मिपा क्रिकेट जल्लोष!!! भारत विरुद्ध बांग्लादेश.
विश्वचषकाचे बिगुल अखेर वाजले. अहो सुरुवात तर पहिल्याच बॉल वर चौकार मारुन जोरदार झाली. त्याच उत्साहात मिपावर क्रिकेट चा जल्लोष साजरा करण्यासाठी आम्ही घेउन आलो आहोत विश्वचषकाचे एक वेगळे पान. आज ह्या वेगळ्या पानाला सुरुवात केली आहेच पण त्यात आम्ही वेळोवेळी सुधारणा करतच राहू... मग देताय ना भेट या पानाला??? या पानावर तुम्हाला लाईव्ह स्कोअर सुद्धा पहाता येणार आहे. या पानाला भेट देण्यासाठी तुम्ही टॉप बार मधल्या क्रिकेट विश्वचषक २०११ हा दुवा ही वापरु शकता
चला मंडळी आता आजच्या सामन्याचा आनंद घेऊयात...
काय वाटतय तुम्हाला भारताच्या किती धावा होणार आज???
Sports Tag
वाचने
28746
वाचनखूण
प्रतिक्रिया
37
त्या वेड्या सेहवागमुळे आमचा सचिन आऊट झाला.... :-(
In reply to छे:.... by मस्त कलंदर
सचिन धावबाद (सेहवाग) २८
In reply to खरे आहे स्कोरबोर्ड वर दिसले पाहीजे by सहज
सचिनने थोडी घाई केली. बॉल मिडॉनच्या जवळच होता फिल्डरपासून पुढे गेला नसल्यामुळे सेहवाग त्याच्याकडे बघून अंदाज घेत होता आणि नेमका डाईव मारुन बॉल फील्ड झाला....सचिनने एखादा क्षण थांबायला हवे होते पण ह्या शेवटी जर तर च्या गोष्टी झाल्या. सच्या अशा रीतीने रनआउट झाल्यावरही वीरु ज्या स्थिरतेने खेळला ते मला कौतुकास्पद वाटले.
In reply to मला नाही तसं वाटलं by चतुरंग
बॉल सेहवागच्या पाठी गेला होता तेव्हा टेकनिकली त्यानं सचिनचा कॉल फॉलो करायला हवा.. आणि त्यात सचिन डेंजर एण्डला पळत असल्याने सचिनचाच कॉल महत्त्वाचा होता. पार्टनर सोडून बॉलकडे/फिल्डरकडे बघणं म्हणजे तद्दन मूर्खपणा आहे. पण हे सगळं घडल्यावरही सेहवागचा थंडपणा कौतुकास्पदच, त्याबद्दल त्याला फुल्ल मार्क्स! :)
In reply to बॉल सेहवागच्या पाठी गेला होता by मेघवेडा
पण हे सगळं घडल्यावरही सेहवागचा थंडपणा कौतुकास्पदच, त्याबद्दल त्याला फुल्ल मार्क्स!+१ सहमत रे.. सेहवाग भारीच खेळला, पण कोहलीचे क्रेडिटही कमी नाही. बॉलर्स काय करतात आता पहायचे....
In reply to पण हे सगळं घडल्यावरही by निखिल देशपांडे
भांगडा जिंदाबाद ;)
In reply to पण हे सगळं घडल्यावरही by निखिल देशपांडे
ते तसं नाहीये, सेहवाग लवकर आत गेला असता ना, तर सचिनने त्याला तुडवला असता.. म्हणून तो घाबरून खेळत राहिलाअआणि चक्क १७५ मारला....
सुरवात तर स्वप्नवर झाली. सच्या आत्ताच पाठवला गेला. :(
+२८५
In reply to सुरवात तर स्वप्नवर झाली. by गणपा
३००+ व्हायला पाहिजे राव...
In reply to ३००+ व्हायला पाहिजे राव... by निखिल देशपांडे
येस सार
सामनावीर : सेहवाग
भारत : ३०० (+/- १०)
बांगलादेश : २५० (+/- १०)
सेहवाग धु धु धुतय...
वा..
२००७ चा सगळा बदला घेणार असा दिसतंय
In reply to सेहवाग धु धु by स्पा
२००७ चा सॉल्लिड बदला घ्यायला हवा. आत्त्ताच मागील वर्ल्डकप च्या मॅच मध्ये बांगलादेश जिंकल्यावरचा जल्लोष दाखवला. सचिनचा पडलेला चेहरा बघवत नव्हता. आज तर जिंकलच पाहिजे आणि ते पण दणदणीत.
आहे हा रनरेट कायम राहिला तर ३५० धावा व्हायला हरकत नाही
वीरेंद्र सेहवागचे शतक....!!!!!
असाच खेळत राहिला तर ३५०+ नक्की.
विरु २०० मारणार वाटते. १६७ (१३३)
त्या येड** मांजरेकला सांगारे कुणी तरी की भारत खेळत आहे.
सारखा देल्ही बॉईज....देल्ही बॉईज ची टेप लावुन बसला आहे मुर्ख.
आज या सामन्याची आठवण झाली
http://www.espncricinfo.com/ci/engine/match/65213.html
पण हरकत नाही.. ३५५+ झालेयत...
माझा आणि रंगाकाकांचा अंदाज खरा ठरला!!!!
सेहवाग गेला.... पण काम करून गेला... १७५!!! डबल झाली असती तर मजा होती.
विराट कोहलीचं शतक होतं की नाही वाटत होतं.. झालं एकदाचं...
शेवटच्या षटकात माती खाल्ली ( जेवढ्या जास्त धावा तेवढ्या तगडा रन रेट)
विराट ने ठरवले होते शतक पूर्ण करायचे म्हणजे कराचे .
मग एकेरी धाव हा सर्वोत्तम आणि सुरक्षित पर्याय .
शेवटचे षटक म्हणून काय हल्लाबोल करायचा ?
(स्वताच्या विकेटची पर्वा न करता )
आता प्रतीस्पर्ध्धी संघ २५० च्यात गुंडाळला पाहिजे .
बाकी सामना वीर म्हणून विरू नक्की (पहिला बॉल ते शेवटचा कोणत्याही बॉलवर ह्याला जरा संधी दिसली कि तिचे सोने करणार .)
In reply to शेवटच्या षटकात माती खाल्ली ( by निनाद मुक्काम …
एवढं करूनही माती खाल्ली? च्यायला काय एकेक अपेक्षा असतील लोकांच्या सांगता येत नाही!
बांग्लादेश तोडायलेत भारी! :(
In reply to बांग्लादेश तोडायलेत भारी! by बिपिन कार्यकर्ते
पहिल्या २-४ षटकांमध्ये तोडतील रे.
मग बसतील गप.
In reply to २-४ .. by कुंदन
मुनाफ ने काढली बुवा पहिली विकेट
भारताचे ३७० फॉर ४ होतील बघा ... मी सांगतोय ना ?
म्हसोबाचा उपवास धरीन. देवा बागलादेसायच्या
दोन चार इकेटा पडू दे. लय जड जाऊ राह्यला म्याच.
-बाबुराव :)
अरे, त्या तमीम्याला उडवा रे... लैच छळायलंय..
अजुन एक गेला..
माताय बांगलादेशी फलंदाज आउट झाल्यावर असा आनंद होईल अस वाटल नव्हत =))
In reply to अजुन एक गेला.. माताय by गणपा
=)) लय भारी
पुढल्या म्याचमधी श्रीसंतला नाय घ्याचं
बाबुराव :)
जरी अपेक्षेप्रमाणे सामना जिंकला असला तरी बांगला देश सारख्या तुलनेने दुबळ्या समजल्या जाणार्या संघाने झहीर आणि को. यांच्या गोलंदाजीसमोर ३०० च्या घरापर्यंत पोचण्याइतपत धावा काढल्या म्हणजे आमच्या गोलंदाजांचाही त्यानी फेस काढला असे कबूल करावे लागेलच....शिवाय संघ पूरता बादही करता आलेला नाही.
असो....पुढील सामन्यासाठी आपल्या संघाला शुभेच्छा देऊ या.
इन्द्रा
सांगितलं होतं मी भारत जिंकेल म्हणून कुणी आधी विश्वासच ठेवला नाही.
हा सामणा भारत जिंकेल असे जाता जाता णमुद करते.
In reply to हा सामणा भारत जिंकेल असे जाता by टारझन
:)
छे:....