"कविता" म्हणून चांगलीच आहे. पण आत्ता लिहीण्याचे प्रयोजन कळले नाही.
मिपा जसे रोज असते तसेच खेळकरपणाने चाललेले आहे. काही विशेष कविता करण्यासारखे घडले आहे असे वाटले नाही.
"दुज्या सुरांचे, हाणा त्याला, कोण मध्ये हे घुसले" हे मिपावर विशेष झाले आहे असे वाटत नाही, उलट इतरत्र झालेले पाहिले आहे.
बाकी हे नेहमीचेच. चालू द्या. असल्या विषयांवरचा माझा हा शेवटचा प्रतिसाद.
तसं काव्यातलं आपल्याला फार काही कळत नाहीच, पण छान वाटतेय ही कविता :)
अर्थात सन्जोपरावांच्या सिध्दहस्त लेखणीतून उतरलेली कोणतीही साहित्यकृती नक्कीच सरस असते असे आमचे निरिक्षण आहे, त्यामुळे तिच्या दर्जाविषयी प्रश्नच उद्भवत नाही...उच्चच असणार !
पण पुन्हा वाचली आणि आशयगर्भ उमगला. राग्....राग नाही आला...वाईट वाटलं !
सन्जोपराव उत्तम लेखक आहेतच, वादच नाही. आम्हाला साहित्यातला सा देखील लावता येत नाही, आणि सन्जोपराव म्हणजे साहित्यचंद्रच जणू आमच्यासाठी!
तरीही लहान तोंडी मोठा घास घेऊन विचारतो, माफ करा, पण...........
का...का असे करावेसे वाटले ? का सन्जोपराव?
अहो, तुमच्या लेखांवर इथं मिपावर देखील उड्या पडतात...लोक आवडीने वाचतात. हां आता आमच्यासारख्या तद्दन टवाळांसारख्या 'मासेस' ला सोडलं एकवेळ तरी 'क्लास' वाले कित्येक वाचक आहेतच ना मिपावर?
अहो, मग त्यांच्यावर असा अन्याय का? त्यांनादेखील ही दुषणे लागू पडतातच की! मिपाचे सदस्य ह्या नात्याने.
बाकी, आपलं कोणतं लेखन कुठे प्रकाशीत करावं हा नक्कीच ज्याचा-त्यचा प्रश्न आहे. पण इतरत्र उत्तमोत्तम साहित्य सादर करुन मिपावर मात्र एखाद्याच्या अंगणात येऊन त्यालाच शिव्या देण्यासारखा हा प्रकार वाटतो मला (व्यक्तिगत मत!)
एक आदर आहे तुमच्याबद्द्ल आम्हा सर्वांच्या मनात! हे असं अति-अतिसर्वसामान्यासारखं वागून का त्याला धक्का लावताय शेठ?
मान्य आहे, प्रत्येक माणूस आपल्या भाव-भावनांच्या कल्लोळात बुडालेला असतो, कधी त्या भावनांचा जोर वाढल्यावर भावनेच्या आहारी जाऊन माणूस असं काहीबाही करतो. शेवटी माणूस हा माणूस असतो, देव नव्हे! आम्हीही एकमेकांना शिव्या देतोच की! सगळेच करतात असे. पण कोणि फक्त शिव्या देण्यापुरता नक्कीच इथं येत नाही हो.
एकंदरीत मिपाच्या खेळकर कौटुंबिक वातावरणात विष कालवल्यासारखं वाटतंय हे असं वागणं :(
पाठ खाजवुनी एकमेकाची तळवे सुजुनी बसले
असेल बुवा तसेही. कोणी एव्हढा विचार केलाय? मिपा हे घर आणि मिपाचे गावकरी हे कुटुंब असं एकदा स्विकारल्यावर आपल्या घरातल्या एखाद्यावर कोणी राळ उडवली तर त्याच्या बाजुने बोललं तर हे असं असाव? आश्चर्य आहे बॉ !
मग इतरत्र जे चालतं ते काय असतं? 'तू माझ्या साडीला छान म्हणालास तरच मी तुझ्या शर्टाला नावाजेन' अशी परिस्थिती निदान मिपावर तरी नक्कीच नाहीये ना हो रावसाहेब?
दुज्या सुरांचे, हाणा त्याला, कोण मध्ये हे घुसले
हे कुठे घडत नाही ? थोड्याफार प्रमाणात ते सगळीकडेच घडतं ना? मग? निदान मिपावर चाळणी तरी नसते...आपल्याला हवं तेच निवडून सर्वत्र 'गुडी गुडी फील' आणण्यासाठी!
बघता बघता कट्टे सगळे गुत्ते होऊन बसले
साहेब....ही फक्त सुरुवात आहे..कट्टे भरण्याची...आगे आगे देखो होता है क्या....
आम्ही बालिश आहोत...मूढही आहो...आम्ही आपल्या परीने कट्टे भरवले...एक कट्टा तर भर दुपारी वाडेश्वरला झाला..खुद्द पुण्यात. प्राजुताई साक्षीला आहेच. तो बरा नाही दिसला..आणि त्यालाही कोणा गुत्ते म्हणणार्याची उपस्थिती नाही दिसली बुवा?
आणी गुत्त्यावर असतात ती भांडणे, शिवीगाळ, आणि बिभत्सपणा...
पुण्यातल्या पहिल्या कट्ट्यावर ॐकारच्या गज़ला, चित्तरशेठच्या गज़ला, डॉ.प्रसाद दाढ्यांच्या आवाजातली सदाबहार गाणी ह्यांचा विसर पडला की काळ्या चष्म्यामुळे दिसलंच नाही?
मिपाचा छापिल अंक काढण्याबद्द्ल झालेली चर्चाही आपल्यास माहित नसेलसं नाही वाटत मला! ह्या गोष्टी गुत्त्यांवर होत नसतात सरकार!!!!!!
असो!
कमीजास्त बोललो असेन तर मिपाचं शेंडेफळ समजुन माफ करा! तुम्हीही मिपाकर आहातच की :) मग घरातल्या लहानांना सांभाळून घेणं मोठ्यांनाच जमतं नै ?
पायरी सोडून बोललो असेन तर चुक पोटात घाला...पण अश्याप्रकारचे हिडीस प्रकार करुन इथलं वातावरण कृपया बिघडवू न्का!
आपला कृपाभिलाषी
- ध मा ल.
कैलास जीवन
प्रयोजन
ह्म्म्म.....
राव साहेब !