'धोबी घाट' - पाहण्याचा वेगळा नजरिया
‘पाहणं’ किंवा ‘पाहिलं जाणं’ या क्रियेशी एकाच संदर्भात खूप वेगवेगळे अर्थ जोडले जाऊ शकतात. एखाद्या बाईकडे एखादा पुरुष ‘काय माल आहे’ म्हणून अधाशासारखं पाहतो तेव्हा ती क्रिया त्याला आनंद देत असते; त्या बाईला ती क्रूर किंवा दुर्लक्ष करण्याच्या लायकीची वाटू शकते तर तिच्या मित्राला ती फाजील वाटू शकते आणि तो त्या परपुरुषाला दम देऊ शकतो.
किरण राव दिग्दर्शित ‘धोबी घाट’ या चित्रपटात आपल्याला मुंबईच्या पार्श्वभूमीवर काहीतरी ‘पाहणारी’ किंवा स्वत: ‘पाहिली जाणारी’ वेगवेगळी माणसं दिसतात.
शाय (मोनिका डोग्रा) ही पारशी परदेशस्थित सुखवस्तू इन्व्हेस्टमेंट बँकर कदाचित काही व्यक्तिगत कारणांमुळे काही दिवस मुंबईत आली आहे. वेळ जाण्यासाठी तिनं मुंबईची छायाचित्रं काढण्याची एक असाईनमेंट घेतली आहे.
अरुण (आमिर खान) हा चित्रकार आहे. त्याच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला शाय आणि त्याची भेट होते. दारूच्या नशेत ते एकमेकांजवळ येतात आणि एक रात्र एकत्र घालवतात. पण दुसऱ्या दिवशी ‘मला रिलेशनशिप नको आहे,’ असं अरुण सांगतो आणि ती काहीशी फुणफुणत निघून जाते. नंतर अरुण आपलं घर बदलून चक्क मोहंमद अली रोडवरच्या एका जुन्या घरात रहायला जातो. आता ही दोघं कधीच भेटणार नाहीत असं वाटतं. पण या दोघांमध्ये एक गमतीशीर दुवा असतो. तो म्हणजे त्यांचा धोबी मुन्ना (प्रतीक बब्बर).
बिहारमधून आलेला स्थलांतरित मुन्ना आपला भाऊ आणि त्याच्या कुटुंबाबरोबर रहात सुखवस्तू लोकांचे कपडे धूत आपली गुजराण करत असतो. कधीतरी आपल्याला सिनेमात चान्स मिळेल हेच त्याचं एक स्वप्न असतं. मुन्नाच्या मदतीनं शाय अरुणचा नवा पत्ता हुडकून काढते. पण त्याला प्रत्यक्ष न भेटता चक्क चोरून त्याचे फोटो काढू लागते. पाहण्याच्या आणि पाहिलं जाण्याच्या वेगवेगळ्या अनपेक्षित क्रिया इथून सुरू होतात.
मुन्ना शायला मुंबईतली वेगवेगळी माणसं दाखवतो आणि तिच्या फोटो-प्रकल्पाला मदत करू लागतो. शिवाय तिच्याकडून आपला पोर्टफ़ोलिओसुद्धा काढून घेतो. म्हणजे शाय पाहणारी, दाखवणारा तो आणि पहिला जाणाराही तो. पण ते इथंच थांबत नाही. हळूहळू तो तिच्यात इतका गुंततो की तिच्याकडे पाहणाऱ्या लिफ्टमनला तो दरडावतो. म्हणजे शाय इतरांकडून पाहिली जाणं त्याला आता नकोसं होतं.
दुसरीकडे शाय अरुणला त्याच्या नकळत पाहते आहे आणि त्याच्यात गुंतते आहे. पण अरुण काहीतरी वेगळं पाहण्यात गुंतला आहे. कुणीतरी पूर्वी केलेलं व्हिडिओ चित्रीकरण त्याच्या नव्या घरात त्याला सापडतं. नवीन लग्न होऊन मुंबईत आलेल्या एका साध्याशा मुलीनं (कृती मल्होत्रा) आपल्या उत्तर प्रदेशातल्या माहेरी राहणाऱ्या भावाला लिहिलेली ती व्हिडिओपत्रं असतात. किंवा म्हटलं तर ती तिची डायरी असते.
तिच्याविषयीचे तपशील अरुणला आणि आपल्याला हळूहळू कळू लागतात. आता या पाहण्याच्या वेगवेगळ्या मितीही लक्षात येऊ लागतात. त्यात अंतर्भूत असणारा एक वर्गसंघर्ष जाणवू लागतो. त्या बरोबरच जाती, धर्म, वर्ग अशा गोष्टींना भेदून त्या पलीकडे जाण्याच्या, या अफाट आणि बहुविध जनसमूहाला पोटात घेणाऱ्या मुंबापुरीतच असणाऱ्या अशा काही शक्यतादेखील दिसू लागतात. पाहणारी शाय आणि पाहिला जाणारा मुन्ना यांच्यात इतकं अंतर असूनही ते एकमेकांच्या जवळ येऊ शकतील का? आणि आले तरी त्याला भविष्य काय? व्हिडिओ चित्रण करणारी (म्हणजे पाहिली जाणारी) साधी, निरागस, गोड मुलगी आणि तिचं आयुष्य पाहणारा, पण तुसडा, एकलकोंडा, माणूसघाणा अरुण तिच्यामुळे बदलेल का आणि कसा? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं शेवटी एका सनातन प्रश्नापुढे येऊन ठाकतात. ह्या अफाट दुनियेला चालतं ठेवण्यासाठी माणसांना एकमेकांविषयी विश्वास, प्रेम, अनुकंपा वाटायला लागणं अतोनात गरजेचं असतं. अशा अजस्र शहरात त्या गोष्टी मिळतात का? की सतत घरं बदलणारी, या शहरानं आपल्या प्राक्तनात लिहिलं असेल त्यानुसार भिरभिरणारी ही माणसं त्या गोष्टी मिळण्याच्या शक्यता स्वत:हून पुसून टाकत असतात? की मख्ख चेहेऱ्यानं समोर येईल ते पाहणारी पण कशावर काहीच प्रतिक्रिया न देणारी अरुणची म्हातारी शेजारीणच मुंबापुरीची पूर्वीपासूनची आणि खरी प्रतिनिधी आहे?
अशा प्रश्नांची उत्तरं सरळसोट नसतात. कारण हे प्रश्नच गहन आहेत. त्यांविषयीच्या काही शक्यता आपल्या जीवनदृष्टीनुसार दाखवून चित्रपट संपतो. वरवर पाहता किंचीतशीच गोष्ट सांगणारा म्हणून काहींना तो कंटाळवाणा वाटेल. पण त्यातली वातावरणनिर्मिती जर जाणवली तर तो आवडू शकेल. गर्दीत हरवून जाणारी, ओळखताही न येणारी, पण आपापल्या मार्गांची निवड अखेर ज्यांना एकेकट्यानंच करावी लागते अशी ही माणसं आणि समुद्राच्या लाटांनी क्षणार्धात पुसले जाणारे त्यांचे इरादे आणि त्यांची अस्तित्वं काहींना ओळखीची वाटतील. कारण म्हटलं तर ते सर्व आपल्यातच आहे. ‘लाईफ इन अ मेट्रो’सारख्या चित्रपटात अधिक ढोबळपणानं मांडल्या गेलेल्या आणि त्यामुळे काहीशा सनसनीखेज झालेल्या खास नागरी जाणिवा इथे अधिक शांत, तरल बनून येतात. सहज येऊन जाणारी महंमद अली रोड आणि धोबी घाटापासून एलिफंटा केव्ह्जपर्यंतची मुंबापुरीतली परिचित स्थळं उगीच न येता विशिष्ट जीवनदृष्टीतून आलेली आहेत हे जाणवतं. चित्रपटातले पाहणारे जसे पाहण्याच्या कृतीतून स्वत:ला समृद्ध करू पाहत असतात तद्वत चित्रपट पाहणाऱ्यालाही अंतर्मुख आणि समृद्ध करण्याच्या शक्यता त्यामुळे त्यात अधिक आहेत. एकंदरीत ढोबळ, उपदेशात्मक, संदेशपर चित्रपटांची रूढ चाकोरी हेतुपुरस्सर टाळणारा आणि तरीही सकस, सघन असा एक अनुभव देऊ पाहणारा असा हा चित्रपट आहे.
शाय (मोनिका डोग्रा) ही पारशी परदेशस्थित सुखवस्तू इन्व्हेस्टमेंट बँकर कदाचित काही व्यक्तिगत कारणांमुळे काही दिवस मुंबईत आली आहे. वेळ जाण्यासाठी तिनं मुंबईची छायाचित्रं काढण्याची एक असाईनमेंट घेतली आहे.
अरुण (आमिर खान) हा चित्रकार आहे. त्याच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला शाय आणि त्याची भेट होते. दारूच्या नशेत ते एकमेकांजवळ येतात आणि एक रात्र एकत्र घालवतात. पण दुसऱ्या दिवशी ‘मला रिलेशनशिप नको आहे,’ असं अरुण सांगतो आणि ती काहीशी फुणफुणत निघून जाते. नंतर अरुण आपलं घर बदलून चक्क मोहंमद अली रोडवरच्या एका जुन्या घरात रहायला जातो. आता ही दोघं कधीच भेटणार नाहीत असं वाटतं. पण या दोघांमध्ये एक गमतीशीर दुवा असतो. तो म्हणजे त्यांचा धोबी मुन्ना (प्रतीक बब्बर).
बिहारमधून आलेला स्थलांतरित मुन्ना आपला भाऊ आणि त्याच्या कुटुंबाबरोबर रहात सुखवस्तू लोकांचे कपडे धूत आपली गुजराण करत असतो. कधीतरी आपल्याला सिनेमात चान्स मिळेल हेच त्याचं एक स्वप्न असतं. मुन्नाच्या मदतीनं शाय अरुणचा नवा पत्ता हुडकून काढते. पण त्याला प्रत्यक्ष न भेटता चक्क चोरून त्याचे फोटो काढू लागते. पाहण्याच्या आणि पाहिलं जाण्याच्या वेगवेगळ्या अनपेक्षित क्रिया इथून सुरू होतात.
मुन्ना शायला मुंबईतली वेगवेगळी माणसं दाखवतो आणि तिच्या फोटो-प्रकल्पाला मदत करू लागतो. शिवाय तिच्याकडून आपला पोर्टफ़ोलिओसुद्धा काढून घेतो. म्हणजे शाय पाहणारी, दाखवणारा तो आणि पहिला जाणाराही तो. पण ते इथंच थांबत नाही. हळूहळू तो तिच्यात इतका गुंततो की तिच्याकडे पाहणाऱ्या लिफ्टमनला तो दरडावतो. म्हणजे शाय इतरांकडून पाहिली जाणं त्याला आता नकोसं होतं.
दुसरीकडे शाय अरुणला त्याच्या नकळत पाहते आहे आणि त्याच्यात गुंतते आहे. पण अरुण काहीतरी वेगळं पाहण्यात गुंतला आहे. कुणीतरी पूर्वी केलेलं व्हिडिओ चित्रीकरण त्याच्या नव्या घरात त्याला सापडतं. नवीन लग्न होऊन मुंबईत आलेल्या एका साध्याशा मुलीनं (कृती मल्होत्रा) आपल्या उत्तर प्रदेशातल्या माहेरी राहणाऱ्या भावाला लिहिलेली ती व्हिडिओपत्रं असतात. किंवा म्हटलं तर ती तिची डायरी असते.
तिच्याविषयीचे तपशील अरुणला आणि आपल्याला हळूहळू कळू लागतात. आता या पाहण्याच्या वेगवेगळ्या मितीही लक्षात येऊ लागतात. त्यात अंतर्भूत असणारा एक वर्गसंघर्ष जाणवू लागतो. त्या बरोबरच जाती, धर्म, वर्ग अशा गोष्टींना भेदून त्या पलीकडे जाण्याच्या, या अफाट आणि बहुविध जनसमूहाला पोटात घेणाऱ्या मुंबापुरीतच असणाऱ्या अशा काही शक्यतादेखील दिसू लागतात. पाहणारी शाय आणि पाहिला जाणारा मुन्ना यांच्यात इतकं अंतर असूनही ते एकमेकांच्या जवळ येऊ शकतील का? आणि आले तरी त्याला भविष्य काय? व्हिडिओ चित्रण करणारी (म्हणजे पाहिली जाणारी) साधी, निरागस, गोड मुलगी आणि तिचं आयुष्य पाहणारा, पण तुसडा, एकलकोंडा, माणूसघाणा अरुण तिच्यामुळे बदलेल का आणि कसा? अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं शेवटी एका सनातन प्रश्नापुढे येऊन ठाकतात. ह्या अफाट दुनियेला चालतं ठेवण्यासाठी माणसांना एकमेकांविषयी विश्वास, प्रेम, अनुकंपा वाटायला लागणं अतोनात गरजेचं असतं. अशा अजस्र शहरात त्या गोष्टी मिळतात का? की सतत घरं बदलणारी, या शहरानं आपल्या प्राक्तनात लिहिलं असेल त्यानुसार भिरभिरणारी ही माणसं त्या गोष्टी मिळण्याच्या शक्यता स्वत:हून पुसून टाकत असतात? की मख्ख चेहेऱ्यानं समोर येईल ते पाहणारी पण कशावर काहीच प्रतिक्रिया न देणारी अरुणची म्हातारी शेजारीणच मुंबापुरीची पूर्वीपासूनची आणि खरी प्रतिनिधी आहे?
अशा प्रश्नांची उत्तरं सरळसोट नसतात. कारण हे प्रश्नच गहन आहेत. त्यांविषयीच्या काही शक्यता आपल्या जीवनदृष्टीनुसार दाखवून चित्रपट संपतो. वरवर पाहता किंचीतशीच गोष्ट सांगणारा म्हणून काहींना तो कंटाळवाणा वाटेल. पण त्यातली वातावरणनिर्मिती जर जाणवली तर तो आवडू शकेल. गर्दीत हरवून जाणारी, ओळखताही न येणारी, पण आपापल्या मार्गांची निवड अखेर ज्यांना एकेकट्यानंच करावी लागते अशी ही माणसं आणि समुद्राच्या लाटांनी क्षणार्धात पुसले जाणारे त्यांचे इरादे आणि त्यांची अस्तित्वं काहींना ओळखीची वाटतील. कारण म्हटलं तर ते सर्व आपल्यातच आहे. ‘लाईफ इन अ मेट्रो’सारख्या चित्रपटात अधिक ढोबळपणानं मांडल्या गेलेल्या आणि त्यामुळे काहीशा सनसनीखेज झालेल्या खास नागरी जाणिवा इथे अधिक शांत, तरल बनून येतात. सहज येऊन जाणारी महंमद अली रोड आणि धोबी घाटापासून एलिफंटा केव्ह्जपर्यंतची मुंबापुरीतली परिचित स्थळं उगीच न येता विशिष्ट जीवनदृष्टीतून आलेली आहेत हे जाणवतं. चित्रपटातले पाहणारे जसे पाहण्याच्या कृतीतून स्वत:ला समृद्ध करू पाहत असतात तद्वत चित्रपट पाहणाऱ्यालाही अंतर्मुख आणि समृद्ध करण्याच्या शक्यता त्यामुळे त्यात अधिक आहेत. एकंदरीत ढोबळ, उपदेशात्मक, संदेशपर चित्रपटांची रूढ चाकोरी हेतुपुरस्सर टाळणारा आणि तरीही सकस, सघन असा एक अनुभव देऊ पाहणारा असा हा चित्रपट आहे.
याद्या
14443
प्रतिक्रिया
51
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे व्वा...
समजण्यास मदत केल्याबद्दल धन्यवाद
In reply to अरे व्वा... by मस्त कलंदर
कालंच पाहिला
In reply to समजण्यास मदत केल्याबद्दल धन्यवाद by महेश-मया
छान
+१ सहमत.
There is a similarity between you and Kiran Rao ...
छान परीक्षण!
@लाईफ इन अ मेट्रो’सारख्या
जितका समजला ठीक वाटला.
परीक्षंण छान
+१
In reply to परीक्षंण छान by आत्मशून्य
अगम्य
+१ सर्वोत्कृश्ठ प्रतीसाद
In reply to अगम्य by सन्जोप राव
तुमको ना काहीच नाही
In reply to अगम्य by सन्जोप राव
__/\__
In reply to अगम्य by सन्जोप राव
सहमत आहे. चित्रपट सहन
In reply to __/\__ by अर्धवटराव
सहमत
In reply to अगम्य by सन्जोप राव
छान प्रतिसाद
In reply to अगम्य by सन्जोप राव
बाब्बौ!
In reply to अगम्य by सन्जोप राव
सूर्याची पिल्ले....!!
In reply to अगम्य by सन्जोप राव
सूर्याची पिल्ले
In reply to सूर्याची पिल्ले....!! by इन्द्र्राज पवार
सहमत
In reply to अगम्य by सन्जोप राव
काही गल्लत होते आहे का?
In reply to सहमत by Pain
+१
In reply to अगम्य by सन्जोप राव
छान !
नेहमीप्रमाणेच सुरेख लेखन
+१
In reply to नेहमीप्रमाणेच सुरेख लेखन by शहराजाद
+१ सहमत
ह्म्म
काहि कळत नाहिये हे का रीपीट
परीक्षन छान अनि आवडले आता
परीक्षन छान अनि आवडले आता
अहो हो!! मग दुसरा काढुन टाकुन
In reply to परीक्षन छान अनि आवडले आता by मुलूखावेगळी
प्रतिसाद
प्रतिसाद
In reply to प्रतिसाद by चिंतातुर जंतू
दोन तास निव्वळ करमणूकीची
In reply to प्रतिसाद by मुक्तसुनीत
दबंग सारखे चित्रपट निव्वळ
In reply to दोन तास निव्वळ करमणूकीची by ३_१४ विक्षिप्त अदिती
+१
In reply to प्रतिसाद by चिंतातुर जंतू
त्यात ‘दबंग’सारख्या,
In reply to प्रतिसाद by चिंतातुर जंतू
गोंधळ
परीचय आणि त्यावरचा
आम्ही पौगुंदा वस्थेत प्रवेश
वाह..
In reply to आम्ही पौगुंदा वस्थेत प्रवेश by निनाद मुक्काम …
एकदम टुकार पिक्चर पैसे वाया
चिंजं उत्तम लेखन. 'किरण रावला
थोडं अजून खोलातलं विश्लेषण
आणखी थोडे
वाह..काका
In reply to आणखी थोडे by सन्जोप राव
एकारलेल्या भूमिका की संयत सूर?
In reply to आणखी थोडे by सन्जोप राव
थोडे अवांतर मला धोबी घाट
सुंदर