक्कीच आणखी फायदा होईल.
प्रतिक्रिया
सुरेख लेख
अजुन ..
छान तरीही फारच त्रोटक
फोटो टाका अन् इतर माहिती
हेच म्हणते..
रस्ता
प्रतिक्रिया