दिवेआगरला दोन वेळा जाने झालेले आहे. एकदा मित्रांसोबत आणि एकदा घराच्यासोबत.
मित्रांसोबत गेलो असताना, आम्ही काय धम्माल केली म्हणून सांगू. आठवणी ताज्या झाल्या. सुवर्णगणेशाचे दर्शन झाल्यावर त्यानंतर तेथेच बाजूला एक खानावळ होती, तेथे यथेच्च भरपेट भोजन करून पडलो होतो आम्ही सगळे. अजूनही आठवतंय....
ह्या असल्या आठवणीच जगण्यास एक नवी उमेद देत राहतात. आठवणी जाग्या करून दिल्याबद्दल धन्यवाद.
आम्ही येथे राहीलो होतो.
तसेच इतरही बरेच ठिकाणी घरगुती स्वरूपात राहायची उत्तम सोय होते.
शाकाहारींसाठी सुहास बापटांचे भोजनालय सर्वोत्तम- 02147-224377, 09423837967
मत्स्यप्रेमींसाठी पाटील, पोतनीसांची खानावळ आहेच.
बदामीकर कॉटेज.
जांभ्या दगडाचे घर. खोल्या यथातथाच.
निसर्गरम्य पण राहणे खाणे वगैरेची खास सोय नाही.
एक बीच टच (व्ह्यू नाहीच ) रिसोर्ट आहे, एक्झॉटिका नावाचा. तिथेही व्हॅल्यू फॉर मनी नाहीच. अत्यंत छोट्या (फायबर केबिन असतात टोलनाक्यांजवळ तशा) रूम्स. त्यापेक्षा बदामीकर अर्ध्या किमतीत. (टीव्ही नाही)
खानावळी सगळ्या आधी ऑर्डर देऊन खाणे या स्वरूपाच्या. (तसं ते गणपतिपुळे वगैरे सर्व पिलग्रिमेजला असतंच. अन्न बनवून वाया जाऊ नये म्हणून फक्त ऑर्डरने बनवतात. एकदोन किरकोळ हॉटेलेही आहेत नाश्त्याची..)
मूळ धागाकर्त्यांनी सुरेख धागा लिहिलाय. ते अधिक माहिती देतीलच. नुकताच जाऊन आलोय म्हणून हा आगाऊपणा :)
व्वा वल्ली व्वा !! कोकण म्हंटलं की मला आठवतात ती पावसाळ्यात बांधलेली तात्पुरती संडासं ... आणि फोटु एकदम झकास.
अवांतर : तो उंट नर की मादी ? आणि त्याला शेपुट का नाहीये ?
- (तात्पुरता कोकणी) टल्ली
केवड्याच्या वनाचा फोटो काढला नाही. पण वरून तिसर्या फोटोत सूर्य ज्या झुडूपांमधून दिसतोय ते केवड्याचे वन आहे. दिवेआगराच्या संपूर्ण किनारपट्टीवर ते आडवे पसरलेले आहे.
फोटो मस्तच आले आहेत .
बाकी कोकणाला लाभेल्या निसर्ग सौदर्य व त्याला अमाप अगदी गोव्याहून जास्त पर्यटक मिळवू देऊ शकतो .कारण मुंबई शी असलेली जवळीक .पण गोरे लोक येतील व संस्कृती बुडवातील अशी भीती .
जैत पूर प्रकल्पाला विरोध का तर पर्यावरण/ निसर्ग नष्ट होईल .मग करे तो करे क्या कोकणी चाकरमानी .मुंबईत यायची सोय नाही उरली .तिथे आधीच उपटसुंभ आहेत .उपटलेले .
खरच मल्या जेव्हा अलिबागला आपल्या खाजगी यॉट मधून मुंबईच्या किनार्यातून आपल्या दिनदर्शिकेवरच्या तायांबरोबर अलिशान रिसोर्ट मध्ये जायचा तेव्हा त्याला आम्ही हॉटेल चा स्टाफ साश्रू नयनाने निरोप द्यायचो .
तो जाऊ शकतो .पण विदेशी पर्यटक नको .गोव्याची नि कोकणाची संकृती वेगळी .(पण शेवटी दोन्ही भारताच्या ना )
बाकी लेख थोडा विस्तृत आला असता म्हणजे दळणवळण व मुक्कामच्या सोयी आदी माहिती .तर मुंबईत जाणार्या जर्मन प्रवाशांना येथून
येवा कोकण आपलेच आहे .असा सल्ला देता आला असता .
जाउन आलोय एकदा अलिबाग,काशिद, जंजिरा, दिवे आगार, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, केळ्शी,मंडणगड, दापोली, गणपती पुळे , पावस असा दौरा होता.
कोकण खरोखरच पर्यटनासाठी उत्तम आहे फक्त सोयीसुविधा अजुन अपुरया आहेत बर्याच ठिकाणी. बाकी निसर्ग तर अप्रतिमच.
प्रतिक्रिया
एकदम सुंदर...........
दिवेआगरला दोन वेळा जाने
स्वसंपादन
व्वा ..............काय झक्कास
मस्त. रहाण्याच्या व्यवस्थेची
येथे पहा
धागाकर्त्यांनी सुरेख धागा लिहिलाय.
व्वा वल्ली व्वा !! कोकण
तिथे
कोकण दर्शन ........
मी काशिद अन त्या बाजुला
दुर्दैवाने नाही
मस्त हो वल्ली अप्रतिम
येवा कोकण आपलेच आहे
सगळे फोटो छान! खालून पहिला
छान...
मस्तच