[खुलासा] एकोळी धागे
एकोळी धाग्यांचे मिसळपावावर एवढे वावडे का आहे कळायला मार्ग नाही. एकोळी धागा अनेक कारणांनी निघू शकतो.
- फेसबुक वर असलेल्या स्टेटस आणि लिंक च्या सुविधा या एकोळी धाग्यांशी साधर्म्य दाखवतात. त्याच धर्तीवर माझे एकोळी धागे असतात. यात फार मोठा अपराध आहे असे मला वाटत नाही. मिसळ्पाव हे फेसबुक नाही असा युक्तीवाद काहीजण करतील पण पुण्यात गाडी चालवायची ज्याना सवय आहे ते मुंबईत (सहसा) पुण्यासारखीच गाडी चालवतात आणि त्याउलट मुंबईत गाडी चालविणारे पुण्यात गोंधळून जातात.
- फालतु चर्चा टाळायला कमीत कमी शब्दात माहिती शेअर करणे मला श्रेयस्कर वाटते. शिवाय शेअर केलेली माहिती सेल्फ एक्सप्लेनटरी असेल तर आणखी स्प्ष्टीकरण द्यायची मला आवश्यकता वाटत नाही.
- अनेक वेळा आपण एखादे पुस्तक/अल्बम इ मित्राला देताना हे वाचच किंव हे ऐकच एवढंच सांगून देतो. दर वेळेला पुस्तकात काय आहे ते "चार-पाच वाक्यात" सांगत नाही.
एकोळी धाग्यांचा एवढा खुलासा पुरेसा ठरावा...
वर्गीकरण
प्रतिक्रिया
खफ ??
एकोळी च्या धाग्याचे
धागा हा शब्दांच्या संख्येने
<<आणि चार पाने लिहूनही त्यात
>>>अगदी अगदी...कालेजात पानभर
आपण आयटीवाला हौत हे
हा हा हा.... >>आपण आयटीवाला
माझ्या निरीक्षणानुसार
धागे कसे का असेनात चालतात
अहो पण त्या एकोळी धाग्यात
एका ओळीत प्रतिसाद.
चर्चा करायची असेल तर त्या
सहमत
धोरणाची कार्यवाही....!